* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE ROAD TO WANTING
  • Availability : Available
  • Translators : CHITRA WALIMBE
  • ISBN : 9789386454881
  • Edition : 1
  • Publishing Year : MAY 2017
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 220
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
SOMETIMES THE HARDEST JOURNEY IS THE ROAD HOME. NA GA WAS ALWAYS IN SEARCH OF A BETTER LIFE. BUT NOW SHE SITS, ALONE, IN A HOTEL ROOM IN WANTING, A GODFORSAKEN TOWN ON THE CHINESE-BURMESE BORDER. PLUCKED FROM HER WILD LIFE AS A RURAL EEL-CATCHER, NA GA IS THEN ABANDONED BY HER WOULD-BE RESCUERS IN RANGOON. LATER, AS A TEENAGER, SHE FINDS HERSELF CHASING THE DREAM OF A NEW LIFE IN THAILAND - WHERE FURTHER BETRAYALS AND VIOLATIONS AWAIT. YET IT SEEMS THAT HER FIGHTING SPIRIT WILL NOT BE BROKEN. BUT FOR HOW LONG CAN NA GA BELONG NOWHERE AND WITH NO ONE? IN THE DINGY HOTEL IN WANTING SHE IS FORCED TO CONFRONT HER COMPULSION TO KEEP RUNNING, AND TO ASK HERSELF WHY, UNTIL NOW, SHE`S RESISTED THE JOURNEY HOME.
काहूर ही कथा आहे, एका जंगली लू जमातीतील मुलीची- जी आयुष्यात चांगल्या गोष्टीच्या शोधात असते. ‘ना गा’ असे नाव असणाऱ्या या मुलीचे भावविश्व लेखकाने उलगडून दाखविले आहे. ना गा केवळ सात वर्षांची असताना पिकांचे झालेले नुकसान, हलाखीची आर्थिक परिस्थिती यामुळे वडिलांनी तिला विकून टाकले आहे. दरू गावातील मुखियाकडे सुरुवातीला घरकाम करण्यासाठी ‘ना गा’ राहत असताना मुखियाची बायको तिला खूपच वाईट वागणूक देत असते. वयाच्या मानाने कठीण कामे करून मालकिणीच्या नजरेत वर येण्याचा ती खूप प्रयत्न करत असे; परंतु ना गा मालकिणीच्या दृष्टीने एक अुशभ मुलगी असल्यामुळे, कधीच यशस्वी होऊ शकणार नाही हे आता तिला कळून चुकले होते. रंगूनमध्ये एका कुटुंबाची सेवा करणाऱ्या डो डो सेंगने ना गाला कजाग मालकिणीच्या तावडीतनं सोडवलं आणि आपल्याचबरोबर रंगूनला घेऊन गेली. मूळ अमेरिकन असलेल्या या कुटुंबातील मॉर फॉर आणि पिया यांनी ना गाला जीव लावला. तिला आपल्या घरातील सदस्यासारखीच वागणूक दिली. परंतु जेव्हा अमेरिकेला जाण्याची वेळ आली तेव्हा ना गा आणि डो डो सेंग यांना त्यांनी सोबत नेलं नाही. अमेरिकेला जाण्याचं स्वप्न तुटलेली डो डो सेंग ना गा ला घेऊनच गावी परतली. ना गा म्हणजे तिचं अमेरिकेला जाण्याचं तिकीट होतं; परंतु जेव्हा बेत फसला, तेव्हा आता डो डो सेंग तिला घालून पाडून बोलू लागली. आपल्या दुर्दैवाला अप्रत्यक्षरीत्या ना गा कारणीभूत आहे, असे तिला वाटू लागले. डो डो सेंगने आपल्याला दाखवलेले सुखाचे दिवस, उपकार लक्षात ठेवून पैसा मिळवून तिला सुख देता यावे म्हणून एका व्यक्तीवर विश्वास ठेवून ती नोकरीच्या निमित्ताने थायलंडला पोहोचते. लवकरच तिच्या लक्षात येते की, आपण