* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: BANJARYACHE GHAR
  • Availability : Available
  • ISBN : 9788177663235
  • Edition : 2
  • Publishing Year : JANUARY 2003
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 192
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
"A HOUSE, A DEFINITE FORM GIVEN TO SPACE BY MAN. HUMANS BUILT HOUSES ON EARTH AND STARTED RESIDING IN THEM. SINCE THEN, OUR DWELLING HAS HAD A SPECIAL PLACE IN OUR MINDS. THE STRONG RELATION BETWEEN A HOUSE AND A PERSON HAS EVER SINCE BEEN PRESENT STRENGTHENING IN EACH ERA. FOR THE SAKE OF PROTECTION, MAN FIRST BUILT A CLAY HOUSE. TO PROTECT THE SOUL, MAN CONSIDERED HIS BODY AS THE ABODE. SINCE THEN, THE SOUL HAS BEEN SUPPORTING THE BODY. THE HOUSE HAS ALWAYS HELPED TO SUSTAIN ON EARTH WHEREAS THE SOUL HAS HELPED TO REMAIN FIRM. WITHOUT HOUSE AND SOUL, A PERSON BECOMES HELPLESS. HENCE, A HUMAN MIND ALWAYS SEEKS A HOUSE AND THE SOUL. A HOUSE ENVELOPES US FROM WITHIN AND FROM OUTSIDE. HENCE A HOUSE HAS EXTREMELY IMPORTANT PLACE IN OUR LIFE. LIKEWISE, THE IMAGES OF HOUSE ARE VITAL FOR US, BE IT OUR PHYSICAL SURROUNDING OR OUR IMAGINARY WORLD. (AN EXCERPT FROM ‘GHARACHI ADIPRATIMA ANI NATSAMRAT MADHIL GHAR’-PROF. GANGADHAR PATIL; NATSAMRAT-SAMIKSHA-EDITED BY PROF. G. T. PATIL) "
घर हे मानवस्पर्शी अवकाशाचे एक रेखीव रूप. माणसाने पृथ्वीवर घर बांधले व तो घरात राहू लागला. तेव्हापासून हे राहते घर मानवी मनात `घर करून` राहू लागले. आणि त्याच क्षणी या घराचे आणि मनाचे अगदी पहिले नाते जुळले - आणि युगायुगातून ते वाढत राहिले. मानवाने आपल्या देहाच्या रक्षणासाठी मातीचे घर बांधले आणि आपल्या आत्म्या च्या निवासासाठी स्वतःच्या देहाचेच घर उभारले. या देहामन्दिरातच मानवी आत्म्याला पहिला निवास मिळाला. तेव्हापासून मानवी आत्मा माणसाला आधार देत आला आहे. या अनंत अवकाशाच्या पोकळीत घराणेच माणसाला आधार दिला. घराप्रमाणेच आत्मा हा माणसाला दुसरा आधार लाभला. घराशिवाय व आत्म्याशिवाय माणूस निराधार, परत्मा होईल. पोरका, एकाकी पडेल. म्हणूनच माणसाला जशी घराची एक मूलभूत ओढ असते. तशीच त्याला आपल्या आत्म्याची, स्वस्था ची पण मूलभूत ओढ असते. घर हे माणसाला आतून व बाहेरून ओढीत व वेढीत असते. म्हणून मानवाच्या भावसृष्टीत व प्रतीकसृष्टीत मनाला व आत्म्याला साकार करताना-या घराच्या आदिबंधरूप प्रतिमांना महत्वाचे स्थान आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #BANJARYACHEGHAR #BANJARYACHEGHAR #बंजाऱ्याचेघर #SHORTSTORIES #MARATHI #YASHODHARAKATKAR "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKMAT 09-01-2005

