* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: NIGHT
  • Availability : Available
  • Translators : ASHA KARDALE
  • ISBN : 9789353172275
  • Edition : 2
  • Publishing Year : SEPTEMBER 1993
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 136
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
NIGHT IS A WORK BY ELIE WIESEL ABOUT HIS EXPERIENCE WITH HIS FATHER IN THE NAZI GERMAN CONCENTRATION CAMPS AT AUSCHWITZ AND BUCHENWALD IN 1944–1945, AT THE HEIGHT OF THE HOLOCAUST TOWARD THE END OF THE SECOND WORLD WAR. IN JUST OVER 100 PAGES OF SPARSE AND FRAGMENTED NARRATIVE, WIESEL WRITES ABOUT THE DEATH OF GOD AND HIS OWN INCREASING DISGUST WITH HUMANITY, REFLECTED IN THE INVERSION OF THE PARENT–CHILD RELATIONSHIP, AS HIS FATHER DECLINES TO A HELPLESS STATE AND WIESEL BECOMES HIS RESENTFUL TEENAGE CAREGIVER. THE BOOK HAD BEEN TRANSLATED INTO 30 LANGUAGES, AND NOW RANKS AS ONE OF THE BEDROCKS OF HOLOCAUST LITERATURE. NIGHT IS THE FIRST IN A TRILOGY—NIGHT, DAWN, DAY—MARKING WIESEL`S TRANSITION DURING AND AFTER THE HOLOCAUST FROM DARKNESS TO LIGHT.
दुसऱ्या महायुद्धात हिटलरच्या नाझी भस्मासुराने लक्षावधी ज्यूंचा क्रूर नरमेध केला. त्या क्रौर्याच्या कहाण्या आजही काळीज फाडून टाकतात. हिटलरच्या छळछावण्यांमध्ये आणि तुरुंगांमध्ये ज्या ज्यूंनी अमानुष छळ सोसला आणि त्या मृत्यूच्या सापळ्यांमधूनही वाचून जे जिवंत राहिले, त्यांचे अनुभव म्हणजे वाहती जखम आहे. अशीच एक भळभळती जखम म्हणजे ‘नाइट’ हे पुस्तक. डॉ. एली वायझेल यांना वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी ऑशवित्झ आणि बुशेनवाल्ड इथल्या नाझींच्या तुरुंगात नेण्यात आले. त्यांचे आई-वडील, लहान बहीण - सर्वांनाच जर्मनांनी पकडून नेले. त्या तुरुंगामधल्या यमयातनांमधून फक्त डॉ. एली वायझेल वाचले. आपल्या प्राणप्रिय आई-वडील-बहीण यांचे मृत्यू त्यांना कोवळ्या वयात सोसावे लागले. हा सगळा या विदारक अनुभव त्यांनी या पुस्तकात कमालीच्या प्रत्ययकारी भाषेत मांडला आहे. हे पुस्तक म्हणजे सखोल जीवनचिंतन आहे. स्वतःच्या दुःखाच्या वर्णनाबरोबर मानवी स्वभावावरील त्यांचे भाष्य अत्यंत अर्थघन आहे. पुस्तकाच्या पानापानांमध्ये त्या काळरात्रींचा जिवंत अनुभव ठासून भरला आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
ELIE WIESEL #NAZIGERMAN #SECONDWORLDWAR #HOLOCAUSTLITERATURE # HITLER # JEWLITERATURE #AUSCHWITZANDBUCHENWALDIN1944–1945 #दुसरेमहायुद्ध #नाझी #हिटलर #एलीवायझल #
Customer Reviews
  • Rating StarAmit Indurkar

