* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE MIRACLE
  • Availability : Available
  • Translators : JAYWANT CHUNEKAR
  • ISBN : 9788177661033
  • Edition : 2
  • Publishing Year : MARCH 2001
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 508
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THOUSANDS OF DESPERATE PEOPLE ARE DRAWN TO LOURDES AND ITS RENOWNED GROTTO WHEN THE VATICAN ANNOUNCES THAT THE VIRGIN MARY WILL PERFORM ANOTHER MIRACLE CURE THERE. THEIR LIVES ARE AT STAKE…BUT WILL A MIRACLE REALLY OCCUR? IRVING WALLACE, AUTHOR OF THE WORD, THE MAN, AND THE PRIZE, FOCUSES ON AN ECLECTIC GROUP OF PILGRIMS AT THE SITE OF THE VIRGIN MARY`S LEGENDARY APPEARANCE: KEN CLAYTON, A YOUNG AMERICAN WHO GIVES UP MEDICINE IN HOPE OF A SPIRITUAL CURE; HIS FIANCÉE, AMANDA, A PSYCHOLOGIST; A POWERFUL RUSSIAN OFFICIAL WHO MUST KEEP HIS DANGEROUS VISIT A SECRET; HURTADO, A BASQUE TERRORIST TO WHOM THE GROTTO SYMBOLIZES REPRESSION; LIZ FINCH, A CYNICAL JOURNALIST; KLEINBERG, A JEWISH DOCTOR; EDITH MOORE, AN ENGLISH WOMAN WHO IS THRUST INTO THE LIMELIGHT BECAUSE OF HER OWN RECOVERY; AND GISELE, WHOSE AMBITION IS NOT TO REACH LOURDES BUT TO ESCAPE IT.THIS IS A NOVEL OF MYSTERY, FAITH, BLACKMAIL, LOVE, AND VIOLENCE, ENCASING THE FASCINATING STORY OF BERNADETTE, THE YOUNG FRENCH PEASANT GIRL WHO FIRST SAW MARY AT THE GROTTO IN 1858. THE SUBJECT IS THOUGHT PROVOKING. THE CLIMAX IS SURPRISING.
लूर्द फ्रान्समधलं एक छोटसं गाव. खिश्चनधर्मीयांचं पवित्र श्रद्धास्थान. एक किसानकन्या; एपीआय् या वृत्तसंस्थेची, एक सुमार रूपाची, पण बुद्धिमान वार्ताहर; एक रूपसंपन्न, निष्णात मानसशास्त्रज्ञ आणि तिचा गुणसंपन्न,देखणा प्रियकर; रशियन पंतप्रधानकीची महत्त्वाकांक्षा बाळगणारा एक रशियन परराष्ट्रमंत्री; साधी-सरळ, निष्कपट, नोकरदार ब्रिटिश महिला नि तिचा अनेक ‘उद्योग’ करणारा नवरा; एक अंध, पण रूपवान इटालियन तरुण अभिनेत्री नि तिचा क्रांतिकारक प्रियकर. वेगवेगळ्या स्वभावांच्या,व्यक्तिमत्त्वांच्या; वेगवेगळ्या थरांतल्या या व्यक्ती लूर्दला गोळा होतात आणि सुरू होतं एक उत्कंठापूर्ण , काहीशी रहस्याची छटा असणारं नाट्य. श्रद्धा, अंधश्रद्धा यांच्यांतील द्वंद्वाच्या आधारे उलगडत जाणारी कहाणी. श्रद्धेचा आणि धर्माचा ‘वापर’ आणि ‘व्यापार’ करुन घेण्याची वृत्ती सार्वत्रिकच असते. म्हणूनच ‘द मिरॅकल’ वाचून विसाव्या शतकाच्या अखेरीस मराठी वाचक आपले विचार, आपला धर्म आणि आपलं राष्ट्र यांबाबत अंतर्मुख होऊन पुन्हा एकदा नव्यानं मांडणी करील, असं वाटतं.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #THEMIRACLE #THEMIRACLE #दमिरॅकल #FICTION #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #JAYWANTCHUNEKAR IRVING WALLACE इर्विंग वॉलेस "
Customer Reviews
  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    श्रद्धा-अंधश्रद्धा यांच्यातील संघर्षाचे रोमांचकारक थरारनाट्य... `दि मिरॅकल` ही कादंबरी एका उत्कंठावर्धक कथासूत्राभोवती गुंफण्यात आली आहे. मानवी श्रद्धा-अश्रद्धा या अथांग आहेत; आणि माणूस कितीही बौद्धिक, तात्त्विक उंचीवर गेला तरी त्याच्या अंतर्मनातील ूलभूत श्रद्धा-अश्रद्धांचा आविष्कार कसा व कुठे होईल याबाबत काहीही अनुमान करता येत नाही. आयर्विंग वॅलेस हा सेव्हन्थ सिक्रेट, सेकंड लेडी, प्राइझ वगैरे कादंबऱ्यांचा गाजलेला लेखक. येशू खिस्ताची माता पवित्र व्हर्जिन मेरी यंदा पुन्हा ऑगस्टमध्ये अवतार घेणार या भविष्यवाणीवर कॅथॉलिक पंथाचे धर्मगुरू पोप अधिकृत म्हणून शिक्कामोर्तब करतात; आणि त्यासाठी नेमलेल्या समितीचा निर्णय पत्रकार परिषदेत जाहीर करतात. त्यानंतर जगभर उमटणाऱ्या या चमत्काराबद्दलच्या प्रतिक्रियांची सांगड घालून आयर्विंग वॅलेस या कादंबरीच्या कथानकामध्ये रंग भरत जातो. फ्रान्सच्या लूर्द या लहानशा गावातील एका किसानकन्या बेनादेत्त सिबिल ही गावाबाहेरच्या एका गुहेत सहज जाते आणि तिला पवित्र व्हर्जिन मेरीचे दर्शन होते. पुढेही रोज ती गुहेला भेट देते आणि पवित्र मेरी तिला तीन रहस्यपूर्ण गोष्टी सांगते; मात्र आपल्या