* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Notify Me
     
  • ISBN : 9789353170257
  • Edition : 1
  • Publishing Year : JULY 2018
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 184
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS GRIPPING STORY ABOUT LOVE, FRIENDSHIP, BETRAYALS, RESPONSIBILITIES, ADDICTIONS AMIDST THE DREAMS ABOUT THE FUTURE OF FIVE YOUNG SOULS WILL KEEP YOU GLUED AND WILL DEFINITELY LEAVE AN INDELIBLE IMPRINT ON YOUR LIVES.
‘बेधुंद’ ही जयंत, अक्षय, सुरेश, समीर आणि अण्णा (फाइव्ह स्टार्स) या पाच मित्रांची कहाणी आहे. एकाच कॉलेजमध्ये शिकणारे हे पाच जण वसतिगृहात राहत असतात. या पाच तरुणांच्या निमित्ताने कॉलेज जीवनाचा वेध या कादंबरीतून घेतला आहे. जया आणि हर्षलाच्या निमित्ताने आंतरजातीय विवाहाला होणारा विरोध, या पाच जणांवर सुरुवातीला सीनिअर्सकडून झालेल्या रॅगिंगच्या चित्रणातून रॅगिंगचा प्रश्न, अक्षा आणि सोनिया आणि अन्य मुलामुलींच्या माध्यमातून ‘सेक्स’चा अनुभव, या पाचही जणांच्या दारू पिण्यातून व्यसनाधीनता, सुऱ्या आणि पिया यांच्यात होणारं सेक्स चॅटिंग, काही उत्सव साजरे करत असताना विद्यार्थ्यांमध्ये जातीयवादावरून झालेली भांडणे इ. विषयांचं वास्तव चित्रण या कादंबरीतून केलं गेलं आहे. कॉलेज जीवनाची ही काळी बाजू समाजावरही विघातक परिणाम करू शकते, असा गर्भित इशारा या कादंबरीतून मिळतो. तेव्हा कॉलेज जीवनातील हे दाहक वास्तव जाणून घेण्यासाठी ही कादंबरी अवश्य वाचली पाहिजे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%#BEDHUND# AVINASH HAMBIRRAO LONDHE #बेधुंद# अविनाश हंबीरराव लोंढे# जयंत# अक्षय# सुरेश# समीर# अण्णा# अश्विनी# सोनिया# हर्षदा# कॉलेज#वसतिगृह# क्रिकेट# बॅडमिंटन# मेस# डीन# रेक्टर# ब्रेकअप
Customer Reviews
  • Rating StarVijaya Hiremath

    पुस्तक अभिप्राय पुस्तक-बेधुंद लेखक-अविनाश लोंढे पृष्ठ संख्या-182 किंमत-250 प्रकाशन-मेहता पब्लिकेशन आयुष्यातील सगळ्यात महत्वाचा टप्पा म्हणजे आपलं कॉलेज जीवन...हे वय असं असतं की जग जे शिकवेल ते पटेलच असं नाही आणि जगायचं कसं हे शिकायला जमेलच असंनाही...लहानपणापासून आई वडिलांचं बोट धरून चालणारी मुलं न कळत बोट सोडून जीवनाच्या या वळणावर चालायला सुरुवात करतात आणि मग खरी धडपड सुरु होते स्वतःला शोधण्याची, सिद्ध करण्याची......वयाच्या 16 व्या वर्षी घराच्या बंधनातून,गावकडील वातावरणातून मुक्त,स्वतंत्र शहरातील मोठ्या नावजलेल्या कॉलेज आणि हॉस्टेलमधील मोकळं,नवं पण आव्हानात्मक आयुष्य....