DR.SUCHIT TAMBOLI

About Author

Birth Date : 24/02/1965


PAEDIATRICS, CHILD DEVELOPMENT AND ADOLESCENCE (M.B.B.S., D.C.H., P.G.D.A.P., P.G.D.M.L.S.) IN JANUARY, 1992, MAHARASHTRAS FIRST PRIVATE CHILD DEVELOPMENT CENTER WAS ESTABLISHED AT AHMEDNAGAR. EARLY INTERVENTION TREATMENT METHODS, CHILD BEHAVIOR PROBLEMS, CHILDREN FALLING BEHIND IN SCHOOL, MENTAL RETARDATION, FAMILY HEALTH-COACHING FOR ADOLESCENT CHILDREN ETC. SPEECHES ALL OVER INDIA ON THE SUBJECTS.

बालरोग, बालविकास व पौगंडावस्थातज्ज्ञ (M.B.B.S., D.C.H., P.G.D.A.P., P.G.D.M.L.S.) जानेवारी, १९९२ मध्ये अहमदनगर येथे महाराष्ट्रातील पहिल्या खासगी बालविकास केंद्राची स्थापना. लवकर हस्तक्षेप उपचार पद्धती , मुलांच्या वर्तनसमस्या, शाळेत मागे पडणारी मुले, मतिमंदत्व, पौगंडावस्थेतील मुलांसाठी कौटुंबिक आरोग्य-प्रशिक्षण इ. विषयांवर संपूर्ण भारतभर भाषणे. राष्ट्रीय बालरोगतज्ज्ञ संघटने च्या शालेय शिक्षण समितीचे सदस्य. आकाशवाणीवर ५० कार्यक्रम प्रक्षेपित. लोकमत , सकाळ , लोकसत्ता , महाराष्ट्र टाइम्स इ. वृत्तपत्रांमध्ये लेख प्रसिद्ध. जन्मलेल्या बाळांसाठी मातेने करायचा सोपा बौद्धिक कार्यक्रम जागतिक आरोग्य संघटने नेसुद्धा (WHO) मान्य केला आहे. राष्ट्रीय स्थूलता निवारण समिती २०१२-१४ चे सदस्य, लवकर हस्तक्षेप उपचार केंद्र केंद्रशासन संचालित कार्यक्रमात सल्लागार समितीवर (२०१३). २०१४-१५ साठी राष्ट्रीय बालरोगतज्ज्ञ संघटनेच्या वाढ, विकास, वर्तनसमस्या या उपविभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष. २०१५ महाराष्ट्र शासनाच्या अपंगत्व प्रमाणीकरण समितीचे अध्यक्ष. समितीच्या रिपोर्टवर कायदा होणार. विविध विषयांवर भाषणे – फेब्रुवारी, २००१ पाटणा – मुलांच्या वर्तनसमस्या. नोव्हेंबर, २००२ दिल्ली – आंतरराष्ट्रीय परिषद, शाळेतील व वातावरणातील घटकांचा पौगंडावस्थेतील मुलांच्या व्यक्तिमत्त्वावर होणारा परिणाम. जानेवारी, २००३ मुंबई – मुलांचा विकास व प्रश्न. जानेवारी, २००४ चेन्नई – मुलांच्या बौद्धिक विकासाचे प्रश्न कसे ओळखायचे, तसेच मुलांशी सुसंवाद : वाचा विकास यावर मार्गदर्शन. सप्टेंबर, २००४ गुवाहाटी – सेरेब्रल पाल्सी आणि मतिमंदत्व निदान-उपचार. ऑक्टोबर, २००५ लखनौ – विकासात्मक चाचण्या. जानेवारी, २००६ दिल्ली – आहार व अपंगत्व. सप्टेंबर, २००६ दिल्ली – वाढीच्या तक्त्यांचा प्रक्टिसमध्ये वापर. सप्टेंबर, २००७ कटक – स्वनियंत्रित उपचाराद्वारे पौगंडावस्थेतील मुलांच्या वर्तनसमस्यांचे निराकारण. जानेवारी, २००८ मुंबई – प्रसारमाध्यमांचा मुलांच्या वर्तनावर होणारा परिणाम. डिसेंबर, २००८ महाबळेश्वर – पौगंडावस्थेतील मुलांच्या वर्तनसमस्या व उपचार. जानेवारी, २०१० हैदराबाद – दोन वर्षांच्या खालील मुलांसाठी खेळ-शाळा कशी असावी. ऑक्टोबर, २०१० – सवयींचे आजार तर लुधियाना येथे वर्तनसमस्या ओळख व उपचार. जयपूर-२०११, मुंबई-२०१२, शिर्डी-२०१२ येथील राष्ट्रीय परिषदांमध्ये वर्तनसमस्यांचे उपचार, लवकर हस्तक्षेप उपचार. २०१० मध्ये अध्ययन अक्षमता यावर कोल्हापूर येथे राज्यस्तरीय परिषदेत, तर नागपूरला २०१२, अस्थिर मुले व शाळेतील कार्यक्षमता तसेच वर्तनात्मक उपचार व औषधांचे उपचार यांतील फरक.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
MULANCHYA SAMRUDDHA JIVANASATHI Rating Star
Add To Cart INR 260

