* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: NIGHT
  • Availability : Available
  • Translators : ASHA KARDALE
  • ISBN : 9789353172275
  • Edition : 2
  • Publishing Year : SEPTEMBER 1993
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 136
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
NIGHT IS A WORK BY ELIE WIESEL ABOUT HIS EXPERIENCE WITH HIS FATHER IN THE NAZI GERMAN CONCENTRATION CAMPS AT AUSCHWITZ AND BUCHENWALD IN 1944–1945, AT THE HEIGHT OF THE HOLOCAUST TOWARD THE END OF THE SECOND WORLD WAR. IN JUST OVER 100 PAGES OF SPARSE AND FRAGMENTED NARRATIVE, WIESEL WRITES ABOUT THE DEATH OF GOD AND HIS OWN INCREASING DISGUST WITH HUMANITY, REFLECTED IN THE INVERSION OF THE PARENT–CHILD RELATIONSHIP, AS HIS FATHER DECLINES TO A HELPLESS STATE AND WIESEL BECOMES HIS RESENTFUL TEENAGE CAREGIVER. THE BOOK HAD BEEN TRANSLATED INTO 30 LANGUAGES, AND NOW RANKS AS ONE OF THE BEDROCKS OF HOLOCAUST LITERATURE. NIGHT IS THE FIRST IN A TRILOGY—NIGHT, DAWN, DAY—MARKING WIESEL`S TRANSITION DURING AND AFTER THE HOLOCAUST FROM DARKNESS TO LIGHT.
दुसऱ्या महायुद्धात हिटलरच्या नाझी भस्मासुराने लक्षावधी ज्यूंचा क्रूर नरमेध केला. त्या क्रौर्याच्या कहाण्या आजही काळीज फाडून टाकतात. हिटलरच्या छळछावण्यांमध्ये आणि तुरुंगांमध्ये ज्या ज्यूंनी अमानुष छळ सोसला आणि त्या मृत्यूच्या सापळ्यांमधूनही वाचून जे जिवंत राहिले, त्यांचे अनुभव म्हणजे वाहती जखम आहे. अशीच एक भळभळती जखम म्हणजे ‘नाइट’ हे पुस्तक. डॉ. एली वायझेल यांना वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी ऑशवित्झ आणि बुशेनवाल्ड इथल्या नाझींच्या तुरुंगात नेण्यात आले. त्यांचे आई-वडील, लहान बहीण - सर्वांनाच जर्मनांनी पकडून नेले. त्या तुरुंगामधल्या यमयातनांमधून फक्त डॉ. एली वायझेल वाचले. आपल्या प्राणप्रिय आई-वडील-बहीण यांचे मृत्यू त्यांना कोवळ्या वयात सोसावे लागले. हा सगळा या विदारक अनुभव त्यांनी या पुस्तकात कमालीच्या प्रत्ययकारी भाषेत मांडला आहे. हे पुस्तक म्हणजे सखोल जीवनचिंतन आहे. स्वतःच्या दुःखाच्या वर्णनाबरोबर मानवी स्वभावावरील त्यांचे भाष्य अत्यंत अर्थघन आहे. पुस्तकाच्या पानापानांमध्ये त्या काळरात्रींचा जिवंत अनुभव ठासून भरला आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
ELIE WIESEL #NAZIGERMAN #SECONDWORLDWAR #HOLOCAUSTLITERATURE # HITLER # JEWLITERATURE #AUSCHWITZANDBUCHENWALDIN1944–1945 #दुसरेमहायुद्ध #नाझी #हिटलर #एलीवायझल #
Customer Reviews
  • Rating StarAmit Indurkar

    मानवतेला काळीमा फासणारे कृत्य करणारा व्यक्ती अर्थात ` हिटलर ` शाळेत असताना हिटलर हे नाव अनेकदा ऐकले होते. हिटलर म्हणजे कुणीतरी रागीट, तापट आणि सर्वांना नकोसा असणारा क्रूर व्यक्ती असावा एवढेच काय त्या हिटलर बद्दल माहित होते. शाळेत असताना मित्र एकमेांना " ए जास्त हिटलर बनण्याचा प्रयत्न करू नकोस, हिटलरशाही तुझ्या अंगात आली आहे का?" इत्यादी वाक्ये बोलायचो. पण हा हिटलर नेमका कोण होता हे त्यावेळी कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. पण काही वर्षांपूर्वी माझ्या एका शिक्षकाने (लेखक, पत्रकार व कवी असणारे) मला कुमार नवाथे लिखित नाझी नरसंहार हे पुस्तक दिलं. ते पुस्तक मी वाचून काढलं