* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE DRESSMAKER OF KHAIR KHANA
  • Availability : Available
  • Translators : VARSHA VELANKAR
  • ISBN : 9789386175069
  • Edition : 1
  • Publishing Year : SEPTEMBER 2016
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 200
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
Quantity
Buying Options:
  • Print Books:
THE RIVETING TRUE STORY OF KAMILA SIDIQI AND OTHER WOMEN OF AFGHANISTAN IN THE WAKE OF THE TALIBAN’S FEARFUL RISE TO POWER. IN WHAT GREG MORTENSON, AUTHOR OF THREE CUPS OF TEA, CALLS “ONE OF THE MOST INSPIRING BOOKS I HAVE EVER READ,” LEMMON RECOUNTS WITH NOVELISTIC VIVIDNESS THE TRUE STORY OF A FEARLESS YOUNG WOMAN WHO NOT ONLY REINVENTED HERSELF AS AN ENTREPRENEUR TO SAVE HER FAMILY BUT, IN THE FACE OF FEROCIOUS OPPOSITION, BROUGHT HOPE TO THE LIVES OF DOZENS OF WOMEN IN WAR-TORN KABUL.
अफगाणिस्तानाचं भविष्य अधांतरीच आहे. ‘द ड्रेसमेकर ऑफ खैरखाना’ मात्र तुम्हाला अशा अफगाणिस्तानाची सैर घडवतं, जे कुणीही पाहिलेलं नाही आणि ज्याची वाच्यता कुठल्याही वर्तमानपत्रांच्या मथळ्यांमध्ये केली गेली नाही. ही खचितच एका युद्धाची कथा आहे. पण ती स्त्रियांच्या एकतेचीही कथा आहे आणि दु:खालाही लाजवणा-या साहसाची कथा आहे.कमिलाचा प्रवास प्रत्येकाला प्रेरणा देणारा आहे. पण त्याचबरोबर तिचा हा प्रवास वाचकाला एका जटिल राजकीय आणि मानवीय घटनाक्रमाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्यासाठी भाग पाडेल, हे निश्चित.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #KHAIRKHANACHIVASTRAUDYOJIKA #THEDRESSMAKEROFKHAIRKHANA #खैरखानाचीवस्त्रोद्योजिका #BIOGRAPHY&TRUESTORIES #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #VARSHAVELANKAR #GAYLETZEMACHLEMMON "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 30-09-2017

    अफगाणिस्तानमधील स्त्रियांच्या एकतेची कथा... तीन वर्षात काबुल, लंडन आणि वॉशिग्टंन डीसी येथे घेतलेल्या मुलाखती आणि संशोधन यातून उलगडलेल्या सत्याला लेखिकेने पुस्तकातील प्रत्येक प्रसंग आणि कथानकाच्या माध्यमातून वाचकांसमोर ठेवलं आहे. या काळात अफगाणिस्तानतील एकंदर राजकीय व सामाजिक परिस्थिती फारच खालावली होती. गेल झेमॉक ले मॉन या सुप्रसिद्ध एबीसी न्यूजमध्ये त्या काम करत असताना २००४मध्ये त्यांनी हार्वर्डमध्ये एमबीए करण्यासाठी नोकरी सोडली जगातील संघर्षांना तोंड देणाऱ्या किंवा संघर्षातून उभारी घेऊ पाहणाऱ्या देशातील महिला उद्योजकांसंदर्भात गेल यांनी अभ्यास केला. या देशामध्ये अफगाणिस्तान, बोस्निया आणि रवांडा या देशांचा समावेश होता. ‘द ड्रेसमेकर ऑफ खैरखाना’ या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद वर्षा वेलणकर यांनी केला आहे. तालिबान नावाचं दृष्टचक्र अफगाणिस्तान आणि तेथील लोकांच्या नशिबी बहुधा कायमस्वरूपी आहे. याचा जास्तीत जास्त त्रास या देशातील महिलांनी भोगला. आपापल्या परीनं त्यांनी या परिस्थितीचा सामना केला. गेल झेमॉक लेमॉन या पत्रकार महिलेनं एक अशी नायिका जगापुढे आणण्याचा चंग बांधला आणि संकटांनी घेरलेल्या देशातील महिला उद्योजिकांचा शोध घेण्याच्या मोहिमेवरच ती निघाली. अफगाणिस्तानातील तिच्या या सफरीत तिला कमिला सिद्दीकी भेटली. तालिबान आणि त्यांच्या देशांची संस्कृती (?) जपण्यासाठी सुरू झालेली मोहीम यांचा पहिला बळी महिला वर्ग होता. स्त्री ही पुरुषांना अनैतिकतेकडे घेऊन जाणारी एक बला आहे आणि तिला दूर सारण्यासाठी तिच्या पायाचं नख ही दिसता कामा नये, अशा विक्षिप्त विचारांच्या या राज्यकर्त्यांनी देशातील सगळ्या महिलांना वेठीस धरलं आणि मनमानी करण्यास सुरुवात केली. मुलींना शिक्षणासाठी केलेली बंदी मात्र अनेकांच्या जिव्हारी लागली. तेव्हाच एका छुप्या संघर्षाला सुरुवात झाली. बंधनांना झुगारून न देता त्यांच्या दायऱ्यात राहून या महिलांनी आपलं स्वत्व जपण्यासाठी जे केलं, त्याचं प्रतिनिधीत्व करणारी कमिला सिद्दीकी ही एक तरुणी आहे. प्रचंड आशावादाच्या जोरावर तिनं स्वत:च्या कुटुंबासाठीच नाही तर समाजासाठीही जे जे केलं त्याची अतुलनीयता निर्विवाद आहे. हे पुस्तक लिहिताना लेखिकेच्या हाती होतं ते फक्त सत्य. सत्याला शब्दबंबाळ करण्याची कधीच गरज नसते. त्यामुळे पुस्तकाची ओघवती भाषाशैली वाचकाला थेट कमिलाच्या पुढ्यात घेऊन जाते. अफगाणिस्तान, तिथली राजकीय परिस्थिती, महिलांचे हाल किंवा आणखी बरंच काही या पुस्तकाच्या माध्यमातून वाचकाला कळतं. पण वाचकाच्या मनाला सगळ्यात जास्त भिडणारी गोष्ट म्हणजे व्यक्तीच्या अंगभूत विरोधाभासी वृत्तीमधल्या योग्य वृत्तीची निवड करण्याची पद्धत. संकट असामान्य आणि कुणालाही नेस्तनाबूत करण्याची क्षमता असलेलं होतं. पण तशा परिस्थितीतही एका तरुणीनं स्वत:तील एका योग्य वृत्तीची निवड करून आयुष्यात कसे बदल घडवून आणले, याची ही कहाणी आहे. अगदी प्रत्येकानं वाचावी अशी! काबूलमधील वास्तव्यात लेखिकेला एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली. येथील स्त्रियांमधला एकोपा विलक्षण होता. या एकोप्याला समजूतदारपणा, हास्यविनोद, धाडस, जगातील घडामोडीचा मागोवा घेण्याची जिज्ञासा आणि आपल्या कामावरील निष्ठा या साऱ्या छटा होत्या. आपला व्यवसाय सुरू करताना आणि इतर स्त्रियांना त्यात सामावून घेताना आपण आपल्या हलाखीच्या परिस्थितीतही देशाला मदत करू असा ठाम विश्वास कमिलाच्या मनात असल्याचं लेखिकेला त्यांच्या पहिल्या जाणवल्या होत्या. ही जिद्द, ही जाणीव कुठून आली होती? कमिलाच्या या कथेचा मागोवा घेताना अफगाणिस्तानचं भविष्य आणि अमेरिकेचा या देशातील सहभाग याबद्दल काय जाणून घेता येईल? लेखिकेतील पत्रकाराला ही उत्सुकता शांत बसू देईना. हीच कहाणी लेखिका आपल्याला सांगत आहे. -शैलजा यादवाड ...Read more