कित्येक मुलं येतात या नव्या वातावरणात येणाऱ्या रॅगिंगसारख्या संकटाला तोंड देत दुनियादारी शिकता शिकतात, धडपडतात ,पडतात काही खंबीर मनाने उभे राहतात तर काहींच आयुष्यच संपायची वेळ येते... मुलं स्वतःला कसेबसे ऍडजस करत चार सहा वर्षात कॉलेज सोडून निघूनही जातात पण काहींच नाव आपल्या यशाने ,प्रगतीने तर कधी नको त्या कारणाने कॉलेजशी कायमच जोडलं जातं... आजच्या काळात याच तरुणांना शिक्षणासोबत अनेक नव्या आव्हाहनांना सामोरे जावे लागते आहे ..अवखळ वय,सळसळत रक्त,डोळ्यांत अनेक स्वप्नं,ती सत्यात उतरवण्याची धडपड शरीरात होणारे बदल,भावनिक आणि व्यावहारिक आयुष्याची सुरवात त्याप्रमाणे निर्माण होणारे आकर्षण,सोशल मीडिया ,व्यसनाधीनता अश्या अनेक भुरळ घालणाऱ्या अनेक गोष्टी ... *बेधुंद* मधून याच अनेक समाज विघातक गोष्टी लेखकाने त्यांच्या वास्तववादी लेखनातून समोर आणल्या आहेत....कॉलेज life मधील अनेक भयानक सत्य समोर येतात आणि वाटू लागलं की वयातच एक तर आयुष्य घडतं किंवा बिघडतं.... घडलं तर त्याचं श्रेय घ्यायला अनेकजण उभे राहतील पण बिघडलं तर जबाबदारी कोणाची?? आजच्या बेधुंद तरुणांकडून वेड्या अपेक्षा ठेवून त्यांच्या प्रेमापोटी त्यांना जगातील सगळी सुखं देऊ पाहणाऱ्या आणि मुलांनी यशस्वी होऊन आनंदी जीवन जगावं यासाठी सतत धडपडणार्या आई बाबांची???कळत नकळत पण प्रत्येकाच्या जीवनावर खूप मोठा परिणाम करणाऱ्या समाज व्यवस्था,जातीव्यवस्था आणि सामाजिक प्रवृत्ती आणि अप्रवृत्तीची???? सगळ्या जगातून अलिप्त होऊन भान हरपलेल्या जीवापाड एकमेकांवर प्रेम करणाऱ्या प्रेम युगलांची?? की जीवाला जीव देवून सुख,दुःखात, जिंकण्यात हरण्यात ,एकमेकांच्या चुकांसाठी ,एकमेकांच्या प्रगतीसाठी मनापासून खांबीतपणे साथ देणाऱ्या मैत्रीची ??की प्रेम,मैत्री ,आनंद यांच्या नावाखाली नशेत धुंद,जगण्यात बेधुंद झालेल्या तरुणाईचीच???की जीवापेक्षा बदल्याची आग,पत, प्रतिष्ठा, पैसे,मानसन्मान मोठा वाटणाऱ्या माणुसकीचा विसर पडलेल्या मानव जातीची??? जबाबदारी कोणी घेवो न घेवो पण भावी पिढी चांगलीच घडावी यासाठी कर्तव्य मात्र आपल्या सगळ्यांचच... आपल घर,कुटुंबीय,घरची परिस्थिती याची सतत जाणीव असणारा,उघड्या डोळ्यांनी मोठी स्वप्नं पाहून ती सत्यात आणण्यासाठी धडपडणारा, उच्च ध्येय बाळगून ते साध्य करण्याची धमक बाळगणारा ,समाजातील विघातक प्रवृत्ती समूळ नष्ट करण्याची मनीषा बाळगणारा तरुण वर्गच भावी सदृढ पिढी घडवू शकतो फक्त गरज आहे ती त्याने भानावर राहण्याची...... या सगळ्यांवर विचार करायला लावणारी कॉलेज मधील 5 स्टार या ग्रुपच्या मित्रांची,त्यांच्या रॅगिंग,प्रेम प्रकरणे ,होकार ,नकार विरह,दोस्ती,टपोरेपण, व्यसनाधीनते बरोबरच जिद्दीची, धाडसाची आणि समाजातील राजकारण आणि सिस्टीम याविरुद्ध चिंता, चीड यांची कहाणी म्हणजे *बेधुंद* ..... कधी रोमांचित तर कधी मन हेलावून टाकणारी...