* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: BANJARYACHE GHAR
  • Availability : Available
  • ISBN : 9788177663235
  • Edition : 2
  • Publishing Year : JANUARY 2003
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 192
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
"A HOUSE, A DEFINITE FORM GIVEN TO SPACE BY MAN. HUMANS BUILT HOUSES ON EARTH AND STARTED RESIDING IN THEM. SINCE THEN, OUR DWELLING HAS HAD A SPECIAL PLACE IN OUR MINDS. THE STRONG RELATION BETWEEN A HOUSE AND A PERSON HAS EVER SINCE BEEN PRESENT STRENGTHENING IN EACH ERA. FOR THE SAKE OF PROTECTION, MAN FIRST BUILT A CLAY HOUSE. TO PROTECT THE SOUL, MAN CONSIDERED HIS BODY AS THE ABODE. SINCE THEN, THE SOUL HAS BEEN SUPPORTING THE BODY. THE HOUSE HAS ALWAYS HELPED TO SUSTAIN ON EARTH WHEREAS THE SOUL HAS HELPED TO REMAIN FIRM. WITHOUT HOUSE AND SOUL, A PERSON BECOMES HELPLESS. HENCE, A HUMAN MIND ALWAYS SEEKS A HOUSE AND THE SOUL. A HOUSE ENVELOPES US FROM WITHIN AND FROM OUTSIDE. HENCE A HOUSE HAS EXTREMELY IMPORTANT PLACE IN OUR LIFE. LIKEWISE, THE IMAGES OF HOUSE ARE VITAL FOR US, BE IT OUR PHYSICAL SURROUNDING OR OUR IMAGINARY WORLD. (AN EXCERPT FROM ‘GHARACHI ADIPRATIMA ANI NATSAMRAT MADHIL GHAR’-PROF. GANGADHAR PATIL; NATSAMRAT-SAMIKSHA-EDITED BY PROF. G. T. PATIL) "
घर हे मानवस्पर्शी अवकाशाचे एक रेखीव रूप. माणसाने पृथ्वीवर घर बांधले व तो घरात राहू लागला. तेव्हापासून हे राहते घर मानवी मनात `घर करून` राहू लागले. आणि त्याच क्षणी या घराचे आणि मनाचे अगदी पहिले नाते जुळले - आणि युगायुगातून ते वाढत राहिले. मानवाने आपल्या देहाच्या रक्षणासाठी मातीचे घर बांधले आणि आपल्या आत्म्या च्या निवासासाठी स्वतःच्या देहाचेच घर उभारले. या देहामन्दिरातच मानवी आत्म्याला पहिला निवास मिळाला. तेव्हापासून मानवी आत्मा माणसाला आधार देत आला आहे. या अनंत अवकाशाच्या पोकळीत घराणेच माणसाला आधार दिला. घराप्रमाणेच आत्मा हा माणसाला दुसरा आधार लाभला. घराशिवाय व आत्म्याशिवाय माणूस निराधार, परत्मा होईल. पोरका, एकाकी पडेल. म्हणूनच माणसाला जशी घराची एक मूलभूत ओढ असते. तशीच त्याला आपल्या आत्म्याची, स्वस्था ची पण मूलभूत ओढ असते. घर हे माणसाला आतून व बाहेरून ओढीत व वेढीत असते. म्हणून मानवाच्या भावस्रुष्टीत व प्रतीकस्रुष्टीत मनाला व आत्म्याला साकार करताना-या घराच्या आदिबंधरूप प्रतिमांना महत्वाचे स्थान आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #BANJARYACHEGHAR #BANJARYACHEGHAR #बंजाऱ्याचेघर #SHORTSTORIES #MARATHI #YASHODHARAKATKAR "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKMAT 09-01-2005