  • Rating StarMAHARASHTRA TIMES 29-01-2017

    ही एक विलक्षण कहाणी आहे. अत्यंत बिकट आणि कठीण परिस्थितीवर मात करून पुढे जाण्याची प्रेरणा या कहाणीतून मिळते. ही कथा आहे अफगाणिस्तानातील एका तरुणीची... स्त्रियांना मिळणारी अत्यंत दुय्यम वागणूक, तालिबान्यांचा दहशतवाद, शैक्षणिक मागासलेपण, राजकीय अस्थैर्यम्हणजे अफगाणिस्तान म्हणजे हा देश, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. तालिबान्यांच्या कारवायांमध्ये पहिला बळी स्त्रियांचा गेला. स्त्री म्हणजे अनैतिकता असा विचार रुजविण्याचा तेथे प्रयत्न झाला. तेथील राज्यकत्र्यांनी स्त्रियांवर जुलूम केले. या दडपशाहीतही काही स्त्रियांनी आपले स्वत्व जपले. अन्यायाविरुद्ध लढा दिला. कमिला ही त्या स्त्रियांपैकीच एक... तिच्या संघर्षाची ही चित्तथरारक कहाणी आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL, SAPTARANG 22-01-2017

    अफगाणिस्तानातल्या काबूलमधल्या खैरखाना या उपनगरातल्या कमिला सिद्दिकीची ही प्रेरणादायी कहाणी. हार्वर्डमधल्या अभ्यासाचा एक भाग म्हणून गेल झेमॉक लेमॉन पत्रकार महिलेनं अफगाणिस्तानातल्या महिला उद्योजकांचा शोध घ्यायचे ठरवलं. त्यातूनच तिला कमिलाची कहाणी सापडी आणि त्यातून ‘ड्रेसमेकर ऑफ खैरखाना’ हे पुस्तक तयार झालं. त्याच पुस्तकाचा हाच अनुवाद. तालिबानी राजवटीत अनेक जुलूम, हिंसाचार चालू असतानाही कमिलानं स्वत:मधल्या उद्यमशीलतेला झळाळी दिली. शिवणकाम करून तिनं तो व्यवसाय वाढवत नेला. कमिलाची धडपड, इतरांच्या सुरक्षिततेसाठी स्वत:चा जीव धोक्यात घालण्याची वृत्ती, तिची बंडखोरी, सर्जनशीलता, तिच्या बहिणी, त्यांचं कुटुंब, त्यांची धडपड यांची ही कहाणी. या कहाणीत अफगाणिस्तानामधलं भयाण वास्तव उलगडत जातं आणि त्याच वेळी कमिलाची आणि एकूणच तिथल्या महिलांची सकारात्मकताही समोर येते. ...Read more

  • Rating StarAjinkya

    Excellent !

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more