* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: SCHAPELLE
  • Availability : Available
  • Translators : SUNITI KANE
  • ISBN : 9788184983050
  • Edition : 1
  • Publishing Year : NOVEMBER 2014
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 214
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
Quantity
Buying Options:
  • Print Books:
SEVEN YEARS AFTER FIRST PUBLICATION OF HER NUMBER-ONE BESTELLING MEMOIR, SCHAPELLE CORBY REMAINS IN JAIL, AND HER BOOK REMAINS HER ONLY DIRECT COMMUNICATION WITH THE AUSTRALIAN PUBLIC. IT WAS MEANT TO BE A TWO-WEEK BREAK TO A TROPICAL PARADISE. BUT FOR SCHAPELLE CORBY IT ENDED UP A WAKING NIGHTMARE. SHE WAS ARRESTED AT DENPASAR AIRPORT AFTER 4.2 KILOGRAMS OF MARIJUANA WERE FOUND IN HER BAG. SCHAPELLE HAD BECOME THE REAL-LIFE VICTIM OF EVERY TRAVELLER`S DARKEST FEAR - DRUGS HAD BEEN PLACED IN HER BAG AFTER SHE CHECKED IT IN. THOUGH INNOCENT, SHE WAS FORCED TO FACE THE CONSEQUENCES OF ANOTHER`S CRIME IN A COUNTRY WHERE THE PENALTIES FOR DRUG SMUGGLING ARE AMONG THE HARSHEST IN THE WORLD. HER TRIAL AND CONVICTION BECAME ONE OF THE BIGGEST STORIES OF THE DECADE IN AUSTRALIA, AND THE ENTIRE NATION WATCHED IN HORROR AS SHE WAS SENTENCED TO TWENTY YEARS IN JAIL. HER STORY HAS RARELY LEFT THE HEADLINES IN THE YEARS SINCE. IN HER SEARING AND COMPELLING BOOK WE HEAR HER TELL HER OWN STORY: OF BEING WRENCHED FROM A CAREFREE HOLIDAY INTO A STINKING POLICE CELL, OF AN ALIEN LEGAL SYSTEM WHERE HER ATTEMPTS TO PROVE HERSELF INNOCENT WERE THWARTED AT EVERY TURN, AND OF LEARNING TO SURVIVE - DAY BY TERRIBLE DAY - IN THE SQUALOR, DISCOMFORT AND VIOLENCE OF A THIRD-WORLD JAIL. SCHAPELLE`S STORY IS LIKE NO OTHER - A YOUNG WOMAN EXPERIENCING THE UNIMAGINABLE, AND ENDURING THE UNENDURABLE WITH COURAGE, STRENGTH AND HUMOUR.
शॅपेल कॉर्बीच्या बॅगेत देनपसार एअरपोर्टवर ड्रग्ज सापडल्यावर, इंडोेनेशियात तिला वीस वर्षं करावासाची शिक्षा ठोठावली गेली आणि सा-या जगाचं लक्ष तिच्याकडं गेलं. क्वीन्सलंडमध्ये ब्यूटी थेरपीचं प्रशिक्षण घेणारी ही मुलगी सध्या केरोबोकनच्या तुरुंगात एक-एक दिवस मोजत असताना, नरकप्राय यातना भोगत आहे. तरीही उमेद न हरता आब राखून जगायचा प्रयत्न करते आहे. असं धीरानं जगणं सोपं नाही; कारण सध्या तरी ती २०२४ पूर्वी सुटेल अशी शक्यता दिसत नाही. शॅपेलच्या खटल्यासंदर्भात कोर्टानं लावलेल्या शोधा मागचं सत्य... प्रसारमाध्यमांनी केलेले दोषारोप आणि वस्तुस्थिती यातली तफावत... ह्या खटल्याबाबतच्या अतिरंजित वावड्या... या सर्वांचं अत्यंत वस्तुनिष्ठ, संयत वर्णन ‘SCHAPELLE’ ह्या पुस्तकात शोध-पत्रकार टोनी विल्सन यांनी केलेलं आहे. टोनी विल्सन यांचा शॅपेलचं निर्दोषत्वावर नेहमीच दृढ विश्वास राहिला. आणि शॅपेलच्या हादरवून टाकणाऱ्या खटल्याबाबतच्या मथळ्यांमागचं सत्य जगापुढे मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी ह्या पुस्तकात केलेला आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #TONYWILSON #SUNITIKANE #SCHAPELLE
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more