* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: RESONANCE
  • Availability : Available
  • Translators : UJWALA GOKHALE
  • ISBN : 9789387789975
  • Edition : 1
  • Publishing Year : JULY 2018
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 340
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :AJAY PANDEY BIRTHDAY OFFER
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
"THE ATTACK ON MUMBAI WAS JUST A TRAILER. THIS TIME THE TERRORISTS HAVE PLANNED SOMETHING MUCH BIGGER. THE JOINT DIRECTOR OF IB, MR. SIDDHARTH RANA HAS COME ACROSS A PORTION OF A PHRASE ‘TO PAK…’ & HE COULD SOLVE THE PUZZLE OF THE DATE OF THE ATTACK JUST TWO DAYS IN ADVANCE. STILL HE IS NOT CERTAIN ABOUT THE VENUE. THE STAGE IS SET & THE TIME IS RUNNING OUT. RANA HAS TO OVERCOME THE TRAITORS AS WELL, TO BE AT THE RIGHT TIME AT THE RIGHT PLACE. A FICTION BASED ON BASIC PHYSICS & THE LATEST INFORMATION TECHNOLOGY. IT SEEMS SO REAL. IT`S KIND OF COMPLICATED; BUT THEN, IT`S A CONSPIRACY WITH A MYSTERY PERSON. THE AUTHOR KEEPS THE PACE AND THE ELEMENTS OF THE STORY KNIT INTO A THRILLER WHICH RACES AHEAD TO AN END THAT`S... "
"मुंबईवरचा हल्ला ही केवळ एक झलक होती. यावेळी अतिरेक्यांनी प्रचंड मोठा कल्पनातीत आघात करून हिंदुस्थानचा सर्वनाशच करायचं ठरवलं होतं. एक कुठलातरी अर्धामुर्धा शब्दप्रयोग आयबीचा जॉइंट डायरेक्टर सिद्धार्थ राणा याच्या कानावर येतो `टू पाक..’ बऱ्याच खटपटीनंतर त्याला दोनच दिवस आधी हल्ल्याची तारीख कळते; पण स्थान, वेळ निसटून जात असतो. करोडो लोकांचं आयुष्य पणाला लागलेलं असतं. त्यातच सिद्धार्थला काही फितुरांशीदेखील सामना करावा लागतो. भौतिकशास्त्राच्या मूलभूत नियमांवर आधारित, अद्ययावत माहिती आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं तडीला नेता येणारा महाभयंकर कट शिजलेला असतो. त्यात एका गूढ व्यक्तीची भर पडते आणि खेळ रंगत जातो. अतिशय गुंतागुंतीची, वेगवान घडामोडींनी भरलेली काल्पनिक कादंबरी उत्कर्ष बिंदूपर्यंत पोचते आणि... "
1)पुणे मराठी ग्रंथालयाचा अनुवादासाठीचा उत्कृष्ट साहित्यकृतीचा पुरस्कार 2018
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#RESONANCE#AJAY PANDE#UJJWALA GOKHALE# #RESONANCE#AJAY PANDE#UJJWALA GOKHALE# #रेझोनंस#अजय पांडे #उज्ज्वला गोखले.#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #रेझोनंस#अजय पांडे #उज्ज्वला गोखले.#
Customer Reviews
  • Rating StarKiran Borkar

    भारताविरुद्ध नवा कट रचला जात आहे .पण यावेळी विज्ञानाचा वापर करून नैसर्गिक आपत्ती निर्माण होणार आहे. अशी नैसर्गिक घटना ज्याने भारत परत कधी उभा राहू शकणार नाही.एक मोठ्या हुद्द्यावरील व्यक्ती मारताना टू पाक टू इतकेच सांगून प्राण सोडते. काय आहे हे टू पाकटू. इंटेलिजन्स ब्युरोचा सहाय्यक संचालक सिद्धार्थ राणा या गोष्टीचा शोध घेतोय. पण हे तितके सोपे ही नाही आहे . अल कायदा ,पाकिस्तान आणि भारतातील काही प्रमुख व्यक्तीही यात सामील आहेत . क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणारी आणि अति प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करीत लिहिलेली कादंबरी आपल्याला शेवटच्या पानापर्यंत गुंतवून ठेवते . ...Read more

