* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
SARTHA LITERALLY MEANS A TRADING CARAVAN. IN ANCIENT INDIA, SUCH CARAVANS WOULD TRAVEL TO DISTANT LANDS TO TRADE WITH THEM. SARTHA IS A REMARKABLE NOVEL, WHICH WORKS SIMULTANEOUSLY ON TWO PLANES. IT IS A PHYSICAL JOURNEY ACROSS INDIA, AS WELL AS A SPIRITUAL INWARD JOURNEY OF AN EIGHTH-CENTURY SCHOLAR BORN TO A TRADITION OF VEDIC STUDIES. NAGABHATTA, THE SCHOLAR, IS DEPUTED BY AMARUKA, THE KING, TO STUDY THE SECRETS OF CARAVANS OF OTHER LANDS IN ORDER TO IMPROVE THE ECONOMY OF HIS KINGDOM. DURING HIS EXTENSIVE TRAVELS, NAGABHATTA BECOMES A WITNESS TO AND COMES UNDER THE INFLUENCE OF DOZENS OF RELIGIOUS, SOCIAL, AND CULTURAL MODES. UNUSUAL EXPERIENCES AND PEOPLES ARE DEPICTED IN A HISTORICALLY CHANGING TIME IN THE HISTORY OF INDIA. THE NOVEL IS A RESULT OF A DEEP AND EXTENSIVE STUDY OF HISTORY AND RESEARCH CONDUCTED AT ACTUAL LOCALES, LIKE NALANDA. IT SEARCHES, CREATIVELY, THE ROOTS OF CONFLICTING RELIGIOUS BELIEFS WHICH INDIA IS CONSTANTLY FACING. BHYRAPPA IS WELL KNOWN FOR HIS PROFOUND STUDY OF PHILOSOPHICAL QUESTIONS. IN SARTHA, HE GOES BACK IN TIME TO RECREATE THE ATMOSPHERE OF A BYGONE ERA WITH AN AUTHENTICITY THAT IS HIS HALLMARK. THROUGH THIS GRIPPING NARRATIVE, A VAST PANORAMA OF THE PAST UNFOLDS BEFORE US. IT IS A NOVEL THAT ABOUNDS IN DETAILS OF EIGHTH-CENTURY INDIA, CREATING AN EXPERIENCE THAT IS RICH AND STRANGE--STRANGE TO READERS UNINITIATED INTO THE WEALTH AND DIVERSITY OF THE INDIA OF MORE THAN A THOUSAND YEARS AGO. SARTHA CAN BE DISCUSSED AT SEVERAL LEVELS. IT IS A HISTORICAL NOVEL PAR EXCELLENCE, DEFYING WESTERN CRITICS` OPINION THAT INDIAN FICTION LACKS HISTORICAL SENSE. ON ANOTHER LEVEL, IT IS A PICARESQUE NOVEL, IN SO FAR AS IT CONCERNS ITSELF WITH THE ESCAPADES OF THE PROTAGONIST. ON YET ANOTHER PLANE IT IS A METAPHYSICAL NOVEL, DEALING WITH THE PHILOSOPHY OF ADVAITIC THOUGHT. FINALLY, IT IS A ROMANCE, A VERY READABLE STORY ABOUT THE TRUE LOVE OF NAGABHATTA AND CHANDRIKA.
आठव्या-नवव्या शतकात घडणारी कथा ‘सार्थ’. ‘सार्थ’ म्हणजे ‘व्यापारी तांडा’. कथेची सुरुवात होते ब्राह्मण नागभट्ट आणि राजा अमरुक यांच्यात असणा-या मैत्रीने. राजा अमरुक हा स्त्रीलंपट आहे. नागभट्टाचा हा बालपणीचा मित्र आहे. नागभट्टाच्या पत्नीला हस्तगत करता यावे म्हणून तो नागभट्टाला हेरगिरीच्या निमित्ताने सार्थांबरोबर राज्याबाहेर पाठवतो. वर्ष-दीड वर्ष सरल्यावर नागभट्टाला बातमी मिळते की, आपल्या पत्नीने आणि जिवलग मित्राने आपल्या विश्वासघात केला आहे. पुन्हा घराकडे न फिरकणे, हेच त्याला योग्य वाटते. भाषेवर प्रभुत्व असणारा नागभट्ट एका नाटक मंडळीच्या संपर्कात येतो. कृष्णावर आधारित असणा-या नाटकात त्याला मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळते. ‘कृष्णानंद’ नावाने त्याची कीर्ती सर्वदूर पसरते. बायकोने केलेल्या विश्वासघाताने खचलेला नागभट्ट त्याची नाटकातली सहकलाकार असणारी नटी ‘चंद्रिका’ हिच्या प्रेमात पडतो. परंतु ध्यानमार्गाचा अवलंब करणारी ‘चंद्रिका’ शरीर पातळीवरील प्रेम मानत नसते. नागभट्टावर प्रेम करत असूनही ती ते मान्य करत नाही. त्यामुळे नागभट्ट तिच्यापासून दूर जाण्याचे ठरवतो. एक ब्राह्मण असूनही तो तंत्रसाधनेचा मार्ग धरतो. अनेक अनुचित मार्ग तो अवलंबतो. पण तरीही एका वळणावर त्याची आणि चंद्रिकेची भेट होते. बौद्ध धर्माचा उदय, त्याला वैदिक धर्माचा विरोध, मुघलांची आक्रमणे यांच्या पार्श्वभूमीवर ही ‘सार्थ’ची कथा घडते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #SARTH #SARTH #सार्थ #FICTION #TRANSLATEDFROMKANNADATOMARATHI #UMAKULKARNI #उमाकुलकर्णी #BHAIRAPPAS.L. #भैरप्पाएस.एल. "
