DR.SUCHIT TAMBOLI

About Author

Birth Date : 24/02/1965


PAEDIATRICS, CHILD DEVELOPMENT AND ADOLESCENCE (M.B.B.S., D.C.H., P.G.D.A.P., P.G.D.M.L.S.) IN JANUARY, 1992, MAHARASHTRAS FIRST PRIVATE CHILD DEVELOPMENT CENTER WAS ESTABLISHED AT AHMEDNAGAR. EARLY INTERVENTION TREATMENT METHODS, CHILD BEHAVIOR PROBLEMS, CHILDREN FALLING BEHIND IN SCHOOL, MENTAL RETARDATION, FAMILY HEALTH-COACHING FOR ADOLESCENT CHILDREN ETC. SPEECHES ALL OVER INDIA ON THE SUBJECTS.

बालरोग, बालविकास व पौगंडावस्थातज्ज्ञ (M.B.B.S., D.C.H., P.G.D.A.P., P.G.D.M.L.S.) जानेवारी, १९९२ मध्ये अहमदनगर येथे महाराष्ट्रातील पहिल्या खासगी बालविकास केंद्राची स्थापना. लवकर हस्तक्षेप उपचार पद्धती , मुलांच्या वर्तनसमस्या, शाळेत मागे पडणारी मुले, मतिमंदत्व, पौगंडावस्थेतील मुलांसाठी कौटुंबिक आरोग्य-प्रशिक्षण इ. विषयांवर संपूर्ण भारतभर भाषणे. राष्ट्रीय बालरोगतज्ज्ञ संघटने च्या शालेय शिक्षण समितीचे सदस्य. आकाशवाणीवर ५० कार्यक्रम प्रक्षेपित. लोकमत , सकाळ , लोकसत्ता , महाराष्ट्र टाइम्स इ. वृत्तपत्रांमध्ये लेख प्रसिद्ध. जन्मलेल्या बाळांसाठी मातेने करायचा सोपा बौद्धिक कार्यक्रम जागतिक आरोग्य संघटने नेसुद्धा (WHO) मान्य केला आहे. राष्ट्रीय स्थूलता निवारण समिती २०१२-१४ चे सदस्य, लवकर हस्तक्षेप उपचार केंद्र केंद्रशासन संचालित कार्यक्रमात सल्लागार समितीवर (२०१३). २०१४-१५ साठी राष्ट्रीय बालरोगतज्ज्ञ संघटनेच्या वाढ, विकास, वर्तनसमस्या या उपविभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष. २०१५ महाराष्ट्र शासनाच्या अपंगत्व प्रमाणीकरण समितीचे अध्यक्ष. समितीच्या रिपोर्टवर कायदा होणार. विविध विषयांवर भाषणे – फेब्रुवारी, २००१ पाटणा – मुलांच्या वर्तनसमस्या. नोव्हेंबर, २००२ दिल्ली – आंतरराष्ट्रीय परिषद, शाळेतील व वातावरणातील घटकांचा पौगंडावस्थेतील मुलांच्या व्यक्तिमत्त्वावर होणारा परिणाम. जानेवारी, २००३ मुंबई – मुलांचा विकास व प्रश्न. जानेवारी, २००४ चेन्नई – मुलांच्या बौद्धिक विकासाचे प्रश्न कसे ओळखायचे, तसेच मुलांशी सुसंवाद : वाचा विकास यावर मार्गदर्शन. सप्टेंबर, २००४ गुवाहाटी – सेरेब्रल पाल्सी आणि मतिमंदत्व निदान-उपचार. ऑक्टोबर, २००५ लखनौ – विकासात्मक चाचण्या. जानेवारी, २००६ दिल्ली – आहार व अपंगत्व. सप्टेंबर, २००६ दिल्ली – वाढीच्या तक्त्यांचा प्रक्टिसमध्ये वापर. सप्टेंबर, २००७ कटक – स्वनियंत्रित उपचाराद्वारे पौगंडावस्थेतील मुलांच्या वर्तनसमस्यांचे निराकारण. जानेवारी, २००८ मुंबई – प्रसारमाध्यमांचा मुलांच्या वर्तनावर होणारा परिणाम. डिसेंबर, २००८ महाबळेश्वर – पौगंडावस्थेतील मुलांच्या वर्तनसमस्या व उपचार. जानेवारी, २०१० हैदराबाद – दोन वर्षांच्या खालील मुलांसाठी खेळ-शाळा कशी असावी. ऑक्टोबर, २०१० – सवयींचे आजार तर लुधियाना येथे वर्तनसमस्या ओळख व उपचार. जयपूर-२०११, मुंबई-२०१२, शिर्डी-२०१२ येथील राष्ट्रीय परिषदांमध्ये वर्तनसमस्यांचे उपचार, लवकर हस्तक्षेप उपचार. २०१० मध्ये अध्ययन अक्षमता यावर कोल्हापूर येथे राज्यस्तरीय परिषदेत, तर नागपूरला २०१२, अस्थिर मुले व शाळेतील कार्यक्षमता तसेच वर्तनात्मक उपचार व औषधांचे उपचार यांतील फरक.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
MULANCHYA SAMRUDDHA JIVANASATHI Rating Star
Add To Cart INR 460

