* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: SEX WORKER
  • Availability : Available
  • Translators : SUPRIYA VAKIL
  • ISBN : 9788177668414
  • Edition : 3
  • Publishing Year : JUNE 2007
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 140
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
WHY THE PATH OF LIFE IS SO ZIGZAGGED AND THORNY FOR SOMEONE BORN AS A WOMAN? THIS IS A TRUE AUTOBIOGRAPHY WHICH GIVES US THE EXPERIENCE OF `TRUTH IS STRANGER THAN FICTION`. THIS AUTOBIOGRAPHY IS UNIQUE AS IT IS NOT WRITTEN BY ANYONE WHO IS FAMOUS OR WHO IS SOMEBODY SOMEWHERE. IT IS THE STORY OF A COMMON WOMAN, BORN IN A NORMAL FAMILY. BUT HER LIFE AFTER THE DEATH OF HER HUSBAND BECAME HELL FOR HER. SHE HAD TO FACE MANY DREADFUL FACTS. SHE HAD TO KEEP HER HOUSE RUNNING AND HAD TO STRUGGLE FOR THE SURVIVAL OF HER CHILDREN. SHE HAD TO ACCEPT PROSTITUTION TO EARN ENOUGH MONEY TO KEEP HER AND HER CHILDREN`S LIVING GOING. SHE HAD TO ACCEPT THE LIFE-STYLE BEYOND THE MORAL NORMS, VIRTUES, AND CULTURE. NO WONDER, HER WORDS, WHICH ARE FULL OF TRUTH; LEAVE US SPELLBOUND.
स्त्री म्हणून जन्माला आल्यानंतर एखादीच्या आयुष्याची वाट इतकी वळणावळणाची आणि काटेरी का असावी? समाजाच्या रूढ, नैतिक चौकटीबाहेरचं जीवन स्वीकारावं लागलेल्या, देहविक्रय व्यवसायात येऊन जीवनाशी विलक्षण संघर्ष करत, करकरीत वास्तवाशी थेट नजर भिडवून वाटचाल करणा-या स्त्रीच्या प्रांजळ लेखणीतून उतरलेली ही आत्मकथा `ट्रूथ इज स्ट्रेंजर दॅन फिक्शन’चा अनुभव देते. अत्यंत वैचित्र्यपूर्ण घटना-प्रसंग कथन करत, समाजाच्या बेगडी नैतिकतेवर सहज शब्दांत पण भेदक प्रहार करत वाचकाच्या मनाचा ठाव घेते.

No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #SEXWORKER #SEXWORKER #सेक्सवर्कर #BIOGRAPHY #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #SUPRIYAVAKIL #सुप्रियावकील #NALINIJAMEELA #नलिनीजमिला"
Customer Reviews
  • Rating StarNilesh Sathe

    सेक्स वर्कर हे नलिनी जमिला यांच आत्मकथन. एका वहित त्यांनी त्यांच नाव, जन्म, आणि वय लिहलं होतं हे लिहताना त्यांच वय होतं एकोणपन्नास. त्यानंतर एका गिर्हाईकानं ते वाचलं आणि त्यामुळं ते गिर्हाईक गमावलं. कारण त्यांनी त्या गिर्हाईकाला त्यांच वय सांगिलं होतं बेचाळीस. वाचून अंगावर काटा आला की नाही ? आहे की नाही हादरवून टाकनारी कहानी? नलिनी ही पाहिला नवरा कैंसरच्या आजाराने गेल्यावर आपल्या झालेल्या मुलीला जगवन्यासाठी सेक्स वर्कर म्हणून काम करू लागली. ही मुलगी तिच्या वडिलांच्या आइकडेच म्हणजे आज्जीकडेच राहत असते. एकटयाने आयुष्य कसं काडायचं म्हणून दुसरं लग्न करते. दुसऱ्या नवर्याकडून हिला एक मुलगी होते पन नवरा बायकोचं नात जास्त काळ टिकत नाही. म्हणून तिसरं लग्न करते तिसऱ्या नवर्याने मात्र नलिनाला जास्त काळ आधार दिला. तिसऱ्या नवर्याचं नाव ही स्वता बदलून त्याला जमीला म्हणत असते आणि स्वताच्या नावापुढे लावतही असते. शेवटी हेही नातं जास्त काळ टिकत नाही. तिला स्वताला वाटतं ही आपली मुलगी आता वयात आली आहे आणि आपल्या नवर्याच्या मनात भलतं सलतं आलं तर.? तसही ही त्याची मुलगी नव्हे. म्हणून तिच्या मुलीला घेवून निघुन जाते. पुढे तिच्या मुलीला शिक्षण देण्याची धडपड अडचणी येतात मुलीला आपल्याच वाटयाला आलेलं दुःख येवू नये म्हणून बऱ्याच संघर्ष्याला सामोरं जाते ही नलिनी. बऱ्याचदा नलिनीला फक्त मशिदित आसरा मिळाला आहे. तिथ मिळणाऱ्या भिक्षेवर ती जीवंत राहीली आहे. तरीही देवावर भाष्य करताना ती म्हणते देव नाही असं म्हंटल तर दैवी कोप होईल असं तिला वाटायचं. पन देव आहे असं खात्रिशिर सांगण्यासारखा एकही अनुभव तिच्याजवळ नाही. तरीसूद्धा देव अस्तित्वात नाही म्हणताला तिला कसलिच भीति वाटत नाही. तीन डिसेंबर हा दिवस सेक्स वर्कर्स डे म्हणून साजरा केला त्यावेळी नलिनी ह्या कोलकात्याला गेल्या होत्या त्यावेळी त्यांनी सेक्स वर्कर्सबद्दल मत मांडल त्या म्हणाल्या देहविक्रेत्या इतर महिलांपेक्षा वेगळ्या असतात. यांना स्वयंपाक करुण नवर्याची वाट पहायची नसते. आपल्या मुलांना कसं वाढवायचं याची परवानगी नवर्याकडून घ्यावी लागत नाही. असं अजुन बरच काही पुस्तकात सांगितलंय ते तुम्ही वाचाच. वर मी सेक्स वर्कर हाच शब्द वापरला आहे वैशा असा उल्लेख केला नाही त्याचं कारण वैशा हा संस्कृत शब्द आहे याचा अर्थ कुकर्मास प्रवृत्त करणारी बाई असा होतो. हा शब्द वाईट अर्थाने घेतला जात असल्याने यांना सेक्स वर्कर हा नवा शब्द घ्यावा लागलाय. जर पुस्तकात इतक्या व्यवस्थित पद्धतीने या शब्दाचा अर्थ सांगितलाय तर आपन तो शब्द वापरणं मूर्खपनाचं ठरेल नाही का.? असो. तुम्ही हे पुस्तक नक्की वाचा, यावर बोला, चर्चा करा अफाट पुस्तक आहे हे. हे पुस्तक वाचून गलबलुन येतं. मला हे पुस्तक वाचून वर्ष झालं पन पुस्तक वाचून मनात तयार झालेला कोलाहाल कधीतरी बाहेर काढावाचं लागतो. म्हणून हा लेखन प्रपंच. शेवटी या पुस्तकातलं मला फार पटलेलं एक वाक्य सांगतो आणि थांबतो. "समाजापासुन दूर पळालेली मानसंच फक्त शरीर सुखासाठी येतात" निलेश ...Read more

  • Rating Starडॉ.कृष्णा सुभाष सपाटे

    मानवी शरीराला जडलेल्या वासनेचे फुत्कार कोणाला क्षणिक सुख देऊन जातात तर कोणाचं आयुष्य गिळंकृत करून जातात त्याचीच ही कहाणी.गरिबीचा आगडोंब, पैशांची विवंचना आणि नात्याचं दुरावलेपण माणसाला कोणत्या खाईत घेऊन जाईल हे सांगता येत नाही. देह विक्रीच्या व्यवसाया कोणी स्वतःहून येत नाही तर त्याला परिस्थिती तस करायला भाग पाडते. ज्यावेळी सगळी शस्त्र आपल्या हातात नसतात त्यावेळी पोटापाण्यासाठी व भिकेला लागण्याआधी जो मार्ग समोर दिसत असतो तो म्हणजे वैश्याव्यवसाय. जगण्याची गरज माणसाला काहीही करायला भाग पाडते, जगभर कोणी कितीही वाईट कृत्ये केलेली असली तरी समाज नावाच्या नैतिकता निर्माण करणाऱ्या घटकाने या व्यवसायाला मात्र नेहमीच खालच्या थरात जागा दिली आहे. गरज म्हणून व्यवसायात शिरलेल्या नलिनीला कुटुंबापासून तुटलेपण भोगाव लागत, आईपण हिरावून घेतलं जातं. व्यवसायाबरोबर लागत गेलेली व्यसनांची गोडी त्याच जोडीला माणुसरूपी जनावरांच होणार दर्शन पुस्तकाच्या पानांपानात दिसत. मनात एखादया तप्त लाव्हाप्रमाणे उसळणारी