GULZAR

About Author

Birth Date : 18/08/1934


GULZAR WAS BORN ON AUGUST 18, 1936 IN THE VILLAGE OF DINA IN THE JHELUM DISTRICT OF BRITISH INDIA. HIS ORIGINAL NAME IS SAMPURAN SINGH KALRA. AFTER STARTING WORK AS A WRITER-POET, HE ADOPTED THE PEN NAME GULZAR. GULZARS FAMILY WAS ONE OF THE HUNDREDS OF FAMILIES AFFECTED BY THE PARTITION. THAT PAIN IS STILL REFLECTED IN HIS WRITINGS. HE STARTED WORKING AS AN ASSISTANT WITH TWO VETERANS, BIMAL ROY AND HRISHIKESH MUKHERJEE.

गुल़जार यांचा जन्म १८ ऑगस्ट, १९३६ रोजी ब्रिटिशकालीन भारतातील झेलम जिल्ह्यात दीना या गावी झाला. त्यांचे मूळ नाव संपूरण सिंग कालरा असे आहे. लेखक-कवी म्हणून काम सुरू केल्यावर त्यांनी गुल़जार हे टोपणनाव घेतले. फाळणीच्या वेळी वाताहत झालेल्या शेकडो कुटुंबांपैकीच एक गुल़जार यांचेही कुटुंब होते. त्यांच्या लिखाणात त्या वेदनांचे प्रतिबिंब अजूनही उमटलेले दिसते. बिमल रॉय आणि हृषिकेश मुखर्जी या दोन दिग्गजांबरोबर त्यांनी असिस्टंट म्हणून काम सुरू केले. बंदिनी या चित्रपटासाठी सचिन देव बर्मन यांच्याबरोबर त्यांनी गीतकार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. राहुल देव बर्मन यांच्याबरोबरची त्यांची गाणी खूप गाजली. त्यांनी गीतकार, दिग्दर्शक, संवादलेखक म्हणूनही काम केले. माणसांमधील नातेसंबंध, जीवनगाथा यांपासून ते वादग्रस्त सामाजिक विषयांपर्यंत कुठल्याही विषयाचे अत्यंत संवेदनशील चित्रण ही त्यांची खासियत आहे. गुल़जार लिखित आणि दिग्दर्शित मिर्झा गालिबही दूरदर्शन मालिका प्रचंड गाजली. या मालिकेत त्यांनी रेखाटलेल्या शब्दचित्रातून त्यांच्यातील प्रतिभावंताचे दर्शन घडते. उत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शक, उत्कृष्ट गीतकार, उत्कृष्ट कथा या विभागांबरोबरच जीवन गौरव पुरस्कार असे अनेक फिल्मफेअर पुरस्कार गुल़जार यांना मिळाले आहेत. मौसम चित्रपटासाठी उत्कृष्ट दिग्दर्शक, माचीस हा उत्कृष्ट चित्रपट आणि इजा़जत आणि लेकिन या चित्रपटांसाठी उत्कृष्ट गीतकार म्हणून त्यांना राष्ट्रीय पुरस्कारमिळाले आहेत. २००२ साली त्यांना साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तर २००४ साली त्यांना पद्मभूषणहा पुरस्कार मिळाला. स्लमडॉग मिलेनिअरया चित्रपटातील त्यांनी लिहिलेल्या जय हो...या गाण्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वोच्च समजला जाणारा ऑस्कर पुरस्कार मिळाला. नुकताच त्यांना कवी, गीतकार व चित्रपट दिग्दर्शनासाठीचा २०१३ सालातील चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त झाला.
Sort by
Show per page
Items 1 to 4 of 4 total
DHAGE Rating Star
Add To Cart INR 130
GULZAR COMBO SET - 4 BOOKS Rating Star
Add To Cart INR 425
RAVIPAR Rating Star
Add To Cart INR 200
TRIVENI Rating Star
Add To Cart INR 95

