RAJSHREE NAWARE

About Author


RAJSHREE NAVARE IS A CELEBRITY IN THE FIELD OF MICROWAVE COOKING. FAMOUS WRITER SHRI. RAJSHREE WAS BORN IN SHIVAJI PARK, MUMBAI, THE DAUGHTER OF ACHYUT BARVE AND MANGALA BARVE, AUTHOR OF ANNAPURNA. HE DID HIS SCHOOLING AT CANOSA CONVENT, MAHIM. HE GRADUATED FROM PODDAR COLLEGE, MATUNGA. HIS MOTHER INTRODUCED HIM TO COOKING AT A VERY YOUNG AGE.

राजश्री नवरे या मायक्रोवेव्ह कुकिंग या क्षेत्रातील ख्यातनाम व्यक्ती आहेत. प्रसिद्ध लेखक श्री. अच्युत बर्वे आणि अन्नपूर्णा च्या लेखिका मंगला बर्वे यांच्या कन्या राजश्री यांचा जन्म शिवाजी पार्क, मुंबई येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण कॅनोसा कॉन्व्हेंट , माहीम येथे झाले. पोद्दार कॉलेज, माटुंगा येथून त्यांनी पदवी संपादन केली. खूप लहान वयातच त्यांच्या आईने पाककलेशी त्यांचा परिचय करून दिला. त्यांनी मात्र लग्नानंतरच यात रुची दाखवली. आखाती देशात बराच काळ वास्तव्य आणि इतर अनेक देशांत भ्रमंती यामुळे स्वयंपाकाची अत्याधुनिक साधने वापरून खाद्यपदार्थ बनवण्याचा त्यांना अनुभव मिळाला. हळूहळू मायक्रोवेव्ह कुकिंग हा त्यांचा अत्यंत आवडीचा छंद बनला. अनेक प्रसिद्ध शेफ्सकडून त्यांनी पाककलेचे धडे घेतले. शिवाय आई आणि सासूबार्इंकडूनही त्यांना मोलाचे मार्गदर्शन मिळाले. २००० साली भारतात अत्यंत नवीन असलेल्या मायक्रोवेव्ह कुकिंगची प्रात्यक्षिके दाखवणाऱ्या काही मोजक्या व्यक्तींपैकी त्या एक होत्या. अनेक नामांकित कंपन्यांसाठीही त्यांनी प्रात्यक्षिके केली. त्यांची सूचना देण्याची शैली आणि मायक्रोवेव्हमध्ये करता येतील अशा पारंपरिक महाराष्ट्रीयन पदार्थांच्या सोप्या कृती लोकांना इतक्या भावल्या, की दोन वर्षांच्या आतच त्यांनी पन्नासहून अधिक ठिकाणी प्रात्यक्षिके केली. भारतीय आणि परदेशी पदार्थ शिकवण्याचे वर्ग त्या चालवतात. मुंबईतील अनेक पाककृती स्पर्धांच्या परीक्षक म्हणून त्यांनी काम केले आहे. २००५ साली गोदरेज वं पनीच्या मायक्रोवेव्ह ओव्हन्सबरोबर दिल्या जाणाऱ्या पुस्तकाचे संकलन आणि संपादन करण्याची संधी त्यांना मिळाली. नियतकालिके आणि वर्तमानपत्रांमधून त्यांचे अनेक लेख प्रसिद्ध झाले आहेत. रेडिओवरही मायक्रोवेव्ह कुकिंग या विषयावरील त्यांचे कार्यक्रम प्रसारित झाले आहेत.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
SWAYAMPAK GHARATIL NAVA MITRA : MICR... Rating Star
Add To Cart INR 120

