* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177663433
  • Edition : 16
  • Publishing Year : JANUARY 1986
  • Weight : 140.00 gms
  • Pages : 140
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :V. P. KALE COMBO SET-52 BOOKS.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
I CARE MORE FOR THE SHADOW A TREE CASTS ON US. IT IS TRUE THAT IF WE CUT THE TREE, WE WILL GAIN A LOT OF MONEY BY SELLING THE WOOD, BUT WE WILL BE BENEFITTED MORE BY ITS SHADOWS FOR GENERATIONS TO COME. IT IS MANY TIMES VALUABLE THAN THE MONEY WE MIGHT GET FROM ONE TIME SELL OF THE WOOD.` "VAPURVAI` THIS TITLE IS BASED ON THE MARATHI WORD APURVAI, WHICH MEANS NOVEL, OR SOMETHING UNPRECEDENTED. VA PU PROVES TRUE TO IT. ALL HIS STORIES ATTRACT THE READERS WITH THEIR SIMPLICITY; THERE IS NOT JUST ONE QUALITY OF HIS WRITING WHICH CAPTIVATES A MIND. IT IS A COMBINATION OF MANY GOOD THINGS UNDER ONE ROOF, OR ON ONE PAGE. HE CAPTURES THE BEAUTY OF ALL THE INCIDENTS IN HIS SUPERB STYLE. HE REVEALS THE SECRETS OF THE ROUTINES. HE FINDS THE VERY UNIQUENESS IN EVERY CHARACTER, UNDER EVERY OR ANY CIRCUMSTANCES. LIFE IS FULL OF DIFFERENT PHASES; THOSE OF SORROW, HAPPINESS, STRUGGLE, BROODING, AND MANY MORE. VA PU HANDLES THEM ALL WITH EQUAL CAPACITY REVEALING THE BEAUTY FOR US, AND CONQUERING OUR MINDS ONCE AGAIN; AS ALWAYS.
‘‘....महाकाय वटवृक्ष तोडून त्याच्या लाकडाचे पैसे नक्कीच भरपूर येतील; पण त्याच्या कितीतरी पट अधिक, पिढ्या न् पिढ्या पुरणारी संपत्ती त्याची सावली असते. मला सावलीचं महत्त्व पटतं....’’ — लोकप्रिय कथाकार वपु काळे आपल्या कथेत अशा अनोख्या प्रतिमांमधून सतत माणूसपणाचा उद्घोष करताना दिसतात. वेगवेगळ्या परिस्थितीत सापडलेली, संघर्ष करणारी, हसणारी, रडणारी, कुढणारी सर्वसामान्य माणसं रंगवताना, ते त्यांच्यातल्या असामान्यत्वाचा नेमका वेध घेतात आणि आपल्या प्रसन्न, खुमासदार, मिस्किल शैलीत त्याचा आविष्कार करतात. वपुंच्या लेखनातील हा पैलूच वाचकांना अपूर्वाईचा वाटतो. यामुळेच वपुर्वाई वाचकांचं मन सहज जिंकून घेते...

