* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789392482557
  • Edition : 1
  • Publishing Year : MARCH 2022
  • Weight : 500.00 gms
  • Pages : 184
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE TALE OF TWELVE SPIRITS, WHO FOUGHT WITH ALL THEIR MIGHT AGAINST THE MANY ATROCITIES THAT WOMEN HAD TO FACE. EACH FOUGHT A DIFFERENT BATTLE, NEVERTHELESS, THEY ALL HAD TO BEAR THE CONSEQUENCES. SIX OF THESE WOMEN WERE BORN IN THE LATTER HALF OF THE 19TH CENTURY WHILE SIX OF THEM WERE BORN IN THE FIRST HALF OF THE 20TH CENTURY. MAA ANNAPURNADEVI WAS FROM UTTAR PRADESH. SHILAVATI KETKAR WAS A FOREIGNER WHO EMBRACED HINDUISM AND THE REMAINING TEN WERE THE DAUGHTERS OF MAHARASTHRA. RAMABAI RANADE, BAYA KARVE, PARVATIBAI ATHAVALE, PARVATIBAI THOMBARE, AND ANANDI JOSHI HAD TO FACE LOT MANY ATROCITIES. ANANDI COULD NOT SERVE THE PEOPLE BECAUSE OF HER UNTIMELY DEATH. THE OTHERS SERVED THE PEOPLE TILL THEIR LAST BREATH. MALATIBAI WAS A SOCIAL WORKER AND WRITER. KUSUMAVATI WENT ALONE TO ENGLAND FOR FURTHER EDUCATION. SHE WAS THE FIRST WOMAN TO BE THE CHAIRPERSON OF SAHITYA SAMMELAN. KAMALA BHAGWAT-SOHONI WAS THE FIRST INDIAN SCIENTIST. EXCEPT FOR HER TEACHER, NONE TREATED HER AS EQUAL. 155 RESEARCH PAPERS ARE TO HER CREDIT. MRINAL GORE WAS FAMOUS AS THE `WATER LADY`. SHE WAS AN EXCEPTIONAL HUMAN BEING WHO DID NOT MISUSE ANY SINGLE RUPEE BUT GOT SIX THOUSAND HOUSES BUILT FOR THE POOR PEOPLE IN MUMBAI. SHE PREFERRED TO REMAIN IN A RENTED HOUSE THROUGHOUT HER LIFE. MAA ANNAPURNADEVI WAS THE WIFE OF THE FAMOUS SITAR PLAYER RAVI SHANKAR. BY ALL MEANS, SHE WAS A FAR MORE BETTER ARTIST THAN HER HUSBAND. THE MALE EGO COMPELLED HER TO TAKE AN OATH THAT SHE WOULD NEVER PLAY SITAR OUTSIDE HER HOUSE. ALL THESE EXCLUSIVE WOMEN MAINTAINED THEIR STATURE OF BEING A HOUSEWIFE AND YET THEY LEFT THEIR MARK ON MANKIND. THE AUTHOR WAS IMPRESSED BY THE NOBLE WORK DONE BY THESE TWELVE WOMEN WHICH HAS BEEN PORTRAYED BEAUTIFULLY IN THIS BOOK.
