* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: PRATINAYAK
  • Availability : Available
  • Translators : BHAGWAT SMITA
  • ISBN : 9789394258105
  • Edition : 2
  • Publishing Year : DECEMBER 2004
  • Weight : 500.00 gms
  • Pages : 580
  • Language : TRANSLATED FROM GUJARATI TO MARATHI
  • Category : NOVEL
  • Available in Combos :DINKAR JOSHI COMBO BOOKS - 19 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
IF YOU TAKE JINNAH`S EARLY POLITICAL CAREER, WHEN HE CAME BACK FROM LONDON IN 1897 AFTER FINISHING LAW, HE WAS TRULY SECULAR. LIAQAT ALI KHAN WENT TO ENGLAND AND CONVINCED JINNAH THAT HE SHOULD JOIN THE MUSLIM LEAGUE AND RETURN TO INDIA. WHEN THE PROVINCIAL ELECTIONS WERE HELD IN THE WINTER OF 1937 IN INDIA, THE MUSLIM LEAGUE FARED BADLY IN ALL MUSLIM AREAS. JINNAH THEN REALISED THERE WAS NO OTHER WAY BUT TO DEMAND A SEPARATE STATE FOR MUSLIMS. IT WAS A TURNING POINT, BOTH FOR JINNAH AND INDIA. THERE WAS AN INTERESTING INCIDENT THAT HAPPENED IN AUGUST 1947. IN HIS LAST DAYS HE MET INDIA`S AMBASSADOR TO PAKISTAN SRI PRAKASA AND TOLD HIM THAT CREATING PAKISTAN WAS HIS BIGGEST MISTAKE. HE ASKED SRI PRAKASA TO CONVEY TO JAWAHARLAL NEHRU THAT HE WANTED TO RETURN TO INDIA AND SETTLE DOWN IN JINNAH HOUSE IN MUMBAI.
देशाच्या फाळणीस कारणीभूत ठरलेले महंमद अली जीना यांच्याविषयी भारतात तिरस्काराची भावना असली तरी पाकिस्तानमध्ये त्यांचा उल्लेख ‘राष्ट्रपती’ असा होतो. त्यांच्याविषयी अनेक समज- गैरसमज आहेत. राष्ट्रप्रेमी असलेले जीना नंतर धर्मांध झाले, पण एक यशस्वी नेता म्हणून त्यांची इतिहासात नोंद घेतली जाते. जीनांची संपूर्ण जीवनकहाणी अभ्यास पद्धतीने तटस्थ व पारदर्शकपणे सांगणे कठीण असले तरी दिनकर जोषी यांनी हे शिवधनुष्य पेलले आहे. भारताच्यादृष्टीने खलनायक ठरलेले जीना प्रत्यक्षात कसे होते हे ‘प्रतिनायक’ या कादंबरीतून कळते. तथ्यापेक्षा सत्याला महत्त्व दिल्याने ही कादंबरी वास्तव झाली आहे व एक वेगळा इतिहास आपल्याला समजतो.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#प्रतिनायक # अनुवादितकादंबरी #दिनकरजोषी #स्मिताभागवत #अंकरहितशून्यांचीबेरीज #अयोध्येचारावणआणिलंकेचाराम #कालपुरुष #महामानवसरदारपटेल #अ-मृतपंथाचायात्री #इथेकुणीनाही #महाभारतातीलमातृवंदना #महाभारतातीलपितृवंदना #रामायणातीलपात्रवंदना #सुरम्यसूर्यास्त #म.गांधी #मुस्लीमलीग #लियाकतअली #फातिमा #कराची #पानेरी #लंडन #कायदेआझम #वझीर-ए-आझम #पाकिस्तान #मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक #मेहतापब्लिशिंगहाऊस #PRATINAYAKA #ANUVADITKADAMBARI, #DINKARJOSHI #SMITABHAGWAT #ANKRAHITSHUNYACHIBERIJ #AYODHECHA RAVANAANDLANKECHARAMA #KALPURUSH #MAHAMANAVSARDARPATEL #A-MRUTPANTHACHAYATRI #ETHEKUNINAHI #MAHABHARATILMATRUVANDANA #MAHABHARATILPITRUVANDANA #RAMAYANATILPATRAVANDANA SURAMYASURYASTA #M.GANDHI #MUSLIMLEAGUE #LIAQATALI #FATIMA #KARACHI #PANERI #LANDON #KAYDEAZAM #VAZIREAZAM #PAKISTAN #MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS #TRANSLATEDMARATHIBOOKS #TBC #TRANSLATEDBOOKS@50% #MEHTAPUBLISHINGHOUSE
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

