MOHAN VELHAL

About Author

Birth Date : 23/05/1933
Death Date : 23/05/2002


MOHAN VELHAL WAS BORN ON 23 MAY 1933. IN TODAYS COMPUTER AGE, NAILING IN A PRINTING PRESS HAS BECOME A THING OF THE PAST. A FILM OR A PLAY HAS MANY ACTORS WORKING BEHIND THE SCENES. JUST AS THEIR NAMES DO NOT COME BEFORE THE AUDIENCE, EVEN AFTER A PUBLISHED BOOK, ALTHOUGH MANY HAVE CONTRIBUTED, THE NAME OF THE PUBLISHER, THE AUTHOR AND THE FOREWORD ARE ALWAYS PROMINENT.

ग्रंथ अंतर्बाह्य निर्दोष व सौष्ठवपूर्ण होण्यासाठी कटाक्ष असणारे : *ज्येष्ठ मुद्रितशोधक - मोहन वेल्हाळ.* मराठी भाषा बोलताना, लिहिताना रोजच्या वापरातल्या अनेक शब्दांचे लेखन अनेकांकडून अनेकदा अयोग्य पद्धतीने केले जात असल्याचे दिसते. ग्रंथ किंवा पुस्तक छापतांना ते भाषेच्यादृष्टीने निर्दोष असायलाच पाहिजे यासाठी आपल्या मुद्रकाचाही कटाक्ष असला पाहिजे. डीटीपी, ऑफसेट, बायंडिंग विभाग याच्या बरोबरीने मुद्रित शोधन खूप महत्वाचे आहे. म्हणूनच साहित्य क्षेत्रात मोहन वेल्हाळ हे नाव खूप वलयांकित ठरले आहे. मोहन वेल्हाळ यांचा जन्म 23 मे 1933 रोजी झाला. आजच्या संगणकाच्या जमान्यात प्रिंटिंग प्रेसमधील (मुद्रणालय) खिळे जुळविणे वगैरे प्रकार इतिहासजमा झाले आहेत. एखादा चित्रपट किंवा नाटकात पडद्यामागे काम करणारे अनेक कलाकार असतात. त्यांची नावे प्रेक्षकांसमोर येत नाहीत त्याचप्रमाणे एखाद्या प्रकाशित झालेल्या पुस्तकामागेही अनेकांचे योगदान असले तरी प्रकाशक, लेखक आणि प्रस्तावना लिहिणारे यांचेच नाव पुढे असते. मात्र, वेल्हाळांच्या सारखे मुद्रितशोधक या मागे या आधुनिक काळातही असतातच. पूर्वी लेखक आपले हस्तलिखित प्रकाशकांकडे पाठवीत असत. त्यानंतर पुढची प्रक्रिया सुरू होत असे. पूर्वी या क्षेत्रामधे मनोहर बोर्डेकर, मोहन वेल्हाळ अशा काही तज्ज्ञ मंडळींचा लेखकांनाही आधार वाटत असे. ह्या सगळ्यांचा मराठी भाषेचा, साहित्याचा अभ्यास असे. त्याकाळी ब्लॉकने चाररंगी छपाई करताना अतिशय कौशल्य लागत असे. मोहन वेल्हाळ मुद्रितशोधन तज्ज्ञ असल्याने, कोणताही ग्रंथ अंतर्बाह्य निर्दोष व परिपूर्ण होण्यावर त्यांचा कटाक्ष असे. “श्रीमानयोगी’, “रुचिरा’, “स्वामी’, “राधेय’ या पुस्तकांची संपूर्ण निर्दोष पुनर्निमिती त्यांनी केली. पुस्तकाचे स्क्रिप्ट हाती आल्यावर लेखकाचा आशय, वाचकांची काय प्रतिक्रिया येऊ शकेल, याची उत्तम जाण त्यांना होती. पुस्तकातील आशय महत्त्वाचा असला तरी मांडणी करण्याची जबाबदारी प्रकाशकाकडे यायची. कारण शेवटी पुस्तकाचे मार्केटिंग त्यालाच करायचे असते व यासाठी प्रेसमधील मुद्रितशोधकावर अधिक जबाबदारी येऊन पडत असे. हे काम मोहन वेल्हाळ लीलया पार पाडत असत. त्यांचा साहित्याचा अभ्यास होता. व्याकरण व शुद्धलेखन या गोष्टीही बारकाईने ते पारखून घेत. मुखपृष्ठापासून ते मलपृष्ठाचा कलात्मक दर्जाही बघावा लागत असे. हल्ली सॉफ्टकॉपी तयार असल्यावर त्याची लिपी व लिपीचा आकार बदलणे शक्‍य झाले आहे. चुका दुरुस्त करणेही सोपे झाले आहे. काही भाषांमधील चुका संगणक दाखवितो. या गोष्टी पूर्वी शक्‍य नव्हत्या. खिळे जुळविण्याचे क्‍लिष्टकाम पूर्वी करावे लागे. एक पान झाल्यावर त्याची नमुना प्रिंट घेऊन त्यातील चुका व मांडणी यावर वेल्हाळ काम करीत असत. मुद्रितशोधक म्हणजे काय? हे अनेकांना माहीतही नाही. आज त्यांची ओळख देताना पुस्तक प्रकाशनापूर्वी किती अवघड प्रक्रियेतून जाते हे वाचकांना समजून येईल. मराठी भाषा बोलताना, लिहिताना रोजच्या वापरातल्या अनेक शब्दांचे लेखन अनेकांकडून अनेकदा अयोग्य पद्धतीने केले जात असल्याचे दिसते. ग्रंथ किंवा पुस्तक छापतांना ते भाषेच्यादृष्टीने निर्दोष असायलाच पाहिजे यासाठी आपल्या मुद्रकाचाही कटाक्ष असला पाहिजे. आज २३ मे, त्यांचा जन्मदिवस... म्हणूनच मोहन वेल्हाळ यांनी मुद्रण क्षेत्राला दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना त्रिवार अभिवादन ! 🌿 _(या संकलित पोस्टसाठी संदर्भ : दै. प्रभात, माधव विद्वांस)_
Sort by
Show per page
Items 1 to 3 of 3 total
GULZAR COMBO SET - 4 BOOKS Rating Star
Add To Cart INR 425
HITOPADESH STORIES 4 BOOKS SET Rating Star
Add To Cart INR 270
RAVIPAR Rating Star
Add To Cart INR 200

