ANANT PAI

About Author

Birth Date : 17/09/1929
Death Date : 24/02/2011


ANANT PAI WAS BORN IN KARNATAKA. HIS PARENTS UMBRELLA OVER HIS HEAD WAS LOST AT THE AGE OF TWO. AT THE AGE OF 12, HE CAME TO MUMBAI FOR EDUCATION. PASSIONATE ABOUT PUBLISHING AND COMICS, ANANT PAI WORKED AS A JUNIOR OFFICER IN THE BOOK DEPARTMENT AT THE TIMES OF INDIA. DISTURBED BY THE IGNORANCE OF CHILDREN ABOUT INDIAN CULTURE AND HISTORY, HE CAME UP WITH THE IDEA OF ​​MAKING CARTOONS BASED ON THESE SUBJECTS.

अनंत पै यांचा जन्म कर्नाटक येथे झाला. वयाच्या दुसऱ्या वर्षीच त्यांच्या डोक्यावरचे आईवडिलांचे छत्र हरवले. बाराव्या वर्षी ते शिक्षणासाठी मुंबई येथे आले. प्रकाशन आणि चित्रकथांचे वेड असलेल्या अनंत पै यांनी टाइम्स ऑफ इंडिया मध्ये पुस्तक विभागात कनिष्ठ अधिकारी म्हणून काम केले. मुलांमध्ये भारतीय संस्कृती आणि इतिहास या विषयी असलेल्या अज्ञानाने व्यथित होऊन या विषयांवर आधारित चित्रकथा काढण्याचा विचार त्यांच्या मनात आला. भारतीय लोककथा, पौराणिक कथा, इतिहासातील प्रसिद्ध व्यक्तींची चरित्रे असलेल्या अमर चित्र कथा भारतीय चित्रकथांमध्ये एक मैलाचा दगड ठरल्या. या मालिकेतील ४४० पुस्तकांच्या ८६ दशलक्ष प्रती विकल्या गेल्या आहेत. १९६९ मध्ये अनंत पै यांनी रंगरेखा फिचर्स नावाची, चित्रकथा व हास्यचित्रांसाठीची संस्था स्थापन केली. टिंकल या लहान मुलांसाठीच्या नियतकालिकाची सुरुवातही त्यांनीच केली. पै यांनी लहान मुले व तरुणांच्या व्यक्तिमत्त्व विकसनासाठी उपयुक्त अशी अनेक पुस्तके लिहिली आहेत. १९९४ : उत्तर प्रदेश बालकल्याण संस्थानाचा कर्पूरचंद पुरस्कार. १९९६ : हैद्राबादमध्ये युद्धवीर स्मृती पुरस्कार. : महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी पुरस्कार. १९९७ : मणिपाल येथील डॉ. पै स्मृती पुरस्कार. २००० : इलिनॉइस, युएसए येथे मिलेनिअम कोकणी संमेलन पुरस्कार २००१ : राजा राममोहन रॉय लायब्ररी फाउण्डेशनचा पुरस्कार. २००२ : प्रियदर्शनी अकादमी पुरस्कार. २००३ : विश्व सारस्वत सन्मान.
Sort by
Show per page
Items 1 to 5 of 5 total
AAPLYA MULANCHYA YASHASWITECHA KANMANTRA Rating Star
Add To Cart INR 100
AATMVISHWASACHA KANMANTRA Rating Star
Add To Cart INR 150
ANANT PAI COMBO SET-4 BOOKS Rating Star
Add To Cart INR 500
UTTAM SMRUTICHA KANMANTRA Rating Star
Add To Cart INR 80
YASHACHA KANMANTRA Rating Star
Add To Cart INR 170

