* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: RAVIPAR
  • Availability : Available
  • Translators : MOHAN VELHAL, VIJAY PADALKAR
  • ISBN : 9788177662597
  • Edition : 7
  • Publishing Year : MARCH 2001
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 196
  • Language : Translated From HINDI to MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :GULZAR COMBO SET - 4 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS IS A COLLECTION OF SHORT STORIES BY THE INTERNATIONALLY FAMOUS, GULJAR, WHO IS NOT ONLY AN AUTHOR BUT IS A POET AND DIRECTOR TOO. THE STORIES WRITTEN BY HIM ARE VERY EXCLUSIVE. EACH IS A CULTURED PEARL WITH ITS OWN SHINE AND LUSTRE. HE USES WORDS MISERLY, BUT EACH WORD IS FULL OF MEANINGS PRESENTING THE SITUATIONS LIKEWISE. HIS STYLE NOT ONLY ELABORATES AN INCIDENT BUT IT ALSO GOES BEYOND IT AND DESCRIBES THE PSYCHOLOGICAL STATE OF MIND AT THE TIME. EACH OF HIS STORIES HAS THE CAPACITY TO SEEK INTERNATIONAL RECOGNITION. HE PRESENTS THE PERFECT PICTURE OF THE STORY WITH ITS BACKGROUND AND THE DIALOGUES TOUCH THE CORE OF OUR HEART. UNTRADITIONAL WAYS OF WRITING AND PICTURESQUE STYLE ARE THE CHARACTERISTICS OF GULJAR`S. VERY HONESTLY AND SENSITIVELY, HE PRESENTS US WITH THE TRUTH AND FACTS OF LIFE. HIS STORIES HAVE ALL THE TOUCHES; SADNESS, SERIOUSNESS, HUMOUROUS, SARCASTIC,THEY ALL MAKE US AWARE OF GULJAR AS A PERSON WITH A BALANCED MIND AND THOUGHTS, WITH A VERY UNDERSTANDING NATURE, FULL OF COMPASSION, FRAGRANCE AND A NEVER-ENDING FRESHNESS.
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कवी, लेखक, दिग्दर्शक गुल़जार यांचा हा पहिलाच लघुकथा-संग्रह. या चतुरस्र लेखकाच्या अभिजात सर्जनशक्तीचा हा निळ्या मखमलीवर ठेवलेल्या पाणमोत्यासारखा विलक्षण मनोज्ञ असा आविष्कार आहे. त्यांच्या मिताक्षरी शैलीतल्या निवेदनात घटनांश, प्रत्यक्ष घटना आणि मनोवस्था यांप्रमाणे बदल घडत राहतो. अभिजात प्रतिभेच्या बळावर गुल़जार वैश्विक पातळीवर जाऊ शकतील, अशी कथासूत्रं गुंफतात, आपल्या दृष्टीसमोर घडणा-या दैनंदिन घटनांची विलक्षण वास्तव पाश्र्वभूमी उभी करतात आणि संवादपूर्ण शैलीने वाचकांच्या थेट काळजाला हात घालतात. अपारंपरिक कथनशैली, चित्रदर्शी स्मरण आणि अभिजातता ही त्यांची वैशिष्ट्यं आहेत. जगण्यातील भेदक सत्य आणि वास्तव ते अत्यंत संवेदनशीलतेनं आणि प्रामाणिकपणानं मांडतात. कधी या कथा गंभीर वाटतात, कधी हलवून सोडतात, कधी हास्याचा शिडकावा करतात, तर कधी औपरोधिक वाटतात. या कथांतून जगाकडं अत्यंत समतोल दृष्टीनं आणि कणवेनं पाहणा-या गुल़जारांच्या समृद्ध आकलनशक्तीची प्रचीती येते. म्हणूनच सोनटक्क्याच्या फुलांसारख्या त्या सतत टवटवीत वाटतात.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #RAVIPAR #RAVIPAR #रावीपार(कथासंग्रह) #SHORTSTORIES #TRANSLATEDFROMHINDITOMARATHI #MOHANVELHAL #VIJAYPADALKAR #GULZAR #गुलजार"
Customer Reviews
  • Rating StarUma Gade

    सुप्रसिद्ध कथालेखक, गीतकार , संवादलेखक ,दिग्दर्शक गुलजार यांचा अप्रतिम कथासंग्रह .अत्यंत वाचनीय आहे

  • Rating StarSnehal Potdar

    सुंदर पुस्तकं

  • Rating StarE Sahitya Pratishthan

    खूप अस्वस्थ करतं हे पुस्तक. गुलजार त्यांची सेनेमॅटोग्राफ़ी आणि धक्कातंत्र इथेही वापरतात.