Customer Reviews
  • Rating StarMandar Paranjape

    *सार्थ - एका अमृतमंथनाची गोष्ट* भारताचा पूर्व-मध्ययुगीन इतिहास म्हणजे साधारण इसवीसनाच्या आठव्या ते दहाव्या शतकातला इतिहास मोठा रोचक आहे. जुनी वैदीक संस्कृती, नव्याने उसळणारे बौद्ध-जैन विचारधारणांचे प्रवाह, आणि वायव्य सीमेवर धडका मारणारा म्लेंच्छ ध्म! या पार्श्वभूमी वरील भैरप्पा यांची "सार्थ" ही कादंबरी नुकतीच वाचली. भारतीय संस्कृती विषयी आस्था असलेल्या प्रत्येकाने आवर्जून वाचावी अशी ही कादंबरी आहे. उमा कुलकर्णी (पती विरुपाक्ष यांच्या मदतीने) यांनी या कादंबरीचा तरल अनुवाद मराठीत केला आहे हे ओघाने आलेच, वेगळे सांगायला नको! कर्मकांडांना सर्वाधिक महत्त्व ज्यात आहे अशी वैदिक संस्कृती आणि कर्मकांडांना नाकारून केवळ मानसिक पातळीवरील प्रयत्नांनी बौद्धत्व प्राप्त करून घेता येते असे सांगणारे बौद्धमत यातील संघर्ष मानसिक/वैचारिक पातळीवरचा होता. वादविवाद करायचा, जो वादविवादात पराभूत होईल त्याने जेत्याचे मत मान्य करायचे असा साधा अहिंसक, बहुजन समाजाची घडी न विस्कटणारा प्रकार घडत होता. राजमान्यताही सहिष्णू होती. सम्राट अशोकाच्या कालखंडांत सुरू झालेली बौद्ध क्रांती देशभर व्याप्त होत होती. त्याचवेळी वायव्येच्या सीमेवर एक हातात तलवार आणि दुसऱ्या हातात कुराण घेऊन अरबी धर्म वावटळ बनून तुटून पडला. गांधार (कंधार), मूलस्थान (मुलतान) येथील वैदिक आणि बौद्धमत वादळात कोसळणाऱ्या वृक्षांप्रमाणे उन्मळून पडले. एतद्देशीय प्रजेच्या श्रद्धास्थानांवर घणाचे घाव घालून त्यांच्या श्रद्धा नामोहरम करण्याचा म्लेंच्छांचा डाव इराणातील अग्निपूजकांविरुद्ध यशस्वी झाला होता, तोच गांधार, मूलस्थानात वापरला गेला. धर्मकारणापाठोपाठ अर्थकारण ताब्यात घ्यायचे आणि समग्र समाजजीवनात स्वतःचा एकेश्वर धर्म बलपूर्वक लादायचा म्लेंच्छांचा डाव होता. याला अहिंसक प्रतिछेद देण्याची एकांडी क्रांती श्रीमद शंकराचार्यांनी घडवून आणली असे अप्रत्यक्ष प्रतिपादन कादंबरीत केले आहे, त्यातील ऐतिहासिक तथ्य तपासून पाहावे लागेल, मात्र वैचारिक पातळीवर ते सिद्ध करण्यात भैरप्पा पूर्णपणे यशस्वी झाले आहेत. कोणत्याही कर्मकांडांच्या पलीकडचे केवळ अध्यात्मिक पातळीवरचे अद्वैत तत्त्वज्ञान मोठ्या वेगाने आसेतुहिमाचल भारतवर्षात प्रस्थापित करण्यात आचार्य यशस्वी ठरले. मंदिरे, स्तूप, विद्यापीठे, बौद्धविहार या भौतिक गोष्टी नष्ट करण्यात म्लेंच्छ यशस्वी झाले, तरी, आचार्यांनी रुजविलेला अद्वैत विचार त्यांना समूळ नष्ट करता आला नाही. तेव्हढी म्लेंच्छ लोकांची बौद्धिक पात्रताच नव्हती. आज आपण हिंदू आहोत ते आचार्यांमुळे ही भावना मनात रुजविण्यात कादंबरी सफल ठरते, हेच तिचे सर्वात मोठे यश आहे. इस्रायल, इराण म्लेंच्छांनी पादाक्रांत केले, इंडोनेशिया, मलेशिया जिंकला, भारतवर्ष त्यांना जिंकता आले नाही, कारण, कदाचित आचार्य श्रीमद शंकराचार्यांनी ती लढाई अशा प्रतलावर नेऊन ठेवली होती की तिथे म्लेंच्छ पोहोचूच शकले नाहीत. अर्थात हे विचार "सार्थ" ही कादंबरी वाचून मनात उठलेले तरंग आहेत. यातून आचार्यांच्या विचारांना आपल्या योग्यतेच्या प्रतलावर समजून घेण्याची प्रेरणा नक्की झाली आहे. लेखनसीमा. - मंदार परांजपे ...Read more

  • Rating StarAshwini Kulkarni-Umbrajkar

