* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
    15 SEPTEMBER 2022
  • ISBN : 9789394258785
  • Edition : 3
  • Publishing Year : NOVEMBER 1995
  • Weight : 500.00 gms
  • Pages : 136
  • Language : MARATHI
  • Category : NOVEL
  • Available in Combos :B.D.KHER COMBO SET- 17 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS STORY TAKES PLACE IN THE CITY OF HEIDELBERG, GERMANY. THE MAJORITY OF GERMANS, WHO ARE PROUD ABOUT INDIAN CULTURE, ARE LIVING IN THE VILLAGE ‘INDISH STRAUS.’ BY RELIGION THEY ARE CATHOLIC CHRISTIAN, BUT ALL OF THEM ARE EXTREMELY PROUD OF INDIAN CULTURE! MANY PEOPLE IN THIS CITY USED TO JOKINGLY REFER TO THIS STREET AS `INDIAN GATEWAY`. IF ANYONE ASKED FOR MUELLER’S HOUSE, THEY WOULD SAY, "MUELLER`S HOUSE IS THE PLACE WHERE PARROTS CHANT HYMNS OF THE VEDAS AND THE UPANISHADS." THE ONLY EXCEPTION TO THIS WAS ERNA MUELLER IN THE MUELLER FAMILY. HER FATHER-IN-LAW, MANFRED MUELLER, WAS A PROFESSOR OF INDIAN CULTURE AT THE UNIVERSITY OF HEIDELBERG. HER HUSBAND, FRANZ MUELLER, WAS ALSO TEACHING INDIAN CULTURE AT THE SAME UNIVERSITY. ERNA AND FRANZ MET WHILE STUDYING AT THE SAME UNIVERSITY, FELL IN LOVE WITH EACH OTHER, AND GOT MARRIED. AT THE TIME, MANFRED MUELLER HAD JUST RETIRED FROM THE UNIVERSITY OF HEIDELBERG AND WAS REPLACED BY FRANZ MUELLER. THE UNIVERSITY OF HEIDELBERG WAS FAMOUS IN THE WORLD AT THAT TIME. HEIDELBERG HAS BECOME ONE OF THE MOST POPULAR CITIES IN THE WORLD SINCE THE UNIVERSITY WAS FOUNDED IN 1386 BY THE FIRST ELECTOR, RUPERT. BEFORE THE OUTBREAK OF THE TRIENNIAL WAR, IT WAS CONSIDERED THE HOME OF REFORMIST STUDENTS AROUND THE WORLD. AT THE END OF THE NEWLYWED DAYS AFTER THE MARRIAGE, ERNA BECAME VERY ANNOYED WITH HER FATHER-IN-LAW AND HER HUSBAND`S LOVE FOR HINDUISM AND THE CONSTANT DISCUSSION ABOUT IT. CONFLICT BETWEEN HINDUISM AND CHRISTIANITY STARTED AT HOME. ERNA`S SON ALBERT AND BHARTI ALSO FALL IN LOVE. THEY HAVE A CLOSE RELATIONSHIP DURING ERNA`S STAY IN INDIA. THEY WANTED TO GET MARRIED; BUT THEY HAD A NOTION THAT ERNA WILL NOT PERMIT IT. NOW ALBERT ALSO HAD A STRONG FASCINATION WITH INDIA AND INDIANS; BUT HE BOWS TO HIS MOTHER`S OPPOSITION. HE REFUSES TO GO TO INDIA ON BEHALF OF THE COMPANY WHERE HE WORKS. BUT THEY BOTH KNOW THAT ALBERT`S SHOOT IS GROWING IN BHARATI`S WOMB. ALBERT DOESN’T WANT TO RUN AWAY FROM HIS RESPONSIBILITIES; BUT THE DILEMMA NOW IS HOW TO CONVINCE THE MOTHER. WHAT HAPPENS NEXT? DOES ERNA ALLOW MARRIAGE? WHAT IS THE FUTURE OF THE MUELLER FAMILY?
जर्मनीतील हैडेलबर्ग या हिंदू धर्माचा प्रभाव असलेल्या शहरातील म्यूलर कुटुंबाची ही कथा. मानफ्रेड म्यूलर आणि त्यांचा मुलगा फ्रान्झ म्यूलर हैडेलबर्ग विद्यापीठात भारतीय संस्कृतीचे प्राध्यापक असतात आणि हिंदू धर्माचे चाहतेही. एर्ना ही फ्रान्झची पत्नी. तिला मात्र हिंदू धर्माविषयी चीड असते. मानफ्रेड यांच्या मृत्यूनंतर फ्रान्झ भारतात जाऊन संन्यास घेतो. तिथेच राहतो. एर्ना-फ्रान्झचा मुलगा अल्बर्ट. त्याला मात्र हिंदू धर्मापासून दूर ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न एर्ना करत असते. त्यात ती बऱ्यापैकी यशस्वीही होते; पण फ्रान्झच्या भारतातील मित्राची मुलगी भारती जर्मनीला शिक्षणासाठी येते आणि म्यूलर कुटुंबात राहायला लागते. तिच्यात आणि अल्बर्टमध्ये प्रेमांकुर फुटतो , त्यांच्या जवळिकीतून भारतीला दिवस जातात. दरम्यान, फ्रान्झचा मृत्यू होतो. भारतीमुळे अल्बर्टही हिंदू धर्माकडे आकर्षित होतो; पण एर्नाच्या भीतीने भारतातील नोकरी नाकारतो. भारती आणि अल्बर्टला प्रश्न पडतो की, एर्नाला आपल्या प्रेमाविषयी, भारतीच्या गरोदरपणाविषयी कसं सांगावं. कसा सुटतो हा तिढा?
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#बर्लिनगंगेलामिळाले #भा.द.खेर #कादंबरी #मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक #मेहतापब्लिशिंगहाऊस #BERLINGANGELAMILALE #B.D.KHER #KADAMBARI #MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS #TRANSLATEDMARATHIBOOKS #TBC #TRANSLATEDBOOKS@50% #MEHTAPUBLISHINGHOUSE "
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more