* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788171616947
  • Edition : 2
  • Publishing Year : APRIL 1997
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 152
  • Language : MARATHI
  • Category : LITERATURE
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
SNEHDHARA: THE FINAL, PLEASANT MANIFESTATION OF THE DIVINE TALENT OF THE LATE RANJIT DESAI! A PERSONS LIFE IS SHAPED BY HIS FATE, HIS CHARACTER AND HIS CIRCUMSTANCE. IN THIS COLLECTION OF CHARACTERSKETCHES HIS LAST SUCH WORK RANJIT DESAI GRATEFULLY REMINISCES ABOUT THE DIFFERENT HUMAN BEINGS &SHY SIMPLE BEINGS AS WELL AS GREAT ONES THAT TOUCHED HIS LIFE AND WITH WHOM HE DEVELOPED SOME SORT OF BOND. THIS IS NOT A CONTINUOUS AUTOBIOGRAPHY. AS IT HAPPENED, DIFFERENT MINOR OCCASIONS HAVE SERVED TO TRIGGER RECOLLECTION OF INTENSE MEMORIES OF CERTAIN PEOPLE. THIS IS AN EMOTIONAL RECOLLECTION OF EACH SUCH INDIVIDUAL AND THE EVENTS ASSOCIATED WITH HIM, WRITTEN BY A SENSITIVE PEN. THE CHARACTERS DESCRIBED HERE ARE NOT COMPLETE BEINGS. THESE MEMOIRS AND SKETCHES TELL US ABOUT THE ENCOUNTERS DESAI HAD WITH EACH OF THESE INDIVIDUALS AND THE WAY THESE ENCOUNTERS MADE A LASTING IMPRESSION ON HIM. OUR JOY AT PRESENTING THIS COLLECTION WRITTEN BY THE LATE RANJIT DESAI TO THE READER IS TINGED WITH SADNESS…BECAUSE THIS IS THE LAST OF HIS UNPUBLISHED WORK THAT WE ARE PRESENTING IN BOOK FORM
कै. रणजित देसाई यांच्या दैवी प्रतिभेचा हा प्रसन्न; परंतु अखेरचा ललिताविष्कार : स्नेहधारा ! दैव, व्यक्तित्व आणि परिस्थिती या तिन्हीच्या क्रियाप्रतिक्रियांमधून जीवन घडलं जात असताना ज्या ज्या छोट्यामोठ्या व्यक्तीशी त्यांचा ऋणानुबंध जडला, त्या सर्वांच कृतज्ञ स्मरण श्री. रणजित देसाई यांनी आपल्या या अखेरच्या व्यक्तिचित्रांच्या संग्रहात केलं आहे. हे सलग आत्मकथन नव्हे. काही तरी तात्कालिक निमित्त्त घडलं आणि त्या त्या व्यक्तीचं स्मरण उत्कटतेनं झालं. त्या व्यक्तीशी संबंधित प्रसंगांची आणि व्यक्तीचं हे हळुवार लेखणीनं केलेलं भावचित्रण आहे. या व्यक्तिरेखाही तशा समग्र, परिपूर्ण नाहीत. त्या व्यक्तीशी आलेला श्री. देसार्इंचा संबंध आणि त्या संबंधाची प्रतिक्रिया म्हणून त्यांच्या मनावर उमटलेला चिरकालिक स्वरूपाचा संस्कार यांनाच या छोट्या स्मरणसाखळीत प्राधान्य दिलं गेलं आहे. कै. रणजित देसार्इंच्या वाचकांच्या हाती त्यांची ही अखेरची ललितकृती देताना आम्हांला दु:खमिश्रित आनंद होत आहे. दु:ख अशासाठी, की श्री. देसार्इंचं हे अखेरचं अप्रकाशित असं साहित्य आम्ही ग्रंथरूपानं प्रसिद्ध करीत आहोत...