    वाचन सार्थ करणारी ‘सार्थ’ नावाची ‘सार्थ’ कादंबरी... एस. एल. भैरप्पा यांची ‘आवरण’ हि कादंबरी वाचली आणि या कादंबरीने अशी काही मोहिनी घातली कि जिथून मिळेल तिथून भैरप्पा वाचायायचे असे निश्चित केले. आवरण नंतर हातात आली ती हि ‘सार्थ’ कादंबरी.. पहिल्या ानापासूनच अलगदपणे ७व्या, ८व्या शतकात आपले मन कसे जाते हे समजत नाही.. ‘सार्थ’ म्हणजे व्यापाऱ्यांचा तांडा. पंचविशीत असणाऱ्या नागभट्ट नावाच्या तरुणाची हि कथा. राजाच्या आज्ञेनुसार प्रवासाला निघालेला हा युवक, वाटेतच त्याला पत्नीच्या व्याभिचाराविशय समजते. त्यामुळे घरी न परतता सार्थासोबत वाट मिळेल तिथे आणि नशीब नेईल तिकडे जाण्याचे ठरवतो. या प्रवासामध्ये अनेक व्यक्ती त्याला भेटतात. अनेक मानसिक स्थित्यंतरातून त्याला जावे लागते. हटयोग आणि अघोरी तंत्रविद्या आत्मसात करण्यापायी त्याचे जीवन भरकटले जाते.. त्याचवेळी त्याच्या आयुष्यात चंद्रिका नावाची नाट्य कलाकार येते. हि चंद्रिका त्याला ‘सार्थ’ जगणे शिकवते. नागभट्ट आणि चंद्रिका यांच्यामधील नाते लेखकाने अगदी तरलपणे उलगडले आहे. या कालखंडामध्ये बौध्द धर्माने बहुतांश भारत व्यापला होता. बौध्द धर्मीय लोक वैदिक लोकांना त्यांच्या धर्माचे महत्व पटवून देत असल्याचा विलक्षण प्रसंग मोठ्या खुबीने या कादंबरीमध्ये लिहिला आहे. अभावितपणे नागभट्टाची गाठ गुरु कुमारील भट्टांशी पडते. तत्कालीन समाजामध्ये पंडित कुमारील भट्ट हि अतीव आदरणीय अशी व्यक्ती होती. कुमारील भट्टांची वैदिक धर्मावर अपार श्रद्धा असते. तरीही बौध्द धर्म जाणून घेण्यासाठी ते बौद्ध धर्म स्वीकारतात.. धर्मांतरण हि त्या काळी खूप निंदनीय गोष्ट होती.. अशा व्यक्तीला पूर्वीच्या धर्माचा नैतिक अधिकार राहत नाही.. परंतु वैदिक धर्माचरण हा कुमारील भट्टांचा श्वास होता. त्यामुळे सर्वांसमक्ष स्वतः चिता रचून ते आत्मदहन करण्याचे ठरवतात. स्वधर्माची महती जाणून घेण्यासाठी प्रसंगी धर्मांतरणाचे पाप करून, प्रायश्चित्त म्हणून प्राणांचे बलिदान देणारे पंडित कुमारील भट्ट भैरप्पानी ठळक चित्तारले आहेत. कुमारील भट्टांची धर्मनिष्ठा आणि चंद्रीकेचे निर्व्याज प्रेम या दोन गोष्टींमुळे नागभट्टाच्या भरकटलेल्या आयुष्यात खूप मोठा बदल होतो. सार्थाबरोबरच्या या प्रवासात त्याला जीवनाची सार्थता लाभते..!! एस. एल. भैराप्पांची ओघवती लेखणी आणि उमा कुलकर्णी यांचा यथोचित अनुवाद यामुळे हि कादंबरी सदैव स्मरणात राहील. सर्वांनी ती आवर्जून वाचावी.. © सौ. अश्विनी कुलकर्णी-उंब्रजकर ...Read more

  • Rating StarRama Naamjoshi

    वेळ काढून वाचावे असे काही `सार्थ`..... एस् एल् भैरप्पा यांचं पुस्तक ज्याचा अनुवाद उमा कुलकर्णी यांनी केलाय. ते वाचायला घेतलं आणि भारल्यासारखी वाचतच गेले. `सार्थ` या शब्दाचा सामान्य माणसाला अभिप्रेत असलेला अर्थ म्हणजे अर्थासह पण या कादंरीत या शब्दाचा अर्थ पूर्णतः वेगळा आहे. ही कादंबरी साधारणपणे आठव्या शतकातील आहे. ज्या काळात सार्थ हा शब्द व्यापार्‍यांचा तांडा या नावाने प्रसिद्ध होता. नागभट्ट हा कथेचा मुळ नायक आहे जो मंडनमिश्रांच्या गुरुकुलात वेदाध्ययन केलेला आहे. नव्याने राज्याभिषेक झालेल्या अमरुक राजाचा तो परममित्र आहे. म्हणूनच राजा एक महत्वाची कामगिरी विश्वासाने आपला मित्र असलेल्या नागभट्टावर सोपवितो. इथूनच कथानकाची सुरुवात होते. अशाच एका सार्थात नागभट्ट सामिल होतो. व्यापारातील अनेक खाचाखोचा समजून घेण्यासाठी. हा सार्थ म्हणजे सामान्य माणूस कल्पनाही करू शकणार नाही असं प्रकरण असतं. हा तांडा थोडाथोडका नाही तर व्यापार्‍यांसाठी आवश्यक असलेले सामान लादलेले पंच्याहत्तर घोडे, दोनशे बैलगाड्या, शंभर गाढवं, दररोजच्या आहारासाठी लागणारं धान्य, इतर सामान, गाड्यांची, चाकाची धाव सुटली तर बसवायला सुतार,लोहार इतका प्रचंड काफिला ज्यात बहुतेक माणसं अशी ज्यांना तलवार चालवता येते आणि स्वतःच्या व इतरांच्याही जीवाचं तसंच मौल्यवान वस्तूंचं संरक्षण करता येतं. अशा सार्थात सहभागी होऊन मार्गक्रमण करणारा नागभट्ट या मोहीमेतून नेमकं काय शिकतो. हा वरवर दिसणारा भौगोलिक प्रदेशातील प्रवास करत असताना त्याच्या अंतरंगातही एक अविरत प्रवास चालू आहेच. अनेक धर्म- पंथातल्या तात्विक मतभेदालाही त्याला सामोरं जावं लागतं आहे. मध्ययुगीन कालखंडातील अनेक सत्य आणि कल्पित घटनांद्वारे ही कादंबरी उलगडत जाते. नालंदा विद्यापीठ, पूर्वेचं सूर्यमंदिर ही ऐतिहासिक स्थळं कादंबरीचा प्रवाह सखोल करत