* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
SARTHA LITERALLY MEANS A TRADING CARAVAN. IN ANCIENT INDIA, SUCH CARAVANS WOULD TRAVEL TO DISTANT LANDS TO TRADE WITH THEM. SARTHA IS A REMARKABLE NOVEL, WHICH WORKS SIMULTANEOUSLY ON TWO PLANES. IT IS A PHYSICAL JOURNEY ACROSS INDIA, AS WELL AS A SPIRITUAL INWARD JOURNEY OF AN EIGHTH-CENTURY SCHOLAR BORN TO A TRADITION OF VEDIC STUDIES. NAGABHATTA, THE SCHOLAR, IS DEPUTED BY AMARUKA, THE KING, TO STUDY THE SECRETS OF CARAVANS OF OTHER LANDS IN ORDER TO IMPROVE THE ECONOMY OF HIS KINGDOM. DURING HIS EXTENSIVE TRAVELS, NAGABHATTA BECOMES A WITNESS TO AND COMES UNDER THE INFLUENCE OF DOZENS OF RELIGIOUS, SOCIAL, AND CULTURAL MODES. UNUSUAL EXPERIENCES AND PEOPLES ARE DEPICTED IN A HISTORICALLY CHANGING TIME IN THE HISTORY OF INDIA. THE NOVEL IS A RESULT OF A DEEP AND EXTENSIVE STUDY OF HISTORY AND RESEARCH CONDUCTED AT ACTUAL LOCALES, LIKE NALANDA. IT SEARCHES, CREATIVELY, THE ROOTS OF CONFLICTING RELIGIOUS BELIEFS WHICH INDIA IS CONSTANTLY FACING. BHYRAPPA IS WELL KNOWN FOR HIS PROFOUND STUDY OF PHILOSOPHICAL QUESTIONS. IN SARTHA, HE GOES BACK IN TIME TO RECREATE THE ATMOSPHERE OF A BYGONE ERA WITH AN AUTHENTICITY THAT IS HIS HALLMARK. THROUGH THIS GRIPPING NARRATIVE, A VAST PANORAMA OF THE PAST UNFOLDS BEFORE US. IT IS A NOVEL THAT ABOUNDS IN DETAILS OF EIGHTH-CENTURY INDIA, CREATING AN EXPERIENCE THAT IS RICH AND STRANGE--STRANGE TO READERS UNINITIATED INTO THE WEALTH AND DIVERSITY OF THE INDIA OF MORE THAN A THOUSAND YEARS AGO. SARTHA CAN BE DISCUSSED AT SEVERAL LEVELS. IT IS A HISTORICAL NOVEL PAR EXCELLENCE, DEFYING WESTERN CRITICS` OPINION THAT INDIAN FICTION LACKS HISTORICAL SENSE. ON ANOTHER LEVEL, IT IS A PICARESQUE NOVEL, IN SO FAR AS IT CONCERNS ITSELF WITH THE ESCAPADES OF THE PROTAGONIST. ON YET ANOTHER PLANE IT IS A METAPHYSICAL NOVEL, DEALING WITH THE PHILOSOPHY OF ADVAITIC THOUGHT. FINALLY, IT IS A ROMANCE, A VERY READABLE STORY ABOUT THE TRUE LOVE OF NAGABHATTA AND CHANDRIKA.
