* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: NIGHT
  • Availability : Available
  • Translators : ASHA KARDALE
  • ISBN : 9789353172275
  • Edition : 2
  • Publishing Year : SEPTEMBER 1993
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 136
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
NIGHT IS A WORK BY ELIE WIESEL ABOUT HIS EXPERIENCE WITH HIS FATHER IN THE NAZI GERMAN CONCENTRATION CAMPS AT AUSCHWITZ AND BUCHENWALD IN 1944–1945, AT THE HEIGHT OF THE HOLOCAUST TOWARD THE END OF THE SECOND WORLD WAR. IN JUST OVER 100 PAGES OF SPARSE AND FRAGMENTED NARRATIVE, WIESEL WRITES ABOUT THE DEATH OF GOD AND HIS OWN INCREASING DISGUST WITH HUMANITY, REFLECTED IN THE INVERSION OF THE PARENT–CHILD RELATIONSHIP, AS HIS FATHER DECLINES TO A HELPLESS STATE AND WIESEL BECOMES HIS RESENTFUL TEENAGE CAREGIVER. THE BOOK HAD BEEN TRANSLATED INTO 30 LANGUAGES, AND NOW RANKS AS ONE OF THE BEDROCKS OF HOLOCAUST LITERATURE. NIGHT IS THE FIRST IN A TRILOGY—NIGHT, DAWN, DAY—MARKING WIESEL`S TRANSITION DURING AND AFTER THE HOLOCAUST FROM DARKNESS TO LIGHT.
दुसऱ्या महायुद्धात हिटलरच्या नाझी भस्मासुराने लक्षावधी ज्यूंचा क्रूर नरमेध केला. त्या क्रौर्याच्या कहाण्या आजही काळीज फाडून टाकतात. हिटलरच्या छळछावण्यांमध्ये आणि तुरुंगांमध्ये ज्या ज्यूंनी अमानुष छळ सोसला आणि त्या मृत्यूच्या सापळ्यांमधूनही वाचून जे जिवंत राहिले, त्यांचे अनुभव म्हणजे वाहती जखम आहे. अशीच एक भळभळती जखम म्हणजे ‘नाइट’ हे पुस्तक. डॉ. एली वायझेल यांना वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी ऑशवित्झ आणि बुशेनवाल्ड इथल्या नाझींच्या तुरुंगात नेण्यात आले. त्यांचे आई-वडील, लहान बहीण - सर्वांनाच जर्मनांनी पकडून नेले. त्या तुरुंगामधल्या यमयातनांमधून फक्त डॉ. एली वायझेल वाचले. आपल्या प्राणप्रिय आई-वडील-बहीण यांचे मृत्यू त्यांना कोवळ्या वयात सोसावे लागले. हा सगळा या विदारक अनुभव त्यांनी या पुस्तकात कमालीच्या प्रत्ययकारी भाषेत मांडला आहे. हे पुस्तक म्हणजे सखोल जीवनचिंतन आहे. स्वतःच्या दुःखाच्या वर्णनाबरोबर मानवी स्वभावावरील त्यांचे भाष्य अत्यंत अर्थघन आहे. पुस्तकाच्या पानापानांमध्ये त्या काळरात्रींचा जिवंत अनुभव ठासून भरला आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
ELIE WIESEL #NAZIGERMAN #SECONDWORLDWAR #HOLOCAUSTLITERATURE # HITLER # JEWLITERATURE #AUSCHWITZANDBUCHENWALDIN1944–1945 #दुसरेमहायुद्ध #नाझी #हिटलर #एलीवायझल #
Customer Reviews
  • Rating StarAmit Indurkar