जातात. नागभट्टाचा अनुभव कथन होतं असताना रसिक वाचकही त्यात खेचला जातो. मध्ययुगीन कालखंडातील अनेक उलटसुलट अनुभव नागभट्टाला परिणामी वाचकालाही येतात. आयुष्यातला नेमका धागा कोणता यावर विचार करायला वाचकाला भाग पाडतात. नागभट्टाची होणारी तगमग, सगळीकडे त्याला येणारा अपूर्णत्वाचा अनुभव आणि तरीही त्याचा सतत नेमक्या सत्याचा शोध घेत राहाणं यांनीच या कादंबरीचा पट घट्ट होत जातो. आणि त्याला अंतिमतः झालेल्या सत्याच्या शोधाशी वाचक सहज स्वाभाविकपणे जोडला जातो. माणसाच्या अंतरंगातील प्रवास, त्याची सत्य शोधण्याची चिकाटी, आणि तीही आयुष्याच्या प्रवासाचं प्रतिबिंब असलेल्या `सार्थ` च्या पार्श्वभूमीवर. या सार्‍या अनुभवांसाठी आवर्जून वाचावं असं पुस्तक धन्यवाद, सौ. रमा नामजोशी 🌹🍃🌹 ...Read more

  • Rating StarMahesh Hande

    `व्यासंग-व्याप्ती` आणि `व्यासंगाची तीक्ष्णता` ह्या भैरपांच्या कादंबरीच्या वैशिष्ट्यांना `सार्थ` सुद्धा अपवाद नाहीच. आठव्या शतकाच्या पार्श्वभूमीचा आधार घेऊन बुद्धीला आकलन न होणारे सूक्ष्म भाव व त्यामागील तत्वज्ञान त्यांनी भैरप्पा शैलीत मांडले आहे. कादंबरीचा नायक नागभट्ट आपल्या राजाच्या आदेशाने सार्थ ची कार्यपद्धती जवळून समजून घेण्यासाठी व व्यापारातील बारकावे जाणण्यासाठी सार्थबरोबर निघतो आणि मग त्यानंतर सुरू होते द्वंद्व....-वैदीक विरुद्ध बौद्ध... - गृहस्थाश्रम की संन्यास... -जीवन की मृत्यू...असे एक ना अनेक `माणसानं पुरुषार्थाच्या आधारे नेहमी कर्मनिष्ठ राहिलं पाहिजे, नाहीतर जीवन अर्थभ्रष्ट होऊन जाईल. ही अर्थभ्रष्टताच मनाला खिन्नता जाणून रुचिहीनता निर्माण करते`.हे खिन्न मन व जीवनातील रुचीहीनता याच गमक तर आपल्याला विचारमग्न करायला लावत आणि त्यामागील सत्यता ही पटते. संपर्क पुस्तकभर प्रेम-प्रणय परस्परभाव,कलावंतांचे अंतर्यामी भाव,वेदविद्या, कर्मनिष्टा, इंद्रियानुभवाच क्षणिकत्व, ध्यानधारणा, बुद्धतत्वे यांचीच सखोलता जाणवत राहते. `मृत्यू हा दुःखाचा लेप नसलेला आनंदानुभव आहे` पुस्तकाचा हा शेवट आपली एक नवी सुरुवात ठरते... ...सुरुवात क्षणिकत्वाला शाश्वत मानण्याची; ...सुरुवात अंतर्मनातील भावप्रकाशात सौन्दर्य शोधण्याची; ...सुरुवात बुध्दिकल्पनेच्या पलीकडील वस्तुस्थिती स्वीकारण्याची; ...सुरुवात तर्काच्या तंतूला बुद्धीचा आधार देण्याची; ...सुरुवात पारमार्थिक दृष्टी घेऊन लौकिक समस्यांतून मार्ग शोधण्याची; ...सुरूवात जीवनाकडे मृत्यूच्या नजरेतून पाहण्याची. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

BHARTIYA GANIKA
BHARTIYA GANIKA by DR.S.R. DESHPANDE Rating Star
डॉ. शुचिता नांदापूरकर-फडके

मंडळी, कालच्या ऱ्हासचक्रानंतर मी विचार करत होते की आज काय? पुस्तकं तर काही वाचून ठेवली होती (म्हणजे वाचली आणि ठेवून दिली बाजूला... अक्षरशः). आत्ताची समोर आहेत ती. कदाचित त्यातलं एखादं उद्या घेईन. मध्ये अचानक या पुस्तकाची जाहिरात वाचली, अगदी गेल्या ठवड्यातली गोष्ट. उत्सुकता चाळवली. समूहात काहीतरी आगळं वेगळं पुस्तक घ्यावं हा विचार सतत मनात असतोच. तसं पुस्तक घरी येताच (जय amazon) चाळायला म्हणून बसले, आणि काय सांगू, हातात मार्कर कधी आलं, मी खुणा कधी केल्या, पुस्तक कधी संपलं... कळलंच नाही. एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगते... प्रेयर पुस्तकाला तुम्ही जो भरघोस प्रतिसाद दिलात, अनेकांनी ते विकत घेण्याचा विचार केला तेव्हाच सांगायचं होतं, पण राहिलं. ओळख करून दिलेलं पुस्तक पूर्णपणे वाचनीय असतं असं नाही. त्याचा बरचसं भाग बोजड असतो. पण ते नाही का, डेटिंगच्या काळात मुलगा मुलगी स्वतःमधलं केवळ उत्तम ते दाखवतात, तसं मला प्रेयर बद्दल वाटलं. आय मीन प्रेयर पुस्तकाबद्दल वाटलं आणि गणिका या पुस्तकाबद्दल मला नेमकं तेच वाटत आहे. ========== ‘भारतीय कामशिल्प’ या पुस्तकाचं लेखन करत असताना प्राचीन भारताच्या समाजजीवनाची माहिती देणारे अनेक संदर्भग्रंथ वाचण्यात येऊन लेखकांची उत्सुकता चाळवली गेली आणि जेव्हा या विषयावर मराठीत एकही परिपूर्ण संदर्भग्रंथ नाही हे लक्षात आलं, तेव्हा त्यांनी स्वतःच या पुस्तकाचं लेखन मनावर घेतलं. केवळ सनसनाटी विषय सवंगपणे हाताळला आहे असं कुठेही वाटत नाही. अतिशय अभ्यासपूर्वक लेखन आहे. सोबत जोडलेली संदर्भग्रंथांची यादी (एकूण संख्या ६४) पुरेशी आहे. गणिका आणि उर्वरित श्रेणी या शरीरविक्रय करतात, हा वैश्विक व्यवसाय आहे. कैक काळापासून या व्यवसायाला मान्यता मिळाली आहे आणि त्याची आवश्यकता वाटली आहे. प्राचीन काळात भारतीय गणिका यांना एक संस्कृती आणि दर्जा होता. नीतीनियम होते, ते पाळावे लागत होते. पुस्तकाची प्रकरणं – प्रास्ताविक, विदेशी गणिका, भारतीय साहित्यातील गणिका, गणिकेची प्रशिक्षण व वर्णन, गानिकांची वेशभूषा, सौंदर्यप्रसाधने, विट, गणिकामाता, प्रियकराचा राग-रंग, कथांविषयी थोडेसे आणि कथा (या शेवटच्या प्रकरणात एकूण १३ कथा आहेत – अगदी सुरस आणि चमत्कारिक वाटाव्यात अशा, त्यांचा परिचय मी देणार....... नाही.) प्रास्ताविक – (नऊ पानांचं प्रकरण) कुटुंब किंवा विवाहसंस्था कधी आकाराला आले हे नक्की सांगता येत नसलं तरी स्त्री-पुरुष शरीरसंबंध हे आदिम असून ते पशु – पक्ष्यांप्रमाणेच जनन हेतुस्तव नैसर्गिक होते आणि राहतील. फलन हे स्त्रीदेहामध्ये होतं या जाणीवेतून तिला आदरस्थान प्राप्त झालं. सर्जनाची गूढ शक्ती धारण करणारी ती आदिमाया/माता/ अद्याशक्ती होय. जवळपास प्रत्येक धर्मात प्रजा, पशु आणि धान्य समृद्धीसाठी सुफलता विधी आहेत. भारतीय हिंदू धर्म शास्त्रीय ग्रंथांतून स्त्री पवित्र्याच्या कथा वाचायला मिळतात. पतीला परमेश्वर मानलं जाई. त्याही काळात गणिका हा व्यवसाय होता आणि त्याकडे सहिष्णू वृत्तीने पाहिलं जाई.राजे महाराजे त्यांचे पोशिंदे असतं. शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रिया तिरस्काराला पात्र असत, पण गणिका नाही. त्यांना नगर भूषण, नगर अलंकार, नाग्त रत्न मानलं जाई. प्रसंगी, राजे त्यांचा सल्ला घेत. त्या बहुश्रुत असतं चौसष्ट कलांत पारंगत असतं. संभाषणचतुर, हुशार, समंजस, उदार, योग्य आदर राखणाऱ्या, विनयशील आणि अनुपम सौंदर्यवती असत. एखाद्या गणिकेमुळे त्या राज्याची कीर्ती वाढत असे. धार्मिक समारंभ, सामाजिक कार्यक्रम (विविध झुंजी, शर्यती), करमणुकीचे कार्यक्रम (जलक्रीडा, वनविहार), रंगमंचावर अभिनय, अशा नानाविध ठिकाणी त्यांची ठळक उपस्थिती असे. रथारूढ अथवा सिंहासनाधिष्ठ राजाला वारा घालणे, चवरी ढाळणे, छत्र धरणे अशी कामं त्या करत. त्यांच्याशी संबंध ठेवणं समाजमान्य होतं. प्रतिष्ठितांचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन व्यापक, अगत्यशील आणि स्नेहिल होता. मात्र, त्यांना कडक आणि कठोर नियम पालन करावे लागे.विजयनगर साम्राज्याच्या अस्तानंतर ते पेशवाई संपेपर्यंतच्या काळात, मोगल राजवट येऊन गेली, ब्रिटीश वसवतवादाचा प्रसार सुरू झाला, समाज व्यवस्था बदलली, गणिका संस्कृतीला ओहोटी लागली. ब्रिटीशांचा अंमल सुरू झाल्यावर गणिका संस्था नष्ट होऊन वेश्या व्यवसाय वाढीला लागला. यामागे औद्योगिक क्रांती हे एक कारण आहे. वेश्यागमन निंद्य कृत्य मानलं जाऊ लागलं. तरुण अधिकाधिक सुशिक्षित होऊ लागला तसा शरीरसंबंधांपायी स्वास्थ्य गमवावं लागलं तर काय, हा विचार थोडाफार मूळ धरू लागला. आणि या शौकाची आसक्ती कमी झाली. चरितार्थाकरता पैसे मिळवण्यासाठी वेश्याव्यवसाय हादेखील विश्वसनीय आर्थिक व्यवसाय मानण्यात यावा असा निकाल १९११मध्ये युरोपियन न्यायालयाने दिला. विदेशी गणिका – (२७) बहुतेक सर्व प्राचीन संस्कृतीत गणिकांचे पुरावे मिळतात. इजिप्त, बबिलोन, सिरीया, फिनिशिया, ही काही उदाहरणं. ग्रीस, इटली, भारत इथे त्यांना विशिष्ट दर्जा प्राप्त झाला. त्यांचेही प्रकार होते, सामान्य वेश्या अलेत्रय्डी, आणि सर्वोच्च म्हणजे हेटीअरा (या शब्दाचा अर्थ सोबती). काही हेटीअरा वादविवादपटू होत्या. क्लेप्सीड्रा हिच्या वक्तशीरपणामुळे तिला ते नाव मिळालं होतं त्याचा अर्थ जलघटिकापात्र असा होतो. थीओफ्रत्स याने इ.