आठव्या-नवव्या शतकात घडणारी कथा ‘सार्थ’. ‘सार्थ’ म्हणजे ‘व्यापारी तांडा’. कथेची सुरुवात होते ब्राह्मण नागभट्ट आणि राजा अमरुक यांच्यात असणा-या मैत्रीने. राजा अमरुक हा स्त्रीलंपट आहे. नागभट्टाचा हा बालपणीचा मित्र आहे. नागभट्टाच्या पत्नीला हस्तगत करता यावे म्हणून तो नागभट्टाला हेरगिरीच्या निमित्ताने सार्थांबरोबर राज्याबाहेर पाठवतो. वर्ष-दीड वर्ष सरल्यावर नागभट्टाला बातमी मिळते की, आपल्या पत्नीने आणि जिवलग मित्राने आपल्या विश्वासघात केला आहे. पुन्हा घराकडे न फिरकणे, हेच त्याला योग्य वाटते. भाषेवर प्रभुत्व असणारा नागभट्ट एका नाटक मंडळीच्या संपर्कात येतो. कृष्णावर आधारित असणा-या नाटकात त्याला मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळते. ‘कृष्णानंद’ नावाने त्याची कीर्ती सर्वदूर पसरते. बायकोने केलेल्या विश्वासघाताने खचलेला नागभट्ट त्याची नाटकातली सहकलाकार असणारी नटी ‘चंद्रिका’ हिच्या प्रेमात पडतो. परंतु ध्यानमार्गाचा अवलंब करणारी ‘चंद्रिका’ शरीर पातळीवरील प्रेम मानत नसते. नागभट्टावर प्रेम करत असूनही ती ते मान्य करत नाही. त्यामुळे नागभट्ट तिच्यापासून दूर जाण्याचे ठरवतो. एक ब्राह्मण असूनही तो तंत्रसाधनेचा मार्ग धरतो. अनेक अनुचित मार्ग तो अवलंबतो. पण तरीही एका वळणावर त्याची आणि चंद्रिकेची भेट होते. बौद्ध धर्माचा उदय, त्याला वैदिक धर्माचा विरोध, मुघलांची आक्रमणे यांच्या पार्श्वभूमीवर ही ‘सार्थ’ची कथा घडते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #SARTH #SARTH #सार्थ #FICTION #TRANSLATEDFROMKANNADATOMARATHI #UMAKULKARNI #उमाकुलकर्णी #BHAIRAPPAS.L. #भैरप्पाएस.एल. "
Customer Reviews
  • Rating Starहेमंत सांबरे

    गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more

  • Rating StarMandar Paranjape

    *सार्थ - एका अमृतमंथनाची गोष्ट* भारताचा पूर्व-मध्ययुगीन इतिहास म्हणजे साधारण इसवीसनाच्या आठव्या ते दहाव्या शतकातला इतिहास मोठा रोचक आहे. जुनी वैदीक संस्कृती, नव्याने उसळणारे बौद्ध-जैन विचारधारणांचे प्रवाह, आणि वायव्य सीमेवर धडका मारणारा म्लेंच्छ ध्म! या पार्श्वभूमी वरील भैरप्पा यांची "सार्थ" ही कादंबरी नुकतीच वाचली. भारतीय संस्कृती विषयी आस्था असलेल्या प्रत्येकाने आवर्जून वाचावी अशी ही कादंबरी आहे. उमा कुलकर्णी (पती विरुपाक्ष यांच्या मदतीने) यांनी या कादंबरीचा तरल अनुवाद मराठीत केला आहे हे ओघाने आलेच, वेगळे सांगायला नको! कर्मकांडांना सर्वाधिक महत्त्व ज्यात आहे अशी वैदिक संस्कृती आणि कर्मकांडांना नाकारून केवळ मानसिक पातळीवरील प्रयत्नांनी बौद्धत्व प्राप्त करून घेता येते असे सांगणारे बौद्धमत यातील संघर्ष मानसिक/वैचारिक पातळीवरचा होता. वादविवाद करायचा, जो वादविवादात पराभूत होईल त्याने जेत्याचे मत मान्य करायचे असा साधा अहिंसक, बहुजन समाजाची घडी न विस्कटणारा प्रकार घडत होता. राजमान्यताही सहिष्णू होती. सम्राट अशोकाच्या कालखंडांत सुरू झालेली बौद्ध क्रांती देशभर व्याप्त होत होती. त्याचवेळी वायव्येच्या सीमेवर