* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE GUNS OF NAVARONE
  • Availability : Available
  • Translators : ASHOK PADHYE
  • ISBN : 9788184989571
  • Edition : 2
  • Publishing Year : JANUARY 2016
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 328
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :ALISTAIR MACLEAN COMBO SET- 14 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
KEITH MALLORY, A MOUNTAIN CLIMBER FROM NEW ZEALAND, MUST INFILTRATE THE AEGEAN ISLAND OF NAVARONE, AND DESTROY THE GUNS ON THE GERMAN FORTRESS THERE, IN ORDER TO SAVE THE LIVES OF 1,200 BRITISH SOLDIERS. HE GETS A TEAM TOGETHER, BOARDS A SMALL CRAFT, AND HEADS TO NAVARONE. ON THE WAY THERE, HIS SMALL SHIP IS NEARLY DESTROYED IN A STORM, AND HE THEN MUST CLIMB A 400 FOOT SHEER CLIFF IN THE MIDDLE OF THE STORM. IN THE PROCESS, THEY LOSE ALL THEIR FOOD, AND ONE OF THEIR TEAM MEMBERS BREAKS HIS LEG. THE NEXT SECTION OF THE BOOK DESCRIBES THEIR WORKING THEIR WAY OVER TO THE OTHER SIDE OF THE ISLAND OF NAVARONE, WHILE DODGING GERMAN PATROLS, AND NURSING THEIR WOUNDED COMRADE. THEY MEET UP WITH THE RESISTANCE MOVEMMENT ON NAVARONE, BUT THE GERMANS KEEP ON THEIR TRAIL. THEY SOON FIND OUT THAT ONE OF THE RESISTANCE MEN WAS GIVING THEM AWAY AND HAVE NEARLY HALF THEIR TEAM CAPTURED. THEY BREAK THEM OUT AND BLOW UP THE GUNS, AND THEN ARE ABLE TO ESCAPE ONTO A WAITING BRITISH SUBMARINE
दुसऱ्या महायुद्धात ‘खेरोस’ या छोट्या बेटावर १२०० ब्रिटिश सैनिक अडकून पडले होते. हे बेट तुर्कस्तानच्या जवळ होते. त्यांना सोडवायला जाणाऱ्या बोटींना नॅव्हारन बेटावरील महाकाय तोफांचा अडथळा होता. त्या तोफा त्यांच्या समोरच्या समुद्रातील कोणतेही जहाज सहज बुडवू शकत होत्या. नॅव्हारनवर एक भक्कम किल्ला होता. तिथे जर्मन व इटालियन सैन्य होते. अशा या तोफा नष्ट करायला मूठभर माणसांची तुकडी बेटाच्या मागच्या कड्यावरून चढून वर पोचली. खेरोस बेटावरील सैनिकांना सोडविण्यास येणारे ब्रिटिश आरमार, तोफांचे त्यावर धरले जाणारे नेम आणि त्या नष्ट करण्यासाठी पुढे सरकलेली ती मूठभर घातपात्यांची तुकडी यांच्यात शर्यत लागली. शेवटी कोण जिंकले ?

No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #THEGUNSOFNAVARONE #THEGUNSOFNAVARONE #दगन्सऑफनॅव्हारन #FICTION #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #ASHOKPADHYE #अशोकपाध्ये #ALISTAIRMACLEAN "
Customer Reviews
  • Rating StarMahesh S