पू. ३७२ – २८७ या काळात ‘ऑन मरेज’ हा ग्रंथ लिहिला, याचा सविस्तर अभ्यास करून लिओंटीयम या हेटीअराने त्यावर प्रगल्भ टीका लिहिली. रोमन समाजात कोर्टीझन अस्तित्वात होत्या. पॉम्पेई इथे व्हिकोली बाल्कोन पन्सिली नावाच्या इमारतीत शेकडो रमणी वास करत. या संदर्भातली रतिक्रिडेची मूळ चित्रं पॉम्पेईन wall paintings म्हणून प्रसिद्ध असून ती इटलीच्या वस्तुसंग्रहालयात सुरक्षित आहेत. रोमन साम्राज्यात हेटीअरा ऐवजी कोर्टीझन शब्द रूढ झाला. युरोपात पंधरा-अठरा शतकांत कोर्टीझन आणि कलावंतीण यांना समाजात विशिष्ट स्थान आणि आदर मिळत होता. फ्रान्समध्ये सतराव्या शतकात रमणींची सत्कारगृहं (सलो) प्रसिद्ध होती. जपानमध्ये गै (कलात्मक क्षमता) आणि शा (व्यक्ती) यावरून गैशा ही संज्ञा रूढ झाली. त्यांच्यात अलंकारिक सुरावट, सौजन्य, निष्कपट, सुसंस्कृतपण असे. बाराव्या शतकापासून कार्यरत असलेली ही प्रथा इडो काळात (इ.स.१६००-१८६८) अधिक वाढीला लागली. ओकिया ही त्यांची निवासस्थानं होत. विसाव्या शतकात त्यांचं वर्चस्व राजकीय क्षेत्रात वाढीला लागलं. १९२०-३० मध्ये त्यांची संख्या साधारण ८० हजार होती, ती १९७०-८० दम्यान १७ हजार इतकीच उरली आहे. चीनमध्ये पूर्वी पीकिंग (बीजिंग) इथे सिंगसॉंग हाउस हा भाग राखीव होता. शांघाय इथे अत्यंत विलासी वारांगना गृहं आहेत. सिंगापूरमध्येगिटार गर्ल्स (पीपाचाई) या नावाने त्या ओळखल्या जातात. पाकिस्तानात त्या तवायफ, कान्जारी आणि गश्ती नावाने ओळखल्या जातात. आज मात्र सर्वत्र आमुलाग्र बदल झाला आहे. भारतीय साहित्यातील गणिका – (३२) संस्कृत, प्राकृत, पाळी भाषांत, हिंदू, बौद्ध, जैन वान्ग्मयात, त्यांचा उल्लेख आढळतो. त्या वैदिक काळात भारतात होत्या हे काही ऋचांवरून समजतं. (ऋचा १.१६७.४ – अनेक पुरुषांशी सांग करणारी ती साधारणी). पंचचुडा अप्सरेपासून त्यांची उत्पत्ती झाली असं मानतात. महाभारत काळात त्यांना प्रतिष्ठा प्राप्त झाली. (राज, नागरी, गुप्त, देव आणि ब्रह्म असे पाच प्रकार होते). रामायणात फार स्थान नव्हतं. अमरकोश, महाभाष्य, वार्त्तिके, दशरूपक, कौटिलीय अर्थशास्त्र जातक कथा, पंचतंत्र, वेताळकथा, शुकबहात्तरी, गाथासप्तशती, अशा विविध ग्रंथांत त्यांचा उल्लेख आहे. कामसूत्र या ग्रंथात वात्सायनाने ‘वैशिक’ या प्रकरणात त्यांची माहिती दिली आहे. कथासरीत्सागर, राजतरंगिणी, शृंगारतिलक, सरस्वतीकंठभरणा, कलाविलास, मेघदूत, मृच्छकटिक, रत्नावली, नागानंदा, अशा नाटकांतून त्यांचा उल्लेख येतो. भारतात इ.पू. पहिल्या सहस्रकात ती प्रथा अस्तित्वात येऊन ब्रिटीशांच्या आगमनानंतर एकोणिसाव्या शतकात लोप पावली असावी असं समजलं जातं. गणिकेची प्रशिक्षण व वर्णन – (१६) गणिकेला बालपण जवळपास नव्हतच. वयाच्या सहा-सात वर्षापासून तिला घडवायला सुरुवात होत असे. त्यांच्या प्रशिक्षणात आचार, विचार, शिष्टाचार, विविध कला, खेळ, भाषा, वर्तन, सौंदर्यवर्धन, गायन, वादन, नृत्य, अलंकरण, शरीर सौष्ठव, बुद्धिवर्धन अशा प्रत्येक अंगाचा व्यापक विचार होता. काही हस्तकला शिकाव्या लागत. पाककला, सुगंधी द्रव्य निर्मिती, कामशास्त्र, प्रणायाराधन, हिकाव्म लागे. स्वसंरक्षण शिकावं लागे. गणिकांची वेशभूषा, सौंदर्यप्रसाधने – (५) आधीच्या प्रशिक्षणात हाही एक महत्त्वाचा भाग होता. विट – (७) हा शब्द मी पहिल्यांदाच ऐकला. त्याचा इथे दिलेला अर्थ – शृंगाररस नायकानुचराप्रमाणे संपत्तीचा भोग न घेणारा किंवा जो आपल्या पैशाचा वापर कधी करत नाही, असं नाटकातलं लबाड, धूर्त पात्र. गणिका संस्थेत त्याच्या जोडीने वयस्य, अनुचर, धूर्त आणि डिंडिक ही पुरुष पात्र वावरतात. प्रतिवेशिनी ही गणिकेची शेजारीण. ती विश्वासातली. ती गणिकेसाठी विट आणि प्रियकर यांच्याशी संवाद साधते. गणिकामाता – (७) हे पात्र फार महत्त्वाच. तिला संरक्षित स्त्री, कुट्टनी किंवा कुट्टीनी म्हटलं जाई. तिचं