हयातीत ती रहस्ये गुप्तच ठेवण्याची अट घालते. खुद्द पोपने विचारले तरी ती रहस्ये आपण उघड करणार नाही असे ती म्हणते. त्या रहस्यांचा संबंध माझ्याशीच आहे, इतर कोणाशी नाही, तेव्हा ती इतर कोणाला सांगण्याची गरजच नाही असे ती ठामपणे पुन:पुन्हा सांगते. पवित्र व्हर्जिन मेरीचे दर्शन तिला खरोखर झाले काय याबद्दल कोणी शंका घेत नाही. का? तर त्या साध्याभोळ्या किसानकन्येच्या संपूर्ण देहाला एक दिव्य रूप प्राप्त होते. चेहरा स्वर्गीय तेजाने झळाळू लागतो. डोळ्यांमध्ये अलौकिक चमक दिसते. ओठांवरचे हास्यही गूढ रम्य जाणवते. गुहेच्या प्रत्येक भेटीनंतर ती जे काही सांगते त्यातून लोकांना तिच्या साक्षात्काराची जास्तीत जास्त खात्री पटू लागते. ११ फेब्रुवारी १८५८ रोजी व त्यानंतर एकूण १८ वेळा पवित्र मेरीने बेनादेत्तला गुंफेत दर्शन दिले. हा साक्षात्कार पूर्णपणे सत्य आह, आणि त्या श्रद्धावान मुलीचा विश्वास आहे, म्हणून तिला अवर लेडी ऑफ ग्रोटो ऑफ लूर्द म्हणून मान्यता देण्याचा निर्णय नोव्हेंबर १८६२ मध्ये तेथील बिशपने नेमलेल्या पहिल्या चौकशी आयोगाच्या अहवालानंतर लूर्दमध्ये जाहीर करण्यात येतो. त्या गुहेतल्या झऱ्याच्या पाण्याने अनेकांचे असाध्य आजार बरे होतात; अनेक अपंग बरे होतात. मृत्यूआधी एका टिपणवहीत बेर्नादत्तने आपल्याला पवित्र मेरीने दिलेल्या दर्शनांची व सांगितलेल्या रहस्यांची नोंद करून ठेवली होती; आणि ती वही आपल्या एका आप्ताकडे देऊन ठेवली होती. त्या टिपणवहीचा १४० वर्षांनी अभ्यास करून तिसरे रहस्य एका पत्रकार परिषदेत उघड करण्यात येते. ते रहस्य म्हणजे १४ ते २२ ऑगस्ट दरम्यान आपण पुन्हा लूर्द येथे अवतीर्ण होऊन आणखी एका व्यक्तीला स्वत:ची ओळख पटवून देऊ आणि दु:खमुक्तीचा चमत्कार घडवून आणू.`` या नोंदीतले वर्ष हे यंदाचे वर्ष आहे. जगातील सर्व वृत्तपत्रे `पवित्र व्हर्जिन मेरी पुन्हा लूर्दला अवतरणार आणि रुग्णांना दु:खमुक्त करणार` अशा बातम्या पहिल्या पानावर छापतात. या पत्रकार परिषदेला एपीआय या वृत्तसंस्थेची पॅरिसस्थित प्रतिनिधी म्हणून लिझ फिंच हजर असते. पॅरिसच्या आर्च बिशपने बोलावलेल्या या पत्रकार परिषदेला अभूतपूर्व गर्दी उसळलेली असते. बेर्नादतने मेरीच्या पुनरावतरणाची जी तारीख लिहून ठेवली आहे ती चालू वर्षातील १४ ते २२ ऑगस्ट दरम्यानची आहे. या अवधीला पुनरावतरण अवधी म्हणून घोषित करण्यात येते. या बातमीचे महत्त्व लिझला काहीच जाणवत नाही; पण तिचा वरिष्ठ ट्रास्क म्हणतो, ``या बातमीने अर्धे जग लूर्दकडे यायला निघेल. लूर्दच्या या गुहेत आजही सालिना पन्नास लाखावर लोक भेट देतात. आपले आजार बरे झाले असे सांगणारे पाच हजारावर तरी लोक हयात आहेत. जगातल्या ७४ कोटी कॅथॉलिक खिश्चनांचा त्यावर विश्वास आहे.`` आणि तो लिझला सांगतो, ``पुढचे तीन चार आठवडे तू लूर्दला राहून या घटनेचा पाठपुरावा कर. व्हर्जिन मेरीच्या पुनरागमनाबाबत प्रत्यक्ष साक्षीदारांची कहाणी मिळव.`` या असल्या भंपक भाकडकथेवर कोणीतरी विश्वास ठेवील काय असा प्रश्न लिझ फिंचला पडतो. परंतु या बातमीने भलेभले प्रभावित होतात. तेहतीस वर्षांचा धनाढ्य केन क्लेटन वैद्यकीय मानसशास्त्रज्ञ अ‍ॅमंडा स्पेन्सरशी लग्न करण्याच्या विचारात असतो; पण तेवढ्यात त्याला हाडाचा कर्करोग असल्याचे निष्पन्न होते; आठवड्याच्या आत शस्त्रक्रिया केली तरच जगण्याची थोडीफार आशा असे डॉक्टर व्हिटनी सांगतात. परंतु व्हर्जिन मेरीची बातमी वाचताच केन शस्त्रक्रियेला नकार देतो; आणि लूर्दला प्रयाण करतो. त्याची प्रेयसी अ‍ॅमंडा ही फादर आर्न यांना भेटून बेर्नादत्तच्या संदर्भातील बातमीबद्दल चर्चा करते. तत्संबंधित पुस्तके वाचून ती त्यांच्याशी वाद घालते. रशियन परराष्ट्रमंत्री सर्जी तिखनॉव हे संयुक्त राष्ट्रसंघात भाषण देत असताना तेथील राजदूत इझकॉन मध्येच उठून बाहेर पडतो. नंतर तिखनॉवला तो सांगतो, ``पंतप्रधान स्क्रायबिन यांना अर्धांचा झटका आला आहे. तुमची निवड पुढचा पंतप्रधान म्हणून केली आहे. केजीबीचे प्रमुख जन. कोसॉफ यांच्याशी बोलून पुढचे प्लॅन ठरवा.`` त्याच वेळी डॉ. इव्हान्स कार्प या मूळ रशियन पण न्यूयॉर्कस्थित डॉक्टरकडे रुटिन चेकअपसाठी गेलेल्या तिखनॉवचा रिपोर्ट पाहून, त्याला डॉ. कार्प तातडीने भेटीला बोलावतो आणि तुम्हाला मस्क्युलर डिस्ट्रफी झाली आहे, ती मिश्र प्रकारची आहे. हातापायाचे स्नायू कमकुवत होत जातील. ही दुर्बलता थोपवण्यासाठी कोणताही उपाय आज ज्ञात नाही. तुम्ही राजीनामा देऊन पूर्ण व्यायाम-विश्रांतीकडे लक्ष दिले तर दहा-बारा वर्षे जगू शकाल. नाहीतर दोनतीन वर्षांपेक्षा अधिक जगू शकणार नाही.