    मानवतेला काळीमा फासणारे कृत्य करणारा व्यक्ती अर्थात ` हिटलर ` शाळेत असताना हिटलर हे नाव अनेकदा ऐकले होते. हिटलर म्हणजे कुणीतरी रागीट, तापट आणि सर्वांना नकोसा असणारा क्रूर व्यक्ती असावा एवढेच काय त्या हिटलर बद्दल माहित होते. शाळेत असताना मित्र एकमेांना " ए जास्त हिटलर बनण्याचा प्रयत्न करू नकोस, हिटलरशाही तुझ्या अंगात आली आहे का?" इत्यादी वाक्ये बोलायचो. पण हा हिटलर नेमका कोण होता हे त्यावेळी कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. पण काही वर्षांपूर्वी माझ्या एका शिक्षकाने (लेखक, पत्रकार व कवी असणारे) मला कुमार नवाथे लिखित नाझी नरसंहार हे पुस्तक दिलं. ते पुस्तक मी वाचून काढलं तेव्हा मला समजले की एखाद्या रागीट, तापट व क्रूर माणसाला हिटलर नावाने का संबोधले जात असते. हे पुस्तक वाचण्यापूर्वी मी आमच्या महाविद्यालयात एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रात सहभागी झालो होतो. चर्चासत्राचा विषय होता मावधिकराच्या विस्तारित कक्षा (The Expanding Horizon of Human Rights). या चर्चासत्राच्या शोधपुस्तिकेसाठी मी एक लेख देखील लिहिला होता. या चर्चासत्रात सहभागी होणाऱ्या एका प्राध्यापकाने हिटलर ने तयार केलेल्या छळछावणीतील त्या क्रूर आणि हिंस्त्रक कार्यवाहीचे काही दाखले दिले होते. ते ऐकून अस्वस्थ वाटू लागले. पण नंतर शिक्षकाने दिलेले पुस्तक वाचल्यानंतर तर मनात एक विचार सारखा येऊ लागला (विचार नव्हे हा तर एक ठाम निष्कर्शच) की हिटलर का क्रूर आणि हिंस्त्रप्राणी होता. त्याला प्राणी देखील म्हणता येणार नाही. (माणूस म्हणण्याच्या लायकीचा तर तो नाहीच). आजवर वाघ, सिंह यांना आपण हिंस्त्रप्राणी असे म्हणत आलेलो आहोत पण ही प्राणी एखाद्या पशू किंवा प्राण्याची शिकार करतात, त्याचे रक्त पितात, त्याचे मांस खातात. पण पोट भरून झाल्यावर मात्र त्यांच्या समोरून कोणता प्राणी गेला तरीही ते शांत असतात कारण पोट भरलेलं असतं. पण हिटलर ने केलेली हिंसा ही कधीही पोट न भरलेल्या प्रण्यासारखी होती. या हिंस्त्र प्राण्याला माणसांवर (ज्यू स्त्री - पुरुष, बालके, अबालवृद्ध लोकांना छळण्याची, त्यांना जिवानिशी मारण्याची सवय झालेली होती. (रक्ताने माखलेले तोंड म्हणतात ना एकदम तशी सवय) याकरिता त्याने त्या जिवंत ज्यू लोकांना अनेक मरणयातना दिल्या, त्यांचा