* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: SNEHADHARA
  • Availability : Available
  • ISBN : 9788171616947
  • Edition : 2
  • Publishing Year : APRIL 1997
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 152
  • Language : MARATHI
  • Category : LITERATURE
  • Available in Combos :RANJEET DESAI COMBO SET- 42 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
SNEHDHARA: THE FINAL, PLEASANT MANIFESTATION OF THE DIVINE TALENT OF THE LATE RANJIT DESAI! A PERSON’S LIFE IS SHAPED BY HIS FATE, HIS CHARACTER AND HIS CIRCUMSTANCE. IN THIS COLLECTION OF CHARACTERSKETCHES – HIS LAST SUCH WORK – RANJIT DESAI GRATEFULLY REMINISCES ABOUT THE DIFFERENT HUMAN BEINGS ­– SIMPLE BEINGS AS WELL AS GREAT ONES – THAT TOUCHED HIS LIFE AND WITH WHOM HE DEVELOPED SOME SORT OF BOND. THIS IS NOT A CONTINUOUS AUTOBIOGRAPHY. AS IT HAPPENED, DIFFERENT MINOR OCCASIONS HAVE SERVED TO TRIGGER RECOLLECTION OF INTENSE MEMORIES OF CERTAIN PEOPLE. THIS IS AN EMOTIONAL RECOLLECTION OF EACH SUCH INDIVIDUAL AND THE EVENTS ASSOCIATED WITH HIM, WRITTEN BY A SENSITIVE PEN. THE CHARACTERS DESCRIBED HERE ARE NOT ‘COMPLETE’ BEINGS. THESE MEMOIRS AND SKETCHES TELL US ABOUT THE ENCOUNTERS DESAI HAD WITH EACH OF THESE INDIVIDUALS AND THE WAY THESE ENCOUNTERS MADE A LASTING IMPRESSION ON HIM. OUR JOY AT PRESENTING THIS COLLECTION WRITTEN BY THE LATE RANJIT DESAI TO THE READER IS TINGED WITH SADNESS…BECAUSE THIS IS THE LAST OF HIS UNPUBLISHED WORK THAT WE ARE PRESENTING IN BOOK FORM…
कै. रणजित देसाई यांच्या दैवी प्रतिभेचा हा प्रसन्न; परंतु अखेरचा ललिताविष्कार : स्नेहधारा ! दैव, व्यक्तित्व आणि परिस्थिती या तिन्हीच्या क्रियाप्रतिक्रियांमधून जीवन घडलं जात असताना ज्या ज्या छोट्यामोठ्या व्यक्तीशी त्यांचा ऋणानुबंध जडला, त्या सर्वांच कृतज्ञ स्मरण श्री. रणजित देसाई यांनी आपल्या या अखेरच्या व्यक्तिचित्रांच्या संग्रहात केलं आहे. हे सलग आत्मकथन नव्हे. काही तरी तात्कालिक निमित्त्त घडलं आणि त्या त्या व्यक्तीचं स्मरण उत्कटतेनं झालं. त्या व्यक्तीशी संबंधित प्रसंगांची आणि व्यक्तीचं हे हळुवार लेखणीनं केलेलं भावचित्रण आहे. या व्यक्तिरेखाही तशा समग्र, परिपूर्ण नाहीत. त्या व्यक्तीशी आलेला श्री. देसार्इंचा संबंध आणि त्या संबंधाची प्रतिक्रिया म्हणून त्यांच्या मनावर उमटलेला चिरकालिक स्वरूपाचा संस्कार यांनाच या छोट्या स्मरणसाखळीत प्राधान्य दिलं गेलं आहे. कै. रणजित देसार्इंच्या वाचकांच्या हाती त्यांची ही अखेरची ललितकृती देताना आम्हांला दु:खमिश्रित आनंद होत आहे. दु:ख अशासाठी, की श्री. देसार्इंचं हे अखेरचं अप्रकाशित असं साहित्य आम्ही ग्रंथरूपानं प्रसिद्ध करीत आहोत...