एक हातात तलवार आणि दुसऱ्या हातात कुराण घेऊन अरबी धर्म वावटळ बनून तुटून पडला. गांधार (कंधार), मूलस्थान (मुलतान) येथील वैदिक आणि बौद्धमत वादळात कोसळणाऱ्या वृक्षांप्रमाणे उन्मळून पडले. एतद्देशीय प्रजेच्या श्रद्धास्थानांवर घणाचे घाव घालून त्यांच्या श्रद्धा नामोहरम करण्याचा म्लेंच्छांचा डाव इराणातील अग्निपूजकांविरुद्ध यशस्वी झाला होता, तोच गांधार, मूलस्थानात वापरला गेला. धर्मकारणापाठोपाठ अर्थकारण ताब्यात घ्यायचे आणि समग्र समाजजीवनात स्वतःचा एकेश्वर धर्म बलपूर्वक लादायचा म्लेंच्छांचा डाव होता. याला अहिंसक प्रतिछेद देण्याची एकांडी क्रांती श्रीमद शंकराचार्यांनी घडवून आणली असे अप्रत्यक्ष प्रतिपादन कादंबरीत केले आहे, त्यातील ऐतिहासिक तथ्य तपासून पाहावे लागेल, मात्र वैचारिक पातळीवर ते सिद्ध करण्यात भैरप्पा पूर्णपणे यशस्वी झाले आहेत. कोणत्याही कर्मकांडांच्या पलीकडचे केवळ अध्यात्मिक पातळीवरचे अद्वैत तत्त्वज्ञान मोठ्या वेगाने आसेतुहिमाचल भारतवर्षात प्रस्थापित करण्यात आचार्य यशस्वी ठरले. मंदिरे, स्तूप, विद्यापीठे, बौद्धविहार या भौतिक गोष्टी नष्ट करण्यात म्लेंच्छ यशस्वी झाले, तरी, आचार्यांनी रुजविलेला अद्वैत विचार त्यांना समूळ नष्ट करता आला नाही. तेव्हढी म्लेंच्छ लोकांची बौद्धिक पात्रताच नव्हती. आज आपण हिंदू आहोत ते आचार्यांमुळे ही भावना मनात रुजविण्यात कादंबरी सफल ठरते, हेच तिचे सर्वात मोठे यश आहे. इस्रायल, इराण म्लेंच्छांनी पादाक्रांत केले, इंडोनेशिया, मलेशिया जिंकला, भारतवर्ष त्यांना जिंकता आले नाही, कारण, कदाचित आचार्य श्रीमद शंकराचार्यांनी ती लढाई अशा प्रतलावर नेऊन ठेवली होती की तिथे म्लेंच्छ पोहोचूच शकले नाहीत. अर्थात हे विचार "सार्थ" ही कादंबरी वाचून मनात उठलेले तरंग आहेत. यातून आचार्यांच्या विचारांना आपल्या योग्यतेच्या प्रतलावर समजून घेण्याची प्रेरणा नक्की झाली आहे. लेखनसीमा. - मंदार परांजपे ...Read more

  • Rating StarAshwini Kulkarni-Umbrajkar

    वाचन सार्थ करणारी ‘सार्थ’ नावाची ‘सार्थ’ कादंबरी... एस. एल. भैरप्पा यांची ‘आवरण’ हि कादंबरी वाचली आणि या कादंबरीने अशी काही मोहिनी घातली कि जिथून मिळेल तिथून भैरप्पा वाचायायचे असे निश्चित केले. आवरण नंतर हातात आली ती हि ‘सार्थ’ कादंबरी.. पहिल्या ानापासूनच अलगदपणे ७व्या, ८व्या शतकात आपले मन कसे जाते हे समजत नाही.. ‘सार्थ’ म्हणजे व्यापाऱ्यांचा तांडा. पंचविशीत असणाऱ्या नागभट्ट नावाच्या तरुणाची हि कथा. राजाच्या आज्ञेनुसार प्रवासाला निघालेला हा युवक, वाटेतच त्याला पत्नीच्या व्याभिचाराविशय समजते. त्यामुळे घरी न परतता सार्थासोबत वाट मिळेल तिथे आणि नशीब नेईल तिकडे जाण्याचे ठरवतो. या प्रवासामध्ये अनेक व्यक्ती त्याला भेटतात. अनेक मानसिक स्थित्यंतरातून त्याला जावे लागते. हटयोग आणि अघोरी तंत्रविद्या आत्मसात करण्यापायी त्याचे जीवन भरकटले जाते.. त्याचवेळी त्याच्या आयुष्यात चंद्रिका नावाची नाट्य कलाकार येते. हि चंद्रिका त्याला ‘सार्थ’ जगणे शिकवते. नागभट्ट आणि चंद्रिका यांच्यामधील नाते लेखकाने