अनन्वित छळ करून त्यांना यमसदनी पाठविले. हिटलर चे हे कृत्य वाचले की अंग अक्षरशः थरथर कापू लागतो, मनात अस्वस्थता निर्माण होते, सभोवताली भीतीचे काळेकुट्ट ढग निर्माण झाल्याचा भास होतो. एली वायझल नावाच्या एका लेखकाने (हिटलरच्या छळछावणीत मरणयातना भोगणाऱ्या एका प्रत्यक्षदर्शी असणारी व्यक्ती) नाईट नावाचे त्याचे छळछावणीत आलेल्या अनुभवाचे एक आत्मकथन लिहिले. हे पुस्तक वाचून आता हिटलर हा शब्द, हे नाव नकोसे वाटू लागले. ते आत्मकथन वाचत असताना पूर्वी लिहिल्याप्रमाणे अंगाला थरकाप सुटतो. लेखकाने त्याच्या डोळ्यासमोर त्याचे कुटुंब, त्याचे गाव उध्वस्त होताना बघितले. त्याने आपल्या कुटुंबातील सर्व सदस्याला हिटलर च्या छळछावणीत त्यांच्याशी होणाऱ्या क्रूर वागणुकीचा सामना करताना बघितले. तेव्हा त्याचे वय जेमतेम १६ वर्षे होते. १६ वर्षाचा हा बालक हिटलर च्या क्रूर कार्यवाहीचा बळी ठरलेला होता. तहान, भूक त्यातल्या त्यात स्वतः चे जीवन वाचविण्यासाठी सोसावे लागणारे दुःख, डोळ्यादेखत अनेकांची हत्या होताना पाहणे, अनेकांना फासावर जाताना तर अनेकांना भुकेपोटी एकमेकांना मारताना पाहणे असे अंगावर काटा आणणारे अनेक अनुभव लेखकाला आलेले आहेत. हे पुस्तक वाचताना ही परस्थिती आपल्या शत्रूवर देखील उद्भवू नये असे मनोमन वाटते. (पुस्तकातील प्रत्येक पृष्ठावर त्या छळछावणीत बंदिस्त असणाऱ्या आणि मरणयातना भोगणाऱ्या त्या सर्व लोकांच्या आर्त किंकाळ्या आहेत. जणूकाही ते आपल्याला सांगत आहेत, ` ही परिस्थिती भविष्यातील पिढ्यांवर ओढवू नये.` ) भारतातील अनेक लोकांना हिटलर, त्याची विचारसरणी, त्या विचारसरणीशी साम्य असणारी संघटन, व्यक्ती अजूनही आवडतात. अश्या विचारसरणी चा विरोध करण्याऐवजी या विचारसरणीला खतपाणी घालत असतात. अशी ही हिंस्त्र विचारसरणी देशातीलच नव्हे तर जगातील लोकांना ( समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय आणि धर्मनिरपेक्ष या विचारसरणीशी बांधिलकी असणाऱ्या व्यक्तींना) नक्कीच आवडणार नाही, नव्हे ती कुणाला परवडणारी देखील नाही. हिटलर लिखित ` माझा लढा (संघर्ष)` हे आत्मचरित्र भारतात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या पुस्तकाच्या यादीत समाविष्ट झालेलं आहे. पण चिंतेची बाब आहे की, त्याची विचारसरणी अनेकांना आवडू लागलेली आहे. ...Read more