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#8 APRIL # SWAMI # SHRIMAN YOGI # RADHEYA # MAZA GAON # ABHOGI # BARI # PRATIKSHA # SAMIDHA # PAVANKHIND # LAKSHYAVEDH # SHEKARA # MORPANKHI SAVALYA # SANKET # ASHADH # MADHUMATEE # MEKH MOGARI # KATAL # ROOPMAHAL # MEGH # PRAPAT # VAISHAKH # KAMODINI # GANDHALI # BABULMORA # AALEKH # KANCHANMRUG # SHRIMANYOGI (NATAK)# SANGEET TANSEN (NATAK)# SAVALI UNHACHI (NATAK)# HE BANDH RESHMACHE (NATAK)# PANKH JAHALE VAIRI (NATAK)# DHAN APURE (NATAK)# RAMSHASTRI (NATAK)# LOKNAYAK (NATAK)# SWAMI (NATAK)# VAARSA (NATAK)# TUZI VAT VEGALI (NATAK)# PANGULGADA (NATAK)# GARUDZEP (NATAK)# SNEHADHARA (NATAK)# (NATAK)# SANCHIT (NATAK) #८ एप्रिल #स्वामी (राज्य पुरस्कार १९६२,ह.ना. आपटे पुरस्कार १९६३) #साहित्य अकादमी पुरस्कार १९६४) #श्रीमान योगी #राजा रविवर्मा #राधेय #माझा गाव #अभोगी #बारी #प्रतिक्षा #समिधा #पावनखिंड #लक्ष्यवेध #शेकरा #मोरपंखी सावल्या #संकेत #आषाढ #मधुमती #मेख मोगरी #कातळ #रुपमहाल #रुपमहाल #मेघ #प्रपात #वैशाख #कमोदिनी #गंधाली #बाबुलमोरा #आलेख #कांचनमृग #श्रीमानयोगी-नाटक #संगीत तानसेन-नाटक #सावली उन्हाची –नाटक #हे बंध रेशमाचे –नाटक #पंख जाहले वैरी –नाटक #रामशास्त्री –नाटक #धन अपुरे –नाटक #लोकनायक –नाटक #स्वामी –नाटक #वारसा –नाटक #तुझी वाट वेगळी –नाटक #पांगुळगाडा –नाटक #पांगुळगाडा –नाटक #गरुडझेप –नाटक #स्नेहधारा –नाटक #संचित -नाटक
Customer Reviews
  • Rating StarPratik Yetavadekar

    स्वामीकार रणजित देसाई यांच्या कथा ,कादंबरी ,नाटक या साहित्यप्रकाराव्यतिरिक्त ललित लेख या प्रकाराला साजेसे असलेले लेखन हाताळले गेले. ते म्हणजेच दैनिक सकाळ च्या कोल्हापूर आवृत्तीसाठी केले गेलेले *`कोरीव लेणी`* हे सदर त्या सदरात देसाईंनी सांगितलेल्या आठणी या शब्दबद्ध केल्या होत्या राम देशपांडे यांनी सलग तीन महिने हे सदर चालले. वाचकांच्या आग्रहाला बळी न पडता वृत्तपत्रीय सदर तीन महिन्यापेक्षा जास्त चालवता कामा नये या मतावर ठाम राहत `माझं श्रेय एवढंच` हा समारोपाचा लेख लिहून त्यांनी सदर लिहिणे बंद केलं यातून त्यांची साहित्याबद्दल श्रद्धेची भावना किती दृढ होती हे दिसून येते. चंद्र-सूर्याची भेट, ....आणि तानपुरा मस्त जुळला, देव दाराशी आला, समाधानाचा एक क्षण, तो बेचैनीचा दिवस, आणि मैफल अधुरी राहिली या प्रकारची अलंकारिक नावे लेखाला दिलेली असल्याने ते लेख वाचनीय च नव्हे चिरस्मरणीय झाले आहेत. आचार्य अत्रे, भाऊसाहेब खांडेकर, बालगंधर्व, शरद तळवलकर, कुमार गंधर्व, वसंतराव देशपांडे, डॉ, एस. राधाकृष्णन, कुसुमाग्रज, इंदिरा संत, यशवंतराव चव्हाण या नामवंत व्यक्तींच्या आठवणी बरोबर कोल्हापूर मधील गोकुळ हॉटेल मधल्या एका मेहतर व्यक्तीची आठवण ही शब्दबद्ध करून गुरुवर्य ती.