* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: RESONANCE
  • Availability : Available
  • Translators : UJWALA GOKHALE
  • ISBN : 9789387789975
  • Edition : 1
  • Publishing Year : JULY 2018
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 340
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
"THE ATTACK ON MUMBAI WAS JUST A TRAILER. THIS TIME THE TERRORISTS HAVE PLANNED SOMETHING MUCH BIGGER. THE JOINT DIRECTOR OF IB, MR. SIDDHARTH RANA HAS COME ACROSS A PORTION OF A PHRASE ‘TO PAK…’ & HE COULD SOLVE THE PUZZLE OF THE DATE OF THE ATTACK JUST TWO DAYS IN ADVANCE. STILL HE IS NOT CERTAIN ABOUT THE VENUE. THE STAGE IS SET & THE TIME IS RUNNING OUT. RANA HAS TO OVERCOME THE TRAITORS AS WELL, TO BE AT THE RIGHT TIME AT THE RIGHT PLACE. A FICTION BASED ON BASIC PHYSICS & THE LATEST INFORMATION TECHNOLOGY. IT SEEMS SO REAL. IT`S KIND OF COMPLICATED; BUT THEN, IT`S A CONSPIRACY WITH A MYSTERY PERSON. THE AUTHOR KEEPS THE PACE AND THE ELEMENTS OF THE STORY KNIT INTO A THRILLER WHICH RACES AHEAD TO AN END THAT`S... "
"मुंबईवरचा हल्ला ही केवळ एक झलक होती. यावेळी अतिरेक्यांनी प्रचंड मोठा कल्पनातीत आघात करून हिंदुस्थानचा सर्वनाशच करायचं ठरवलं होतं. एक कुठलातरी अर्धामुर्धा शब्दप्रयोग आयबीचा जॉइंट डायरेक्टर सिद्धार्थ राणा याच्या कानावर येतो `टू पाक..’ बऱ्याच खटपटीनंतर त्याला दोनच दिवस आधी हल्ल्याची तारीख कळते; पण स्थान, वेळ निसटून जात असतो. करोडो लोकांचं आयुष्य पणाला लागलेलं असतं. त्यातच सिद्धार्थला काही फितुरांशीदेखील सामना करावा लागतो. भौतिकशास्त्राच्या मूलभूत नियमांवर आधारित, अद्ययावत माहिती आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं तडीला नेता येणारा महाभयंकर कट शिजलेला असतो. त्यात एका गूढ व्यक्तीची भर पडते आणि खेळ रंगत जातो. अतिशय गुंतागुंतीची, वेगवान घडामोडींनी भरलेली काल्पनिक कादंबरी उत्कर्ष बिंदूपर्यंत पोचते आणि... "
1)पुणे मराठी ग्रंथालयाचा अनुवादासाठीचा उत्कृष्ट साहित्यकृतीचा पुरस्कार 2018
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#RESONANCE#AJAY PANDE#UJJWALA GOKHALE# #RESONANCE#AJAY PANDE#UJJWALA GOKHALE# #रेझोनंस#अजय पांडे #उज्ज्वला गोखले.#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #रेझोनंस#अजय पांडे #उज्ज्वला गोखले.#
Customer Reviews
  • Rating StarKiran Borkar

    भारताविरुद्ध नवा कट रचला जात आहे .पण यावेळी विज्ञानाचा वापर करून नैसर्गिक आपत्ती निर्माण होणार आहे. अशी नैसर्गिक घटना ज्याने भारत परत कधी उभा राहू शकणार नाही.एक मोठ्या हुद्द्यावरील व्यक्ती मारताना टू पाक टू इतकेच सांगून प्राण सोडते. काय आहे हे टू पाकटू. इंटेलिजन्स ब्युरोचा सहाय्यक संचालक सिद्धार्थ राणा या गोष्टीचा शोध घेतोय. पण हे तितके सोपे ही नाही आहे . अल कायदा ,पाकिस्तान आणि भारतातील काही प्रमुख व्यक्तीही यात सामील आहेत . क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणारी आणि अति प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करीत लिहिलेली कादंबरी आपल्याला शेवटच्या पानापर्यंत गुंतवून ठेवते . ...Read more