    यशोधरा भोसले यांचा ‘बंजाऱ्याचे घर’ हा ललित लेखसंग्रह विविध गुणांनी संपन्न आहे. प्रसिद्ध लेखिका माधवी देसाई यांच्या या कन्या. या संग्रहातील पाचही लेख यशोधरा भोसले यांचे वास्तव्य झालेल्या घरासंबंधीच्या आहेत. या लेखामध्ये स्मरणरंजन आहे. आत्मकथन आहे. त्यतून प्रकट होणारी मानसिकता खूप काही सोसून पचवलेल्या प्रगल्भ परिपक्वतेची आहे. घराशी निगडित असलेल्या त्या-त्या वेळच्या भाविश्वात घेऊन जाणारे हे लेख आहेत. आयुष्याच एकेका ठप्प्याशी रेंगाळणारे आहेत. त्या-त्या टप्प्यांवरील व्यक्तींवर लक्ष केंद्रित करणारे आहेत. लेखिकेचे हे पहिलेच पुस्तक असूनही लेखन, वर्णन, शैलीतील सहजता व सफाई लुब्ध करणारी आहे. एका स्त्रीमधून वेगळी दृष्टी या लेखांना लाभली आहे. अनेक रंग या घरांना आणि घरातल्या माणसांना लाभलेले आहेत. कलावंतांचे मन आणि नजर या लेखातील अगणित तपशीलातून दिसते. घराभोवतालच्या निसर्गाची चैतन्यशील रूपे नजरेसमोर येतात, तशीच एखाद्या चित्रकृतीची सौंदर्यस्थळेही सहजपणे शब्दरूप धारण करतात, ‘बंजाऱ्याचे घर’ मधील शेवटचे घर वगळता बाकीच्या सर्व घरांशी लेखिकेचा वैयक्तिक संबंध आल्यामुळे त्यातील तपशीलांना व्यापक संदर्भ लाभलेला आहे. चित्रतपस्वी, भालजी पेंढारकर (आजोबा), लीलाबाई पेंढारकर (आजी), माधवी देसाई-काटकर (आई), काटकर (वडील), मीरा तारळेकर (बहीण), रणजित देसाई (पितृतुल्य दादा), प्रभाकर पेंढारकर (मामा) आणि जाई (कन्या) या कुटुंबीयांसमवेत इतरही व्यक्तींचे उल्लेख येतात. पहिले घर आहे ते गावाकडचे पिढ्यान् पिढ्या पासूनचे शंभर वर्षंचे या घरात पूर्वजांच्या पिढ्या वर्षानुवर्षे वाढल्या. लेखिकेचे या घरात पाय ठेवताच सगळे ताण कमी होऊन जातात. चिडचिड् कमी होते. दुसरे घर भेटते ते माहेरचे गोव्यातले बांदोड्याचे. काटकरांशी लग्न करून गोव्यात आल्यावर येथील सुखासीन जीवनाला उबगलेल्या माधवीताई मुंबईसारख्या शहरात नशीब अजमावायला पतीसह गाव सोडतात. कल्याणजवळच्या मोहोन्याच्या कंपनीच्या क्वार्टरमध्ये चार खोल्यांत हौसेने घर सजवतात. परंतु काटकरांच्या मृत्यूनंतर आणि रणजित देसार्इंच्या कोवाडच्या घरातून बाहेर पडल्यावर, बेळगावमधल्या अल्प वास्तव्यानंतर आपल्या मूळ सासरच्या घरी गोमंतकात येण्याचा निर्णय माधवी घेतात आणि वर्षानुवर्षे बंद असलेल्या बांदोड्यातल्या देवळाच्या परिसरातल्या या घराला घरपण येते. तिसरे घर आहे ते कोवाडमधले रणजित देसाई यांचा खानदानी वाडा. काटकरांच्यानंतर रणजित देसाई लेखिकेचे वडील, गुरू, मित्र आणि मार्गदर्शकही बनतात. त्यांच्या बद्दलचे मनोभाव येथे संयतपणे प्रकट झाले आहेत. चौथे घर आहे ते चित्रकार रमेशच्या स्टुडिओमधले.’ ‘१२ ए-रेशम’ हा टेन परसेंट कोट्यातील फ्लॅट लेखिकेला मिळालेला असतो. या फ्लॅटमध्ये राहताना त्या घराचे आणि आपले सूर चांगले जुळून आल्याचे समाधान त्यांच्या लेखामधून व्यक्त होते. अशाप्रकारे एक प्रदीर्घ प्रवास या घरांद्वारे लेखिकेप्रमाणेच वाचकांनाही घडतो. -प्रा. शिवाजी पाटील ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 23-03-2003

    स्त्री मनाचा गुंता उकलणारं ललित लेखन... ‘घर’ या विषयाभोवती घुटमळणाऱ्या ललित लेखांचं पुस्तक आहे ‘बंजाऱ्याचे घर’. यशोधरा भोसलेंनी ते लिहिलं. पुस्तकात ‘घर’ विषयाची एक कथाही आहे. शेवटी ‘कुणी घर देता कां घर?’ असा टाहो फोडणाऱ्या नटसम्राटाची आंतरिक घालमेल ेऊन येणारं हे पुस्तक ‘घर’ या विषयाशी जोडलेल्या स्त्री मनाचा गुंताही उकलतं. व्हर्जिनिया वुल्फनी ‘ए रूम ऑफ वन्स ओन’ची कल्पना मांडली होती. पंजाबी कवयित्री अमृता प्रीतमनी तीच कल्पना ‘चौथा कमरा’ म्हणून स्पष्ट केली आहे. शांताबाई शेळकेंनी ‘चोली का अपना दामन’ म्हणून समाजाच्या आसमंतातील स्त्री मनाचा अवकाश वर्णिला होता. यशोधरा भोसले आजोळ, माहेर, सासर, मित्र अशी घरांची स्थित्यंतरं अनुभवतात. जीवनात कोसळलेलं आकाश पेलत यशोधरा भोसले आपलं आकाश, अंगण, आसमंत निर्माण करतात. जीवनातल्या प्रतिकूल क्षणी आपली असणारी माणसं जेव्हा दुरावतात तेव्हा दगडमातीची निर्जीव वाटणारी घरंच ऊब देतात. कधी काळी स्वत: बंजारा असलेला मुख्यमंत्री यशोधरा भोसलेंसारख्या निराधार परागंदा स्त्रीस मुख्यमंत्र्यांच्या कोट्यातून देतो तेव्हा ती आई-बाबांची पुण्याई म्हणूनच; पण या साऱ्या प्रवासात लेखिकेस सावरतात ती घरंच तेच तिचे खरे गणगोत. ‘बंजाऱ्याचे घर’ जीवनाच्या अवघड वळणावर स्त्रीस बळ देणाऱ्या घराच्या घरंदाजपणाची स्वगतंच होतं! घर बोलतंय की, लेखिका असा कधी कधी भ्रम पडावा अशा एकात्मिक लालित्याने लिहिलेले घरांसंबंधी ललित लेख वाचताना वाचकाला स्वत:चं घरदेखील मनी-मानसी बोलू-डोलू लागल्याच्या अपसूक भास होऊ लागतो. हे असतं यशोधरा भोसले यांच्या ललित नि संवेदी शैलीचं यश. पुस्तक वाचताना लेखिका कधी काळी उभारीच्या वयात इंग्रजीमय झाली होती. हे खरं नाही वाटत. साऱ्या घरांच्या वर्णनामागे एक अंधुक, अलिखित सूत्र जाणवतं. जागतिकीकरणाच्या कचाट्यात