अगदी तरलपणे उलगडले आहे. या कालखंडामध्ये बौध्द धर्माने बहुतांश भारत व्यापला होता. बौध्द धर्मीय लोक वैदिक लोकांना त्यांच्या धर्माचे महत्व पटवून देत असल्याचा विलक्षण प्रसंग मोठ्या खुबीने या कादंबरीमध्ये लिहिला आहे. अभावितपणे नागभट्टाची गाठ गुरु कुमारील भट्टांशी पडते. तत्कालीन समाजामध्ये पंडित कुमारील भट्ट हि अतीव आदरणीय अशी व्यक्ती होती. कुमारील भट्टांची वैदिक धर्मावर अपार श्रद्धा असते. तरीही बौध्द धर्म जाणून घेण्यासाठी ते बौद्ध धर्म स्वीकारतात.. धर्मांतरण हि त्या काळी खूप निंदनीय गोष्ट होती.. अशा व्यक्तीला पूर्वीच्या धर्माचा नैतिक अधिकार राहत नाही.. परंतु वैदिक धर्माचरण हा कुमारील भट्टांचा श्वास होता. त्यामुळे सर्वांसमक्ष स्वतः चिता रचून ते आत्मदहन करण्याचे ठरवतात. स्वधर्माची महती जाणून घेण्यासाठी प्रसंगी धर्मांतरणाचे पाप करून, प्रायश्चित्त म्हणून प्राणांचे बलिदान देणारे पंडित कुमारील भट्ट भैरप्पानी ठळक चित्तारले आहेत. कुमारील भट्टांची धर्मनिष्ठा आणि चंद्रीकेचे निर्व्याज प्रेम या दोन गोष्टींमुळे नागभट्टाच्या भरकटलेल्या आयुष्यात खूप मोठा बदल होतो. सार्थाबरोबरच्या या प्रवासात त्याला जीवनाची सार्थता लाभते..!! एस. एल. भैराप्पांची ओघवती लेखणी आणि उमा कुलकर्णी यांचा यथोचित अनुवाद यामुळे हि कादंबरी सदैव स्मरणात राहील. सर्वांनी ती आवर्जून वाचावी.. © सौ. अश्विनी कुलकर्णी-उंब्रजकर ...Read more

  • Rating StarRama Naamjoshi

    वेळ काढून वाचावे असे काही `सार्थ`..... एस् एल् भैरप्पा यांचं पुस्तक ज्याचा अनुवाद उमा कुलकर्णी यांनी केलाय. ते वाचायला घेतलं आणि भारल्यासारखी वाचतच गेले. `सार्थ` या शब्दाचा सामान्य माणसाला अभिप्रेत असलेला अर्थ म्हणजे अर्थासह पण या कादंरीत या शब्दाचा अर्थ पूर्णतः वेगळा आहे. ही कादंबरी साधारणपणे आठव्या शतकातील आहे. ज्या काळात सार्थ हा शब्द व्यापार्‍यांचा तांडा या नावाने प्रसिद्ध होता. नागभट्ट हा कथेचा मुळ नायक आहे जो मंडनमिश्रांच्या गुरुकुलात वेदाध्ययन केलेला आहे. नव्याने राज्याभिषेक झालेल्या अमरुक राजाचा तो परममित्र आहे. म्हणूनच राजा एक महत्वाची कामगिरी विश्वासाने आपला मित्र असलेल्या नागभट्टावर सोपवितो. इथूनच कथानकाची सुरुवात होते. अशाच एका सार्थात नागभट्ट सामिल होतो. व्यापारातील अनेक खाचाखोचा समजून घेण्यासाठी. हा सार्थ म्हणजे सामान्य माणूस कल्पनाही करू शकणार नाही असं प्रकरण असतं. हा तांडा थोडाथोडका नाही तर व्यापार्‍यांसाठी आवश्यक असलेले सामान लादलेले पंच्याहत्तर घोडे, दोनशे बैलगाड्या, शंभर गाढवं, दररोजच्या आहारासाठी लागणारं धान्य, इतर सामान, गाड्यांची, चाकाची धाव सुटली तर बसवायला सुतार,लोहार इतका प्रचंड काफिला ज्यात बहुतेक माणसं अशी ज्यांना तलवार चालवता येते आणि स्वतःच्या व इतरांच्याही जीवाचं तसंच मौल्यवान वस्तूंचं संरक्षण करता येतं. अशा सार्थात सहभागी होऊन मार्गक्रमण करणारा नागभट्ट या मोहीमेतून नेमकं काय शिकतो. हा वरवर दिसणारा भौगोलिक प्रदेशातील प्रवास करत असताना त्याच्या अंतरंगातही एक अविरत प्रवास चालू