MOHAN VELHAL

About Author

Birth Date : 23/05/1933
Death Date : 23/05/2002


MOHAN VELHAL WAS BORN ON 23 MAY 1933. IN TODAYS COMPUTER AGE, NAILING IN A PRINTING PRESS HAS BECOME A THING OF THE PAST. A FILM OR A PLAY HAS MANY ACTORS WORKING BEHIND THE SCENES. JUST AS THEIR NAMES DO NOT COME BEFORE THE AUDIENCE, EVEN AFTER A PUBLISHED BOOK, ALTHOUGH MANY HAVE CONTRIBUTED, THE NAME OF THE PUBLISHER, THE AUTHOR AND THE FOREWORD ARE ALWAYS PROMINENT.

ग्रंथ अंतर्बाह्य निर्दोष व सौष्ठवपूर्ण होण्यासाठी कटाक्ष असणारे : *ज्येष्ठ मुद्रितशोधक - मोहन वेल्हाळ.* मराठी भाषा बोलताना, लिहिताना रोजच्या वापरातल्या अनेक शब्दांचे लेखन अनेकांकडून अनेकदा अयोग्य पद्धतीने केले जात असल्याचे दिसते. ग्रंथ किंवा पुस्तक छापतांना ते भाषेच्यादृष्टीने निर्दोष असायलाच पाहिजे यासाठी आपल्या मुद्रकाचाही कटाक्ष असला पाहिजे. डीटीपी, ऑफसेट, बायंडिंग विभाग याच्या बरोबरीने मुद्रित शोधन खूप महत्वाचे आहे. म्हणूनच साहित्य क्षेत्रात मोहन वेल्हाळ हे नाव खूप वलयांकित ठरले आहे. मोहन वेल्हाळ यांचा जन्म 23 मे 1933 रोजी झाला. आजच्या संगणकाच्या जमान्यात प्रिंटिंग प्रेसमधील (मुद्रणालय) खिळे जुळविणे वगैरे प्रकार इतिहासजमा झाले आहेत. एखादा चित्रपट किंवा नाटकात पडद्यामागे काम करणारे अनेक कलाकार असतात. त्यांची नावे प्रेक्षकांसमोर येत नाहीत त्याचप्रमाणे एखाद्या प्रकाशित झालेल्या पुस्तकामागेही अनेकांचे योगदान असले तरी प्रकाशक, लेखक आणि प्रस्तावना लिहिणारे यांचेच नाव पुढे असते. मात्र, वेल्हाळांच्या सारखे मुद्रितशोधक या मागे या आधुनिक काळातही असतातच. पूर्वी लेखक आपले हस्तलिखित प्रकाशकांकडे पाठवीत असत. त्यानंतर पुढची प्रक्रिया सुरू होत असे. पूर्वी या क्षेत्रामधे मनोहर बोर्डेकर, मोहन वेल्हाळ अशा काही तज्ज्ञ मंडळींचा लेखकांनाही आधार वाटत असे. ह्या सगळ्यांचा मराठी भाषेचा, साहित्याचा अभ्यास असे. त्याकाळी ब्लॉकने चाररंगी छपाई करताना अतिशय कौशल्य लागत असे. मोहन वेल्हाळ मुद्रितशोधन तज्ज्ञ असल्याने, कोणताही ग्रंथ अंतर्बाह्य निर्दोष व परिपूर्ण होण्यावर त्यांचा कटाक्ष असे. “श्रीमानयोगी’, “रुचिरा’, “स्वामी’, “राधेय’ या पुस्तकांची संपूर्ण निर्दोष पुनर्निमिती त्यांनी केली. पुस्तकाचे स्क्रिप्ट हाती आल्यावर लेखकाचा आशय, वाचकांची काय प्रतिक्रिया येऊ शकेल, याची उत्तम जाण त्यांना होती. पुस्तकातील आशय महत्त्वाचा असला तरी मांडणी करण्याची जबाबदारी प्रकाशकाकडे यायची. कारण शेवटी पुस्तकाचे मार्केटिंग त्यालाच करायचे असते व यासाठी प्रेसमधील मुद्रितशोधकावर अधिक जबाबदारी येऊन पडत असे. हे काम मोहन वेल्हाळ लीलया पार पाडत असत. त्यांचा साहित्याचा अभ्यास होता. व्याकरण व शुद्धलेखन या गोष्टीही बारकाईने ते पारखून घेत. मुखपृष्ठापासून ते मलपृष्ठाचा कलात्मक दर्जाही बघावा लागत असे. हल्ली सॉफ्टकॉपी तयार असल्यावर त्याची लिपी व लिपीचा आकार बदलणे शक्‍य झाले आहे. चुका दुरुस्त करणेही सोपे झाले आहे. काही भाषांमधील चुका संगणक दाखवितो. या गोष्टी पूर्वी शक्‍य नव्हत्या. खिळे जुळविण्याचे क्‍लिष्टकाम पूर्वी करावे लागे. एक पान झाल्यावर त्याची नमुना प्रिंट घेऊन त्यातील चुका व मांडणी यावर वेल्हाळ काम करीत असत. मुद्रितशोधक म्हणजे काय? हे अनेकांना माहीतही नाही. आज त्यांची ओळख देताना पुस्तक प्रकाशनापूर्वी किती अवघड प्रक्रियेतून जाते हे वाचकांना समजून येईल. मराठी भाषा बोलताना, लिहिताना रोजच्या वापरातल्या अनेक शब्दांचे लेखन अनेकांकडून अनेकदा अयोग्य पद्धतीने केले जात असल्याचे दिसते. ग्रंथ किंवा पुस्तक छापतांना ते भाषेच्यादृष्टीने निर्दोष असायलाच पाहिजे यासाठी आपल्या मुद्रकाचाही कटाक्ष असला पाहिजे. आज २३ मे, त्यांचा जन्मदिवस... म्हणूनच मोहन वेल्हाळ यांनी मुद्रण क्षेत्राला दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना त्रिवार अभिवादन ! 🌿 _(या संकलित पोस्टसाठी संदर्भ : दै. प्रभात, माधव विद्वांस)_
Sort by
Show per page
Items 1 to 3 of 3 total
GULZAR COMBO SET - 4 BOOKS Rating Star
Add To Cart INR 425
HITOPADESH STORIES 4 BOOKS SET Rating Star
Add To Cart INR 270
RAVIPAR Rating Star
Add To Cart INR 200