    दुसऱ्या महायुद्धात ‘खेरोस’ या छोट्या बेटावर १२०० ब्रिटिश सैनिक अडवून पडले होते. हे बेट तुर्कस्तानच्या जवळ होते. त्यांना सोडवायला जाणाऱ्या बोटींना नॅव्हारन बेटावरील महाकाय तोफांचा अडथळा होता. त्या तोफा त्यांच्या समोरच्या समुद्रातील कोणतेही जहाज सहज बुवू शकत होत्या. नॅव्हारनवर एक भक्कम किल्ला होता. तिथे जर्मन व इटालियन सैन्य होते. अशा या तोफा नष्ट करायला मूठभर माणसांची तुकडी बेटाच्या मागच्या कड्यावरून चढून वर पोचली. खेरोस बेटावरील सैनिकांना सोडविण्यास येणारे ब्रिटिश आरमार, तोफांचे त्यावर धरले जाणारे नेम आणि त्या नष्ट करण्यासाठी पुढे सरकलेली ती मूठभर घातपात्यांची तुकडी यांच्यात शर्यत लागली. शेवटी कोण जिंकले? ...Read more

  • Rating StarMAHARASHTRA TIMES 27-03

    खिळवून ठेवणारी युद्धकथा... युद्धकथा, साहसकथा यांकडे वाचकांचा कामयच मोठा ओढा राहिलेला आहे, मग तो पाश्चात्त्य वाचक असो वा भारतीय. इंग्रजी वाचकांनी डोक्यावर घेतलेल्या अ‍ॅलिस्टर मॅक्लीन या युद्धकथा लेखकाची ‘द गन्स ऑफ नॅव्हारन’ ही कादंबरी.’ दुसऱ्या महायु्धातील एका काल्पनिक लढाईवर आधारलेली ही इंग्रजी कादंबरी वेगवान कथानक, क्षणोक्षणी उत्कंठा वाढवणारी वर्णनात्मक शैली आणि लष्करी डावपेचांचे रंजक तपशील, यांमुळे लोकप्रिय ठरली होती. १९५७ मध्ये प्रसिद्ध झालेल्या या कादंरीवर साठीच्या दशकात प्रदर्शित झालेला त्याच नावाचा चित्रपटही अफाट यशस्वी ठरला होता. अशा या वेगवेगळ्या माध्यमात पसंती मिळवलेल्या कथानकाचा अशोक पाध्ये यांनी केलेला मराठी अनुवादही तितकाच खिळवून ठेवणारा आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या ऐन धामधुमीत भूमध्य समुद्रातील एका बेटावर अडकून पडलेल्या बाराशे ब्रिटिश सैनिकांची सुटका करण्याच्या मार्गातील मोठा अडथळा असलेल्या नॅव्हारन नामक बेटावरच्या अजस्त्र तोफा नष्ट करण्याची, विमाने आणि आरमाराच्या ताफ्यांना प्रयत्नांनी न जमलेली जबाबदारी कॅप्टन कीथ मॅलरी आणि त्याच्या चार सहकाऱ्यांच्या खांद्यावर येऊन पडते. खिळखिळ्या बोटीतून सुरू झालेला त्यांचा प्रवास समुद्रातील वादळ, नॅव्हारन बेटावर पोहोचल्यावर सरळसोट उभा कडा, हाडे गोठवणारी थंडी, जायबंदी झालेला सहकारी अशा सगळ्या संकटांच्या मालिका घेऊन येतो. अधूनमधून भेटणाऱ्या शत्रू सैनिकांना कधी आपल्या वेशांतराने चकवत तर कधी लष्करी सराईतपणे दोन हात करत आपल्या लक्ष्याच्या, तोफांच्या दिशेने ही तुकडी मार्गक्रमण करते, हा सगळा प्रवास अत्यंत रोमांचक, वेगवान आहे. लेखक मॅक्लीन यांनी स्वत: काही वर्षे नौदलातील कामाचा अनुभव घेतलेला असल्यामुळे कथेत उतरलेल्या बारीकसारीक तपशिलांमुळे हा थरार वाढत जातो. कथा पुढे सरकण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या भौगोलिक प्रदेशाचे वर्णन एवढे बारकाईने आले आहे की, नकाशासह तेथील समुद्र, बेटे, किल्ला, गुहा आदी तपशील चित्रासारखे डोळ्यापुढे उतरत जातात. या गुप्त मोहिमेचा नेता न्यूझीलंडचा गिर्यारोहक कॅप्टन मॅलरी, कोणत्याही परिस्थितीत हार न मानणारा ग्रीक अँड्रिया, अमेरिकन धूर्त-हिकमती मिलर, अनुनभवी-कोवळा स्टीव्हन्स, तंत्रज्ञ ब्राऊन आणि त्यांना नॅव्हारनमध्ये भेटणारे लुकी, पनायीस या सर्वांच्या व्यक्तिरेखा वैशिष्ट्यपूर्ण आहेत शिवाय, युद्धकथा असली, तरी रक्तपाताची भडक वर्णने नसल्याने कादंबरी रक्तरंजित होत नाही. मॅक्लीन यांच्या युद्धकथेचा सर्व भर सहज वर्णन, खिळवून ठेवणारी शैली यावर आहे. हा सर्व थरार मराठी अनुवादातही तितक्याच सहजपणे उतरला आहे. अ‍ॅलिस्टर मॅक्लीन यांच्या अनेक कादंबऱ्या मेहता पब्लिशिंग हाऊसने मराठीत अनुवादित केल्या आहेत. या मालिकेतील ही नवीन कादंबरी युद्धकथाप्रेमींच्या निश्चितच पसंतीस उतरेल, अशी आहे. ...Read more