वि.स.खांडेकर यांनी सांगितलेल्या बऱ्याच गोष्ठी त्यांनी शेवटपर्यंत कशा पाळल्या हे दिसून येते. बऱ्याच मैफिली साकार करायच्या होत्या.`छोट्या`पासून `मोठ्या`पर्यंत अनेकांनी त्यांच्या मनात घर केलं होतं स्नेहाच्या अतूट धाग्यांनी मन जखडलं होतं पण अचानक अघटित घडलं.मैफल अधुरी च राहिली. यातच स्वामीकार रणजित देसाईंच्या मैत्र किंवा नातं जपण्याच्या एका पैलूचे दर्शन घडते. ...Read more

  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    रणजित देसार्इंनी जागवलेल्या ऋणानुबंधांच्या गूढतरल भाव-स्मृती… रणजित देसाई यांनी अखेरच्या दिवसांत कोल्हापूरच्या दैनिक सकाळमध्ये कोरीव लेणी हे सदर लिहून, आपल्या अनेक स्नेहीसोबत्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. त्या व्यक्तिचित्रांचा हा संग्रह म्हणजे एकापरने रणजित देसाई यांच्या प्रतिभेचा अंतिम ललित आविष्कार. पुस्तकरूपात येणारे हे शेवटचेच लेखन. स्वा. सावरकर, आचार्य अत्रे, भालजी पेंढारकर, तात्यासाहेब शिरवाडकर, राजे देशमुख, सी. रामचंद्र, काशीनाथ घाणेकर, पुंडलिकजी कातगडे, प्राचार्य एम. आर. देसाई, शरद तळवलकर, यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब खर्डेकर, कुमार गंधर्व, बालगंधर्व, सुलोचना, हंसा वाडकर, डॉ. पिसुर्लेकर, बाळासाहेब देसाई, नरहर कुरुंदकर, भाऊसाहेब खांडेकर, बडे काही नाही’ म्हटल्यावर यशवंतराव म्हणतात, खोटं बोलू नको. माणसं ओळखणं ही अवघड गोष्ट. अनुभवानं मला ती जमली आहे. मी अशा समारंभात माझ्या माणसांना ओळख दाखवत नाही. चारचौघांत तुमच्यापाशी बोललो तर तर वशिल्याच्या कामासाठी लोकांचं लचांडे पाठीमागं लागतं... तर तू गैरसमज करून घेऊ नकोस.’’ रणजित देसाई यांचं विमान उशिरा आलं तर यशवंतराव अस्वस्थ झालेले दिसले. माधवीसाठी त्यांनी वेणूतार्इंच्या ड्रेसिंग टेबलवर प्रसाधनांची जणू जत्राच तयार ठेवली होती. माधवी मासा चांगला करते म्हटल्यावर साहेबांनी मासा दहा किलो पापलेट आणून ठेवले. ‘इथं कोणताही पदार्थ एकट्यानं खाल्ला जात नाही. बंगल्यातील सर्वांसाठी तो असतो. जेवताना ते सांगतात, ‘मला माशांची भयंकर भीती वाटते. काटे काढून दिले तरच खाईन.’’ भाऊसाहेब खांडेकरांना आचार्य अत्रे यांच्याकडे घेऊन जाण्याचे रणजितने कबूल केले, भाऊसाहेब टाळाटाळ करीत राहिले. सहाची वेळ ठरली असताना आठ वाजता अत्र्यांकडे गेले. ‘आज आमची शिवशक्ती धन्य झाली.’ म्हणत अत्र्यांनी हार घालून बाळासाहेब देसाई, नरहर कुरुंदकर, भाऊसाहेब खांडेकर, बडे गुलामअली खाँ, इंदिरा संत, वसंत देशपांडे अशा साहित्य-संगीत-चित्रपट शिक्षण प्रकाशन क्षेत्रातील मान्यवरांशी आलेल्या कमी अधिक सौहार्दपूर्ण संबंधांच्या स्मृती जागवणाऱ्या या छोट्या-छोट्या लेखांतून रणजित देसाई यांच्या सौजन्यशील, समंजस, कलासक्त, कृतज्ञ भावविश्वाचे नेटके दर्शन घडते. ‘स्वामी’ची प्रत देण्यासाठी रणजित देसाई स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भेटीला मुंबईला जातात. पुस्तक चाळून ते चार दिवसांनी पुन्हा या म्हणतात. स्वामी वाचली, आवडली असे सांगतात, मात्र पुढे पण भाषा, परदेशी भाषेचा आधार घ्यायची जरूरी होती का?’ अशी पृच्छा करून ‘आपली मराठी भाषा समृद्ध आहे, भाषा समृद्ध आहे, भाषा शुद्ध करा. तुमची कादंबरी चांगली आहे.’ असे बजावतात. प्रकृतीच्या विकलांग अवस्थेतही सावरकरांनी आपली कादंबरी वाचून दोष दाखवावे. याचेच अप्रूप रणजित देसाई यांचे मन भरून येण्यास पुरेसे ठरते. यशवंतराव चव्हाण एका कार्यक्रमाच्या वेळी रणजित देसाई दिसूनही कार्यकर्त्यांच्या गराड्यात त्यांना भेटू शकत नाहीत. ते डोंगरे यांना पाठवून सर्किट हाऊसवर येण्याचा निरोप देतात. रणजितचे हात पकडून बेडरूममध्ये नेतात. ‘तू रागावला असशील. गैरसमज करून घेतला असशील नाही?’ विचारतात. ‘तसं अत्र्यांकडे गेले. ‘आज आमची शिवशक्ती धन्य झाली’ म्हणत अत्र्यांनी हार घालून स्वागत केले. अत्रे म्हणाले, भाऊ तुमच्या अंगावर डाग असले तरी तुमचं मन गंगेइतकं निर्मळ आहे.’ भाऊंनी म्हटले. आज जो संयुक्त महाराष्ट्र होतोय त्याचे श्रेय तुम्हांला आहे. जे मनात आहे ते स्पष्ट बोलण्याचे धाडस केवळ तुमच्यात आहे. ‘श्रेष्ठ नाटककारांच्या पंक्तींत अत्रे बसू शकत नाहीत, ‘हा कोडफुटक्या खांडेकर काय सांगतो’ या जुन्या जखमांची भळभळ त्या भेटीने दूर झाली. तात्यासाहेब शिरवाडकर न कळवता अचानक कोवाडला येतात. ‘स्फूर्ती ही स्वयंस्फूर्तीच हवी. जेव्हा सुचेल तेव्हा लिही, उगीच भरडण्यात अर्थ नसतो, ‘असे ते सांगतात. ‘आयुष्यातल्या एकाकीपणाबद्दल शोक करू नको, त्याचा दोष कुणाला देऊ नकोस. कल्पित शोकामागे धावण्यात अर्थ नाही.’ असाही सल्ला देतात. हा माणुसकीचा जिव्हाळा रणजितना भाव्याकुळ करून टाकतो. अशा अनेक हृदयांतरीच्या स्नेहाच्या धारा रणजित देसार्इंनी खुल्या केलेल्या आहेत, म्हणून त्यांचे दर्शन प्रेरणादायी व कृतज्ञतेचे ठरते. -शंकर सारडा ...Read more

  • Rating StarDAINIK LOKSATTA 20-06-1999