  • Rating StarSuhas Birhade

    नाईट- पिता पुत्राचा मृत्यूशी संघर्ष नाझींच्या क्रूरतेच्या, नरसंहाराच्या घटना काळजाचा थरकाप उडवतात, अंगावर शहारे आणतात. नाझींच्या छळछावणीतून बचावलेल्या एली वायझल यांनी लिहिलेले ‘नाईट’ हे पुस्तक देखील वाचताना सुन्न करून जातं. १५ वर्षांचें असताना एलीयांना कुटुंबासह छळछावणीत डांबण्यात आलं. एली आणि त्यांच्या वडीलांचा प्रत्येक क्षणी मृत्यूशी सामना सुरू होता. या संकटसमयी किशोरवयीन मुलगा आणि त्याच्या वडिलांच्या अतूट नात्याची हृदयस्पर्शी कहाणी या पुस्तकातून उलगडते. नाझींच्या छळछावण्या, ज्यू लोकांच्या निर्दयी कत्तली याविषयी अनेक पुस्तके, सिनेमे आहेत. ‘नाईट’ पुस्तकात वडील आणि मुलाच्या नात्याची करूण किनार दिसते. मृत्यूच्या नरकात एकमेकांनी जिवंत रहावे म्हणून दोघांची चालेलली धडपड, हतबलता वाचकांना बधीर करते. मृत्यू एकेक दिवस पुढे ढकल्यासाठी पिता पुत्रांचा संघर्ष सुरू असतो. एकेक प्रसंग काळजाचा ठाव घेतात. त्या कोवळ्या वयात एली यांच्यातील तीव्र इच्छाशक्ती मृत्यूवर मात करते. पुस्तकातील घटनांची कल्पना करवत नाही, एवढ्या भयंकर आहेत. कुठल्याही क्षणी जिवंत भट्टीत टाकले जाईल, गोळ्या घातल्या जातील हे माहित असताना दुदर्म्य इच्छाशक्तीच्या बळावर तग धरून राहत जगण्यासाठीचा संघर्ष सुरू असतो. एली वायझेल यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी पुढे अनेक पुस्तके लिहिली आहेत. ...Read more