आहेच. अनेक धर्म- पंथातल्या तात्विक मतभेदालाही त्याला सामोरं जावं लागतं आहे. मध्ययुगीन कालखंडातील अनेक सत्य आणि कल्पित घटनांद्वारे ही कादंबरी उलगडत जाते. नालंदा विद्यापीठ, पूर्वेचं सूर्यमंदिर ही ऐतिहासिक स्थळं कादंबरीचा प्रवाह सखोल करत जातात. नागभट्टाचा अनुभव कथन होतं असताना रसिक वाचकही त्यात खेचला जातो. मध्ययुगीन कालखंडातील अनेक उलटसुलट अनुभव नागभट्टाला परिणामी वाचकालाही येतात. आयुष्यातला नेमका धागा कोणता यावर विचार करायला वाचकाला भाग पाडतात. नागभट्टाची होणारी तगमग, सगळीकडे त्याला येणारा अपूर्णत्वाचा अनुभव आणि तरीही त्याचा सतत नेमक्या सत्याचा शोध घेत राहाणं यांनीच या कादंबरीचा पट घट्ट होत जातो. आणि त्याला अंतिमतः झालेल्या सत्याच्या शोधाशी वाचक सहज स्वाभाविकपणे जोडला जातो. माणसाच्या अंतरंगातील प्रवास, त्याची सत्य शोधण्याची चिकाटी, आणि तीही आयुष्याच्या प्रवासाचं प्रतिबिंब असलेल्या `सार्थ` च्या पार्श्वभूमीवर. या सार्‍या अनुभवांसाठी आवर्जून वाचावं असं पुस्तक धन्यवाद, सौ. रमा नामजोशी 🌹🍃🌹 ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more

I HAVE A DREAM
I HAVE A DREAM by RASHMI BANSAL Rating Star
Krishna Diwate

‘स्टे हंग्री स्टे फूलीश’ आणि ‘कनेक्ट द डॉटस’ या बेस्ट सेलर पुस्तकाच्या लेखिका ‘समाजातल्या परंपरागत समस्या सोडवण्याचा नवा मार्ग शोधून काढणार्‍या वीस सामाजिक उद्योजकांच्या प्रेरणादायी कहाण्या’ हे वाक्य पुस्तकाचे पहिले पान उघडले आणि दिसले. त्यामुळे माझ कुतुहल चाळवले आणि ते पुस्तक वाचायला सुरुवात केली. मनोगतात लेखिका म्हणतात की, आता नव्या दमाचे, डोक्याने आणि मनाने ही विचार करणारे काही जण एखाद्याच्या नजरेतील दुःख ओळखतात, पेटून उठतात; पण ते त्याच्यावर विचार एखाद्या उद्योजकाप्रमाणे करतात. म्हणून ते ‘सामाजिक उद्योजक.’ नफा मिळविण्याचा हव्यास नसला तरी ते बिझनेस मधील तत्वे वापरून ती गोष्ट साध्य करतात. हे काही तरी वेगळे आपण वाचत आहोत असे मला वाटले. त्यामुळेच ते पुस्तक वाचायला घेतले. ह्या मध्ये वीस लोकांची चरीत्रे आहेत. ते सर्व भारतीय, उच्चशिक्षित तरूण तरूणी आहेत. कोणी त्यातील शास्त्रज्ञ आहेत तर कोणी मरिन बायोलॉजिस्ट, आयआयटी, आयआयएम ग्रॅज्युएट आहेत पण कोणत्या कोणत्या सामाजिक प्रश्नाने ते अस्वस्थ झाले आणि नेहमीच्या मार्गाने न जाता वेगळीच वाट पकडली. पुस्तकात ‘रेनमेकर्स,’ ‘चेंजमेकर्स’ व ‘स्पिरिच्युअल कॅपिटॅलिस्ट’ असे तीन भाग आहेत. प्रत्येकात अनुक्रमे अकरा,सहा व तीन व्यक्तीमत्वांची ओळख करून दिली आहे. ‘सुलभ’ ही आधुनिक टॉयलेटस उभारणारे बिंदेश्वर पाठक ह्याच्या चरित्राने पुस्तकाची सुरुवात होते. जातीने बिहारमधील ब्राह्मण. पण लहानपणी टॉयलेटस साफ करणार्‍याला हात लावला त्यामुळे आजीने अक्षरशः शेण, गोमुत्र खायला लावले. पण त्याच बिंद्रेश्वरांनी अगदी योगायोगाने ह्याच क्षेत्रात काम करण्याचे ठरविले. अर्थात ही वाट निश्चितच सोपी नव्हती. अनेक हालअपेष्टा सोसत, जगाचे धक्के खात, अनेक समस्यांना तोंड देत आपले स्वप्न ‘सुलभ शौचालयाच्या’ माध्यमातून सुरु केले. तो सगळा खडतर प्रवास अर्थात पुस्तकातूनच वाचायला हवा. त्यासाठी त्यांनी केवळ ती यंत्रणा तयार केली नाही तर ती टॉयलेटस बांधून, त्यासाठी लागणारी प्रेरणा, शिक्षण, संभाषण, ट्रेनिंग, पाठपुरावा अशा सर्वच गोष्टी ‘सुलभ’ तर्फेच संभाळल्या जातात. सध्या ही संस्था स्वबळावर चालते. 