RAJSHREE NAWARE

About Author


RAJSHREE NAVARE IS A CELEBRITY IN THE FIELD OF MICROWAVE COOKING. FAMOUS WRITER SHRI. RAJSHREE WAS BORN IN SHIVAJI PARK, MUMBAI, THE DAUGHTER OF ACHYUT BARVE AND MANGALA BARVE, AUTHOR OF ANNAPURNA. HE DID HIS SCHOOLING AT CANOSA CONVENT, MAHIM. HE GRADUATED FROM PODDAR COLLEGE, MATUNGA. HIS MOTHER INTRODUCED HIM TO COOKING AT A VERY YOUNG AGE.

राजश्री नवरे या मायक्रोवेव्ह कुकिंग या क्षेत्रातील ख्यातनाम व्यक्ती आहेत. प्रसिद्ध लेखक श्री. अच्युत बर्वे आणि अन्नपूर्णा च्या लेखिका मंगला बर्वे यांच्या कन्या राजश्री यांचा जन्म शिवाजी पार्क, मुंबई येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण कॅनोसा कॉन्व्हेंट , माहीम येथे झाले. पोद्दार कॉलेज, माटुंगा येथून त्यांनी पदवी संपादन केली. खूप लहान वयातच त्यांच्या आईने पाककलेशी त्यांचा परिचय करून दिला. त्यांनी मात्र लग्नानंतरच यात रुची दाखवली. आखाती देशात बराच काळ वास्तव्य आणि इतर अनेक देशांत भ्रमंती यामुळे स्वयंपाकाची अत्याधुनिक साधने वापरून खाद्यपदार्थ बनवण्याचा त्यांना अनुभव मिळाला. हळूहळू मायक्रोवेव्ह कुकिंग हा त्यांचा अत्यंत आवडीचा छंद बनला. अनेक प्रसिद्ध शेफ्सकडून त्यांनी पाककलेचे धडे घेतले. शिवाय आई आणि सासूबार्इंकडूनही त्यांना मोलाचे मार्गदर्शन मिळाले. २००० साली भारतात अत्यंत नवीन असलेल्या मायक्रोवेव्ह कुकिंगची प्रात्यक्षिके दाखवणाऱ्या काही मोजक्या व्यक्तींपैकी त्या एक होत्या. अनेक नामांकित कंपन्यांसाठीही त्यांनी प्रात्यक्षिके केली. त्यांची सूचना देण्याची शैली आणि मायक्रोवेव्हमध्ये करता येतील अशा पारंपरिक महाराष्ट्रीयन पदार्थांच्या सोप्या कृती लोकांना इतक्या भावल्या, की दोन वर्षांच्या आतच त्यांनी पन्नासहून अधिक ठिकाणी प्रात्यक्षिके केली. भारतीय आणि परदेशी पदार्थ शिकवण्याचे वर्ग त्या चालवतात. मुंबईतील अनेक पाककृती स्पर्धांच्या परीक्षक म्हणून त्यांनी काम केले आहे. २००५ साली गोदरेज वं पनीच्या मायक्रोवेव्ह ओव्हन्सबरोबर दिल्या जाणाऱ्या पुस्तकाचे संकलन आणि संपादन करण्याची संधी त्यांना मिळाली. नियतकालिके आणि वर्तमानपत्रांमधून त्यांचे अनेक लेख प्रसिद्ध झाले आहेत. रेडिओवरही मायक्रोवेव्ह कुकिंग या विषयावरील त्यांचे कार्यक्रम प्रसारित झाले आहेत.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
SWAYAMPAK GHARATIL NAVA MITRA : MICR... Rating Star
Add To Cart INR 120