    यशोधरा भोसले यांचा ‘बंजाऱ्याचे घर’ हा ललित लेखसंग्रह विविध गुणांनी संपन्न आहे. प्रसिद्ध लेखिका माधवी देसाई यांच्या या कन्या. या संग्रहातील पाचही लेख यशोधरा भोसले यांचे वास्तव्य झालेल्या घरासंबंधीच्या आहेत. या लेखामध्ये स्मरणरंजन आहे. आत्मकथन आहे. त्यतून प्रकट होणारी मानसिकता खूप काही सोसून पचवलेल्या प्रगल्भ परिपक्वतेची आहे. घराशी निगडित असलेल्या त्या-त्या वेळच्या भाविश्वात घेऊन जाणारे हे लेख आहेत. आयुष्याच एकेका ठप्प्याशी रेंगाळणारे आहेत. त्या-त्या टप्प्यांवरील व्यक्तींवर लक्ष केंद्रित करणारे आहेत. लेखिकेचे हे पहिलेच पुस्तक असूनही लेखन, वर्णन, शैलीतील सहजता व सफाई लुब्ध करणारी आहे. एका स्त्रीमधून वेगळी दृष्टी या लेखांना लाभली आहे. अनेक रंग या घरांना आणि घरातल्या माणसांना लाभलेले आहेत. कलावंतांचे मन आणि नजर या लेखातील अगणित तपशीलातून दिसते. घराभोवतालच्या निसर्गाची चैतन्यशील रूपे नजरेसमोर येतात, तशीच एखाद्या चित्रकृतीची सौंदर्यस्थळेही सहजपणे शब्दरूप धारण करतात, ‘बंजाऱ्याचे घर’ मधील शेवटचे घर वगळता बाकीच्या सर्व घरांशी लेखिकेचा वैयक्तिक संबंध आल्यामुळे त्यातील तपशीलांना व्यापक संदर्भ लाभलेला आहे. चित्रतपस्वी, भालजी पेंढारकर (आजोबा), लीलाबाई पेंढारकर (आजी), माधवी देसाई-काटकर (आई), काटकर (वडील), मीरा तारळेकर (बहीण), रणजित देसाई (पितृतुल्य दादा), प्रभाकर पेंढारकर (मामा) आणि जाई (कन्या) या कुटुंबीयांसमवेत इतरही व्यक्तींचे उल्लेख येतात. पहिले घर आहे ते गावाकडचे पिढ्यान् पिढ्या पासूनचे शंभर वर्षंचे या घरात पूर्वजांच्या पिढ्या वर्षानुवर्षे वाढल्या. लेखिकेचे या घरात पाय ठेवताच सगळे ताण कमी होऊन जातात. चिडचिड् कमी होते. दुसरे घर भेटते ते माहेरचे गोव्यातले बांदोड्याचे. काटकरांशी लग्न करून गोव्यात आल्यावर येथील सुखासीन जीवनाला उबगलेल्या माधवीताई मुंबईसारख्या शहरात नशीब अजमावायला पतीसह गाव सोडतात. कल्याणजवळच्या मोहोन्याच्या कंपनीच्या क्वार्टरमध्ये चार खोल्यांत हौसेने घर सजवतात. परंतु काटकरांच्या मृत्यूनंतर आणि रणजित देसार्इंच्या कोवाडच्या घरातून बाहेर पडल्यावर, बेळगावमधल्या अल्प वास्तव्यानंतर आपल्या मूळ सासरच्या घरी गोमंतकात येण्याचा निर्णय माधवी घेतात आणि वर्षानुवर्षे बंद असलेल्या बांदोड्यातल्या देवळाच्या परिसरातल्या या घराला घरपण येते. तिसरे घर आहे ते कोवाडमधले रणजित देसाई यांचा खानदानी वाडा. काटकरांच्यानंतर रणजित देसाई लेखिकेचे वडील, गुरू, मित्र आणि मार्गदर्शकही बनतात. त्यांच्या बद्दलचे मनोभाव येथे संयतपणे प्रकट झाले आहेत. चौथे घर आहे ते चित्रकार रमेशच्या स्टुडिओमधले.’ ‘१२ ए-रेशम’ हा टेन परसेंट कोट्यातील फ्लॅट लेखिकेला मिळालेला असतो. या फ्लॅटमध्ये राहताना त्या घराचे आणि आपले सूर चांगले जुळून आल्याचे समाधान त्यांच्या लेखामधून व्यक्त होते. अशाप्रकारे एक प्रदीर्घ प्रवास या घरांद्वारे लेखिकेप्रमाणेच वाचकांनाही घडतो. -प्रा. शिवाजी पाटील ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 23-03-2003