  • Rating StarKIRAN BORKAR 16.03.17

    1961 साली प्रदर्शित झालेला" द गन्स ऑफ नॅव्हारन हा चित्रपट दुसऱ्या महायुद्धातील एका गोष्टीवर बेतला होता . तेव्हाचा सुपरस्टार ग्रेगरी पेक ह्याने मुख्य भूमिका केली होती . खैसर या बेटावर अडकलेल्या 1200 ब्रिटिश सैनिकांची सुटका करण्यासाठी एका चार जणांच्या थकाची नियुक्ती होते . खैसर बेटाजवळ जाणाऱ्या बोटींना प्रमुख अडथळा होता तो नॅव्हरान बेटावरील किल्ल्यावर असलेल्या महाकाय तोफांचा .त्या तोफा नष्ट करण्यासाठी उंच कडा पार करून जाणे भाग होते . त्या तोफा नष्ट करायची कामगिरी या पथकावर सोपवली जाते . जर्मन आणि इटालियन सैनिकांच्या कडक पहाऱ्यात आणि ब्रिटिश आरमाराच्या बोटी नष्ट करण्याआधीच तो उंच कडा पार करून त्या तोफा नष्ट करणे जरुरीचे होते . अतिशय थरारक अशी कादंबरी . ...Read more

  • Rating StarDAINIK AIKYA 08-05-2016

    दुसऱ्या महायुद्धात ‘खेरोस’ या छोट्या बेटावर १२०० ब्रिटिश सैनिक अडकून पडले होते. हे बेट तुर्कस्तानच्या जवळ होते. त्यांना सोडवायला जाणाऱ्या बोटींना नॅव्हारन बेटावरील महाकाय तोफांचा अडथळा होता. त्या तोफा त्यांच्या समोरच्या समुद्रातील कोणतेही जहाज सहज बुवू शकत होत्या. नॅव्हारनवर एक भक्कम किल्ला होता. तिथे जर्मन आणि इटालियन सैन्य होते. अशा या तोफा नष्ट करायला मूठभर माणसांची तुकडी बेटाच्या मागच्या कड्यावर चढून वर पोचली. खेरोस बेटावरील सैनिकांना सोडविण्यास येणारे ब्रिटिश आरमार, तोफांचे त्यावर धरले जाणारे नेम आणि त्या नष्ट करण्यासाठी पुढे सरकलेली ती मूठभर घातपात्यांची तुकडी’ यांच्यात शर्यत लागली. शेवटी कोण जिंकले? ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

A-AMITABHCHA
A-AMITABHCHA by G.B. DESHMUKH Rating Star
प्रा. डॉ . वैशाली रवी देशमुख, अमरावती

