ANANT PAI

About Author

Birth Date : 17/09/1929
Death Date : 24/02/2011


ANANT PAI WAS BORN IN KARNATAKA. HIS PARENTS UMBRELLA OVER HIS HEAD WAS LOST AT THE AGE OF TWO. AT THE AGE OF 12, HE CAME TO MUMBAI FOR EDUCATION. PASSIONATE ABOUT PUBLISHING AND COMICS, ANANT PAI WORKED AS A JUNIOR OFFICER IN THE BOOK DEPARTMENT AT THE TIMES OF INDIA. DISTURBED BY THE IGNORANCE OF CHILDREN ABOUT INDIAN CULTURE AND HISTORY, HE CAME UP WITH THE IDEA OF ​​MAKING CARTOONS BASED ON THESE SUBJECTS.

अनंत पै यांचा जन्म कर्नाटक येथे झाला. वयाच्या दुसऱ्या वर्षीच त्यांच्या डोक्यावरचे आईवडिलांचे छत्र हरवले. बाराव्या वर्षी ते शिक्षणासाठी मुंबई येथे आले. प्रकाशन आणि चित्रकथांचे वेड असलेल्या अनंत पै यांनी टाइम्स ऑफ इंडिया मध्ये पुस्तक विभागात कनिष्ठ अधिकारी म्हणून काम केले. मुलांमध्ये भारतीय संस्कृती आणि इतिहास या विषयी असलेल्या अज्ञानाने व्यथित होऊन या विषयांवर आधारित चित्रकथा काढण्याचा विचार त्यांच्या मनात आला. भारतीय लोककथा, पौराणिक कथा, इतिहासातील प्रसिद्ध व्यक्तींची चरित्रे असलेल्या अमर चित्र कथा भारतीय चित्रकथांमध्ये एक मैलाचा दगड ठरल्या. या मालिकेतील ४४० पुस्तकांच्या ८६ दशलक्ष प्रती विकल्या गेल्या आहेत. १९६९ मध्ये अनंत पै यांनी रंगरेखा फिचर्स नावाची, चित्रकथा व हास्यचित्रांसाठीची संस्था स्थापन केली. टिंकल या लहान मुलांसाठीच्या नियतकालिकाची सुरुवातही त्यांनीच केली. पै यांनी लहान मुले व तरुणांच्या व्यक्तिमत्त्व विकसनासाठी उपयुक्त अशी अनेक पुस्तके लिहिली आहेत. १९९४ : उत्तर प्रदेश बालकल्याण संस्थानाचा कर्पूरचंद पुरस्कार. १९९६ : हैद्राबादमध्ये युद्धवीर स्मृती पुरस्कार. : महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी पुरस्कार. १९९७ : मणिपाल येथील डॉ. पै स्मृती पुरस्कार. २००० : इलिनॉइस, युएसए येथे मिलेनिअम कोकणी संमेलन पुरस्कार २००१ : राजा राममोहन रॉय लायब्ररी फाउण्डेशनचा पुरस्कार. २००२ : प्रियदर्शनी अकादमी पुरस्कार. २००३ : विश्व सारस्वत सन्मान.
Sort by
Show per page
Items 1 to 5 of 5 total
AAPLYA MULANCHYA YASHASWITECHA KANMANTRA Rating Star
Add To Cart INR 100
AATMVISHWASACHA KANMANTRA Rating Star
Add To Cart INR 150
24 %
OFF
ANANT PAI COMBO SET-4 BOOKS Rating Star
Add To Cart INR 500 INR 378
UTTAM SMRUTICHA KANMANTRA Rating Star
Add To Cart INR 80
YASHACHA KANMANTRA Rating Star
Add To Cart INR 170