    स्त्री मनाचा गुंता उकलणारं ललित लेखन... ‘घर’ या विषयाभोवती घुटमळणाऱ्या ललित लेखांचं पुस्तक आहे ‘बंजाऱ्याचे घर’. यशोधरा भोसलेंनी ते लिहिलं. पुस्तकात ‘घर’ विषयाची एक कथाही आहे. शेवटी ‘कुणी घर देता कां घर?’ असा टाहो फोडणाऱ्या नटसम्राटाची आंतरिक घालमेल ेऊन येणारं हे पुस्तक ‘घर’ या विषयाशी जोडलेल्या स्त्री मनाचा गुंताही उकलतं. व्हर्जिनिया वुल्फनी ‘ए रूम ऑफ वन्स ओन’ची कल्पना मांडली होती. पंजाबी कवयित्री अमृता प्रीतमनी तीच कल्पना ‘चौथा कमरा’ म्हणून स्पष्ट केली आहे. शांताबाई शेळकेंनी ‘चोली का अपना दामन’ म्हणून समाजाच्या आसमंतातील स्त्री मनाचा अवकाश वर्णिला होता. यशोधरा भोसले आजोळ, माहेर, सासर, मित्र अशी घरांची स्थित्यंतरं अनुभवतात. जीवनात कोसळलेलं आकाश पेलत यशोधरा भोसले आपलं आकाश, अंगण, आसमंत निर्माण करतात. जीवनातल्या प्रतिकूल क्षणी आपली असणारी माणसं जेव्हा दुरावतात तेव्हा दगडमातीची निर्जीव वाटणारी घरंच ऊब देतात. कधी काळी स्वत: बंजारा असलेला मुख्यमंत्री यशोधरा भोसलेंसारख्या निराधार परागंदा स्त्रीस मुख्यमंत्र्यांच्या कोट्यातून देतो तेव्हा ती आई-बाबांची पुण्याई म्हणूनच; पण या साऱ्या प्रवासात लेखिकेस सावरतात ती घरंच तेच तिचे खरे गणगोत. ‘बंजाऱ्याचे घर’ जीवनाच्या अवघड वळणावर स्त्रीस बळ देणाऱ्या घराच्या घरंदाजपणाची स्वगतंच होतं! घर बोलतंय की, लेखिका असा कधी कधी भ्रम पडावा अशा एकात्मिक लालित्याने लिहिलेले घरांसंबंधी ललित लेख वाचताना वाचकाला स्वत:चं घरदेखील मनी-मानसी बोलू-डोलू लागल्याच्या अपसूक भास होऊ लागतो. हे असतं यशोधरा भोसले यांच्या ललित नि संवेदी शैलीचं यश. पुस्तक वाचताना लेखिका कधी काळी उभारीच्या वयात इंग्रजीमय झाली होती. हे खरं नाही वाटत. साऱ्या घरांच्या वर्णनामागे एक अंधुक, अलिखित सूत्र जाणवतं. जागतिकीकरणाच्या कचाट्यात सापडलेल्या घरानं मनुष्यपण मारलं, हवा, पाणी, परिसर, विद्रूप, विरूप होऊ लागलेला आहे. अशा स्थितीत घराचं घरपण आपण जपलं-जोपासलं तरच सुख-समृद्धी, स्वास्थ्य, संस्कार, संस्कृतीचं पंचशील सुरक्षित राहणार हे समजविणारे हे ललित लेख! सुंदर तितकेच सामाजिक भान देणारे!! ‘बंजाऱ्याचे घर’ लेखिकेनी ऋणमोचन भावनेनं केलेलं लेखन आहे. त्यात कृतज्ञता आहे तशी कणवही. गावाकडचं घर पहिल्या भेटीतच आपलं होतं. कौलारू, कृष्णवेलींनी वेढलेलं. आजीच्या मायेनं मंतरलेलं हे मातृधर्मी घर. म्हणूनच लेखिकेला त्याचं कोण अप्रूप? घर आपलं असलं की, यायला निमित्त नाही लागत. ते नित्यनेमाने