कधी चेहऱ्यावर हासू तर कधी डोळ्यांत आसू आणणारी... कधी डोळे मिटून प्रेमाची अनुभूती देणारी तर कधी समाजाचे ,सध्य परिस्थितीचे दर्शन घडवून खाडकन डोळे उघडवणारी...कधी स्वमग्न होऊ देणारी प्रेरणादायी तर कधी चीड दुःख ,वेदनांची जाणीव करून देणारी ....कधी टपोऱ्या स्पष्ट शब्दांत मराठी भाषेत तर कधी हिंदी इंग्लिश मिश्रित मराठीत ...योग्य वेळी प्रवेश करणाऱ्या निरनिराळ्या पात्रांच्या प्रवेशाने खुलणारी आणि अचानक अपेक्षेपेक्षया वेगळीच कलाटणी घेणारी *बेधुंद* ही उत्कंठावर्धक कादंबरी लेखकाने समाजभान राखून तरुणांसाठी खास लिहलेली ही कादंबरी मला मनापासून आवडली...एक वेगळा दृष्टीकोन आणि विचार दिल्याबद्दल लेखक अविनाश लोंढे सरांचे मनापासून आभार आणि त्यांच्या पुढील लेखन कार्यास खुप खुप शुभेच्छा🌹🌹🌹🌹🌹 सौ विजया कैलास हिरेमठ ...Read more

  • Rating Starदैनिक दिव्य मराठी ७ एप्रिल २०२०

    तरुणाईच्या वादळी लाटा : बेधुंद तरुणाई म्हणजे एकीकडे उत्साह , आनंद , दुसरीकडं अत्यंत आक्रमक अन हिंसक . त्यामुळे तिला योग्य दिशा मिळाली नाही तर ती किती भयावह रूप धारण करू शकते , स्वतः चेच नुकसान कसे करते , हे अविनाश लोंढे यांची `बेधुंद ` कादंबरी सागते . तेही तरुणाईच्या विशिष्ट , सळसळत्या , वादळी भाषेत . त्यामुळे नाविन्यपूर्ण , वाचनीय तर झालीच आहे , शिवाय सध्या वीस -पंचीविशीत असलेला मराठी तरुण स्वतःला कोणत्या दिशेने घेऊन जात असावा , चारित्र्य ह्या विषयी मुले तर सोडाच मुलींच्या संकल्पना काय आहेत , याचाही अंदाज येतो . तारुण्य प्रत्येकाला हवंहवंसं असतं . कारण त्या काळात शरीरात , मनात अभूतपूर्व ऊर्जा असते . विचारांचा प्रवाह नुसता खळखळत असतो , ओसंडून वाहत असतो . त्या विचारांच्या बळावरच तो प्रत्येक्ष कृती करतो . त्यातून त्याचे व्यक्तिमत्व ठरत असते . तो जीवनात पुढे नेमके काय करणार याची पायाभरणी तारुण्यातच होत असते . शहरी संस्कृतीमध्ये अशा पायाभरणीचे मुख्य स्थळ म्हणजे कॉलेजातील लाईफ . तेथे दिवसाकाठी अक्षरशः शेकडो घडामोडी होत असतात . अभ्यासाच्या निम्मिताने नजरेला नजरा मिळतात . काहींच्या स्वतंत्र नजरा तयार होतात . काहींच्या कायमस्वरूपी भरकटून जातात . आणि कॉलेज लाईफ मध्ये हॉस्टेल हे एक स्वतंत्र जग आहे . तेथेही घडामोडी होतात . पण , त्यात भानगडीच जास्त असतात . गेल्या काही वर्षात कॉलेजात आणि होस्टेलात भानगडी धोकादायक वळणावर पोहचल्या आहेत . तरुणाई म्हणजे मौजमस्ती , धिंगाणा , सेक्स , भरपूर दारू पिणे अशी संस्कृती तयार होऊ लागली आहे . आपल्यावर देश , समाज घडवण्याची जबाबदारी आहे , असं तरुणांनी मानलेच पाहिजे