काम शिस्त राखणे, थोडक्यात रेक्टर. कामकुजानांना आळा घालणं, गणिकांना खऱ्या प्रेमापासून वंचित ठेवणं. कामुकांचं मानसशास्त्र तिला मुखोद्गत. पुरुषांच्या गुणदोषाच्या’ आधारे अचूक आडाखे बांधत ती गणिकेला सल्ला देता. तिचा दबदबा असतो. ते नसती तर गणिका ही संस्था कधीच नामशेष झाली असती. कारण स्त्रिया या स्त्रिया असल्याने स्त्रीसुलभ भावनेनुसार गणिकागिरीत न रमता त्या केव्हाच संसाराला लागल्या असत्या. प्रियकराचा राग-रंग – (९) रग हे बारा छटांमधली काम आसक्ती असं म्हणता येईल. पुरुषाची मनोवृत्ती, प्रवृत्ती, स्वभाव, गुणविशेष आणि खास करून राग-लोभ जाणून घेत गणिकेला त्याच्याशी वर्तन करावे लागते. कथांविषयी थोडेसे आणि कथा (४८) – ‘शृंगारमंजरीकथा’ हा राजा भोज रचित संस्कृत ग्रंथ असून त्यात स्त्री-पुरुष मनोवृत्ती दर्शन घडवणाऱ्या तेरा कथा आहेत. त्यापैकी काही जीर्ण, काही अपूर्ण आहेत. पैकी एक कथा वाचून दाखवते. संदर्भग्रंथ (४) सोबत फोटो दिले आहेत त्या पानांचे. या पुस्तकात आढळलेले सुंदर शब्द – गरती, लीलासहचारी, पृथुल (अर्थ कळला नाही अजून), रूपाजीवा, सूरसुंदरी परिचय फार लांबला. या विषयावरच्या इतक्या अभ्यासानंतर एखादा पेपर सहज देता येईल. परत अभिमानाने म्हणता येईल, ‘मा, मै फर्स्ट क्लास फर्स्ट आया!’ मनापासून धन्यवाद. माझी परिचय पाळी नसती तर मी हे पुस्तक वाचलंच नसतं. मजा आली मला वाचताना. तशी तुम्हालाही आली असेल अशी खात्री आहे. थांबते. ...Read more

RESHIMREGHA
RESHIMREGHA by SHANTA J SHELAKE Rating Star
मीना कश्यप शाह

शांता शेळके या कवयित्री म्हणून आपल्या सर्वांच्या माहितीच्या आहेतच. गीतकार म्हणूनही त्यांचे मोठे नाव झाले. रेशीमरेघा हे त्यांनी रचलेल्या गीतांचे पुस्तक. मुख्यतः त्यांनी चित्रपट आणि नाटक यासाठी गीते लिहिली आहेत. प्रस्तावनेत शांताबाई म्हणतात, गीते लििणे त्यांना अतिशय आकर्षक वाटत गेले आणि म्हणून केवळ चित्रपट आणि नाटकांसाठीच नाही, तर स्वानंदासाठीही, त्या गीतं लिहित राहिल्या. चालीवर गीते लिहिणे त्यांना आव्हानात्मक वाटायचे, बंधनकारक नाही. पुढे बंगाली, गुजराती अशा काही गीतांच्या चाली आवडल्या, तर त्या, त्या चालींवरही छंद म्हणून गीते लिहू लागल्या. त्यांच्या गीतांमध्ये लावण्या, गवळणी, नृत्यगीते आणि युगुलगीते (त्यांनी द्वंद्वगीते हा शब्द वापरला आहे, जो मला आवडत नाही) जास्त आहेत. ह्या पुस्तकात त्यांचे संकलन आढळून येतं. पुस्तकातील काही गीतांपेक्षा मला त्यांची प्रस्तावनाच जास्त आवडली. आपल्या गीतांबद्दल त्यांनी हळुवार होत लिहिलं आहे. प्रत्येक गाणं ध्वनिमुद्रीत होतानाचे क्षण त्यांना आठवतात. आणि ही गीतं प्रसिद्ध होण्यासाठी संगीतकार, गायक यांचा हातभार नक्कीच आहे याची त्या आठवण काढतात. गीतांचा अर्थ रसिकांपर्यंत पूर्णपणे पोहोचवण्यासाठी गायक-गायिकांचा खूपच मोठा वाटा आहे, त्यांच्याबद्दल त्या अपार कृतज्ञता व्यक्त करतात. हे पुस्तक त्यांनी लावणेसम्राज्ञी यमुनाबाईंना अर्पित केलेले आहे. त्यान्नी लिहिलेल्या "रेशमाच्या रेघांनी" या सर्वात जास्त प्रसिद्ध पावलेल्या लावणीच्या नावावर ह्या पुस्तकाचे नाव आधारित आहे. अनेक प्रसिद्ध गाणी या गीत संग्रहात आढळतात. रेशमाच्या रेघांनी, काय बाई सांगू, मनाच्या धुंदीत लहरीत, हे श्यामसुंदर, राजसा, शालू हिरवा पाच नि मरवा, चाल तुरू तुरू, मनाच्या धुंदीत लहरीत येना आणि अशी अनेक. शांताबाईंचं काव्य सामर्थ्य ह्या लावण्या/गीतांमध्ये देखील दिसून येतं... कळ्या आजच्या, शिळ्या उद्याला, ओठांशी न्याल का, आल्यावर जवळ मला घ्याल का.... अशी अनेक उदाहरणं! पुस्तकातील बहुतेक गाणी ही लावण्यांच्या स्वरूपातली आहेत. त्यामुळे त्याच त्याच भावना सारख्या सारख्या आढळून येतात. बोलावणे किंवा नको जाऊ म्हणणे, भेटी (गिफ्ट्स) घेणे, वाट पाहणे, विरह, सौंदर्याचे वर्णन, शृंगाराचे वर्णन, म्हणजे तुम्हाला काय मिळू शकेल याची कल्पना गीतातून देणे (उदा. कंबरपट्टा रेखून दावी, देहाचा