खदखद कोणताच सहानुभूतीचा समुद्र शांत करू शकत नाही कारण आपलं माणूसपणच जिथं नाकारलं जात, तिथं अन्यायासाठी न्याय मागणं देखील अवघड असत. एकदा परतीचे दोर कापले की मागे फिरायचं नसत, जे वाट्याला येईल ते घोटत पुढे चालावं लागत. कधी तरी मनाला शांत करणारा छोटासा शिडकावा मिळतो तर इतरवेळी होरपळून काढणारी आग. नलिनीचा बंडखोर स्वभाव लहानपणापासून ते आजतागायत तिच्या आयुष्यात वेगवेगळी वळण आणतो. काही वेळा हतबल झाल्यामुळे जुळत घेणं तिला भाग पडलं. ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA 10-07-2007

    केरळमधील वेश्येचे आत्मचरित्र मराठीत... स्वत: जगण्यासाठी आणि पोटच्या गोळ्यांना जगविण्यासाठी रूढता, नैतिकता ठोकरत वेश्याव्यवसायाच्या दाहकतेत उडी घेऊन तितक्याच बेधडकपणे आपली करुण कहाणी शब्दबद्ध करणाऱ्या मल्याळी नलिनीची आत्मकथा आता मराठीत उपलब्ध झाली आह. ‘सेक्स वर्कर’ नावाने सुप्रिया वकील यांनी अनुवादित केलेले हे पुस्तक मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केले आहे. ‘ओरू लैंगिक कोझिलालियुते आत्मकथा’ (एका देहविक्रेतीची आत्मकथा) हे नलिनी जमीला यांचे आत्मचरित्र. या मल्याळी भाषेतील पुस्तकाच्या १० आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या. त्यांच्या २१ हजार प्रती विकल्या गेल्या. डी.सी. बुक्स या केरळमधील प्रकाशन संस्थेने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. तमीळ, कानडी, बंगाली, इंग्रजी, फ्रेंच, मराठीसह सहा भाषांत हे पुस्तक अनुवादित झाले आहे. तिसरीपर्यंत शिकलेल्या नलिनी जमीला हिने तिच्या जीवनाविषयी लिहावे, असा आग्रह अनेकांनी केला. अखेर मुक्त पत्रकार आय. गोपीनाथ यांनी तिचे आत्मकथन शब्दबद्ध केले. कोणतीही ओळख न लपविता लिहिलेले हे पुस्तक आहे. देहविक्री करणाऱ्या महिलेने लिहिलेले हे पहिले पुस्तक असल्याचा दावा सुप्रिया वकील यांनी पत्रकार परिषदेत केला. मेहता पब्लिशिंग हाऊसचे सुनील मेहता याप्रसंगी उपस्थित होते. घरातील दारिद्र्यामुळे नलिनीला या व्यवसायात येणे भाग पडलं. उपेक्षित बालपण गेलेल्या नलिनीचा एका दादाशी विवाह झाला. तीन वर्षांतच त्याने आजारपणाला कंटाळून आत्महत्या केली. त्यानंतर दोन मुलांचे पालनपोषण करण्याची जबाबदारी तिच्यावर पडली. त्यात खाष्ट सासू, त्यामुळे नाइलाजास्तव ती या व्यवसायात आली. तिचं पहिलं गिऱ्हाईक होतं एक वरिष्ठ पोलीस अधिकारी! त्यानंतर तिने मेंगलोरच्या एकाशी लग्न केले. एक मुलगी झाल्यानंतर त्याने तिला सोडले. मग तामिळनाडूमधील एकाशी तिने विवाह केला. त्याच्याबरोबर तिने १२ वर्षे संसार केला. ती आजारी पडली. त्यानंतर तिसरा नवराही तिला सोडून गेला. माहेरचा आधार नाही. तारुण्यात पदार्पण केलेल्या मुलीसह नलिनी पुन्हा रस्त्यावर आली. स्वत:च्या मुलीला मात्र तिने यापासून दूर ठेवले. रोजच्या जगण्याशी दोन हात करत असतानाच मुलीच्या संरक्षणाचेही आव्हान तिने पेलले. टूथ इन स्ट्रेजर द फिक्शनची प्रचिती देणारी ही आत्मकथा वाचताच वाचक सुन्न होतात, असे वकील यांनी सांगितले. ‘ज्वालामुखी’ या स्वयंसेवी संस्थेत नलिनी सहभागी झाली. देहविक्री करणाऱ्या महिला नुसत्या प्रश्नावर चर्चा करतात; पण त्यावर उत्तर शोधत नाहीत. त्यामुळे त्यांच्या प्रश्नासंदर्भात सक्रिय होऊन तिने माहितीपट बनविला. देहविक्री करणाऱ्या महिलांचे प्रश्न ती सोडवित आहे. या पुस्तकातून समाजाच्या बेगडी नैतिकतेवर प्रहार करताना सुन्न करणारे प्रश्न विचारते. सध्या नलिनी तिची मुलगी आणि रिक्षावाला जावई यांच्यासमवेत राहते. तिचा जावई व विहिण यांना तिच्या पूर्वआयुष्याबद्दल कल्पना आहे, असे वकील यांनी सांगितले. ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 07-09-2007

    देहाची परवड, मनाची तडफड… नलिनी जमीला यांचे जगणे आपल्या सरळमार्गी आयुष्याला ठेच पोचविणारे आहे. केवळ स्त्रीत्वाचा बाजार मांडून नव्हे, तर माणूस म्हणून जगायचे असे तिचे जाणीवपूर्वक प्रयत्न दिसतात. ‘सेक्स वर्कर’ हे नलिनी जमीला यांचे आत्मचरित्र एखाद्या ादंबरीसारखे आहे. व्यापक जीवनपट, अद्भुतता, घटनावैचित्र्य या दृष्टीने मी या पुस्तकाला कादंबरीसारखे ठरवत नाही, तर कादंबरीत ज्याप्रमाणे परिस्थिती व नायक-नायिका यांचा संघर्ष, काळ्या-पांढऱ्या रंगातील प्रवृत्ती रेखाटलेल्या असतात, त्याप्रमाणेच त्या नलिनी जमीला यांच्या जीवनपटात प्रत्यक्ष घडतात. आपल्या सरळमार्गी आयुष्याला ठेच पोचविणारे हे जगणे आहे. काही वर्षांपूर्वी मी स्वत:ही अशा एका विलक्षण बाईला भेटलो आहे. चांगल्या घरातील मुलगी नवस म्हणून देवीला सोडली गेली होती. तिथूनच तिच्या आयुष्याची परवड सुरू झाली. मुलगा झाल्यावर त्याला शिकवून मोठा करण्यासाठी तिची धडपड सुरू झाली. ती वेश्या व्यवसायातून बाहेर पडली व आज चांगले जीवन जगते आहे. या बाईशी आणि या व्यवसायातील तिच्या काही परिचित महिलांशी बोलताना त्यांच्या देहाची परवड व प्रत्येक क्षणी होणारी मनाची तडफड दिसत होती. त्या पार्श्वभूमीवर नलिनी जमीला यांचे आत्मचरित्र मी तोलत होतो. ते आहे तरी कसे? नलिनी ही एका चांगल्या घरातील मुलगी. पण वडिलांचे विचित्र वागणे आणि आईची हतबलता यामुळे या मुलीला खाणकामगार व्हावे लागले. धुणी-भांडीवाली म्हणून काम करावे लागले. एका घरी ती मुले सांभाळायला लागली. तिने लग्न केले आणि तिच्या आजपर्यंतच्या आयुष्याच्या वळणावळणाच्या वाटेवर काटेही पसरले गेले. नवरा मेल्यानंतर मुलांना वाढविण्यासाठी नाइलाजाने ती देहविक्रय करू लागली आणि मुलांनाच गमावून बसली. नंतर पुन्हा एका वळणावर धर्मांतर व दुसरा विवाह. पण परवड संपली नाही. दुसऱ्या विवाहानंतर झालेल्या मुलीला गमवावे लागू नये आणि तिच्यावर आपल्या अभद्र व्यावसायिक जीवनाची सावली पडू नये यासाठी धडपडणारी आई इथे दिसते. समाजाने आखलेल्या नैतिक चौकटीबाहेरचे जीवन तिला जगावे लागत आहे; पण त्यातही ती एक चौकट स्वत:ला घालून घेताना दिसते. त्यातूनच एक विलक्षण संघर्षमय आयुष्य तिच्या वाट्याला येते. केवळ परिस्थिती म्हणून ते आयुष्य ती निमूटपणे स्वीकारीत नाही, तर त्याला ती खंबीरपणे सामोरी जाते, हे या ‘नायिके’चे वैशिष्ट्य आहे. केवळ स्त्रीत्वाचा बाजार मांडून नव्हे, तर माणूस म्हणून जगायचे असे तिचे जाणीवपूर्वक प्रयत्न दिसतात. या पुस्तकाचे महत्त्व यातच आहे. नलिनीच्या वाट्याला आलेले आयुष्य मात्र खूपच दु:खाचे आहे. पुरुषी वृत्तीची कितीएक रूपे येथे दिसतात. देहविक्रय व्यवसायाच्या