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#8 APRIL # SWAMI # SHRIMAN YOGI # RADHEYA # MAZA GAON # ABHOGI # BARI # PRATIKSHA # SAMIDHA # PAVANKHIND # LAKSHYAVEDH # SHEKARA # MORPANKHI SAVALYA # SANKET # ASHADH # MADHUMATEE # MEKH MOGARI # KATAL # ROOPMAHAL # MEGH # PRAPAT # VAISHAKH # KAMODINI # GANDHALI # BABULMORA # AALEKH # KANCHANMRUG # SHRIMANYOGI (NATAK)# SANGEET TANSEN (NATAK)# SAVALI UNHACHI (NATAK)# HE BANDH RESHMACHE (NATAK)# PANKH JAHALE VAIRI (NATAK)# DHAN APURE (NATAK)# RAMSHASTRI (NATAK)# LOKNAYAK (NATAK)# SWAMI (NATAK)# VAARSA (NATAK)# TUZI VAT VEGALI (NATAK)# PANGULGADA (NATAK)# GARUDZEP (NATAK)# SNEHADHARA (NATAK)# (NATAK)# SANCHIT (NATAK) #८ एप्रिल #स्वामी (राज्य पुरस्कार १९६२,ह.ना. आपटे पुरस्कार १९६३) #साहित्य अकादमी पुरस्कार १९६४) #श्रीमान योगी #राजा रविवर्मा #राधेय #माझा गाव #अभोगी #बारी #प्रतिक्षा #समिधा #पावनखिंड #लक्ष्यवेध #शेकरा #मोरपंखी सावल्या #संकेत #आषाढ #मधुमती #मेख मोगरी #कातळ #रुपमहाल #रुपमहाल #मेघ #प्रपात #वैशाख #कमोदिनी #गंधाली #बाबुलमोरा #आलेख #कांचनमृग #श्रीमानयोगी-नाटक #संगीत तानसेन-नाटक #सावली उन्हाची –नाटक #हे बंध रेशमाचे –नाटक #पंख जाहले वैरी –नाटक #रामशास्त्री –नाटक #धन अपुरे –नाटक #लोकनायक –नाटक #स्वामी –नाटक #वारसा –नाटक #तुझी वाट वेगळी –नाटक #पांगुळगाडा –नाटक #पांगुळगाडा –नाटक #गरुडझेप –नाटक #स्नेहधारा –नाटक #संचित -नाटक
Customer Reviews
  • Rating StarPratik Yetavadekar

    स्वामीकार रणजित देसाई यांच्या कथा ,कादंबरी ,नाटक या साहित्यप्रकाराव्यतिरिक्त ललित लेख या प्रकाराला साजेसे असलेले लेखन हाताळले गेले. ते म्हणजेच दैनिक सकाळ च्या कोल्हापूर आवृत्तीसाठी केले गेलेले *`कोरीव लेणी`* हे सदर त्या सदरात देसाईंनी सांगितलेल्या आठणी या शब्दबद्ध केल्या होत्या राम देशपांडे यांनी सलग तीन महिने हे सदर चालले. वाचकांच्या आग्रहाला बळी न पडता वृत्तपत्रीय सदर तीन महिन्यापेक्षा जास्त चालवता कामा नये या मतावर ठाम राहत `माझं श्रेय एवढंच` हा समारोपाचा लेख लिहून त्यांनी सदर लिहिणे बंद केलं यातून त्यांची साहित्याबद्दल श्रद्धेची भावना किती दृढ होती हे दिसून येते. चंद्र-सूर्याची भेट, ....आणि तानपुरा मस्त जुळला, देव दाराशी आला, समाधानाचा एक क्षण, तो बेचैनीचा दिवस, आणि मैफल अधुरी राहिली या प्रकारची अलंकारिक नावे लेखाला दिलेली असल्याने ते लेख वाचनीय च नव्हे चिरस्मरणीय झाले आहेत. आचार्य अत्रे, भाऊसाहेब खांडेकर, बालगंधर्व, शरद तळवलकर, कुमार गंधर्व, वसंतराव देशपांडे, डॉ, एस. राधाकृष्णन, कुसुमाग्रज, इंदिरा संत, यशवंतराव चव्हाण या नामवंत व्यक्तींच्या आठवणी बरोबर कोल्हापूर मधील गोकुळ हॉटेल मधल्या एका मेहतर व्यक्तीची आठवण ही शब्दबद्ध करून गुरुवर्य ती.