    स्मरणचित्रांचा हृद्य अल्बम… ‘तसं पाहिलं तर त्याच्या अंतरंगाचा ठाव घेणं कधीच कुणाला जमलं नाही. किनाऱ्यावर सागराच्या लाटा फेसाळत येतात, गर्जतात. तेवढंच का कलावंतांचं रूप असतं? त्यापेक्षाही आत कुठे तरी अथांग सागर पसरलेला असतो. त्याला क्वचित उधाण येतं. ण त्याच्या आत खोलवर चाललेली ही खळबळ कितीजणांना कळते?’ काशिनाथ घाणेकरांच्या संदर्भात रणजित देसाई यांनी हे लिहिले असले तरी ‘स्नेहधारा’ या त्यांच्या पुस्तकामागेही ‘खळबळ’ टिपण्याचीच प्रेरणा आहे असे मत सहज बनून जाते. अर्थात केवळ कलावंताच्या मनापुरतीच मर्यादा आखून न घेता सामान्यांच्या मनांचीही स्पंदने टिपण्याचे काम त्यांनी येथे भावनोत्कट शैलीत केले आहे. संपादक पांडुरंग कुंभार यांच्या म्हणण्यानुसार जेवढे लेख ते जमवू शकले त्या लेखांचा हा संग्रह आहे. आचार्य अत्रे आणि गुरू भाऊसाहेब खांडेकर यांच्या समेटाने पहिला लेख सुरू होतो आणि वसंतराव देशपांडे यांच्या अधुऱ्या मैफलीच्या व्यथेने पुस्तक संपते. आठवणींच्या माध्यमातून माणसाच्या माणुसपणाचे अंतरंग उघडे करण्याचे कसब देसाई यांना साधले आहे. आपली ‘स्वामी’ कादंबरी जेव्हा बक्षीसपात्र ठरली तेव्हा त्यांच्या मनाची झालेली अवस्था एवढाच काय तो वैयक्तिक उल्लेख बाकी सारे इतरांच्या अंतरंगात घुसून मर्मभेदी क्षण टिपणे! तात्यासाहेब शिरवाडकर असो अथवा कुमार गंधर्व यांच्या आठवणी असो, देसार्इंचा नम्रपणा त्यात उठून दिसतो. कुमार गंधर्व देसार्इंच्या घरी येऊन चार-पाच भजनं गातात हा केवळ कलावंतांच्या लहरीचा भाग नसतो तर स्नेहबंधाने जुळवून आणलेला योग असतो. भालजी पेंढारकरांविषयी लिहिताना देसाई कमालीच्या भावुकपणानं लिहितात. राजकारणाच्या काट्यातही साहित्याचे गुलाब बाळगणारे यशवंतराव चव्हाण देसाईच्या लेखणीतून समर्थपणे साकारत जातात. यातील काही लेख तर भावनांना हात घालतात. मात्र साहित्याच्या मननाचा, चिंतनाचा आनंदही त्यातून मिळतो हे देसार्इंच्या लिखाणाचे वैशिष्ट्य, त्यामुळे सगळ्या आठवणी हृद्य झाल्या आहेतच, शिवाय वेगवेगळे संदर्भ मिळत गेल्याने इतिहासाचे एक आकलनही लेख वाचताना होत राहते. सावरकरांनी आपली ‘स्वामी’ कादंबरी वाचून प्रतिक्रिया नोंदवली याचा देसार्इंना मनस्वी आनंद झालाय. त्याचप्रमाणे पुरस्कार मिळाल्यावर औषधांच्या पैशांसाठी पुरस्काराची रक्कम विचारणाऱ्या हंसाबाई वाडकर तर अधिकच चटका लावून जातात. पुंडलिकजी कातगडे या खऱ्या-खुऱ्या स्वयंसेवकाचे स्मरणचित्र असेच रेंगाळत राहते. सनईचा सूर ऐकताच गाडीतून उतरून नुकत्याच लग्न झालेल्या जोडप्याला आशीर्वाद देऊन मनाचा आनंद मिळवणारे बाळासाहेब देसाई यांच्या सोबतीने निव्र्याज मनाने चांगल्याचे कौतुक करणाऱ्या अभिनेत्री सुलोचना यांचेही स्मरणचित्र छान रेखाटले गेले आहे. तसेच शाहीर गव्हाणकरांच्या स्नेहाचे दर्शन हा आणखी एक मैत्रीचा पीळ. सी. रामचंद्र असो की लालजी गोखले असो, कलावंतांच्या हृदयाचे कप्पे रणजीत देसाई मोठ्या कलात्मकतेने उघडे करतात. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MI GALIB BOLTOY