  • Rating StarVaibhav Mahajan

    इंटेलिजन्स ब्युरोचे संयुक्त संचालक सिद्धार्थ राणा एक गूढ उकलण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करत आहेत . निव्वळ अंधारात चाचपडायला लावणारे धागेदोरे घेऊन सिद्धार्थला एक लढा लढायचा आहे. भारताविरुद्ध एक भयंकर कट रचणाऱ्या दहशतवादयांना प्रतिबंध घालण्याचे आव्हान ्यांच्यासमोर आहे. श्वास रोखून धरणाऱ्या या कथानकामध्ये अनेक नवनवीन विज्ञान व तंत्रज्ञानाशी संबंधित उपकरणांचा उपयोग केलेला आहे . दहशतवाद, भारत पाकिस्तान वैर असे काही समान धागे पकडून लेखकाने त्यात आपल्या कल्पनेचे बेमालूम मिश्रण घालून अजोड असे कथानक निर्माण केले आहे . ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 05-08-2018

    सत्य आणि कल्पना यांची बेमालूम गुंफण असलेली आणि देश-विदेशाच्या सीमा ओलांडणारी ‘थ्रिलर’ प्रकारातली ही कादंबरी. इंटेलिजन्स ब्युरोचे संयुक्त संचालक सिद्धार्थ राणा एक गूढ उकलण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करत आहेत. भारताविरुद्ध एक भयंकर कट रचणाऱ्या दहशतवाद्यंना प्रतिबंध घालण्याचं आव्हान त्यांच्यासमोर आहे. इथून वेगळ्या घटना-घडामोडी, शह-काटशह, श्वास रोखून धरायला लावणारं धैर्य, नात्यांमधलं सौंदर्य या सगळ्यांचं दर्शन घडवत ही कादंबरी वाचकांना घुसळवून टाकते. उज्ज्वला गोखले यांनी अनुवाद केला आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