वाचनाचे फायदे सांगताना प्रसिद्ध इंग्रजी लेखक फ्रान्सिस बेकन म्हणतो `रीडिंग मेकेथ अ फुल मॅन`. वाचनामुळे माणूस परिपूर्ण होतो. क्वचित एखादं असं पुस्तक हाती येतं जे वाचल्यानंतर ह्या परिपूर्णतेची , आत्यंतिक समाधानाची जाणीव होते . नुकतंच जी. बी. देशुख यांचं `अ- अमिताभचा` हे पुस्तक हाती पडलं एका बैठकीत ते वाचून संपवलं आणि काहीतरी माहितीपर तरीही दर्जेदार आणि साहित्यिक मूल्य असणारं पुस्तक वाचण्याचा आनंद प्राप्त झाला. सीमा आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात काम करून निवृत्त झालेल्या जीबी देशमुखांनी २०२० मध्ये अमिताभ बच्चनच्या कारकिर्दीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त त्यांच्या विविध ५० सिनेमातील भूमिकांचे विश्लेषण करणारे साप्ताहिक सदर दैनिक सकाळ मध्ये प्रकाशित केले. कोरोना काळात लिहिलेल्या या लेखमालेला त्यावेळी प्रचंड प्रतिसाद मिळाला. केवळ ज्येष्ठच नाही तर तरुण वाचकांनीही या लेखमालिकेला पसंतीची पावती दिली. २०२२ मध्ये मेहता पब्लिकेशनने अमिताभ बच्चनच्या एकूण ६२ सिनेमांवर आधारित लेख `अ अमिताभचा` या पुस्तक रूपाने प्रकाशित केले. १९६९ पासून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीला पाच दशकांपेक्षा अधिक काळ लोटला तरीही त्याचे सिनेरसिकांच्या भावविश्वावर असलेले अधिराज्य कायम आहे. ती जादू कमी ओसरण्याचं नावच घेत नाही तर ती दिवसेंदिवस वाढत आहे . किरकोळ शरीरयष्टी, भरमसाठ उंची आणि सौंदर्याच्या साचेबंद व्याख्येत न बसणारा चेहरा असलेला अमिताभ आणि त्याला मिळालेली अफाट लोकप्रियता याची सांगड घालणे सर्वसामान्य व्यक्तीच्या आकलनापलीकडचे आहे. अमिताभ बच्चनचे प्रचंड चाहते असलेले जी . बी देशमुख यांच्यासाठी `अ` हा अमिताभचाच आहे. परंतु केवळ एक चाहते म्हणून त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं नाही तर अमिताभ बच्चनचे जे गारुड कित्येक दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर आहे त्यामागची नेमकी कारणे कोणती असू शकतात हे अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने शोधण्याचा प्रयत्न त्यांनी या पुस्तकात केलेला आहे. एक रसिक, चोखंदळ प्रेक्षक, अभ्यासक आणि समीक्षक म्हणून या पुस्तकात लेखक आपल्या समोर येतात. `बेमिसाल` पासून `झुंड` या चित्रपटा पर्यंत अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीतील उत्तमोत्तम ६२ सिनेमांचा लेखकांनी या पुस्तकात परामर्ष घेतलेला आहे. या चित्रपटांमधील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित सर्व बाबींचे अत्यंत अभ्यास पूर्वक रसग्रहण केलेले आहे. `अमिताभ बच्चन चांगला कलाकार आहे` किंवा `अमुक अमुक चित्रपट चांगला आहे` असं जेव्हा एखादा सर्वसामान्य