* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: I,PHOOLANDEVI
  • Availability : Available
  • Translators : PRAMOD JOGLEKAR
  • ISBN : 9788171617418
  • Edition : 2
  • Publishing Year : OCTOBER 1997
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 408
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
  • Sub Category : MEMOIRS, DIARIES, LETTERS & JOURNALS, POLITICAL LEADERS, POLITICAL PARTIES
  • Available in Combos :PRAMOD JOGLEKAR COMBO SET - 30 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
SHE WAS ONE OF THOSE RARE PEOPLE WHO, IN THEIR VERY LIFETIME, SEEM STRAIGHT OUT OF A LEGEND ... BORN IN THE HEART OF INDIA INTO A LOW-CASTE FAMILY, PHOOLAN DEVI WAS DESTINED FOR DOMESTIC SLAVERY. MARRIED AT ELEVEN TO A MAN THREE TIMES OLDER THAN HER, ABANDONED AND THEN RAPED BEFORE BEING KIDNAPPED BY OUTLAWS, SHE REBELLED TO BECOME THE FAMOUS QUEEN OF BANDITS. FOR THREE YEARS, AT THE HEAD OF A REAL ARMY, SHE STRUCK THE IMAGINATION OF AN ENTIRE CONTINENT, STEALING FROM THE RICH TO GIVE TO THE POOR, IN THE PURSUIT OF REVENGE EVER SATIATED AGAINST THE BRUTALITY OF MEN. FOR ALL THE WOMEN IN THE WORLD, FROM HUMILIATION TO LIBERATION, PHOOLAN DEVI HAD BECOME THE SYMBOL OF REBELLION AND STRUGGLE. SHE WAS MURDERED ON JULY 25, 2001. THIS BOOK IS HER WILL. PHOOLAN DEVI WAS BORN IN 1961 IN A POOR VILLAGE IN INDIA. AFTER ELEVEN YEARS IN PRISON, SHE GIVES US THE HEARTBREAKING TESTIMONY OF HER FIGHT AGAINST MISERY, VIOLENCE AND SLAVERY. AFTER FOUNDING AN ADVOCATE FOR THE OPPRESSED, PHOOLAN DEVI BECAME A MEMBER OF THE STATE OF UTTAR PRADESH, WHERE SHE GREW UP. SHE WAS FINALLY MURDERED ON JULY 25, 2001, LEAVING BEHIND COUNTLESS REBELS.
रॉबिनहूडचा स्त्री अवतार म्हणजे फूलनदेवी. उत्तर प्रदेशात जन्मलेल्या डाकूराणी फूलनदेवीचं हे खरंखुर आत्मकथन आहे. खालच्या जातीच्या गरीब घरात जन्मलेल्या फूलनने दारिद्र्य आणि अपमानाचं जीणं यांचा सामना केला. अशा समाजात ती टिकून राहिली की जिथे पोटात आणि भिंतींमध्ये माती लिंपावी लागते, अशा समाजात की जिथे भटक्या म्हशीला एखाद्या मुलीपेक्षा जास्त मान दिला जातो. आपल्यापेक्षा तिप्पट वयाच्या विधुराशी लग्न लागल्यावर अवघ्या अकराव्या वर्षी तिला मारहाण, अपमान आणि अत्याचारांना सामोरं जावं लागलं. समाजानं तिची वेश्या म्हणून संभावना केली. तिला ठार करण्यासाठी सुपारी घेतलेल्या डाकूंनी तिला पळवलं. पण ती त्यातूनही जगली आणि स्वतः डाकू बनली. पुरुषांसारखी बंदूक चालवून ती दरोडे घालू लागली. तरीही ती एक स्त्री होती. तिला प्रेमाची भूक होती. तिला प्रेम आणि आधार देणारा माणूस नियतीने तिच्यापासून हिरावून घेतला. त्यानंतर अनेक डाकूंनी अत्याचार केले. अपमान आणि अत्याचारांनी कल्पनेच्या बाहेर घायाळ होऊनही ती जिवंत राहिली. तीन वर्ष ती उत्तरप्रदेशातल्या जंगलांमध्ये डाकू म्हणून थैमान घालत होती. अत्याचाराची शिकार होणार्‍यांच्या अन्यायाला वाचा फोडणे आणि अत्याचार्‍यांना शासन करणे, श्रीमंतांना लुटून ती संपत्ती गोरगरिबांना वाटणे त्यामुळे ती लोकप्रिय झाली. सरकार हवालदील झालं. अखेर ती शरण आली आणि मग अकरा वर्ष खटल्याशिवाय तुरुंगात तिला स्थानबद्ध करून ठेवण्यात आलं. अजूनही तळागाळातल्या शोषित वर्गाला ती आपली वाटते. फूलन म्हणते, ’’मी स्वतः फार चांगली आहे असं माझं म्हणणं नाही. पण मी वाईटसुद्धा नाही. पुरुषांनी मला जे भोगायला लावलं त्यांना मी त्याचीच परतफेड करायला लावली. माझ्या जातीतली एक स्त्री प्रथमच आपली कहाणी सांगतेय. अन्यायानं दबल्या जाणार्‍या आणि अपमानानं जळणार्‍या लोकांसाठी मी धैर्यानं हात पुढे करत आहे. मी जे भोगलं त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून हा प्रयत्न.’’