आपणाकडे आपल्या माणसांना ओढत राहतं. जंगलाच्या कुशीत दडलेलं हे घर. या घरातली माणसं पण घरासारखीच आतून-बाहेरून एक. साकाळलेलं आयुष्य मोकळं करणारं हे घर लेखिकेला म्हणून तर आप्त, स्वकीय, आत्मीय वाटत. राहतं मावशी, रखवालदार भीम, त्याची मुलं सारी कशी स्वभाव गर्द, मनानं हिरवी स्वभावानं गुलमोहर, बोगनच्या फुलासारखी जर्द! दुसरं घर लेखिकेचं गोव्यातलं आजोळ, बांदोड्याचं सभामंडप, नगारखाना, आगरशाळा, असं ऐसपैस चौसोपी. महालक्ष्मी मंदिराच्या ओवऱ्यांनी वेढलेलं, भट-भिक्षुकांच्या घरांनी घेरलेलं. चिऱ्यांचा गडगा, पाण्याचं तळं... लेखिका घर सजीव करते ती शब्द वर्णनांनी नाही, तर आठवणींच्या शिंपणांनी, पोर्तुगीजी थाटाचं हे घर अगडबंब कुलूप-किल्लीनी; पण प्राचीन असल्याच्या खुणा उठवतं. उतरती कौलं, अर्धगोल महिरपी दरवाजे, खिडक्या, देवळी, दगडं साऱ्यांनी हे घर आपणास केव्हा भूतकाळात घेऊन जातं ते कळलं नाही. खेड्यातलं असलं तर खानदानी कोंदणात वसलेलं नि म्हणून लोभसही! कोवाडचं घर तिसरं. स्वामीकार रणजित देसार्इंचं, हे बांदोड्यासारखच खानदानी घर; पण याची चेहरेपट्टी वेगळी नाही म्हणून तरी कर्नाटकी मुलखाच्या सीमेवर वसलेलं. या घरानं लेखिकेचं हरवलेलं मराठीपण बहाल केलं. भाषा, साहित्य, कलेचे संस्कारांनी भरलेलं घर. पायाखालची वाळू सरकलेल्या भुसभुशीत दिवसात मायमराठीबरोबर याच घरानी सुप्त कलेचे धुमारे फुलवले. आपल्या रणजितदादांचं तुटलेपण लेखिकेनं अनुभवलं ते हेच घर. साऱ्या विस्कटलेल्या आयुष्याचे धागेदोरे जोडणारे हे घर; पण कसं सुन्न ...मौन ...‘यार की कोई खबर लाता नही’ असं काव्यात्मक, भावस्पर्शी शीर्षक देऊन यशोधरा भोसले यांनी एका उद्ध्वस्त जीवनाची अबोल करुण कहाणीच पेश केली आहे. ‘कोलाज हे चौथं घर. कोलाज ही एक चित्रशैली. आपल्या ठिगळ जोडीच्या आयुष्यात भेटलेल्या चित्रकार मित्राचं हे घर. मुकुंदनगर, चेंबूर, मुंबईचा परिसर ज्यांना माहिती आहे त्यांना कोलाज वाचताना लेखिकेच्या निरीक्षण नि:शब्द सामर्थ्याची कल्पना यावी. ‘बंजाऱ्याचे घर’ पुस्तक म्हणजे चित्रशैलीचा सुंदर नमुना. या पुस्तकाचं सारं सौंदर्य शैलीत सामावलंय. पत्ता हरवलेल्या घराआधीचं ‘१२-ए रेशम’ हे घर महानगरातील फ्लॅट संस्कृतीचं व्यवच्छेदक रूप. पैसा, प्रतिष्ठा सर्वत्र असलेल्या महानगरात मुख्यमंत्री मोठा की बिल्डर? मुख्यमंत्री कोट्यातील घर मिळवण्याचं दिव्य पार केल्यानंतर मिळालेलं हे घर लेखिकेला आपली जागा, आपलं जग मिळवून देत. या पुस्तकातील प्रत्येक लेखास लाभलेली सूचक, समर्पक, शीर्षकं या पुस्तकाचं आगळं वैशिष्ट्य. या प्रत्येक कथात्मक लेखाच्या सुरुवातीस व शेवटी मनोज आचार्य यांची रेखाटनं पुस्तकास बोलकी करतात. पुस्तकाच्या मुखपृष्ठात हिरवे, निळे, पिवळे जर्द रंग ओतून निसर्गाचं गहिरंपण चित्रकारांनी असं चित्रित केलंय की, त्या