`` पंतप्रधानपदाची आलेली संधी या मस्क्युलर डिस्ट्रफीने हुकणार या विचाराने तिखनॉव बेचैन होतो. त्याचवेळी लूर्दला व्हर्जिन मेरी पुन्हा अवतरणार, रोगमुक्त करणार ही बातमी तो बघतो आणि लूर्दच्या प्रवासाची योजना आखतो. पण बनावट नावाने. बनावट पासपोर्टवर. सॅम्युअल टॅली नामक अमेरिकन नागरिक म्हणून तो वेषांतर करून फ्रान्समध्ये दाखल होतो. तेथे डॉ. मोत्ता यांना डॉ. कार्पच्या तपासणीचा रिपोर्ट दाखवितो. अकाली वृद्धत्वाकडे झुकू लागलेल्या व्यक्तींवर उपचार करणे ही त्याची स्पेशॅलिटी. डिस्ट्रफीवर उपचार हे अनुषंगिक काम. नताली रिनाल्डी ही एक नव्या दमाची अभिनेत्री. तीन वर्षांपूर्वी ऑप्टिक अ‍ॅट्रिफने (अपुऱ्या पोषणामुळे झालेल्या दृष्टिक्षयाने) तिला अंधत्व आले, आणि तिचे अभिनय क्षेत्रातले अस्तित्वच संपुष्टात आले. तीही लूर्दला जाण्याचे ठरविते. एडिथ मूर एका चित्रपट एजन्सीचं काम करीत असे. मालकाची वैयक्तिक सचीव. भरपूर पगार. लग्नानंतर तीन वर्षांनी तिच्या नितंबात वेदना सुरू होतात. बायोप्सी होते. सरकोमा-लहान आतड्यातील खालच्या हाडातील जोडपेशीवर गाठ. या व्याधीवरही अजून औषध सापडलेले नाही. नोकरी सोडणे तिला भाग पडते. लूर्दला जाऊन तरी बघू या असा विचार ती करते; आणि तिला तेथील पाण्याने फायदा होतो. व्याधीची तीव्रता कमी होते. कुबड्या न घेता चालता येते. पुन्हा नोकरी स्वीकारते. आर्चबिशप तिच्या व्याधिमुक्तीच्या अद्भूत कहाणीबद्दल तिच्याशी चर्चा करतात... आणि आता व्हर्जिन मेरी दर्शन देणार ही बातमी येते. आर्चबिशप तिला सांगतात, ``कदाचित मेरी तुला दिसेल. तू एक अलौकिक स्त्री ठरशील.`` तिचा नवरा रेगी हा या घटनेवर चित्रपट काढण्याची कल्पना मनात खेळवतो. `दैवी वरदान असलेली स्त्री` पत्नी म्हणून आपल्याला लाभली आहे हे लक्षात येताच त्याच्या कल्पनाशक्तीचे विमान हवेत उंच झेपावू लागते. केवळ चित्रपट काढून थांबायचे नाही. लूर्दमधले हॉटेल विकत घ्यायचे, लूर्दच्या सहली आखणारी ट्रॅव्हल एजन्सी चालवायची असे त्याचे मनोरथ दौडू लागतात. स्पेनमधील जुलमी फ्रॅंकोच्या कारकीर्दीत छळ झालेल्या कुटुंबातला मायकेल हुर्टाडो क्रांतिकारक व लेखक बनलेला होता. कॉम्रेड क्रांतिकारक म्हणून तो बॉम्बनं लूर्दची ती नतद्रष्ट गुहाच उद्ध्वस्त करण्याची योजना आखतो. बास्क नागरिकांना गुलामीतून मुक्त करू पाहणाऱ्या इटीए या दहशतवादी संघटनेचा तो कार्यकर्ता असतो. १९७३ मध्ये अ‍ॅडमिरल ब्रँको प्रार्थनेसाठी चालला असताना स्फोट घडवून त्याची गाडी पाच मजली इमारतीच्याही वर फेकली गेली होती. हुर्टाडोची साथीदार ज्युलिया वाल्देझ ही लूर्दची गुहा बाँबस्फोटाने उडवण्याच्या योजनेला विरोध करते. ``मायकेल, तसं करणं म्हणजे साक्षात ईश्वरी वस्तूचाच अपहार करण्याचं भयंकर कृत्य ठरेल ते!`` अशा विविध उपकथानकांची जोड देऊन आयर्विंग वॅलेस या सर्व पात्रांना लूर्द येथे आणून त्यांच्या नाट्यपूर्ण भेटीगाठीमध्ये रंग भरू लागतो. व्हर्जिन मेरीच्या संभाव्य अवतरणाच्या आदल्या दिवशीच एपीआयची प्रतिनिधी लिझ फिंचच लूर्दला येऊन ओतेला गालिआ अँड लोन्द्रमध्ये मुक्काम ठोकते. गावात फेरफटका मारते. व्हर्जिन मेरी, बेर्नादत्त यांच्या प्रतिमांचा वापर करून तयार केलेल्या भेटवस्तूंची दुकाने भरलेली असतात. गुहेतल्या पाण्याचा वापर केलेल्या साखरेच्या कांड्या, पाण्यासाठी बाटल्या– तेथील एक वृत्तप्रसारण कचेरीत जाऊन ती धडकते. ओळखपत्र व माहितीपत्रकांचे पाकीट घेते. झिसल द्युप्री या मार्गदर्शक तरुणीला बरोबर घेऊन ती गुंफेकडे जाते. १८५८ साली बेर्नादत्तला त्या गुहेत जे दिसले, त्याची माहिती घेते. त्याचवेळी ती झिसलला एक ऑफर देते.`` ही सारी लूर्द कथा बनावट आहे अशी माझी खात्री आहे. पण ते सिद्ध करणं आवश्यक आहे. तू हे गाव, इथले लोक यांच्या पातळीवर रहा. काही धागादोरा मिळाला तर मला सांग. मला त्यातून मोठी स्टोरी मिळेल. मी तुला खूप पैसे देईन.