तNहा, तेथील व्यवहार उलगडतो. वेगळे जग समोर येते. पण येथे हे पुस्तक कमी पडते. या सगळ्या निवेदनातून देहविक्रय करणाऱ्या स्त्रीच्या देहाची परवड दिसते. त्या प्रत्येक क्षणी तिच्या मनाची जी तडफड झालेली असेल ती ओझरती जाणवते. कित्येकदा तर स्त्रीला केवळ देह असतो; मन नसतेच असे वाटावे इतके सपक निवेदन येते. नलिनी स्वत: अल्पशिक्षित आहे; पण तिला लेखनास साह्य करणाऱ्या व्यक्तींनी ही त्रुटी तिच्याकडून दूर करून घ्यायला हवी होती. नलिनी एका कम्युनिस्ट कार्यकर्त्याची मुलगी आहे. खाणीत काम करतानाही एकदा तिच्या नकळत तिने एका संपाचे नेतृत्व केले होते. हे कार्यकर्तेपण तिच्यामध्ये नैसर्गिक आहे. ती आपल्या आयुष्याच्या करकरीत वास्तवाला थेट नजर भिडवूनच जगते. त्यामुळेच देहविक्रय करणाऱ्यांच्या संघटनेशी तिचा परिचय झाल्यावर तिचे हे कार्यकर्तेपण सहज फुलते. तिच्याकडे काही प्रमाणात नेतृत्व येते. त्या वेळी ती समाजाच्या नैतिकतेतील बेगडीपणा फाडून दाखवते. आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून घेण्याची संधी मिळताच आपल्या भावना माहितीपटातून व्यक्त करते. संघटनेसाठी लढते, ‘इव्हेंट’ आयोजित करते, चर्चासत्रे गाजवते. हा सगळा भाग आणखी विस्ताराने, तपशिलात नोंदवायला हवा होता. कित्येक ठिकाणी परिच्छेदाचे पहिले वाक्य व शेवटचे वक्य आशयदृष्ट्या एकच आहे. परत-परत तेच वाचणे थोडे कंटाळवाणे होते. अनुवाद करताना हे टाळता आले असते. बाकी अनुवादही खूपच प्रवाही व प्रभावी झाला आहे. -संतोष शेणई ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more

I HAVE A DREAM
I HAVE A DREAM by RASHMI BANSAL Rating Star
Krishna Diwate

‘स्टे हंग्री स्टे फूलीश’ आणि ‘कनेक्ट द डॉटस’ या बेस्ट सेलर पुस्तकाच्या लेखिका ‘समाजातल्या परंपरागत समस्या सोडवण्याचा नवा मार्ग शोधून काढणार्‍या वीस सामाजिक उद्योजकांच्या प्रेरणादायी कहाण्या’ हे वाक्य पुस्तकाचे पहिले पान उघडले आणि दिसले. त्यामुळे माझ कुतुहल चाळवले आणि ते पुस्तक वाचायला सुरुवात केली. मनोगतात लेखिका म्हणतात की, आता नव्या दमाचे, डोक्याने आणि मनाने ही विचार करणारे काही जण एखाद्याच्या नजरेतील दुःख ओळखतात, पेटून उठतात; पण ते त्याच्यावर विचार एखाद्या उद्योजकाप्रमाणे करतात. म्हणून ते ‘सामाजिक उद्योजक.’ नफा मिळविण्याचा हव्यास नसला तरी ते बिझनेस मधील तत्वे वापरून ती गोष्ट साध्य करतात. हे काही तरी वेगळे आपण वाचत आहोत असे मला वाटले. त्यामुळेच ते पुस्तक वाचायला घेतले. ह्या मध्ये वीस लोकांची चरीत्रे आहेत. ते सर्व भारतीय, उच्चशिक्षित तरूण तरूणी आहेत. कोणी त्यातील शास्त्रज्ञ आहेत तर कोणी मरिन बायोलॉजिस्ट, आयआयटी, आयआयएम ग्रॅज्युएट आहेत पण कोणत्या कोणत्या सामाजिक प्रश्नाने ते अस्वस्थ झाले आणि नेहमीच्या मार्गाने न जाता वेगळीच वाट पकडली. पुस्तकात ‘रेनमेकर्स,’ ‘चेंजमेकर्स’ व ‘स्पिरिच्युअल कॅपिटॅलिस्ट’ असे तीन भाग आहेत. प्रत्येकात अनुक्रमे अकरा,सहा व तीन व्यक्तीमत्वांची ओळख करून दिली आहे. ‘सुलभ’ ही आधुनिक टॉयलेटस उभारणारे बिंदेश्वर पाठक ह्याच्या चरित्राने पुस्तकाची सुरुवात होते. जातीने बिहारमधील ब्राह्मण. पण लहानपणी टॉयलेटस साफ करणार्‍याला हात