No Records Found
No Records Found
Keywords
25TH MARCH #SANVADINI #VAPU 85 #NAVRA MHANAVA AAPALA #MODEN PAN VAKNAR NAHI #ONE FOR THE ROAD #ZOPALA #MAYABAJAR #CHATURBHUJ #INTIMATE #GULMOHAR #VAPURVAI #HUNKAR #MI MANUS SHODHATOY #BAI BAYKO CALENDER #SWAR #BHULBHULAIYA #KA RE BHULALASI #VALAY #KARMACHARI #AIK SAKHE #GOSHTA HATATLI HOTI #TAPTAPADI #GHAR HARAVLELI MANASA #DOST #MAHOTSAV #KAHI KHAR KAHI KHOTA #SAKHI #RANG MANACHE #AAPAN SARE ARJUN #THIKARI #TU BHRAMAT AAHASI VAYA #HI VAT EKTICHI #PARTNER #DUNIYA TULA VISAREL #PREMAMAYEE #FANTASY EK PREYASI #PANPOI#NIMITTA #MAZA MAZYAPASHI? #PLEASURE BOX BHAG 1 #PLEASURE BOX BHAG 2 #KATHA KATHANACHI KATHA #VAPURZA #RANGPANCHAMI #SANGE VADILANCHI KIRTI #CHEERS #MANASA #JAPUN TAK PAUL #LALITKALECHYA SAHAWASAT #DAHAVYA RANGETUN #२५ मार्च #संवादिनी #वपु# ८५ # नवरा म्हणावा आपला #मोडेन पण वाकणार नाही #वन फॉर द रोड#झोपाळा #मायाबाजार #चतुर्भुज #इन्टिमेट #गुलमोहर #वपुर्वाई #हुंकार #मी माणूस शोधतोय #बाई, बायको, कॅलेंडर #स्वर #भुलभुलैय्या #का रे भुललासी #वलय #कर्मचारी #ऐक सखे #गोष्ट हातातली होती! #तप्तपदी #घर हरवलेली माणसं #दोस्त #काही खरं काही खोटं #सखी #महोत्सव #रंग मनाचे #आपण सारे अर्जुन #ठिकरी #तू भ्रमत आहासी वाया #"ही वाट एकटीची #(राज्य पुरस्कार १९७०-७१)" #पार्टनर #दुनिया तुला विसरेल #प्रेममयी #फॅण्टसी एक प्रेयसी #पाणपोई #निमित्त #माझं माझ्यापाशी? #प्लेझर बॉक्स भाग-१ #प्लेझर बॉक्स भाग-२ #कथाकथनाची कथा #वपुर्झा #रंगपंचमी #सांगे वडिलांची कीर्ती #चिअर्स #माणसं #जपून टाक पाऊल! # ललितकलेच्या सहवासातून #दहाव्या रांगेतून
Customer Reviews
  • Rating StarVishakha Kulkarni

    व पू म्हणतात माणसाला कोणतेतरी वेड असायला हवे. असे वेड जे त्याला झपाटून टाकेल... असे वेड जे त्याला शांत बसू देणार नाही... वाचनाच्या असाच वेडापायी हातात घेतलं व पूंच वपूर्वाई...... खरं तर वाचकांसाठी हि अपूर्वाईच!! व पू काळे यांचे अनेक विचार नेहमीच ाचनात येतात. विचार करायला लावतात. आणि त्यामुळेच अनेक दिवसांपासून व पुंच एखादं पुस्तक वाचव असं मनात होतं. म्हणून हे पुस्तक हाती घेतलं आणि वाचायला सुरुवात केली. अगदी साधे शब्द, साधे अनुभव त्यांनी अत्यंत सुंदर भाषेत मांडले आहेत. अनेकदा आपल्या आजू बाजूच्या माणसांच्या हालचाली, त्यांचे हावभाव आपण गृहीत धरतो... ते ही फार विचार न करता.... पण पुढे त्या हालचालींमागे काही कारण असते हे आपल्याला जेव्हा लक्षात येते तेव्हा त्यामागील कारण खरंच आपल्याला अचंबित करणारे असते. आणि हेच व पुंनी आपल्या भाषेत मांडले आहे. बरं केवळ अनुभवच मांडले नाहीत तर प्रत्येक गोष्ट आपल्याला एक नवा विचार, एक नवी शिकवण देऊन जाते. तसं पाहिलं तर अनेकदा आपण ज्या गोष्टी "taken for granted" घेत असतो त्या आपल्या स्वभावाला, व्यक्तिमत्त्वाला नवा पैलू देत असतो. तो पैलू कसा पडला जातो याची जाणीव करून देणारा एक उत्तम कथा संग्रह! - विशाखा ...Read more