तेव्हा मला समजले की एखाद्या रागीट, तापट व क्रूर माणसाला हिटलर नावाने का संबोधले जात असते. हे पुस्तक वाचण्यापूर्वी मी आमच्या महाविद्यालयात एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रात सहभागी झालो होतो. चर्चासत्राचा विषय होता मावधिकराच्या विस्तारित कक्षा (The Expanding Horizon of Human Rights). या चर्चासत्राच्या शोधपुस्तिकेसाठी मी एक लेख देखील लिहिला होता. या चर्चासत्रात सहभागी होणाऱ्या एका प्राध्यापकाने हिटलर ने तयार केलेल्या छळछावणीतील त्या क्रूर आणि हिंस्त्रक कार्यवाहीचे काही दाखले दिले होते. ते ऐकून अस्वस्थ वाटू लागले. पण नंतर शिक्षकाने दिलेले पुस्तक वाचल्यानंतर तर मनात एक विचार सारखा येऊ लागला (विचार नव्हे हा तर एक ठाम निष्कर्शच) की हिटलर का क्रूर आणि हिंस्त्रप्राणी होता. त्याला प्राणी देखील म्हणता येणार नाही. (माणूस म्हणण्याच्या लायकीचा तर तो नाहीच). आजवर वाघ, सिंह यांना आपण हिंस्त्रप्राणी असे म्हणत आलेलो आहोत पण ही प्राणी एखाद्या पशू किंवा प्राण्याची शिकार करतात, त्याचे रक्त पितात, त्याचे मांस खातात. पण पोट भरून झाल्यावर मात्र त्यांच्या समोरून कोणता प्राणी गेला तरीही ते शांत असतात कारण पोट भरलेलं असतं. पण हिटलर ने केलेली हिंसा ही कधीही पोट न भरलेल्या प्रण्यासारखी होती. या हिंस्त्र प्राण्याला माणसांवर (ज्यू स्त्री - पुरुष, बालके, अबालवृद्ध लोकांना छळण्याची, त्यांना जिवानिशी मारण्याची सवय झालेली होती. (रक्ताने माखलेले तोंड म्हणतात ना एकदम तशी सवय) याकरिता त्याने त्या जिवंत ज्यू लोकांना अनेक मरणयातना दिल्या, त्यांचा अनन्वित छळ करून त्यांना यमसदनी पाठविले. हिटलर चे हे कृत्य वाचले की अंग अक्षरशः थरथर कापू लागतो, मनात अस्वस्थता निर्माण होते, सभोवताली भीतीचे काळेकुट्ट ढग निर्माण झाल्याचा भास होतो. एली वायझल नावाच्या एका लेखकाने (हिटलरच्या छळछावणीत मरणयातना भोगणाऱ्या एका प्रत्यक्षदर्शी असणारी व्यक्ती) नाईट नावाचे त्याचे छळछावणीत आलेल्या अनुभवाचे एक आत्मकथन लिहिले. हे पुस्तक वाचून आता हिटलर हा शब्द, हे नाव नकोसे वाटू लागले. ते आत्मकथन वाचत असताना पूर्वी लिहिल्याप्रमाणे अंगाला थरकाप सुटतो. लेखकाने त्याच्या डोळ्यासमोर त्याचे कुटुंब, त्याचे गाव उध्वस्त होताना बघितले. त्याने आपल्या कुटुंबातील सर्व सदस्याला हिटलर च्या छळछावणीत त्यांच्याशी होणाऱ्या क्रूर वागणुकीचा सामना करताना बघितले. तेव्हा त्याचे वय जेमतेम १६ वर्षे होते. १६ वर्षाचा हा बालक हिटलर च्या क्रूर कार्यवाहीचा बळी ठरलेला होता. तहान, भूक त्यातल्या त्यात स्वतः चे जीवन वाचविण्यासाठी सोसावे लागणारे दुःख, डोळ्यादेखत अनेकांची हत्या होताना पाहणे, अनेकांना फासावर जाताना तर अनेकांना भुकेपोटी एकमेकांना मारताना पाहणे असे अंगावर काटा आणणारे अनेक अनुभव लेखकाला आलेले आहेत. हे पुस्तक वाचताना ही परस्थिती आपल्या शत्रूवर देखील उद्भवू नये असे मनोमन वाटते. (पुस्तकातील प्रत्येक पृष्ठावर त्या छळछावणीत बंदिस्त असणाऱ्या आणि मरणयातना भोगणाऱ्या त्या सर्व लोकांच्या आर्त किंकाळ्या आहेत. जणूकाही ते आपल्याला सांगत आहेत, ` ही परिस्थिती भविष्यातील पिढ्यांवर ओढवू नये.` ) भारतातील अनेक लोकांना हिटलर, त्याची विचारसरणी, त्या विचारसरणीशी साम्य असणारी संघटन, व्यक्ती अजूनही आवडतात. अश्या विचारसरणी चा विरोध करण्याऐवजी या विचारसरणीला खतपाणी घालत असतात. अशी ही हिंस्त्र विचारसरणी देशातीलच नव्हे तर जगातील लोकांना ( समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय आणि धर्मनिरपेक्ष या विचारसरणीशी बांधिलकी असणाऱ्या व्यक्तींना) नक्कीच आवडणार नाही, नव्हे ती कुणाला परवडणारी देखील नाही. हिटलर लिखित ` माझा लढा (संघर्ष)` हे आत्मचरित्र भारतात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या पुस्तकाच्या यादीत समाविष्ट झालेलं आहे. पण चिंतेची बाब आहे की, त्याची विचारसरणी अनेकांना आवडू लागलेली आहे. ...Read more