    मानवतेला काळीमा फासणारे कृत्य करणारा व्यक्ती अर्थात ` हिटलर ` शाळेत असताना हिटलर हे नाव अनेकदा ऐकले होते. हिटलर म्हणजे कुणीतरी रागीट, तापट आणि सर्वांना नकोसा असणारा क्रूर व्यक्ती असावा एवढेच काय त्या हिटलर बद्दल माहित होते. शाळेत असताना मित्र एकमेांना " ए जास्त हिटलर बनण्याचा प्रयत्न करू नकोस, हिटलरशाही तुझ्या अंगात आली आहे का?" इत्यादी वाक्ये बोलायचो. पण हा हिटलर नेमका कोण होता हे त्यावेळी कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. पण काही वर्षांपूर्वी माझ्या एका शिक्षकाने (लेखक, पत्रकार व कवी असणारे) मला कुमार नवाथे लिखित नाझी नरसंहार हे पुस्तक दिलं. ते पुस्तक मी वाचून काढलं तेव्हा मला समजले की एखाद्या रागीट, तापट व क्रूर माणसाला हिटलर नावाने का संबोधले जात असते. हे पुस्तक वाचण्यापूर्वी मी आमच्या महाविद्यालयात एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रात सहभागी झालो होतो. चर्चासत्राचा विषय होता मावधिकराच्या विस्तारित कक्षा (The Expanding Horizon of Human Rights). या चर्चासत्राच्या शोधपुस्तिकेसाठी मी एक लेख देखील लिहिला होता. या चर्चासत्रात सहभागी होणाऱ्या एका प्राध्यापकाने हिटलर ने तयार केलेल्या छळछावणीतील त्या क्रूर आणि हिंस्त्रक कार्यवाहीचे काही दाखले दिले होते. ते ऐकून अस्वस्थ वाटू लागले. पण नंतर शिक्षकाने दिलेले पुस्तक वाचल्यानंतर तर मनात एक विचार सारखा येऊ लागला (विचार नव्हे हा तर एक ठाम निष्कर्शच) की हिटलर का क्रूर आणि हिंस्त्रप्राणी होता. त्याला प्राणी देखील म्हणता येणार नाही. (माणूस म्हणण्याच्या लायकीचा तर तो नाहीच). आजवर वाघ, सिंह यांना आपण हिंस्त्रप्राणी असे म्हणत आलेलो आहोत पण ही प्राणी एखाद्या पशू किंवा प्राण्याची शिकार करतात, त्याचे रक्त पितात, त्याचे मांस खातात. पण पोट भरून झाल्यावर मात्र त्यांच्या समोरून कोणता प्राणी गेला तरीही ते शांत असतात कारण पोट भरलेलं असतं. पण हिटलर ने केलेली हिंसा ही कधीही पोट न भरलेल्या प्रण्यासारखी होती. या हिंस्त्र प्राण्याला माणसांवर (ज्यू स्त्री - पुरुष, बालके, अबालवृद्ध लोकांना छळण्याची, त्यांना जिवानिशी मारण्याची सवय झालेली होती. (रक्ताने माखलेले तोंड म्हणतात ना एकदम तशी सवय) याकरिता त्याने त्या जिवंत ज्यू लोकांना अनेक मरणयातना दिल्या, त्यांचा अनन्वित छळ करून त्यांना यमसदनी पाठविले. हिटलर चे हे कृत्य वाचले की अंग अक्षरशः थरथर कापू लागतो, मनात अस्वस्थता निर्माण होते, सभोवताली भीतीचे काळेकुट्ट ढग निर्माण झाल्याचा भास होतो. एली वायझल नावाच्या एका लेखकाने (हिटलरच्या छळछावणीत मरणयातना भोगणाऱ्या एका प्रत्यक्षदर्शी असणारी व्यक्ती) नाईट नावाचे त्याचे छळछावणीत आलेल्या अनुभवाचे एक आत्मकथन लिहिले. हे पुस्तक वाचून आता हिटलर हा शब्द, हे नाव नकोसे वाटू लागले. ते आत्मकथन वाचत असताना पूर्वी लिहिल्याप्रमाणे अंगाला थरकाप सुटतो. लेखकाने त्याच्या डोळ्यासमोर त्याचे कुटुंब, त्याचे गाव उध्वस्त होताना बघितले. त्याने आपल्या कुटुंबातील सर्व सदस्याला हिटलर च्या छळछावणीत त्यांच्याशी होणाऱ्या क्रूर वागणुकीचा सामना करताना बघितले. तेव्हा त्याचे वय जेमतेम १६ वर्षे होते. १६ वर्षाचा हा बालक हिटलर च्या क्रूर कार्यवाहीचा बळी ठरलेला होता. तहान, भूक त्यातल्या त्यात स्वतः चे जीवन वाचविण्यासाठी सोसावे लागणारे दुःख, डोळ्यादेखत अनेकांची हत्या होताना पाहणे, अनेकांना फासावर जाताना तर अनेकांना भुकेपोटी एकमेकांना मारताना पाहणे असे अंगावर काटा आणणारे अनेक अनुभव लेखकाला आलेले आहेत. हे पुस्तक वाचताना ही परस्थिती आपल्या शत्रूवर देखील उद्भवू नये असे मनोमन वाटते. (पुस्तकातील प्रत्येक पृष्ठावर त्या छळछावणीत बंदिस्त असणाऱ्या आणि मरणयातना भोगणाऱ्या त्या सर्व लोकांच्या आर्त किंकाळ्या आहेत. जणूकाही ते आपल्याला सांगत आहेत, ` ही परिस्थिती भविष्यातील पिढ्यांवर ओढवू नये.` ) भारतातील अनेक लोकांना हिटलर, त्याची विचारसरणी, त्या विचारसरणीशी साम्य असणारी संघटन, व्यक्ती अजूनही आवडतात. अश्या विचारसरणी चा विरोध करण्याऐवजी या विचारसरणीला खतपाणी घालत असतात. अशी ही हिंस्त्र विचारसरणी देशातीलच नव्हे तर जगातील लोकांना ( समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय आणि धर्मनिरपेक्ष या विचारसरणीशी बांधिलकी असणाऱ्या व्यक्तींना) नक्कीच आवडणार नाही, नव्हे ती कुणाला परवडणारी देखील नाही. हिटलर लिखित ` माझा लढा (संघर्ष)` हे आत्मचरित्र भारतात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या पुस्तकाच्या यादीत समाविष्ट झालेलं आहे. पण चिंतेची बाब आहे की, त्याची विचारसरणी अनेकांना आवडू लागलेली आहे. ...Read more