Latest Reviews

वा. पां. जाधव अमरावती

`अमरावतीचे छप्पन स्वभाव एक मनोरंजक काव्यसंग्रह` `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे अमरावतीचे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री जी. बी. देशमुख यांचे अमरावती नगरीचा सहज स्वभाव व ह्या नगरीच्या वेगळ्या ओळखीवर आधारित मनोरंजक पुस्तक वाचले. वाचून भरपूर मनोरंजन झाले. खर काय लिहावे या लेखकाबद्दल, मन गोंधळले. ऐतिहासिक असो, प्रवास वर्णन असो, व्यक्ती विशेष असो, अनुभवात्मक घटना घडामोडी असो कशावरही सहज लिखाण करणारा हा लेखक आहे. आता तर त्यांनी लेखनाला विनोद प्रचुर फोडणी देऊन `अमरावतीचे छप्पन स्वभाव` या काव्यसंग्रहातून अमरावतीकरांना मनोरंजनाची मेजवानीच दिली आहे. प्रत्येक शहराची व त्या शहरातील वैशिष्ट्यांची एक वेगळीच ओळख असते. दिवस जातात, काळ लोटतो, पिढ्या बदलतात मात्र जुन्या स्मृतीची चिन्हे नवीन येणाऱ्या पिढीच्या मनात गुढ निर्माण करत कायम हाक देत राहतात. अमरावतीही त्याला अपवाद नाही. बापट चौकात चौक नाही, त्या जागेवर चौरस्ता नसून टी-पॉइंट आहे, खापर्डे बगीचा म्हणून आजही ओळख आहे मात्र तेथे बगिचा नाही किंवा प्रसिद्ध गांधी चौकात गांधीचा पुतळा अथवा स्मृतीदर्शक चिन्ह अथवा उल्लेख नाही मात्र गांधी चौक अशीच ओळख जनमानसात आहे. अशा एक ना अनेक विसंगत नाम दर्शक ओळख असलेली उदाहरणे त्यात सप्रमाण आहेत. पण खरी गंमत म्हणजे कधी काळी घडलेला इतिहास त्यामध्ये दडलेला आहे हे निश्चित. या सोबतच अमरावतीकरांच्या स्वभावातला स्थायी मजेदारपणाच्या एक एका हटके गुण वैशिष्ट्याच्या गमती लेखकाने हुबेहूब अधोरेखित केलेल्या आहेत. आणि त्यावरुन तत्सम रचनांचा उहापोह लेखकाने पुस्तकात केला असावा. विदेशात स्थाईक झालेल्या मूळ अमरावतीकरांना लेखकाने लिहिलेल्या गमती मनोरंजनात्मक वाटाव्या एवढी किमया जी.बी. च्या सहज लेखनाने दाखवली आहे. अमरावतीचे अग्रगण्य वृत्तपत्र दै. हिंदुस्थान मध्ये लेखकाने सतत ६ महीणे लिहीलेल्या काव्य सदरात अमरावतीच्या जनमानसाच्या हृदयाच्या ठाव घेणाऱ्या काव्य रचनांचा आठवणींनी महापूर ओसंडून गेला होता. विशेष म्हणजे ह्यात कुठेही अनावश्यक अभिनीवेष नव्हता. उलट गमतीत केलेले आत्मपरिक्षण मात्र काही प्रमाणात होते. वयस्क अमरावतीकर रसिकांना या रचना ताज्या करून त्यांच्या तारुण्यात घेऊन गेल्या हेच खरे. जी बी देशमुख या लेखकास मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रियां वरून दिसून येते. . सदर पुस्तकातील काव्यमय रचना वाचतांना अमरावतीच्या माणसाच्या वऱ्हाडभोळ्या स्वभावाची प्रचीती येते आणि वेगळाच आनंद देऊन जाते. निखळ मनोरंजन करत गुदगुल्या करणारा असा हा काव्यसंग्रह आहे. अमरावती शहराची ऐतिहासिक वैशिष्टे काव्यरूपात वाचण्याचा आनंद अमरावतीकरांना ते जिथं असतील त्या गावात, परगावात, परदेशात पुस्तक मागवून घेता येईल. ...Read more

ज्योती चेडे, मुंबई.

अमरावतीच्या वैशिष्ट्यांवर आधारीत खुमासदार छप्पन्न कवितांच्या संग्रहातील प्रत्येक कविता वाचत असताना अमरावतीच्या वातावरणाची धुंदी आपसुकच मनावर चढु लागली. सगळ्याच कविता सुंदर आहेत. एकेक कविता अमरावतीचे अप्रतिम वर्णन करते. प्रत्येक कवितेचा शेवट कुठेतरी गंभीर विचार करायला भाग पाडतो आणि मन गलबलून जाते. सगळ्याच कविता सुंदर आहेत पण माझ्या मनाला भावलेल्या व भिडलेल्या कविता आहेत `अमरावतीतल्या गमती`, `अमरावतीचे शिक्षण`, `अमरावतीचे हजरजबाबी`, `अमरावतीचे वेडे`, `अमरावतीच्या काकू` व बाकी सगळ्या. `अमरावतीचे वेडे` या कवितेत उल्लेखीत शेवटचा अश्रुंचा एक थेंब जरुर राखला जाईल. तसेच `अमरावतीच्या काकूं` ची उर्जा उरात भरून उरेल. जीवन देणाऱ्या विहीरीने कोणाचेही जीवन घेऊ नये, अशी सद्भावना मनात जागेल. अमरावतीकर जगात कुठेही असो त्यांच्या मनात एका कोपऱ्यात राजकमल चौक असतोच हे सत्य मनावर कोरले जाईल. प्रत्येक अमरावतीकराने ह्या कविता जगाव्यात. त्यासाठी हे पुस्तक संग्रही ठेवावे आणि परगावी राहणाऱ्या आपल्या अमरावतीकर आप्तेष्टांना भेटी दाखल द्याव्या. ...Read more