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
डॉ. जयंत वडतकर.अमरावती

मेळघाटचा एन्सायक्लोपिडीया असलेले निवृत्त वनाधिकारी श्री. रविंद्र वानखडे यांच्या अनुभवांवर आधारित कुलामामाच्या देशात हे पुस्तक वाचले तेव्हापासून या पुस्तकाचे लेखक श्री. जी. बी. देशमुख यांना भेटण्याची इच्छा होती. इच्छाशक्ती असली की योग जुळून येतो असं महणतात. रविंद्र वानखडे सरांच्या माध्यमातूनच तो योग जुळून आला. माझ्या एक पुस्तकाचे प्रकाशन बाबत वानखडे सरांशी चर्चा करीत असताना त्यांनी लेखकाचा संदर्भ दिला व जी.बी. ना भेटून घ्या असे सांगितले. भेट घडून आली. अगदी सहज, घरगुती भेट झाली, गप्पा रंगल्या. यावेळी जी. बी. देशमुख यांनी त्यांचे पहिले पुस्तक महारुद्र मला भेट दिले. आमच्या चर्चेतून आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉल मथला मराठमोळा झंझावात महारुद्र, हे या पुस्तकाचे शीर्षक वाचून पुस्तकाचा विषय थोडक्यात समजला. लेखकाचे वडील भीमराव देशमुख यांनी फुटबॉलपटू म्हणून गाजविलेल्या कारकीदींचा आढावा या पुस्तकात होता. एका मुलाने आपल्या वडिलांवर लिहिलेले पुस्तक कसे असेल? असा प्रश्न अन पुस्तक, दोन्ही घेऊन घरी आलो. भेट मिळालेले पुस्तक वेळ मिळाला तसे एका बैठकीत वाचून काढले. आता गल्ली गल्लीत जसं क्रिकेट खेळल्या व बघितले जाते तसं स्वातंत्र्य पुर्व काळात वऱ्हाडात फुटबॉल खेळला जात असे. गावागावांत टीम असायच्या, सामने अर्थात स्पर्धा भरवल्या जात असत. स्वातंत्र्यपूर्व काळात अशाच रुपयांमधून चमकत, वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील एका खेळाडूने थेट मुंबईतील फुटबॉल क्लब व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मुसंडी मारत आपल्या खेळाचा व व्यक्तीमत्त्वाचा ठसा उमटविला होता. तो काळ होता १९३० ते १९५० चा. त्या वल्लीचे नाव होतं भिमराव देशमुख. जी. बी. देशमुख यांनी त्यांच्या वडिलांवर लिहिलेले महारुद्र पुस्तक काही फक्त भिमराव देशमुख यांची जीवन चरित्र नाही. स्वातंत्र्य मिळण्याच्या साधारण वीस वर्षा पुर्वी ३० ते ५० च्या दशकात आपल्या देशातील खेळाची स्थिती कशी होती. विशेषतः वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील स्थिती कशी होती. कुठले खेळ खेळले जात असत. स्पर्धा कशा भरवल्या जात असत. शाळा आणि शिक्षण कसं होतं. आर्थिक स्थिती कशी होती. अमरावती जिल्ह्यातील कोणत्या गावात फुटबॉलच्या नावाजलेल्या टीम होत्या. अमरावती कशी होती याची माहिती सुद्धा या पुस्तकातून वाचायला मिळते. पुस्तकाच्या पहिल्याच प्रकरणात भीमराव