प्रेक्षक म्हणतो त्यावेळेस हे आवडणं किंवा चांगलं असणं नेमकं का आहे याची उत्तरं देण्याचा प्रयत्न लेखकाने प्रत्येक लेखात केलेला आहे. प्रत्येक चित्रपटातील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित हायलाइट्स जसे की, एखादा उत्कट प्रसंग, गाणे, नृत्य, मारामारीचे दृश्य यावर लेखकाने प्रकाश टाकलेला आहे. आपण जर तो चित्रपट पाहिला असेल तर लेखकाने वर्णन केलेले प्रसंग जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहतात आणि बघितला नसेल तर तो चित्रपट आपण पाहिलाच पाहिजे अशी तीव्र इच्छा मनात निर्माण होते. उदाहरणार्थ, शोले या चित्रपटातील रसग्रहणात ,चेहऱ्यावरचे रेषाही ढळू न देता अमिताभने फेकलेले वन लाइनर्स, बुद्धीची चमक दाखवणारे शांतपणे केलेले विनोद, हळुवार प्रेमासाठी त्याचं आतल्या आत झुरणं , मित्राच्या मांडीवर प्राणत्यागाचे उत्कट दृश्य, आणि पिढ्यानपिढ्या लक्षात राहिलेला मावशी लीला मिश्रा सोबतचा विनोदी संवाद यांचे परिणामकारक वर्णन करून त्यांनी अमिताभची उत्तुंग अभिनय क्षमता उलगडून दाखवली आहे. या पुस्तकाला वाचनीय बनवणारा एक घटक म्हणजे लेखकाने वापरलेली भाषा. अत्यंत साध्या, सोप्या आणि अनुभवातून आलेल्या शब्दातून लेखकाने अमिताभ बच्चन भूमिकांचा उत्तरोत्तर चढत जाणारा आलेख शब्दांकित केला आहे. लेखकाच्या भाषा प्रभुत्वाचे साक्ष देणारी अनेक वाक्य पुस्तकांमध्ये जागजागी आढळतात. एका ठिकाणी ते लिहितात, `अमिताभने सिनेमातील विनोदाची सूत्र हाती घेतली तेव्हापासून विनोदी कलाकारांवर जणू बेकारीचं संकट कोसळलं होतं. प्रेक्षकांना दिलेल्या मनोरंजनाच्या वचनाशी `नमक हलाली` करणाऱ्या प्रकाश मेहरा आणि अमिताभ या जोडीने प्रेक्षकांना `और हम नाचे बिन घुंगरू के` असा आनंद दिला होता. असेच एक सुंदर वाक्य- `अमिताभचा उंट मनोरंजनाचा अख्खा तंबू व्यापून बसला होता`. लेखकाच्या ओघवत्या आणि मनाला भिडणाऱ्या भाषा शैलीचं एक उदाहरण मिली चित्रपटाच्या रसग्रहणातील या परिषदेतून दिसून येत: "शेखरच्या मनावर चढलेली उदासीची पुटं अमिताभच्या कसदार अभिनयामुळे आपल्याला अस्वस्थ,उदास करून सोडतात. दारूच्या नशेतील अमिताभचं एक दृश्य मस्त जमलं होतं . मोबाईल, टीव्ही इत्यादी आधुनिक साधनं व्यवहारात येण्याच्या आधीचा तो काळ होता. मिली आजारामुळे घरात बंदिस्त झाल्यानंतर त्या दोघात नोकराच्या माध्यमातून जो पत्र व्यवहार होतो तो आजच्या मोबाईल चॅटिंग पेक्षाही प्रभावी वाटतो. रोज मिलीला वरच्या मजल्यावरून खालच्या मजल्यावर गुलदस्ता पाठवणारा अमिताभ एका चिठ्ठीत लिहितो `जो गुलदस्ता बनके खुद आ जाऊ तो कहा रखुं . ` हे रोमँटिसिझम खूप वरच्या स्तराचं होतं. अमर्याद दुःखाची वीण घट्ट करत जाताना किशोर कुमारच्या दर्दभऱ्या स्वरात `बडी सुनी, सुनी है जिंदगी