Latest Reviews

FRANKLIN MALIKA COMBO SET - 29 BOOKS
FRANKLIN MALIKA COMBO SET - 29 BOOKS by PAULETTE BOURGEOIS Rating Star
रश्मी मुसळे-साळगांवकर

लहानग्यांच्या विश्वातल्या छोट्या छोट्या गमतीजमती या पुस्तकांच्या मालिकेतून अगदी मजेशीर पद्धतीने मुलांसमोर येतात..त्या गोष्टी ऐकताना, वाचताना मूलं यात अगदी रमून जातात... शिवाय आजवर ससा आणि कासव यांव्यतिरिक्त इतर कथाविश्वात काहीसा दुर्लक्षित राहिलेलया कासवाच्या जगातही अनेक गंमती घडू शकतात ही नवखी कल्पना मुलांना भारीच आवडते... ...Read more

MARATHI DAULATICHE NARI SHILP
MARATHI DAULATICHE NARI SHILP by GOPAL DESHMUKH Rating Star
लोकसत्ता २२ जानेवारी २०२३.

बाईचे विश्व हे चूल आणि मूल एवढय़ापुरतेच मर्यादित नसते याची उदाहरणे आपल्याला इतिहासातसुद्धा पाहायला मिळतात. इतिहासात डोकावून पाहिले तर स्त्रियांचे आयुष्य हजार बंधनांनी जखडलेले होते. लहान वयातच मुलींची लग्नं केली जात असत. सतीची चाल, विधवांना केशपनाची सक्ती, सती जाणाऱ्या स्त्रियांच्या मरणाइतकेच सती न जाणाऱ्या विधवांचे जगणे भयंकर होते. अशा समाजातच काही स्त्रिया अशासुद्धा होऊन गेल्या ज्यांनी आपल्या कार्याने, आपल्या धाडसाने, शौर्याने महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाची भर टाकली. समाजाचा स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यात ज्यांचा मोलाचा वाटा आहे अशाच काही निवडक स्त्रियांचे चरित्र रेखाटन गोपाळ देशमुख यांनी ‘मराठी दौलतीचे नारी शिल्प’ या पुस्तकात केले आहे. जिजाऊमातेने बालशिवाजींची जडणघडण केली. अशा कर्तृत्ववान जिजाबाईंचे व्यक्तिचरित्र ‘राजमाता जिजाऊ’ या प्रकरणामध्ये सारांशरूपाने रेखाटण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. तसेच शिवरायांच्या जीवनात ज्या आठ राण्या आल्या त्यांच्या जीवनकार्याचे वर्णन ‘राणीवसा’ या प्रकरणात येते. ‘महाराणी येसूबाई’ या प्रकरणात त्यांची स्वराज्यनिष्ठा व दूरदृष्टी कशी दिसून येते याचे वर्णन केले आहे. संकटसमयी संभाजी राजांना दिलेल्या सल्ल्यामुळे त्यांच्या कार्यात मदत कशी झाली याचेही वर्णन आले आहे. ताराबाई, उमाबाई दाभाडे, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी युद्धभूमीवर शत्रूला तोंड कसे दिले. दर्याबाई निंबाळकर, पेशवा पत्नी गोपिकाबाई, रमाबाई, गंगाबाई यांनाही व्यक्तिगत सुखदु:खाबरोबरच मराठी दौलतीच्या वाटचालीत आपली भूमिका कशी पार पाडावी लागली याचीही माहिती पुस्तकात देण्यात आली आहे. दौलतीचा कारभार करताना अहिल्याबाईंना तीस वर्षे वैयक्तिक दु:खांना सामोरे जावे लागले. या साऱ्या दु:खांना बाजूला सारून उत्कृष्ट कार्य करून त्या ‘साध्वी पुण्यश्लोक अहिल्या’ कशा झाल्या याचा थोडक्यात आढावा घेतला आहे ‘अहिल्याबाई होळकर’ या प्रकरणात. तसेच पुतळाबाई आणि रमाबाई यांचे पतिनिष्ठेचे वर्णनही वाचायला मिळते. या सर्व व्यक्तिचरित्रांपैकी ‘राणी लक्ष्मीबाई’ यांचे चरित्र वाचताना त्यांची धाडसी वृत्ती, चिकाटी, येईल त्या प्रसंगाला न घाबरता शौर्याने सामोरे जाण्याची वृत्ती व शेवटी त्यांचा झालेला शोकात्मक शेवट आपल्या मनाला चटका लावून गेल्याशिवाय राहात नाही. वयाच्या चौदाव्या वर्षी गंगाधरराव यांच्याशी विवाह झाल्यानंतर आपल्या मुलाच्या आणि पतीच्या निधनानंतर शोक करत न बसता ही वीरांगना आपला दत्तक मुलगा दामोदर याला घेऊन ब्रिटिशांच्या कटू कारस्थानांना तोंड देण्यास सज्ज झाली होती. यातच तिला वीरमरण आले. हे वीरमरण येतानासुद्धा ती मोठय़ा शौर्याने अखेरच्या क्षणापर्यंत लढली आणि जेव्हा आपला देह आपल्याला साथ देत नाही हे लक्षात आले तेव्हा तिने आपल्या अनुयायांना आपला देह शत्रूच्या हातात पडता कामा नये, त्याला अग्नी द्या, असे सांगितले. अशा या वीरांगनेची गर्जना ‘मै मेरी झांसी नही दूंगी’ ही आजही अनेक स्त्रियांना आपल्या कामात प्रेरणा देणारी अशी आहे. राणी लक्ष्मीबाईच्या मरणाविषयी अनेक हकीकती उपलब्ध आहेत. त्यांचा उल्लेखही या पुस्तकात आला आहे. या पुस्तकातील स्त्रिया इतिहासकालीन असल्याने काही ठिकाणी ऐतिहासिक संदर्भाची पुनरावृत्ती झाल्यासारखे वाटते; पण ते येणेसुद्धा गरजेचे आहे. साध्या सोप्या भाषेत ही स्त्री चरित्रे आपल्याला वाचायला मिळतात. थोडक्यात असे म्हणता येईल की, इतिहासकाळातील थोर महिला विभूतींच्या जीवनकार्याचा अल्पांशाने सार वाचकांपुढे मांडण्याचा प्रयत्न लेखक गोपाळ देशमुख यांनी केला आहे, तो कौतुकास्पद आहे. ...Read more