  • Rating StarVaibhav Mahajan

    इंटेलिजन्स ब्युरोचे संयुक्त संचालक सिद्धार्थ राणा एक गूढ उकलण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करत आहेत . निव्वळ अंधारात चाचपडायला लावणारे धागेदोरे घेऊन सिद्धार्थला एक लढा लढायचा आहे. भारताविरुद्ध एक भयंकर कट रचणाऱ्या दहशतवादयांना प्रतिबंध घालण्याचे आव्हान ्यांच्यासमोर आहे. श्वास रोखून धरणाऱ्या या कथानकामध्ये अनेक नवनवीन विज्ञान व तंत्रज्ञानाशी संबंधित उपकरणांचा उपयोग केलेला आहे . दहशतवाद, भारत पाकिस्तान वैर असे काही समान धागे पकडून लेखकाने त्यात आपल्या कल्पनेचे बेमालूम मिश्रण घालून अजोड असे कथानक निर्माण केले आहे . ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 05-08-2018

    सत्य आणि कल्पना यांची बेमालूम गुंफण असलेली आणि देश-विदेशाच्या सीमा ओलांडणारी ‘थ्रिलर’ प्रकारातली ही कादंबरी. इंटेलिजन्स ब्युरोचे संयुक्त संचालक सिद्धार्थ राणा एक गूढ उकलण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करत आहेत. भारताविरुद्ध एक भयंकर कट रचणाऱ्या दहशतवाद्यंना प्रतिबंध घालण्याचं आव्हान त्यांच्यासमोर आहे. इथून वेगळ्या घटना-घडामोडी, शह-काटशह, श्वास रोखून धरायला लावणारं धैर्य, नात्यांमधलं सौंदर्य या सगळ्यांचं दर्शन घडवत ही कादंबरी वाचकांना घुसळवून टाकते. उज्ज्वला गोखले यांनी अनुवाद केला आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

BACKSTAGE
BACKSTAGE by MONTEK SINGH AHLUWALIA Rating Star
महाराष्ट्र टाईम्स.. ६.९.२०२६