  • Rating StarSuhas Birhade

    नाईट- पिता पुत्राचा मृत्यूशी संघर्ष नाझींच्या क्रूरतेच्या, नरसंहाराच्या घटना काळजाचा थरकाप उडवतात, अंगावर शहारे आणतात. नाझींच्या छळछावणीतून बचावलेल्या एली वायझल यांनी लिहिलेले ‘नाईट’ हे पुस्तक देखील वाचताना सुन्न करून जातं. १५ वर्षांचें असताना एलीयांना कुटुंबासह छळछावणीत डांबण्यात आलं. एली आणि त्यांच्या वडीलांचा प्रत्येक क्षणी मृत्यूशी सामना सुरू होता. या संकटसमयी किशोरवयीन मुलगा आणि त्याच्या वडिलांच्या अतूट नात्याची हृदयस्पर्शी कहाणी या पुस्तकातून उलगडते. नाझींच्या छळछावण्या, ज्यू लोकांच्या निर्दयी कत्तली याविषयी अनेक पुस्तके, सिनेमे आहेत. ‘नाईट’ पुस्तकात वडील आणि मुलाच्या नात्याची करूण किनार दिसते. मृत्यूच्या नरकात एकमेकांनी जिवंत रहावे म्हणून दोघांची चालेलली धडपड, हतबलता वाचकांना बधीर करते. मृत्यू एकेक दिवस पुढे ढकल्यासाठी पिता पुत्रांचा संघर्ष सुरू असतो. एकेक प्रसंग काळजाचा ठाव घेतात. त्या कोवळ्या वयात एली यांच्यातील तीव्र इच्छाशक्ती मृत्यूवर मात करते. पुस्तकातील घटनांची कल्पना करवत नाही, एवढ्या भयंकर आहेत. कुठल्याही क्षणी जिवंत भट्टीत टाकले जाईल, गोळ्या घातल्या जातील हे माहित असताना दुदर्म्य इच्छाशक्तीच्या बळावर तग धरून राहत जगण्यासाठीचा संघर्ष सुरू असतो. एली वायझेल यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी पुढे अनेक पुस्तके लिहिली आहेत. ...Read more

  • Rating StarAneruddha Devkar

    ज्युंचा जो छळ क्रुर हिटलरच्या जर्मनीने केला त्याचे ह्रदयस्पर्शी वर्णन या पुस्तकातुन एली वायझल यांनी केले आहे. माणुस किती अमानुषपणे दुस-याशी वागु शकतो हे वाचुन शहारे येतात. लेखकाने आपला पुर्ण परिवार ह्या छळछावणीत आपल्या डोळ्यासमोर तीळतीळ मरताना पाहिला केवळ पंधराव्या वर्षी कोणालाही भोगाव्या लागु नये अश्या यातना त्यांनी भोगल्या. हजारो, लाखो ज्यु बांधवांना निर्विकारपणे मरणाच्या खाईत लोटणा-या निर्दयी नाझींचे वास्तववादी चित्रण लेखकाने यशस्वीपणे या पुस्तकात मांडले आहे. पुस्तकातील काही प्रसंग अतिशय भावस्पर्शी असुन मनाला हादरा देणारे आहेत. लेखकाने अनेक काळरात्री अनुभवल्या आणि त्या त्यांच्या संपुर्ण आयुष्याला कलाटणी देऊन गेल्यात. पुस्तकाच्या प्रत्येक पानावरील त्यांचे अनुभव मानवतेला काळीमा फासणारे आहेत. अश्या छळछावण्यांमधुन सर्व हालअपेष्टा भोगुन सुटलेल्या सर्व योध्दयांना सलाम.... ...Read more

  • Rating StarKIRAN BORKAR