Latest Reviews

रुपाली सोनवणे

#रुक #जाना #नही लेखक: Dr. भावेश भाटिया शब्दांकन: Dr: सचिन पाचोरकर अनुवाद: सुप्रिया वकील ​अंथरून पाहून पाय पसरावे... अह्ह.. त्या निर्जीव अंथरुणासाठी आपल्या सजीव पावलांना का त्रास द्यावा? असेच एक जबरदस्त आत्मचरित्र वाचून संपवलं आणि एक ऊर्जा निर्माणकरून गेलं, पुस्तकाचं नाव आहे `रुक जाना नहीँ ​डॉ. भावेश भाटिया यांची ही प्रेरणादायी कहाणी. शाळेत असताना आलेलं अकाली अंधत्व आणि त्यानंतर खडखडीत खडतर जीवनाचा सुरू झालेला प्रवास, पण या प्रवासात खचलेल्या बालमनाला त्यांच्या आईने दिलेलं बळ, प्रेरणा व आत्मसन्मानाची शिकवण आणि स्वाभिमानाचे धडे लेखकास पुरे होते. हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. चांगल्या धडधाकट व्यक्तीवर संकट आल्यावर दूर दूर पळणारे नातलग, मित्र परिवार, जातभाई... दृष्टी गेलेल्या व्यक्तीस कितपत आधार देतील? पण एक ऑपरेटर ते एक उद्योजक, `सनराईज कॅण्डल`चा विस्तार आणि स्वतःबरोबर अनेक दृष्टिहीन व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभं करून रोजगार देणारा हा अवलिया किती अडथळे पार करून आलाय हे जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचायला हवंच. ​कुठलाही वशीला नाही की कोणाची सहानुभूती नाही, स्वबळावर विविध प्रयोग करत उद्योग यशस्वी करणं सोपं नाही. यात ज्या ज्या देवमाणसांनी हातभार लावला त्यांचा पण उल्लेख आहे, पण त्या देवमाणसांनी देखील कधीच उपकारिक भाषा न करता व स्वाभिमान न दुखावता कशी मदत करता येऊ शकते हे त्यांच्या कृतीतून दाखवून दिलंय. लेखक फक्त उद्योग उभारून थांबले नाहीत तर त्यांनी सामाजिक जाणीवेचं भान देखील ठेवलंय. महाबळेश्वरमध्ये सनराईज कॅण्डल नावाने त्यांनी भव्य असा उद्योग परिसर आणि म्युझियम सुरू केलंय, तेथे अनेक दृष्टिहीन व्यक्तींना रोजगार मिळाला आहे त्याचबरोबर सर्वजण स्वाभिमानाने कष्ट करून जगत आहेत. हजारो आयुष्य त्यांनी उजळून टाकली आहेत. दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार सह एकून 46 पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.विशेष म्हणजे सर्व पुरस्कार त्यांच्या योग्यतेनुसार दिले आहेत.. आणी अशा हजारो पुरस्कारांचे ते मानकरी आहेत असंच वाटत..त्यांच्या कामाची दखल रिलायन्स ग्रुप ने देखील घेतली आहे.व त्यांच्या पुस्तकास प्रस्तावना देखील नीता अंबानी यांनी दिली आहे.उद्योग करताना छोट्या छोट्या गोष्टी कसा प्रभाव करतात याच वर्णन देखील त्यांनी लिहिल आहे.. ​या कार्यात महत्त्वाचं योगदान त्यांच्या धर्मपत्नी नीता भाटिया यांनी दिलं आहे. दूरदृष्टी ठेवून आपल्या पतीस प्रोत्साहन देऊन, नवीन कल्पनेसह पाठिंबा देऊन त्यांना हुरूप देण्याचं काम त्यांनी केलंय. नीता भाटिया यांचं कर्तृत्व, त्यांचं पवित्र निस्वार्थी प्रेम या पुस्तकातून वाचताना आंतरिक वेगळी ऊर्जा मिळते. कलियुगातील देवी हा शब्द व मान त्यांना समर्पक वाटतो. पुस्तक सर्व वयोगटातील वाचक वाचू शकतात. मनाने खचलेल्या पण शरीराने धडधाकट असलेल्या प्रत्येक व्यक्तीने वरील पुस्तक नक्की वाचावं आणि आत्मसात करावं. एवढ्या उंचीवर असूनही जमिनीवर पाय असलेल व्यक्तिमत्व आहे. अगदी प्रेमळ पणे वागण बोलण सन्मान देण..ही दैवी देणगी त्यांच्या जवळ आहे. ...Read more