भारताच्या आर्थिक सुधारणांवर अनेक पुस्तके आजवर प्रसिद्ध झाली आहेत. काहींमध्ये आकडेवारीचे जंजाळ असते, काही धोरणांचे विश्लेषण करतात, तर काही विशिष्ट नेत्यांची जाहिरातबाजी करतात. मात्र माँटेकसिंग अहलुवालिया यांचे `बॅकस्टेज : भारताच्या उच्च वाढीच्या र्षांमागची कहाणी` हे पुस्तक या सगळ्यांपेक्षा वेगळे ठरते. कारण हे पुस्तक भारताच्या आर्थिक परिवर्तनाची कथा बाहेरून पाहणाऱ्या अभ्यासकाने नव्हे, तर त्या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी उभ्या असलेल्या व्यक्तीने सांगितलेली आहे. जी. बी. देशमुख यांनी मूळ इंग्रजी पुस्तकाचा केलेला मराठी अनुवाद सरस उतरला आहे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच माँटेकसिंग एक गोष्ट स्पष्ट करतात, ती म्हणजे, हे पुस्तक आत्मकथन नाही. आत्मप्रौढी मिरवण्यासाठी नव्हे, तर भारताच्या आर्थिक सुधारणांचा प्रवास समजावून सांगण्यासाठी अहलुवालिया हे पुस्तक लिहितात. विषयाच्या अनुषंगाने पुस्तकात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील संदर्भ येतात, पण ते आर्थिक आणि राजकीय घडामोडी समजावून सांगण्यापुरतेच. सिकंदराबादमधील मध्यमवर्गीय वातावरणातून सुरू झालेला त्यांचा प्रवास दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, ऑक्सफर्ड, जागतिक बँक, अर्थ मंत्रालय, योजना आयोग आणि अखेर देशाच्या सर्वोच्च आर्थिक धोरणनिर्मितीच्या केंद्रापर्यंत पोहोचतो. हा प्रवास वाचताना स्वतंत्र भारताच्या आर्थिक विचारसरणीचा विकासक्रम उलगडत जातो. पुस्तकाचे केंद्रस्थान अर्थातच १९९१च्या आर्थिक संकटाचे आहे. त्यावेळी देशाकडे काही आठवड्यांच्या आयातीपुरताही डॉलर शिल्लक नव्हता. सोन्याचा साठा गहाण ठेवण्याची वेळ आली होती आणि आर्थिक दिवाळखोरीची शक्यता प्रत्यक्ष समोर उभी होती. अशावेळी सरकारने घेतलेले निर्णय, त्यामागील तणाव, राजकीय अनिश्चितता आणि प्रशासकीय संघर्ष यांचे वर्णन पुस्तकात अत्यंत जिवंतपणे आले आहे. नाणेनिधी किंवा जागतिक बँकेच्या दबावामुळे या सुधारणा झाल्याची धारणा माँटेकसिंग ठामपणे नाकारतात. हे पुस्तक आर्थिक सुधारणांना कोणत्याही प्रकारच्या विचारधारेच्या चष्म्यातून पाहत नाही. लेखक ना मुक्त बाजाराचे अंधसमर्थन करतात, ना राज्यनियंत्रित व्यवस्थेचे. त्यांचा दृष्टिकोन व्यवहारवादी आहे. भारतासारख्या लोकशाही देशात सुधारणा एका झटक्यात होत नाहीत; त्या राजकीय वास्तवाशी जुळवून घेत हळूहळू पुढे सरकतात, हे ते वारंवार. अधोरेखित करतात. पुस्तकात अनेक ठिकाणी `सुधारणा` हा आर्थिक नव्हे, तर राजकीय प्रक्रियेचाही विषय आहे, हे प्रकर्षाने जाणवते. अहलुवालिया या पुस्तकात अनेक व्यक्ती, अधिकारी, अर्थतज्ज्ञ आणि राजकीय नेत्यांच्या योगदानाचा उल्लेख करतात. नरसिंह राव, मनमोहन सिंग, पी. चिदंबरम, यशवंत सिन्हा, जसवंत सिंह यांच्यापासून ते विविध सनदी अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांची भूमिका ते प्रामाणिकपणे नोंदवतात. योजना आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम करताना अहलुवालिया यांनी जवळून अनुभवलेला काळ येथे उभा राहतो. सन २००४ ते २०११ या काळातील उच्च आर्थिक वाढ, दारिद्रयनिर्मूलनातील प्रगती, पायाभूत सुविधांमध्ये झालेली वाढ आणि ग्रामीण विकासाच्या कार्यक्रमांचे मूल्यमापन ते करतात. विशेषतः भारताने सलग अनेक वर्षे सात ते आठ टक्क्यांच्या दरम्यान वाढ नोंदवली, ती केवळ जागतिक परिस्थितीचा. परिणाम नव्हती; १९९० नंतरच्या सुधारणांनी घातलेल्या पायावर उभे राहून ती शक्य झाली, हा त्यांचा युक्तिवाद पटण्याजोगा वाटतो. मात्र पुस्तकाचे खरे सामर्थ्य यशोगाथेत नाही, तर आत्मपरीक्षणात आहे. यूपीए-२ दरम्यान निर्माण झालेली निर्णयप्रक्रियेतील अडचण, गुंतवणुकीतील वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक मंदी, भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे निर्माण झालेले वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक थेट भाष्य करतात. अनुवादक जी. बी. देशमुख यांनी मूळ पुस्तकातील आर्थिक संकल्पना सहज आणि प्रवाही मराठीत मांडल्या आहेत. यात कृत्रिमता जाणवत नाही. आर्थिक विषयावरील पुस्तक असूनही भाषा जड वाटत नाही. आर्थिक सुधारणांच्या व्यापक सामाजिक परिणामांचा स्वतंत्र आणि सविस्तर ऊहापोह येथे अपेक्षेपेक्षा कमी आढळतो. मात्र, हे पुस्तक ज्या उद्देशाने लिहिले गेले आहे त्या उद्देशात ते अत्यंत यशस्वी ठरते. `बॅकस्टेज` हे केवळ पुस्तक नाही; ते भारताच्या आर्थिक परिवर्तनाचा प्रत्यक्षदर्शी दस्तऐवज आहे. १९९१ नंतर भारताने घेतलेल्या वळणाचा अर्थ समजून घ्यायचा असेल, उच्च वाढीच्या वर्षामागील वास्तविक कथा जाणून घ्यायची असेल आणि धोरणनिर्मितीच्या पडद्यामागे काय घडत असते याचा मागोवा घ्यायचा असेल, तर हे पुस्तक अभ्यासणे आवश्यक ठरते. भारतीय अर्थव्यवस्थेच्या आर्थिक सुधारणांचा इतिहास आणि त्यांचे परिणाम समजून घेण्यासाठी हे पुस्तक एक महत्त्वाचा संदर्भग्रंथ म्हणून ओळखले जाऊ शकते. मराठीत उपलब्ध असलेला हा अनुवाद त्या दृष्टीने विशेष स्वागतार्ह आहे. ...Read more

HACHYUKISUNASKI
HACHYUKISUNASKI by ABA MAHAJAN Rating Star
Dinesh

This is a different planet. This is a different world. And this is a truly different book. I loved it. You should also buy it and read it. I’m sure you will love it too. Hachyukisunaski is a fantastic Book.