MI GALIB BOLTOY by SHABBIR ROMANI Rating Star
लोकमत २५.९.२०२३

शब्बीर रोमानी हे व्यवसायाने वकील. मातृभाषा अर्थात उर्दू आणि शिक्षण मराठी माध्यमातून झालेले. २०१८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या उर्दू पुस्तकाला, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालच्या साहित्य अकादमी केंद्राचे पुरस्कार लाभले आहेत. आता मिर्झागालिबवरचे नवे पुस्तक, `मी गालिब बोलतोय...!` लक्ष वेधून घेत आहे. गालिबच्या एका शेरची पहिली ओळ घेऊन सांगायचे झाल्यास, जिक्र गालिबचा आणि खूबसूरत बयान लेखकाचे असे या पुरस्काराबद्दल म्हणता येईल. मिर्जा असदुल्ला खां,`गालिब` या श्रेष्ठ शायरची शायरी, त्याचे पत्रलेखन, चरित्र यावर आजवर शेकडो पुस्तक प्रसिद्ध आहेत. लेखकाने प्रस्तावनेत नमूद केल्यानुसार गालिबवर अनेक लेखकांनी लिहिले आहे. मराठी, हिंदी-उर्दू लेखकांची ते तपशील पाहून आचंबा वाटतो. शिवाय शब्बीर रोमानी यांनी इथे आपल्या लेखनाचे प्रयोजन सांगताना म्हटले आहे, कि गालिबबद्दल अनेक उलट-सुलट प्रकारच्या कहाण्या, विनोद, (कसलेही शेर गालिबच्या नावाने सांगत राहणे) प्रचलित आहेत; त्यामुळे गालिबची कथा, त्याच्या पत्रांमधल्या मनोरंजक गप्पा-गोष्टी आणि त्याच्याशी निगडित आठवणी हे सगळं साध्या सोप्या भाषेत लिहिण्याचा प्रयत्न म्हणजे हे पुस्तक. सर्वसामान्य माणसाच्या जगण्यातल्या सर्व भावछटा गालिबच्या काव्यातून दिसत असतात. पुस्तक वाचताना गालिबची प्रकृती, त्याची विनोद बुद्धी, संवेदनशील वृत्ती हे आपल्याला जाणवत राहते, आणि लेखकाची तळमळसुद्धा. या पुस्तकाचे वैशिष्टय म्हणजे, मोठी प्रकरण टाळून किस्से सांगावेत अशी रचना. शिवाय लेखकाची साधी-सरळ भाषा, यामुळे शायरीची आणि गालिबबद्दलची सर्वसाधारण माहिती आणि कुतुहूल असणाऱ्या वाचकांना हे पुस्तक रंजक वाटेल. सहसा गालिबचे गाजलेले शेर, किस्से हे आपल्या वाचनात असतात. या पुस्तकात गालिबचे अनेक दुर्मिळ शेर, शिवाय फारसी रचनाही या पुस्तकात समाविष्ट असल्याने त्याला एक संदर्भ ग्रंथाचेही स्वरूप आलेले आहे. गालिबला आंबे फार आवडायचे, `मिर्झा गालिब` या गाजलेल्या चित्रपटातला तो प्रसंग आजही लक्षात आहे. आंबे खाताना एक मित्र गालिबला तुच्छतेने म्हणतो, `आम तो गधेभी नही खाते!` त्यावर गालिबने त्वरित उत्तर देतो. `सिर्फ गधेही नाही खाते!