    अंगावर काटा आणणारे आत्मकथन.... हे आत्मकथन आहे एका ज्यूचे. जो नाझींच्या छळछावणीतून सुटून आलाय. माणुसकीचा अंत म्हणजे ज्यूची छळ छावणी. नाझीनी पद्धतशीरपणे केलेला ज्यूचा नरसंहार यातून दिसून येतो.कोवळ्या मुलांनी भरलेल्या गाड्या गॅस चेंबरकडे जात होत्या. भटटीचे इंधन म्हणून जिवंत माणसे वापरली जात होती. नाझीनी कित्येक लहान मुलांना आपली आई बहीण डोळ्यादेखत भट्टीत जळताना जबरदस्तीने पाहायला लावली. नाझींच्या क्रौर्याच्या कहाण्या अनेक पुस्तकातुन वाचल्या गेल्यात . ट्रान्सील्वानियातील सिघेट गावातील पंधरा वर्षाच्या ज्यू मुलाची ही कहाणी जी त्याने प्रत्यक्ष अनुभवली आहे. छळछावणीतील प्रत्यक्षात पाहिलेले दाहक अनुभव हा मुलगा आपल्याला सांगतो. सिघेट गावातील तो मुलगा आपले आई वडील आणि तीन बहिणी यांच्यासोबत राहतोय. एके दिवशी सिघेटमध्ये जर्मन सैनिक घुसले. त्यांनी सर्व ज्यूना पिवळा तारा धारण करायला लावला.त्यांना हॉटेल मंदिरात जाण्यास बंदी घातली. संध्याकाळी सहा नंतर घराबाहेर पडू नये असा आदेश काढला. ज्यूच्या बंदिस्त वसाहती उभारल्या गेल्या .त्यालाच घेटो नाव दिले गेले आणि एक दिवस त्या सर्वांना सिघेटमधून हद्दपार करण्यात आले. हद्दपार केलेल्या ज्यूना छळ छावणीत नेण्यात आले.तिथे स्त्री पुरुष लहान मुले याना वेगळे केले गेले. त्या नंतर कोणीही आपल्या कुटूंबातील स्त्री पुरुषांना पाहू शकले नाही. मग सुरू झाला फक्त छळ,अमानुष मारहाण ,जनावरांनाही मिळणार नाही इतकी क्रूर वागणूक. उपासमार आणि हाड गोठविणार्या थंडीत गुरांच्या डब्यातून हजारो किलोमीटरचा प्रवास. कित्येकजण त्या भयानक थंडी गारठून मेले.काहीजण फक्त बर्फ खाऊन जगले. गॅस चेंबरमध्ये आपला नंबर कधी येईल याची वाट पाहत राहिले. या छळछावणीतही त्या मुलाने आपल्या वडिलांची साथ सोडली नाही. प्रसंगी भयानक मार ही खाल्ला. कणाकणाने आपल्या वडिलांना मरताना त्याने पाहिले.शेवटी अमेरिकन सैन्याने त्या छळछावणीवर ताबा मिळवला आणि त्याची सुटका झाली . लेखकाने ओस्लो येथे १० डिसेंबर १९८६ रोजी नोबेल शांती पुरस्कार स्वीकारला . ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

ANUWADATUN ANUSARJANAKADE
ANUWADATUN ANUSARJANAKADE by LEENA SOHONI Rating Star
कौशिक लेले

पुस्तक – अनुवादातून अनुसर्जनाकडे (Anuwadatun Anusarjanakade) लेखिका – लीना सोहोनी (Leena Sohoni) भाषा – मराठी पाने – २३९ प्रकाशन – मेहता पब्लिशिंग हाऊस. फेब २०२४ छापील किंमत – रु. ३७०/- ISBN – 9789357205337 ह्या परिचयाची माझी वेबसाईट लिंक htps://learnmarathiwithkaushik.com/courses/anuwadatun-anusarjanakade/ मराठी पुस्तकांमध्ये सध्या इतर भाषांतून अनुवादित झालेली पुस्तके सुद्धा मोठ्या संख्येने दिसतात. एखादा सरस अनुवाद वाचताना आपल्या डोक्यात सुद्धा आपल्या आवडीच्या परभाषेतल्या पुस्तकांची यादी तयार होते. ही पुस्तकं सुद्धा मराठीत आली तर काय मजा येईल असं वाटतं. भाषा हा ज्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे त्यांची इच्छा एक पुढचं पाऊल टाकेल. आपणही स्वतः असा अनुवाद केला तर ? आपल्यालाही दोन्ही भाषा चांगल्या येत आहेत मग अनुवाद का करू नये ? हे पिल्लू डोक्यात शिरेलच. असा अनुवाद करायचा स्वतः काही प्रयत्न केला की लक्षात येईल की हे किती किचकट काम आहे. चांगला अनुवाद करायचा असेल तर सराव लागेल. अभ्यास लागेल. त्याची काही तंत्र मंत्र शिकून घ्यावी लागतील. एखाद्या चांगल्या जाणकार व्यक्तीचं, अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शनही मिळायला हवं. जर तुमच्याही मनात अशा भावना आल्या असतील तर लीना सोहोनी यांचं “अनुवादाकडून अनुसर्जनाकडे” हे पुस्तक तुम्हाला नक्की आवडेल. लीना सोहोनी हे नाव मराठीत अनुवादिका म्हणून प्रसिद्ध आहे. आत्तापर्यंत त्यांनी अनुवाद केलेली पन्नासच्यावर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचा अनुभव व अधिकार वेगळा सांगायला नको. त्यांचे हे पुस्तक "अनुवादातून