वि.स.खांडेकर यांनी सांगितलेल्या बऱ्याच गोष्ठी त्यांनी शेवटपर्यंत कशा पाळल्या हे दिसून येते. बऱ्याच मैफिली साकार करायच्या होत्या.`छोट्या`पासून `मोठ्या`पर्यंत अनेकांनी त्यांच्या मनात घर केलं होतं स्नेहाच्या अतूट धाग्यांनी मन जखडलं होतं पण अचानक अघटित घडलं.मैफल अधुरी च राहिली. यातच स्वामीकार रणजित देसाईंच्या मैत्र किंवा नातं जपण्याच्या एका पैलूचे दर्शन घडते. ...Read more

  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    रणजित देसार्इंनी जागवलेल्या ऋणानुबंधांच्या गूढतरल भाव-स्मृती… रणजित देसाई यांनी अखेरच्या दिवसांत कोल्हापूरच्या दैनिक सकाळमध्ये कोरीव लेणी हे सदर लिहून, आपल्या अनेक स्नेहीसोबत्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. त्या व्यक्तिचित्रांचा हा संग्रह म्हणजे एकापरने रणजित देसाई यांच्या प्रतिभेचा अंतिम ललित आविष्कार. पुस्तकरूपात येणारे हे शेवटचेच लेखन. स्वा. सावरकर, आचार्य अत्रे, भालजी पेंढारकर, तात्यासाहेब शिरवाडकर, राजे देशमुख, सी. रामचंद्र, काशीनाथ घाणेकर, पुंडलिकजी कातगडे, प्राचार्य एम. आर. देसाई, शरद तळवलकर, यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब खर्डेकर, कुमार गंधर्व, बालगंधर्व, सुलोचना, हंसा वाडकर, डॉ. पिसुर्लेकर, बाळासाहेब देसाई, नरहर कुरुंदकर, भाऊसाहेब खांडेकर, बडे काही नाही’ म्हटल्यावर यशवंतराव म्हणतात, खोटं बोलू नको. माणसं ओळखणं ही अवघड गोष्ट. अनुभवानं मला ती जमली आहे. मी अशा समारंभात माझ्या माणसांना ओळख दाखवत नाही. चारचौघांत तुमच्यापाशी बोललो तर तर वशिल्याच्या कामासाठी लोकांचं लचांडे पाठीमागं लागतं... तर तू गैरसमज करून घेऊ नकोस.’’ रणजित देसाई यांचं विमान उशिरा आलं तर यशवंतराव अस्वस्थ झालेले दिसले. माधवीसाठी त्यांनी वेणूतार्इंच्या ड्रेसिंग टेबलवर प्रसाधनांची जणू जत्राच तयार ठेवली होती. माधवी मासा चांगला करते म्हटल्यावर साहेबांनी मासा दहा किलो पापलेट आणून ठेवले. ‘इथं कोणताही पदार्थ एकट्यानं खाल्ला जात नाही. बंगल्यातील सर्वांसाठी तो असतो. जेवताना ते सांगतात, ‘मला माशांची भयंकर भीती वाटते. काटे काढून दिले तरच खाईन.’’ भाऊसाहेब खांडेकरांना आचार्य अत्रे यांच्याकडे घेऊन जाण्याचे रणजितने कबूल केले, भाऊसाहेब टाळाटाळ करीत राहिले. सहाची वेळ ठरली असताना आठ वाजता अत्र्यांकडे गेले. ‘आज आमची शिवशक्ती धन्य झाली.’ म्हणत अत्र्यांनी हार घालून बाळासाहेब देसाई, नरहर कुरुंदकर, भाऊसाहेब खांडेकर, बडे गुलामअली खाँ, इंदिरा संत, वसंत देशपांडे अशा साहित्य-संगीत-चित्रपट शिक्षण प्रकाशन क्षेत्रातील मान्यवरांशी आलेल्या कमी अधिक सौहार्दपूर्ण संबंधांच्या स्मृती जागवणाऱ्या या छोट्या-छोट्या लेखांतून रणजित देसाई यांच्या सौजन्यशील, समंजस, कलासक्त, कृतज्ञ भावविश्वाचे नेटके दर्शन घडते. ‘स्वामी’ची प्रत देण्यासाठी रणजित देसाई स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भेटीला मुंबईला जातात. पुस्तक चाळून ते चार दिवसांनी पुन्हा या म्हणतात. स्वामी वाचली, आवडली असे सांगतात, मात्र पुढे पण भाषा, परदेशी भाषेचा आधार घ्यायची जरूरी होती का?’ अशी पृच्छा करून ‘आपली मराठी भाषा समृद्ध आहे, भाषा समृद्ध आहे, भाषा शुद्ध करा. तुमची कादंबरी चांगली आहे.’ असे बजावतात. प्रकृतीच्या विकलांग अवस्थेतही सावरकरांनी आपली कादंबरी वाचून दोष दाखवावे. याचेच अप्रूप रणजित देसाई यांचे मन भरून येण्यास पुरेसे ठरते. यशवंतराव चव्हाण एका कार्यक्रमाच्या वेळी रणजित देसाई दिसूनही कार्यकर्त्यांच्या गराड्यात त्यांना भेटू शकत नाहीत. ते डोंगरे यांना पाठवून सर्किट हाऊसवर येण्याचा निरोप देतात. रणजितचे हात पकडून बेडरूममध्ये नेतात. ‘तू रागावला असशील. गैरसमज करून घेतला असशील नाही?’ विचारतात. ‘तसं अत्र्यांकडे गेले. ‘आज आमची शिवशक्ती धन्य झाली’ म्हणत अत्र्यांनी हार घालून स्वागत केले. अत्रे म्हणाले, भाऊ तुमच्या अंगावर डाग असले तरी तुमचं मन गंगेइतकं निर्मळ आहे.’ भाऊंनी म्हटले. आज जो संयुक्त महाराष्ट्र होतोय त्याचे श्रेय तुम्हांला आहे. जे मनात आहे ते स्पष्ट बोलण्याचे धाडस केवळ तुमच्यात आहे. ‘श्रेष्ठ नाटककारांच्या पंक्तींत अत्रे बसू शकत नाहीत, ‘हा कोडफुटक्या खांडेकर काय सांगतो’ या जुन्या जखमांची भळभळ त्या भेटीने दूर झाली. तात्यासाहेब शिरवाडकर न कळवता अचानक कोवाडला येतात. ‘स्फूर्ती ही स्वयंस्फूर्तीच हवी. जेव्हा सुचेल तेव्हा लिही, उगीच भरडण्यात अर्थ नसतो, ‘असे ते सांगतात. ‘आयुष्यातल्या एकाकीपणाबद्दल शोक करू नको, त्याचा दोष कुणाला देऊ नकोस. कल्पित शोकामागे धावण्यात अर्थ नाही.’ असाही सल्ला देतात. हा माणुसकीचा जिव्हाळा रणजितना भाव्याकुळ करून टाकतो. अशा अनेक हृदयांतरीच्या स्नेहाच्या धारा रणजित देसार्इंनी खुल्या केलेल्या आहेत, म्हणून त्यांचे दर्शन प्रेरणादायी व कृतज्ञतेचे ठरते. -शंकर सारडा ...Read more

  • Rating StarDAINIK LOKSATTA 20-06-1999