100 ते 125 कोटी इतके तिचे वर्षाचे उपन्न आहे. इतकेच नाही पूर्वी जे लोक सफाईचे काम करत असत त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च संस्था करत आहे. ‘सुलभ पब्लिक स्कूल’ नावाने शाळा सुरु केली आहे. तरूणांसाठी व्होकेशनल क्लासेस चालवले जातात. म्हणजे मिळालेला नफा पुन्हा त्याच सफाई कामगारांच्या कल्याणासाठी वापरला जातो. टॉयलेटस बांधून भरपूर पैसा मिळवता येतो हे वाक्य पचायला जरा जडच जाते. अनिता आहुजा ही दिल्लीत सुखवस्तू कुटूंबात रहाणारी सामान्य स्त्री. पण कचरा वेचणार्‍या मुलांचे हाल पाहून त्यांच्यासाठी काही तरी करावे असे तिने ठरविले. तिने 1998 मध्ये कॉन्झर्व्ह नावाची संस्था उभी केली. व त्यातून पहिला प्रोजेक्ट सुरु केला तो म्हणजे आजुबाजूच्या परिसरातील कचरा उचलून त्याचे कंपोस्टखत तयार करणे. कचरा गोळा करण्यासाठी चांगल्या ढकलगाड्या आणल्या, युनिफॉर्म, आय कार्डची सोय केली. 2002 पर्यंत एक पूर्ण वेळ काम करणारी मोठी संस्था बनली. त्याचवेळी त्यांनी प्लॅस्टीकच्या कचर्‍यावर प्रयोग सुरु केले. तिचे पती शलभ ह्यांनी बिटस पिलानी मधून इंजिनिअरींग केले आहे. त्यांच्या मदतीने तिने फॅक्टरी सुरु करण्याचे ठरविले. शलभने मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक शीटस निर्मिती करू शकेल असे मशीन तयार केले. त्यासाठी अर्थातच अनेक प्रश्न समोर उभॆ राहिले. चुका झाल्या, ठोकरा खाल्या पण त्यातून वाट काढत त्यांनी चिकाटीने प्रयत्न सुरुच ठेवले. आज दोघे मिळून कचर्‍यातील प्लॅस्टिक पिशव्या वापरून आकर्षक अशा हॅडबॅगस तयार करण्याचा कारखाना चालवतात. जे लोक सुरुवातीला केवळ कचरा उचलण्याचे काम करत होते, त्यांच्या काही कौशल्य दिसले की त्यांना वेगळे काढून ट्रेनिंग दिले जाते. मशीनवर असिस्टंटचे काम करू लागतात त्यातून काही लोक तर ग्रुप लिडर ही झाले आहेत. कटींग करणॆ, क्वालिटी तपासणॆ, फिनिंशींग, पॅकिंग अशी सर्व महत्वाची कामे ते करतात. आता ते कामगार झाल्यामुळॆ त्यांना चांगला पगार, प्रॉव्हिडंट फंड, ओव्हरटाईम अशा सुविधा मिळू लागल्या त्यापेक्षा ही जास्त त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळाली. त्यांच्या साठी हे नवीनच आहे. अनिता व शलभ दोघॆही मेहनत घेतात पण एनजीओ असून ही भरपूर पैसा कमावणे त्यांना चुकीचे वाटत नाही. कारण आज ह्या एका उद्योगामुळे कित्येक कुटूंबाची आर्थिक स्थिती बदलून गेली आहे. अशीच अजून एक प्रेरणादायी कथा दिल्लीतील रंगसूत्र कंपनी चालविणार्‍या सुमिता घोस ह्यांची. स्वतः ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यावर मास्टर इन इकॉनॉमिक्स ची पदवी घेतल्यावर संजॉय घोस ह्या या आय आर एम मधून शिक्षण घेतलेल्या ध्येयवादी तरूणाशी लग्न केले. पण दुर्दैवाने