Latest Reviews

रुपाली सोनवणे

#रुक #जाना #नही लेखक: Dr. भावेश भाटिया शब्दांकन: Dr: सचिन पाचोरकर अनुवाद: सुप्रिया वकील ​अंथरून पाहून पाय पसरावे... अह्ह.. त्या निर्जीव अंथरुणासाठी आपल्या सजीव पावलांना का त्रास द्यावा? असेच एक जबरदस्त आत्मचरित्र वाचून संपवलं आणि एक ऊर्जा निर्माणकरून गेलं, पुस्तकाचं नाव आहे `रुक जाना नहीँ ​डॉ. भावेश भाटिया यांची ही प्रेरणादायी कहाणी. शाळेत असताना आलेलं अकाली अंधत्व आणि त्यानंतर खडखडीत खडतर जीवनाचा सुरू झालेला प्रवास, पण या प्रवासात खचलेल्या बालमनाला त्यांच्या आईने दिलेलं बळ, प्रेरणा व आत्मसन्मानाची शिकवण आणि स्वाभिमानाचे धडे लेखकास पुरे होते. हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. चांगल्या धडधाकट व्यक्तीवर संकट आल्यावर दूर दूर पळणारे नातलग, मित्र परिवार, जातभाई... दृष्टी गेलेल्या व्यक्तीस कितपत आधार देतील? पण एक ऑपरेटर ते एक उद्योजक, `सनराईज कॅण्डल`चा विस्तार आणि स्वतःबरोबर अनेक दृष्टिहीन व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभं करून रोजगार देणारा हा अवलिया किती अडथळे पार करून आलाय हे जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचायला हवंच. ​कुठलाही वशीला नाही की कोणाची सहानुभूती नाही, स्वबळावर विविध प्रयोग करत उद्योग यशस्वी करणं सोपं नाही. यात ज्या ज्या देवमाणसांनी हातभार लावला त्यांचा पण उल्लेख आहे, पण त्या देवमाणसांनी देखील कधीच उपकारिक भाषा न करता व स्वाभिमान न दुखावता कशी मदत करता येऊ शकते हे त्यांच्या कृतीतून दाखवून दिलंय. लेखक फक्त उद्योग उभारून थांबले नाहीत तर त्यांनी सामाजिक जाणीवेचं भान देखील ठेवलंय. महाबळेश्वरमध्ये सनराईज कॅण्डल नावाने त्यांनी भव्य असा उद्योग परिसर आणि म्युझियम सुरू केलंय, तेथे अनेक दृष्टिहीन व्यक्तींना रोजगार मिळाला आहे त्याचबरोबर सर्वजण स्वाभिमानाने कष्ट करून जगत आहेत. हजारो आयुष्य त्यांनी उजळून टाकली आहेत. दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार सह एकून 46 पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.विशेष म्हणजे सर्व पुरस्कार त्यांच्या योग्यतेनुसार दिले आहेत.. आणी अशा हजारो पुरस्कारांचे ते मानकरी आहेत असंच वाटत..त्यांच्या कामाची दखल रिलायन्स ग्रुप ने देखील घेतली आहे.व त्यांच्या पुस्तकास प्रस्तावना देखील नीता अंबानी यांनी दिली आहे.उद्योग करताना छोट्या छोट्या गोष्टी कसा प्रभाव करतात याच वर्णन देखील त्यांनी लिहिल आहे.. ​या कार्यात महत्त्वाचं योगदान त्यांच्या धर्मपत्नी नीता भाटिया यांनी दिलं आहे. दूरदृष्टी ठेवून आपल्या पतीस प्रोत्साहन देऊन, नवीन कल्पनेसह पाठिंबा देऊन त्यांना हुरूप देण्याचं काम त्यांनी केलंय. नीता भाटिया यांचं कर्तृत्व, त्यांचं पवित्र निस्वार्थी प्रेम या पुस्तकातून वाचताना आंतरिक वेगळी ऊर्जा मिळते. कलियुगातील देवी हा शब्द व मान त्यांना समर्पक वाटतो. पुस्तक सर्व वयोगटातील वाचक वाचू शकतात. मनाने खचलेल्या पण शरीराने धडधाकट असलेल्या प्रत्येक व्यक्तीने वरील पुस्तक नक्की वाचावं आणि आत्मसात करावं. एवढ्या उंचीवर असूनही जमिनीवर पाय असलेल व्यक्तिमत्व आहे. अगदी प्रेमळ पणे वागण बोलण सन्मान देण..ही दैवी देणगी त्यांच्या जवळ आहे. ...Read more