    स्मरणचित्रांचा हृद्य अल्बम… ‘तसं पाहिलं तर त्याच्या अंतरंगाचा ठाव घेणं कधीच कुणाला जमलं नाही. किनाऱ्यावर सागराच्या लाटा फेसाळत येतात, गर्जतात. तेवढंच का कलावंतांचं रूप असतं? त्यापेक्षाही आत कुठे तरी अथांग सागर पसरलेला असतो. त्याला क्वचित उधाण येतं. ण त्याच्या आत खोलवर चाललेली ही खळबळ कितीजणांना कळते?’ काशिनाथ घाणेकरांच्या संदर्भात रणजित देसाई यांनी हे लिहिले असले तरी ‘स्नेहधारा’ या त्यांच्या पुस्तकामागेही ‘खळबळ’ टिपण्याचीच प्रेरणा आहे असे मत सहज बनून जाते. अर्थात केवळ कलावंताच्या मनापुरतीच मर्यादा आखून न घेता सामान्यांच्या मनांचीही स्पंदने टिपण्याचे काम त्यांनी येथे भावनोत्कट शैलीत केले आहे. संपादक पांडुरंग कुंभार यांच्या म्हणण्यानुसार जेवढे लेख ते जमवू शकले त्या लेखांचा हा संग्रह आहे. आचार्य अत्रे आणि गुरू भाऊसाहेब खांडेकर यांच्या समेटाने पहिला लेख सुरू होतो आणि वसंतराव देशपांडे यांच्या अधुऱ्या मैफलीच्या व्यथेने पुस्तक संपते. आठवणींच्या माध्यमातून माणसाच्या माणुसपणाचे अंतरंग उघडे करण्याचे कसब देसाई यांना साधले आहे. आपली ‘स्वामी’ कादंबरी जेव्हा बक्षीसपात्र ठरली तेव्हा त्यांच्या मनाची झालेली अवस्था एवढाच काय तो वैयक्तिक उल्लेख बाकी सारे इतरांच्या अंतरंगात घुसून मर्मभेदी क्षण टिपणे! तात्यासाहेब शिरवाडकर असो अथवा कुमार गंधर्व यांच्या आठवणी असो, देसार्इंचा नम्रपणा त्यात उठून दिसतो. कुमार गंधर्व देसार्इंच्या घरी येऊन चार-पाच भजनं गातात हा केवळ कलावंतांच्या लहरीचा भाग नसतो तर स्नेहबंधाने जुळवून आणलेला योग असतो. भालजी पेंढारकरांविषयी लिहिताना देसाई कमालीच्या भावुकपणानं लिहितात. राजकारणाच्या काट्यातही साहित्याचे गुलाब बाळगणारे यशवंतराव चव्हाण देसाईच्या लेखणीतून समर्थपणे साकारत जातात. यातील काही लेख तर भावनांना हात घालतात. मात्र साहित्याच्या मननाचा, चिंतनाचा आनंदही त्यातून मिळतो हे देसार्इंच्या लिखाणाचे वैशिष्ट्य, त्यामुळे सगळ्या आठवणी हृद्य झाल्या आहेतच, शिवाय वेगवेगळे संदर्भ मिळत गेल्याने इतिहासाचे एक आकलनही लेख वाचताना होत राहते. सावरकरांनी आपली ‘स्वामी’ कादंबरी वाचून प्रतिक्रिया नोंदवली याचा देसार्इंना मनस्वी आनंद झालाय. त्याचप्रमाणे पुरस्कार मिळाल्यावर औषधांच्या पैशांसाठी पुरस्काराची रक्कम विचारणाऱ्या हंसाबाई वाडकर तर अधिकच चटका लावून जातात. पुंडलिकजी कातगडे या खऱ्या-खुऱ्या स्वयंसेवकाचे स्मरणचित्र असेच रेंगाळत राहते. सनईचा सूर ऐकताच गाडीतून उतरून नुकत्याच लग्न झालेल्या जोडप्याला आशीर्वाद देऊन मनाचा आनंद मिळवणारे बाळासाहेब देसाई यांच्या सोबतीने निव्र्याज मनाने चांगल्याचे कौतुक करणाऱ्या अभिनेत्री सुलोचना यांचेही स्मरणचित्र छान रेखाटले गेले आहे. तसेच शाहीर गव्हाणकरांच्या स्नेहाचे दर्शन हा आणखी एक मैत्रीचा पीळ. सी. रामचंद्र असो की लालजी गोखले असो, कलावंतांच्या हृदयाचे कप्पे रणजीत देसाई मोठ्या कलात्मकतेने उघडे करतात. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more