* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE GUNS OF NAVARONE
  • Availability : Available
  • Translators : ASHOK PADHYE
  • ISBN : 9788184989571
  • Edition : 2
  • Publishing Year : JANUARY 2016
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 328
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :ALISTAIR MACLEAN COMBO SET- 14 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
KEITH MALLORY, A MOUNTAIN CLIMBER FROM NEW ZEALAND, MUST INFILTRATE THE AEGEAN ISLAND OF NAVARONE, AND DESTROY THE GUNS ON THE GERMAN FORTRESS THERE, IN ORDER TO SAVE THE LIVES OF 1,200 BRITISH SOLDIERS. HE GETS A TEAM TOGETHER, BOARDS A SMALL CRAFT, AND HEADS TO NAVARONE. ON THE WAY THERE, HIS SMALL SHIP IS NEARLY DESTROYED IN A STORM, AND HE THEN MUST CLIMB A 400 FOOT SHEER CLIFF IN THE MIDDLE OF THE STORM. IN THE PROCESS, THEY LOSE ALL THEIR FOOD, AND ONE OF THEIR TEAM MEMBERS BREAKS HIS LEG. THE NEXT SECTION OF THE BOOK DESCRIBES THEIR WORKING THEIR WAY OVER TO THE OTHER SIDE OF THE ISLAND OF NAVARONE, WHILE DODGING GERMAN PATROLS, AND NURSING THEIR WOUNDED COMRADE. THEY MEET UP WITH THE RESISTANCE MOVEMMENT ON NAVARONE, BUT THE GERMANS KEEP ON THEIR TRAIL. THEY SOON FIND OUT THAT ONE OF THE RESISTANCE MEN WAS GIVING THEM AWAY AND HAVE NEARLY HALF THEIR TEAM CAPTURED. THEY BREAK THEM OUT AND BLOW UP THE GUNS, AND THEN ARE ABLE TO ESCAPE ONTO A WAITING BRITISH SUBMARINE
दुसऱ्या महायुद्धात ‘खेरोस’ या छोट्या बेटावर १२०० ब्रिटिश सैनिक अडकून पडले होते. हे बेट तुर्कस्तानच्या जवळ होते. त्यांना सोडवायला जाणाऱ्या बोटींना नॅव्हारन बेटावरील महाकाय तोफांचा अडथळा होता. त्या तोफा त्यांच्या समोरच्या समुद्रातील कोणतेही जहाज सहज बुडवू शकत होत्या. नॅव्हारनवर एक भक्कम किल्ला होता. तिथे जर्मन व इटालियन सैन्य होते. अशा या तोफा नष्ट करायला मूठभर माणसांची तुकडी बेटाच्या मागच्या कड्यावरून चढून वर पोचली. खेरोस बेटावरील सैनिकांना सोडविण्यास येणारे ब्रिटिश आरमार, तोफांचे त्यावर धरले जाणारे नेम आणि त्या नष्ट करण्यासाठी पुढे सरकलेली ती मूठभर घातपात्यांची तुकडी यांच्यात शर्यत लागली. शेवटी कोण जिंकले ?

No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #THEGUNSOFNAVARONE #THEGUNSOFNAVARONE #दगन्सऑफनॅव्हारन #FICTION #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #ASHOKPADHYE #अशोकपाध्ये #ALISTAIRMACLEAN "
Customer Reviews
  • Rating StarMahesh S