असं नाही मी पण किमान आपल्यामुळं कोणाचं नुकसान होणार नाही , समाज बिघडणार नाही , याची काळजी घेतली पाहिजे . दुर्दयवाने ते होताना दिसत नाही . केवळ भौतिक सुखाच्या मागे धावाधाव सुरु आहे . प्रेम म्हणजे शारीरिक संबंध असा समाज सोशल मीडियामुळे होत चालला आहे . मोठ्या शहरांमधील कॉलेजेस , होस्टेल्स हाऊसफुल्ल आहेत . शिक्षणाचे बाजारीकरण होत आहे . शिक्षक म्हणजे गुरु ही भावना पालकांमध्ये राहिलेली नाही , शिक्षकांमध्येही नाही . त्याचे एक -एक परिणाम दिसणार आहेत , ते कसे असू शकतील , याचा अंदाज `मेहता पब्लिशिंग हाऊस` ने प्रकाशित केलेली `बेधुंद ` वाचताना येतो . एकेक प्रसंग अस्वस्थ , चिंताग्रस्त करून टाकतो . दुसरीकडं काही भरकटणारी मुलं विशिष्ट क्षणी भानावर येतात . उत्तम शिक्षण घेऊन स्वतः च जीवन घडवण्यासाठी चालू लागतात , हे पाहून मनात आशावादही जागृत होतो . लेखक `लोंढे ` मूळचे सोलापूर जिल्यातील वेणेगाव येथील , सध्या इथिओपिया मध्ये कोकाकोला कंपनीत प्रोजेकट मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत . खरगपूर आय आय टी मधून एम . टेक . ची पदवी त्यांनी मिळवली आहे . पण त्यांचा मूळ पिंड लेखनाचा , शब्दातून व्यक्त होत राहण्याचा आहे . तो त्यांनी जाणीवपूर्वक जपला आहे , असं बेधुंद ची एकशे ब्यायांशी पाने वाचताना जाणवत राहते . तरुणाईचे अध:पतन , कोसळत जाणं किती भयावह आहे , हे लोंढे यांच्या लेखनाचे मुख्य सूत्र आहे . त्यासाठी त्यांनी जयंत , अक्षय , सुरेश , समीर आणि अण्णा या पाच मित्रांच्या व्यक्तिमत्त्वांना एकत्र गुंफले आहे . पाच मित्र वेगवेगळ्या स्वभावाचे . प्रत्येकाच्या घरची आर्थिक स्थिती वेगळी . ध्येय , भावविश्वही वेगळे , त्यात प्रवेश करणाऱ्या मुली तऱ्हेवाईक . छांदिष्ट आणि टिपिकल भारतीयही . पाच मित्रांचे कॉलेज , हॉस्टेल मधील जीवन जसजसे पुढे जाऊ लागते , तसतशी त्यातील गुंतागुंत वाढत जाते , राडे होत जातात . जातीवाद कश्या पद्धतीने पोसला , पेरला जात आहे हे कळते . लैंगिक सुखासाठी काय काय केले जाते , हे समोर येत राहते , आणि एकाचवेळी अनेक अंगांना कोसळत जाणारे हिमप्रपात दाखवण्याकरीता लोंढे यांनी काही नाट्यमय , वेगवान प्रसंग रचले आहेत . पुढील पानावर काय असावं , अशी उत्सुकता लागून राहते . शिवाय शहरी मुलं - मुली जी खूप टपोरी , खूप हिंदीमिश्रित भाषा वापरतात , तीच ठेवली आहे . तिला उगाच प्रमाण मराठीमध्ये सांगण्याचा आटापिटा केलेला नाही . जे म्हणायचे आहे , ते साध्या , सोप्यासरळ भाषेत मांडले आहे . त्यामुळं अनेक पानावरील वर्णने अंगावर येतात , पण हे करताना मूळ कथानक भरकटणार नाही , हाणामारी , सेक्स विषयीची वर्णने बटबटीत , लांबलचक अश्शील होणार नाहीत , याची