  • Rating StarSuhas Birhade

    नाईट- पिता पुत्राचा मृत्यूशी संघर्ष नाझींच्या क्रूरतेच्या, नरसंहाराच्या घटना काळजाचा थरकाप उडवतात, अंगावर शहारे आणतात. नाझींच्या छळछावणीतून बचावलेल्या एली वायझल यांनी लिहिलेले ‘नाईट’ हे पुस्तक देखील वाचताना सुन्न करून जातं. १५ वर्षांचें असताना एलीयांना कुटुंबासह छळछावणीत डांबण्यात आलं. एली आणि त्यांच्या वडीलांचा प्रत्येक क्षणी मृत्यूशी सामना सुरू होता. या संकटसमयी किशोरवयीन मुलगा आणि त्याच्या वडिलांच्या अतूट नात्याची हृदयस्पर्शी कहाणी या पुस्तकातून उलगडते. नाझींच्या छळछावण्या, ज्यू लोकांच्या निर्दयी कत्तली याविषयी अनेक पुस्तके, सिनेमे आहेत. ‘नाईट’ पुस्तकात वडील आणि मुलाच्या नात्याची करूण किनार दिसते. मृत्यूच्या नरकात एकमेकांनी जिवंत रहावे म्हणून दोघांची चालेलली धडपड, हतबलता वाचकांना बधीर करते. मृत्यू एकेक दिवस पुढे ढकल्यासाठी पिता पुत्रांचा संघर्ष सुरू असतो. एकेक प्रसंग काळजाचा ठाव घेतात. त्या कोवळ्या वयात एली यांच्यातील तीव्र इच्छाशक्ती मृत्यूवर मात करते. पुस्तकातील घटनांची कल्पना करवत नाही, एवढ्या भयंकर आहेत. कुठल्याही क्षणी जिवंत भट्टीत टाकले जाईल, गोळ्या घातल्या जातील हे माहित असताना दुदर्म्य इच्छाशक्तीच्या बळावर तग धरून राहत जगण्यासाठीचा संघर्ष सुरू असतो. एली वायझेल यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी पुढे अनेक पुस्तके लिहिली आहेत. ...Read more