घरांची ओढ वाचकांना दाटून आल्याशिवाय राहत नाही. ‘बंजाऱ्याचे घर’मधील ‘पत्ता हरवलेलं घर’ ही एक स्वतंत्र कथा आहे. कथेची विषयक पार्श्वभूमी घर असली तरी दोन पुरुषांमधील वैशिक संबंधांची ही कथा. एक गंभीर विषय पेलणारी कहाणी. कथात्मक ललित लेखांबरोबर देणं औचित्यपूर्ण खचितच नाही. लेखिकेनं संग्रहभर कथा होईपर्यंत या कथेसाठी थांबायला हवं होतं. हे पुस्तक सदरचा अपवाद वगळता समाज व व्यक्तीसंबंधांची ललित अंगांनी केलेली मांडणी असली, तरी त्यामागची सल सतत वाचकास अस्वस्थ करत राहते. ...Read more

  • Rating StarJyotsna Aphale

    हे पुस्तक वाचले आहे अप्रतिम

  • Rating StarSharmila Phadke

    माझं अत्यंत आवडीचं पुस्तक

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
डॉ. जयंत वडतकर.अमरावती

मेळघाटचा एन्सायक्लोपिडीया असलेले निवृत्त वनाधिकारी श्री. रविंद्र वानखडे यांच्या अनुभवांवर आधारित कुलामामाच्या देशात हे पुस्तक वाचले तेव्हापासून या पुस्तकाचे लेखक श्री. जी. बी. देशमुख यांना भेटण्याची इच्छा होती. इच्छाशक्ती असली की योग जुळून येतो असं महणतात. रविंद्र वानखडे सरांच्या माध्यमातूनच तो योग जुळून आला. माझ्या एक पुस्तकाचे प्रकाशन बाबत वानखडे सरांशी चर्चा करीत असताना त्यांनी लेखकाचा संदर्भ दिला व जी.बी. ना भेटून घ्या असे सांगितले. भेट घडून आली. अगदी सहज, घरगुती भेट झाली, गप्पा रंगल्या. यावेळी जी. बी. देशमुख यांनी त्यांचे पहिले पुस्तक महारुद्र मला भेट दिले. आमच्या चर्चेतून आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉल मथला मराठमोळा झंझावात महारुद्र, हे या पुस्तकाचे शीर्षक वाचून पुस्तकाचा विषय थोडक्यात समजला. लेखकाचे वडील भीमराव देशमुख यांनी फुटबॉलपटू म्हणून गाजविलेल्या कारकीदींचा आढावा या पुस्तकात होता. एका मुलाने आपल्या वडिलांवर लिहिलेले पुस्तक कसे असेल? असा प्रश्न अन पुस्तक, दोन्ही घेऊन घरी आलो. भेट मिळालेले पुस्तक वेळ मिळाला तसे एका बैठकीत वाचून काढले. आता गल्ली गल्लीत जसं क्रिकेट खेळल्या व बघितले जाते तसं स्वातंत्र्य पुर्व काळात वऱ्हाडात फुटबॉल खेळला जात असे. गावागावांत टीम असायच्या, सामने अर्थात स्पर्धा भरवल्या जात असत. स्वातंत्र्यपूर्व काळात अशाच रुपयांमधून चमकत, वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील एका खेळाडूने थेट मुंबईतील फुटबॉल क्लब व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मुसंडी मारत आपल्या खेळाचा व व्यक्तीमत्त्वाचा ठसा उमटविला होता. तो काळ होता १९३० ते १९५० चा. त्या वल्लीचे नाव होतं भिमराव देशमुख. जी. बी. देशमुख यांनी त्यांच्या वडिलांवर लिहिलेले महारुद्र पुस्तक काही फक्त भिमराव देशमुख यांची जीवन चरित्र नाही. स्वातंत्र्य मिळण्याच्या साधारण वीस वर्षा पुर्वी ३० ते ५० च्या