No Records Found
No Records Found
Keywords
#PHOOLAN DEVI # MARIETHÉRÈSECUNY&PAUL RAMBALI #PRAMOD JOGLEKAR #मीफुलनदेवी #मारीतेरेजक्यूनी #पॉल रोम्बाली #प्रमोद जोगळेकर#CHAMBALGHATI #BANDITQUEEN #चंबळघाटी #दरोडेखोर #गोरहा #BEHMAIMASSACRE #
Customer Reviews
  • Rating StarMoin Humanist

    खालच्या जातीच्या गरीब घरात जन्मलेल्या फुलनने दारिद्र्य आणि अपमानच जीणं याचा सामना केला.अशा समाजात ती टिकून राहिली की जिथे पोटात आणि भिंतीमध्ये माती लिंपावी लागते,अशा समाजात की जिथे भटक्या म्हशीला एखाद्या मुलींपेक्षा जास्त मान दिला जातो..आपल्यापेक्षा िप्पट वयाच्या माणसाशी लग्न झाल्यावर अवघ्या ११व्या वर्षी तिला मारहाण,अपमान आणि अत्याचारांना सामोरं जावं लागलं.समाजानं तिची वेश्या म्हणून संभावना केली.तिला ठार करण्यासाठी सुपारी घेतलेल्या डाकुनी तिला पळवल.पण ती त्यातूनही जगली आणि स्वतः एक डाकू बनली..श्रीमंतांना लुटून ती संपत्ती गोरगरिबांना वाटणे त्यामुळे ती लोकप्रिय झाली.सरकार हवालदिल झालं,अखेर ती शरण आली आणि मग ११ वर्ष खटल्याशिवाय तिला स्थानबद्ध करून ठेवण्यात आलं...🙏आणि २००१ मध्ये तिची निर्घृण हत्या करण्यात आली.... ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