  • Rating StarAneruddha Devkar

    ज्युंचा जो छळ क्रुर हिटलरच्या जर्मनीने केला त्याचे ह्रदयस्पर्शी वर्णन या पुस्तकातुन एली वायझल यांनी केले आहे. माणुस किती अमानुषपणे दुस-याशी वागु शकतो हे वाचुन शहारे येतात. लेखकाने आपला पुर्ण परिवार ह्या छळछावणीत आपल्या डोळ्यासमोर तीळतीळ मरताना पाहिला केवळ पंधराव्या वर्षी कोणालाही भोगाव्या लागु नये अश्या यातना त्यांनी भोगल्या. हजारो, लाखो ज्यु बांधवांना निर्विकारपणे मरणाच्या खाईत लोटणा-या निर्दयी नाझींचे वास्तववादी चित्रण लेखकाने यशस्वीपणे या पुस्तकात मांडले आहे. पुस्तकातील काही प्रसंग अतिशय भावस्पर्शी असुन मनाला हादरा देणारे आहेत. लेखकाने अनेक काळरात्री अनुभवल्या आणि त्या त्यांच्या संपुर्ण आयुष्याला कलाटणी देऊन गेल्यात. पुस्तकाच्या प्रत्येक पानावरील त्यांचे अनुभव मानवतेला काळीमा फासणारे आहेत. अश्या छळछावण्यांमधुन सर्व हालअपेष्टा भोगुन सुटलेल्या सर्व योध्दयांना सलाम.... ...Read more

  • Rating StarKIRAN BORKAR

    अंगावर काटा आणणारे आत्मकथन.... हे आत्मकथन आहे एका ज्यूचे. जो नाझींच्या छळछावणीतून सुटून आलाय. माणुसकीचा अंत म्हणजे ज्यूची छळ छावणी. नाझीनी पद्धतशीरपणे केलेला ज्यूचा नरसंहार यातून दिसून येतो.कोवळ्या मुलांनी भरलेल्या गाड्या गॅस चेंबरकडे जात होत्या. भटटीचे इंधन म्हणून जिवंत माणसे वापरली जात होती. नाझीनी कित्येक लहान मुलांना आपली आई बहीण डोळ्यादेखत भट्टीत जळताना जबरदस्तीने पाहायला लावली. नाझींच्या क्रौर्याच्या कहाण्या अनेक पुस्तकातुन वाचल्या गेल्यात . ट्रान्सील्वानियातील सिघेट गावातील पंधरा वर्षाच्या ज्यू मुलाची ही कहाणी जी त्याने प्रत्यक्ष अनुभवली आहे. छळछावणीतील प्रत्यक्षात पाहिलेले दाहक अनुभव हा मुलगा आपल्याला सांगतो. सिघेट गावातील तो मुलगा आपले आई वडील आणि तीन बहिणी यांच्यासोबत राहतोय. एके दिवशी सिघेटमध्ये जर्मन सैनिक घुसले. त्यांनी सर्व ज्यूना पिवळा तारा धारण करायला लावला.त्यांना हॉटेल मंदिरात जाण्यास बंदी घातली. संध्याकाळी सहा नंतर घराबाहेर पडू नये असा आदेश काढला. ज्यूच्या बंदिस्त वसाहती उभारल्या गेल्या .त्यालाच घेटो नाव दिले गेले आणि एक दिवस त्या सर्वांना सिघेटमधून हद्दपार करण्यात आले. हद्दपार केलेल्या ज्यूना छळ छावणीत नेण्यात आले.तिथे स्त्री पुरुष लहान मुले याना वेगळे केले गेले. त्या नंतर कोणीही आपल्या कुटूंबातील स्त्री पुरुषांना पाहू शकले नाही. मग सुरू झाला फक्त छळ,अमानुष मारहाण ,जनावरांनाही मिळणार नाही इतकी क्रूर वागणूक. उपासमार आणि हाड गोठविणार्या थंडीत गुरांच्या डब्यातून हजारो किलोमीटरचा प्रवास. कित्येकजण त्या भयानक थंडी गारठून मेले.काहीजण फक्त बर्फ खाऊन जगले. गॅस चेंबरमध्ये आपला नंबर कधी येईल याची वाट पाहत राहिले. या छळछावणीतही त्या मुलाने आपल्या वडिलांची साथ सोडली नाही. प्रसंगी भयानक मार ही खाल्ला. कणाकणाने आपल्या वडिलांना मरताना त्याने पाहिले.शेवटी अमेरिकन सैन्याने त्या छळछावणीवर ताबा मिळवला आणि त्याची सुटका झाली . लेखकाने ओस्लो येथे १० डिसेंबर १९८६ रोजी नोबेल शांती पुरस्कार स्वीकारला . ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more