सापडलेल्या घरानं मनुष्यपण मारलं, हवा, पाणी, परिसर, विद्रूप, विरूप होऊ लागलेला आहे. अशा स्थितीत घराचं घरपण आपण जपलं-जोपासलं तरच सुख-समृद्धी, स्वास्थ्य, संस्कार, संस्कृतीचं पंचशील सुरक्षित राहणार हे समजविणारे हे ललित लेख! सुंदर तितकेच सामाजिक भान देणारे!! ‘बंजाऱ्याचे घर’ लेखिकेनी ऋणमोचन भावनेनं केलेलं लेखन आहे. त्यात कृतज्ञता आहे तशी कणवही. गावाकडचं घर पहिल्या भेटीतच आपलं होतं. कौलारू, कृष्णवेलींनी वेढलेलं. आजीच्या मायेनं मंतरलेलं हे मातृधर्मी घर. म्हणूनच लेखिकेला त्याचं कोण अप्रूप? घर आपलं असलं की, यायला निमित्त नाही लागत. ते नित्यनेमाने आपणाकडे आपल्या माणसांना ओढत राहतं. जंगलाच्या कुशीत दडलेलं हे घर. या घरातली माणसं पण घरासारखीच आतून-बाहेरून एक. साकाळलेलं आयुष्य मोकळं करणारं हे घर लेखिकेला म्हणून तर आप्त, स्वकीय, आत्मीय वाटत. राहतं मावशी, रखवालदार भीम, त्याची मुलं सारी कशी स्वभाव गर्द, मनानं हिरवी स्वभावानं गुलमोहर, बोगनच्या फुलासारखी जर्द! दुसरं घर लेखिकेचं गोव्यातलं आजोळ, बांदोड्याचं सभामंडप, नगारखाना, आगरशाळा, असं ऐसपैस चौसोपी. महालक्ष्मी मंदिराच्या ओवऱ्यांनी वेढलेलं, भट-भिक्षुकांच्या घरांनी घेरलेलं. चिऱ्यांचा गडगा, पाण्याचं तळं... लेखिका घर सजीव करते ती शब्द वर्णनांनी नाही, तर आठवणींच्या शिंपणांनी, पोर्तुगीजी थाटाचं हे घर अगडबंब कुलूप-किल्लीनी; पण प्राचीन असल्याच्या खुणा उठवतं. उतरती कौलं, अर्धगोल महिरपी दरवाजे, खिडक्या, देवळी, दगडं साऱ्यांनी हे घर आपणास केव्हा भूतकाळात घेऊन जातं ते कळलं नाही. खेड्यातलं असलं तर खानदानी कोंदणात वसलेलं नि म्हणून लोभसही! कोवाडचं घर तिसरं. स्वामीकार रणजित देसार्इंचं, हे बांदोड्यासारखच खानदानी घर; पण याची चेहरेपट्टी वेगळी नाही म्हणून तरी कर्नाटकी मुलखाच्या सीमेवर वसलेलं. या घरानं लेखिकेचं हरवलेलं मराठीपण बहाल केलं. भाषा, साहित्य, कलेचे संस्कारांनी भरलेलं घर. पायाखालची वाळू सरकलेल्या भुसभुशीत दिवसात मायमराठीबरोबर याच घरानी सुप्त कलेचे धुमारे फुलवले. आपल्या रणजितदादांचं तुटलेपण लेखिकेनं अनुभवलं ते हेच घर. साऱ्या विस्कटलेल्या आयुष्याचे धागेदोरे जोडणारे हे घर; पण कसं सुन्न ...मौन ...