* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: EKLAVYA
  • Availability : Available
  • ISBN : 9788177664195
  • Edition : 7
  • Publishing Year : AUGUST 1988
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 304
  • Language : MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
SHREE SAMARTHA RAMDAS ILLUSTRATES THE CHARACTERISTICS OF A GOOD STUDENT AS , `THE WEALTH OF A GOOD STUDENT LIES IN HIS DEVOTION TOWARDS HIS TEACHER, HIS DEVOTION MAKES HIM AS GOOD AS THE TEACHER AND ULTIMATELY GIVES HIM THAT ETERNAL PLACE`.EKLAVYA WAS THE FOREMOST OF ALL STUDENTS WHO LEARNT THROUGH HIS DEVOTION AND DEDICATION TOWARDS HIS TEACHER. HE WAS THE BEST OF ALL DISCIPLES. THIS BOOK NARRATES HIS STORY. IN TODAY`S LIFE, EVERY MOMENT SOME EKLAVYA TAKES BIRTH FROM THE DROPLET OF THE BLOOD SHED BY THAT ORIGINAL EKLAVYA, WHEN HE CUT HIS THUMB. THE REASON FOR THIS BIRTH VARIES FROM CASTE, RELIGION, PURIFICATION OF MIND AND BODY, TO VARIOUS OTHER REASONS. AT THE SAME TIME, WE COME ACROSS THE TEACHERS LIKE DRONACHARYA WHO HAVE GIVEN THEMSELVES AS SLAVES TO OVERCOME THEIR HUNGER. SINCE THE ANCIENT AGE OF MAHABHARATA, THE CONFLICT BETWEEN KNOWLEDGE AND INFORMATION WAS STARTED. THE KNOWLEDGE SEEKERS BECAME SELF-CENTRED, EGOIST, SLAVES AND STARTED THINKING ONLY ABOUT THEIR NEEDS AND NECESSITIES. THE MAIN REASON FOR THE DISGRACE OF HUMANS WAS THUS THE KNOWLEDGE WHICH TAUGHT TO BE SELFISH, PARTIAL AND WHICH WAS DEVOID OF ANY HIGH MORALES. THE ORIGIN OF THIS STORY IS THE DISGRACE OF HUMANISM, EVERYONE SHOULD READ IT AT LEAST ONCE.
श्री दासबोध ह्या लोकोत्तर ग्रंथात सच्छिष्याची लक्षणं विस्तारानं विशद करताना श्रीसमर्थ रामदास म्हणतात : ऐसे सच्छिष्याचें वैभव । सद्गुरुवचनीं दृढभाव । तेणें गुणें देवराव । स्वयेंचि होती ।।४९।। (दशक पाचवा, समास तिसरा) ...असं सच्छिष्याचं वैभव असतं. सद्गुरुवचनावर त्याचा दृढविश्वास असल्यामुळंच तो स्वत: सद्गुरुस्वरूप होतो, देवांचाही देव होतो... आत्मकर्तृत्वाच्या बळावर सद्गुरुस्वरूप प्राप्त करून घेतलेला पहिला सर्वोत्तम शिष्य एकलव्य. त्याची ही चरितकहाणी. आद्य एकलव्याच्या कापल्या अंगठ्यातून गळणा-या रक्ताच्या कणाकणांतून कधी जात, कधी धर्म, कुठं रक्तशुद्धी, कुठं वर्ण अशा कोणत्या ना कोणत्या कारणानं रोज नवनवे एकलव्य जन्माला येत आहेत; आणि आयुष्यातील छोट्या-मोठ्या संघर्षाला भिणारे, पोटासाठी लाचार झालेले द्रोणाचार्यही पावलोपावली भेटत आहेत. महाभारत-काळापासूनच ज्ञान आणि पोटभरू विद्या यांची गल्लत सुरू झाली. ज्ञानोपासक आत्मकेंद्रित, अहंमन्य, लाचार व पोटार्थी बनले. त्यामुळं ज्ञान व समाजाची नैतिक घसरगुंडी झाली. स्वार्थप्रेरक, पक्षपाती आणि उच्च जीवननिष्ठा न देणारं ज्ञान हेच व्यक्तीच्या आणि समष्टीच्या -हासाचं व अपकर्षाचं मुख्य कारण होत गेलं. या चरितकहाणीचा मूलस्त्रोतच हा आहे. प्रत्येक ज्ञानपिपासूनं वाचायला हवीच, अशी ही कथावस्तू आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #EKLAVYA #EKLAVYA #एकलव्य #BIOGRAPHY #MARATHI #SHARADDALVI #शरददळवी "
Customer Reviews
  • Rating StarRajesh Rankhamb