फसवले गेलो आहोत. कामाच्या बहाण्याने तिची रवानगी एका कुंटणखान्यात होते. विचित्र, यातनामय आयुष्य जगत असताना तिच्या आयुष्यात विल येतो. अतिशय सभ्य सुसंस्कृत असणारा विल ना गाच्या प्रगतीसाठी, सुखासाठी खूप प्रयत्न करतो. ना गा आणि विल यांच्यात नात्याचा नाजूक बंध निर्माण होतो. बायको नसूनही बायकोप्रमाणे त्याची सेवा करणारी ना गा नकळतपणे त्याच्या प्रेमात पडते. पण तिचा पत्नी म्हणून स्वीकार करण्यास विल तयार नसतो. दहा वर्षं एकत्र राहिल्यावर एक दिवस विल तिला पुन्हा तिच्या घरी जाण्याविषयी सुचवतो. विलला मिळवण्याचे सर्व प्रयत्न करून थकलेली ना गा डोक्यात विचारांचे काहूर माजलेले असतानाच परतण्याची इच्छा नसतानाही वाँटिंगच्या प्रवासाला निघते. काही चमत्कार घडावा, विलने आपल्याला थांबवावे असे मनात म्हणत परतत असताना तिला सुरक्षित घरी पोहोचण्यासाठी विलने अनेक माणसांची व्यवस्था केलेली असते. या परतीच्या मार्गावर तिला अनेक कटू-गोड अनुभव येतात. आपल्या उद्ध्वस्त घराचा अनिच्छेने शोध घेण्यासाठी ती वाट चालू लागते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #KAHUR #THEROADTOWANTING #काहूर #BIOGRAPHY&TRUESTORIES #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #CHITRAWALIMBE "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAMANA 27-05-2018

    संवेदना बधिर करणारे ‘काहुर’... ‘द रोड टू वॉटिंग’ ही वेण्डी लॉऱ्योन यांची मूळ इंग्रजी सत्यकथा चित्रा वाळिंबे यांनी ‘काहूर’मध्ये अनुवादित केली आहे. ब्रह्मदेशातील अल्पसंख्याक ‘जंगली लू’ जमातीतील ‘ना गा’ची ही कहाणी आपले हृदय पिळवटून टाकते. मूळ कथानकाची ावगर्भता हळुवारपणे जपण्याचा चित्र वाळिंबे यांनी कसोशीने प्रयत्न केला आहे. कथेची नायिका ‘ना गा’ आत्मशोध घेत आहे. या शोधात ती हरवून गेली आहे. मार्ग सापडत नाही. परिस्थितीने गांजून गेलेली आत्महत्येचा अयशस्वी प्रयत्नही करू जाते. कुनमिंग ते वॉटिंग. वॉटिंग ते बँकॉक आणि बँकॉक ते पुन्हा कुनमिंग असा तिचा झगडा चालला आहे. मॉर आणि फॉर आणि छोटी सवंगडी पिया हा तिच्या आयुष्यातील पहिला सुखाचा पडाव. डो-डो सेंग ही एक आश्वासक झुळूक. नशिबाचा फेरा ‘ना गा’ला कोणकोणत्या दुष्टचक्रातून फिरवतो आणि तिला कसे फसवले जाते हे वाचून मन सुन्न होते. विल हा ‘देवदूत’ पण त्याच्या सहवासातही भूतकाळातल्या गडद सावल्या तिची पाठ सोडत नाहीत. त्या छायेत ती कधीच मोकळा श्वास घेऊ शकत नाही. कायम कोंडलेल्या ‘ना गा’ची पावले चुकीची पडतात आणि ती पेâकली जाते. पुन:पुन्हा अनिश्चिततेच्या गर्तेत. डो-डो सेंग विल. मोल. जियांग ही सारी जीव लावणारी माणसे. मिन्झू छोटी आहे, निरागस आहे. पण ती ‘मा’ची काळजी करते आहे. त्यासाठी ‘नको’ ते धाडस करायला धजते आहे. तिच्या काळजीने ‘ना गा’चा जीव अर्धा होतो. अखेर सीमा पार करूनही काय मिळवायचे, कुठे जायचे हे प्रश्नचिन्ह कायम ठेवूनच कादंबरीचा शेवट येतो. आपले मूळ आणि कूळ शोधत जायचे