RAJSHREE NAWARE

About Author


RAJSHREE NAVARE IS A CELEBRITY IN THE FIELD OF MICROWAVE COOKING. FAMOUS WRITER SHRI. RAJSHREE WAS BORN IN SHIVAJI PARK, MUMBAI, THE DAUGHTER OF ACHYUT BARVE AND MANGALA BARVE, AUTHOR OF ANNAPURNA. HE DID HIS SCHOOLING AT CANOSA CONVENT, MAHIM. HE GRADUATED FROM PODDAR COLLEGE, MATUNGA. HIS MOTHER INTRODUCED HIM TO COOKING AT A VERY YOUNG AGE.

राजश्री नवरे या मायक्रोवेव्ह कुकिंग या क्षेत्रातील ख्यातनाम व्यक्ती आहेत. प्रसिद्ध लेखक श्री. अच्युत बर्वे आणि अन्नपूर्णा च्या लेखिका मंगला बर्वे यांच्या कन्या राजश्री यांचा जन्म शिवाजी पार्क, मुंबई येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण कॅनोसा कॉन्व्हेंट , माहीम येथे झाले. पोद्दार कॉलेज, माटुंगा येथून त्यांनी पदवी संपादन केली. खूप लहान वयातच त्यांच्या आईने पाककलेशी त्यांचा परिचय करून दिला. त्यांनी मात्र लग्नानंतरच यात रुची दाखवली. आखाती देशात बराच काळ वास्तव्य आणि इतर अनेक देशांत भ्रमंती यामुळे स्वयंपाकाची अत्याधुनिक साधने वापरून खाद्यपदार्थ बनवण्याचा त्यांना अनुभव मिळाला. हळूहळू मायक्रोवेव्ह कुकिंग हा त्यांचा अत्यंत आवडीचा छंद बनला. अनेक प्रसिद्ध शेफ्सकडून त्यांनी पाककलेचे धडे घेतले. शिवाय आई आणि सासूबार्इंकडूनही त्यांना मोलाचे मार्गदर्शन मिळाले. २००० साली भारतात अत्यंत नवीन असलेल्या मायक्रोवेव्ह कुकिंगची प्रात्यक्षिके दाखवणाऱ्या काही मोजक्या व्यक्तींपैकी त्या एक होत्या. अनेक नामांकित कंपन्यांसाठीही त्यांनी प्रात्यक्षिके केली. त्यांची सूचना देण्याची शैली आणि मायक्रोवेव्हमध्ये करता येतील अशा पारंपरिक महाराष्ट्रीयन पदार्थांच्या सोप्या कृती लोकांना इतक्या भावल्या, की दोन वर्षांच्या आतच त्यांनी पन्नासहून अधिक ठिकाणी प्रात्यक्षिके केली. भारतीय आणि परदेशी पदार्थ शिकवण्याचे वर्ग त्या चालवतात. मुंबईतील अनेक पाककृती स्पर्धांच्या परीक्षक म्हणून त्यांनी काम केले आहे. २००५ साली गोदरेज वं पनीच्या मायक्रोवेव्ह ओव्हन्सबरोबर दिल्या जाणाऱ्या पुस्तकाचे संकलन आणि संपादन करण्याची संधी त्यांना मिळाली. नियतकालिके आणि वर्तमानपत्रांमधून त्यांचे अनेक लेख प्रसिद्ध झाले आहेत. रेडिओवरही मायक्रोवेव्ह कुकिंग या विषयावरील त्यांचे कार्यक्रम प्रसारित झाले आहेत.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
SWAYAMPAK GHARATIL NAVA MITRA : MICR... Rating Star
Add To Cart INR 120

