DAPHNE DU MAURIER

About Author

Birth Date : 13/05/1907
Death Date : 19/04/1989


DAME DAPHNE DU MAURIER, LADY BROWNING, DBE WAS AN ENGLISH NOVELIST, BIOGRAPHER AND PLAYWRIGHT. HER PARENTS WERE ACTOR-MANAGER SIR GERALD DU MAURIER AND HIS WIFE, ACTRESS MURIEL BEAUMONT. HER GRANDFATHER WAS GEORGE DU MAURIER, A WRITER AND CARTOONIST.

डॅफने द्यू मोरियेर एक विख्यात इंग्लिश लेखिका आणि नाटककार आहेत. त्यांच्या अनेक साहित्यकृती चित्रपटासाठी स्वीकारल्या गेल्या, ज्यामध्ये रिबेका या १९४१ सालच्या ऑस्कर विजेत्या चित्रपटाचा समावेश होतो. डॅफने यांचा जन्म लंडन येथे झाला. जवळजवळ संपूर्ण आयुष्य त्यांनी कॉर्नवॉल या त्यांच्या आवडत्या ठिकाणी व्यतीत केले. अभिनेत्री म्यूरियेल ब्यूमॉण्ट आणि अभिनेता सर गेराल्ड द्यू मोरियेर हे त्यांचे आई-वडील. अभिनय क्षेत्रातील परिवारात जन्म घेतल्याने साहित्यक्षेत्रातील कारकीर्द सुरू करणे डॅफने यांना सोपे गेले. त्यांनी आपले सुरुवातीचे साहित्य बायस्टॅण्डर या नियतकालिकामधून प्रकाशित केले. १९३१ मध्ये त्यांची द लिव्हिंग स्पिरिट ही पहिली कादंबरी प्रकाशित झाली. समाजात फार न मिसळणार्या, एकान्तवासी अशी त्यांची प्रतिमा होती. प्रसिद्धीच्या झगमगाटापासून दूर रहाणे सोडले, तर एक उमदे आणि विनोदी व्यक्तिमत्त्व म्हणूनच लोक त्यांना ओळखत. कॉर्नवॉल येथील मेनाबिली या त्यांच्या घरी येणार्या लोकांचे त्या खूप मनापासून आदरातिथ्य करीत.१९९६ साली विमेन ऑफ अचिव्हमेंट या नावाने पाच ब्रिटिश टपाल तिकिटांचा संच छापण्याचे ठरले. त्या पाच स्त्रियांमध्ये डॅफने द्यू मोरियेर यांची निवड झाली. त्यांनी आपल्या बहुतेक पुस्तकांचे लेखन जिथे केले त्या कॉर्नवॉल येथील घरीच त्यांचा मृत्यू झाला.
Sort by
Show per page
Items 1 to 2 of 2 total
JAMAICA INN Rating Star
Add To Cart INR 250
MY COUSIN RACHEL Rating Star
Add To Cart INR 575

Shop by

Category Price
      
Latest Edition Year
Author

Latest Reviews

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more

वा. पां. जाधव अमरावती

`अमरावतीचे छप्पन स्वभाव एक मनोरंजक काव्यसंग्रह` `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे अमरावतीचे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री जी. बी. देशमुख यांचे अमरावती नगरीचा सहज स्वभाव व ह्या नगरीच्या वेगळ्या ओळखीवर आधारित मनोरंजक पुस्तक वाचले. वाचून भरपूर मनोरंजन झाले. खर काय लिहावे या लेखकाबद्दल, मन गोंधळले. ऐतिहासिक असो, प्रवास वर्णन असो, व्यक्ती विशेष असो, अनुभवात्मक घटना घडामोडी असो कशावरही सहज लिखाण करणारा हा लेखक आहे. आता तर त्यांनी लेखनाला विनोद प्रचुर फोडणी देऊन `अमरावतीचे छप्पन स्वभाव` या काव्यसंग्रहातून अमरावतीकरांना मनोरंजनाची मेजवानीच दिली आहे. प्रत्येक शहराची व त्या शहरातील वैशिष्ट्यांची एक वेगळीच ओळख असते. दिवस जातात, काळ लोटतो, पिढ्या बदलतात मात्र जुन्या स्मृतीची चिन्हे नवीन येणाऱ्या पिढीच्या मनात गुढ निर्माण करत कायम हाक देत राहतात. अमरावतीही त्याला अपवाद नाही. बापट चौकात चौक नाही, त्या जागेवर चौरस्ता नसून टी-पॉइंट आहे, खापर्डे बगीचा म्हणून आजही ओळख आहे मात्र तेथे बगिचा नाही किंवा प्रसिद्ध गांधी चौकात गांधीचा पुतळा अथवा स्मृतीदर्शक चिन्ह अथवा उल्लेख नाही मात्र गांधी चौक अशीच ओळख जनमानसात आहे. अशा एक ना अनेक विसंगत नाम दर्शक ओळख असलेली उदाहरणे त्यात सप्रमाण आहेत. पण खरी गंमत म्हणजे कधी काळी घडलेला इतिहास त्यामध्ये दडलेला आहे हे निश्चित. या सोबतच अमरावतीकरांच्या स्वभावातला स्थायी मजेदारपणाच्या एक एका हटके गुण वैशिष्ट्याच्या गमती लेखकाने हुबेहूब अधोरेखित केलेल्या आहेत. आणि त्यावरुन तत्सम रचनांचा उहापोह लेखकाने पुस्तकात केला असावा. विदेशात स्थाईक झालेल्या मूळ अमरावतीकरांना लेखकाने लिहिलेल्या गमती मनोरंजनात्मक वाटाव्या एवढी किमया जी.बी. च्या सहज लेखनाने दाखवली आहे. अमरावतीचे अग्रगण्य वृत्तपत्र दै. हिंदुस्थान मध्ये लेखकाने सतत ६ महीणे लिहीलेल्या काव्य सदरात अमरावतीच्या जनमानसाच्या हृदयाच्या ठाव घेणाऱ्या काव्य रचनांचा आठवणींनी महापूर ओसंडून गेला होता. विशेष म्हणजे ह्यात कुठेही अनावश्यक अभिनीवेष नव्हता. उलट गमतीत केलेले आत्मपरिक्षण मात्र काही प्रमाणात होते. वयस्क अमरावतीकर रसिकांना या रचना ताज्या करून त्यांच्या तारुण्यात घेऊन गेल्या हेच खरे. जी बी देशमुख या लेखकास मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रियां वरून दिसून येते. . सदर पुस्तकातील काव्यमय रचना वाचतांना अमरावतीच्या माणसाच्या वऱ्हाडभोळ्या स्वभावाची प्रचीती येते आणि वेगळाच आनंद देऊन जाते. निखळ मनोरंजन करत गुदगुल्या करणारा असा हा काव्यसंग्रह आहे. अमरावती शहराची ऐतिहासिक वैशिष्टे काव्यरूपात वाचण्याचा आनंद अमरावतीकरांना ते जिथं असतील त्या गावात, परगावात, परदेशात पुस्तक मागवून घेता येईल. ...Read more