तिथे कोणीच नाही. हे माहीत असताना आणि मग होणारे भास हे चित्र भेसूर आहे. पण ही कादंबरी नीट जाणून घेण्यासाठी चीन व बर्मामधील या अत्याचारांची सामाजिक व ऐतिहासिक पार्श्वभूमी माहीत असेल तर नक्कीच मदत होईल. ‘काहूर’च्या निमित्ताने आपण एका वेगळ्या देशातून आणि वेगळ्या संस्कृतीमधून प्रवास करतो. जी गूढ आहे, कधी हळवी. तर कधी व्रूâर आहे. साहित्यातून संवेदनशीलता वृद्धिंगत करणारी ‘काहूर’ वाचूनच घ्यायचा अनुभव आहे. – अरविंद दोडे ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 23-07-2017

    सुखाच्या शोधात वणवण करत राहणाऱ्या वाइल्ड लू या आदिवासी जमातीतल्या वा गा नावाच्या मुलीची ही कहाणी. ती जंगली समाजातून दूर फेकली जाते, तारुण्यात अवहेलना आणि विश्वासघात तिला सहन करावे लागतात. तरीही ती लढत राहते. ‘द रोड टू वाँटिंग’ या कादंबरीत वेंडी लॉ-यो यांनी वा गाची ही कहाणी लिहिली आहे. तिचं हे मराठी रूपांतर चित्रा वाळिंबे यांनी केलं आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

रुपाली सोनवणे

#रुक #जाना #नही लेखक: Dr. भावेश भाटिया शब्दांकन: Dr: सचिन पाचोरकर अनुवाद: सुप्रिया वकील ​अंथरून पाहून पाय पसरावे... अह्ह.. त्या निर्जीव अंथरुणासाठी आपल्या सजीव पावलांना का त्रास द्यावा? असेच एक जबरदस्त आत्मचरित्र वाचून संपवलं आणि एक ऊर्जा निर्माणकरून गेलं, पुस्तकाचं नाव आहे `रुक जाना नहीँ ​डॉ. भावेश भाटिया यांची ही प्रेरणादायी कहाणी. शाळेत असताना आलेलं अकाली अंधत्व आणि त्यानंतर खडखडीत खडतर जीवनाचा सुरू झालेला प्रवास, पण या प्रवासात खचलेल्या बालमनाला त्यांच्या आईने दिलेलं बळ, प्रेरणा व आत्मसन्मानाची शिकवण आणि स्वाभिमानाचे धडे लेखकास पुरे होते. हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. चांगल्या धडधाकट व्यक्तीवर संकट आल्यावर दूर दूर पळणारे नातलग, मित्र परिवार, जातभाई... दृष्टी गेलेल्या व्यक्तीस कितपत आधार देतील? पण एक ऑपरेटर ते एक उद्योजक, `सनराईज कॅण्डल`चा विस्तार आणि स्वतःबरोबर अनेक दृष्टिहीन व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभं करून रोजगार देणारा हा अवलिया किती अडथळे पार करून आलाय हे जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचायला हवंच. ​कुठलाही वशीला नाही की कोणाची सहानुभूती नाही, स्वबळावर विविध प्रयोग करत उद्योग यशस्वी करणं सोपं नाही. यात ज्या ज्या देवमाणसांनी हातभार लावला त्यांचा पण उल्लेख आहे, पण त्या देवमाणसांनी देखील कधीच उपकारिक भाषा न करता व स्वाभिमान न दुखावता कशी मदत करता येऊ शकते हे त्यांच्या कृतीतून दाखवून दिलंय. लेखक फक्त उद्योग उभारून थांबले नाहीत तर त्यांनी सामाजिक जाणीवेचं भान देखील ठेवलंय. महाबळेश्वरमध्ये सनराईज कॅण्डल नावाने त्यांनी भव्य असा उद्योग परिसर आणि म्युझियम सुरू केलंय, तेथे अनेक दृष्टिहीन व्यक्तींना रोजगार मिळाला आहे त्याचबरोबर सर्वजण स्वाभिमानाने कष्ट करून जगत आहेत. हजारो आयुष्य त्यांनी उजळून टाकली आहेत. दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार सह एकून 46 पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.