* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE SEA HAWK : LIFE AND BATTLES OF KANHOJI ANGREY
  • Availability : Available
  • Translators : P.L. DESHPANDE
  • ISBN : 9789357205207
  • Edition : 9
  • Publishing Year : 1986
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 308
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : NOVEL
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
"SEVENTEENTH-CENTURY INDIA. CHHATRAPATI SHIVAJI MAHARAJ`S DOMINION HAS BEEN FIRMLY ESTABLISHED OVER THE DECCAN PENINSULA. TROUBLED BY THE MOUNTING EUROPEAN THREAT ALONG THE KONKAN COAST, THE MARATHA EMPIRE TURNS TO KANHOJI ANGREY, MASTER MARINER, EXCELLENT SWORDSMAN AND ASTUTE STRATEGIST, TO LEAD ITS NAVY. FOR THE NEXT FEW DECADES, UNTIL HIS DEATH IN 1729, NO MATTER WHO RULES THE LAND OR LORDS OVER THE TRADING SETTLEMENTS, NONE CAN DEFY KANHOJI`S HOLD OVER THE WATERS OF THE KONKAN COAST. JOIN KANHOJI ON HIS MANY ADVENTURES AND NAVAL CAMPAIGNS AS HE COURTS DANGER AND EVADES CAPTURE. MANOHAR MALGONKAR`S THRILLING STORYTELLING IN THE SEA HAWK BRINGS TO LIFE THIS `LORD OF THE KONKAN`. LONG OUT OF PRINT, THIS INDIAN CLASSIC IS ONCE AGAIN AVAILABLE IN A STUNNING NEW EDITION!"
कान्होजी आंग्रे...मराठा आरमाराचे अनभिषिक्त सम्राट...छत्रपती संभाजींपासून ते छत्रपती शाहूंपर्यंत भोसले घराण्याचे निष्ठावंत सेवक...पोर्तुगीज, डच, इंग्रज, सिद्दी, मोगल या शत्रूंना बिनतोड उत्तर देणारे पराक्रमी सरखेल...सगळ्याच जहाजांना समुद्रात जाण्यासाठी ‘दस्तक` हा परवाना घ्यायला भाग पाडणारे आरमारप्रमुख...‘सरखेल वजारत मा आब` या किताबाचे मानकरी... छत्रपती राजाराम, त्यांच्यानंतर ताराबाईंच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे इमानदार सेवक...नंतर बाळाजी विश्वनाथ यांच्या सांगण्यावरून शाहूच्या पायावरही निष्ठा वाहणारे निष्ठावंत...तर असे हे कान्होजी आंग्रे...त्यांचा पराक्रम, त्यांचा मुत्सद्दीपणा, सागरी किल्ल्यांचे संरक्षण करीत समुद्र मार्गे होणारं परकीयांचं आक्रमण थोपवण्याचं त्यांनी केलेलं अजोड कार्य याची ही अपूर्व गाथा मनोहर माळगोनकरांच्या लेखणीतून उतरलेली आणि पु. ल. देशपांडे यांच्या लेखणीचा अनुवादरूपी परिसस्पर्श झालेली.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीसाहित्य#मराठीप्रकाशक#मेहतापब्लिशिंगहाऊस#कादंबरी#कान्होजीआंग्रे#मनोहरमाळगोनकर#पु.ल.देशपांडे#MEHTAPUBLISHINGHOUSE#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLETEDMARATHIBOOKS#KANHOJIANGRE#NOVEL#MANOHARMALGAONKAR #P.L.DESHPANDE
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