वा. पां. जाधव अमरावती

`अमरावतीचे छप्पन स्वभाव एक मनोरंजक काव्यसंग्रह` `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे अमरावतीचे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री जी. बी. देशमुख यांचे अमरावती नगरीचा सहज स्वभाव व ह्या नगरीच्या वेगळ्या ओळखीवर आधारित मनोरंजक पुस्तक वाचले. वाचून भरपूर मनोरंजन झाले. खर काय लिहावे या लेखकाबद्दल, मन गोंधळले. ऐतिहासिक असो, प्रवास वर्णन असो, व्यक्ती विशेष असो, अनुभवात्मक घटना घडामोडी असो कशावरही सहज लिखाण करणारा हा लेखक आहे. आता तर त्यांनी लेखनाला विनोद प्रचुर फोडणी देऊन `अमरावतीचे छप्पन स्वभाव` या काव्यसंग्रहातून अमरावतीकरांना मनोरंजनाची मेजवानीच दिली आहे. प्रत्येक शहराची व त्या शहरातील वैशिष्ट्यांची एक वेगळीच ओळख असते. दिवस जातात, काळ लोटतो, पिढ्या बदलतात मात्र जुन्या स्मृतीची चिन्हे नवीन येणाऱ्या पिढीच्या मनात गुढ निर्माण करत कायम हाक देत राहतात. अमरावतीही त्याला अपवाद नाही. बापट चौकात चौक नाही, त्या जागेवर चौरस्ता नसून टी-पॉइंट आहे, खापर्डे बगीचा म्हणून आजही ओळख आहे मात्र तेथे बगिचा नाही किंवा प्रसिद्ध गांधी चौकात गांधीचा पुतळा अथवा स्मृतीदर्शक चिन्ह अथवा उल्लेख नाही मात्र गांधी चौक अशीच ओळख जनमानसात आहे. अशा एक ना अनेक विसंगत नाम दर्शक ओळख असलेली उदाहरणे त्यात सप्रमाण आहेत. पण खरी गंमत म्हणजे कधी काळी घडलेला इतिहास त्यामध्ये दडलेला आहे हे निश्चित. या सोबतच अमरावतीकरांच्या स्वभावातला स्थायी मजेदारपणाच्या एक एका हटके गुण वैशिष्ट्याच्या गमती लेखकाने हुबेहूब अधोरेखित केलेल्या आहेत. आणि त्यावरुन तत्सम रचनांचा उहापोह लेखकाने पुस्तकात केला असावा. विदेशात स्थाईक झालेल्या मूळ अमरावतीकरांना लेखकाने लिहिलेल्या गमती मनोरंजनात्मक वाटाव्या एवढी किमया जी.बी. च्या सहज लेखनाने दाखवली आहे. अमरावतीचे अग्रगण्य वृत्तपत्र दै. हिंदुस्थान मध्ये लेखकाने सतत ६ महीणे लिहीलेल्या काव्य सदरात अमरावतीच्या जनमानसाच्या हृदयाच्या ठाव घेणाऱ्या काव्य रचनांचा आठवणींनी महापूर ओसंडून गेला होता. विशेष म्हणजे ह्यात कुठेही अनावश्यक अभिनीवेष नव्हता. उलट गमतीत केलेले आत्मपरिक्षण मात्र काही प्रमाणात होते. वयस्क अमरावतीकर रसिकांना या रचना ताज्या करून त्यांच्या तारुण्यात घेऊन गेल्या हेच खरे. जी बी देशमुख या लेखकास मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रियां वरून दिसून येते. . सदर पुस्तकातील काव्यमय रचना वाचतांना अमरावतीच्या माणसाच्या वऱ्हाडभोळ्या स्वभावाची प्रचीती येते आणि वेगळाच आनंद देऊन जाते. निखळ मनोरंजन करत गुदगुल्या करणारा असा हा काव्यसंग्रह आहे. अमरावती शहराची ऐतिहासिक वैशिष्टे काव्यरूपात वाचण्याचा आनंद अमरावतीकरांना ते जिथं असतील त्या गावात, परगावात, परदेशात पुस्तक मागवून घेता येईल. ...Read more

ज्योती चेडे, मुंबई.

अमरावतीच्या वैशिष्ट्यांवर आधारीत खुमासदार छप्पन्न कवितांच्या संग्रहातील प्रत्येक कविता वाचत असताना अमरावतीच्या वातावरणाची धुंदी आपसुकच मनावर चढु लागली. सगळ्याच कविता सुंदर आहेत. एकेक कविता अमरावतीचे अप्रतिम वर्णन करते. प्रत्येक कवितेचा शेवट कुठेतरी गंभीर विचार करायला भाग पाडतो आणि मन गलबलून जाते. सगळ्याच कविता सुंदर आहेत पण माझ्या मनाला भावलेल्या व भिडलेल्या कविता आहेत `अमरावतीतल्या गमती`, `अमरावतीचे शिक्षण`, `अमरावतीचे हजरजबाबी`, `अमरावतीचे वेडे`, `अमरावतीच्या काकू` व बाकी सगळ्या. `अमरावतीचे वेडे` या कवितेत उल्लेखीत शेवटचा अश्रुंचा एक थेंब जरुर राखला जाईल. तसेच `अमरावतीच्या काकूं` ची उर्जा उरात भरून उरेल. जीवन देणाऱ्या विहीरीने कोणाचेही जीवन घेऊ नये, अशी सद्भावना मनात जागेल. अमरावतीकर जगात कुठेही असो त्यांच्या मनात एका कोपऱ्यात राजकमल चौक असतोच हे सत्य मनावर कोरले जाईल. प्रत्येक अमरावतीकराने ह्या कविता जगाव्यात. त्यासाठी हे पुस्तक संग्रही ठेवावे आणि परगावी राहणाऱ्या आपल्या अमरावतीकर आप्तेष्टांना भेटी दाखल द्याव्या. ...Read more