* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
VIOLENCE NEVER ENDS, IT GROWS MORE AND MORE, FINDING NEW OPPONENTS, NEW METHODS . VIOLENCE , PERSECUTION , POSSESS THEIR OWN VELOCITY, THEIR OWN RATIONALITY. PERSECUTION, POLITICS, DIPLOMACY , AND SIMILAR TERMS DON’T BELIEVE IN USING THEIR INTELLECTS , BUT ,NOBODY CAN RULE A MIND AND ITS CREATIVITY . AUTHORS, ARTISTS, JOURNALISTS, SOCIAL WORKERS ETC. ARE TARGETED BY THESE KIND OF PEOPLE. AS A RESULT, THE CULTURAL AND FOLKLORIC LOSS IS INTOLERABLE AND AWFUL. THE CIRCLE OF TIME FREEZES FOR THAT CHUNK OF PEOPLE. THE SKY WAS OBSCURED BEFORE THE DECLARENCE OF EMERGENCY CRISIS. POLITICIANS WERE CONTENT WITH THEIR HIDDEN OUTLAW POWERS . “NEITHER YOU’LL STAY ALIVE, NOR DEATH WILL ARRIVE” WAS THE CIRCUMSTANCE THEY CREATED. IN THIS DISTURBING SITUATION , HOW AN INTELLIGENT JOURNALIST ALONG WITH HIS FAMILY SUFFERS FROM AN INTENSE SITUATION, NARRATED ON A NATIONAL BACKGROUND, THAT KNOCK-BACKS OUR MINDS AND BRAINS DREADFULLY IS - TANTU GREAT AND FEARLESS KANNAD IDEALIST AND AUTHOR SHRI S.L.BHAIRAPPA WITH HIS VARIED AND STRANGE FILAMENTS HAVE STITCHED A GIANT FABRIC – TANTU
‘हिंसा सहसा नष्ट होत नाही, ती वाढतच राहते; आणि नवे शत्रू, नवे मार्ग शोधत राहते. हिंसा, जुलूमशाही यांची स्वत:ची अशी एक गती असते, स्वत:चेच तर्कशास्त्र असते. जुलूमशाही, लष्करशाही, एकाधिकारशाही आणि अशाच प्रवृत्तींचा कल स्वत:ची विचारशक्ती गुंडाळून ठेवण्याकडे असतो; परंतु विचार आणि सर्जकता यांवर कुणाचीही हुकमत चालू शकत नाही. त्यामुळे या प्रवृत्ती आपल्या हल्ल्याचा रोख लेखक, कलावंत, पत्रकार, विचारवंत, समाजधुरीण इत्यादींकडे वळवतात. परिणामी होणारी सांस्कृतिक हानी कधीही भरून येणारी नसते... त्या समाजाच्या संदर्भात कालचक्र जणू गोठले जाते.’ आणीबाणी घोषित होण्यापूर्वीच बराच काळ आभाळ झाकोळून आलेले होते. राज्यकत्र्यांच्या हातात सुप्त दमनतंत्राचे नवे दुधारी हत्यार आले होते. ‘न तू फिर जी सकेगा, और न तुझको मौत आएगी...’ अशी भल्याभल्यांची अवस्था करण्यात आली होती. अशा आणि त्यानंतरच्या कालखंडात एका बुद्धिप्रामाण्यवादी पत्रकाराची आणि त्याच्या कुटुंबीयांची कशी दारुण वाताहत होते, याची राष्ट्रीय पाश्र्वभूमीवर चितारलेली मन आणि मेंदू बधिर करणारी प्रदीर्घ कथा : तं तू! कन्नड साहित्यातील थोर तत्त्वविवेचक आणि निर्भीड कादंबरीकार श्री. एस. एल. भैरप्पा यांनी चित्रविचित्र धाग्यांनी विणलेले महावस्त्र : तं तू !
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TANTU #TANTU #तंतू #FICTION #TRANSLATEDFROMKANNADATOMARATHI #UMAKULKARNI #उमाकुलकर्णी #BHAIRAPPAS.L. #भैरप्पा एस.एल. "
Customer Reviews
  • Rating StarNilesh Dadgal