वा. पां. जाधव अमरावती

`अमरावतीचे छप्पन स्वभाव एक मनोरंजक काव्यसंग्रह` `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे अमरावतीचे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री जी. बी. देशमुख यांचे अमरावती नगरीचा सहज स्वभाव व ह्या नगरीच्या वेगळ्या ओळखीवर आधारित मनोरंजक पुस्तक वाचले. वाचून भरपूर मनोरंजन झाले. खर काय लिहावे या लेखकाबद्दल, मन गोंधळले. ऐतिहासिक असो, प्रवास वर्णन असो, व्यक्ती विशेष असो, अनुभवात्मक घटना घडामोडी असो कशावरही सहज लिखाण करणारा हा लेखक आहे. आता तर त्यांनी लेखनाला विनोद प्रचुर फोडणी देऊन `अमरावतीचे छप्पन स्वभाव` या काव्यसंग्रहातून अमरावतीकरांना मनोरंजनाची मेजवानीच दिली आहे. प्रत्येक शहराची व त्या शहरातील वैशिष्ट्यांची एक वेगळीच ओळख असते. दिवस जातात, काळ लोटतो, पिढ्या बदलतात मात्र जुन्या स्मृतीची चिन्हे नवीन येणाऱ्या पिढीच्या मनात गुढ निर्माण करत कायम हाक देत राहतात. अमरावतीही त्याला अपवाद नाही. बापट चौकात चौक नाही, त्या जागेवर चौरस्ता नसून टी-पॉइंट आहे, खापर्डे बगीचा म्हणून आजही ओळख आहे मात्र तेथे बगिचा नाही किंवा प्रसिद्ध गांधी चौकात गांधीचा पुतळा अथवा स्मृतीदर्शक चिन्ह अथवा उल्लेख नाही मात्र गांधी चौक अशीच ओळख जनमानसात आहे. अशा एक ना अनेक विसंगत नाम दर्शक ओळख असलेली उदाहरणे त्यात सप्रमाण आहेत. पण खरी गंमत म्हणजे कधी काळी घडलेला इतिहास त्यामध्ये दडलेला आहे हे निश्चित. या सोबतच अमरावतीकरांच्या स्वभावातला स्थायी मजेदारपणाच्या एक एका हटके गुण वैशिष्ट्याच्या गमती लेखकाने हुबेहूब अधोरेखित केलेल्या आहेत. आणि त्यावरुन तत्सम रचनांचा उहापोह लेखकाने पुस्तकात केला असावा. विदेशात स्थाईक झालेल्या मूळ अमरावतीकरांना लेखकाने लिहिलेल्या गमती मनोरंजनात्मक वाटाव्या एवढी किमया जी.बी. च्या सहज लेखनाने दाखवली आहे. अमरावतीचे अग्रगण्य वृत्तपत्र दै. हिंदुस्थान मध्ये लेखकाने सतत ६ महीणे लिहीलेल्या काव्य सदरात अमरावतीच्या जनमानसाच्या हृदयाच्या ठाव घेणाऱ्या काव्य रचनांचा आठवणींनी महापूर ओसंडून गेला होता. विशेष म्हणजे ह्यात कुठेही अनावश्यक अभिनीवेष नव्हता. उलट गमतीत केलेले आत्मपरिक्षण मात्र काही प्रमाणात होते. वयस्क अमरावतीकर रसिकांना या रचना ताज्या करून त्यांच्या तारुण्यात घेऊन गेल्या हेच खरे. जी बी देशमुख या लेखकास मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रियां वरून दिसून येते. . सदर पुस्तकातील काव्यमय रचना वाचतांना अमरावतीच्या माणसाच्या वऱ्हाडभोळ्या स्वभावाची प्रचीती येते आणि वेगळाच आनंद देऊन जाते. निखळ मनोरंजन करत गुदगुल्या करणारा असा हा काव्यसंग्रह आहे. अमरावती शहराची ऐतिहासिक वैशिष्टे काव्यरूपात वाचण्याचा आनंद अमरावतीकरांना ते जिथं असतील त्या गावात, परगावात, परदेशात पुस्तक मागवून घेता येईल. ...Read more

ज्योती चेडे, मुंबई.

अमरावतीच्या वैशिष्ट्यांवर आधारीत खुमासदार छप्पन्न कवितांच्या संग्रहातील प्रत्येक कविता वाचत असताना अमरावतीच्या वातावरणाची धुंदी आपसुकच मनावर चढु लागली. सगळ्याच कविता सुंदर आहेत. एकेक कविता अमरावतीचे अप्रतिम वर्णन करते. प्रत्येक कवितेचा शेवट कुठेतरी गंभीर विचार करायला भाग पाडतो आणि मन गलबलून जाते. सगळ्याच कविता सुंदर आहेत पण माझ्या मनाला भावलेल्या व भिडलेल्या कविता आहेत `अमरावतीतल्या गमती`, `अमरावतीचे शिक्षण`, `अमरावतीचे हजरजबाबी`, `अमरावतीचे वेडे`, `अमरावतीच्या काकू` व बाकी सगळ्या. `अमरावतीचे वेडे` या कवितेत उल्लेखीत शेवटचा अश्रुंचा एक थेंब जरुर राखला जाईल. तसेच `अमरावतीच्या काकूं` ची उर्जा उरात भरून उरेल. जीवन देणाऱ्या विहीरीने कोणाचेही जीवन घेऊ नये, अशी सद्भावना मनात जागेल. अमरावतीकर जगात कुठेही असो त्यांच्या मनात एका कोपऱ्यात राजकमल चौक असतोच हे सत्य मनावर कोरले जाईल. प्रत्येक अमरावतीकराने ह्या कविता जगाव्यात. त्यासाठी हे पुस्तक संग्रही ठेवावे आणि परगावी राहणाऱ्या आपल्या अमरावतीकर आप्तेष्टांना भेटी दाखल द्याव्या. ...Read more