काळजी त्यांनी घेतलेली आहे . तारुण्य हे निसर्गाने दिलेले वरदान आहे . त्याचा योग्य वेळी , योग्य वापर केला नाही तर आयुष्य उध्वस्थ होते , हा संदेश वाचकांच्या मनात कोरण्यात ते यशस्वी ठरतात . मागच्या पिढीत `सुहास शिरवाळकरांनी` `दुनियादारी` कादंबरीत तरुणाईचे एक विश्व उभे केले होते . तसेच काहीसे `लोंढे` यांनी `बेधुंद` मध्ये केले आहे , असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही . एखाद्या चित्रपटाच्या पटकथेचा पाया यात आहे . त्यामुळे कथानक , मांडणी , भाषा शैली आणि पटकथेच्या अर्थाने ` बेधुंद ` ची नोंद मराठी साहित्यात नक्कीच करावी लागेल . ...Read more

  • Rating StarAkash Alugade

    प्रत्येकाला स्वतःची एक वेगळी अनुभवलेली कॉलेज लाईफ असते, काही जणांनी एन्जॉय केलेली, काही जण मनासारखी कॉलेज लाईफ जगतात तर काही जणांना अगदी वेगळ्या आठवणी किंवा निराशजनक घेऊन जगलेली असतात. मी हि माझ्या कॉलेज लाईफवर अनेक लेख लिहले आहेत. कॉलेज लाईफ हि आपण ्रगल्भ अवस्थेत जात असतो त्यात घडलेल्या घटना आपल्याला नेहमी आठवणीत असतात.. असच कॉलेज लाईफ वरील आधारित असलेले एक पुस्तक ,एक लहान कादंबरी "बेधुंद" हे माझ्या नुकतंच वाचनात आलं. बेधुंद हि कादंबरी माझ्या हाती आली आणि जस जस ते पुस्तक मी वाचायला सुरवात केली तस तस मला ती सर्व पात्रे आणि घडणाऱ्या घटना समोर प्रत्यक्षात दिसू लागल्या. लेखक अविनाश लोंढे हे आजच्या युवा युगातील तीक्ष्ण लेखणी घेऊन उमजलेले लेखक म्हणायला हरकत नाही... तर बेधुंद हि `फाईव्ह स्टार ग्रुप` वर आधारित एक कथा आहे. फाईव्ह स्टार म्हणजे जयंत, अक्षय, सुरेश, समीर आणि अण्णा. हे फाईव्ह स्टार इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षांपासून वेगवेगळ्या कारणाने ओळखी झालेले कथेचे "फाईव्ह स्टार" असतात. लव्ह , सेक्स , ब्रेकअप , रॅगिंग, व्यसन आणि कॉलेज अभ्यास बद्धल सुरु असलेला त्या ५ जणांचा आणि त्याच्या मित्रांचा एकमेकांबध्दल असणारा विश्वास, मैत्री आणि अश्या सगळ्याचा प्रत्येकाच्या आयुष्यावर होणारा वेगवेगळा परिणाम... पुस्तक वाचताना असे अनेक हिस्से आले जे माझ्या सोबत घडले आहेत. ह्या पुस्तकात अश्या अनेक घटना तुमच्या कॉलेज जीवनात घडल्या असतील ज्या पुस्तक वाचताना नक्की समोर येतीलच . जसे जसे त्यांच्या इंजनिअरिंगच्या सेमिस्टर संपत जातात आणि नवीन येत राहतात तशी तशी पुस्तकातील कथा अनेक रूप घेत राहते, पुस्तकात हिंदी आणि इंग्रजीचा उल्लेख भरपूर ठिकाणी आहे आणि तसा करणे लेखकाला भाग पडले आहे. तुम्हाला सांगतो मराठी भाषेतील किंवा "नवीन युगातील" असे एकमेव पुस्तक आहे जे बेफाम आणि नावाप्रमाणे "बेधुंद" असे लिहले गेले आहे. सुरवातीला पुस्तक