    कन्नड साहित्यातील थोर तत्वविवेचक आणि निर्भिड कादंबरीकार श्री. एस. एल. भैरप्पा यांनी चित्रविचित्र धाग्यांनी विणलेले महावस्त्र : तंतू सर्व प्रथम आमचे काका स्व. अनंत उर्फ गोटू अभ्यंकर यांचे खुप खुप धन्यवाद ज्यांनी मला हि कादंबरी वाचायला दिली आणि ाही दिवसाच आम्हाला सोडुन गेले. नंतर बरेच दिवस कादंबरी वाचता आली नाही, पण काका खरच तुमचे खुप उपकार आहेत कि भैरप्पा सारख्या महान लेखकाच्या लिखाणासोबत माझी ओळख करुन त्यांच्या लिखाणाच्या वाचनाची मला ओढ लावली. खुप छान कादंबरी, वाचतांना मग्न करणारी व विचार करायला लावणारे लिखाण. `हिंसा सहसा नष्ट होत नाही, ती वाढतच राहते आणि नवे शत्रू , नवे मार्ग शोधत राहते. हिंसा जुलूमशाही यांची स्वत:ची एक गती असते, स्वत:चेच तर्कशास्त्र असते. जुलूमशाही, लष्करशाही, एकाधिकारशाही आणि अशाच प्रवृतींचा कल स्वत:ची विचारशक्ती गुंडाळून ठेवण्याकडे असतो; परंतु विचार आणि सर्जकता यांवर कुणाचीही हुकमत चालू शकत नाही; त्यामुळे या प्रवृत्ती आपल्या हल्याचा रोख लेखक, कलावंत, पत्रकार, विचारवंत, समाजसुधारीण इत्यादींनकडे वळतात. परिणामी, होणारी सांस्कृतिक हानी कधीही भरून येणारी नसते... त्या समाजाच्या संदर्भात कालचक्र जणू गोठले जाते.` आणिबाणी घोषित होण्यापुर्वी बराच काळ आभाळ झाकोळून आलेले होते. राज्यकर्त्यांच्या हातात सुप्त दमनतंत्राचे नवे दुधारी हत्यार आले होते. `न तू फिर जी सकेगा, और न तुझको मौत आएगी...` अशी भल्याभल्यांची अवस्था करण्यात आली होती. अशा आणि त्यानंतरच्या कालखंडात एका बुध्दिप्रामाण्यवादी पत्रकारांची आणि त्याच्या कुटुंबीयांची कशी दारुण वाताहत होते, याची राष्ट्रीय पार्श्वभूमीवर चितारलेली मन आणि मेंदू बधिर करणारी प्रदीर्घ कथा : तंतू! ...Read more

  • Rating StarGovind Kulkarni

    ह्या मध्ये नायिका स्वतः बिझिनेस मध्ये उतरते सगळे अडथळे पार करत स्वतःच अस्तित्व सिद्ध करण्यासाठी व मीही पती पेक्षा वेगळं काहींतरी करू शकते ही उर्मी.

  • Rating StarGovind Kulkarni

    तंतूच प्रवाहिपण तसंच पात्रांची व प्रसंगाची रेलचेल पण त्याची सुंदर सुसूत्रता अशी अनेक कारणांनी अंतर्मुख करणारी कादंबरी आहे.मानवी स्वभावाचे अनेक पैलू व कंगोरे जागोजागी वाचायला मिळतात.त्यांत सर्वचजण आले आहेत.

  • Rating StarAkshay Chorage

    Tantu..Mast ch ahe..

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RAZOR SHARP
RAZOR SHARP by ASHWIN SANGHI Rating Star
सुनील माने, पुणे

