ARUN SHEVATE

About Author

Birth Date : 30/04/1958


NA

शेवते १९९३ पासून ‘ऋतुरंग’ या दिवाळी अंकाचे संपादन आणि प्रकाशन करत आहेत. ‘ऋतुरंग’ या दिवाळी अंकातील विविध लेखांची ५० पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. नापास मुलांची गोष्ट, हाती ज्यांच्या शून्य होते, एकच मुलगी, माझे गाव माझे जगणे, ऐवज तसेच ७९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर आधारित ‘संवाद’ इत्यादी पुस्तकांचे संपादन त्यांनी केले. त्यांचे ‘नापास मुलांची गोष्ट’ हे पुस्तक मुंबई विद्यापीठाच्या एफ.वाय.बी.ए.च्या अभ्यासक्रमात समाविष्ट झाले आहे. त्यांच्या ‘राजघाट’ या कवितासंग्रहाचा गुजरातीमध्ये अनुवाद प्रसिद्ध झाला आहे. ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळे यांनी डिसेंबर २०१७ मध्ये आयोजित केलेल्या ‘असेही एक संमेलन’ या साहित्य संमेलनाचे श्री. शेवते अध्यक्ष होते. शेवते यांना पद्मश्री दया पवार प्रतिष्ठानचा पुरस्कार मिळाला. तसेच त्यांच्या ‘कावळ्यांच्या कविता’, ‘तळघर’ या कवितासंग्रहांना राज्य पुरस्कार, ‘ऐवज’ (निवडक ऋतुरंग) ग्रंथाला राज्य शासनाचा उत्कृष्ट संपादन पुरस्कार, ‘माझे गाव माझे जगणे’ ग्रंथाला व ‘राजघाट’ या कवितासंग्रहाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार, तर ‘ऐवज’ या ग्रंथाला सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पुरस्कार यांसह ‘ऋतुरंग’ दिवाळी अंकाला २५ वर्षांत ६० पारितोषिके प्राप्त झाली आहेत. शेवते यांची आजवर कवितासंग्रह, संपादन आणि इतर पुस्तके मिळून ७५ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
SAHEB SANDHYAKALI BHETALE Rating Star
Add To Cart INR 120

Latest Reviews

Harshita Shivhare

Wonderful and knowledgeable book with all the necessary information about the motherly queen Rani Ahilyabai Holkar.

राजेंद्र घोडके, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर

नमस्कार आदरणीय श्री उमेश कदम साहेब, मी आपल्या साहित्याचा चाहता आहे. आपली मेहता प्रकाशनाने प्रकाशित केलेली सहा पुस्तके (संहार, केवळ मैत्रीसाठी, उध्वस्त, एक होता मित्र, स्थलांतर, झांझिबारी मसाला) गेल्या महिन्याभरात मी वाचून पूर्ण ेली. आपल्या साहित्याच्या वाचनातून खूप आनंद तर मिळालाच पण ज्ञानात ही खूप भर पडली. आपली लेखन शैली वाचकाला खिळवून ठेवणारी आहे. आपल्या लेखनाच्या वाचनातून वाचकाला जगाच्या एका मोठ्या भागाची सफर घडते. आपली उर्वरित पुस्तकेही मिळवून मी लवकरच ती वाचणार आहे. ...Read more