Latest Reviews

रुपाली सोनवणे

#रुक #जाना #नही लेखक: Dr. भावेश भाटिया शब्दांकन: Dr: सचिन पाचोरकर अनुवाद: सुप्रिया वकील ​अंथरून पाहून पाय पसरावे... अह्ह.. त्या निर्जीव अंथरुणासाठी आपल्या सजीव पावलांना का त्रास द्यावा? असेच एक जबरदस्त आत्मचरित्र वाचून संपवलं आणि एक ऊर्जा निर्माणकरून गेलं, पुस्तकाचं नाव आहे `रुक जाना नहीँ ​डॉ. भावेश भाटिया यांची ही प्रेरणादायी कहाणी. शाळेत असताना आलेलं अकाली अंधत्व आणि त्यानंतर खडखडीत खडतर जीवनाचा सुरू झालेला प्रवास, पण या प्रवासात खचलेल्या बालमनाला त्यांच्या आईने दिलेलं बळ, प्रेरणा व आत्मसन्मानाची शिकवण आणि स्वाभिमानाचे धडे लेखकास पुरे होते. हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. चांगल्या धडधाकट व्यक्तीवर संकट आल्यावर दूर दूर पळणारे नातलग, मित्र परिवार, जातभाई... दृष्टी गेलेल्या व्यक्तीस कितपत आधार देतील? पण एक ऑपरेटर ते एक उद्योजक, `सनराईज कॅण्डल`चा विस्तार आणि स्वतःबरोबर अनेक दृष्टिहीन व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभं करून रोजगार देणारा हा अवलिया किती अडथळे पार करून आलाय हे जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचायला हवंच. ​कुठलाही वशीला नाही की कोणाची सहानुभूती नाही, स्वबळावर विविध प्रयोग करत उद्योग यशस्वी करणं सोपं नाही. यात ज्या ज्या देवमाणसांनी हातभार लावला त्यांचा पण उल्लेख आहे, पण त्या देवमाणसांनी देखील कधीच उपकारिक भाषा न करता व स्वाभिमान न दुखावता कशी मदत करता येऊ शकते हे त्यांच्या कृतीतून दाखवून दिलंय. लेखक फक्त उद्योग उभारून थांबले नाहीत तर त्यांनी सामाजिक जाणीवेचं भान देखील ठेवलंय. महाबळेश्वरमध्ये सनराईज कॅण्डल नावाने त्यांनी भव्य असा उद्योग परिसर आणि म्युझियम सुरू केलंय, तेथे अनेक दृष्टिहीन व्यक्तींना रोजगार मिळाला आहे त्याचबरोबर सर्वजण स्वाभिमानाने कष्ट करून जगत आहेत. हजारो आयुष्य त्यांनी उजळून टाकली आहेत. दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार सह एकून 46 पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.विशेष म्हणजे सर्व पुरस्कार त्यांच्या योग्यतेनुसार दिले आहेत.. आणी अशा हजारो पुरस्कारांचे ते मानकरी आहेत असंच वाटत..त्यांच्या कामाची दखल रिलायन्स ग्रुप ने देखील घेतली आहे.व त्यांच्या पुस्तकास प्रस्तावना देखील नीता अंबानी यांनी दिली आहे.उद्योग करताना छोट्या छोट्या गोष्टी कसा प्रभाव करतात याच वर्णन देखील त्यांनी लिहिल आहे.. ​या कार्यात महत्त्वाचं योगदान त्यांच्या धर्मपत्नी नीता भाटिया यांनी दिलं आहे. दूरदृष्टी ठेवून आपल्या पतीस प्रोत्साहन देऊन, नवीन कल्पनेसह पाठिंबा देऊन त्यांना हुरूप देण्याचं काम त्यांनी केलंय. नीता भाटिया यांचं कर्तृत्व, त्यांचं पवित्र निस्वार्थी प्रेम या पुस्तकातून वाचताना आंतरिक वेगळी ऊर्जा मिळते. कलियुगातील देवी हा शब्द व मान त्यांना समर्पक वाटतो. पुस्तक सर्व वयोगटातील वाचक वाचू शकतात. मनाने खचलेल्या पण शरीराने धडधाकट असलेल्या प्रत्येक व्यक्तीने वरील पुस्तक नक्की वाचावं आणि आत्मसात करावं. एवढ्या उंचीवर असूनही जमिनीवर पाय असलेल व्यक्तिमत्व आहे. अगदी प्रेमळ पणे वागण बोलण सन्मान देण..ही दैवी देणगी त्यांच्या जवळ आहे. ...Read more