सेवासदनच्या संस्थापक रमाबाई रानडे...भारतातील पहिली डॉक्टर स्त्री आनंदीबाई जोशी...महर्षी कर्व्यांच्या कार्याशी एकरूप होऊनही स्वत्व जपणाऱ्या बाया कर्वे... विधवेच्या जिण्यातून बाहेर पडून समाजसेवेत स्वत:ला झोकून देणाऱ्या पार्वतीबाई आठवले...बालकवींसारखा प्रतिभावंत नवरा मिळूनही दु:खाच्या खाईत लोटल्या गेलेल्या पार्वतीबाई ठोंबरे... ज्ञानकोशकार केतकर यांच्यासाठी परदेशातून इथे येऊन हिंदू झालेल्या आणि त्यांच्या निधनानंतरही त्यांचं जीवितकार्य पूर्ण करणाऱ्या शीलवती केतकर...भारतातील पहिल्या महिला शास्त्रज्ञ कमलाबाई सोहोनी...स्त्रियांचे प्रश्न धीटपणे मांडणाऱ्या, काळाच्या पुढे असणाऱ्या देदीप्यमान लेखिका मालतीबाई बेडेकर...लेखिका, समीक्षक विदुषी कुसुमावती देशपांडे...`पाणीवाली बाई’ म्हणून मुंबईत प्रसिद्धीस आलेल्या मृणाल गोरे... उच्च कोटीचा कलाकार असूनही एकटेपण वाट्याला आलेल्या अन्नपूर्णादेवी...गोवा मुक्ती लढ्यात उडी घेणाऱ्या सुधा जोशी... एकूण बारा स्त्रियांच्या जीवनाचा आणि कार्यकर्तृत्वाचा सहृदयतेने घेतलेला वेध

No Records Found
No Records Found
Keywords
#ध्यासपर्व #मधुवंती सप्रे #वहिनीसाहेबरमाबाईरानडे #आनंदाचाझराडॉ.आनंदीजोशी #चळवळीस्त्रीबायाकर्वे #व्रतस्थपार्वतीआठवले #फुलराणीबहरलीचनाहीपार्वतीबाईठोंबरे #महाराष्ट्राचीविलक्षणसूनशीलवतीकेतकर #सरस्वतीचीसुकन्याकमलासोहोनी #विभावरीमालतीबाईबेडेकर #कुसुमानिलकुसुमावतीदेशपांडे #लोकलमाझीसखी #जनसेवेचेबांधूनकंकणमृणालगोरे #साक्षातसरस्वतीचीजोडमाँअन्नपूर्णादेवी #युगायुगांचीमीस्वयंपाकीणसुधाजोशी #मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक #मेहतापब्लिशिंगहाऊस #DHYASPARV #MADHUVANTISAPRE #VAHINISAHEBRAMABAIRANADE #ANANDACHAZARADOCTORANANDIJOSHI #CHALWALISTRIBAYAKARVE #VRATASTHAPARVATIATHAVALE #PHULRANIBAHARLICHNAHIPARVATIBAITHOMBRE #MAHARASHTRACHIVILAXANSUNSHILWATIKETKAR #SARASWATICHISUKANYAKAMALASOHONI #VIBHAVARIMALTIBAIBEDEKAR #KUSUMANILKUSUMAVATIDESHPANDE #JANASEVECHEBANDHUNKANKANMRUNALGORE # LOCAL MAZI SAKHI #SAKSHATSARASWATICHIJODMAANNAPURNADEVI #YUGAYUGANCHIMISWAYAMPAKINSUDHAJOSHI #MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS #TRANSLATEDMARATHIBOOKS #TBC #TRANSLATEDBOOKS@50% #MEHTAPUBLISHINGHOUSE
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KHULBHAR DUDHACHI KAHANI
KHULBHAR DUDHACHI KAHANI by SUNANDA AMRAPURKAR Rating Star
श्रीपाद ब्रह्मे