विशेष म्हणजे सर्व पुरस्कार त्यांच्या योग्यतेनुसार दिले आहेत.. आणी अशा हजारो पुरस्कारांचे ते मानकरी आहेत असंच वाटत..त्यांच्या कामाची दखल रिलायन्स ग्रुप ने देखील घेतली आहे.व त्यांच्या पुस्तकास प्रस्तावना देखील नीता अंबानी यांनी दिली आहे.उद्योग करताना छोट्या छोट्या गोष्टी कसा प्रभाव करतात याच वर्णन देखील त्यांनी लिहिल आहे.. ​या कार्यात महत्त्वाचं योगदान त्यांच्या धर्मपत्नी नीता भाटिया यांनी दिलं आहे. दूरदृष्टी ठेवून आपल्या पतीस प्रोत्साहन देऊन, नवीन कल्पनेसह पाठिंबा देऊन त्यांना हुरूप देण्याचं काम त्यांनी केलंय. नीता भाटिया यांचं कर्तृत्व, त्यांचं पवित्र निस्वार्थी प्रेम या पुस्तकातून वाचताना आंतरिक वेगळी ऊर्जा मिळते. कलियुगातील देवी हा शब्द व मान त्यांना समर्पक वाटतो. पुस्तक सर्व वयोगटातील वाचक वाचू शकतात. मनाने खचलेल्या पण शरीराने धडधाकट असलेल्या प्रत्येक व्यक्तीने वरील पुस्तक नक्की वाचावं आणि आत्मसात करावं. एवढ्या उंचीवर असूनही जमिनीवर पाय असलेल व्यक्तिमत्व आहे. अगदी प्रेमळ पणे वागण बोलण सन्मान देण..ही दैवी देणगी त्यांच्या जवळ आहे. ...Read more

RAZOR SHARP
RAZOR SHARP by ASHWIN SANGHI Rating Star
सुनील माने, पुणे

लेखक अश्विन सांघी “द रोझाबल लाइन” या पहिल्याच कादंबरीने खूप लोकप्रिय झाला. प्राचीन भारतीय दंतकथा/ऐतिहासिक संदर्भ घेऊन त्याच्याभोवती आजच्या काळात रहस्यपूर्ण कथा लिहिणारा अश्विन. Chanakya’s Chant, The Krishna Key, The Sialkot Saga, Keepers of the Kalacakra, The Vault of Vishnu, The Magicians of Mazda अशा एकापेक्षा एक सुंदर रहस्य कादंबर्या “भारत सिरीज़” नावाने खूप प्रसिद्ध झाल्या. या सर्व कादंबऱ्या मी इंग्लिश मधेच वाचल्या. यांचा मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाउस यांच्याकडे उपलब्ध आहे. अश्विन सांघीने या भारत सिरीज शिवाय एक नवीन थ्रिल्लर सिरीज (कुत्ता कदम) सुरू केली आहे. त्यांतील पहिली कादंबरी Razor Sharp. एक सिरियल किलर मुंबईत एकानंतर एक खून पाडतोय. पोलिस चक्रावले आहेत. 1. रविवार दि २ फेब्रुवारी , गोरेगाव पश्चिममधे रवि मेहराचा खून होतो. त्याची बायको खुशी कॅाल सेंटरचा जॅाब करून रात्री ११.३० ला परत येते. खूप वेळा बेल वाजवून दार न उघडल्यामुळे ती उघडून आत येते तर रवि रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेला असतो. त्याचे हात पाठीमागे नायलॅान दोरीने बांधलेले असतात. त्याच्या छातीत सुरा खुपसलेला असतो. त्याच्या तोंडात काहीतरी खाद्य पदार्थ असतो. 