GULZAR

About Author

Birth Date : 18/08/1934


GULZAR WAS BORN ON AUGUST 18, 1936 IN THE VILLAGE OF DINA IN THE JHELUM DISTRICT OF BRITISH INDIA. HIS ORIGINAL NAME IS SAMPURAN SINGH KALRA. AFTER STARTING WORK AS A WRITER-POET, HE ADOPTED THE PEN NAME GULZAR. GULZARS FAMILY WAS ONE OF THE HUNDREDS OF FAMILIES AFFECTED BY THE PARTITION. THAT PAIN IS STILL REFLECTED IN HIS WRITINGS. HE STARTED WORKING AS AN ASSISTANT WITH TWO VETERANS, BIMAL ROY AND HRISHIKESH MUKHERJEE.

गुल़जार यांचा जन्म १८ ऑगस्ट, १९३६ रोजी ब्रिटिशकालीन भारतातील झेलम जिल्ह्यात दीना या गावी झाला. त्यांचे मूळ नाव संपूरण सिंग कालरा असे आहे. लेखक-कवी म्हणून काम सुरू केल्यावर त्यांनी गुल़जार हे टोपणनाव घेतले. फाळणीच्या वेळी वाताहत झालेल्या शेकडो कुटुंबांपैकीच एक गुल़जार यांचेही कुटुंब होते. त्यांच्या लिखाणात त्या वेदनांचे प्रतिबिंब अजूनही उमटलेले दिसते. बिमल रॉय आणि हृषिकेश मुखर्जी या दोन दिग्गजांबरोबर त्यांनी असिस्टंट म्हणून काम सुरू केले. बंदिनी या चित्रपटासाठी सचिन देव बर्मन यांच्याबरोबर त्यांनी गीतकार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. राहुल देव बर्मन यांच्याबरोबरची त्यांची गाणी खूप गाजली. त्यांनी गीतकार, दिग्दर्शक, संवादलेखक म्हणूनही काम केले. माणसांमधील नातेसंबंध, जीवनगाथा यांपासून ते वादग्रस्त सामाजिक विषयांपर्यंत कुठल्याही विषयाचे अत्यंत संवेदनशील चित्रण ही त्यांची खासियत आहे. गुल़जार लिखित आणि दिग्दर्शित मिर्झा गालिबही दूरदर्शन मालिका प्रचंड गाजली. या मालिकेत त्यांनी रेखाटलेल्या शब्दचित्रातून त्यांच्यातील प्रतिभावंताचे दर्शन घडते. उत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शक, उत्कृष्ट गीतकार, उत्कृष्ट कथा या विभागांबरोबरच जीवन गौरव पुरस्कार असे अनेक फिल्मफेअर पुरस्कार गुल़जार यांना मिळाले आहेत. मौसम चित्रपटासाठी उत्कृष्ट दिग्दर्शक, माचीसहा उत्कृष्ट चित्रपट आणि इजा़जत आणि लेकिन या चित्रपटांसाठी उत्कृष्ट गीतकार म्हणून त्यांना राष्ट्रीय पुरस्कारमिळाले आहेत. २००२ साली त्यांना साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तर २००४ साली त्यांना पद्मभूषणहा पुरस्कार मिळाला. स्लमडॉग मिलेनिअरया चित्रपटातील त्यांनी लिहिलेल्या जय हो...या गाण्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वोच्च समजला जाणारा ऑस्कर पुरस्कार मिळाला. नुकताच त्यांना कवी, गीतकार व चित्रपट दिग्दर्शनासाठीचा २०१३ सालातील चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त झाला.
Sort by
Show per page
Items 1 to 5 of 5 total
DHAGE Rating Star
Add To Cart INR 130
30 %
OFF
GULZAR COMBO SET - 4 BOOKS Rating Star
Add To Cart INR 1720 INR 1199
GULZAR PATKATHA (6 BOOKS SET) Rating Star
Add To Cart INR 1295
RAVIPAR Rating Star
Add To Cart INR 200
TRIVENI Rating Star
Add To Cart INR 95

Latest Reviews

FRANKLIN MALIKA COMBO SET - 29 BOOKS
FRANKLIN MALIKA COMBO SET - 29 BOOKS by PAULETTE BOURGEOIS Rating Star
रश्मी मुसळे-साळगांवकर

लहानग्यांच्या विश्वातल्या छोट्या छोट्या गमतीजमती या पुस्तकांच्या मालिकेतून अगदी मजेशीर पद्धतीने मुलांसमोर येतात..त्या गोष्टी ऐकताना, वाचताना मूलं यात अगदी रमून जातात... शिवाय आजवर ससा आणि कासव यांव्यतिरिक्त इतर कथाविश्वात काहीसा दुर्लक्षित राहिलेलया कासवाच्या जगातही अनेक गंमती घडू शकतात ही नवखी कल्पना मुलांना भारीच आवडते... ...Read more

MARATHI DAULATICHE NARI SHILP
MARATHI DAULATICHE NARI SHILP by GOPAL DESHMUKH Rating Star
लोकसत्ता २२ जानेवारी २०२३.