` शब्बीर रोमानी यांनी हा प्रसंग व विनोद म्हणून सांगितला नाही, तर त्याचे तपशिलाने वर्णन तर केलेच शिवाय आंब्यावरची गालिबची मोठी गजल त्यांनी दिलेली असल्याने त्या किश्श्याला एक गांभीर्य आलेले आहे. असाच एक किस्सा, ते कलकत्त्याला असताना साध्या चिकणी-सुपारीवर गालिबला कुणी छेडले होते, यावर तुमची शायरी होऊन जाऊ द्या! असे आवाहन केले. या सुपारीच्या दिसण्या-असण्यावरच्या अफलातून शायरीची भली मोठी झलकच गालिबने पेश केली! गालिबच्या एक महत्वाचा शेर आहे. जिक्र ऊस परी-वंश का और फार बयां अपना बन गया रिकीब आखिर, था जो राजदां अपना त्या परिच्या सौंदर्याचे वर्णन आणि तेही माझ्या भाषेतून, माझ्याकडून ऐकले आणि माझा जवळचा असा मित्र आता या प्रेमाच्या नात्यात माझा प्रतिस्पर्धी झाला (आता तो तिच्यावर प्रेम करायला लागला) कलकत्त्याला गालिब दीडेएक वर्ष राहिला होता. तिथल्या धनिकांनी मुशायरे, मुजरे आयोजित केलेले असायचे, गालिबचा तिथे सन्मानही व्हायचा. गालिबने या बद्दल फार जिव्हाळ्याने लिहिले आहे. या मुशायऱ्यामध्ये गालिबचे फारसीचे काव्यवाचन ऐकून फारसी भाषेचे तज्ञ त्याच्यावर नाराज झाल्याची आठवण आहे! गालिबच्या तोंडून फारसीचे कौतुक ऐकून लोकांनी आक्षेप घेतला! गालिब हा आपल्या दुःख, विवंचनेवर हसणारा अद्भुत असा कलावंत होता. हा शेर वाचल्यावर आपल्याला मुन्शी प्रेमचंद यांच्या `पूस कि रात` मधला हलकू आठवतो! मिर्झा गालिबच्या कुतुहूल असणाऱ्या वाचकांना हा संग्रह आवडण्यासारखाच आहे. लेखनातल्या भाषिक काही त्रुटी वगळल्यास, गालिबचे किस्से, त्याची शायरी हे सगळे रोचक आहे. ...Read more

MRUTYUNJAYEE
MRUTYUNJAYEE by RATNAKAR MATKARI Rating Star
पुस्तकप्रेमी

मीना कश्यप शाह *मृत्युंजयी* भयकथा हा रत्नाकर मतकरींच्या लेखनाचा हातखंडा. मी दहावीच्या सुट्टीत असताना भयकथा वाचायला सुरुवात केली आणि त्यांनी मला पुरात झपाटून टाकलं होतं. ही पुस्तकं असायचीही सुटसुटीत जाडीची. त्यामुळे जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी पुस्तक लगणाऱ्या मला सगळीकडे ती घेऊन जात येत असत. क्लास मध्ये लवकर पोहोचले - वाच पुस्तक, बससाठी उभी आहे, वाच पुस्तक; झोप येत नाही, वाच (हे बहुदा चक्राकार रित्या सुरु राहायचं, झोप नाही म्हणून वाचायचं आणि वाचत असायचे म्हणून झोप नाही... त्या वयात असं सगळं चालायचं - लहानपण देगा देवा...) मृत्युंजयी सुरु केली तेव्हा आधीच खेकडा, रंगांधळा वाचून झालं होतं. अजूनही एक संपवलं होतं, पण नाव नाही आठवत (बहुतेक कबंध). त्या पार्श्वभूमीवर मृत्युंजयी फार आवडलं नाही, आणि खरं तर त्यामुळे रत्नाकर मतकरींच्या भयकथा वाचणं थांबलं. अलीकडेच हे इ-बुक मिळालं किंडल वर, पुन्हा वाचलं - आतासुद्धा शेवटच्या परिच्छेदात काय वळण मिळतं