ARUN SHEVATE

About Author

Birth Date : 30/04/1958


NA

शेवते १९९३ पासून ‘ऋतुरंग’ या दिवाळी अंकाचे संपादन आणि प्रकाशन करत आहेत. ‘ऋतुरंग’ या दिवाळी अंकातील विविध लेखांची ५० पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. नापास मुलांची गोष्ट, हाती ज्यांच्या शून्य होते, एकच मुलगी, माझे गाव माझे जगणे, ऐवज तसेच ७९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर आधारित ‘संवाद’ इत्यादी पुस्तकांचे संपादन त्यांनी केले. त्यांचे ‘नापास मुलांची गोष्ट’ हे पुस्तक मुंबई विद्यापीठाच्या एफ.वाय.बी.ए.च्या अभ्यासक्रमात समाविष्ट झाले आहे. त्यांच्या ‘राजघाट’ या कवितासंग्रहाचा गुजरातीमध्ये अनुवाद प्रसिद्ध झाला आहे. ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळे यांनी डिसेंबर २०१७ मध्ये आयोजित केलेल्या ‘असेही एक संमेलन’ या साहित्य संमेलनाचे श्री. शेवते अध्यक्ष होते. शेवते यांना पद्मश्री दया पवार प्रतिष्ठानचा पुरस्कार मिळाला. तसेच त्यांच्या ‘कावळ्यांच्या कविता’, ‘तळघर’ या कवितासंग्रहांना राज्य पुरस्कार, ‘ऐवज’ (निवडक ऋतुरंग) ग्रंथाला राज्य शासनाचा उत्कृष्ट संपादन पुरस्कार, ‘माझे गाव माझे जगणे’ ग्रंथाला व ‘राजघाट’ या कवितासंग्रहाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार, तर ‘ऐवज’ या ग्रंथाला सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पुरस्कार यांसह ‘ऋतुरंग’ दिवाळी अंकाला २५ वर्षांत ६० पारितोषिके प्राप्त झाली आहेत. शेवते यांची आजवर कवितासंग्रह, संपादन आणि इतर पुस्तके मिळून ७५ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
SAHEB SANDHYAKALI BHETALE Rating Star
Add To Cart INR 120

Latest Reviews

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
विभा मिटकरी, मुंबई.

`कुलामामाच्या देशात` ह्या पुस्तकाचे लेखक जी.बी.देशमुख ह्यांची लेखन शैली फार छान आहे. ओघवत्या लेखन शैली मुळे पुस्तक वाचताना प्रत्येक प्रसंग डोळ्यांसमोर उभा राहतो, आपण घरात नसून जंगलात वावरतोय असा अनुभव येतो, प्रत्येक कथा उत्कंठा वाढवणारी आहे आणि वन्यजवना बद्दल खूप महत्त्व पुर्ण माहिती देणारी आहे. माझी जी.बी.देशमुखांना विनंती कि त्यांनी श्री.रवींद्र वानखेडे साहेबांच्या संग्रही असणारे असेच अनेक चित्तथरारक अनुभव आम्हा वाचकांसाठी शब्द बद्ध करावे. ...Read more