लेखक अश्विन सांघी “द रोझाबल लाइन” या पहिल्याच कादंबरीने खूप लोकप्रिय झाला. प्राचीन भारतीय दंतकथा/ऐतिहासिक संदर्भ घेऊन त्याच्याभोवती आजच्या काळात रहस्यपूर्ण कथा लिहिणारा अश्विन. Chanakya’s Chant, The Krishna Key, The Sialkot Saga, Keepers of the Kalacakra, The Vault of Vishnu, The Magicians of Mazda अशा एकापेक्षा एक सुंदर रहस्य कादंबर्या “भारत सिरीज़” नावाने खूप प्रसिद्ध झाल्या. या सर्व कादंबऱ्या मी इंग्लिश मधेच वाचल्या. यांचा मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाउस यांच्याकडे उपलब्ध आहे. अश्विन सांघीने या भारत सिरीज शिवाय एक नवीन थ्रिल्लर सिरीज (कुत्ता कदम) सुरू केली आहे. त्यांतील पहिली कादंबरी Razor Sharp. एक सिरियल किलर मुंबईत एकानंतर एक खून पाडतोय. पोलिस चक्रावले आहेत. 1. रविवार दि २ फेब्रुवारी , गोरेगाव पश्चिममधे रवि मेहराचा खून होतो. त्याची बायको खुशी कॅाल सेंटरचा जॅाब करून रात्री ११.३० ला परत येते. खूप वेळा बेल वाजवून दार न उघडल्यामुळे ती उघडून आत येते तर रवि रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेला असतो. त्याचे हात पाठीमागे नायलॅान दोरीने बांधलेले असतात. त्याच्या छातीत सुरा खुपसलेला असतो. त्याच्या तोंडात काहीतरी खाद्य पदार्थ असतो. 2. सोमवार दि १० फेब्रुवारी , लोअर परळमधे सुचंद्रा अग्रवालचा खून. तिची कामवाली आल्यावर दार न उघडल्यामुळे सोसायटीवाले दार तोडतात. आत सुचंद्राचा खून झालेला. हात नायलॅान दोरीने मागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात काहीतरी खाद्यपदार्थ. पोलिस चक्रावलेले. मग पोलिसखाते जागे होते. त्यांचा नावाजलेला अधिकारी जो सस्पेंड झालेला आहे, त्या प्रकाश कदम, DCP याला बोलावले जाते. राज्याचे गृहमंत्री ओंकार लोखंडे, त्यांचा माणूस कमिशनर चव्हाण आणि उपगृहमंत्री जयंत गायकवाड व त्यांचा माणूस SCP राणे, मुंबईचा डॅान भाऊ पाटील जो लोखंडेचाच माणूस असतो, हे सर्व या केसच्या मागावर लागतात. कदम हा राणेंच्या ओळखीचा खास ऑफिसर असतो म्हणून त्यालाही इन्व्हेस्टीगेशनला बोलावले जाते. 3. मंगळवार दि १८ फेब्रुवारी , ठाणे येथे मंगला शहाचा खून. तिच्या शेजारणीमुळे हे कळते. मंगलाचे हात नायलॅान दोरीने पाठीमागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात खाद्यपदार्थ. पोलिस अधिकारी शिंदे कदमबरोबर येतात. मंगलाच्या चेहऱ्याजवळ कदमला पेस्टिसाईडचा वास येतो. चेहरा निळसर झालेला. खून झाल्यावर बॅाडीला हलवलेले दिसते. तो ऑफिसमध्ये जुन्या खूनांचे फोटो तपासतो. त्यांचीही बॅाडी खून केल्यावर हलवलेली दिसते. चेहऱ्यावर निळसर झाक दिसते. तिन्ही खून “फिनेक” ब्रॅंडच्या चाकूने केलेले असतात. हे समान धागे कदम त्याची मुलगी केतुल बरोबर चर्चा करतो. केतुलची आई काही वर्षांपूर्वी कदमला सोडून गेलेली असते. ती भाऊ पाटीलची सावत्र बहीण असते. पण सध्या ती कुठे आहे व काय करते हे माहित नसते. केतुल कोर्टात काम करत असते तसेच ती “शक्ती” या NGO मधेही काम करते. शक्ती हे सोनापूरमधुन सुटका केलेल्या वेश्यांचे पुनर्वसन करत असते. निर्मल नावाचा तिचा मित्र एथिकल हॅकर असतो. तिच्यावर प्रेम करत असतो. कदमला हार्ट अटॅक येऊन गेलेला व स्टेंट बसवलेला असतो. Depression मुळे त्याची सायकॅालॅाजिस्टकडे ट्रिटमेंट चालू असते. कदमला या तिन्ही केसमधे आणखी एक धागा सापडतो. हे खून आठ दिवसांच्या अंतरावर झालेले असतात. म्हणजे पुढचा खून बुधवारी होणार असल्याचे तो राणे व शिंदेला सांगतो. 4. बुधवार दि २६ फेब्रुवारी, कांदिवली पश्चिम, लक्ष्मी बुधीराजाचा खून. तोच पॅटर्न. 5. गुरुवार दि ५ मार्च, खार पश्चिम, गुरुराज अदवानीचा खून सेम पॅटर्न. गुरूराज हा युट्युबवरचा प्रसिद्ध सिंगर असतो. 