  • Rating StarAneruddha Devkar

    ज्युंचा जो छळ क्रुर हिटलरच्या जर्मनीने केला त्याचे ह्रदयस्पर्शी वर्णन या पुस्तकातुन एली वायझल यांनी केले आहे. माणुस किती अमानुषपणे दुस-याशी वागु शकतो हे वाचुन शहारे येतात. लेखकाने आपला पुर्ण परिवार ह्या छळछावणीत आपल्या डोळ्यासमोर तीळतीळ मरताना पाहिला केवळ पंधराव्या वर्षी कोणालाही भोगाव्या लागु नये अश्या यातना त्यांनी भोगल्या. हजारो, लाखो ज्यु बांधवांना निर्विकारपणे मरणाच्या खाईत लोटणा-या निर्दयी नाझींचे वास्तववादी चित्रण लेखकाने यशस्वीपणे या पुस्तकात मांडले आहे. पुस्तकातील काही प्रसंग अतिशय भावस्पर्शी असुन मनाला हादरा देणारे आहेत. लेखकाने अनेक काळरात्री अनुभवल्या आणि त्या त्यांच्या संपुर्ण आयुष्याला कलाटणी देऊन गेल्यात. पुस्तकाच्या प्रत्येक पानावरील त्यांचे अनुभव मानवतेला काळीमा फासणारे आहेत. अश्या छळछावण्यांमधुन सर्व हालअपेष्टा भोगुन सुटलेल्या सर्व योध्दयांना सलाम.... ...Read more

  • Rating StarKIRAN BORKAR

    अंगावर काटा आणणारे आत्मकथन.... हे आत्मकथन आहे एका ज्यूचे. जो नाझींच्या छळछावणीतून सुटून आलाय. माणुसकीचा अंत म्हणजे ज्यूची छळ छावणी. नाझीनी पद्धतशीरपणे केलेला ज्यूचा नरसंहार यातून दिसून येतो.कोवळ्या मुलांनी भरलेल्या गाड्या गॅस चेंबरकडे जात होत्या. भटटीचे इंधन म्हणून जिवंत माणसे वापरली जात होती. नाझीनी कित्येक लहान मुलांना आपली आई बहीण डोळ्यादेखत भट्टीत जळताना जबरदस्तीने पाहायला लावली. नाझींच्या क्रौर्याच्या कहाण्या अनेक पुस्तकातुन वाचल्या गेल्यात . ट्रान्सील्वानियातील सिघेट गावातील पंधरा वर्षाच्या ज्यू मुलाची ही कहाणी जी त्याने प्रत्यक्ष अनुभवली आहे. छळछावणीतील प्रत्यक्षात पाहिलेले दाहक अनुभव हा मुलगा आपल्याला सांगतो. सिघेट गावातील तो मुलगा आपले आई वडील आणि तीन बहिणी यांच्यासोबत राहतोय. एके दिवशी सिघेटमध्ये जर्मन सैनिक घुसले. त्यांनी सर्व ज्यूना पिवळा तारा धारण करायला लावला.त्यांना हॉटेल मंदिरात जाण्यास बंदी घातली. संध्याकाळी सहा नंतर घराबाहेर पडू नये असा आदेश काढला. ज्यूच्या बंदिस्त वसाहती उभारल्या गेल्या .त्यालाच घेटो नाव दिले गेले आणि एक दिवस त्या सर्वांना सिघेटमधून हद्दपार करण्यात आले. हद्दपार केलेल्या ज्यूना छळ छावणीत नेण्यात आले.तिथे स्त्री पुरुष लहान मुले याना वेगळे केले गेले. त्या नंतर कोणीही आपल्या कुटूंबातील स्त्री पुरुषांना पाहू शकले नाही. मग सुरू झाला फक्त छळ,अमानुष मारहाण ,जनावरांनाही मिळणार नाही इतकी क्रूर वागणूक. उपासमार आणि हाड गोठविणार्या थंडीत गुरांच्या डब्यातून हजारो किलोमीटरचा प्रवास. कित्येकजण त्या भयानक थंडी गारठून मेले.काहीजण फक्त बर्फ खाऊन जगले. गॅस चेंबरमध्ये आपला नंबर कधी येईल याची वाट पाहत राहिले. या छळछावणीतही त्या मुलाने आपल्या वडिलांची साथ सोडली नाही. प्रसंगी भयानक मार ही खाल्ला. कणाकणाने आपल्या वडिलांना मरताना त्याने पाहिले.शेवटी अमेरिकन सैन्याने त्या छळछावणीवर ताबा मिळवला आणि त्याची सुटका झाली . लेखकाने ओस्लो येथे १० डिसेंबर १९८६ रोजी नोबेल शांती पुरस्कार स्वीकारला . ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