    दुसऱ्या महायुद्धात ‘खेरोस’ या छोट्या बेटावर १२०० ब्रिटिश सैनिक अडवून पडले होते. हे बेट तुर्कस्तानच्या जवळ होते. त्यांना सोडवायला जाणाऱ्या बोटींना नॅव्हारन बेटावरील महाकाय तोफांचा अडथळा होता. त्या तोफा त्यांच्या समोरच्या समुद्रातील कोणतेही जहाज सहज बुवू शकत होत्या. नॅव्हारनवर एक भक्कम किल्ला होता. तिथे जर्मन व इटालियन सैन्य होते. अशा या तोफा नष्ट करायला मूठभर माणसांची तुकडी बेटाच्या मागच्या कड्यावरून चढून वर पोचली. खेरोस बेटावरील सैनिकांना सोडविण्यास येणारे ब्रिटिश आरमार, तोफांचे त्यावर धरले जाणारे नेम आणि त्या नष्ट करण्यासाठी पुढे सरकलेली ती मूठभर घातपात्यांची तुकडी यांच्यात शर्यत लागली. शेवटी कोण जिंकले? ...Read more

  • Rating StarMAHARASHTRA TIMES 27-03

    खिळवून ठेवणारी युद्धकथा... युद्धकथा, साहसकथा यांकडे वाचकांचा कामयच मोठा ओढा राहिलेला आहे, मग तो पाश्चात्त्य वाचक असो वा भारतीय. इंग्रजी वाचकांनी डोक्यावर घेतलेल्या अ‍ॅलिस्टर मॅक्लीन या युद्धकथा लेखकाची ‘द गन्स ऑफ नॅव्हारन’ ही कादंबरी.’ दुसऱ्या महायु्धातील एका काल्पनिक लढाईवर आधारलेली ही इंग्रजी कादंबरी वेगवान कथानक, क्षणोक्षणी उत्कंठा वाढवणारी वर्णनात्मक शैली आणि लष्करी डावपेचांचे रंजक तपशील, यांमुळे लोकप्रिय ठरली होती. १९५७ मध्ये प्रसिद्ध झालेल्या या कादंरीवर साठीच्या दशकात प्रदर्शित झालेला त्याच नावाचा चित्रपटही अफाट यशस्वी ठरला होता. अशा या वेगवेगळ्या माध्यमात पसंती मिळवलेल्या कथानकाचा अशोक पाध्ये यांनी केलेला मराठी अनुवादही तितकाच खिळवून ठेवणारा आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या ऐन धामधुमीत भूमध्य समुद्रातील एका बेटावर अडकून पडलेल्या बाराशे ब्रिटिश सैनिकांची सुटका करण्याच्या मार्गातील मोठा अडथळा असलेल्या नॅव्हारन नामक बेटावरच्या अजस्त्र तोफा नष्ट करण्याची, विमाने आणि आरमाराच्या ताफ्यांना प्रयत्नांनी न जमलेली जबाबदारी कॅप्टन कीथ मॅलरी आणि त्याच्या चार सहकाऱ्यांच्या खांद्यावर येऊन पडते. खिळखिळ्या बोटीतून सुरू झालेला त्यांचा प्रवास समुद्रातील वादळ, नॅव्हारन बेटावर पोहोचल्यावर सरळसोट उभा कडा, हाडे गोठवणारी थंडी, जायबंदी झालेला सहकारी अशा सगळ्या संकटांच्या मालिका घेऊन येतो. अधूनमधून भेटणाऱ्या शत्रू सैनिकांना कधी आपल्या वेशांतराने चकवत तर कधी लष्करी सराईतपणे दोन हात करत आपल्या लक्ष्याच्या, तोफांच्या दिशेने ही तुकडी मार्गक्रमण करते, हा सगळा प्रवास अत्यंत रोमांचक, वेगवान आहे. लेखक मॅक्लीन यांनी स्वत: काही वर्षे नौदलातील कामाचा अनुभव घेतलेला असल्यामुळे कथेत उतरलेल्या बारीकसारीक तपशिलांमुळे हा थरार वाढत जातो. कथा पुढे सरकण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या भौगोलिक प्रदेशाचे वर्णन एवढे बारकाईने आले आहे की, नकाशासह तेथील समुद्र, बेटे, किल्ला, गुहा आदी तपशील चित्रासारखे डोळ्यापुढे उतरत जातात. या गुप्त मोहिमेचा नेता न्यूझीलंडचा गिर्यारोहक कॅप्टन मॅलरी, कोणत्याही परिस्थितीत हार न मानणारा ग्रीक अँड्रिया, अमेरिकन धूर्त-हिकमती मिलर, अनुनभवी-कोवळा स्टीव्हन्स, तंत्रज्ञ ब्राऊन आणि त्यांना नॅव्हारनमध्ये भेटणारे लुकी, पनायीस या सर्वांच्या व्यक्तिरेखा वैशिष्ट्यपूर्ण आहेत शिवाय, युद्धकथा असली, तरी रक्तपाताची भडक वर्णने नसल्याने कादंबरी रक्तरंजित होत नाही. मॅक्लीन यांच्या युद्धकथेचा सर्व भर सहज वर्णन, खिळवून ठेवणारी शैली यावर आहे. हा सर्व थरार मराठी अनुवादातही तितक्याच सहजपणे उतरला आहे. अ‍ॅलिस्टर मॅक्लीन यांच्या अनेक कादंबऱ्या मेहता पब्लिशिंग हाऊसने मराठीत अनुवादित केल्या आहेत. या मालिकेतील ही नवीन कादंबरी युद्धकथाप्रेमींच्या निश्चितच पसंतीस उतरेल, अशी आहे. ...Read more

