GULZAR

About Author

Birth Date : 18/08/1934


GULZAR WAS BORN ON AUGUST 18, 1936 IN THE VILLAGE OF DINA IN THE JHELUM DISTRICT OF BRITISH INDIA. HIS ORIGINAL NAME IS SAMPURAN SINGH KALRA. AFTER STARTING WORK AS A WRITER-POET, HE ADOPTED THE PEN NAME GULZAR. GULZARS FAMILY WAS ONE OF THE HUNDREDS OF FAMILIES AFFECTED BY THE PARTITION. THAT PAIN IS STILL REFLECTED IN HIS WRITINGS. HE STARTED WORKING AS AN ASSISTANT WITH TWO VETERANS, BIMAL ROY AND HRISHIKESH MUKHERJEE.

गुल़जार यांचा जन्म १८ ऑगस्ट, १९३६ रोजी ब्रिटिशकालीन भारतातील झेलम जिल्ह्यात दीना या गावी झाला. त्यांचे मूळ नाव संपूरण सिंग कालरा असे आहे. लेखक-कवी म्हणून काम सुरू केल्यावर त्यांनी गुल़जार हे टोपणनाव घेतले. फाळणीच्या वेळी वाताहत झालेल्या शेकडो कुटुंबांपैकीच एक गुल़जार यांचेही कुटुंब होते. त्यांच्या लिखाणात त्या वेदनांचे प्रतिबिंब अजूनही उमटलेले दिसते. बिमल रॉय आणि हृषिकेश मुखर्जी या दोन दिग्गजांबरोबर त्यांनी असिस्टंट म्हणून काम सुरू केले. बंदिनी या चित्रपटासाठी सचिन देव बर्मन यांच्याबरोबर त्यांनी गीतकार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. राहुल देव बर्मन यांच्याबरोबरची त्यांची गाणी खूप गाजली. त्यांनी गीतकार, दिग्दर्शक, संवादलेखक म्हणूनही काम केले. माणसांमधील नातेसंबंध, जीवनगाथा यांपासून ते वादग्रस्त सामाजिक विषयांपर्यंत कुठल्याही विषयाचे अत्यंत संवेदनशील चित्रण ही त्यांची खासियत आहे. गुल़जार लिखित आणि दिग्दर्शित मिर्झा गालिबही दूरदर्शन मालिका प्रचंड गाजली. या मालिकेत त्यांनी रेखाटलेल्या शब्दचित्रातून त्यांच्यातील प्रतिभावंताचे दर्शन घडते. उत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शक, उत्कृष्ट गीतकार, उत्कृष्ट कथा या विभागांबरोबरच जीवन गौरव पुरस्कार असे अनेक फिल्मफेअर पुरस्कार गुल़जार यांना मिळाले आहेत. मौसम चित्रपटासाठी उत्कृष्ट दिग्दर्शक, माचीस हा उत्कृष्ट चित्रपट आणि इजा़जत आणि लेकिन या चित्रपटांसाठी उत्कृष्ट गीतकार म्हणून त्यांना राष्ट्रीय पुरस्कारमिळाले आहेत. २००२ साली त्यांना साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तर २००४ साली त्यांना पद्मभूषणहा पुरस्कार मिळाला. स्लमडॉग मिलेनिअरया चित्रपटातील त्यांनी लिहिलेल्या जय हो...या गाण्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वोच्च समजला जाणारा ऑस्कर पुरस्कार मिळाला. नुकताच त्यांना कवी, गीतकार व चित्रपट दिग्दर्शनासाठीचा २०१३ सालातील चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त झाला.
Sort by
Show per page
Items 1 to 4 of 4 total
DHAGE Rating Star
Add To Cart INR 130
GULZAR COMBO SET - 4 BOOKS Rating Star
Add To Cart INR 425
RAVIPAR Rating Star
Add To Cart INR 200
TRIVENI Rating Star
Add To Cart INR 95