बाईचे विश्व हे चूल आणि मूल एवढय़ापुरतेच मर्यादित नसते याची उदाहरणे आपल्याला इतिहासातसुद्धा पाहायला मिळतात. इतिहासात डोकावून पाहिले तर स्त्रियांचे आयुष्य हजार बंधनांनी जखडलेले होते. लहान वयातच मुलींची लग्नं केली जात असत. सतीची चाल, विधवांना केशपनाची सक्ती, सती जाणाऱ्या स्त्रियांच्या मरणाइतकेच सती न जाणाऱ्या विधवांचे जगणे भयंकर होते. अशा समाजातच काही स्त्रिया अशासुद्धा होऊन गेल्या ज्यांनी आपल्या कार्याने, आपल्या धाडसाने, शौर्याने महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाची भर टाकली. समाजाचा स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यात ज्यांचा मोलाचा वाटा आहे अशाच काही निवडक स्त्रियांचे चरित्र रेखाटन गोपाळ देशमुख यांनी ‘मराठी दौलतीचे नारी शिल्प’ या पुस्तकात केले आहे. जिजाऊमातेने बालशिवाजींची जडणघडण केली. अशा कर्तृत्ववान जिजाबाईंचे व्यक्तिचरित्र ‘राजमाता जिजाऊ’ या प्रकरणामध्ये सारांशरूपाने रेखाटण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. तसेच शिवरायांच्या जीवनात ज्या आठ राण्या आल्या त्यांच्या जीवनकार्याचे वर्णन ‘राणीवसा’ या प्रकरणात येते. ‘महाराणी येसूबाई’ या प्रकरणात त्यांची स्वराज्यनिष्ठा व दूरदृष्टी कशी दिसून येते याचे वर्णन केले आहे. संकटसमयी संभाजी राजांना दिलेल्या सल्ल्यामुळे त्यांच्या कार्यात मदत कशी झाली याचेही वर्णन आले आहे. ताराबाई, उमाबाई दाभाडे, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी युद्धभूमीवर शत्रूला तोंड कसे दिले. दर्याबाई निंबाळकर, पेशवा पत्नी गोपिकाबाई, रमाबाई, गंगाबाई यांनाही व्यक्तिगत सुखदु:खाबरोबरच मराठी दौलतीच्या वाटचालीत आपली भूमिका कशी पार पाडावी लागली याचीही माहिती पुस्तकात देण्यात आली आहे. दौलतीचा कारभार करताना अहिल्याबाईंना तीस वर्षे वैयक्तिक दु:खांना सामोरे जावे लागले. या साऱ्या दु:खांना बाजूला सारून उत्कृष्ट कार्य करून त्या ‘साध्वी पुण्यश्लोक अहिल्या’ कशा झाल्या याचा थोडक्यात आढावा घेतला आहे ‘अहिल्याबाई होळकर’ या प्रकरणात. तसेच पुतळाबाई आणि रमाबाई यांचे पतिनिष्ठेचे वर्णनही वाचायला मिळते. या सर्व व्यक्तिचरित्रांपैकी ‘राणी लक्ष्मीबाई’ यांचे चरित्र वाचताना त्यांची धाडसी वृत्ती, चिकाटी, येईल त्या प्रसंगाला न घाबरता शौर्याने सामोरे जाण्याची वृत्ती व शेवटी त्यांचा झालेला शोकात्मक शेवट आपल्या मनाला चटका लावून गेल्याशिवाय राहात नाही. वयाच्या चौदाव्या वर्षी गंगाधरराव यांच्याशी विवाह झाल्यानंतर आपल्या मुलाच्या आणि पतीच्या निधनानंतर शोक करत न बसता ही वीरांगना आपला दत्तक मुलगा दामोदर याला घेऊन ब्रिटिशांच्या कटू कारस्थानांना तोंड देण्यास सज्ज झाली होती. यातच तिला वीरमरण आले. हे वीरमरण येतानासुद्धा ती मोठय़ा शौर्याने अखेरच्या क्षणापर्यंत लढली आणि जेव्हा आपला देह आपल्याला साथ देत नाही हे लक्षात आले तेव्हा तिने आपल्या अनुयायांना आपला देह शत्रूच्या हातात पडता कामा नये, त्याला अग्नी द्या, असे सांगितले. अशा या वीरांगनेची गर्जना ‘मै मेरी झांसी नही दूंगी’ ही आजही अनेक स्त्रियांना आपल्या कामात प्रेरणा देणारी अशी आहे. राणी लक्ष्मीबाईच्या मरणाविषयी अनेक हकीकती उपलब्ध आहेत. त्यांचा उल्लेखही या पुस्तकात आला आहे. या पुस्तकातील स्त्रिया इतिहासकालीन असल्याने काही ठिकाणी ऐतिहासिक संदर्भाची पुनरावृत्ती झाल्यासारखे वाटते; पण ते येणेसुद्धा गरजेचे आहे. साध्या सोप्या भाषेत ही स्त्री चरित्रे आपल्याला वाचायला मिळतात. थोडक्यात असे म्हणता येईल की, इतिहासकाळातील थोर महिला विभूतींच्या जीवनकार्याचा अल्पांशाने सार वाचकांपुढे मांडण्याचा प्रयत्न लेखक गोपाळ देशमुख यांनी केला आहे, तो कौतुकास्पद आहे. ...Read more