* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE ROAD TO WANTING
  • Availability : Available
  • Translators : CHITRA WALIMBE
  • ISBN : 9789386454881
  • Edition : 1
  • Publishing Year : MAY 2017
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 220
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
SOMETIMES THE HARDEST JOURNEY IS THE ROAD HOME. NA GA WAS ALWAYS IN SEARCH OF A BETTER LIFE. BUT NOW SHE SITS, ALONE, IN A HOTEL ROOM IN WANTING, A GODFORSAKEN TOWN ON THE CHINESE-BURMESE BORDER. PLUCKED FROM HER WILD LIFE AS A RURAL EEL-CATCHER, NA GA IS THEN ABANDONED BY HER WOULD-BE RESCUERS IN RANGOON. LATER, AS A TEENAGER, SHE FINDS HERSELF CHASING THE DREAM OF A NEW LIFE IN THAILAND - WHERE FURTHER BETRAYALS AND VIOLATIONS AWAIT. YET IT SEEMS THAT HER FIGHTING SPIRIT WILL NOT BE BROKEN. BUT FOR HOW LONG CAN NA GA BELONG NOWHERE AND WITH NO ONE? IN THE DINGY HOTEL IN WANTING SHE IS FORCED TO CONFRONT HER COMPULSION TO KEEP RUNNING, AND TO ASK HERSELF WHY, UNTIL NOW, SHE`S RESISTED THE JOURNEY HOME.
काहूर ही कथा आहे, एका जंगली लू जमातीतील मुलीची- जी आयुष्यात चांगल्या गोष्टीच्या शोधात असते. ‘ना गा’ असे नाव असणाऱ्या या मुलीचे भावविश्व लेखकाने उलगडून दाखविले आहे. ना गा केवळ सात वर्षांची असताना पिकांचे झालेले नुकसान, हलाखीची आर्थिक परिस्थिती यामुळे वडिलांनी तिला विकून टाकले आहे. दरू गावातील मुखियाकडे सुरुवातीला घरकाम करण्यासाठी ‘ना गा’ राहत असताना मुखियाची बायको तिला खूपच वाईट वागणूक देत असते. वयाच्या मानाने कठीण कामे करून मालकिणीच्या नजरेत वर येण्याचा ती खूप प्रयत्न करत असे; परंतु ना गा मालकिणीच्या दृष्टीने एक अुशभ मुलगी असल्यामुळे, कधीच यशस्वी होऊ शकणार नाही हे आता तिला कळून चुकले होते. रंगूनमध्ये एका कुटुंबाची सेवा करणाऱ्या डो डो सेंगने ना गाला कजाग मालकिणीच्या तावडीतनं सोडवलं आणि आपल्याचबरोबर रंगूनला घेऊन गेली. मूळ अमेरिकन असलेल्या या कुटुंबातील मॉर फॉर आणि पिया यांनी ना गाला जीव लावला. तिला आपल्या घरातील सदस्यासारखीच वागणूक दिली. परंतु जेव्हा अमेरिकेला जाण्याची वेळ आली तेव्हा ना गा आणि डो डो सेंग यांना त्यांनी सोबत नेलं नाही. अमेरिकेला जाण्याचं स्वप्न तुटलेली डो डो सेंग ना गा ला घेऊनच गावी परतली. ना गा म्हणजे तिचं अमेरिकेला जाण्याचं तिकीट होतं; परंतु जेव्हा बेत फसला, तेव्हा आता डो डो सेंग तिला घालून पाडून बोलू लागली. आपल्या दुर्दैवाला अप्रत्यक्षरीत्या ना गा कारणीभूत आहे, असे तिला वाटू लागले. डो डो सेंगने आपल्याला दाखवलेले सुखाचे दिवस, उपकार लक्षात ठेवून पैसा मिळवून तिला सुख देता यावे म्हणून एका व्यक्तीवर विश्वास ठेवून ती नोकरीच्या निमित्ताने थायलंडला पोहोचते. लवकरच तिच्या लक्षात येते की, आपण फसवले गेलो आहोत. कामाच्या बहाण्याने तिची रवानगी एका कुंटणखान्यात होते. विचित्र, यातनामय आयुष्य जगत असताना तिच्या आयुष्यात विल येतो. अतिशय सभ्य सुसंस्कृत असणारा विल ना गाच्या प्रगतीसाठी, सुखासाठी खूप प्रयत्न करतो. ना गा आणि विल यांच्यात नात्याचा नाजूक बंध निर्माण होतो. बायको नसूनही बायकोप्रमाणे त्याची सेवा करणारी ना गा नकळतपणे त्याच्या प्रेमात पडते. पण तिचा पत्नी म्हणून स्वीकार करण्यास विल तयार नसतो. दहा वर्षं एकत्र राहिल्यावर एक दिवस