6. शुक्रवार दि १३ मार्च, ताडदेव, दिव्या शुक्रपाणीवर खूनी हल्ला होतो. पण ती जबर जखमी होते. ती फिटनेस ट्रेनर असल्यामुळे खुन्याबरोबर झटापट करते. पण चाकू पोटात घुसल्यामुळे ती जबर जखमी होते. हात बांधलेले असतानाही ती फोनवर “सिरी” ला तिच्या भावाला, ध्रुवला फोन लावायला सांगते. फोन लागतो व ती “हेल्प हेल्प” एव्हढेच बोलून बेशुद्ध होते. म्हणून खुनी पळून जातो. ध्रुव तिथे पोहोचून तिला हॅास्पिटलमधे ॲडमिट करतो. पोलिसांना तिथे खुन्याची बॅग सापडते. त्यांत नायलॅानची दोरी, बेगॅान स्प्रे व राजमाच्या बिया सापडतात. तिसऱ्या खुनाआधी पोलिस संशयित म्हणून राजू दाभाडेला अटक करतात. पण चौथ्या खूनाच्या वेळेस तो कस्टडीतच असतो. मग खूनी कोण? 7. शनिवार दि २१ मार्च, बान्द्रा पश्चिम, शनिया डिसौजाचा खून होतो. सेम मोडस ऑपरेंडी . 8. शनिवार दि २८ मार्च, चेंबूर, ७१ वर्षांच्या राहुल सिंह नावाच्या सिख व्यक्तिचा खून होतो. तीच पध्दत. यानंतर एक दिवस कदम KBC बघत असताना अमिताभ बच्चन एका सिनेमाचं गाणं लावून त्याचा पिक्चर ओळखायला सांगतात. ते गाणं असते- “सोमवार को हम मिले मंगलवार को नयन बुध को मेरी निंद खुली जुम्मेरात को चैन अरे शुक्र शनी कटे मुश्किलसे आज है इतवार सात दिनों में हो गया जैसे सात जनम का प्यार” आणि कदमच्या डोक्यात एकदम प्रकाश पडतो… अरे, हे सर्व खून असेच रविवार ते शनिवार एक एका वारी घडलेत! पण शनिवारी दोन खून कसे? याच्या मागे काही खगोलशास्त्र किंवा भविष्याचा तर संबंध नाही? कदमला आठवतं की शेजारी राहणारा डॉ. देसाईला पण भविष्य-खगोलशास्त्राची आवड व माहिती आहे. ( डॅाक्टर कडे सापडलेल्या नायलॅानचे रंगीत दोर व फिनेक कंपनीचा चाकू यामुळे एक संशयित म्हणून कदमने त्याला अटक करून पुछताछ केलेली असते) कदम लगेच डॅाक्टरांकडे जातो. त्यांची माफी मागून त्यांना या प्रश्नांत मदत करायला सांगतो. तो या सर्व खुनांचा सिक्वेन्स सांगतो. ते प्रत्येक वारी का घडले? मग शनिवारी दोन का? यापुढे कोणता वार? कुणाचा खून? डॅाक्टर सांगतात की भारतीय भविष्य व खगोल शास्त्रात नवग्रहांना खूप महत्व आहे. रवि, सोम(चंद्र), मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि, राहू आणि केतु. यांचे रंग व धान्य वेगवेगळे असतात. त्या त्या ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी ते वापरले जातात. कदम ही माहिती लिहून घेतो. त्यावरून प्रत्येक खुनात वापरण्यात आलेले फिनेक कंपनीचे चाकू, वेगवेगळ्या रंगांचे नायलॅान दोर व तोंडातील पदार्थ यांचा संबंध जोडून एक तख्ता तयार करतोः- “रवि मेहरा-रविवार-सोनेरी दोर- तोंडात गहू-दिशा पूर्व सुचंद्रा-सोमवार-चंदेरी दोर-तोंडात तांदूळ-दिशा पश्चिम मंगला शाह-मंगळवार-लाल दोर-तोंडात तूर डाळ- दिशा दक्षिण लक्ष्मी बुधीराजा-बुधवार-हिरवा दोर-तोंडात हिरवे मूग-दिशा उत्तर गुरुराज अदवानी-गुरूवार-पिवळा दोर-तोंडात हरबरा डाळ-दिशा उत्तर पूर्व(ईशान्य) दिव्या शुक्रपाणी-शुक्रवार-पांढरा दोर-राजमा-दिशा दक्षिण पूर्व शनिया डिसौजा-शनिवार-काळा दोर-तोंडात काळे तिळ-दिशा उत्तर पश्चिम राहुल सिंग-शनिवार-निळा दोर-तोंडात उडीद दाळ-दिशा दक्षिण पश्चिम” आता उरला एकच ग्रह-केतु. केतुचा वार मंगळवार. ग्रे रंग, चना दाळ, दिशा दक्षिण पश्चिम. “केतु”म्हणजे कदमची मुलगी केतुलचा नंबर लागणार? आज तर मंगळवारच आहे! कदम घाबरून जातो! तो केतुलला फोन करतो पण तो बंद लागतो. ती सध्या कुठे आहे? कोर्टात? कदम आपल्या मुलीला वाचवतो का? खरा खुनी कोण असतो? तो पकडला जातो का? त्याचे यामागचा उद्देश काय असतो? याच्यामध्ये अजून कोण सामिल असतं का? याची उत्तरे मिळण्यासाठी वाचावी लागेल अश्विन सांघी यांची कादंबरी Razor Sharp. ...Read more

BANGARWADI
BANGARWADI by VYANKATESH MADGULKAR Rating Star
Sameer Kazi

सुंदर अशी कादंबरी माणदेशी बनगरवाडी तशी कोरडी रखरखती पण, यातील पात्रात मायेचा करुणेचाओलावा मनात घर करुन जातो