MARIJA SRES

About Author


MARIJA SRES (BN 1943) IS A RELIGIOUS NUN FROM BRATONCI, SLOVENIA. FOR THIRTY YEARS SHE HAS WORKED WITH THE DUNGRI GARASIYA BHILS OF GUJARAT. MARIJAS PREVIOUS BOOKS ON GUJARATI TRIBAL WOMEN HAVE BEEN TRANSLATED IN ENGLISH, SLOVENE, SPANISH, GUJARATI, AND MARATHI.

मारिजा स्रेस यांचा जन्म युगोस्लाव्हियात एका रोमन कॅथॉलिक कुटुंबात झाला. त्यांनी अर्थशास्त्राची पदवी घेतली. काही काळ स्पेनमध्ये केलेल्या वास्तव्यात वेगवेगळ्या देशांबद्दल माहिती करून घेतल्यानंतर सामाजिक कार्य हे स्वतःचं ध्येय ठरवून त्यांनी भारतात येण्याचं नक्की केलं. वयाच्या २८व्या वर्षी त्या भारतात येऊन पोहोचल्या. गुजरातच्या दुष्काळी भागात काम करायला गेलेल्या असताना, तेथील एकूण दयनीय अवस्था (रस्ते नाहीत, वीज नाही, सगळीकडे प्रचंड धूळ, गरिबी, उपासमार आणि सामाजिक शोषण!) त्यांनी पाहिली. येथील स्थानिक लोकांमध्ये मिसळायचं असेल तर त्यांची भाषा आली पाहिजे, हे जेव्हा लक्षात आलं, तेव्हा त्यांनी अहमदाबादच्या सेंट झेवियर्स कॉलेजमधून गुजराती भाषेत पदवी प्राप्त केली. १९७६मध्ये साबरकांठा जिल्ह्याच्या भिलोडा तालुक्यातील लुसाडिया गावी त्या जाऊन राहिल्या. अविश्रांत परिश्रम घेऊन स्थानिक आदिवासी लोकांचा विश्वास संपादन केला. येथील स्त्रियांना आर्थिक स्वातंत्र्य मिळालं, तरच परिस्थती सुधारेल असं त्यांना वाटलं आणि त्यांनी स्त्रीसंघटना उभी केली. त्या स्त्रियांना लिहायला, वाचायला शिकवलं. लुसाडिया आणि आसपासच्या खेड्यांमध्ये त्यांनी तिथल्या स्त्रियांचं जे आयुष्य पाहिलं, त्यांचे अनुभव, मारिजा यांना स्वत:ला करावे लागलेले प्रयत्न यांच्या कथा या सर्वांमधून त्यांनी गिरीसमां एक डुंगरी – गहाण पडलेली टेकडी - हे पुस्तक लिहिलं.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
GAHAN PADLELI TEKADI Rating Star
Add To Cart INR 220

Latest Reviews

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more

वा. पां. जाधव अमरावती

`अमरावतीचे छप्पन स्वभाव एक मनोरंजक काव्यसंग्रह` `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे अमरावतीचे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री जी. बी. देशमुख यांचे अमरावती नगरीचा सहज स्वभाव व ह्या नगरीच्या वेगळ्या ओळखीवर आधारित मनोरंजक पुस्तक वाचले. वाचून भरपूर मनोरंजन झाले. खर काय लिहावे या लेखकाबद्दल, मन गोंधळले. ऐतिहासिक असो, प्रवास वर्णन असो, व्यक्ती विशेष असो, अनुभवात्मक घटना घडामोडी असो कशावरही सहज लिखाण करणारा हा लेखक आहे. आता तर त्यांनी लेखनाला विनोद प्रचुर फोडणी देऊन `अमरावतीचे छप्पन स्वभाव` या काव्यसंग्रहातून अमरावतीकरांना मनोरंजनाची मेजवानीच दिली आहे. प्रत्येक शहराची व त्या शहरातील वैशिष्ट्यांची एक वेगळीच ओळख असते. दिवस जातात, काळ लोटतो, पिढ्या बदलतात मात्र जुन्या स्मृतीची चिन्हे नवीन येणाऱ्या पिढीच्या मनात गुढ निर्माण करत कायम हाक देत राहतात. अमरावतीही त्याला अपवाद नाही. बापट चौकात चौक नाही, त्या जागेवर चौरस्ता नसून टी-पॉइंट आहे, खापर्डे बगीचा म्हणून आजही ओळख आहे मात्र तेथे बगिचा नाही किंवा प्रसिद्ध गांधी चौकात गांधीचा पुतळा अथवा स्मृतीदर्शक चिन्ह अथवा उल्लेख नाही मात्र गांधी चौक अशीच ओळख जनमानसात आहे. अशा एक ना अनेक विसंगत नाम दर्शक ओळख असलेली उदाहरणे त्यात सप्रमाण आहेत. पण खरी गंमत म्हणजे कधी काळी घडलेला इतिहास त्यामध्ये दडलेला आहे हे निश्चित. या सोबतच अमरावतीकरांच्या स्वभावातला स्थायी मजेदारपणाच्या एक एका हटके गुण वैशिष्ट्याच्या गमती लेखकाने हुबेहूब अधोरेखित केलेल्या आहेत. आणि त्यावरुन तत्सम रचनांचा उहापोह लेखकाने पुस्तकात केला असावा. विदेशात स्थाईक झालेल्या मूळ अमरावतीकरांना लेखकाने लिहिलेल्या गमती मनोरंजनात्मक वाटाव्या एवढी किमया जी.बी. च्या सहज लेखनाने दाखवली आहे. अमरावतीचे अग्रगण्य वृत्तपत्र दै. हिंदुस्थान मध्ये लेखकाने सतत ६ महीणे लिहीलेल्या काव्य सदरात अमरावतीच्या जनमानसाच्या हृदयाच्या ठाव घेणाऱ्या काव्य रचनांचा आठवणींनी महापूर ओसंडून गेला होता. विशेष म्हणजे ह्यात कुठेही अनावश्यक अभिनीवेष नव्हता. उलट गमतीत केलेले आत्मपरिक्षण मात्र काही प्रमाणात होते. वयस्क अमरावतीकर रसिकांना या रचना ताज्या करून त्यांच्या तारुण्यात घेऊन गेल्या हेच खरे. जी बी देशमुख या लेखकास मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रियां वरून दिसून येते. . सदर पुस्तकातील काव्यमय रचना वाचतांना अमरावतीच्या माणसाच्या वऱ्हाडभोळ्या स्वभावाची प्रचीती येते आणि वेगळाच आनंद देऊन जाते. निखळ मनोरंजन करत गुदगुल्या करणारा असा हा काव्यसंग्रह आहे. अमरावती शहराची ऐतिहासिक वैशिष्टे काव्यरूपात वाचण्याचा आनंद अमरावतीकरांना ते जिथं असतील त्या गावात, परगावात, परदेशात पुस्तक मागवून घेता येईल. ...Read more