यांचे व्यक्तिमत्व कसं होतं हे सांगण्यासाठी लेखकाने बाबा म्हणून जरी त्यांची ओळख करून दिली असली तरी पुढील सर्व प्रकरणातून त्यांनी भीमराव अशा एकेरी उल्लेखातून हे व्यक्तिमत्व साकारले आहे. वऱ्हाडातल्या आपल्या सवयीनुसार प्रसिद्धी पासून दूर राहिलेल्या एका नामवंत फुटबॉलपटूची कारकीर्द व फुटबॉल पश्चात कौटुंबिक कारकीर्द तटस्तपणे मांडण्यात लेखक यशस्वी झाले आहेत हे आधीच सांगून टाकतो. अमरावती जिल्ह्यातील खारतळेगाव येथील फुटबॉलच्या टीम मध्ये भीमराव देशमुख यांची कारकीर्द सुरु झाली. ती १९३० सालापासून त्यावेळी ते जेमतेम विशीत होते. प्रथम शालेय स्पर्धापासून पुढे क्लब स्पर्धा पासून भीमरावने आपल्या खेळाचा ठसा उमटविला हळूहळू ख्याती विदर्भांत पोहोचली, भीमराव यांचा खेळ बघण्यासाठी लोक खास वेळ काढून येऊ लागेल, १९३८-३९ मध्ये विदर्भात झालेल्या काही स्पर्धात मुबंईच्या काही टीम सहभागी झाल्या होत्या, त्यामुळे नावाजलेल्या ब्रिटीश खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळाली. मुंबईच्या इंग्रजांच्या टीमला वऱ्हाडातील भीमराव यांच्या टीमने हरविले. वायएमसिए, मुंबईच्या अलेक्झांडर नावाच्या कप्तानाने भीमरावच्या खेळाने प्रभावित होऊन खारतळेगावच्या चार खेळाडूंना मुंबईच्या टीम कडून खेळण्याचे निमंत्रण दिले. १९४० ला भीमराव सह चार खेळाडू मुंबईत पोहोचले. अलेक्झांडरने त्यांना सराव शिबिरीत घातले. पुढील वर्षात भीमराव वायएमसिए टीम कडून खेळण्यासाठी करारबद्ध झाले. जशा आयपीएल मध्ये आज वेगवेगळ्या टीम खेळतात तसे त्यावेळी मुंबईत फुटबॉलचे क्लब होते. पुढील १० वर्षे अनेक टीम कडून खेळत अनेक स्पर्धा गाजविल्या. भीमराव यांचेवर तेव्हाच्या इंग्रजी वृत्तपत्रांतून रकाने छापले जाऊ लागले. मुंबईतील आपल्या १२ वर्षाच्या कार्यकाळात क्लब स्पर्धामधून त्यांनी ४०० सामने खेळले, तब्बल २५० गोल मारलेत. भीमराव वेगवेगळ्या स्पर्धामधून खेळत मैदान गाजवत होते. त्यातूनच १९४८ च्या ऑलम्पिक स्पर्धेच्या टीम मध्ये निवड झाली मात्र एका सराव सामन्यात पाय फॅक्चर झाल्याने देशाकडून खेळण्याची संधी हुकली. पुढील वर्षात भीमराव हे भारतीय टीम सोबत मलेशिया, कंबोडिया, इंडोनेशिया, म्यानमार, फिलिपिन्स, हाँगकाँग, थायलंड अशा देशात खेळले, या दौऱ्यातील २० पैकी १९ सामने जिंकले. भीमराव आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू झाले होते. इतके खेळून भीमराव यांचेकडे आर्थिक नियोजन नसल्याने परिस्थिती जेमतेमच होती. अशातच १९५१ साली त्यांनी निवृत्ती घेतली. अमरावती मध्ये परत आल्यावर त्यांनी आपला