  • Rating StarDAINIK LOKSATTA 30-11-1986

    सुरेख कथासंग्रह… वपुच्या आजवरच्या लेखन लौकिकात भर टाकणारा आणखी एक कथासंग्रह आहे - वपूर्वाई. वपुंची कथाकथनाची हातोटी त्यांच्या लेखनातही समर्थपणे जाणवते. लेखन आणि कथाकथन ह्या दोन्ही क्षेत्रात वपुंनी आपलं असं एक विशिष्ट स्थान निर्माण केलं आहे हे निर्विाद. ओघवत्या आणि सोप्या भाषेतून वाचकांच्या समोर प्रसंग उभा करण्याचे सामर्थ्य, मानवी भावभावनांचे वेगवेगळे पदर दाखवण्याचे वपुंचे कसब ह्या कथांतून ठायीठायी जाणवते. पुलंच्या अपुर्वाई नावाप्रमाणे वपुर्वाई हे कथासंग्रहाचे नाव असले तरी बाकी कुठल्याही प्रकारचे दोहोत साम्य नाही. अपुर्वाईमध्ये पुलंनी परदेशवर्णन, तेथील अनुभवकथन केले आहेत तर वपुर्वाईमध्ये वपुनी ७ कथांमधून कलाकाराच्या समाजाकडून अपेक्षा, स्त्रीमुक्तीचा सोपा अर्थ, माणसाची प्रेम करण्याची स्वार्थी रीत इ. कथाबीजं फुलवली आहेत. सर्वच कथा चांगल्या आहेत. त्यातल्या त्यात डावे-उजवे करायचे झाले तर ‘झापड’, ‘ठिणगी’ आणि ‘नॉट सो स्ट्रेज’ या तीन कथांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. कलावंत समाजाचं ज्याप्रमाणे काही देणं लागतो त्याप्रमाणे समाजही कलावंताचे काही देणं लागतो ह्याचं समाजानं भान ठेवावं हे आहे ‘झापड’ कथेचं सूत्र. कलाकारांच्या बाबतीत समाज फार टोकाची भूमिका घेत असतो. एखाद्या कलाकाराचे कौतुक केले तर इतके करतील की चाहत्यांच्या प्रेमाने तो गुदमरून जाईल, नाहीतर जरा कुठे त्या कलाकाराचा तोल ढळतो असे वाटले तर त्याला टोचून टोचून जीव नकोसा करून टाकतील. कलेच्या प्रांतात गरुड-भरारी घेताना जरा कुठे तोल गेला तर त्याला घसरणे हे नामाभिधान न देता कलाकाराला आलेली ती द्वाणिक झापड समजून, ‘सुबह का भुला शाम को घर लौटा तो उसे भुला नही कहते’ ह्या उक्तीप्रमाणे, समाजाने त्या कलावंताला भक्कम आधार द्यायला हवा. हे ह्या कथेतील कलावंत नायिकेचा पती स्वत:च्या कृतीने पटवून देतो. आपली पत्नी क्षणिक मोहाला बळी पडली हे कळल्यावरही तिला झालेला खराखुरा पश्चाताप अनुभवून धीरोदात्त मनाने तो तिला स्वीकारतो. इथे संसाराची व्याख्या वपु फार छान देतात- ‘‘एकमेकांचे वाभाडे काढण्यासाठी किंवा वर्मावर चोची मारण्यासाठी संसार करायचा नसतो. जिथं जोडीदार कमी पडेल तिथं आपण उभं राहायचं’’ मान गए उस्ताद! ‘‘नवऱ्याच्या नजरेत ज्या क्षणी प्रथम पशुत्वाची ठिणगी दिसते त्याच क्षणापासून स्त्रीनं बंडांच निशाण उभारायला हवं. प्रत्येक ठिणगीची चितेची ज्चाला होईल तोवर वाट बघायची नाही.’’ ‘ठिणगी’ या कथेतील नायिका सुप्रियाच्या तोंडून वपुच स्त्रीमुक्तीचा अर्थ वाचकांना सांगत आहेत असं वाटतं. स्वाभिमानी, बाणेदार वकील सासऱ्याच्या विरोधात उभी राहून एका सासुरवाशिणीच्या खुनाची हायकोर्टात दाद मागते आणि त्या खुनी नवऱ्याला फाशीची आणि सासऱ्याला जन्मठेपेची शिक्षा देववते, ही सर्वच कथा रोमांचक आहे. ‘नॉट सो स्ट्रेंज’ कथेत एक मांजर उर्फ कुत्रा, माणसाची व्यवहारी रीत सांगतो - ‘‘समोरचा माणूस जितका आपल्या मनाप्रमाणे वागेल तितकेच त्याच्यावर आपण प्रेम करतोय.’’ अपघातानंतरच्या ऑपरेशमुळे मांजर-कुत्र्यासारखं वागायला लागल्यावर त्याला मांजरंही आपलं म्हणत नाहीत आणि मांजराचे रुप असल्यामुळे कुत्रीही त्याला आपल्यात सामावून घेत नाहीत. शेवटी हा टू इन वन प्राणी म्युनिसिपालिटीच्या कुत्री पकडण्याच्या गाडीत आपणहून चढून जातो. वपु व्यवसायाने आर्किटेक्ट असल्यामुळे त्या कामाची वर्णनही ‘प्रिटेंड सर्किट’ ह्या कथेत आली आहेत. ‘हसरे दु:ख’ ही कथा मनोविश्लेषणात्मक वाटते. ‘एम.वाय. आर. ६९०’ या कथेत सर्वार्थाने मुक्त स्त्रीचं वर्णन येतं. स्त्री-पुरुष मैत्रीचे विविध पदर दाखविणारी ही कथा आहे. ‘हव्या हव्या क्षणांसह’ या कथेत दोन थरातील मित्र-मैत्रिणीच्या दोन जोड्या आहेत. एकमेकांच्या सहवासासाठी आतुरलेल्या क्लार्क जोडीतील मैत्रिणीला वाटतं - आपण दोघं मोठ्या हुद्द्यावर असतो तर उघड-उघडपणे बरोबरीने वावरता आलं असतं. मोठ्या हुद्द्यावरील जोडीतील मैत्रिणीला वाटतं, आपण सामान्य असतो तर एकमेकांच्या सहवासात मजेत राहिलो असतो. लोकांचं आपल्याकडे लक्षही गेलं नसतं. मानवी स्वभावाच्या बारक्याशा कंगोऱ्यातूनही वपु कथा फुलवतात, त्यामुळे वाचकांना त्यांच्या कथा एक आगळाच आनंद देऊन जातात. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KHULBHAR DUDHACHI KAHANI
KHULBHAR DUDHACHI KAHANI by SUNANDA AMRAPURKAR Rating Star
श्रीपाद ब्रह्मे

नुकतंच असंच वेगानं वाचून संपवलेलं दुसरं पुस्तक म्हणजे सुनंदा अमरापूरकर यांचं ‘खुलभर दुधाची कहाणी’. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या त्या पत्नी. अर्थात ही काही त्यांची एकमेव ओळख नव्हे. एक चांगल्या अभिनेत्री, उत्तम अनुवादक म्हणूनही त्या ्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘खुलभर दुधाची कहाणी’ या आत्मचरित्रवजा लेखनातून त्यांच्या जगण्याचा व्यापक पट अतिशय प्रांजळपणे उलगडला आहे. मला हे पुस्तक विशेष भावण्याचं कारण म्हणजे त्यात आलेलं नगरचं वर्णन. मी स्वत: नगरला फार प्रदीर्घ काळ राहिलो नसलो, तरी ते शेवटी माझ्या जिल्ह्याचं गाव. आणि वयाच्या १३ ते २२ अशा महत्त्वाच्या कुमार व तरुण वयातला माझा तिथला रहिवास असल्यानं नगरच्या आठवणी विसरणं शक्य नाही. सुनंदाताई माझ्या आईच्या वयाच्या. त्यामुळं त्यांच्या लहानपणच्या आठवणी जवळपास माझ्या जन्माच्या २०-२५ वर्षं आधीच्या. असं असलं तरी मी त्या वर्णनाशी, त्या काळातल्या नगरशीही रिलेट होऊ शकलो, याचं कारण मुळात गेल्या शतकात बदलांचा वेग अतिशय संथ होता. नगरसारख्या निम्नशहरी भागात तर तो आणखी संथ होता. त्यामुळं एकूण समाजजीवनात १९६० ते १९९० या तीस वर्षांत तपशिलातले फरक सोडले, तर फार मोठा बदल झाला नव्हता. सुनंदाताई माहेरच्या करमरकर. त्यांचं आजोळ‌ सातारा असलं, तरी त्या जन्मापासून नगरमध्येच लहानाच्या मोठ्या झालेल्या. अगदी पक्क्या ‘नगरी’ म्हणाव्यात अशा. ( आजही त्या स्वत:ला अभिमानानं ‘नगरकर’च म्हणवून घेतात.) सुनंदाताईंचे वडील त्या दहा वर्षांच्या असतानाच गेले. त्यांना मामांचा आधार होता, पण आईनंच लहानाचं मोठं केलं. तेव्हाचं त्यांचं निम्न मध्यमवर्गीय जगणं, नगरमधले वाडे, तिथलं समाजजीवन, तिथल्या शाळा, शिक्षक, नगरमधील दुकानं, दवाखाने, तिथल्या गल्ल्या, बाजार हे सगळं सगळं सुनंदाताई अतिशय तपशीलवार उभं करतात. नगरसारख्या मध्यम शहरात वाढलेल्या महाराष्ट्रातील कुठल्याही शहरातील त्या काळातील व्यक्तीला अतिशय सहज रिलेट होईल, असं त्यांचं हे जगणं होतं. त्यात सुनंदाताईंचं लेखन अतिशय सहज, सोपं आणि प्रांजळ असल्यामुळं ते आपल्याला अगदी भिडतं. एका प्रख्यात अभिनेत्याची पत्नी असल्यानं त्यांचं जीवन इतर सर्वसामान्य स्त्रियांपेक्षा वेगळं झालं असेल, अशी आपली अपेक्षा असते. सुनंदाताईंच्या लेखनातून या ‘वेगळ्या जीवना’ची काही तरी झलक मिळेल, अशीही आपली एक भूमिका तयार झालेली असते. सदाशिव अमरापूरकरांसारख्या मनस्वी अभिनेत्याशी लग्न झाल्यानंतर सुनंदाताईंचं जगणं बदललंही; मात्र ते वेगळ्या पद्धतीनं. सदाशिव अमरापूरकर ऊर्फ नगरकरांचा लाडका बंडू त्यांना नगरमध्ये शाळेपासून कसा भेटला, नंतर कॉलेजमध्ये दोघांनी एकाच ग्रुपमधील नाटकं कशी सादर केली, त्यात अगदी नकळतपणे त्यांचं प्रेम कसं जमलं आणि नंतर नगर सोडून त्या पतीच्या कारकिर्दीसाठी मुंबईत कशा आल्या हा सर्व नाट्यमय प्रवास सुनंदाताई अतिशय तन्मयतेनं मांडतात. अमरापूरकर मंडळींच्या घराविषयीचे तपशील त्यात येतात. अमरापूरकरांचे वडील दत्तोपंत हे नगरमधलं मोठं प्रस्थ. श्रीमंत घराणं. मोठा वाडा, नोकरचाकर वगैरे. त्या तुलनेत सुनंदाताईंची माहेरची परिस्थिती जेमतेम म्हणावी अशी. अशा परिस्थितीत हे लग्न झालं आणि त्या अमरापूरकरांची सून झाल्या, इथपर्यंत पुस्तकाचा निम्मा प्रवास (मध्यंतरच) होतो. पुढल्या दोनशे पानांत आपल्याला खऱ्या अर्थानं सदाशिव अमरापूरकर हे काय व्यक्तिमत्त्व होतं, हे उलगडत जातं. अमरापूरकरांनी शेवटपर्यंत त्यांची मध्यमवर्गीय राहणी व मध्यमवर्गीय मूल्यं सोडली नाहीत. ‘अर्धसत्य’सारख्या सिनेमामुळं एका रात्रीतून ते भारतभरात प्रसिद्ध झाले. या एका ओळखीमुळं अमरापूरकरांचं जीवन पूर्ण बदलून गेलं. तोपर्यंत असलेली आर्थिक ओढगस्तीही संपली. हिंदी चित्रपटसृष्टीत अगदी स्वप्नवत अशा रीतीनं ते मोठे स्टार झाले. एकापाठोपाठ एक खलनायकी भूमिका त्यांच्याकडं येऊ लागल्या. पैसा येऊ लागला. अशा परिस्थितीत एक मध्यमवर्गीय कुटुंब या सगळ्या धबधब्याला कसं तोंड देतं आणि आपली मूल्यं कायम जपत राहतं, हे सुनंदाताईंनी फार हृद्यपणे लिहिलं आहे. सुनंदाताईंनी अनेक वर्षं एलआयसीत नोकरी केली. पतीचं अस्थिर क्षेत्र असल्यानं त्यांनी सुरुवातीला नोकरी केलीच; पण नवरा हिंदी चित्रपटसृष्टीत सुपरस्टार व्हिलन झाल्यावरही त्यांनी ही नोकरी सोडली नाही. त्यांच्या तिन्ही मुलींवर त्यांनी उत्तम संस्कार केले. एका सिनेमाच्या प्रीमियरनंतर हे सगळे कुटुंबीय कसे घरी जाऊन पिठलं-भाकरीचं जेवण तयार करून जेवले हे त्यांनी एका प्रसंगात अतिशय खेळकरपणे सांगितलं आहे. अमरापूरकरांचं नाटकवेड, भौतिक सुखांविषयीची काहीशी विरक्त वृत्ती, त्यांचा मित्रांचा गोतावळा, अनेक माणसांचा घरात राबता असा एकूण ‘देशस्थी’ कारभार यावर सुनंदाताई कधी गमतीत, तर कधी काहीसं वैतागून टिप्पणी करतात. अर्थात त्यांचं सदाशिव अमरापूरकरांवर अतिशय प्रेम होतं आणि त्यांनी हे शेवटपर्यंत उत्तम निभावलं. अशा आत्मचरित्रांत अनेकदा ‘आहे मनोहर तरी... गमते उदास’ असा सूर लागण्याचा धोका असतो. सुनंदाताईंच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे, एखादा अपवाद वगळता, त्यांच्या या संपूर्ण पुस्तकात असा रडवा सूर कधीही लागलेला नाही. आपल्याला जे काही मिळालं, ते आपणच निवडलं आहे आणि त्यामुळं त्याविषयी तक्रार करण्याचा आपल्याला काही अधिकार नाही, अशी एक भूमिका त्यांनी घेतलेली दिसते. त्यांच्या या पुस्तकातून विसाव्या शतकातील मध्यमवर्गीय ब्राह्मण घरातील एका तरुणीच्या आशा-आकांक्षांचा, आयुष्यानं दिलेल्या आश्चर्याच्या धक्क्यांचा आणि त्याला सामोरं जाण्यातील धीट दिलदारपणाचा लोभस प्रवास दिसतो. आपली मध्यमवर्गीय मूल्यं जपत, प्रामाणिकपणे व उमेदीनं आयुष्य जगणाऱ्या अनेक महिलांना या पुस्तकात आपल्या जगण्याचं प्रतिबिंब सापडेल. तेच या ‘खुलभर दुधाच्या कहाणी’चं यश आहे. ...Read more

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
प्रभाकर गावंडे, अमरावती

मी विकत घेऊन वाचले आहे हे पुस्तकं, चांगले आहे, नवीन माहिती वाचायला मिळाली.