Latest Reviews

वा. पां. जाधव अमरावती

`अमरावतीचे छप्पन स्वभाव एक मनोरंजक काव्यसंग्रह` `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे अमरावतीचे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री जी. बी. देशमुख यांचे अमरावती नगरीचा सहज स्वभाव व ह्या नगरीच्या वेगळ्या ओळखीवर आधारित मनोरंजक पुस्तक वाचले. वाचून भरपूर मनोरंजन झाले. खर काय लिहावे या लेखकाबद्दल, मन गोंधळले. ऐतिहासिक असो, प्रवास वर्णन असो, व्यक्ती विशेष असो, अनुभवात्मक घटना घडामोडी असो कशावरही सहज लिखाण करणारा हा लेखक आहे. आता तर त्यांनी लेखनाला विनोद प्रचुर फोडणी देऊन `अमरावतीचे छप्पन स्वभाव` या काव्यसंग्रहातून अमरावतीकरांना मनोरंजनाची मेजवानीच दिली आहे. प्रत्येक शहराची व त्या शहरातील वैशिष्ट्यांची एक वेगळीच ओळख असते. दिवस जातात, काळ लोटतो, पिढ्या बदलतात मात्र जुन्या स्मृतीची चिन्हे नवीन येणाऱ्या पिढीच्या मनात गुढ निर्माण करत कायम हाक देत राहतात. अमरावतीही त्याला अपवाद नाही. बापट चौकात चौक नाही, त्या जागेवर चौरस्ता नसून टी-पॉइंट आहे, खापर्डे बगीचा म्हणून आजही ओळख आहे मात्र तेथे बगिचा नाही किंवा प्रसिद्ध गांधी चौकात गांधीचा पुतळा अथवा स्मृतीदर्शक चिन्ह अथवा उल्लेख नाही मात्र गांधी चौक अशीच ओळख जनमानसात आहे. अशा एक ना अनेक विसंगत नाम दर्शक ओळख असलेली उदाहरणे त्यात सप्रमाण आहेत. पण खरी गंमत म्हणजे कधी काळी घडलेला इतिहास त्यामध्ये दडलेला आहे हे निश्चित. या सोबतच अमरावतीकरांच्या स्वभावातला स्थायी मजेदारपणाच्या एक एका हटके गुण वैशिष्ट्याच्या गमती लेखकाने हुबेहूब अधोरेखित केलेल्या आहेत. आणि त्यावरुन तत्सम रचनांचा उहापोह लेखकाने पुस्तकात केला असावा. विदेशात स्थाईक झालेल्या मूळ अमरावतीकरांना लेखकाने लिहिलेल्या गमती मनोरंजनात्मक वाटाव्या एवढी किमया जी.बी. च्या सहज लेखनाने दाखवली आहे. अमरावतीचे अग्रगण्य वृत्तपत्र दै. हिंदुस्थान मध्ये लेखकाने सतत ६ महीणे लिहीलेल्या काव्य सदरात अमरावतीच्या जनमानसाच्या हृदयाच्या ठाव घेणाऱ्या काव्य रचनांचा आठवणींनी महापूर ओसंडून गेला होता. विशेष म्हणजे ह्यात कुठेही अनावश्यक अभिनीवेष नव्हता. उलट गमतीत केलेले आत्मपरिक्षण मात्र काही प्रमाणात होते. वयस्क अमरावतीकर रसिकांना या रचना ताज्या करून त्यांच्या तारुण्यात घेऊन गेल्या हेच खरे. जी बी देशमुख या लेखकास मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रियां वरून दिसून येते. . सदर पुस्तकातील काव्यमय रचना वाचतांना अमरावतीच्या माणसाच्या वऱ्हाडभोळ्या स्वभावाची प्रचीती येते आणि वेगळाच आनंद देऊन जाते. निखळ मनोरंजन करत गुदगुल्या करणारा असा हा काव्यसंग्रह आहे. अमरावती शहराची ऐतिहासिक वैशिष्टे काव्यरूपात वाचण्याचा आनंद अमरावतीकरांना ते जिथं असतील त्या गावात, परगावात, परदेशात पुस्तक मागवून घेता येईल. ...Read more

ज्योती चेडे, मुंबई.

अमरावतीच्या वैशिष्ट्यांवर आधारीत खुमासदार छप्पन्न कवितांच्या संग्रहातील प्रत्येक कविता वाचत असताना अमरावतीच्या वातावरणाची धुंदी आपसुकच मनावर चढु लागली. सगळ्याच कविता सुंदर आहेत. एकेक कविता अमरावतीचे अप्रतिम वर्णन करते. प्रत्येक कवितेचा शेवट कुठेतरी गंभीर विचार करायला भाग पाडतो आणि मन गलबलून जाते. सगळ्याच कविता सुंदर आहेत पण माझ्या मनाला भावलेल्या व भिडलेल्या कविता आहेत `अमरावतीतल्या गमती`, `अमरावतीचे शिक्षण`, `अमरावतीचे हजरजबाबी`, `अमरावतीचे वेडे`, `अमरावतीच्या काकू` व बाकी सगळ्या. `अमरावतीचे वेडे` या कवितेत उल्लेखीत शेवटचा अश्रुंचा एक थेंब जरुर राखला जाईल. तसेच `अमरावतीच्या काकूं` ची उर्जा उरात भरून उरेल. जीवन देणाऱ्या विहीरीने कोणाचेही जीवन घेऊ नये, अशी सद्भावना मनात जागेल. अमरावतीकर जगात कुठेही असो त्यांच्या मनात एका कोपऱ्यात राजकमल चौक असतोच हे सत्य मनावर कोरले जाईल. प्रत्येक अमरावतीकराने ह्या कविता जगाव्यात. त्यासाठी हे पुस्तक संग्रही ठेवावे आणि परगावी राहणाऱ्या आपल्या अमरावतीकर आप्तेष्टांना भेटी दाखल द्याव्या. ...Read more