लावला त्यामुळे आजीने अक्षरशः शेण, गोमुत्र खायला लावले. पण त्याच बिंद्रेश्वरांनी अगदी योगायोगाने ह्याच क्षेत्रात काम करण्याचे ठरविले. अर्थात ही वाट निश्चितच सोपी नव्हती. अनेक हालअपेष्टा सोसत, जगाचे धक्के खात, अनेक समस्यांना तोंड देत आपले स्वप्न ‘सुलभ शौचालयाच्या’ माध्यमातून सुरु केले. तो सगळा खडतर प्रवास अर्थात पुस्तकातूनच वाचायला हवा. त्यासाठी त्यांनी केवळ ती यंत्रणा तयार केली नाही तर ती टॉयलेटस बांधून, त्यासाठी लागणारी प्रेरणा, शिक्षण, संभाषण, ट्रेनिंग, पाठपुरावा अशा सर्वच गोष्टी ‘सुलभ’ तर्फेच संभाळल्या जातात. सध्या ही संस्था स्वबळावर चालते. 100 ते 125 कोटी इतके तिचे वर्षाचे उपन्न आहे. इतकेच नाही पूर्वी जे लोक सफाईचे काम करत असत त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च संस्था करत आहे. ‘सुलभ पब्लिक स्कूल’ नावाने शाळा सुरु केली आहे. तरूणांसाठी व्होकेशनल क्लासेस चालवले जातात. म्हणजे मिळालेला नफा पुन्हा त्याच सफाई कामगारांच्या कल्याणासाठी वापरला जातो. टॉयलेटस बांधून भरपूर पैसा मिळवता येतो हे वाक्य पचायला जरा जडच जाते. अनिता आहुजा ही दिल्लीत सुखवस्तू कुटूंबात रहाणारी सामान्य स्त्री. पण कचरा वेचणार्‍या मुलांचे हाल पाहून त्यांच्यासाठी काही तरी करावे असे तिने ठरविले. तिने 1998 मध्ये कॉन्झर्व्ह नावाची संस्था उभी केली. व त्यातून पहिला प्रोजेक्ट सुरु केला तो म्हणजे आजुबाजूच्या परिसरातील कचरा उचलून त्याचे कंपोस्टखत तयार करणे. कचरा गोळा करण्यासाठी चांगल्या ढकलगाड्या आणल्या, युनिफॉर्म, आय कार्डची सोय केली. 2002 पर्यंत एक पूर्ण वेळ काम करणारी मोठी संस्था बनली. त्याचवेळी त्यांनी प्लॅस्टीकच्या कचर्‍यावर प्रयोग सुरु केले. तिचे पती शलभ ह्यांनी बिटस पिलानी मधून इंजिनिअरींग केले आहे. त्यांच्या मदतीने तिने फॅक्टरी सुरु करण्याचे ठरविले. शलभने मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक शीटस निर्मिती करू शकेल असे मशीन तयार केले. त्यासाठी अर्थातच अनेक प्रश्न समोर उभॆ राहिले. चुका झाल्या, ठोकरा खाल्या पण त्यातून वाट काढत त्यांनी चिकाटीने प्रयत्न सुरुच ठेवले. आज दोघे मिळून कचर्‍यातील प्लॅस्टिक पिशव्या वापरून आकर्षक अशा हॅडबॅगस तयार करण्याचा कारखाना चालवतात. जे लोक सुरुवातीला केवळ कचरा उचलण्याचे काम करत होते, त्यांच्या काही कौशल्य दिसले की त्यांना वेगळे काढून ट्रेनिंग दिले जाते. मशीनवर असिस्टंटचे काम करू लागतात त्यातून काही लोक तर ग्रुप लिडर ही झाले आहेत. कटींग करणॆ, क्वालिटी तपासणॆ, फिनिंशींग, पॅकिंग अशी सर्व महत्वाची कामे ते करतात. आता ते कामगार झाल्यामुळॆ त्यांना चांगला पगार, प्रॉव्हिडंट फंड, ओव्हरटाईम अशा सुविधा मिळू लागल्या त्यापेक्षा ही जास्त त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळाली. त्यांच्या साठी हे नवीनच आहे. अनिता व शलभ दोघॆही मेहनत घेतात पण एनजीओ असून ही भरपूर पैसा कमावणे त्यांना चुकीचे वाटत नाही. कारण आज ह्या एका उद्योगामुळे कित्येक कुटूंबाची आर्थिक स्थिती बदलून गेली आहे. अशीच अजून एक प्रेरणादायी कथा दिल्लीतील रंगसूत्र कंपनी चालविणार्‍या सुमिता घोस ह्यांची. स्वतः ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यावर मास्टर इन इकॉनॉमिक्स ची पदवी घेतल्यावर संजॉय घोस ह्या या आय आर एम मधून शिक्षण घेतलेल्या ध्येयवादी तरूणाशी लग्न केले. पण दुर्दैवाने आसाममध्ये काम करत असताना त्यांची 1998 मध्ये उल्फाच्या अतिरेक्यांनी हत्या केली. त्यानंतर अनेक टक्केटोणपे खात, दोन लहान मुलांचा संभाळ करत सुमिताने ‘रंगसूत्र’ नावाची कंपनी काढली. त्याच्या मार्फत ती खॆडॆगावातल्या लोकांकडून कापड, शोभॆच्या वस्तू, बनवून घेते आणि त्या फॅब ईंडीयासारख्या प्रसिध्द कंपन्यांना विकते. जैसलमेर, बारमेर जिल्ह्यातले कारागिर तिच्यासोबत काम करत आहेत. अजून एक अशीच ध्येयवादी तरूणी म्हणजे इशिता खन्ना. डेहराडून मध्ये जन्म झालेली एक सर्वसामान्य मुलगी. पण निसर्गसंवर्धन आणि भूगोल या विषयांची आवड असलेली. म्हणूनच तिने आपल्या ग्रॅज्युएशन नंतर टाटा इंन्स्टीट्यूट मधून मास्टर्स केले. पर्यावरण क्षेत्रातच काम करायचे आहे हे निश्चित ठरवून तिने काही वर्षे नोकरी केली. त्यानंतर 2002 मध्ये नोकरी सोडून आपल्या दोन मित्रांसोबत स्पिती व्हॅलीमध्ये मूस नावाची एन्जीओ सुरु केली. तेथील स्थानिक महिलांचे ग्रुपस करून त्यांना तिथे असणार्‍या सीबक थॉर्न ह्या फळांच्या लागवडीचे ट्रेनिंग दिले. त्यावर प्रक्रिया करायला शिकवले. ही झाडॆ मातीला धरून ठेवतात त्यामुळे धूप रोखली जाते, शिवाय नायट्रोजन ही धरून ठेवत असल्याने जमिनीचा पोत सुधारतो. त्यामुळे ह्या फळांवर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे तिथल्या बायकांना चांगला रोजगार मिळू लागला. त्याचबरोबर तिने स्थानिक तरूणांना पर्यटकांना ट्रेक किंवा जीप सफारीसाठी नेणे, कॅम्प लावणे, गरज पडल्यास प्रथमोपचार करणे ही कामे ही करायला शिकवले. कारण हळूहळू तिथे पर्यटन वाढू लागले. ते इको-फ्रेंडली करण्याकडॆ तिच्या इकोस्पियर संस्थेचा भर आहे. आता दरवर्षी पर्यटनातून 35 ते 40 लाखाचे उत्पन्न मिळते.आणि त्यातून नफा ही मिळतो. इकोस्पियर संस्थेने शेजारच्य़ा ‘लाहुल’ व्हॅलीमध्ये ही विकास कामे सुरु केली आहेत. पर्वतावर तयार होणार्‍या कचर्‍याच्या समस्येवरही तिला काहीतरी करायचे आहे. तिची संस्था लोकांना मुद्दाम तिथले लोक किती अवघड परिस्थितीत रहातात हे दाखवते. अतिशय थंडीत तिथे तापमान मायनस 35 पर्यंत खाली गेल्यावर हॅंडपंपने पाणी काढणे सुध्दा किती कठीण होते हे सांगितले जाते. तेव्हा आपल्यासारख्य़ा पर्यटकांना काय काय करता येईल याबद्दल ती जागरूकता निर्माण करते. मूळात हे पुस्तक 2012 साली लिहिलेले आहे. त्यामुळे आता ह्या वेगवेगळ्या प्रकारचे काम करणार्‍या संस्थेचे काम या दहा वर्षात खूपच वाढले असेल यात काही शंका नाही. दीनबंधू साहू हे मरिन बायोलॉजिस्ट आहेत पण ते प्रयोगशाळेतून बाहेर पडून समाजासाठी काम करतात. ‘प्रोजेक्ट चिलका’ ह्या त्यांच्या संस्थेमार्फत ओरिसातील लोकांना समुद्राची शेती करायला शिकवतात. ओरिसा मधील पुरी येथे जन्म झालेल्या दीनबंधूनी अतिशय हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतल्यानंतर दिल्लीत एमएसीला ॲडमिशन घेतली. परंतु योगायोगाने १९८७ मध्ये अंटार्क्टिक वर जाण्याची संधी मिळाली. नंतर पीएचडी पूर्ण केल्यानंतर अनेक