नुकतंच असंच वेगानं वाचून संपवलेलं दुसरं पुस्तक म्हणजे सुनंदा अमरापूरकर यांचं ‘खुलभर दुधाची कहाणी’. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या त्या पत्नी. अर्थात ही काही त्यांची एकमेव ओळख नव्हे. एक चांगल्या अभिनेत्री, उत्तम अनुवादक म्हणूनही त्या ्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘खुलभर दुधाची कहाणी’ या आत्मचरित्रवजा लेखनातून त्यांच्या जगण्याचा व्यापक पट अतिशय प्रांजळपणे उलगडला आहे. मला हे पुस्तक विशेष भावण्याचं कारण म्हणजे त्यात आलेलं नगरचं वर्णन. मी स्वत: नगरला फार प्रदीर्घ काळ राहिलो नसलो, तरी ते शेवटी माझ्या जिल्ह्याचं गाव. आणि वयाच्या १३ ते २२ अशा महत्त्वाच्या कुमार व तरुण वयातला माझा तिथला रहिवास असल्यानं नगरच्या आठवणी विसरणं शक्य नाही. सुनंदाताई माझ्या आईच्या वयाच्या. त्यामुळं त्यांच्या लहानपणच्या आठवणी जवळपास माझ्या जन्माच्या २०-२५ वर्षं आधीच्या. असं असलं तरी मी त्या वर्णनाशी, त्या काळातल्या नगरशीही रिलेट होऊ शकलो, याचं कारण मुळात गेल्या शतकात बदलांचा वेग अतिशय संथ होता. नगरसारख्या निम्नशहरी भागात तर तो आणखी संथ होता. त्यामुळं एकूण समाजजीवनात १९६० ते १९९० या तीस वर्षांत तपशिलातले फरक सोडले, तर फार मोठा बदल झाला नव्हता. सुनंदाताई माहेरच्या करमरकर. त्यांचं आजोळ‌ सातारा असलं, तरी त्या जन्मापासून नगरमध्येच लहानाच्या मोठ्या झालेल्या. अगदी पक्क्या ‘नगरी’ म्हणाव्यात अशा. ( आजही त्या स्वत:ला अभिमानानं ‘नगरकर’च म्हणवून घेतात.) सुनंदाताईंचे वडील त्या दहा वर्षांच्या असतानाच गेले. त्यांना मामांचा आधार होता, पण आईनंच लहानाचं मोठं केलं. तेव्हाचं त्यांचं निम्न मध्यमवर्गीय जगणं, नगरमधले वाडे, तिथलं समाजजीवन, तिथल्या शाळा, शिक्षक, नगरमधील दुकानं, दवाखाने, तिथल्या गल्ल्या, बाजार हे सगळं सगळं सुनंदाताई अतिशय तपशीलवार उभं करतात. नगरसारख्या मध्यम शहरात वाढलेल्या महाराष्ट्रातील कुठल्याही शहरातील त्या काळातील व्यक्तीला अतिशय सहज रिलेट होईल, असं त्यांचं हे जगणं होतं. त्यात सुनंदाताईंचं लेखन अतिशय सहज, सोपं आणि प्रांजळ असल्यामुळं ते आपल्याला अगदी भिडतं. एका प्रख्यात अभिनेत्याची पत्नी असल्यानं त्यांचं जीवन इतर सर्वसामान्य स्त्रियांपेक्षा वेगळं झालं असेल, अशी आपली अपेक्षा असते. सुनंदाताईंच्या लेखनातून या ‘वेगळ्या जीवना’ची काही तरी झलक मिळेल, अशीही आपली एक भूमिका तयार झालेली असते. सदाशिव अमरापूरकरांसारख्या मनस्वी अभिनेत्याशी लग्न झाल्यानंतर सुनंदाताईंचं जगणं बदललंही; मात्र ते वेगळ्या पद्धतीनं. सदाशिव अमरापूरकर ऊर्फ नगरकरांचा लाडका बंडू त्यांना नगरमध्ये शाळेपासून कसा भेटला, नंतर कॉलेजमध्ये दोघांनी एकाच ग्रुपमधील नाटकं कशी सादर केली, त्यात अगदी नकळतपणे त्यांचं प्रेम कसं जमलं आणि नंतर नगर सोडून त्या पतीच्या कारकिर्दीसाठी मुंबईत कशा आल्या हा सर्व नाट्यमय प्रवास सुनंदाताई अतिशय तन्मयतेनं मांडतात. अमरापूरकर मंडळींच्या घराविषयीचे तपशील त्यात येतात. अमरापूरकरांचे वडील दत्तोपंत हे नगरमधलं मोठं प्रस्थ. श्रीमंत घराणं. मोठा वाडा, नोकरचाकर वगैरे. त्या तुलनेत सुनंदाताईंची माहेरची परिस्थिती