आसाममध्ये काम करत असताना त्यांची 1998 मध्ये उल्फाच्या अतिरेक्यांनी हत्या केली. त्यानंतर अनेक टक्केटोणपे खात, दोन लहान मुलांचा संभाळ करत सुमिताने ‘रंगसूत्र’ नावाची कंपनी काढली. त्याच्या मार्फत ती खॆडॆगावातल्या लोकांकडून कापड, शोभॆच्या वस्तू, बनवून घेते आणि त्या फॅब ईंडीयासारख्या प्रसिध्द कंपन्यांना विकते. जैसलमेर, बारमेर जिल्ह्यातले कारागिर तिच्यासोबत काम करत आहेत. अजून एक अशीच ध्येयवादी तरूणी म्हणजे इशिता खन्ना. डेहराडून मध्ये जन्म झालेली एक सर्वसामान्य मुलगी. पण निसर्गसंवर्धन आणि भूगोल या विषयांची आवड असलेली. म्हणूनच तिने आपल्या ग्रॅज्युएशन नंतर टाटा इंन्स्टीट्यूट मधून मास्टर्स केले. पर्यावरण क्षेत्रातच काम करायचे आहे हे निश्चित ठरवून तिने काही वर्षे नोकरी केली. त्यानंतर 2002 मध्ये नोकरी सोडून आपल्या दोन मित्रांसोबत स्पिती व्हॅलीमध्ये मूस नावाची एन्जीओ सुरु केली. तेथील स्थानिक महिलांचे ग्रुपस करून त्यांना तिथे असणार्‍या सीबक थॉर्न ह्या फळांच्या लागवडीचे ट्रेनिंग दिले. त्यावर प्रक्रिया करायला शिकवले. ही झाडॆ मातीला धरून ठेवतात त्यामुळे धूप रोखली जाते, शिवाय नायट्रोजन ही धरून ठेवत असल्याने जमिनीचा पोत सुधारतो. त्यामुळे ह्या फळांवर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे तिथल्या बायकांना चांगला रोजगार मिळू लागला. त्याचबरोबर तिने स्थानिक तरूणांना पर्यटकांना ट्रेक किंवा जीप सफारीसाठी नेणे, कॅम्प लावणे, गरज पडल्यास प्रथमोपचार करणे ही कामे ही करायला शिकवले. कारण हळूहळू तिथे पर्यटन वाढू लागले. ते इको-फ्रेंडली करण्याकडॆ तिच्या इकोस्पियर संस्थेचा भर आहे. आता दरवर्षी पर्यटनातून 35 ते 40 लाखाचे उत्पन्न मिळते.आणि त्यातून नफा ही मिळतो. इकोस्पियर संस्थेने शेजारच्य़ा ‘लाहुल’ व्हॅलीमध्ये ही विकास कामे सुरु केली आहेत. पर्वतावर तयार होणार्‍या कचर्‍याच्या समस्येवरही तिला काहीतरी करायचे आहे. तिची संस्था लोकांना मुद्दाम तिथले लोक किती अवघड परिस्थितीत रहातात हे दाखवते. अतिशय थंडीत तिथे तापमान मायनस 35 पर्यंत खाली गेल्यावर हॅंडपंपने पाणी काढणे सुध्दा किती कठीण होते हे सांगितले जाते. तेव्हा आपल्यासारख्य़ा पर्यटकांना काय काय करता येईल याबद्दल ती जागरूकता निर्माण करते. मूळात हे पुस्तक 2012 साली लिहिलेले आहे. त्यामुळे आता ह्या वेगवेगळ्या प्रकारचे काम करणार्‍या संस्थेचे काम या दहा वर्षात खूपच वाढले असेल यात काही शंका नाही. दीनबंधू साहू हे मरिन बायोलॉजिस्ट आहेत पण ते प्रयोगशाळेतून बाहेर पडून समाजासाठी काम करतात. ‘प्रोजेक्ट चिलका’ ह्या त्यांच्या संस्थेमार्फत ओरिसातील लोकांना समुद्राची शेती करायला शिकवतात. ओरिसा मधील पुरी येथे जन्म झालेल्या दीनबंधूनी अतिशय हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतल्यानंतर दिल्लीत एमएसीला ॲडमिशन घेतली. परंतु योगायोगाने १९८७ मध्ये अंटार्क्टिक वर जाण्याची संधी मिळाली. नंतर पीएचडी पूर्ण केल्यानंतर अनेक देशांमध्ये नोकरी निमित्ताने फिरले. पण तरीही शेवटी दिल्ली युनिव्हर्सिटी मध्ये प्रोफेसर म्हणून