Latest Reviews

NADIMUKH
NADIMUKH by PERUMAL MURUGAN Rating Star
सुरेश काळे

कालपासून मानसीने भाषांतरित केलेलं आणि मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रसिद्ध केलेलं पेरुमाल मुरुगन् यांच्या मूळ तमिळ पुस्तकाचं मराठीत भाषांतर वाचायला घेतलं आणि काय सांगू? खालीच ठेववेना! त्याची ओघवती भाषा व आधुनिक कम्प्युटर आणि मोबाईल ह्यांनी घातलेला गोंधळ, रुण पिढीवर केलेली जादू यांनी भारावून गेलो. एक उत्तम पुस्तक वाचनात आलं, असं वाटू लागलं. ते बऱ्याच जणांच्या बाबतीत डोळ्यात अंजन घालणार ठरेल असं वाटलं. विशेषतः किरकिर करणाऱ्या, सतत रडत राहणाऱ्या लहान मुलांना मोबाईलची सवय लावणाऱ्या पालकांना हा मोठा झटकाच आहे. यातील नायक कुमारासुर हा असुर-संगणक नावाच्या राक्षसाच्या मायाजालाला म्हणजेच इंटरनेटपासून जेवढा स्वतःला दूर ठेवत जातो तसतसा तो त्यातच गुंतत जातो. त्याचा मुलगा हा संगणकतज्ज्ञ बनू पाहतो. त्याला म्हणजे नायक मेघासला कोणकोणत्या दिव्यातून प्रवास करावा लागतो याचे या वैशिष्ट्यपूर्ण पुस्तकात चित्रण केले आहे. भाषांतरकाराने पण त्याच्या ओघवत्या शैलीने त्याचे प्रामुख्याने वर्णन छान केलंय. विशेषतः कॉलेजची विद्यार्थी वर्गाप्रती आणि आपल्याच महाविद्यालयाने पहिल्या वर्गात यावे याची केलेली व्यवस्था अतिशय वास्तववादी झाली आहे. असे घडू शकते आणि सर्वसामान्य माणसाला ही मायावी महाविद्यालय आणि कोचिंग क्लासेस कुठल्या दर्जाचे विद्यार्थी घडवतात आणि त्यांच्या जीवाशी खेळतात हे कळून येईल इतके प्रभावी चित्रण ह्यात केले आहे. एका ज्वलंत विषयाला आपल्या सडेतोड भाषेने व लेखणीने जनतेपुढे आणण्याबद्दल अत्यंत आभार! ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
...ए.के.देशमुख, पेनसिल्वेनिया (यु.एस.ए.)

`छाटितो गप्पा` हे मी वाचलेलं जी.बी.देशमुखांचं पाचवं पुस्तक. अमेरिकेत मुलीकडे मुक्कामी आलो असता मिळालेल्या निवांत वेळेत मी हे पुस्तक वाचलं. पुस्तक वाचताना खुप मजा वाटली. लेखकापेक्षा मी वयाने ज्येष्ठ असल्यामुळे मला अमरावती शहराची रचना, तिथली संस्कती आणि इतर संदर्भात त्या काळी झालेला विकास लेखकाच्या आधी अनुभवण्याची संधी मिळाली होती. राजेंद्र कॉलनी अस्तित्वात आल्यापासूनच माझ्या परिचयाची होती आणि तिथल्या घर क्र. १० मधे काही काळ माझा निवास देखील होता. `छाटितो गप्पा` वाचताना अंबागेट ते राजेंद्र काॅलनी दरम्यान अनेक वेळा सायकल किंवा सायकल-रिक्षाने केलेल्या येरझारा आठवल्या. त्या वेळी अमरावतीचा बहुचर्चित रेल्वे पुल देखील बांधला गेला नव्हता. "छाटितो गप्पा " हे पुस्तक मला अमरावती मधील माझ्या महाविद्यालयातील मोरपंखी दिवसात घेऊन गेले. त्या दिवसात अनेक जागी दिलेल्या भेटिंची पुन्हा एकदा उजळणी झाली. तेव्हाची व आजची अमरावती नजरेसमोर तरळू लागली. आयुष्यात अशा लहान सहान गोष्टी आपण सर्वच अनुभवत असतो पण लेखकाने त्या पुस्तक रुपात अत्यंत खुमासदार पद्धतीने वाचकांसमोर आणल्या. म्हणून लेखकाचे विषेश अभिनंदन व आगामी लेखनाकरीता खुप खुप शुभेच्छा. ...Read more