Latest Reviews

रुपाली सोनवणे

#रुक #जाना #नही लेखक: Dr. भावेश भाटिया शब्दांकन: Dr: सचिन पाचोरकर अनुवाद: सुप्रिया वकील ​अंथरून पाहून पाय पसरावे... अह्ह.. त्या निर्जीव अंथरुणासाठी आपल्या सजीव पावलांना का त्रास द्यावा? असेच एक जबरदस्त आत्मचरित्र वाचून संपवलं आणि एक ऊर्जा निर्माणकरून गेलं, पुस्तकाचं नाव आहे `रुक जाना नहीँ ​डॉ. भावेश भाटिया यांची ही प्रेरणादायी कहाणी. शाळेत असताना आलेलं अकाली अंधत्व आणि त्यानंतर खडखडीत खडतर जीवनाचा सुरू झालेला प्रवास, पण या प्रवासात खचलेल्या बालमनाला त्यांच्या आईने दिलेलं बळ, प्रेरणा व आत्मसन्मानाची शिकवण आणि स्वाभिमानाचे धडे लेखकास पुरे होते. हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. चांगल्या धडधाकट व्यक्तीवर संकट आल्यावर दूर दूर पळणारे नातलग, मित्र परिवार, जातभाई... दृष्टी गेलेल्या व्यक्तीस कितपत आधार देतील? पण एक ऑपरेटर ते एक उद्योजक, `सनराईज कॅण्डल`चा विस्तार आणि स्वतःबरोबर अनेक दृष्टिहीन व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभं करून रोजगार देणारा हा अवलिया किती अडथळे पार करून आलाय हे जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचायला हवंच. ​कुठलाही वशीला नाही की कोणाची सहानुभूती नाही, स्वबळावर विविध प्रयोग करत उद्योग यशस्वी करणं सोपं नाही. यात ज्या ज्या देवमाणसांनी हातभार लावला त्यांचा पण उल्लेख आहे, पण त्या देवमाणसांनी देखील कधीच उपकारिक भाषा न करता व स्वाभिमान न दुखावता कशी मदत करता येऊ शकते हे त्यांच्या कृतीतून दाखवून दिलंय. लेखक फक्त उद्योग उभारून थांबले नाहीत तर त्यांनी सामाजिक जाणीवेचं भान देखील ठेवलंय. महाबळेश्वरमध्ये सनराईज कॅण्डल नावाने त्यांनी भव्य असा उद्योग परिसर आणि म्युझियम सुरू केलंय, तेथे अनेक दृष्टिहीन व्यक्तींना रोजगार मिळाला आहे त्याचबरोबर सर्वजण स्वाभिमानाने कष्ट करून जगत आहेत. हजारो आयुष्य त्यांनी उजळून टाकली आहेत. दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार सह एकून 46 पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.विशेष म्हणजे सर्व पुरस्कार त्यांच्या योग्यतेनुसार दिले आहेत.. आणी अशा हजारो पुरस्कारांचे ते मानकरी आहेत असंच वाटत..त्यांच्या कामाची दखल रिलायन्स ग्रुप ने देखील घेतली आहे.व त्यांच्या पुस्तकास प्रस्तावना देखील नीता अंबानी यांनी दिली आहे.उद्योग करताना छोट्या छोट्या गोष्टी कसा प्रभाव करतात याच वर्णन देखील त्यांनी लिहिल आहे.. ​या कार्यात महत्त्वाचं योगदान त्यांच्या धर्मपत्नी नीता भाटिया यांनी दिलं आहे. दूरदृष्टी ठेवून आपल्या पतीस प्रोत्साहन देऊन, नवीन कल्पनेसह पाठिंबा देऊन त्यांना हुरूप देण्याचं काम त्यांनी केलंय. नीता भाटिया यांचं कर्तृत्व, त्यांचं पवित्र निस्वार्थी प्रेम या पुस्तकातून वाचताना आंतरिक वेगळी ऊर्जा मिळते. कलियुगातील देवी हा शब्द व मान त्यांना समर्पक वाटतो. पुस्तक सर्व वयोगटातील वाचक वाचू शकतात. मनाने खचलेल्या पण शरीराने धडधाकट असलेल्या प्रत्येक व्यक्तीने वरील पुस्तक नक्की वाचावं आणि आत्मसात करावं. एवढ्या उंचीवर असूनही जमिनीवर पाय असलेल व्यक्तिमत्व आहे. अगदी प्रेमळ पणे वागण बोलण सन्मान देण..ही दैवी देणगी त्यांच्या जवळ आहे. ...Read more