  • Rating StarKIRAN BORKAR 16.03.17

    1961 साली प्रदर्शित झालेला" द गन्स ऑफ नॅव्हारन हा चित्रपट दुसऱ्या महायुद्धातील एका गोष्टीवर बेतला होता . तेव्हाचा सुपरस्टार ग्रेगरी पेक ह्याने मुख्य भूमिका केली होती . खैसर या बेटावर अडकलेल्या 1200 ब्रिटिश सैनिकांची सुटका करण्यासाठी एका चार जणांच्या थकाची नियुक्ती होते . खैसर बेटाजवळ जाणाऱ्या बोटींना प्रमुख अडथळा होता तो नॅव्हरान बेटावरील किल्ल्यावर असलेल्या महाकाय तोफांचा .त्या तोफा नष्ट करण्यासाठी उंच कडा पार करून जाणे भाग होते . त्या तोफा नष्ट करायची कामगिरी या पथकावर सोपवली जाते . जर्मन आणि इटालियन सैनिकांच्या कडक पहाऱ्यात आणि ब्रिटिश आरमाराच्या बोटी नष्ट करण्याआधीच तो उंच कडा पार करून त्या तोफा नष्ट करणे जरुरीचे होते . अतिशय थरारक अशी कादंबरी . ...Read more

  • Rating StarDAINIK AIKYA 08-05-2016

    दुसऱ्या महायुद्धात ‘खेरोस’ या छोट्या बेटावर १२०० ब्रिटिश सैनिक अडकून पडले होते. हे बेट तुर्कस्तानच्या जवळ होते. त्यांना सोडवायला जाणाऱ्या बोटींना नॅव्हारन बेटावरील महाकाय तोफांचा अडथळा होता. त्या तोफा त्यांच्या समोरच्या समुद्रातील कोणतेही जहाज सहज बुवू शकत होत्या. नॅव्हारनवर एक भक्कम किल्ला होता. तिथे जर्मन आणि इटालियन सैन्य होते. अशा या तोफा नष्ट करायला मूठभर माणसांची तुकडी बेटाच्या मागच्या कड्यावर चढून वर पोचली. खेरोस बेटावरील सैनिकांना सोडविण्यास येणारे ब्रिटिश आरमार, तोफांचे त्यावर धरले जाणारे नेम आणि त्या नष्ट करण्यासाठी पुढे सरकलेली ती मूठभर घातपात्यांची तुकडी’ यांच्यात शर्यत लागली. शेवटी कोण जिंकले? ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more