Latest Reviews

रुपाली सोनवणे

#रुक #जाना #नही लेखक: Dr. भावेश भाटिया शब्दांकन: Dr: सचिन पाचोरकर अनुवाद: सुप्रिया वकील ​अंथरून पाहून पाय पसरावे... अह्ह.. त्या निर्जीव अंथरुणासाठी आपल्या सजीव पावलांना का त्रास द्यावा? असेच एक जबरदस्त आत्मचरित्र वाचून संपवलं आणि एक ऊर्जा निर्माणकरून गेलं, पुस्तकाचं नाव आहे `रुक जाना नहीँ ​डॉ. भावेश भाटिया यांची ही प्रेरणादायी कहाणी. शाळेत असताना आलेलं अकाली अंधत्व आणि त्यानंतर खडखडीत खडतर जीवनाचा सुरू झालेला प्रवास, पण या प्रवासात खचलेल्या बालमनाला त्यांच्या आईने दिलेलं बळ, प्रेरणा व आत्मसन्मानाची शिकवण आणि स्वाभिमानाचे धडे लेखकास पुरे होते. हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. चांगल्या धडधाकट व्यक्तीवर संकट आल्यावर दूर दूर पळणारे नातलग, मित्र परिवार, जातभाई... दृष्टी गेलेल्या व्यक्तीस कितपत आधार देतील? पण एक ऑपरेटर ते एक उद्योजक, `सनराईज कॅण्डल`चा विस्तार आणि स्वतःबरोबर अनेक दृष्टिहीन व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभं करून रोजगार देणारा हा अवलिया किती अडथळे पार करून आलाय हे जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचायला हवंच. ​कुठलाही वशीला नाही की कोणाची सहानुभूती नाही, स्वबळावर विविध प्रयोग करत उद्योग यशस्वी करणं सोपं नाही. यात ज्या ज्या देवमाणसांनी हातभार लावला त्यांचा पण उल्लेख आहे, पण त्या देवमाणसांनी देखील कधीच उपकारिक भाषा न करता व स्वाभिमान न दुखावता कशी मदत करता येऊ शकते हे त्यांच्या कृतीतून दाखवून दिलंय. लेखक फक्त उद्योग उभारून थांबले नाहीत तर त्यांनी सामाजिक जाणीवेचं भान देखील ठेवलंय. महाबळेश्वरमध्ये सनराईज कॅण्डल नावाने त्यांनी भव्य असा उद्योग परिसर आणि म्युझियम सुरू केलंय, तेथे अनेक दृष्टिहीन व्यक्तींना रोजगार मिळाला आहे त्याचबरोबर सर्वजण स्वाभिमानाने कष्ट करून जगत आहेत. हजारो आयुष्य त्यांनी उजळून टाकली आहेत. दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार सह एकून 46 पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.विशेष म्हणजे सर्व पुरस्कार त्यांच्या योग्यतेनुसार दिले आहेत.. आणी अशा हजारो पुरस्कारांचे ते मानकरी आहेत असंच वाटत..त्यांच्या कामाची दखल रिलायन्स ग्रुप ने देखील घेतली आहे.व त्यांच्या पुस्तकास प्रस्तावना देखील नीता अंबानी यांनी दिली आहे.उद्योग करताना छोट्या छोट्या गोष्टी कसा प्रभाव करतात याच वर्णन देखील त्यांनी लिहिल आहे.. ​या कार्यात महत्त्वाचं योगदान त्यांच्या धर्मपत्नी नीता भाटिया यांनी दिलं आहे. दूरदृष्टी ठेवून आपल्या पतीस प्रोत्साहन देऊन, नवीन कल्पनेसह पाठिंबा देऊन त्यांना हुरूप देण्याचं काम त्यांनी केलंय. नीता भाटिया यांचं कर्तृत्व, त्यांचं पवित्र निस्वार्थी प्रेम या पुस्तकातून वाचताना आंतरिक वेगळी ऊर्जा मिळते. कलियुगातील देवी हा शब्द व मान त्यांना समर्पक वाटतो. पुस्तक सर्व वयोगटातील वाचक वाचू शकतात. मनाने खचलेल्या पण शरीराने धडधाकट असलेल्या प्रत्येक व्यक्तीने वरील पुस्तक नक्की वाचावं आणि आत्मसात करावं. एवढ्या उंचीवर असूनही जमिनीवर पाय असलेल व्यक्तिमत्व आहे. अगदी प्रेमळ पणे वागण बोलण सन्मान देण..ही दैवी देणगी त्यांच्या जवळ आहे. ...Read more