जेमतेम म्हणावी अशी. अशा परिस्थितीत हे लग्न झालं आणि त्या अमरापूरकरांची सून झाल्या, इथपर्यंत पुस्तकाचा निम्मा प्रवास (मध्यंतरच) होतो. पुढल्या दोनशे पानांत आपल्याला खऱ्या अर्थानं सदाशिव अमरापूरकर हे काय व्यक्तिमत्त्व होतं, हे उलगडत जातं. अमरापूरकरांनी शेवटपर्यंत त्यांची मध्यमवर्गीय राहणी व मध्यमवर्गीय मूल्यं सोडली नाहीत. ‘अर्धसत्य’सारख्या सिनेमामुळं एका रात्रीतून ते भारतभरात प्रसिद्ध झाले. या एका ओळखीमुळं अमरापूरकरांचं जीवन पूर्ण बदलून गेलं. तोपर्यंत असलेली आर्थिक ओढगस्तीही संपली. हिंदी चित्रपटसृष्टीत अगदी स्वप्नवत अशा रीतीनं ते मोठे स्टार झाले. एकापाठोपाठ एक खलनायकी भूमिका त्यांच्याकडं येऊ लागल्या. पैसा येऊ लागला. अशा परिस्थितीत एक मध्यमवर्गीय कुटुंब या सगळ्या धबधब्याला कसं तोंड देतं आणि आपली मूल्यं कायम जपत राहतं, हे सुनंदाताईंनी फार हृद्यपणे लिहिलं आहे. सुनंदाताईंनी अनेक वर्षं एलआयसीत नोकरी केली. पतीचं अस्थिर क्षेत्र असल्यानं त्यांनी सुरुवातीला नोकरी केलीच; पण नवरा हिंदी चित्रपटसृष्टीत सुपरस्टार व्हिलन झाल्यावरही त्यांनी ही नोकरी सोडली नाही. त्यांच्या तिन्ही मुलींवर त्यांनी उत्तम संस्कार केले. एका सिनेमाच्या प्रीमियरनंतर हे सगळे कुटुंबीय कसे घरी जाऊन पिठलं-भाकरीचं जेवण तयार करून जेवले हे त्यांनी एका प्रसंगात अतिशय खेळकरपणे सांगितलं आहे. अमरापूरकरांचं नाटकवेड, भौतिक सुखांविषयीची काहीशी विरक्त वृत्ती, त्यांचा मित्रांचा गोतावळा, अनेक माणसांचा घरात राबता असा एकूण ‘देशस्थी’ कारभार यावर सुनंदाताई कधी गमतीत, तर कधी काहीसं वैतागून टिप्पणी करतात. अर्थात त्यांचं सदाशिव अमरापूरकरांवर अतिशय प्रेम होतं आणि त्यांनी हे शेवटपर्यंत उत्तम निभावलं. अशा आत्मचरित्रांत अनेकदा ‘आहे मनोहर तरी... गमते उदास’ असा सूर लागण्याचा धोका असतो. सुनंदाताईंच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे, एखादा अपवाद वगळता, त्यांच्या या संपूर्ण पुस्तकात असा रडवा सूर कधीही लागलेला नाही. आपल्याला जे काही मिळालं, ते आपणच निवडलं आहे आणि त्यामुळं त्याविषयी तक्रार करण्याचा आपल्याला काही अधिकार नाही, अशी एक भूमिका त्यांनी घेतलेली दिसते. त्यांच्या या पुस्तकातून विसाव्या शतकातील मध्यमवर्गीय ब्राह्मण घरातील एका तरुणीच्या आशा-आकांक्षांचा, आयुष्यानं दिलेल्या आश्चर्याच्या धक्क्यांचा आणि त्याला सामोरं जाण्यातील धीट दिलदारपणाचा लोभस प्रवास दिसतो. आपली मध्यमवर्गीय मूल्यं जपत, प्रामाणिकपणे व उमेदीनं आयुष्य जगणाऱ्या अनेक महिलांना या पुस्तकात आपल्या जगण्याचं प्रतिबिंब सापडेल. तेच या ‘खुलभर दुधाच्या कहाणी’चं यश आहे. ...Read more

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
प्रभाकर गावंडे, अमरावती

मी विकत घेऊन वाचले आहे हे पुस्तकं, चांगले आहे, नवीन माहिती वाचायला मिळाली.