`` बेर्नादत्तचं बिंग फोडणारी ही कहाणी नक्कीच मोठी ठरेल अशी तिची खात्री असते. १४ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट या कालावधीत ३० लाख खासगी मोटारी, ३० हजार बसगाड्या, ४ हजार विमानं, ४ हजार विमानं, ११०० रेल्वेगाड्या लूर्दमध्ये प्रवाशांना आणून सोडणार होत्या. दरवर्षी ५० लाख पर्यटक येत. यंदा ही संख्या कितीतरी पटीने वाढणार होती. अ‍ॅमंडा व केन फ्लेटन फादर वुडकोर्टसह तेथे येतात. सर्जी तिखनॉव सॅम्युएल टॅली बनून येतो, आणि इतर कुठा जागा न मिळाल्यामुळे योगायोगाने झिसल द्युप्रीच्याच घरी उतरतो. आंधळी अभिनेत्री नताली गुंफेत रोझाबरोबर जाते. बेर्नादत्तने जेथे गुडघे टेकून प्रार्थना केली त्या जागी बसून प्रार्थना करते. हुर्टाडो गुहेत फिरत असताना त्याला केन समजून अ‍ॅमंडा स्पेन्सर क्लेटन त्याच्या दंडाला पकडते. तो तिला म्हणतो, ``तुमची काहीतरी चूक झालेली दिसते. मी क्लेटन नाही.`` मग त्या दोघांची श्रद्धेबद्दल चर्चा होते. रात्री दोन वाजता अंध नताली एकटीच हॉटेलबाहेर पडते आणि ठामपणे पावले टाकीत ती गुंफेत जाऊन व्हर्जिन मेरीची प्रार्थना करण्यात दंग होते. तिची निश्चल समाधी लागते. थोडी हालचाल करून ती जमिनीवर उन्मनी अवस्थेत अचेतन होऊन पडते. हुर्ताडो तिला पाहून दचकतो. तिच्या मदतीला जाण्याचे तो टाळतो. स्फोटानंतर संशयिताचा शोध सुरू झाला तर ती त्याला आवाजावरून ओळखू शकेल अशी भीती तिला वाटते. तेवढ्यात त्या हॉटेलमधला नाइट वॉचमन अनातोल तेथे येऊन तिच्या चेहऱ्यावर पाणी मारून तिला शुद्धीवर आणतो. तिला उभे करून तिचा हात पकडून तिला गुंफेबाहेर नेतो. ती दुक्कल बाहेर पडेपर्यंत वाट बघायचे हुर्ताडो ठरवतो... हॉटेलात आल्यावर अनातोल नतालीच्या खोलीत शिरतो. तिच्याशी लगट करू शकतो. तिची किंचाळी ऐकून हुर्ताडो त्या खोलीत शिरतो आणि अनातोलाच्या जबड्यावर दणका देतो. अनातोलला तो खोलीबाहेर आणून आणखी लाथांनी तुडवतो. नताली त्याला धन्यवाद देते. इकडे झिसलला त्या दिवशीच्या वृत्तपत्रात रशियन पंतप्रधान आजारी, पंतप्रधानपदी कोण येणार ही बातमी वाचायला मिळते. संभाव्य उमेदवारांचे फोटो बघितल्यावर त्यातील एक चेहरा ओळखीचा दिसतो. मात्र त्याखाली नाव असते तिखनॉव. तिला संयुक्त राष्ट्रसंघातले दिवस आठवतात. तिखनॉवही वृत्तपत्र पाहतो. त्याला आपला फोटो दिसतो. तो लगेच स्नानकुंडाकडे निघतो. स्नानानंतर बाहेर पडताना वेषांतर करण्यासाठी लावलेली मिशी खाली पडते. तो ती उचलून पुन्हा लावतो. तिकडे झिसल कॅमेरा लावून उभी असते. कॅमेऱ्यात आपले चित्र आले धंदेवाईक मिस्टर मूर मादाम मूर्ख मिरॅकल रेस्टॉरंट असा बोर्ड लावून कर्करोगातून मुक्त झालेल्या एडिथ मूरच्या नावाने ग्राहकांना आकृष्ट करू पाहतात. तिला भेटायला व तिच्याशी गप्पा मारायला एक वेगळे दालन सजवलेले असते. त्यासाठी खास मेनू. जबरदस्त कव्हर चार्ज. तरीही गर्दी होतेच. लूर्दची आर्थिक सुबत्ता तेथील गुहेच्या पर्यटकांवर अवलंबून असते. त्यामुळे तेथे घडणाऱ्या चमत्कारांच्या कहाण्या लोकांपुढे सातत्याने येण्याची गरज असते. पत्रकार लिझ किसानकन्येचा ढोंगीपणा उघड करायला आलेली असते. तिला तसे काही पुरावेही मिळतात. बेर्नादत्तच्या पहिल्या डायरीतच तसे काही उल्लेख येतात. पण अंध अभिनेत्री नताली हिला गुहेत प्रार्थना केल्यावर खरोखरच दृष्टी येते आणि तिचा व्हर्जिन मेरीचे दर्शन होते तेव्हा तिच्या मनात खरा गोंधळ सुरू होतो. फक्त सहा व्यक्तींनाच ही घटना सांगण्याची व त्यांनी तिची वाच्यता न करण्याची शपथ घातलेली असते. एडिथ मूरचा कर्करोग पुन्हा उचल खातो. पण त्यातून ती मुक्त होते. चमत्काराचे मग नवेच अर्थ गवसतात. हे सगळे नंतरचे कथानकातले गुंते हे मूळातूनच वाचायला हवेत. आयर्विंग वॅलेसने त्यातील गुंतागुंत रंगवताना खूपच कल्पकता दाखवली आहे. अनेक पथ्ये पाळली आहेत. लिझलाही पत्रकारितेत स्थैर्य मिळेल अशी घेतली दक्षता आहे. एकदा वाचायला घेतल्यावर सारखी पुढे काय अशी उत्सुकता लागून राहते आयर्विंग वॅलेसचे कथावस्तूचा उभारणीचे कौशल्य थक्क करते. ...Read more

  • Rating StarDAINIK LOKMAT 22-04-2001