‘यार की कोई खबर लाता नही’ असं काव्यात्मक, भावस्पर्शी शीर्षक देऊन यशोधरा भोसले यांनी एका उद्ध्वस्त जीवनाची अबोल करुण कहाणीच पेश केली आहे. ‘कोलाज हे चौथं घर. कोलाज ही एक चित्रशैली. आपल्या ठिगळ जोडीच्या आयुष्यात भेटलेल्या चित्रकार मित्राचं हे घर. मुकुंदनगर, चेंबूर, मुंबईचा परिसर ज्यांना माहिती आहे त्यांना कोलाज वाचताना लेखिकेच्या निरीक्षण नि:शब्द सामर्थ्याची कल्पना यावी. ‘बंजाऱ्याचे घर’ पुस्तक म्हणजे चित्रशैलीचा सुंदर नमुना. या पुस्तकाचं सारं सौंदर्य शैलीत सामावलंय. पत्ता हरवलेल्या घराआधीचं ‘१२-ए रेशम’ हे घर महानगरातील फ्लॅट संस्कृतीचं व्यवच्छेदक रूप. पैसा, प्रतिष्ठा सर्वत्र असलेल्या महानगरात मुख्यमंत्री मोठा की बिल्डर? मुख्यमंत्री कोट्यातील घर मिळवण्याचं दिव्य पार केल्यानंतर मिळालेलं हे घर लेखिकेला आपली जागा, आपलं जग मिळवून देत. या पुस्तकातील प्रत्येक लेखास लाभलेली सूचक, समर्पक, शीर्षकं या पुस्तकाचं आगळं वैशिष्ट्य. या प्रत्येक कथात्मक लेखाच्या सुरुवातीस व शेवटी मनोज आचार्य यांची रेखाटनं पुस्तकास बोलकी करतात. पुस्तकाच्या मुखपृष्ठात हिरवे, निळे, पिवळे जर्द रंग ओतून निसर्गाचं गहिरंपण चित्रकारांनी असं चित्रित केलंय की, त्या घरांची ओढ वाचकांना दाटून आल्याशिवाय राहत नाही. ‘बंजाऱ्याचे घर’मधील ‘पत्ता हरवलेलं घर’ ही एक स्वतंत्र कथा आहे. कथेची विषयक पार्श्वभूमी घर असली तरी दोन पुरुषांमधील वैशिक संबंधांची ही कथा. एक गंभीर विषय पेलणारी कहाणी. कथात्मक ललित लेखांबरोबर देणं औचित्यपूर्ण खचितच नाही. लेखिकेनं संग्रहभर कथा होईपर्यंत या कथेसाठी थांबायला हवं होतं. हे पुस्तक सदरचा अपवाद वगळता समाज व व्यक्तीसंबंधांची ललित अंगांनी केलेली मांडणी असली, तरी त्यामागची सल सतत वाचकास अस्वस्थ करत राहते. ...Read more

  • Rating StarJyotsna Aphale

    हे पुस्तक वाचले आहे अप्रतिम

  • Rating StarSharmila Phadke

    माझं अत्यंत आवडीचं पुस्तक

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KHULBHAR DUDHACHI KAHANI
KHULBHAR DUDHACHI KAHANI by SUNANDA AMRAPURKAR Rating Star
श्रीपाद ब्रह्मे

नुकतंच असंच वेगानं वाचून संपवलेलं दुसरं पुस्तक म्हणजे सुनंदा अमरापूरकर यांचं ‘खुलभर दुधाची कहाणी’. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या त्या पत्नी. अर्थात ही काही त्यांची एकमेव ओळख नव्हे. एक चांगल्या अभिनेत्री, उत्तम अनुवादक म्हणूनही त्या ्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘खुलभर दुधाची कहाणी’ या आत्मचरित्रवजा लेखनातून त्यांच्या जगण्याचा व्यापक पट अतिशय प्रांजळपणे उलगडला आहे. मला हे पुस्तक विशेष भावण्याचं कारण म्हणजे त्यात आलेलं नगरचं वर्णन. मी स्वत: नगरला फार प्रदीर्घ काळ राहिलो नसलो, तरी ते शेवटी माझ्या जिल्ह्याचं गाव. आणि वयाच्या १३ ते २२ अशा महत्त्वाच्या कुमार व तरुण वयातला माझा तिथला रहिवास असल्यानं नगरच्या आठवणी विसरणं शक्य नाही. सुनंदाताई