वा. पां. जाधव अमरावती

`अमरावतीचे छप्पन स्वभाव एक मनोरंजक काव्यसंग्रह` `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे अमरावतीचे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री जी. बी. देशमुख यांचे अमरावती नगरीचा सहज स्वभाव व ह्या नगरीच्या वेगळ्या ओळखीवर आधारित मनोरंजक पुस्तक वाचले. वाचून भरपूर मनोरंजन झाले. खर काय लिहावे या लेखकाबद्दल, मन गोंधळले. ऐतिहासिक असो, प्रवास वर्णन असो, व्यक्ती विशेष असो, अनुभवात्मक घटना घडामोडी असो कशावरही सहज लिखाण करणारा हा लेखक आहे. आता तर त्यांनी लेखनाला विनोद प्रचुर फोडणी देऊन `अमरावतीचे छप्पन स्वभाव` या काव्यसंग्रहातून अमरावतीकरांना मनोरंजनाची मेजवानीच दिली आहे. प्रत्येक शहराची व त्या शहरातील वैशिष्ट्यांची एक वेगळीच ओळख असते. दिवस जातात, काळ लोटतो, पिढ्या बदलतात मात्र जुन्या स्मृतीची चिन्हे नवीन येणाऱ्या पिढीच्या मनात गुढ निर्माण करत कायम हाक देत राहतात. अमरावतीही त्याला अपवाद नाही. बापट चौकात चौक नाही, त्या जागेवर चौरस्ता नसून टी-पॉइंट आहे, खापर्डे बगीचा म्हणून आजही ओळख आहे मात्र तेथे बगिचा नाही किंवा प्रसिद्ध गांधी चौकात गांधीचा पुतळा अथवा स्मृतीदर्शक चिन्ह अथवा उल्लेख नाही मात्र गांधी चौक अशीच ओळख जनमानसात आहे. अशा एक ना अनेक विसंगत नाम दर्शक ओळख असलेली उदाहरणे त्यात सप्रमाण आहेत. पण खरी गंमत म्हणजे कधी काळी घडलेला इतिहास त्यामध्ये दडलेला आहे हे निश्चित. या सोबतच अमरावतीकरांच्या स्वभावातला स्थायी मजेदारपणाच्या एक एका हटके गुण वैशिष्ट्याच्या गमती लेखकाने हुबेहूब अधोरेखित केलेल्या आहेत. आणि त्यावरुन तत्सम रचनांचा उहापोह लेखकाने पुस्तकात केला असावा. विदेशात स्थाईक झालेल्या मूळ अमरावतीकरांना लेखकाने लिहिलेल्या गमती मनोरंजनात्मक वाटाव्या एवढी किमया जी.बी. च्या सहज लेखनाने दाखवली आहे. अमरावतीचे अग्रगण्य वृत्तपत्र दै. हिंदुस्थान मध्ये लेखकाने सतत ६ महीणे लिहीलेल्या काव्य सदरात अमरावतीच्या जनमानसाच्या हृदयाच्या ठाव घेणाऱ्या काव्य रचनांचा आठवणींनी महापूर ओसंडून गेला होता. विशेष म्हणजे ह्यात कुठेही अनावश्यक अभिनीवेष नव्हता. उलट गमतीत केलेले आत्मपरिक्षण मात्र काही प्रमाणात होते. वयस्क अमरावतीकर रसिकांना या रचना ताज्या करून त्यांच्या तारुण्यात घेऊन गेल्या हेच खरे. जी बी देशमुख या लेखकास मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रियां वरून दिसून येते. . सदर पुस्तकातील काव्यमय रचना वाचतांना अमरावतीच्या माणसाच्या वऱ्हाडभोळ्या स्वभावाची प्रचीती येते आणि वेगळाच आनंद देऊन जाते. निखळ मनोरंजन करत गुदगुल्या करणारा असा हा काव्यसंग्रह आहे. अमरावती शहराची ऐतिहासिक वैशिष्टे काव्यरूपात वाचण्याचा आनंद अमरावतीकरांना ते जिथं असतील त्या गावात, परगावात, परदेशात पुस्तक मागवून घेता येईल. ...Read more

ज्योती चेडे, मुंबई.

अमरावतीच्या वैशिष्ट्यांवर आधारीत खुमासदार छप्पन्न कवितांच्या संग्रहातील प्रत्येक कविता वाचत असताना अमरावतीच्या वातावरणाची धुंदी आपसुकच मनावर चढु लागली. सगळ्याच कविता सुंदर आहेत. एकेक कविता अमरावतीचे अप्रतिम वर्णन करते. प्रत्येक कवितेचा शेवट कुठेतरी गंभीर विचार करायला भाग पाडतो आणि मन गलबलून जाते. सगळ्याच कविता सुंदर आहेत पण माझ्या मनाला भावलेल्या व भिडलेल्या कविता आहेत `अमरावतीतल्या गमती`, `अमरावतीचे शिक्षण`, `अमरावतीचे हजरजबाबी`, `अमरावतीचे वेडे`, `अमरावतीच्या काकू` व बाकी सगळ्या. `अमरावतीचे वेडे` या कवितेत उल्लेखीत शेवटचा अश्रुंचा एक थेंब जरुर राखला जाईल. तसेच `अमरावतीच्या काकूं` ची उर्जा उरात भरून उरेल. जीवन देणाऱ्या विहीरीने कोणाचेही जीवन घेऊ नये, अशी सद्भावना मनात जागेल. अमरावतीकर जगात कुठेही असो त्यांच्या मनात एका कोपऱ्यात राजकमल चौक असतोच हे सत्य मनावर कोरले जाईल. प्रत्येक अमरावतीकराने ह्या कविता जगाव्यात. त्यासाठी हे पुस्तक संग्रही ठेवावे आणि परगावी राहणाऱ्या आपल्या अमरावतीकर आप्तेष्टांना भेटी दाखल द्याव्या. ...Read more