दशकात आपल्या देशातील खेळाची स्थिती कशी होती. विशेषतः वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील स्थिती कशी होती. कुठले खेळ खेळले जात असत. स्पर्धा कशा भरवल्या जात असत. शाळा आणि शिक्षण कसं होतं. आर्थिक स्थिती कशी होती. अमरावती जिल्ह्यातील कोणत्या गावात फुटबॉलच्या नावाजलेल्या टीम होत्या. अमरावती कशी होती याची माहिती सुद्धा या पुस्तकातून वाचायला मिळते. पुस्तकाच्या पहिल्याच प्रकरणात भीमराव यांचे व्यक्तिमत्व कसं होतं हे सांगण्यासाठी लेखकाने बाबा म्हणून जरी त्यांची ओळख करून दिली असली तरी पुढील सर्व प्रकरणातून त्यांनी भीमराव अशा एकेरी उल्लेखातून हे व्यक्तिमत्व साकारले आहे. वऱ्हाडातल्या आपल्या सवयीनुसार प्रसिद्धी पासून दूर राहिलेल्या एका नामवंत फुटबॉलपटूची कारकीर्द व फुटबॉल पश्चात कौटुंबिक कारकीर्द तटस्तपणे मांडण्यात लेखक यशस्वी झाले आहेत हे आधीच सांगून टाकतो. अमरावती जिल्ह्यातील खारतळेगाव येथील फुटबॉलच्या टीम मध्ये भीमराव देशमुख यांची कारकीर्द सुरु झाली. ती १९३० सालापासून त्यावेळी ते जेमतेम विशीत होते. प्रथम शालेय स्पर्धापासून पुढे क्लब स्पर्धा पासून भीमरावने आपल्या खेळाचा ठसा उमटविला हळूहळू ख्याती विदर्भांत पोहोचली, भीमराव यांचा खेळ बघण्यासाठी लोक खास वेळ काढून येऊ लागेल, १९३८-३९ मध्ये विदर्भात झालेल्या काही स्पर्धात मुबंईच्या काही टीम सहभागी झाल्या होत्या, त्यामुळे नावाजलेल्या ब्रिटीश खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळाली. मुंबईच्या इंग्रजांच्या टीमला वऱ्हाडातील भीमराव यांच्या टीमने हरविले. वायएमसिए, मुंबईच्या अलेक्झांडर नावाच्या कप्तानाने भीमरावच्या खेळाने प्रभावित होऊन खारतळेगावच्या चार खेळाडूंना मुंबईच्या टीम कडून खेळण्याचे निमंत्रण दिले. १९४० ला भीमराव सह चार खेळाडू मुंबईत पोहोचले. अलेक्झांडरने त्यांना सराव शिबिरीत घातले. पुढील वर्षात भीमराव वायएमसिए टीम कडून खेळण्यासाठी करारबद्ध झाले. जशा आयपीएल मध्ये आज वेगवेगळ्या टीम खेळतात तसे त्यावेळी मुंबईत फुटबॉलचे क्लब होते. पुढील १० वर्षे अनेक टीम कडून खेळत अनेक स्पर्धा गाजविल्या. भीमराव यांचेवर तेव्हाच्या इंग्रजी वृत्तपत्रांतून रकाने छापले जाऊ लागले. मुंबईतील आपल्या १२ वर्षाच्या कार्यकाळात क्लब स्पर्धामधून त्यांनी ४०० सामने खेळले, तब्बल २५० गोल मारलेत. भीमराव वेगवेगळ्या स्पर्धामधून खेळत मैदान गाजवत होते. त्यातूनच १९४८ च्या ऑलम्पिक स्पर्धेच्या टीम मध्ये निवड झाली मात्र एका सराव सामन्यात पाय फॅक्चर झाल्याने देशाकडून खेळण्याची संधी हुकली. पुढील वर्षात भीमराव हे भारतीय टीम सोबत मलेशिया, कंबोडिया, इंडोनेशिया, म्यानमार, फिलिपिन्स, हाँगकाँग, थायलंड अशा देशात खेळले, या दौऱ्यातील २० पैकी १९ सामने जिंकले. भीमराव आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू झाले होते. इतके खेळून भीमराव यांचेकडे आर्थिक नियोजन नसल्याने परिस्थिती जेमतेमच होती. अशातच १९५१ साली त्यांनी निवृत्ती घेतली. अमरावती मध्ये परत आल्यावर त्यांनी आपला संसार थाटला, आर्थिक पाठबळ नसल्याने फुटकळ व्यवसाय केले. मात्र मी कधीकाळी आंतरराष्ट्रीय खेळाडू होते याचा कधी उल्लेख सुद्धा केला नाही, प्रसिद्धी पासून ते कायमच दूर राहिले. या काळात भीमराव यांच्या पत्नी अंजीरा यांनी जबाबदारीनं संसार सांभाळला. मुलांना मोठे केले. भीमराव शेवटपर्यंत मेहनत करीत राहिले. समाजात चांगले स्थान निर्माण केले. मात्र ते इतके मोठे फुटबॉलपटू होते ते अमरावतीकरांना काही माहिती झाले नाही. भीमराव यांच्या निधनानंतर या आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूचे कार्य पुढील पिढीला माहित व्हावे या उद्देशाने जी. बी. देशमुख यांनी या पुस्तकातून आपल्या तीर्थरुपांचे भावचित्र अगदी सोप्या सरळ भाषेत शब्दबद्ध करून महारुद्र च्या रूपाने वाचकांसमोर ठेवले. या लिखाणासाठी त्यांनी मुंबईत जाऊन त्या काळातील टाईम्स वृत्तपत्रांतील भीमराव यांचा उल्लेख असलेली कात्रणे मिळविली, त्यांच्या समवेत खेळलेल्या खेळाडूंना व पत्रकारांना भेटले, अमरावती मधील त्यांच्या समवयस्क परिचितांकडून त्यांची माहिती गोळा केली. त्यासाठी त्यांनी अथक अशी मेहनत घेतली. व २००५ साली हे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकाच्या पुढील आवृत्ती मेहता प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केल्याने ते पुस्तक महाराष्ट्रभर पोहोचले. या निमित्त्याने भीमराव यांचे कार्य, त्यांचा फुटबॉल खेळातील झंझावात मराठी माणसाला माहिती झाला. अमरावतीकर या नात्याने मला तर आपल्या मातीतील माणूस त्या काळात आंतरराष्ट्रीय पातळीवर झेंडा गाडून आल्याचा अभिमान वाटला. अशा अनेक अर्थाने महारुद्र महत्वाचे आहे. ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
सलिल तांबे

ज्यांना गोष्टींची आवड आहे अशा मुलांसाठी ही मेजवानी आहेच, पण आपल्या पाल्यांमध्ये संवेदनशीलता आणि निसर्गाप्रती आदर जोपासण्यासाठी मोठ्यांनीही हे पुस्तक वाचायला हवे. प्रदूषणाविरुद्ध लहान हातांनी दिलेला लढा असो किंवा निसर्गाचा खरा आनंद पिशवीत भरून आणण्यापक्षा मनात कसा साठवावा, हे सांगणारा दृष्टिकोन असो; हे पुस्तक प्रत्येक वाचकाला समृद्ध करते. पुस्तकातील प्रत्येक कथा संपताना आपल्याला जगण्याकडे बघण्याची एक नवी दृष्टी देऊन जाते. यातलं काही गूढ, काही थरार आणि खूप सारे हळवे प्रसंग अनुभवण्यासाठी तुम्हाला हे पुस्तक स्वतः वाचायलाच हवं. म्हणूनच, आपल्या संग्रही असावा असा हा `हाटूमुटूचा चंद्र` तुम्ही एकदा नक्की अनुभवा! चला तर मग, आपणही शोधूया आपला स्वतःचा ‘हाटूमुटूचा चंद्र’! ...Read more