आकार!!) अशा प्रकारचे विषय पुन्हा पुन्हा येत राहतात, पण (शांताबाई बीइंग शांताबाई) कुठेच तोचतोचपणा कंटाळवाणा होत नाही (वाचकाने जरा रोमँटिकपणा दाखवून वाचली ही गीतं तर फारच बहार!) शांताबाई नथ फारच आवडते असं दिसतं... नथ सर्जाची नाकी घालता हसेल डावा गाल किंवा सलगी करते नथ ओठांशी, तो तुमचा अधिकार अशा प्रकारे ती खुलून देखील दिसते ह्या गीतांमधे!! अनेकविध लावण्या आहेत ह्या पुस्तकात. पाडव्याची, रंगपंचमीची, श्रावणाची, अशा विविध दिवसांच्या लावण्या तर हिरव्या रंगाची लावणी देखील आहे. पाडव्याची लावणी म्हणजे पाडव्याला शालू मागते आहे, कारण ती रात्री एकांतात उभारणार आहे. 🙂 "मी सुंदर आहे तर आता मी काय करू?" अशी तक्रारही दिसून येते. "माझ्या नखऱ्याच्या शंभर तऱ्हा" सांगणारीला स्वतःच्या सौंदर्याची पुरेपूर जाणीव आहे आणि त्यापेक्षाही, फक्त शारीरिक सौंदर्यावर विसंबून न राहता, त्याबरोबर तोरा दाखवत भुरळ पाडणे ह्यात ती माहीर आहे. पण त्याचबरोबर ती धोक्याची सूचना पण देते आहे... घटकाभर संग बसून घालवा वेळ, जमल्यास मनांचा जमून येईल मेळ, नाहीतर यायचा अंगाशी हा खेळ, पाय टाकण्याआधी इथे, विचार पुरता करा, माझ्या नखऱ्याच्या शंभर तऱ्हा!! एका लावणीत एका पुरुषाने फसवलंय अशा स्त्रीचे रूप आहे. जत्रेत एक जण भेटला आणि त्याने आपल्याशी फ्लर्ट केलं, जत्रा उलगडल्यावर दुसऱ्या दिवशी मात्र तो डोळ्याला डोळा भिडवत नाही, तोंड चुकवून पुढे जातो, ह्याची तक्रार ह्या लावणीत येते. किती विविधता! अशा लावणी कलाकाराच्या आयुष्याचं विदारक दृश्य देखील शांताबाईंनी दाखवले आहे. तिथे येणारा आज एक, तर उद्या दुसराही असू शकेल किंवा तिथे असणारी आज एक, तर उद्या दुसरीही असू शकेल. हे सांगून त्या म्हणतात... प्रीतीचे नीतीचे व्यर्थ सांगणे, भुकेल्या देहाचे सारे मागणे, जन्माच्या नात्याचे फुका बहाणे, कुणाला सतत इथे राहणे? इथल्या महाली घडीची वस्ती, सुखाचे हिंदोळे आभाळी चढती, घडीत वरती घडीत खालती ऐन विशीतल्या स्त्रीचं सौंदर्याचं अत्युत्तम वर्णन एका गीतात केलं आहे. अनेक गीतांमध्ये पुरुषांनी स्त्रीच्या देहाचे आणि मनाचे केलेले वर्णन दिसून येते. त्यातही नुसता देहच नाही तर स्त्रीचा तोरा (attitude) देखील पुरुषाला कशी भुरळ पाडतो हे दिसतच. "ही चाल तुरुतुरु" आपल्या सगळ्यांच्या आवडीचे आणि माहितीचे आहे. असंच "मनाच्या धुंदीत लहरीत ये ना" हे देखील. गीतांमध्ये श्रावण, पाऊस, विरह, वाट बघणे हे सर्व हमखास येतं. एक गीत आहे "लहरी सजण कुणी दावा" - मीना खडीकर यांचे संगीत, उषा मंगेशकर यांचा आवाज. हे गीत मला ना वाचायला आवडलं ना ऐकायला आवडलं 🫣 श्रीकृष्ण राधेच्या कथा तर आपण गवळणींमधे अनेक वेळा ऐकल्या आहेत. कृष्णाची धून ऐकल्यानंतर अगदी काहीही न सुचता तशीच्या तशी निघालेली राधा! त्यातही तिच्या शृंगारचं वर्णन येतंच. सजण्याची आवड असलेल्या स्त्रीचे वर्णन अतिशय खुबीने शांताबाईंनी केले आहे. मला स्वतःला नटण्या मुरडण्याची अतिशय हौस असल्यामुळे हे सगळं वर्णन वाचून, "हे पुस्तक आपण आधी का नाही वाचलं" याचं दुःख मात्र झालं. ही उदाहरणं बघा ना... माथ्यावर मोतियाची जाळी, भांगेत मोती सर, चंद्रकोर भाळी, कानात झुमके, केसांमध्ये वेल, नाकात नथ, नथित हिरे, बिल्वदळे, वज्रटिक, `बोलताना पाठीवर जिचे रेशमाचे गोंडे खालीवर होतील अशी` पाच पदरी मोहन माळ!! दंडात वाकी रुताव्या, शिंदेशाही तोडे असावेत आणि पायी सांध्यात सोनसळी, गळ्यात तन्मणी, कमरेला कंबरपट्टा, पायी पैंजण.... "शालू हिरवा, पाच नि मरवा, वेणी तीपेडी घाला" हे गीत तर फारच प्रसिद्ध झाले. शृंगार आणि सौंदर्य यांचे वर्णन या सगळ्या गीतांमध्ये अगदी खुलून आलेलं आहे. आणि प्रेम! त्याविषयी किती लिहावं आणि कशाप्रकारे लिहावं असा मोठाच प्रश्न पडला आहे. तरीही एका स्त्रीच्या मनाने वाचलेल्या ह्या चार ओळी लिहीतेच... काय वाजले प्रिय ते पाऊल, तो तर वारा तिची न चाहूल, भास हो फसवा वरचेवरी, शोधितो राधेला श्रीहरी!! ...Read more