त्याची उत्सुकता होती, पण एकूणच माझा patience खूपच कमी झालाय त्यामुळे skip reading, quick reading करत पुस्तक पटकन वाचून संपलं. मृत्यू, अखेर, शेवट ही भावना प्रत्येकासाठी भीतीदायकच. त्या भीतीवर बेतलेल्या कथा ह्या संग्रहात आहेत. अतिमानवीय, फँटसी, भुताटकी अशा धक्कातंत्राचा उपयोग अनेक लेखक करतात. पण मतकरीचं वैशिष्ठय असं, की ते जळमटं सारखी कथा लिहून जातात. मृत्युंजयी मधील कथांमध्ये मृत्यूची अनेक रूपं दिसतात, कथा जिवंत माणसांच्या - पण मृत्यूची चाहूल, त्याची भीती, कधी त्याचं हवेहवेपण, कधी त्याच्याकडे आपणहून जाणे, अशा अनेक रंगढंगांनी मतकरी गूढता कायम ठेवतात. ह्या पुस्तकातील, मृत्यू अवतीभवती असलेल्या प्रत्येक कथेत, आपणा सर्वांना नक्कीच सुप्त आकर्षण वाटत असलेल्या अनेक गूढ गोष्टी येतातच... मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी करण्याची अतिमानवीय साधना... स्त्री-पुरुषातील शारीरिक आणि मानसिक ओढ... पूर्वी केलेल्या चुका आणि त्याबद्दलचा सल... जुलमाचा प्रतिशोध... अतिमानवीय शक्तींनी झपाटणे... भूतबाधा, भूतांशी गाठभेट... मृत्यूच्या अनेकविध तऱ्हा... मानसिक संतुलन ढळणे... आणि तत्सम. ह्या कथाप्रकारात महत्वाचं असतं, ते शेवटच्या काही वाक्यांमधे कथेला दिलेलं वळण आणि त्यामुळे वाचकाला बसलेला धक्का. रत्नाकर मतकरींच्या गूढकथा म्हणूनच खूप प्रभावी ठरतात. आता मात्र हे धक्का तंत्र बऱ्याच जागी पाहायला मिळतं - OTT वरच्या अनेक चित्रपट किंवा नाट्यमालांमधे हे तंत्र कथाकार वापरतात, आणि लोकांना हे पहायला खरंच खूप आवडतं, म्हणूनच त्या प्रसिद्ध होतात. अलीकडचं उदाहरण "वाळवी" चित्रपट! मृत्युंजयी मधे देखील काही कथा असा आनंद देऊन जातात. पण असं आहे ना "अति सर्वत्र वर्जयेत" - त्यामुळे बऱ्याच कथांच्या शेवटचा अंदाज लागतो आणि त्यांचा प्रभाव कमी होतो. सुरुवातीला जी गूढकथांची पुस्तकं मी वाचली, तेव्हा हे धक्कातंत्र मला नवीन होतं, त्यामुळे त्यात हा अंदाज लागत नव्हता. कदाचित मृत्युंजयी तेव्हा वाचलं आणि आताही वाचलं ते ह्या तंत्राचा अति वापर झाल्यावर वाचलं गेलं म्हणून असेल, पण कमी प्रभावी वाटलं हे खरं. अर्थात प्रत्येक गोष्टीत (सध्या इतर कथांमधे फारसे न सापडणारे) एक समान सूत्र आहे - ते म्हणजे, *वाईटाचं कधीच भलं होत नाही*. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, कधीही उचलून वाचायला सुरुवात करून काही मिनिटात एक गोष्ट संपते. सध्याच्या व्यग्र काळात हे पुस्तक पुन्हा वाचायला सोपे गेले, नक्कीच. आणि मी पुन्हा एकदा ह्या कथाप्रकाराकडे आकर्षितही झाले आहे... पुन्हा सगळी गूढकथांची पुस्तकं वाचायला हवीत. ...Read more