FRANKLIN MALIKA COMBO SET - 29 BOOKS
FRANKLIN MALIKA COMBO SET - 29 BOOKS by PAULETTE BOURGEOIS Rating Star
रश्मी मुसळे-साळगांवकर

लहानग्यांच्या विश्वातल्या छोट्या छोट्या गमतीजमती या पुस्तकांच्या मालिकेतून अगदी मजेशीर पद्धतीने मुलांसमोर येतात..त्या गोष्टी ऐकताना, वाचताना मूलं यात अगदी रमून जातात... शिवाय आजवर ससा आणि कासव यांव्यतिरिक्त इतर कथाविश्वात काहीसा दुर्लक्षित राहिलेलया कासवाच्या जगातही अनेक गंमती घडू शकतात ही नवखी कल्पना मुलांना भारीच आवडते... ...Read more

MARATHI DAULATICHE NARI SHILP
MARATHI DAULATICHE NARI SHILP by GOPAL DESHMUKH Rating Star
लोकसत्ता २२ जानेवारी २०२३.

बाईचे विश्व हे चूल आणि मूल एवढय़ापुरतेच मर्यादित नसते याची उदाहरणे आपल्याला इतिहासातसुद्धा पाहायला मिळतात. इतिहासात डोकावून पाहिले तर स्त्रियांचे आयुष्य हजार बंधनांनी जखडलेले होते. लहान वयातच मुलींची लग्नं केली जात असत. सतीची चाल, विधवांना केशपनाची सक्ती, सती जाणाऱ्या स्त्रियांच्या मरणाइतकेच सती न जाणाऱ्या विधवांचे जगणे भयंकर होते. अशा समाजातच काही स्त्रिया अशासुद्धा होऊन गेल्या ज्यांनी आपल्या कार्याने, आपल्या धाडसाने, शौर्याने महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाची भर टाकली. समाजाचा स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यात ज्यांचा मोलाचा वाटा आहे अशाच काही निवडक स्त्रियांचे चरित्र रेखाटन गोपाळ देशमुख यांनी ‘मराठी दौलतीचे नारी शिल्प’ या पुस्तकात केले आहे. जिजाऊमातेने बालशिवाजींची जडणघडण केली. अशा कर्तृत्ववान जिजाबाईंचे व्यक्तिचरित्र ‘राजमाता जिजाऊ’ या प्रकरणामध्ये सारांशरूपाने रेखाटण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. तसेच शिवरायांच्या जीवनात ज्या आठ राण्या आल्या त्यांच्या जीवनकार्याचे वर्णन ‘राणीवसा’ या प्रकरणात येते. ‘महाराणी येसूबाई’ या प्रकरणात त्यांची स्वराज्यनिष्ठा व दूरदृष्टी कशी दिसून येते याचे वर्णन केले आहे. संकटसमयी संभाजी राजांना दिलेल्या सल्ल्यामुळे त्यांच्या कार्यात मदत कशी झाली याचेही वर्णन आले आहे. ताराबाई, उमाबाई दाभाडे, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी युद्धभूमीवर शत्रूला तोंड कसे दिले. दर्याबाई निंबाळकर, पेशवा पत्नी गोपिकाबाई, रमाबाई, गंगाबाई यांनाही व्यक्तिगत सुखदु:खाबरोबरच मराठी दौलतीच्या वाटचालीत आपली भूमिका कशी पार पाडावी लागली याचीही माहिती पुस्तकात देण्यात आली आहे. दौलतीचा कारभार करताना अहिल्याबाईंना तीस वर्षे वैयक्तिक दु:खांना सामोरे जावे लागले. या साऱ्या दु:खांना बाजूला सारून उत्कृष्ट कार्य करून त्या ‘साध्वी पुण्यश्लोक अहिल्या’ कशा झाल्या याचा थोडक्यात आढावा घेतला आहे ‘अहिल्याबाई होळकर’ या प्रकरणात. तसेच पुतळाबाई आणि रमाबाई यांचे पतिनिष्ठेचे वर्णनही वाचायला मिळते. या सर्व व्यक्तिचरित्रांपैकी ‘राणी लक्ष्मीबाई’ यांचे चरित्र वाचताना त्यांची धाडसी वृत्ती, चिकाटी, येईल त्या प्रसंगाला न घाबरता शौर्याने सामोरे जाण्याची वृत्ती व शेवटी त्यांचा झालेला शोकात्मक शेवट आपल्या मनाला चटका लावून गेल्याशिवाय राहात नाही. वयाच्या चौदाव्या वर्षी गंगाधरराव यांच्याशी विवाह झाल्यानंतर आपल्या मुलाच्या आणि पतीच्या निधनानंतर शोक करत न बसता ही वीरांगना आपला दत्तक मुलगा दामोदर याला घेऊन ब्रिटिशांच्या कटू कारस्थानांना तोंड देण्यास सज्ज झाली होती. यातच तिला वीरमरण आले. हे वीरमरण येतानासुद्धा ती मोठय़ा शौर्याने अखेरच्या क्षणापर्यंत लढली आणि जेव्हा आपला देह आपल्याला साथ देत नाही हे लक्षात आले तेव्हा तिने आपल्या अनुयायांना आपला देह शत्रूच्या हातात पडता कामा नये, त्याला अग्नी द्या, असे सांगितले. अशा या वीरांगनेची गर्जना ‘मै मेरी झांसी नही दूंगी’ ही आजही अनेक स्त्रियांना आपल्या कामात प्रेरणा देणारी अशी आहे. राणी लक्ष्मीबाईच्या मरणाविषयी अनेक हकीकती उपलब्ध आहेत. त्यांचा उल्लेखही या पुस्तकात आला आहे. या पुस्तकातील स्त्रिया इतिहासकालीन असल्याने काही ठिकाणी ऐतिहासिक संदर्भाची पुनरावृत्ती झाल्यासारखे वाटते; पण ते येणेसुद्धा गरजेचे आहे. साध्या सोप्या भाषेत ही स्त्री चरित्रे आपल्याला वाचायला मिळतात. थोडक्यात असे म्हणता येईल की, इतिहासकाळातील थोर महिला विभूतींच्या जीवनकार्याचा अल्पांशाने सार वाचकांपुढे मांडण्याचा प्रयत्न लेखक गोपाळ देशमुख यांनी केला आहे, तो कौतुकास्पद आहे. ...Read more