ANANT PAI

About Author

Birth Date : 17/09/1929
Death Date : 24/02/2011


ANANT PAI WAS BORN IN KARNATAKA. HIS PARENTS UMBRELLA OVER HIS HEAD WAS LOST AT THE AGE OF TWO. AT THE AGE OF 12, HE CAME TO MUMBAI FOR EDUCATION. PASSIONATE ABOUT PUBLISHING AND COMICS, ANANT PAI WORKED AS A JUNIOR OFFICER IN THE BOOK DEPARTMENT AT THE TIMES OF INDIA. DISTURBED BY THE IGNORANCE OF CHILDREN ABOUT INDIAN CULTURE AND HISTORY, HE CAME UP WITH THE IDEA OF ​​MAKING CARTOONS BASED ON THESE SUBJECTS.

अनंत पै यांचा जन्म कर्नाटक येथे झाला. वयाच्या दुसऱ्या वर्षीच त्यांच्या डोक्यावरचे आईवडिलांचे छत्र हरवले. बाराव्या वर्षी ते शिक्षणासाठी मुंबई येथे आले. प्रकाशन आणि चित्रकथांचे वेड असलेल्या अनंत पै यांनी टाइम्स ऑफ इंडिया मध्ये पुस्तक विभागात कनिष्ठ अधिकारी म्हणून काम केले. मुलांमध्ये भारतीय संस्कृती आणि इतिहास या विषयी असलेल्या अज्ञानाने व्यथित होऊन या विषयांवर आधारित चित्रकथा काढण्याचा विचार त्यांच्या मनात आला. भारतीय लोककथा, पौराणिक कथा, इतिहासातील प्रसिद्ध व्यक्तींची चरित्रे असलेल्या अमर चित्र कथा भारतीय चित्रकथांमध्ये एक मैलाचा दगड ठरल्या. या मालिकेतील ४४० पुस्तकांच्या ८६ दशलक्ष प्रती विकल्या गेल्या आहेत. १९६९ मध्ये अनंत पै यांनी रंगरेखा फिचर्स नावाची, चित्रकथा व हास्यचित्रांसाठीची संस्था स्थापन केली. टिंकल या लहान मुलांसाठीच्या नियतकालिकाची सुरुवातही त्यांनीच केली. पै यांनी लहान मुले व तरुणांच्या व्यक्तिमत्त्व विकसनासाठी उपयुक्त अशी अनेक पुस्तके लिहिली आहेत. १९९४ : उत्तर प्रदेश बालकल्याण संस्थानाचा कर्पूरचंद पुरस्कार. १९९६ : हैद्राबादमध्ये युद्धवीर स्मृती पुरस्कार. : महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी पुरस्कार. १९९७ : मणिपाल येथील डॉ. पै स्मृती पुरस्कार. २००० : इलिनॉइस, युएसए येथे मिलेनिअम कोकणी संमेलन पुरस्कार २००१ : राजा राममोहन रॉय लायब्ररी फाउण्डेशनचा पुरस्कार. २००२ : प्रियदर्शनी अकादमी पुरस्कार. २००३ : विश्व सारस्वत सन्मान.
Sort by
Show per page
Items 1 to 5 of 5 total
AAPLYA MULANCHYA YASHASWITECHA KANMANTRA Rating Star
Add To Cart INR 100
AATMVISHWASACHA KANMANTRA Rating Star
Add To Cart INR 150
ANANT PAI COMBO SET-4 BOOKS Rating Star
Add To Cart INR 500
UTTAM SMRUTICHA KANMANTRA Rating Star
Add To Cart INR 80
YASHACHA KANMANTRA Rating Star
Add To Cart INR 170