माझ्या आईच्या वयाच्या. त्यामुळं त्यांच्या लहानपणच्या आठवणी जवळपास माझ्या जन्माच्या २०-२५ वर्षं आधीच्या. असं असलं तरी मी त्या वर्णनाशी, त्या काळातल्या नगरशीही रिलेट होऊ शकलो, याचं कारण मुळात गेल्या शतकात बदलांचा वेग अतिशय संथ होता. नगरसारख्या निम्नशहरी भागात तर तो आणखी संथ होता. त्यामुळं एकूण समाजजीवनात १९६० ते १९९० या तीस वर्षांत तपशिलातले फरक सोडले, तर फार मोठा बदल झाला नव्हता. सुनंदाताई माहेरच्या करमरकर. त्यांचं आजोळ‌ सातारा असलं, तरी त्या जन्मापासून नगरमध्येच लहानाच्या मोठ्या झालेल्या. अगदी पक्क्या ‘नगरी’ म्हणाव्यात अशा. ( आजही त्या स्वत:ला अभिमानानं ‘नगरकर’च म्हणवून घेतात.) सुनंदाताईंचे वडील त्या दहा वर्षांच्या असतानाच गेले. त्यांना मामांचा आधार होता, पण आईनंच लहानाचं मोठं केलं. तेव्हाचं त्यांचं निम्न मध्यमवर्गीय जगणं, नगरमधले वाडे, तिथलं समाजजीवन, तिथल्या शाळा, शिक्षक, नगरमधील दुकानं, दवाखाने, तिथल्या गल्ल्या, बाजार हे सगळं सगळं सुनंदाताई अतिशय तपशीलवार उभं करतात. नगरसारख्या मध्यम शहरात वाढलेल्या महाराष्ट्रातील कुठल्याही शहरातील त्या काळातील व्यक्तीला अतिशय सहज रिलेट होईल, असं त्यांचं हे जगणं होतं. त्यात सुनंदाताईंचं लेखन अतिशय सहज, सोपं आणि प्रांजळ असल्यामुळं ते आपल्याला अगदी भिडतं. एका प्रख्यात अभिनेत्याची पत्नी असल्यानं त्यांचं जीवन इतर सर्वसामान्य स्त्रियांपेक्षा वेगळं झालं असेल, अशी आपली अपेक्षा असते. सुनंदाताईंच्या लेखनातून या ‘वेगळ्या जीवना’ची काही तरी झलक मिळेल, अशीही आपली एक भूमिका तयार झालेली असते. सदाशिव अमरापूरकरांसारख्या मनस्वी अभिनेत्याशी लग्न झाल्यानंतर सुनंदाताईंचं जगणं बदललंही; मात्र ते वेगळ्या पद्धतीनं. सदाशिव अमरापूरकर ऊर्फ नगरकरांचा लाडका बंडू त्यांना नगरमध्ये शाळेपासून कसा भेटला, नंतर कॉलेजमध्ये दोघांनी एकाच ग्रुपमधील नाटकं कशी सादर केली, त्यात अगदी नकळतपणे त्यांचं प्रेम कसं जमलं आणि नंतर नगर सोडून त्या पतीच्या कारकिर्दीसाठी मुंबईत कशा आल्या हा सर्व नाट्यमय प्रवास सुनंदाताई अतिशय तन्मयतेनं मांडतात. अमरापूरकर मंडळींच्या घराविषयीचे तपशील त्यात येतात. अमरापूरकरांचे वडील दत्तोपंत हे नगरमधलं मोठं प्रस्थ. श्रीमंत घराणं. मोठा वाडा, नोकरचाकर वगैरे. त्या तुलनेत सुनंदाताईंची माहेरची परिस्थिती जेमतेम म्हणावी अशी. अशा परिस्थितीत हे लग्न झालं आणि त्या अमरापूरकरांची सून झाल्या, इथपर्यंत पुस्तकाचा निम्मा प्रवास (मध्यंतरच) होतो. पुढल्या दोनशे पानांत आपल्याला खऱ्या अर्थानं सदाशिव अमरापूरकर हे काय व्यक्तिमत्त्व