काम सुरू केले. त्यांना समुद्री वनस्पती बद्दल विशेष आस्था होती; पण त्या बद्दल आपल्या देशात फारशी जागरूकता नव्हती. ही लागवड पर्यावरण पूरक असते शिवाय त्यातून स्थानिक लोकांना उत्पन्नाचे साधन मिळते. त्यासाठी डिएसटीने निधी मंजूर केला. मग त्यांनी चिल्का सरोवराची पहाणी केली, त्यामध्ये वाढू शकतील अशा चार जातींची निवड करून स्थानिक लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत माहिती दिली. प्रात्यक्षिके दाखवली, वर्कशॉप्स घेतली. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना रोजगार मिळू लागला. यातूनच पर्यावरण संरक्षण ही होऊ लागले. यातून त्यांना प्रत्यक्ष कांहीं आर्थिक फायदा होत नसला तरी ते म्हणतात, की आम्हाला दोघांना दिल्लीत चांगली नोकरी आहे. त्यामुळे पैसे कमावणे हा उद्देश नाही; पण अजून तीस वर्षांनंतर मला मी काही तरी काम केलेले दिसेल. असे जर काहीच तुम्हाला दिसणार नसेल तर जगायचे कशाला? भूषण पुनानी हे असेच अत्यंत बुध्दीमान विद्यार्थी. मेडीकलची ॲडमिशन हुकल्यामुळे डेअरी कोर्ससाठी ॲडमिशन घेतली. तिथे ही विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला. नंतर पीएचडी केले. ग्रामविकास शिकण्यासाठी आयआयएम मध्ये एमबीए केले. हे झाल्यावर 1979 मध्ये ब्लाईंड स्कूल मध्ये दोन वर्षांसाठी नोकरी सुरु केली ती सुधा ह्याच हेतूने की मॅनेजमेंट शिकताना जी थेअरी शिकलो ती विकासाच्या क्षेत्रात वापरता येईल का? हळूहळू त्यांना अनेक लोक मिळत गेले. सर्वांनी मिळून आज संस्था खूप मोठी केली आहे.त्यांनी काम सुरु केले तेव्हा फक्त एक कॅपस होता, आज गुजरात मध्ये आठ कॅपस आहेत. दहा लाख मूल्य असलेली संस्था आज दोन कोटी रुपयांची आहे. अपंग लोकांनी स्वावलंबी व्हावे ह्यासाठी संस्था काम करते. दृष्टीहीन मुली ब्यूटी पार्लरसारखे कोर्स चालवतात, फिजिओथेरपी शिकून सेंटर मध्ये काम करतात. विकास साधण्यासाठी योग्य व्यवस्थापनेची गरज असते हे त्यांनी दाखवून दिले आहे. हजारो लोकांच्या आयुष्यात नवा प्रकाश निर्माण करून त्यांना सामान्य आयुष्य जगण्याची संधी मिळवून दिली आहे. अशी ही एकापेक्षा एक वेगवेगळ्या प्रकारची माणसे. कोणत्या तरी ध्येयाने पछाडलेली . सामाजिक कार्य करत असतानाच त्या लोकांचे कल्याण कसे होईल असा विचार करणारी. लेखिकेने त्या सर्वांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या आहेत, त्यांचे काम प्रत्यक्ष पाहून जाणून घेतले आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित गोळा करून आपल्यासमोर मांडली आहे. त्यामुळेच त्या मनोगतात म्हणतात, ‘तुमचं आयुष्य कसे ही असले तरी इतरांसाठी एखादा क्षण द्या. इतरांना प्रेम, आनंद, चांगुलपण द्या. जितकं द्याल तितकं तुम्हाला परत मिळेल.’ हेच वाक्य मलाही अतिशय उर्जा देऊन गेले. माझ्याकडे जे आहे, जे मला देणे शक्य आहे ते निरपेक्षपणे ज्यांना गरज आहे त्याला देणे ह्या सारखा आनंद अजून काय असणार? ह्याच वाक्याने मी आपली ह्या आठवड्यात रजा घेते. उद्या पासून सुरु होणार्‍या नवीन सत्रासाठी सारिका ताईंना हार्दिक शुभेच्छा. ...Read more