वा. पां. जाधव अमरावती

`अमरावतीचे छप्पन स्वभाव एक मनोरंजक काव्यसंग्रह` `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे अमरावतीचे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री जी. बी. देशमुख यांचे अमरावती नगरीचा सहज स्वभाव व ह्या नगरीच्या वेगळ्या ओळखीवर आधारित मनोरंजक पुस्तक वाचले. वाचून भरपूर मनोरंजन झाले. खर काय लिहावे या लेखकाबद्दल, मन गोंधळले. ऐतिहासिक असो, प्रवास वर्णन असो, व्यक्ती विशेष असो, अनुभवात्मक घटना घडामोडी असो कशावरही सहज लिखाण करणारा हा लेखक आहे. आता तर त्यांनी लेखनाला विनोद प्रचुर फोडणी देऊन `अमरावतीचे छप्पन स्वभाव` या काव्यसंग्रहातून अमरावतीकरांना मनोरंजनाची मेजवानीच दिली आहे. प्रत्येक शहराची व त्या शहरातील वैशिष्ट्यांची एक वेगळीच ओळख असते. दिवस जातात, काळ लोटतो, पिढ्या बदलतात मात्र जुन्या स्मृतीची चिन्हे नवीन येणाऱ्या पिढीच्या मनात गुढ निर्माण करत कायम हाक देत राहतात. अमरावतीही त्याला अपवाद नाही. बापट चौकात चौक नाही, त्या जागेवर चौरस्ता नसून टी-पॉइंट आहे, खापर्डे बगीचा म्हणून आजही ओळख आहे मात्र तेथे बगिचा नाही किंवा प्रसिद्ध गांधी चौकात गांधीचा पुतळा अथवा स्मृतीदर्शक चिन्ह अथवा उल्लेख नाही मात्र गांधी चौक अशीच ओळख जनमानसात आहे. अशा एक ना अनेक विसंगत नाम दर्शक ओळख असलेली उदाहरणे त्यात सप्रमाण आहेत. पण खरी गंमत म्हणजे कधी काळी घडलेला इतिहास त्यामध्ये दडलेला आहे हे निश्चित. या सोबतच अमरावतीकरांच्या स्वभावातला स्थायी मजेदारपणाच्या एक एका हटके गुण वैशिष्ट्याच्या गमती लेखकाने हुबेहूब अधोरेखित केलेल्या आहेत. आणि त्यावरुन तत्सम रचनांचा उहापोह लेखकाने पुस्तकात केला असावा. विदेशात स्थाईक झालेल्या मूळ अमरावतीकरांना लेखकाने लिहिलेल्या गमती मनोरंजनात्मक वाटाव्या एवढी किमया जी.बी. च्या सहज लेखनाने दाखवली आहे. अमरावतीचे अग्रगण्य वृत्तपत्र दै. हिंदुस्थान मध्ये लेखकाने सतत ६ महीणे लिहीलेल्या काव्य सदरात अमरावतीच्या जनमानसाच्या हृदयाच्या ठाव घेणाऱ्या काव्य रचनांचा आठवणींनी महापूर ओसंडून गेला होता. विशेष म्हणजे ह्यात कुठेही अनावश्यक अभिनीवेष नव्हता. उलट गमतीत केलेले आत्मपरिक्षण मात्र काही प्रमाणात होते. वयस्क अमरावतीकर रसिकांना या रचना ताज्या करून त्यांच्या तारुण्यात घेऊन गेल्या हेच खरे. जी बी देशमुख या लेखकास मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रियां वरून दिसून येते. . सदर पुस्तकातील काव्यमय रचना वाचतांना अमरावतीच्या माणसाच्या वऱ्हाडभोळ्या स्वभावाची प्रचीती येते आणि वेगळाच आनंद देऊन जाते. निखळ मनोरंजन करत गुदगुल्या करणारा असा हा काव्यसंग्रह आहे. अमरावती शहराची ऐतिहासिक वैशिष्टे काव्यरूपात वाचण्याचा आनंद अमरावतीकरांना ते जिथं असतील त्या गावात, परगावात, परदेशात पुस्तक मागवून घेता येईल. ...Read more

ज्योती चेडे, मुंबई.

अमरावतीच्या वैशिष्ट्यांवर आधारीत खुमासदार छप्पन्न कवितांच्या संग्रहातील प्रत्येक कविता वाचत असताना अमरावतीच्या वातावरणाची धुंदी आपसुकच मनावर चढु लागली. सगळ्याच कविता सुंदर आहेत. एकेक कविता अमरावतीचे अप्रतिम वर्णन करते. प्रत्येक कवितेचा शेवट कुठेतरी गंभीर विचार करायला भाग पाडतो आणि मन गलबलून जाते. सगळ्याच कविता सुंदर आहेत पण माझ्या मनाला भावलेल्या व भिडलेल्या कविता आहेत `अमरावतीतल्या गमती`, `अमरावतीचे शिक्षण`, `अमरावतीचे हजरजबाबी`, `अमरावतीचे वेडे`, `अमरावतीच्या काकू` व बाकी सगळ्या. `अमरावतीचे वेडे` या कवितेत उल्लेखीत शेवटचा अश्रुंचा एक थेंब जरुर राखला जाईल. तसेच `अमरावतीच्या काकूं` ची उर्जा उरात भरून उरेल. जीवन देणाऱ्या विहीरीने कोणाचेही जीवन घेऊ नये, अशी सद्भावना मनात जागेल. अमरावतीकर जगात कुठेही असो त्यांच्या मनात एका कोपऱ्यात राजकमल चौक असतोच हे सत्य मनावर कोरले जाईल. प्रत्येक अमरावतीकराने ह्या कविता जगाव्यात. त्यासाठी हे पुस्तक संग्रही ठेवावे आणि परगावी राहणाऱ्या आपल्या अमरावतीकर आप्तेष्टांना भेटी दाखल द्याव्या. ...Read more