संसार थाटला, आर्थिक पाठबळ नसल्याने फुटकळ व्यवसाय केले. मात्र मी कधीकाळी आंतरराष्ट्रीय खेळाडू होते याचा कधी उल्लेख सुद्धा केला नाही, प्रसिद्धी पासून ते कायमच दूर राहिले. या काळात भीमराव यांच्या पत्नी अंजीरा यांनी जबाबदारीनं संसार सांभाळला. मुलांना मोठे केले. भीमराव शेवटपर्यंत मेहनत करीत राहिले. समाजात चांगले स्थान निर्माण केले. मात्र ते इतके मोठे फुटबॉलपटू होते ते अमरावतीकरांना काही माहिती झाले नाही. भीमराव यांच्या निधनानंतर या आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूचे कार्य पुढील पिढीला माहित व्हावे या उद्देशाने जी. बी. देशमुख यांनी या पुस्तकातून आपल्या तीर्थरुपांचे भावचित्र अगदी सोप्या सरळ भाषेत शब्दबद्ध करून महारुद्र च्या रूपाने वाचकांसमोर ठेवले. या लिखाणासाठी त्यांनी मुंबईत जाऊन त्या काळातील टाईम्स वृत्तपत्रांतील भीमराव यांचा उल्लेख असलेली कात्रणे मिळविली, त्यांच्या समवेत खेळलेल्या खेळाडूंना व पत्रकारांना भेटले, अमरावती मधील त्यांच्या समवयस्क परिचितांकडून त्यांची माहिती गोळा केली. त्यासाठी त्यांनी अथक अशी मेहनत घेतली. व २००५ साली हे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकाच्या पुढील आवृत्ती मेहता प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केल्याने ते पुस्तक महाराष्ट्रभर पोहोचले. या निमित्त्याने भीमराव यांचे कार्य, त्यांचा फुटबॉल खेळातील झंझावात मराठी माणसाला माहिती झाला. अमरावतीकर या नात्याने मला तर आपल्या मातीतील माणूस त्या काळात आंतरराष्ट्रीय पातळीवर झेंडा गाडून आल्याचा अभिमान वाटला. अशा अनेक अर्थाने महारुद्र महत्वाचे आहे. ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
सलिल तांबे

ज्यांना गोष्टींची आवड आहे अशा मुलांसाठी ही मेजवानी आहेच, पण आपल्या पाल्यांमध्ये संवेदनशीलता आणि निसर्गाप्रती आदर जोपासण्यासाठी मोठ्यांनीही हे पुस्तक वाचायला हवे. प्रदूषणाविरुद्ध लहान हातांनी दिलेला लढा असो किंवा निसर्गाचा खरा आनंद पिशवीत भरून आणण्यापक्षा मनात कसा साठवावा, हे सांगणारा दृष्टिकोन असो; हे पुस्तक प्रत्येक वाचकाला समृद्ध करते. पुस्तकातील प्रत्येक कथा संपताना आपल्याला जगण्याकडे बघण्याची एक नवी दृष्टी देऊन जाते. यातलं काही गूढ, काही थरार आणि खूप सारे हळवे प्रसंग अनुभवण्यासाठी तुम्हाला हे पुस्तक स्वतः वाचायलाच हवं. म्हणूनच, आपल्या संग्रही असावा असा हा `हाटूमुटूचा चंद्र` तुम्ही एकदा नक्की अनुभवा! चला तर मग, आपणही शोधूया आपला स्वतःचा ‘हाटूमुटूचा चंद्र’! ...Read more