देशांमध्ये नोकरी निमित्ताने फिरले. पण तरीही शेवटी दिल्ली युनिव्हर्सिटी मध्ये प्रोफेसर म्हणून काम सुरू केले. त्यांना समुद्री वनस्पती बद्दल विशेष आस्था होती; पण त्या बद्दल आपल्या देशात फारशी जागरूकता नव्हती. ही लागवड पर्यावरण पूरक असते शिवाय त्यातून स्थानिक लोकांना उत्पन्नाचे साधन मिळते. त्यासाठी डिएसटीने निधी मंजूर केला. मग त्यांनी चिल्का सरोवराची पहाणी केली, त्यामध्ये वाढू शकतील अशा चार जातींची निवड करून स्थानिक लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत माहिती दिली. प्रात्यक्षिके दाखवली, वर्कशॉप्स घेतली. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना रोजगार मिळू लागला. यातूनच पर्यावरण संरक्षण ही होऊ लागले. यातून त्यांना प्रत्यक्ष कांहीं आर्थिक फायदा होत नसला तरी ते म्हणतात, की आम्हाला दोघांना दिल्लीत चांगली नोकरी आहे. त्यामुळे पैसे कमावणे हा उद्देश नाही; पण अजून तीस वर्षांनंतर मला मी काही तरी काम केलेले दिसेल. असे जर काहीच तुम्हाला दिसणार नसेल तर जगायचे कशाला? भूषण पुनानी हे असेच अत्यंत बुध्दीमान विद्यार्थी. मेडीकलची ॲडमिशन हुकल्यामुळे डेअरी कोर्ससाठी ॲडमिशन घेतली. तिथे ही विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला. नंतर पीएचडी केले. ग्रामविकास शिकण्यासाठी आयआयएम मध्ये एमबीए केले. हे झाल्यावर 1979 मध्ये ब्लाईंड स्कूल मध्ये दोन वर्षांसाठी नोकरी सुरु केली ती सुधा ह्याच हेतूने की मॅनेजमेंट शिकताना जी थेअरी शिकलो ती विकासाच्या क्षेत्रात वापरता येईल का? हळूहळू त्यांना अनेक लोक मिळत गेले. सर्वांनी मिळून आज संस्था खूप मोठी केली आहे.त्यांनी काम सुरु केले तेव्हा फक्त एक कॅपस होता, आज गुजरात मध्ये आठ कॅपस आहेत. दहा लाख मूल्य असलेली संस्था आज दोन कोटी रुपयांची आहे. अपंग लोकांनी स्वावलंबी व्हावे ह्यासाठी संस्था काम करते. दृष्टीहीन मुली ब्यूटी पार्लरसारखे कोर्स चालवतात, फिजिओथेरपी शिकून सेंटर मध्ये काम करतात. विकास साधण्यासाठी योग्य व्यवस्थापनेची गरज असते हे त्यांनी दाखवून दिले आहे. हजारो लोकांच्या आयुष्यात नवा प्रकाश निर्माण करून त्यांना सामान्य आयुष्य जगण्याची संधी मिळवून दिली आहे. अशी ही एकापेक्षा एक वेगवेगळ्या प्रकारची माणसे. कोणत्या तरी ध्येयाने पछाडलेली . सामाजिक कार्य करत असतानाच त्या लोकांचे कल्याण कसे होईल असा विचार करणारी. लेखिकेने त्या सर्वांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या आहेत, त्यांचे काम प्रत्यक्ष पाहून जाणून घेतले आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित गोळा करून आपल्यासमोर मांडली आहे. त्यामुळेच त्या मनोगतात म्हणतात, ‘तुमचं आयुष्य कसे ही असले तरी इतरांसाठी एखादा क्षण द्या. इतरांना प्रेम, आनंद, चांगुलपण द्या. जितकं द्याल तितकं तुम्हाला परत मिळेल.’ हेच वाक्य मलाही अतिशय उर्जा देऊन गेले. माझ्याकडे जे आहे, जे मला देणे शक्य आहे ते निरपेक्षपणे ज्यांना गरज आहे त्याला देणे ह्या सारखा आनंद अजून काय असणार? ह्याच वाक्याने मी आपली ह्या आठवड्यात रजा घेते. उद्या पासून सुरु होणार्‍या नवीन सत्रासाठी सारिका ताईंना हार्दिक शुभेच्छा. ...Read more