    एका तरुणीला लूर्दच्या गुंफेत व्हर्जिन मेरीचे दर्शन होते, आणि... ‘दि मिरॅकल’ ही कादंबरी एका उत्कंठावर्धक कथासूत्राभोवती गुंफण्यात आली आहे; मानवी श्रद्धा-अंधश्रद्धांचा आविष्कार कसा व कुठे होईल याबाबत काहीही अनुमान करता येत नाही. आयर्विंग वॅलेस हा से्हन्थ सिक्रेट, सेकंड लेडी, प्राइझ वगैरे कादंबऱ्यांचा गाजलेला लेखक. येशू खिस्ताची माता पवित्र व्हर्जिन मेरी यंदा पुन्हा ऑगस्टमध्ये अवतार घेणार या भविष्यवाणीवर कॅथॉलिक पंथाचे धर्मगुरू पोप अधिकृत म्हणून शिक्कामोर्तब करता आणि त्यासाठी नेमलेल्या समितीचा निर्णय पत्रकार परिषदेत जाहीर करतात– त्यानंतर जगभर उमटणाऱ्या चमत्कारांबद्दलच्या प्रतिक्रियांची सांगड घालून आयर्विंग वॅलेसने या कादंबरीच्या कथानकामध्ये रंग भरला आहे. साक्षात्काराची आभा फ्रान्सच्या लूर्द या लहानशा गावातील एका किसान कन्य बेर्नादत्त सुबिरू ही गावाबाहेरच्या एका गुहेत सहज जाते आणि तिला पवित्र व्हर्जिन मेरीचे दर्शन होते. पुढेही रोज ती गुहेला भेट देते आणि पवित्र मेरी तिला तीन रहस्यपूर्ण गोष्टी सांगते, मात्र आपल्या हयातीत ती रहस्ये गुप्तच ठेवण्याची अट घालते. खुद्द पोपने विचारले तरी ती रहस्ये आपण उघडे करणार नाही असे म्हणते. त्या रहस्यांचा संबंध माझ्याशीच आहे, इतर कोणाशी नाही. तेव्हा ती इतर कोणाला सांगण्याची गरजच नाही असे ठामपणे पुन: पुन्हा सांगते. पवित्र व्हर्जिन मेरीचे खरोखर दर्शन तिला झाले का याबद्दल कोणी शंका घेत नाही. का? तर त्या साध्याभोळ्या किसानकन्येच्या संपूर्ण देहाला एक दिव्य रूप प्राप्त होते. चेहरा स्वर्गीय तेजाने झळाळू लागतो. डोळ्यांमध्ये अलौकिक चमक दिसते. ओठांवरचे हास्यही गूढरम्य जाणवते. गुहेच्या प्रत्येक भेटीनंतर ती जे काही सांगते त्यातून लोकांना तिच्या साक्षात्काराची जास्तीत जास्त खात्री पटू लागते. ११ फेब्रुवारी १८५८ रोजी व त्यानंतर एकूण १८ वेळा पवित्र मेरीने बेर्नादत्तला गुंफेत दर्शन दिले; हा साक्षात्कार पूर्णपणे सत्य आहे आणि त्या श्रद्धावान मुलीचा विश्वास साधार आहे म्हणून तिला अवर लेडी ऑफ ग्रोटो ऑफ लूर्द म्हणून मान्यता देण्याचा निर्णय नोव्हेंबर १८५८ मध्ये तेथील बिशपने नेमलेल्या पहिल्या चौकशी आयोगाच्या अहवालानंतर लूर्दामध्ये जाहीर करण्यात येतो. त्या गुहेतल्या झऱ्याच्या पाण्याने अनेकांचे असाध्य आजार बरे होतात, अनेक अपंग बरे होतात, मृत्यूआधी एका टिपणवहीत बेर्नादत्तने आपल्याला पवित्र मेरीने दिलेल्या दर्शनांची व सांगितलेल्या रहस्यांची नोंद करून ठेवली होती आणि ती वही आपल्या एका आप्ताकडे देऊन ठेवली होती. त्या टिपणवहीचा १४० वर्षांनी अभ्यास करून तिसरे रहस्य एका पत्रकार परिषदेत उघड करण्यात येते. ते रहस्य म्हणजे ‘‘१४ ते २२ ऑगस्ट दरम्यान आपण पुन्हा लूर्द येथे अवतीर्ण होऊन आणखी एका व्यक्तीला स्वत:ची ओळख पटवून देऊ आणि दु:खमुक्तीचा चमत्कार घडवून आणू.’’ या नोंदीतले वर्ष हे यंदाचे वर्ष आहे. जगातील सर्व वृत्तपत्रे पवित्र व्हर्जिन मेरी पुन्हा लूर्दला अवतरणार आणि रुग्णांना दु:खमुक्त करणार अशा बातम्या पहिल्या पृष्ठावर छापतात. पत्रकार लिझ फिंच या पत्रकार परिषदेला एपीआयया वृत्तसंस्थेची पॅरिसस्थित प्रतिनिधी म्हणून लिझ फिंच हजर असते. पॅरिसच्या आर्च बिशपने बोलावलेल्या या पत्रकार परिषदेला अभूतपूर्व गर्दी उसळलेली असते. बेर्नादत्तने मेरीच्या पुनरावतरणाची जी तारीख लिहून ठेवली आहे ती चालू वर्षातील १४ ते २२ दरम्यानची आहे. या अवधीला पुनरवतरण अवधी म्हणून घोषित करण्यात येत आहे. या बातमीचे महत्त्व लिझला काहीच जाणवत नाही; पण तिचा वरिष्ठ टास्क म्हणतो, ‘‘या बातमीने अर्धे जग लूर्दकडे यायला निघेल. लूर्दच्या या गुहेला आजही सालिना पन्नासावर लाखो भेट देतात. आपले आजार बरे झाले असे सांगणारे पाच हजारांवर तरी लोक हयात आहेत. जगातल्या ७४ कोटी कॅथलिक खिश्चनांचा त्यावर विश्वास आहे.’’ आणि तो लिझला सांगतो, ‘‘पुढचे तीन-चार आठवडे तू लूर्दला राहून या घटनेचा पाठपुरावा कर. व्हर्जिन मेरीच्या पुनरागमनाबाबत प्रत्यक्ष साक्षीदाराची कहाणी मिळव.’’ या असल्या भंपक भाकडकथेवर कोणीतरी विश्वास ठेवील का असा प्रश्न लिझ फिंचला पडतो. धनाढ्य केप क्लेटन परंतु या बातमीने भलेभले प्रभावित होतात. तेहतीस वर्षांचा धनाढ्य केन क्लेटन वैद्यकीय मानसशास्त्रही अ‍ॅमंडा स्पेन्सरशी लग्न करण्याच्या विचारात असतो; पण तेवढ्यात त्याला हाडाचा कर्करोग असल्याचे निष्पन्न होते; आठवड्याच्या आत शस्त्रक्रिया केली तरच थोडीफार जगण्याची आशा असे डॉक्टर व्हिटनी सांगतात. परंतु व्हर्जिन मेरीची बातमी वाचताच केन शस्त्रक्रियेला नकार देतो आणि लूर्दला प्रयाण करतो. त्याची प्रेयसी अ‍ॅमंडा ही फादर ऑर्न यांना भेटून बेर्नादत्तच्या संदर्भातील बातमीबद्दल चर्चा करते. तत्संबंधित पुस्तके वाचून ती त्यांच्याशी वाद घालते. रशियन तिरखॉव : पंतप्रधानपदी निवड रशियन परराष्ट्रमंत्री : सर्जी तिखनॉव हे संयुक्त राष्ट्रसंघात भाषण देत असताना तेथील राजदूत इझकॉन मध्येच उठून बाहेर पडतो. नंतर तिखनॉवला तो सांगतो, ‘‘पंतप्रधान स्क्रायबिन यांना अर्धांगवायूचा झटका आला आहे. तुमची निवड पुढचा पंतप्रधान म्हणून केली आहे. केजीबीचे प्रमुख जन. कोसॉफ यांच्याशी बोलून पुढचे प्लॅन ठरवा.’’ त्याचवेळी डॉ. ड्रव्हान्स कार्प या मूळ रशियन; पण न्यूयॉर्कस्थित डॉक्टरकडे रुटिन चेकअपसाठी गेलेल्या तिखनॉवचा रिपोर्ट पाहून, त्याला डॉ. कॉर्प तातडीने भेटीला बोलावतो आणि तुम्हाला मस्क्युलर डिस्ट्रफी झाली आहे, ती मिश्र प्रकारची आहे. हातपायाचे स्नायू कमकुवत हात जातील. ही दुर्बलता थोपवण्यासाठी कोणताही उपाय ज्ञात नाही. तुम्ही राजीनामा देऊन पूर्ण व्यायाम-विश्रांतीकडे लक्ष दिले तर दहाबारावर्षं जगू शकाल. नाही तर दोन-तीन वर्षांपेक्षा अधिक जगू शकणार नाही. पंतप्रधानपदाची आलेली संधी या मस्क्युलर डिस्ट्रफीने हुकणार या विचाराने तिखनॉव बेचैन होतो. त्याचवेळी लूर्दला व्हर्जिनमेरी पुन्हा अवतरणार, रोगमुक्त करणार ही बातमी तो बघतो आणि लूर्दच्या प्रवासाची योजना आखतो. पण बनावट नावाने. बनावट पासपोर्टावर. सॅम्युएल टॅली नामक अमेरिकन नागरिक म्हणून तो वेशांतर करून फ्रान्समध्ये दाखल होतो. तेथे डॉ. मोत्ता यांना डॉ. कार्पच्या तपासणीचा रिपोर्ट दाखवतो. अकाली वृद्धत्वाकडे झुकू लागलेल्या व्यक्तींवर उपचार करणे ही त्याची स्पेशॅलिटी. डिस्ट्रफीवर उपचार हे अनुवंशिक काम. तरुण अभिनेत्री नताली हिचे अंधत्व नताली रिनाल्डी ही एक नव्या दमाची अभिनेत्री. तीन वर्षांपूर्वी अँप्टिक अ‍ॅट्रफिने (अपुऱ्या पोषणामुळे झालेल्या दृष्टिक्षयाने) तिला अंधत्व आले आणि तिचे अभियन क्षेत्रातले अस्तित्वच संपुष्टात आले. तीही लूर्दला जाण्याचे ठरविते. एडिथ मूर; असाध्य रोग एडिथ मूर एका चित्रपट एजन्सीचं काम करीत असे. मालकाची वैयक्तिक सचिव. भरपूर पगार. लग्नानंतर तीन वर्षांनी तिच्या नितंबात वेदना सुरू होतात. बायोप्सी होते. सरकोमा– लहान आतड्यातील खालच्या हाडातील जोडपेशीवर गाठ. या व्याधीवरही अजून औषध सापडलेले नाही. नोकरी सोडणे तिला भाग पडते. लूर्दला जाऊन तरी बघू या असा विचार ती करते आणि तिला तेथील पाण्याने पाण्याने फायदा होतो. व्याधीची तीव्रता कमी होते. कुबड्या न घेता चालता येते. पुन्हा नोकरी स्वीकारते. आर्चबिशप तिच्या व्याधीमुक्तीच्या अद्भूत कहाणीबद्दल तिच्याशी चर्चा करतात... आणि आता व्हर्जिन मेरी दर्शन देणार ही बातमी येते आर्चाबिशप तिला सांगतात. ‘‘कदाचित मेरी तुला दिसेल. तू एक अलौकिक स्त्री ठरशील.’’ तिचा नवरा रेगी हा या घटनेवर चित्रपट काण्याची कल्पना मनात खेळवतो. ‘दैवी वरदान असलेली स्त्री’ पत्नी म्हणून लाभली आहे. हे लक्षात येताच त्याचे विमान हवेत उंच झेपावू लागते. केवळ चित्रपटच काढून थांबायचे नाही. लूर्दमधले हॉटेल विकत घ्यायचे, लूर्दच्या सहली आखणारी ट्रॅव्हल एजन्सी चालवायची असे त्याचे मनोरथ दौडू लागतात. गुहा बाँबस्फोटाने उद्ध्वस्त करण्याची योजना स्पेनमधील जुलमी फ्रॅंकच्या कारकिर्दीत छळ झालेल्या कुटुंबातला मायकेल हुर्टाडो क्रांतीकारक व लेखक बनलेला होता. कॉम्रेड क्रांतिकारक व लेखक बनलेला होता. क्रॉम्रेड क्रांतीकारक म्हणून तो लूर्दची ती नतद्रष्ट गुहाच बॉम्बनं उद्ध्वस्त करण्याची योजना आखतो. बास्क नागरिकांना गुलामतीतून मुक्त करू पाहणाऱ्या इटीए या दहशतवाद संघटनेचा तो कार्यकर्ता असतो. १९७३ मध्ये अ‍ॅडमिरल ब्रँको प्रार्थनेसाठी चालला असताना स्फोट घडवून त्याच्या गाडी पाच मजली इमारतीच्याही वर फेकली गेली होती. हुर्टाडोची प्रयेसी साथीदार ज्युलिया वाल्देझ ती लूर्दची गुहा बाँब स्फोटने उडवण्याच्या योजनेला विरोध करते. ‘‘मायकेल, तसं करणं म्हणजे साक्षात ईश्वरी वस्तूचाच अपहार करण्याचं भयंकर कृत्य ठरेल ते!’’ – या विविध उपकथानकांची जोड घेऊन आयर्विंग वॅलेस या सर्व पात्रांना लूर्द येथे आणून त्यांच्या नाट्यपूर्ण भेटीगाठीमध्ये रंग भरत जातो. लूर्दमधील उत्सवी वातावरण व्हर्जिन मेरीच्या संभाव्य अवरणाच्या आदल्या दिवशीच एपीआयची प्रतिनिधी लिझ फिंच लूर्दला येऊन ओतेला गालिआ अँड लोंद्रमध्ये मुक्काम ठोकते. गावात फेरफटका मारते. व्हर्जिन मेरी बेर्नादत्त यांच्या प्रतिमांचा वापर करून तयार केलेल्या भेटवस्तूंनी दुकाने भरलेली असतात. गुहेतल्या पाण्याचा वापर केलेला साखरेच्या कांड्या, पाण्यासाठी बाटल्या– डिशेस, जपमाळा, तबकड्या, भिंतीचित्रे, मेणबत्त्या, चामड्याच्या पिशव्या इ. इ. तेथील मुख्य वृत्तप्रसारण कचेरीत जाऊन ती धडकते. ओळखपत्र व माहितीपत्रकांचे पाकीट घेते. झिसल द्युप्री या मार्गदर्शक तरुणीला बरोबर घेऊन ती गुंफेकडे जाते. १८५८ साली बेर्नादत्तला त्या गुहेत जे दिसले, त्याची माहिती घेते. त्याचवेळी ती झिसलला ऑफर देते. ‘‘ही सारी लूर्दकथा बनावट आहे अशी माझी खात्री आहे. पण ते सिद्ध करणं आवश्यक आहे. तू हे गाव, इथले लोक यांच्या पाळतीवर राहा. काही धागादोरा मिळाला तर मला सांग. मला यातून मोठी स्टोरी मिळेल. मी तुला खूप पैसे देईन.’’ बेर्नादत्तचं बिंग फोडणारी ही कहाणी नक्कीच मोठी ठरेल अशी तिची खात्री असते. १४ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट या कालावधीत ३० लाख खासगी मोटारी, ३० हजार बसगाड्या, ४ हजार विमानं, ११०० रेल्वेगाड्या लूर्दमध्ये प्रवाशांना आणून सोडणार होत्या. दरवर्षी लाखो पर्यटक येत. यंदा ही संख्या कितीतरी पटीनं वाढणार होती. अ‍ॅमेंडा व केन क्लेटन फादर वुडकोर्टसह तेथे येतात. सर्जी तिखनॉव सॅम्युएल टॅली बनून येतो आणि झिसल द्युप्रीच्याच घरी तो उतरतो. आंधळी अभिनेत्री नताला गुंफेत रोझाबरोबर जाते. बेर्नादत्तने जेथे गुडघे टेकून प्रार्थना केली त्या जागी बसून प्रार्थना करते. हुर्टाडो गुहेत फिरत असताना त्याला केन समजून अ‍ॅमंडा स्पेन्सर क्लेटन त्याच्यचा दंडाला पकडते... तो तिला म्हणतो, ‘‘तुमची काहीतरी चूक झालेली दिसते. मी क्लेटन नाही.’’ पण त्या दोघांची श्रद्धेबद्दल चर्चा होते. रात्री दोन वाजता अंध नताली एकटीच हॉटेलबाहेर पडते आणि ठामपणे पावले टाकत ती पुढे जात राहिले होते. गुंफेत जाऊन ती व्हर्जिन मेरीची प्रार्थना करण्यात दंग होते. तिची व्हर्जिन मेरीची प्रार्थना करण्यात दंग होते. तिची निश्चल समाधी लागते. थोडी हालचाल करून ती जमिनीवर उन्मनी अवस्थेत अचेतन होऊन पडते. हुर्टाडो तिला पाहून दचकतो. तिच्या मदतीला जाण्याचे तो टाळतो. स्फोटानंतर संशयिताचा शोध सुरू झाला तर ती त्याला ओळखू शकेल, अशी भीती तिला वाटते. तेवढ्यात त्या हॉटेलमधला नाइट वॉचमन अनातोल तेथे येऊन तिच्या चेहऱ्यावर पाणी मारून तिला शुद्धीवर आणतो. तिला उभे करून तिचा हात पकडून तिला गुफेबाहेर नेतो. ती दुक्कल बाहेर पडेपर्यंत वाट बघायचे हुर्ताडो ठरवतो. हॉटेलात आल्यावर अनातोल नतालीच्या खोलीत शिरतो. तिच्याशी लगट करू लागतो. तिची किंचाळी ऐकून हुर्ताडो त्या खोलीत शिरतो आणि अनातोलच्या जबड्यावर दणका देतो. अनातोलला तो खोलीबाहेर आणून आणखी लाथांनी तुडवतो. नताली त्याला धन्यवाद देते. तिखनॉवचे पितळ उघडे पडते इकडे झिसलला त्या दिवशीच्या वृत्तपत्रात रशियन पंतप्रधान आजारी, पंतप्रधानपदी कोण येणार ही बातमी वाचायला मिळते. संभाव्य उमेदवारांचे फोटो बघितल्यावर त्यातील एक चेहरा ओळखीचा दिसतो. मात्र त्याखाली नाव असते तिखनॉव. तिला संयुक्त राष्ट्रसंघातले दिवस आठवतात. तिखनॉवही वृत्तपत्र पाहतो. त्याला आपला फोटो दिसतो. तो लगेच स्नानकुंडाकडे निघतो. स्नानानंतर बाहेर पडताना वेशांतर करण्यासाठी लावलेली मिशी खाली पडते. तो ती उचलून पुन्हा लावतो. तिकडे झिसल कॅमेरा लावून उभी असते. कॅमेऱ्यात आपले चित्र आले असेल का असा प्रश्न त्याला पडतो. मिस्टर मूड हॉटेलवर मादाम मूर्स मिरॅकल रेस्टॉरंट असा बोर्ड लावून कर्करोगातून मुक्त झालेल्या एडिथ मूरच्या नावाने ग्राहकांना आकृष्ट करू पाहतात. तिला भेटायला व तिच्या गप्पा मारायला एक वेगळे दालन सजवलेले असते. त्यासाठी खास मेनू. जबरदस्त कव्हर चार्ज. तरीही गर्दी होतेच. मी चमत्कार बघितलेला नाही अ‍ॅमंडा आणि लिझ दोघी कोतरे या गावी जातात. कारण तेथेच गरम पाण्याच्या कुंडात बेर्नादत्त व्याधीमुक्त झाली होती. तेथे फादर कायू यांच्याशी लिझची चर्चा होते. ते म्हणतात, ‘‘मी आतापर्यंत कधीच चमत्कार बघितलेला नाही. लूर्दची आर्थिक सुबत्ता तेथील गुहेच्या पर्यटकांवर अवलंबून असते. त्यामुळे तेथे घडणाऱ्या चमत्काराच्या कहाण्या लोकांपुढे सातत्याने येण्याची गरज असते. नतालीला खरोखरच दृष्टी येते. पत्रकार लिझ किसानकन्येचा ढोंगीपणा उघड करायला आलेली असते. तिला तसे काही पुरावेही मिळतात. तिला तसे काही पुरावेही मिळतात. बेर्नादत्तच्या पहिल्या डायरीतच तसे काही उल्लेख येतात. पण जेव्हा अंध अभिनेत्री नताली हिला गुहेत प्रार्थना केल्यावर खरोखरच दृष्टी येते आणि तिचा व्हर्जिन मेरीचे दर्शन होते तेव्हा तिच्या मनात खरा गोंधळ सुरू होतो. फक्त सहा व्यक्तींनाच ही घटना सांगण्याची व त्यांनी तिची वाच्यता न करण्याची शपथ घातलेली असते... एडिथ मूरचा कर्करोग पुन्हा उचल खातो पण त्यातून ती मुक्त होते. चमत्काराचे मग नवेच अर्थ गवसतात. कथानकातले हे सगळे नंतरचे गुंते हे मूळातूनच वाचायलाच हवेत. आयर्विंग वॅलेसने त्यातील गुंतागुंत रंगवताना खूपच कल्पकता दाखवली आहे. अनेक पथ्ये पाळली आहेत. लिझलाही पत्रकारितेत स्थैर्य मिळेल अशी दक्षता घेतली आहे. -शंकर सारडा ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA 27-05-2001