अनुसर्जनाकडे" पुस्तकाचा पहिला भागात लीना सोनी यांनी आपल्या अनुवादाच्या प्रवासाचं सिंहावलोकन केलं आहे. त्यांनी अनुवादाची सुरुवात कशी केली, त्यात प्रगती कशी झाली हे लिहिलं आहे. अनुवादामुळे प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर, सुधा मूर्ती, किरण बेदी यांच्याशी जुळलेले संबंध आणि त्यांच्या भेटीची वर्णनं आहेत. ह्या प्रवासात “मेहता पब्लिशिंग हाऊस” या प्रकाशन संस्थेचा भरभक्कम पाठिंबा त्यांना मिळाला. सुनील मेहता आणि अनिल मेहता यांच्याबरोबरच्या आठवणी सुद्धा पुस्तकात आहेत. पुढच्या भागात अनुवाद या विषयाची एखाद्या शास्त्रीय शोधनिबंधाप्रमाणे माहिती दिलेली आहे. यात अनुवाद प्रक्रियेकडे अतिशय बारकाईने बघितलं आहे. ढोबळमानाने बघितलं तर, अनुवाद म्हणजे तर एका भाषेतल्या शब्दांच्या ऐवजी दुसऱ्या भाषेतले शब्द वापरणे. पण प्रत्येक वेळी एका शब्दाच्या बदल्यात दुसरा भाषेतला एक शब्द असं होतंच असं नाही. त्यामुळे काही वेळा शब्दाची फोड करून दाखवावी लागते. तर काही वेळा मूळ मोठं वाक्य लहान होऊ शकतं. कदाचित तिथे पूर्णपणे वेगळीच शब्दयोजना वाक्यरचना होऊ शकते. या प्रत्येक प्रकाराला एक विशिष्ट शास्त्रीय नाव (पारिभाषिक संज्ञा) आहे हे आपल्याला पुस्तक वाचून कळतं. जे शब्दांच्या बाबतीत तेच वाक्यांच्या बाबतीत. मूळ भाषेतल्या शब्दांसाठी नवीन शब्द वापरून वाक्य तयार झालं तरी ते वाचकाला सहज वाटलं पाहिजे. नाहीतर आपण लगेच म्हणू, “अनुवाद खूप बोजड झाला आहे; ठोकळेबाज झाला आहे”. हे टाळायचं तर वाक्यरचना सुद्धा सुधारायला पाहिजे. याची उदाहरणे पुस्तकात दिली आहेत आणि त्या अनुषंगाने पारिभाषिक संज्ञा (terminology) काय आहे हे मराठी आणि इंग्रजी दोन्हीत दिलं आहे. शब्द, वाक्य ह्यांना लावलेल्या कसोटीचा विस्तार करून ती कसोटी “संकल्पनां”ना लावायला पाहिजे. एखाद्या भाषेत, एखाद्या समाजात असणाऱ्या संकल्पना, प्रथा-परंपरा मराठी भाषेत नसतील तर अनुवाद करताना ते जसंच्या तसं ठेवायचं का तिथे काही वेगळी संकल्पना वापरायची ? का तळ टीप देऊन स्पष्टीकरण द्यायचं? असे एकाच गोष्टीकडे बघण्याचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. हा मुद्दा आपण सोदाहरण स्पष्ट केला आहे. हा ऊहापोह वाचल्यासार अनुवादासाठी दोन्ही भाषांवर आपली किती चांगली पकड पाहिजे हे वाचकाच्या लक्षात येईल. त्याचबरोबर जे पुस्तक आपण वाचतोय त्याची पार्श्वभूमी, त्यातल्या प्रसंगाची सामाजिक पार्श्वभूमी, आणि लेखकाला काय ध्वनीत करायचे आहे हे सगळं समजणं सुद्धा किती महत्त्वाचं हे लक्षात येईल. म्हणजे अनुवाद प्रक्रिया दिसताना शब्दांची दिसली तरी “शब्दांच्या पलीकडले” अनुवादकाला पकडता आले तरच मूळ कृतीला न्याय मिळेल. हे या पुस्तकाच्या वाचनातून अधोरेखित होतं. पुस्तकाचा प्रकारानुसार अनुवादकासमोर असणारी आव्हाने सुद्धा बदलतात. कथा-कादंबरीचा अनुवाद वेगळा तर कवितेचा अनुवाद वेगळा. कारण कवितेमध्ये भावभावनांना महत्त्व आहे तितकेच महत्त्व शब्द, लय, शब्दचमत्कृती यांनाही आहे. म्हणूनच तर ते पद्य आहे गद्य नाही. लीनाजींनी ह्याचाही परामर्श घेतला आहे. नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने अजून वेगळी. परिणामकारक संवाद, नेपथ्य, पात्रांची देहबोली, त्याचा प्रेक्षकांवर होणारा परिणाम या सगळ्याचा विचार करून अनुवाद करावा लागतो. म्हणूनच, अनुवाद म्हणजे प्रत्येक वेळी “शंभर टक्के पुस्तक जसेच्या तसे” असं नसतं. तर काही वेळा ते रूपांतर ठरतं. काही वेळा तो स्वैर अनुवाद ठरतो. तर काही वेळा मूळ कलाकृतीवर आधारित नवीन कलाकृती ठरते. हे सुद्धा कितीतरी उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे. हे सगळे मुद्दे एकमेकांशी निगडित आहेत त्यामुळे पुस्तकात बऱ्याच वेळा मुद्द्यांची पुनरावृत्ती झाली आहे असं मला वाटलं. ती पुनरुक्ती टाळून कदाचित थोडी पानं कमी करता आली असती. पण मुद्दा वाचकाच्या मनावर ठसावा, कुठलंही विशिष्ट प्रकरण वाचायला घेतले तरी ते त्या मुद्द्यापुरतं पूर्ण असावं हा त्यामागचा हेतू असेल. पुस्तकात पुढे अनुवादकांना नोकरी, व्यवसायाच्या काय संधी आहेत; कुठल्या संस्था याबद्दलचं शिक्षण देतात; कुठले कोर्सेस उपलब्ध आहेत याबद्दलचा तपशील आहे. अनुवाद करायला सुरुवात करायची असेल तर मजकूरनिवड, प्रकाशकांशी संपर्क, परवानगी ह्याचे मार्गदर्शन आहे. त्यांनतर शाळेत आपण जे प्राथमिक व्याकरण शिकतो; म्हणजे कर्ता, कर्म, क्रियापद, ॲक्टिव-पॅसिव्ह व्हॉइस, वेगवेगळे काळ इत्यादींच्या व्याख्या देऊन सगळ्याची उजळणी केली आहे. ज्याला अनुवाद क्षेत्रात उतरायचे आहे त्याला व्याकरणाचा अजून बराच अभ्यास करावा लागणारच आहे. आणि पुस्तकाचा उद्देश व्याकरण शिकवणं नाही तर अनुवादकासाठी व्याकरण अत्यावश्यक आहे हे ठसवणं आहे. त्यामुळे व्याकरणाचा भाग पुस्तकात नसता तरी चालला असता असं मला वाटलं. पुस्तकातील काही पाने वर दिलेल्या लिंकवर शेअर केली आहेत. म्हणजे तुम्हाला पुस्तकाची, लेखनशैलीची अजून चांगली कल्पना येईल. त्यात पुढील मुद्द्यांबद्दलची पाने आहेत १) अनुवादिका म्हणून येणारे कटुगोड अनुभव. २) प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर ह्यांच्या पुस्तकांचा मराठी अनुवाद लीनाजींनी केला आहे. त्यातून जेफ्री आर्चर ह्यांच्याशी भेटीगाठी झाल्या त्यातला एक प्रसंग. ३) अनुवादाचे वर्गीकरण/प्रकार सांगणाऱ्या प्रकरणातली दोन पाने. अनुवाद प्रक्रियेची किती बारकाईने तांत्रिक चिकित्सा केली आहे हे लक्षात येईल. ४) नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने ह्याबद्दलच्या प्रकरणातली दोन पाने. लीना सोहोनींचे आत्मकथन असणारा पुस्तकाचा पहिला भाग सर्व वाचकांना वाचायला आवडेलच. पुस्तकाचा दुसरा भाग तांत्रिक आहे. तो सर्वसामान्य वाचकाला वाचायला आवडेलच असं नाही. पण तो वाचल्यावर अनुवादक म्हणून काम करताना किती कटकटी असतात, काय व्यवधानं सांभाळावी लागतात हे वाचकाच्या लक्षात येईल. त्यातून अनुवादकांकडे व त्यांच्या कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन अजून कौतुकाचा आणि कृतज्ञतेचा होईल हे निश्चित. ज्यांना अनुवाद करायचा आहे, या क्षेत्रात शिरायचं आहे किंवा तशी उमेदवारी सुरू झाली आहे त्यांना हा भाग मार्गदर्शक ठरेल. जाण वाढवेल हे नक्की. त्यामुळे या पुस्तकाच्या वाचनातून अनुवादाचा किडा काही वाचकांच्या डोक्यात गेला आणि त्यातून नवे अनुवादक मराठीत निर्माण झाले तर ते सोन्याहून पिवळे ! मराठीत कथा,कादंबऱ्या, चरित्र, सामाजिक विषयांची चर्चा ह्या पद्धतीचे लेखन भरपूर होत असतं. पण ह्या पुस्तकाप्रमाणे शास्त्रीय/तांत्रिक चिकित्सा करणारी, गंभीरपणे शिकवणारी पुस्तकं कमी दिसतात. ती प्रकाशित झाली तरी ती क्रमिक पाठ्यपुस्तक किंवा “अभ्यासाचे पुस्तक” या प्रकारात ढकलली जातात आणि दुर्लक्षित होतात. पण या पुस्तकाच्या लेखिका आणि प्रकाशक यांनी हे पुस्तक मुख्यधारेतल्या पुस्तकाप्रमाणे सादर केलं आहे. त्यातून हे पुस्तक जास्त वाचलं जाईल; जास्त लोकांना विचार प्रवृत्त करेल असं