  • Rating StarShalaka Naringekar

    काही दिवसांपूर्वी माझ्या एका मैत्रिणीने मला हे पुस्तक वाचण्यासाठी म्हणून दिलें. मला सआदत हसन (मंटो) यांचं लिखाण आवडतं म्हंटल तेव्हा गुलज़ार यांचं रावीपार हे ही आवडेल असं तिने म्हंटल. या पुस्तकात गुलज़ार यांनी भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी झालेल्या निर्ासितांवर व त्यावेळी दोन्ही देशांच्या सीमेलगतच्या लोकांना तसचं देशभरात सर्वधर्मीयांना सहन कराव्या लागलेल्या घटनांविषयी सुंदर कथात्मक वर्णन केलेलं आहे. गुलज़ार यांच्या चाहत्यांना आवडेल असं हे पुस्तक आहे. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KHULBHAR DUDHACHI KAHANI
KHULBHAR DUDHACHI KAHANI by SUNANDA AMRAPURKAR Rating Star
श्रीपाद ब्रह्मे

नुकतंच असंच वेगानं वाचून संपवलेलं दुसरं पुस्तक म्हणजे सुनंदा अमरापूरकर यांचं ‘खुलभर दुधाची कहाणी’. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या त्या पत्नी. अर्थात ही काही त्यांची एकमेव ओळख नव्हे. एक चांगल्या अभिनेत्री, उत्तम अनुवादक म्हणूनही त्या ्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘खुलभर दुधाची कहाणी’ या आत्मचरित्रवजा लेखनातून त्यांच्या जगण्याचा व्यापक पट अतिशय प्रांजळपणे उलगडला आहे. मला हे पुस्तक विशेष भावण्याचं कारण म्हणजे त्यात आलेलं नगरचं वर्णन. मी स्वत: नगरला फार प्रदीर्घ काळ राहिलो नसलो, तरी ते शेवटी माझ्या जिल्ह्याचं गाव. आणि वयाच्या १३ ते २२ अशा महत्त्वाच्या कुमार व तरुण वयातला माझा तिथला रहिवास असल्यानं नगरच्या आठवणी विसरणं शक्य नाही. सुनंदाताई माझ्या आईच्या वयाच्या. त्यामुळं त्यांच्या लहानपणच्या आठवणी जवळपास माझ्या जन्माच्या २०-२५ वर्षं आधीच्या. असं असलं तरी मी त्या वर्णनाशी, त्या काळातल्या नगरशीही रिलेट होऊ शकलो, याचं कारण मुळात गेल्या शतकात बदलांचा वेग अतिशय संथ होता. नगरसारख्या निम्नशहरी भागात तर तो आणखी संथ होता. त्यामुळं एकूण समाजजीवनात १९६० ते १९९० या तीस वर्षांत तपशिलातले फरक सोडले, तर फार मोठा बदल झाला नव्हता. सुनंदाताई माहेरच्या करमरकर. त्यांचं आजोळ‌ सातारा असलं, तरी त्या जन्मापासून नगरमध्येच लहानाच्या मोठ्या झालेल्या. अगदी पक्क्या ‘नगरी’ म्हणाव्यात अशा. ( आजही त्या स्वत:ला अभिमानानं ‘नगरकर’च म्हणवून घेतात.) सुनंदाताईंचे वडील त्या दहा वर्षांच्या असतानाच गेले. त्यांना मामांचा आधार होता, पण आईनंच लहानाचं मोठं केलं. तेव्हाचं त्यांचं निम्न मध्यमवर्गीय जगणं, नगरमधले वाडे, तिथलं समाजजीवन, तिथल्या शाळा, शिक्षक, नगरमधील दुकानं, दवाखाने, तिथल्या गल्ल्या, बाजार हे सगळं सगळं सुनंदाताई अतिशय तपशीलवार उभं करतात. नगरसारख्या मध्यम शहरात वाढलेल्या महाराष्ट्रातील कुठल्याही शहरातील त्या काळातील व्यक्तीला अतिशय सहज रिलेट होईल, असं त्यांचं हे जगणं होतं. त्यात सुनंदाताईंचं लेखन अतिशय सहज, सोपं आणि प्रांजळ असल्यामुळं ते आपल्याला अगदी भिडतं. एका प्रख्यात अभिनेत्याची पत्नी असल्यानं त्यांचं जीवन इतर सर्वसामान्य स्त्रियांपेक्षा वेगळं झालं असेल, अशी आपली अपेक्षा असते. सुनंदाताईंच्या लेखनातून या ‘वेगळ्या जीवना’ची काही तरी झलक मिळेल, अशीही आपली एक भूमिका तयार झालेली असते. सदाशिव अमरापूरकरांसारख्या मनस्वी अभिनेत्याशी लग्न झाल्यानंतर सुनंदाताईंचं जगणं बदललंही; मात्र ते वेगळ्या पद्धतीनं. सदाशिव अमरापूरकर ऊर्फ नगरकरांचा लाडका बंडू त्यांना नगरमध्ये शाळेपासून कसा भेटला, नंतर कॉलेजमध्ये दोघांनी एकाच ग्रुपमधील नाटकं कशी सादर केली, त्यात अगदी नकळतपणे त्यांचं प्रेम कसं जमलं आणि नंतर नगर सोडून त्या पतीच्या कारकिर्दीसाठी मुंबईत कशा आल्या हा सर्व नाट्यमय प्रवास सुनंदाताई अतिशय तन्मयतेनं मांडतात. अमरापूरकर मंडळींच्या घराविषयीचे तपशील त्यात येतात. अमरापूरकरांचे वडील दत्तोपंत हे नगरमधलं मोठं प्रस्थ. श्रीमंत घराणं. मोठा वाडा, नोकरचाकर वगैरे. त्या तुलनेत सुनंदाताईंची माहेरची परिस्थिती जेमतेम म्हणावी अशी. अशा परिस्थितीत हे लग्न झालं आणि त्या अमरापूरकरांची सून झाल्या, इथपर्यंत पुस्तकाचा निम्मा प्रवास (मध्यंतरच) होतो. पुढल्या दोनशे पानांत आपल्याला खऱ्या अर्थानं सदाशिव अमरापूरकर हे काय व्यक्तिमत्त्व होतं, हे उलगडत जातं. अमरापूरकरांनी शेवटपर्यंत त्यांची मध्यमवर्गीय राहणी व मध्यमवर्गीय मूल्यं सोडली नाहीत. ‘अर्धसत्य’सारख्या सिनेमामुळं एका रात्रीतून ते भारतभरात प्रसिद्ध झाले. या एका ओळखीमुळं अमरापूरकरांचं जीवन पूर्ण बदलून गेलं. तोपर्यंत असलेली आर्थिक ओढगस्तीही संपली. हिंदी चित्रपटसृष्टीत अगदी स्वप्नवत अशा रीतीनं ते मोठे स्टार झाले. एकापाठोपाठ एक खलनायकी भूमिका त्यांच्याकडं येऊ लागल्या. पैसा येऊ लागला. अशा परिस्थितीत एक मध्यमवर्गीय कुटुंब या सगळ्या धबधब्याला कसं तोंड देतं आणि आपली मूल्यं कायम जपत राहतं, हे सुनंदाताईंनी फार हृद्यपणे लिहिलं आहे. सुनंदाताईंनी अनेक वर्षं एलआयसीत नोकरी केली. पतीचं अस्थिर क्षेत्र असल्यानं त्यांनी सुरुवातीला नोकरी केलीच; पण नवरा हिंदी चित्रपटसृष्टीत सुपरस्टार व्हिलन झाल्यावरही त्यांनी ही नोकरी सोडली नाही. त्यांच्या तिन्ही मुलींवर त्यांनी उत्तम संस्कार केले. एका सिनेमाच्या प्रीमियरनंतर हे सगळे कुटुंबीय कसे घरी जाऊन पिठलं-भाकरीचं जेवण तयार करून जेवले हे त्यांनी एका प्रसंगात अतिशय खेळकरपणे सांगितलं आहे. अमरापूरकरांचं नाटकवेड, भौतिक सुखांविषयीची काहीशी विरक्त वृत्ती, त्यांचा मित्रांचा गोतावळा, अनेक माणसांचा घरात राबता असा एकूण ‘देशस्थी’ कारभार यावर सुनंदाताई कधी गमतीत, तर कधी काहीसं वैतागून टिप्पणी करतात. अर्थात त्यांचं सदाशिव अमरापूरकरांवर अतिशय प्रेम होतं आणि त्यांनी हे शेवटपर्यंत उत्तम निभावलं. अशा आत्मचरित्रांत अनेकदा ‘आहे मनोहर तरी... गमते उदास’ असा सूर लागण्याचा धोका असतो. सुनंदाताईंच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे, एखादा अपवाद वगळता, त्यांच्या या संपूर्ण पुस्तकात असा रडवा सूर कधीही लागलेला नाही. आपल्याला जे काही मिळालं, ते आपणच निवडलं आहे आणि त्यामुळं त्याविषयी तक्रार करण्याचा आपल्याला काही अधिकार नाही, अशी एक भूमिका त्यांनी घेतलेली दिसते. त्यांच्या या पुस्तकातून विसाव्या शतकातील मध्यमवर्गीय ब्राह्मण घरातील एका तरुणीच्या आशा-आकांक्षांचा, आयुष्यानं दिलेल्या आश्चर्याच्या धक्क्यांचा आणि त्याला सामोरं जाण्यातील धीट दिलदारपणाचा लोभस प्रवास दिसतो. आपली मध्यमवर्गीय मूल्यं जपत, प्रामाणिकपणे व उमेदीनं आयुष्य जगणाऱ्या अनेक महिलांना या पुस्तकात आपल्या जगण्याचं प्रतिबिंब सापडेल. तेच या ‘खुलभर दुधाच्या कहाणी’चं यश आहे. ...Read more

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
प्रभाकर गावंडे, अमरावती

मी विकत घेऊन वाचले आहे हे पुस्तकं, चांगले आहे, नवीन माहिती वाचायला मिळाली.