विल तिला पुन्हा तिच्या घरी जाण्याविषयी सुचवतो. विलला मिळवण्याचे सर्व प्रयत्न करून थकलेली ना गा डोक्यात विचारांचे काहूर माजलेले असतानाच परतण्याची इच्छा नसतानाही वाँटिंगच्या प्रवासाला निघते. काही चमत्कार घडावा, विलने आपल्याला थांबवावे असे मनात म्हणत परतत असताना तिला सुरक्षित घरी पोहोचण्यासाठी विलने अनेक माणसांची व्यवस्था केलेली असते. या परतीच्या मार्गावर तिला अनेक कटू-गोड अनुभव येतात. आपल्या उद्ध्वस्त घराचा अनिच्छेने शोध घेण्यासाठी ती वाट चालू लागते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #KAHUR #THEROADTOWANTING #काहूर #BIOGRAPHY&TRUESTORIES #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #CHITRAWALIMBE "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAMANA 27-05-2018

    संवेदना बधिर करणारे ‘काहुर’... ‘द रोड टू वॉटिंग’ ही वेण्डी लॉऱ्योन यांची मूळ इंग्रजी सत्यकथा चित्रा वाळिंबे यांनी ‘काहूर’मध्ये अनुवादित केली आहे. ब्रह्मदेशातील अल्पसंख्याक ‘जंगली लू’ जमातीतील ‘ना गा’ची ही कहाणी आपले हृदय पिळवटून टाकते. मूळ कथानकाची ावगर्भता हळुवारपणे जपण्याचा चित्र वाळिंबे यांनी कसोशीने प्रयत्न केला आहे. कथेची नायिका ‘ना गा’ आत्मशोध घेत आहे. या शोधात ती हरवून गेली आहे. मार्ग सापडत नाही. परिस्थितीने गांजून गेलेली आत्महत्येचा अयशस्वी प्रयत्नही करू जाते. कुनमिंग ते वॉटिंग. वॉटिंग ते बँकॉक आणि बँकॉक ते पुन्हा कुनमिंग असा तिचा झगडा चालला आहे. मॉर आणि फॉर आणि छोटी सवंगडी पिया हा तिच्या आयुष्यातील पहिला सुखाचा पडाव. डो-डो सेंग ही एक आश्वासक झुळूक. नशिबाचा फेरा ‘ना गा’ला कोणकोणत्या दुष्टचक्रातून फिरवतो आणि तिला कसे फसवले जाते हे वाचून मन सुन्न होते. विल हा ‘देवदूत’ पण त्याच्या सहवासातही भूतकाळातल्या गडद सावल्या तिची पाठ सोडत नाहीत. त्या छायेत ती कधीच मोकळा श्वास घेऊ शकत नाही. कायम कोंडलेल्या ‘ना गा’ची पावले चुकीची पडतात आणि ती पेâकली जाते. पुन:पुन्हा अनिश्चिततेच्या गर्तेत. डो-डो सेंग विल. मोल. जियांग ही सारी जीव लावणारी माणसे. मिन्झू छोटी आहे, निरागस आहे. पण ती ‘मा’ची काळजी करते आहे. त्यासाठी ‘नको’ ते धाडस करायला धजते आहे. तिच्या काळजीने ‘ना गा’चा जीव अर्धा होतो. अखेर सीमा पार करूनही काय मिळवायचे, कुठे जायचे हे प्रश्नचिन्ह कायम ठेवूनच कादंबरीचा शेवट येतो. आपले मूळ आणि कूळ शोधत जायचे तिथे कोणीच नाही. हे माहीत असताना आणि मग होणारे भास हे चित्र भेसूर आहे. पण ही कादंबरी नीट जाणून घेण्यासाठी चीन व बर्मामधील या अत्याचारांची सामाजिक व ऐतिहासिक पार्श्वभूमी माहीत असेल तर नक्कीच मदत होईल. ‘काहूर’च्या निमित्ताने आपण एका वेगळ्या देशातून आणि वेगळ्या संस्कृतीमधून प्रवास करतो. जी गूढ आहे, कधी हळवी. तर कधी व्रूâर आहे. साहित्यातून संवेदनशीलता वृद्धिंगत करणारी ‘काहूर’ वाचूनच घ्यायचा अनुभव आहे. – अरविंद दोडे ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 23-07-2017

    सुखाच्या शोधात वणवण करत राहणाऱ्या वाइल्ड लू या आदिवासी जमातीतल्या वा गा नावाच्या मुलीची ही कहाणी. ती जंगली समाजातून दूर फेकली जाते, तारुण्यात अवहेलना आणि विश्वासघात तिला सहन करावे लागतात. तरीही ती लढत राहते. ‘द रोड टू वाँटिंग’ या कादंबरीत वेंडी लॉ-यो यांनी वा गाची ही कहाणी लिहिली आहे. तिचं हे मराठी रूपांतर चित्रा वाळिंबे यांनी केलं आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more