वाचताना जाणवते कि लहान लहान गोष्टीचा उल्लेख का केला असेल पण जसे जसे वाचत जातो तसे तसे उत्सुकता लागते कि आता पुढे काय होईल...??? तिसऱ्या सेमिस्टरपासून पुस्तकातील लेखकाच्या भावना जाणतात. कथेतील अक्ष्या ( अक्षय ) आणि हर्षल हे माझे आवडते पात्र आहेत. तसेच कॉलेज लाईफ मध्ये होणारे कार्यक्रम , त्यातील राजकारण , कमिटी आणि लेखकांनी आजच्या तरुणाईची भाषा, त्यांचे प्रश्न, विषय, बिनधास्त आणि मोकळेपणाने `बेधुंद` मध्ये मांडले आहेत. जे शब्द प्रत्यक्ष कॉलेज लाईफमध्ये वापरले जातात ते `जसेच्या तसे` लेखात दिले गेले आहेत. खरं म्हणजे इंजनिअरिंग केलेल्या सर्वानी हे पुस्तक वाचले पाहिजेच. हे वय "धुंद" होण्याचे आहे की आपल्या आयुष्याला योग्य वळणं देण्याचे आहे याचा योग्य विचार करायला लावणारे पुस्तकं आहे. लेखक खूप धाडसी आहेत मला त्या पुस्तकाकडून आणि लेखकाकडून खूप प्रेरणा मिळाली आहे. खूप मोजकीच पुस्तके आहेत जी अशी लिहली गेली आहेत. १८२ पानांचे हे पुस्तक जेव्हा शेवटच्या पानावर वाचन येते तेव्हा डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही याची मी खात्री देऊ शकतो. इतक्या तीव्र भावना इतका विझूलाईझन त्या शब्दातून होतो कि हृदय हळहळ व्यक्त करतच... ह्या पुस्तकातून मला फाईव्ह स्टार ग्रुपची कॉलेज लाईफ वाचन करत जगता आली ह्यासाठी मी लेखकाचे आभार व्यक्त करतो.. `मेहता पब्लिकेशन हाऊसने` हि लहान कादंबरी प्रकाशित केली आहे. बेधुंद ऍमेझॉन वर https://amzn.to/2tmz85O ह्या लिंक वर उपलब्ध आहे. पुस्तकाचे नाव - बेधुंद | लेखक - अविनाश लोंढे आकाश आलुगडे, बेधुंद पुस्तक परीक्षण २ जानेवारी २०२० ...Read more

  • Rating Starप्रमोदकुमार अणेराव

    नमस्कार मित्रांनो! मागील चार पाच दिवसांपूर्वी पोस्टाने एक जाडजूड पार्सल मला प्राप्त झाले.माझ्या स्वभावाप्रमाणे मी ते हावरटपणे उघडले तर त्यात बेधुंद ही देखणी कादंबरी निघाली.लेखक अविनाश लोंढे.हा तरुण लेखक आय आय टी खरगपूर वरून एम.टेक झालेला आणि आता इथिपिया देशात कोका कोला कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करतो आहे .अभियांत्रिकी शाखेचे शिक्षण असूनही मराठीत लेखन करण्याची त्याची अनन्यता पाहून खरेच अभिमान वाटतो.अविनाश चे सारे शिक्षण अभियांत्रिकी शाखेत झाल्याने तेथील सगळे अनुभव सहजपणे आणि कलात्मक बाज घेऊन या कादंबरीत लीलया प्रगट झालेले आहे.ही कादंबरी मेहता पब्लिकेशन सारख्या ख्यातनाम प्रकाशनाने प्रकाशित केलेली आहे.त्यामुळे त्याचे निर्मितीमूल्य अधिक वाढले आहे.कॉलेज जीवन म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवनाची पायभरणी असते असा आपला सर्वसाधारण समज असतो.या जीवनात भविष्याचे वेध घ्यायचेही हे दिवस असतात.