    श्रद्धा व अंधश्रद्धेच्या झुल्यावर झुलवत ठेवणारी कांदबरी… श्रद्धा आणि अंधश्रद्धा हा विषय ज्या कादंबरीत प्रभावीपणे हाताळला आहे ती कादंबरी आहे. आयर्विंग वॅलेस यांची ‘द मिरॅकल’ ही जयवंत चुनेकर यांनी या कादंबरीचा मराठी अनुवाद केला आहे, शीर्षक मात्र तेच ठवले आहे. देव, धर्म, श्रद्धा-अंधश्रद्धा या संकल्पना वा भावना जगाच्या पाठीवर कुठंही गेलं तरी आढळताच आणि मानसिक हळवेपणाकडे झुकलेल्या या संकल्पनांचा ‘व्यापारा’साठी वापर करायची वृत्तीही सर्वत्र आढळते. ‘द मिरॅकल’ ही कादंबरी एका उत्कंठावर्धक सूत्राभोवती गुंफण्यात आली आहे. ‘येशू खिस्ताची माता पवित्र व्हर्जिन मेरी ऑगस्टमध्ये पुन्हा अवतार घेणार’ या भविष्यवाणीवर कॅथॉलिक धर्मगुरू पोप अधिकृत म्हणून शिक्कामोर्तब करतात. नेमलेल्या समितीचा निर्णय पत्रकार परिषदेत जाहीर करतात. या चमत्कारावर उमटलेल्या अनेकविध प्रतिक्रिया त्याभोवती कथानक गुंफले आहे. फ्रान्सच्या लूर्द या छोट्याशा गावातील एक किसानकन्यका बेर्नादत सुविस गावाबाहेरच्या गुहेत एकदा गेली असताना पवित्र व्हर्जिन मेरीचे तिला दर्शन होते. पवित्र मेरी तिला भेटीमध्ये तीन रहस्यपूर्ण गोष्टी सांगते व त्या गोष्टी गुप्तच ठेवण्याची अटही घालते. अगदी खुद्द पोपपासूनदेखील ही रहस्ये गुप्त ठेवायची. पण व्हर्जिन मेरीचं पवित्र दर्शन हिला झाले हे खरे कशावरून? तर यानंतर यासाध्यासुध्या कन्येच्या देहाला एक दिव्य रूप प्राप्त होते. चेहरा स्वर्गीय तेजाने झळाळू लागतो. ओठांवरचे हास्य गूढरम्य असल्यागत जाणवू लागते. या गुहेतल्या झऱ्याच्या पाण्याने असाध्य अजार बरे होतात. बेर्नादत्तने मृत्यूआधी पवित्र मेरीच्या दर्शनाची व सांगितलेल्या रहस्यांची नोंदवही आप्ताकडे देऊन ठेवली होती. या वहीचा १४० वर्षांनी अभ्यास करून तिसरे रहस्य उघड करण्यात येते. ते म्हणजे १४ ते २२ ऑगस्टच्या दरम्यान पुन्हा लूर्द येथे अवतीर्ण होऊन आणखी एका व्यक्तीला स्वत:ची ओळख पटवून देऊ आणि दु:खमुक्तीचा चमत्कार घडवून आणू म्हणूनच जगातील सर्व वृत्तपत्रे अशा बातमीने झळाळतात की, ‘पवित्र व्हर्जिन मेरी लूर्द येथे पुन्हा अवतरणार व रुग्णांना दु:खातून मुक्त करणार.’ या बातमीने भले-भले प्रभावित होतात. ज्यात धनाढ्य केप क्लेटन, पंतप्रधान स्क्रायबिन, तरुण अभिनेत्री नताली, एडिथ मूर ही नोकदार अशा अनेकांचा समावेश असतो. म्हणूनच १४ ते २२ ऑगस्ट या काळात ३० लाख खासगी मोटारी, ३० हजार बसगाड्या, ४ हजार विमान व ११०० रेल्वेगाड्या लूर्दमध्ये प्रवाशांना आणून सोडणार होत्या. हा खरोखरच काही चमत्कार आहे की भाकडकथा आहे हे अजमावयला एपीआयची प्रतिनिधी लिझ फिच लूर्दला येते. यातले वास्तव म्हणजे नतालीला खरोखरीच दृष्टी येते, एडिथ कर्करोगमुक्त होतो. चमत्काराचे नवे अर्थ गवसत जातात. अखेर लूर्दची आर्थिक सुबत्ता येथीहल गुहेच्या पर्यटकांवर अवलंबून असते. म्हणूनच तेथे घडणाऱ्या चमत्कारांच्या कहाण्या सातत्याने लोकांपुढे येण्याची गरज असते. कथानकात असलेले गुंतागुंतीचे संदर्भ हे मुळातूनच वाचण्यासारखे. ‘द मिरॅकल’ वाचून विसाव्या शतकाच्या अखेरीस मराठी वाचक आपले विचार, आपला धर्म व आपलं राष्ट्र याबाबत परत एकदा अंतर्मुख होऊन पुन्हा नव्यानं मांडणी होईल या अपेक्षेनेच लेखकाने हा प्रपंच साधला आहे. कथानकाला साजेशी अशीच प्रवाही भाषा आहे. कादंबरीत बरेच फ्रेंच शब्दही आले आहेत. कादंबरीचा व्याप आणि पसारा बराच मोठा असूनही प्रवाही व बोलकी भाषा हे वैशिष्ट्यअसल्याने शेवटपर्यंत ती वाचावीशी वाटत राहते. कादंबरीत व्यक्त झालेला चमत्कार, श्रद्धा-अंधश्रद्धा यांच्या झुल्यावर झुलणारी नियतीशरण व्यक्तिमत्त्व व पवित्र व्हर्जिन मेरी यांचं सुखद दर्शन घडवणारे चंद्रमोहन कुलकर्णी यांचे मुखपृष्ठ अतिशय समर्पक व बोलके आहे. -शोभा नाखरे ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more