Latest Reviews

वा. पां. जाधव अमरावती

`अमरावतीचे छप्पन स्वभाव एक मनोरंजक काव्यसंग्रह` `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे अमरावतीचे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री जी. बी. देशमुख यांचे अमरावती नगरीचा सहज स्वभाव व ह्या नगरीच्या वेगळ्या ओळखीवर आधारित मनोरंजक पुस्तक वाचले. वाचून भरपूर मनोरंजन झाले. खर काय लिहावे या लेखकाबद्दल, मन गोंधळले. ऐतिहासिक असो, प्रवास वर्णन असो, व्यक्ती विशेष असो, अनुभवात्मक घटना घडामोडी असो कशावरही सहज लिखाण करणारा हा लेखक आहे. आता तर त्यांनी लेखनाला विनोद प्रचुर फोडणी देऊन `अमरावतीचे छप्पन स्वभाव` या काव्यसंग्रहातून अमरावतीकरांना मनोरंजनाची मेजवानीच दिली आहे. प्रत्येक शहराची व त्या शहरातील वैशिष्ट्यांची एक वेगळीच ओळख असते. दिवस जातात, काळ लोटतो, पिढ्या बदलतात मात्र जुन्या स्मृतीची चिन्हे नवीन येणाऱ्या पिढीच्या मनात गुढ निर्माण करत कायम हाक देत राहतात. अमरावतीही त्याला अपवाद नाही. बापट चौकात चौक नाही, त्या जागेवर चौरस्ता नसून टी-पॉइंट आहे, खापर्डे बगीचा म्हणून आजही ओळख आहे मात्र तेथे बगिचा नाही किंवा प्रसिद्ध गांधी चौकात गांधीचा पुतळा अथवा स्मृतीदर्शक चिन्ह अथवा उल्लेख नाही मात्र गांधी चौक अशीच ओळख जनमानसात आहे. अशा एक ना अनेक विसंगत नाम दर्शक ओळख असलेली उदाहरणे त्यात सप्रमाण आहेत. पण खरी गंमत म्हणजे कधी काळी घडलेला इतिहास त्यामध्ये दडलेला आहे हे निश्चित. या सोबतच अमरावतीकरांच्या स्वभावातला स्थायी मजेदारपणाच्या एक एका हटके गुण वैशिष्ट्याच्या गमती लेखकाने हुबेहूब अधोरेखित केलेल्या आहेत. आणि त्यावरुन तत्सम रचनांचा उहापोह लेखकाने पुस्तकात केला असावा. विदेशात स्थाईक झालेल्या मूळ अमरावतीकरांना लेखकाने लिहिलेल्या गमती मनोरंजनात्मक वाटाव्या एवढी किमया जी.बी. च्या सहज लेखनाने दाखवली आहे. अमरावतीचे अग्रगण्य वृत्तपत्र दै. हिंदुस्थान मध्ये लेखकाने सतत ६ महीणे लिहीलेल्या काव्य सदरात अमरावतीच्या जनमानसाच्या हृदयाच्या ठाव घेणाऱ्या काव्य रचनांचा आठवणींनी महापूर ओसंडून गेला होता. विशेष म्हणजे ह्यात कुठेही अनावश्यक अभिनीवेष नव्हता. उलट गमतीत केलेले आत्मपरिक्षण मात्र काही प्रमाणात होते. वयस्क अमरावतीकर रसिकांना या रचना ताज्या करून त्यांच्या तारुण्यात घेऊन गेल्या हेच खरे. जी बी देशमुख या लेखकास मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रियां वरून दिसून येते. . सदर पुस्तकातील काव्यमय रचना वाचतांना अमरावतीच्या माणसाच्या वऱ्हाडभोळ्या स्वभावाची प्रचीती येते आणि वेगळाच आनंद देऊन जाते. निखळ मनोरंजन करत गुदगुल्या करणारा असा हा काव्यसंग्रह आहे. अमरावती शहराची ऐतिहासिक वैशिष्टे काव्यरूपात वाचण्याचा आनंद अमरावतीकरांना ते जिथं असतील त्या गावात, परगावात, परदेशात पुस्तक मागवून घेता येईल. ...Read more

ज्योती चेडे, मुंबई.

अमरावतीच्या वैशिष्ट्यांवर आधारीत खुमासदार छप्पन्न कवितांच्या संग्रहातील प्रत्येक कविता वाचत असताना अमरावतीच्या वातावरणाची धुंदी आपसुकच मनावर चढु लागली. सगळ्याच कविता सुंदर आहेत. एकेक कविता अमरावतीचे अप्रतिम वर्णन करते. प्रत्येक कवितेचा शेवट कुठेतरी गंभीर विचार करायला भाग पाडतो आणि मन गलबलून जाते. सगळ्याच कविता सुंदर आहेत पण माझ्या मनाला भावलेल्या व भिडलेल्या कविता आहेत `अमरावतीतल्या गमती`, `अमरावतीचे शिक्षण`, `अमरावतीचे हजरजबाबी`, `अमरावतीचे वेडे`, `अमरावतीच्या काकू` व बाकी सगळ्या. `अमरावतीचे वेडे` या कवितेत उल्लेखीत शेवटचा अश्रुंचा एक थेंब जरुर राखला जाईल. तसेच `अमरावतीच्या काकूं` ची उर्जा उरात भरून उरेल. जीवन देणाऱ्या विहीरीने कोणाचेही जीवन घेऊ नये, अशी सद्भावना मनात जागेल. अमरावतीकर जगात कुठेही असो त्यांच्या मनात एका कोपऱ्यात राजकमल चौक असतोच हे सत्य मनावर कोरले जाईल. प्रत्येक अमरावतीकराने ह्या कविता जगाव्यात. त्यासाठी हे पुस्तक संग्रही ठेवावे आणि परगावी राहणाऱ्या आपल्या अमरावतीकर आप्तेष्टांना भेटी दाखल द्याव्या. ...Read more