नवे ज्ञान ,नवे आव्हान ,नवे प्रश्न यांना पुढे जाण्यासाठीचा हा सुवर्णकाळ असतो.पण अभियांत्रिकी कॉलेजातील वास्तव मात्र खूप वेगळे असते.बुद्धीच्या वरच्या स्तरातील मुले जिथे एकवटल्या जातात तिथे काही भव्यदिव्य घडण्याचा ,नवे विधायक स्वप्न आकारण्याचा अपेक्षा असतात पण असे न होता रॅगिंगचे विकृत वाटावे असे स्वरूप , व्यसनाची आधिक्यता , टोळीयुद्ध वाटाव्यात असल्या मारामाऱ्या , त्यांच्यातील क्लेशकारक वाटावे असे अनिष्ट स्तरीकरण, मुक्त सेक्स असले विकृत जीवनरूप तिथे पाहायला मिळते .तेव्हा सामान्य वाचकांना सखेद आश्चर्य वाटल्या शिवाय राहत नाही.ही कादंबरी जयंत ,सूऱ्या ,अक्षय, समीर आणि अण्णा अश्या पाच फाईव्ह स्टार म्हणविणार्या मित्रांची स्खलनशीलता दर्शविणारी सकृतदर्शनी कथा आहे.पण हे सारे पात्र केवळ प्रातिनिधिक पात्र आहे.अभियांत्रिकी आणि मेडिकल कॉलेज मध्ये कुठेही जा ही प्रवृत्ती आपणांस अलीकडे दिसावे असे हे वास्तव आहे.या कादंबरीचे वैशिष्ट्य म्हणजे तिची वाचनियता .कुठेही ती वाचकाला थकवत नाही.तिच्यातील कथानुभव आणि त्यातील नाट्य वाचकांना आपल्यासोबत घेऊन जाते. यातील पात्राच्या सुखदुःखात आणि त्यांच्या नैसर्गिक वागण्यातही आपण नकळत ओढल्या जातो. पण सारखा प्रश्न पडतो की , बुद्धीच्या वरच्या स्तरावरची ही सगळी मुलं विधायक , creative ,productive विचार करताना निदान या कादंबरीत तरी दिसत नाही.स्खलनशीलतेकडून स्खलनशीते कडे त्याच्या प्रवास संबंध कादंबरीभर आपल्याला दिसतो.पण लेखकाला बुद्धीच्या या स्तरावरील विद्यार्थ्यांची ही स्खलनशीलता च दाखवायची आहे.एक संदेश असावा कदाचित त्यातून याबाबतीत अविनाश लोंढे हा लेखक यशस्वी झालेला आहे.अविनाश च्या लेखनात खूप प्रवाहीपण आहे.हा त्याचा स्वानुभव असल्याने त्यात आत्मनिष्ठ जाणिवा पण तीव्रतम पातळीवर प्रकट होतात.,पण त्याच बरोबर त्यात समूहनिष्ठता सुद्धा आहेच. ज्याचे आव्हान आणि आवाहन व्यक्तींना आहे तसे ते समूहालाही आहे.या कादंबरीची खूप वेगवेगळ्या पातळीवरून आणि मानसशास्त्रीय पातळीवरूनही समीक्षण करण्याची नितांत गरज आहे.युवकांचे मानसशास्त्रीय भावविश्व आणि प्रत्यक्षातील सर्वत्र अस्तित्वात असलेले सामाजिक आणि राजकीय वास्तव यातील गुंतागुंतीची आणि प्रश्नांना अधोरेखित करणारी ही कादंबरी आहे. ,एक रसिक म्हणून मला ही कादंबरी अतिशय आवडलेली आहे.कमालीची गध्यप्रायता आणि कथारहिता लेखनात येत चाललेल्या या काळात बेधुंद ही कादंबरी बरीच दिलासा देते ,एक आश्वासकता जागृत करते.तिचे अंतर्बाह्य स्वरूप कादंबरी विश्वात अधिक उठून दिसणारे आहे. अविनाश तुला पुढील लेखनासाठी खूप खूप शुभेच्छा ! ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more