Latest Reviews

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
डॉ शिंदे निलेश, अमरावती

`कुलमामाच्या देशात` वाचून काढले. प्रत्येक कथा खुप वाचनीय आहे. `कपारीत वाघोबा` मध्ये रवींद्र वानखडे ह्यांनी पहाटे चार ते 10 नुसती भ्रमंती केली आहे.. सकाळची सूर्यकिरण अंगावर पडली असताना वाघ बघायला भेटणं ही एक अप्रूप वाटणारी गोष्ट आहे. `डरकाळीचा रार` वानखडे साहेबांनी बेलसरें सोबत अनुभवला आहे. `जिवाची पर्वा` न करता वानखडे साहेब पाळण्यात विसावले होते. गव्याच्या पिलावर वाघीणीने हल्ला केला नाही.. हे वानखडे साहेबांनी स्वतः बघितले व आम्हाला देखील समजले.. वाघाच्या पंजाची कशी प्रतिकृती तयार करतात हे सांगितले परंतू मला लक्षात आले नाही (मी प्रत्यक्ष बोलून जाणून घेईन). `मेहमान रह गया` या कथेत वाघाने माणसाची शिकार कशी केली त्यानंतर वनविभागाने बसची सोय करून मुलांना मदत कशी झाली हे देखील सांगितले व आपल्या सारखे वन अधिकारी काय करू शकतो हे प्रांजळ पणे नमूद केले आहे.. सेमडोह येथील गजराजाची कथा अजून देखील लोक सांगतात त्यातील तुम्ही त्याला वाचवयाचा प्रयत्न केला परंतू तो नियतीला मान्य नसेल. बाणा का घुंगरू- मधील हल्ला व घटना मन विचलित करणारी वाटली व मेळघाट मधील वन कर्मचारी किती कामसू आहेत हे त्या वरून दिसले.. मला बाणा ढाप प्रत्यक्ष बघायला आवडेल.. `रानगव्यांची कवायत` मध्ये रानगवे स्वतःच रक्षण कश्या पद्धतीनं करतात हे मला पहिल्यांदा समजले.. कोकटु इथं तीन दिवस आपण वाघ बघण्याची केलेली हॅट्रिक ही जंगलाने तुम्हा वनाधिकार्‍यास दिलेली सलामी आहे. `शिकार हो गया` - माहुल वेलीचा कसा उपयोग केला जातो व पोळी तयार करतात हे देखील वेगळी गोष्ट वाटली.. आपण सांबर शिकार कशी थांबवली व वन्यजीवनाची साखळी अबाधित राखली.. वाघ खेकडे मारून खातो हे ऐकून नवल वाटले.. असा सॉलिड वन अधिकारी मेळघाटला लाभला हे या कथां मधून मला समजलं व प्रत्येक वाचकाला हे जंगल, इथले लोक या विषयी कायम आकर्षण निर्माण करत राहील.. ...Read more

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
श्री. बाबाराव घोरमाडे, अमरावती

अमरावती जिल्हा मधील एका सामान्य खेड्यातील, एक अलौकिक असामान्य अशा फुटबॉल खेळाडूचे हे व्यक्तिचरित्र. १९४० ते १९५१ हा कालखंड म्हंजे तसाही भारतीया करीता त्यातल्या त्यात ग्रामीण भागाकरिता खडतर कालखंड. अशा विपरीत परिस्थितीत शैक्षणिक आर्थिक सामाजिक मारगदर्शन इत्यादी पाठबळ चा अभाव असताना सुद्धा आतंरराष्ट्रीय दर्जा चा खेळाडू निर्माण होणे हे ते चरित्र नायक चे असामान्य व्यक्तिमत्व अधोरेखित होते. समाधानाची आनंदाची बाब ही की हे पुस्तक रूपाने प्रसिध्द करण्याचे काम चरित्र नायक चे सुपुत्र श्री गजाननराव उर्फ जी बी देशमुख यांनी केले. हे सर्व काही अंशी कर्ज ओझे हलके करण्यासारखे आहे लेखकाला या करीता खूप मेहनत करून माहिती संकलित करावी लागली. एखादी थप्पड बनती थी........ बडे बेआबरू होकर घरी आलो........पण कहाणी मे ट्विस्ट अभि बाकी था..... प्रसंगी चे वाक्य रचना , कोसळणाऱ्या धबधबा सारखे निखळ आनंद देऊन गेले . मेहता पब्लिशिंग ने लॉन्च केले म्हणजे सर्वदूर मराठी माणसाचे पर्यंत पोहोचले आहे वाचनीय आहे प्रत्येकाने वाचावे.विसावा शतकातील पुर्वाध, विपरीत परिस्थितीतही किती कष्ट करावे लागले असतील? धन्य ते.. ...Read more