होतं, हे उलगडत जातं. अमरापूरकरांनी शेवटपर्यंत त्यांची मध्यमवर्गीय राहणी व मध्यमवर्गीय मूल्यं सोडली नाहीत. ‘अर्धसत्य’सारख्या सिनेमामुळं एका रात्रीतून ते भारतभरात प्रसिद्ध झाले. या एका ओळखीमुळं अमरापूरकरांचं जीवन पूर्ण बदलून गेलं. तोपर्यंत असलेली आर्थिक ओढगस्तीही संपली. हिंदी चित्रपटसृष्टीत अगदी स्वप्नवत अशा रीतीनं ते मोठे स्टार झाले. एकापाठोपाठ एक खलनायकी भूमिका त्यांच्याकडं येऊ लागल्या. पैसा येऊ लागला. अशा परिस्थितीत एक मध्यमवर्गीय कुटुंब या सगळ्या धबधब्याला कसं तोंड देतं आणि आपली मूल्यं कायम जपत राहतं, हे सुनंदाताईंनी फार हृद्यपणे लिहिलं आहे. सुनंदाताईंनी अनेक वर्षं एलआयसीत नोकरी केली. पतीचं अस्थिर क्षेत्र असल्यानं त्यांनी सुरुवातीला नोकरी केलीच; पण नवरा हिंदी चित्रपटसृष्टीत सुपरस्टार व्हिलन झाल्यावरही त्यांनी ही नोकरी सोडली नाही. त्यांच्या तिन्ही मुलींवर त्यांनी उत्तम संस्कार केले. एका सिनेमाच्या प्रीमियरनंतर हे सगळे कुटुंबीय कसे घरी जाऊन पिठलं-भाकरीचं जेवण तयार करून जेवले हे त्यांनी एका प्रसंगात अतिशय खेळकरपणे सांगितलं आहे. अमरापूरकरांचं नाटकवेड, भौतिक सुखांविषयीची काहीशी विरक्त वृत्ती, त्यांचा मित्रांचा गोतावळा, अनेक माणसांचा घरात राबता असा एकूण ‘देशस्थी’ कारभार यावर सुनंदाताई कधी गमतीत, तर कधी काहीसं वैतागून टिप्पणी करतात. अर्थात त्यांचं सदाशिव अमरापूरकरांवर अतिशय प्रेम होतं आणि त्यांनी हे शेवटपर्यंत उत्तम निभावलं. अशा आत्मचरित्रांत अनेकदा ‘आहे मनोहर तरी... गमते उदास’ असा सूर लागण्याचा धोका असतो. सुनंदाताईंच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे, एखादा अपवाद वगळता, त्यांच्या या संपूर्ण पुस्तकात असा रडवा सूर कधीही लागलेला नाही. आपल्याला जे काही मिळालं, ते आपणच निवडलं आहे आणि त्यामुळं त्याविषयी तक्रार करण्याचा आपल्याला काही अधिकार नाही, अशी एक भूमिका त्यांनी घेतलेली दिसते. त्यांच्या या पुस्तकातून विसाव्या शतकातील मध्यमवर्गीय ब्राह्मण घरातील एका तरुणीच्या आशा-आकांक्षांचा, आयुष्यानं दिलेल्या आश्चर्याच्या धक्क्यांचा आणि त्याला सामोरं जाण्यातील धीट दिलदारपणाचा लोभस प्रवास दिसतो. आपली मध्यमवर्गीय मूल्यं जपत, प्रामाणिकपणे व उमेदीनं आयुष्य जगणाऱ्या अनेक महिलांना या पुस्तकात आपल्या जगण्याचं प्रतिबिंब सापडेल. तेच या ‘खुलभर दुधाच्या कहाणी’चं यश आहे. ...Read more

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
प्रभाकर गावंडे, अमरावती

मी विकत घेऊन वाचले आहे हे पुस्तकं, चांगले आहे, नवीन माहिती वाचायला मिळाली.