ये जिंदगी` आणि `आये तुम याद मुझे गाने लगी हर धडकन` ही दोन गाणी वातावरण औदासिन्यानं भरून टाकतात. मनाचा चांगला पण लहानपणी आई वडिलांच्या बाबतीत घडलेल्या घटनेने आणि लोकांनी त्याकरिता डिवचल्यानं कच खाल्लेला, प्रेमाची आस लागलेला एक तरुण अमिताभने लाजवाब रंगवला होता. या पुस्तकाच्या रंजकतेत भर टाकणारा आणखी एक घटक म्हणजे लेखकाचे आत्मचरित्रात्मक निवेदन. प्रत्येक चित्रपटाच्या बाबतीत तो चित्रपट त्यांनी केव्हा पाहिला, कुणाबरोबर पाहिला,त्यावेळी ते किती वर्षांचे होते आणि त्या चित्रपटाचा त्यांच्या भावविश्वावर कसा परिणाम झाला याचा उल्लेख जागजागी केलेला आहे. लेखकाच्या पिढीतील वाचकांना यातून पुनः प्रत्ययाचा आनंद मिळतो. आणि आजच्या पिढीतील इतर वाचकांसाठीही ही बाब रंजक ठरते. पुस्तकाच्या मलपृष्ठावर लेखक म्हणतात, `1973 साली आम्ही पाचवीत असताना आम्हाला प्रथमच हिंदी सिनेमातील नायकाची `ये पोलीस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नही`, अशी आगळीवेगळी मिजास पडद्यावर बघायला मिळाली आणि आता निवृत्तीला आलो तर हाच अद्भुत माणूस आम्हाला `पिंक` या महिलाप्रधान सिनेमात `ना का मतलब सिर्फ ना होता है`, असं ठणकावतो, `बदला` ह्या रहस्यपटात तितक्याच जोरकसपणे `सबका सच अलग अलग होता है ,` असं तत्वज्ञान मांडतो आणि अगदी अलीकडच्या `झुंड` मध्ये झोपडपट्टीतील धटिंगण मुलांच्या घोळक्याला `झुंड नाही, टीम... `म्हणायची शिकवण देतो तेव्हा आजही त्याचं म्हणणं आमच्या हृदयात थेट उतरतं .` पुस्तक वाचत असताना लेखकाच्या अफाट निरीक्षणशक्तीचे आणि अभ्यासू वृत्तीचे दर्शन घडते . विविध दिग्दर्शकांनी अमिताभच्या अभिनयक्षमतेचा केलेला वापर , अमिताभच्या डोळ्यातून सशक्तपणे व्यक्त झालेले हृदयस्पर्शी भाव, वेगवेगळ्या चित्रपटात त्याने केलेला लाथेचा उपयोग, त्याची वैशिष्ट्यपूर्ण नृत्य, आणि भारदस्त आवाजातील संवाद आणि गाणी यांचं वर्णन वाचत असताना लेखकाची संशोधक वृत्ती तर जाणवतेच परंतु आपणही हे चित्रपट पाहून हा रसास्वाद घ्यायलाच हवा ही इच्छा वाचकांच्या मनात प्रकर्षाने निर्माण होते.यातच या पुस्तकाचे फार मोठे यश सामावले आहे हे नक्की! ...Read more

SAAD GHALATO KALAHARI
SAAD GHALATO KALAHARI by MARK & DELIA OWENS Rating Star
मोहन देशपांडे नागपुर

cry of kalahari ह्या पुस्तके अनुवाद हिंदी सर्वोत्तम (RD) मध्ये कित्येक वर्षापूर्वी वाचले होते. माझ्याजवळ, जपून ठेवलेल्या पुस्तकामधे ते पुस्तक गहाळ झाले. मग 4 वर्षापूर्वी हे पुस्तक मिळाले व विकत घेतले. ते अनेक वेळा वाचून काढले, तरी प्रत्येकवेळी वेगळा नंद होतो. ती तुमची रसाळ भाषेची किमया. ह्या मुळेच Deceiption valley एकदा तरी बघता यावी ही इच्छा तुमचे अभिनंदन व धन्यवाद... ...Read more