मला वाटतं. अशा प्रकारची पुस्तकं मराठीत प्रकाशित होणे हे मराठी भाषेला ज्ञानभाषा करण्यासाठी मोठे योगदान आहे. त्याबद्दल प्रकाशक आणि लेखिका दोघांचेही एक मराठी भाषा प्रेमी म्हणून मी मनापासून आभार मानतो. —————————— मी दिलेली पुस्तक श्रेणी —————————— अनुवाद करणारे असाल किंवा करायची इच्छा असेल तर आवा ( आवर्जून वाचा ) इतरांनी जवा ( जमल्यास वाचा ) ——————————— आवा ( आवर्जून वाचा ) जवा ( जमल्यास वाचा ) वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक ) नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक ) ...Read more

OMKARACHI REKH JANA
OMKARACHI REKH JANA by MANJUSHRI GOKHALE Rating Star
सौ. जस्मिन जोगळेकर

आमच्या पुस्तकप्रेमी समुहावरचा एकही दिवसाचा खंड न पडता सलग 1730 वा पुस्तक परिचय पुस्तक प्रेमी समूह,पुस्तक परिचय अभियान: एकही दिवस खंड पडू न देता पुस्तकांचा परिचय हे पुस्तकप्रेमी समूहाचे यश ! पुस्तक सत्र:- ३ सप्ताह क्रमांक:- २४८ पुस्तक क्रमांक: १७३० दिनांक: १०/०३/२०२५ पुस्तकाचे नांव:- ओंकाराची रेख जना लेखक:- मंजुश्री गोखले पहिली आवृत्ती: फेब्रुवारी २०१२ पृष्ठ संख्या : ३०८ मूल्य: रु. ३२० प्रकाशन: मेहता पब्लिशिंग हाऊस परिचयकर्ती: सौ. जस्मिन जोगळेकर एखाद्या गोष्टीसाठी वेळ यावी लागते म्हणतात, तसं काहीसं झालं माझं. खरंतर पुस्तक वाचनाच्या बाबतीत असं व्हायला नको होतं पण झालं. `हे खूप सुंदर पुस्तक आहे, तुम्ही वाचाच` म्हणून एक पुस्तक आमच्या हाती आलं. अर्थात ज्यांनी सांगितलं त्यांनी त्यांच्या संग्रहातलं पुस्तक दिलं होतं. तसं बरेच दिवस होतं आमच्याकडे. नवऱ्याने वाचून खूपच सुंदर आहे, वाच नक्की सांगितलं देखील मला. पण पुस्तक परत द्यायची वेळ आली तरी वाचलं गेलं नाही. तरी ते नाव डोक्यात फिट बसलं होतं. अखेर एक दिवस ते एकच पुस्तक नव्हे तर त्याच लेखिकेची चार पुस्तकं विकतच घेऊन आले आणि मग ती वेळ आली…. त्या पुस्तकाच्या, पुस्तकातील भाषेच्या आणि त्या लेखिकेच्या प्रेमात पडण्याची. पुस्तक होतं…मंजुश्री गोखले यांनी संत जनाबाईंवर लिहिलेलं `ओंकाराची रेख जना`. `विठू माझा लेकुरवाळा`, `धरिला पंढरीचा चोर` अशा अभंग रचनेतून जनाबाई आपल्या ओळखीच्या आहेत. किंवा विठूराया त्यांना हर कामात मदत करत असतो वगैरे माहीत आहे. पण त्यांचं संपूर्ण चरित्र सगळ्यांना माहीत असेलच असं नाही. ते माहीत करून देण्याचं सुरेख काम या कादंबरीने केलं आहे. जनाबाईंच्या जन्मापूर्वीची आणि नंतरचीही त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती, छोट्या जनाला मागे ठेऊन दुखण्याने तिला सोडून गेलेली तिची आई, त्यानंतरची बिकट वेळ याचं वर्णन वाचताना डोळ्यातलं पाणी थांबत नाही. पुढेही काही प्रसंग असे आहेत…भागाबाईचं वागणं असेल किंवा सुळावर चढवायचा प्रसंग असेल… डोळ्यात पाणी येतच राहतं. पण एवढं होऊनही त्यांची पंढरीरायावरची भक्ती मात्र गाढ होती. जनाईसुध्दा त्याला पाहायला आतुर होती. सोसले चटके l पोटी नाही घास l विठ्ठलाची आस l जनाईला ll भेटीसाठी त्याच्या l गोळा तनमन l धाडे आवतान l विठूराया ll अखेर विठुरायाकडून आमंत्रण आल्यावर बापलेक पंढरीची वाट चालू लागतात. काळया देवाला पाहायला आसुसलेली जना आणि लेकीला कायमचं परक्या घरी सोडून यायचं या विचाराने जडावलेला दमा… नशिबाची रेख l भिवरेच्या काठी l विठूराया ओढी l जनाईची ll दोघांचा प्रवास विठ्ठलाच्या विश्वासावर सुरू होतो. पुढं जनाईला दामाशेटींच्या घरी सोडून देणं, त्या घराने