2. सोमवार दि १० फेब्रुवारी , लोअर परळमधे सुचंद्रा अग्रवालचा खून. तिची कामवाली आल्यावर दार न उघडल्यामुळे सोसायटीवाले दार तोडतात. आत सुचंद्राचा खून झालेला. हात नायलॅान दोरीने मागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात काहीतरी खाद्यपदार्थ. पोलिस चक्रावलेले. मग पोलिसखाते जागे होते. त्यांचा नावाजलेला अधिकारी जो सस्पेंड झालेला आहे, त्या प्रकाश कदम, DCP याला बोलावले जाते. राज्याचे गृहमंत्री ओंकार लोखंडे, त्यांचा माणूस कमिशनर चव्हाण आणि उपगृहमंत्री जयंत गायकवाड व त्यांचा माणूस SCP राणे, मुंबईचा डॅान भाऊ पाटील जो लोखंडेचाच माणूस असतो, हे सर्व या केसच्या मागावर लागतात. कदम हा राणेंच्या ओळखीचा खास ऑफिसर असतो म्हणून त्यालाही इन्व्हेस्टीगेशनला बोलावले जाते. 3. मंगळवार दि १८ फेब्रुवारी , ठाणे येथे मंगला शहाचा खून. तिच्या शेजारणीमुळे हे कळते. मंगलाचे हात नायलॅान दोरीने पाठीमागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात खाद्यपदार्थ. पोलिस अधिकारी शिंदे कदमबरोबर येतात. मंगलाच्या चेहऱ्याजवळ कदमला पेस्टिसाईडचा वास येतो. चेहरा निळसर झालेला. खून झाल्यावर बॅाडीला हलवलेले दिसते. तो ऑफिसमध्ये जुन्या खूनांचे फोटो तपासतो. त्यांचीही बॅाडी खून केल्यावर हलवलेली दिसते. चेहऱ्यावर निळसर झाक दिसते. तिन्ही खून “फिनेक” ब्रॅंडच्या चाकूने केलेले असतात. हे समान धागे कदम त्याची मुलगी केतुल बरोबर चर्चा करतो. केतुलची आई काही वर्षांपूर्वी कदमला सोडून गेलेली असते. ती भाऊ पाटीलची सावत्र बहीण असते. पण सध्या ती कुठे आहे व काय करते हे माहित नसते. केतुल कोर्टात काम करत असते तसेच ती “शक्ती” या NGO मधेही काम करते. शक्ती हे सोनापूरमधुन सुटका केलेल्या वेश्यांचे पुनर्वसन करत असते. निर्मल नावाचा तिचा मित्र एथिकल हॅकर असतो. तिच्यावर प्रेम करत असतो. कदमला हार्ट अटॅक येऊन गेलेला व स्टेंट बसवलेला असतो. Depression मुळे त्याची सायकॅालॅाजिस्टकडे ट्रिटमेंट चालू असते. कदमला या तिन्ही केसमधे आणखी एक धागा सापडतो. हे खून आठ दिवसांच्या अंतरावर झालेले असतात. म्हणजे पुढचा खून बुधवारी होणार असल्याचे तो राणे व शिंदेला सांगतो. 4. बुधवार दि २६ फेब्रुवारी, कांदिवली पश्चिम, लक्ष्मी बुधीराजाचा खून. तोच पॅटर्न. 5. गुरुवार दि ५ मार्च, खार पश्चिम, गुरुराज अदवानीचा खून सेम पॅटर्न. गुरूराज हा युट्युबवरचा प्रसिद्ध सिंगर असतो. 6. शुक्रवार दि १३ मार्च, ताडदेव, दिव्या शुक्रपाणीवर खूनी हल्ला होतो. पण ती जबर जखमी होते. ती फिटनेस ट्रेनर असल्यामुळे खुन्याबरोबर झटापट करते. पण चाकू पोटात घुसल्यामुळे ती जबर जखमी होते. हात बांधलेले असतानाही ती फोनवर “सिरी” ला तिच्या भावाला, ध्रुवला फोन लावायला सांगते. फोन लागतो व ती “हेल्प हेल्प” एव्हढेच बोलून बेशुद्ध होते. म्हणून खुनी पळून जातो. ध्रुव तिथे पोहोचून तिला हॅास्पिटलमधे ॲडमिट करतो. पोलिसांना तिथे खुन्याची बॅग सापडते. त्यांत नायलॅानची दोरी, बेगॅान स्प्रे व राजमाच्या बिया सापडतात. तिसऱ्या खुनाआधी पोलिस संशयित म्हणून राजू दाभाडेला अटक करतात. पण चौथ्या खूनाच्या वेळेस तो कस्टडीतच असतो. मग खूनी कोण? 7. शनिवार दि २१ मार्च, बान्द्रा पश्चिम, शनिया डिसौजाचा खून होतो. सेम मोडस ऑपरेंडी . 