जनाला आपलंच म्हणणं, नामदेवांसोबत तिचं मोठं होणं अशा कितीतरी प्रसंगांनी सुखावून जायला होतं. तेव्हाची सामाजिक परिस्थिती, जनाचं अतिशूद्र असणं आणि त्यातून स्त्री असणं…त्यासाठी तिला झेलावे लागणारे त्रास, संत म्हणून मोठेपण मिळाल्यावरही त्यांच्यावर आलेला चोरीचा आळ… त्रास होतो वाचताना. जनाची आणि विठ्ठलाची पहिली भेट आणि तिथून त्यांच्यात दृढ होत जाणारे नाते…वाचताना शहारून जायला होतं. जना ते संत जनाबाई हा प्रवास, त्यात जनाबाईंनी रचलेले अभंग, ज्ञानदेवादि भावंडांचा सहवास आणि मुख्य म्हणजे नामदेव आणि जनाबाई यांचे नाते… गुरू शिष्य ऐसी l जोडी कौतुकाची l जनी नामयाची l संतांमधे ll याबद्दल पुस्तकात आलेले उल्लेख मन लावून वाचण्यासारखे आहेत. विठ्ठलाच्या चरणी झालेला जनाबाईंच्या जीवनाचा शेवट म्हणजे तर 🙏 वृंदा कोमेजली l स्तब्ध वारा पाणी l ओघळले मणी l मंजिऱ्यांचे ll थरारली वीट l कंप राऊळाला l श्वास ओलावला l क्षणभर ll आज नाही घाई l विठोबाला काही l जनाईच येई l चरणाशी ll शांता शेळके यांनी अनुवाद केलेलं `चौघीजणी` जसं मनात कायमचं घर करुन बसलं आहे, त्या जोडीला आता `ओंकाराची रेख जना` हे ही अत्यंत आवडीचं झालं आहे. यापूर्वी संत साहित्य किंवा संतांवर लिहिलेलं साहित्य फारसं वाचलं नव्हतं. लताजी किंवा भीमसेनजींमुळे घराघरात पोहोचलेले अभंग तेवढे माहीत होते. त्यामुळं जनाबाईंवर लिहिलेल्या या पुस्तकाबाबत उत्सुकता होतीच. पहिल्या प्रकरणाच्या अगदी पहिल्या ओळीपासून या पुस्तकाशी जी बांधली गेले ते शेवटपर्यंत. पुस्तकातील सगळं वर्णन अगदी बारीक सारीक तपशील देऊन पुढं जात राहतं आणि त्यात आपल्याला गुंतवून ठेवतं. सुरुवातीची काही प्रकरणं तर डोळ्यात अश्रुंच्या धारा घेऊन, पुसट अक्षरं समोर ठेऊन वाचावी लागतात. प्रसंग सगळे l तपशिलासवे l डोळ्यात आसवे l वाचुनिया ll भाषा ही साजिरी l सत्य हेच वाटे l प्रसंग तो घडे l आसपास ll एकूणच पुस्तकातलं वर्णन इतकं जिवंत आहे की सगळे प्रसंग आपल्या आसपास घडताहेत असंच वाटत राहतं कायम. दमा - कुरुंडचं दुर्दैवी आयुष्य, पोटी मूल नसल्याचं त्यांचं दुःख, विठ्ठलाला त्यासाठी साकडं घालण्यासाठी त्यांनी केलेला पंढरपूरचा प्रवास असो किंवा जनाबाईंच्या खोलीत येऊन विठ्ठलाने त्यांच्याशी मारलेल्या गप्पा, त्यांना कामात केलेली मदत…. सगळे अगदी सगळे प्रसंग आपणच जगतोय असं वाटावेत इतके मनाला भिडून जातात. काही ठिकाणं तर अशी… `अरे विठ्ठला, गडबडीत भलतंच काय उचलतोस. तुझा रत्नहार आणि शेला तर घेऊन जा`...असं आपणच विठ्ठलाला हाक मारून सांगावं असं वाटायला लागतं वाचताना. भाषा, वर्णनशैली फार साजिरी आहे. पुस्तकातला `साजिरी` हा शब्द एकदम आवडून गेलाय. एखादा चेहरा पाहिल्यावर कसं आपल्याला कळून जातं ना की, ही व्यक्ती मायाळू आहे किंवा तुसडी आहे वगैरे…तसं पुस्तकाच्या सुरुवातीलाच यातल्या भाषेबद्दल आपुलकी, प्रेम वाटायला लागतं. भाषा साधी पण सुंदर, शब्दांचा वापर असा की यापेक्षा वेगळा शब्द इथं शोभला नसता असं वाटायला लागेल असा. अनवाणी पायाला चटके बसावेत इतकं हवामान अजून बदललं नव्हतं…यासाठी `अजून मातीने माया सोडली नव्हती`... किती सुरेख वाक्य आहे ना! अशी कितीतरी वाक्य आपल्याला त्यांच्या प्रेमात पाडायला लावणारी यात सापडतील. एकूणच सांगायचं झालं तर पुस्तक अप्रतिम आणि सगळ्यांनी आवर्जून वाचावं असंच आहे. एकाच लेखकाची पुस्तकं सलग एका मागोमाग एक अशी माझ्याकडून वाचली जात नाहीत. पण आता खुणावतंय ते… `जोहार मायबाप जोहार`. ...Read more