8. शनिवार दि २८ मार्च, चेंबूर, ७१ वर्षांच्या राहुल सिंह नावाच्या सिख व्यक्तिचा खून होतो. तीच पध्दत. यानंतर एक दिवस कदम KBC बघत असताना अमिताभ बच्चन एका सिनेमाचं गाणं लावून त्याचा पिक्चर ओळखायला सांगतात. ते गाणं असते- “सोमवार को हम मिले मंगलवार को नयन बुध को मेरी निंद खुली जुम्मेरात को चैन अरे शुक्र शनी कटे मुश्किलसे आज है इतवार सात दिनों में हो गया जैसे सात जनम का प्यार” आणि कदमच्या डोक्यात एकदम प्रकाश पडतो… अरे, हे सर्व खून असेच रविवार ते शनिवार एक एका वारी घडलेत! पण शनिवारी दोन खून कसे? याच्या मागे काही खगोलशास्त्र किंवा भविष्याचा तर संबंध नाही? कदमला आठवतं की शेजारी राहणारा डॉ. देसाईला पण भविष्य-खगोलशास्त्राची आवड व माहिती आहे. ( डॅाक्टर कडे सापडलेल्या नायलॅानचे रंगीत दोर व फिनेक कंपनीचा चाकू यामुळे एक संशयित म्हणून कदमने त्याला अटक करून पुछताछ केलेली असते) कदम लगेच डॅाक्टरांकडे जातो. त्यांची माफी मागून त्यांना या प्रश्नांत मदत करायला सांगतो. तो या सर्व खुनांचा सिक्वेन्स सांगतो. ते प्रत्येक वारी का घडले? मग शनिवारी दोन का? यापुढे कोणता वार? कुणाचा खून? डॅाक्टर सांगतात की भारतीय भविष्य व खगोल शास्त्रात नवग्रहांना खूप महत्व आहे. रवि, सोम(चंद्र), मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि, राहू आणि केतु. यांचे रंग व धान्य वेगवेगळे असतात. त्या त्या ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी ते वापरले जातात. कदम ही माहिती लिहून घेतो. त्यावरून प्रत्येक खुनात वापरण्यात आलेले फिनेक कंपनीचे चाकू, वेगवेगळ्या रंगांचे नायलॅान दोर व तोंडातील पदार्थ यांचा संबंध जोडून एक तख्ता तयार करतोः- “रवि मेहरा-रविवार-सोनेरी दोर- तोंडात गहू-दिशा पूर्व सुचंद्रा-सोमवार-चंदेरी दोर-तोंडात तांदूळ-दिशा पश्चिम मंगला शाह-मंगळवार-लाल दोर-तोंडात तूर डाळ- दिशा दक्षिण लक्ष्मी बुधीराजा-बुधवार-हिरवा दोर-तोंडात हिरवे मूग-दिशा उत्तर गुरुराज अदवानी-गुरूवार-पिवळा दोर-तोंडात हरबरा डाळ-दिशा उत्तर पूर्व(ईशान्य) दिव्या शुक्रपाणी-शुक्रवार-पांढरा दोर-राजमा-दिशा दक्षिण पूर्व शनिया डिसौजा-शनिवार-काळा दोर-तोंडात काळे तिळ-दिशा उत्तर पश्चिम राहुल सिंग-शनिवार-निळा दोर-तोंडात उडीद दाळ-दिशा दक्षिण पश्चिम” आता उरला एकच ग्रह-केतु. केतुचा वार मंगळवार. ग्रे रंग, चना दाळ, दिशा दक्षिण पश्चिम. “केतु”म्हणजे कदमची मुलगी केतुलचा नंबर लागणार? आज तर मंगळवारच आहे! कदम घाबरून जातो! तो केतुलला फोन करतो पण तो बंद लागतो. ती सध्या कुठे आहे? कोर्टात? कदम आपल्या मुलीला वाचवतो का? खरा खुनी कोण असतो? तो पकडला जातो का? त्याचे यामागचा उद्देश काय असतो? याच्यामध्ये अजून कोण सामिल असतं का? याची उत्तरे मिळण्यासाठी वाचावी लागेल अश्विन सांघी यांची कादंबरी Razor Sharp. ...Read more