    महाभारतावरील बरीच पुस्तकं वाचून झाल्यानंतर हे जीवन-गीतामृत हातात पडलं आणि अक्षरशः हे अमृत रसपान एका रात्रीत संपवून टाकलं. आद्य एकलव्याच्या कापल्या अंगठ्यातून गळणा-या रक्ताच्या कणाकणांतून कधी जात, कधी धर्म, कुठं रक्तशुद्धी, कुठं वर्ण अशा कोणत्य ना कोणत्या कारणानं रोज नवनवे एकलव्य जन्माला येत आहेत; आणि आयुष्यातील छोट्या-मोठ्या संघर्षाला भिणारे, पोटासाठी लाचार झालेले द्रोणाचार्यही पावलोपावली भेटत आहेत. महाभारत-काळापासूनच ज्ञान आणि पोटभरू विद्या यांची गल्लत सुरू झाली. ज्ञानोपासक आत्मकेंद्रित, अहंमन्य, लाचार व पोटार्थी बनले. त्यामुळं ज्ञान व समाजाची नैतिक घसरगुंडी झाली. स्वार्थप्रेरक, पक्षपाती आणि उच्च जीवननिष्ठा न देणारं ज्ञान हेच व्यक्तीच्या आणि समष्टीच्या -हासाचं व अपकर्षाचं मुख्य कारण होत गेलं. या चरितकहाणीचा मूलस्त्रोतच हा आहे. प्रत्येक ज्ञानपिपासूनं वाचायला हवीच, अशी ही कथावस्तू आहे. ...Read more

  • Rating StarSantosh Rangapure

    महाभारता वरची बरीच पुस्तके वाचली आहेत परंतु एकलव्याची बाजू संपूर्ण पणे वाचावे असे बरयाच दिवसांपासुन डोक्यात होते आणि शरद दळवी लिखित `एकलव्य` पुस्तक सापडले आणि पुस्तकाने अक्षरशः झपाटून सोडले. एका शिष्याची गुरूप्रती अगाध, अगम्य श्रद्धा आणि तेही गुरू अनयाय करतोय हे माहीत असून देखील हे सर्व अक्षरशः थक्क करणारे आहे. एकलव्याने गुरुदक्षिणा म्हणून अंगठा दिला इथपर्यंत आपणा सर्वांनाच माहीत आहे परंतु अंगठा नसून देखील एकलव्य अर्जुन आणि कर्ण यांच्यापेक्षा उत्कृष्ट धनुर्धर होता युद्धात त्याने अर्जुनाला सळो की पळो करून सोडले हे वाचणे खूपच उत्कंठावर्धक आहे शिवाय एकलव्य निषादांचा राजा होता आणि आपले राज्य त्याने खूपच संतुलित पद्धतीने चालवून एक आदर्श निर्माण केला होता. अनेक माहित नसलेल्या गोष्टींचा उलगडा केल्याबद्दल लेखकाचे मनःपूर्वक आभार... मित्रांनो नक्कीच वाचा हे पुस्तक महाभारता मधील एक वेगळाच पैलू अनुभवायला मिळेल. ...Read more

  • Rating Starविलास निकम.

    एकलव्य वर आधारित मराठीतील एकमेव उत्कृष्ट पुस्तक..सर्वांनी वाचावे असे...

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RUCHIRA BHAG -1
RUCHIRA BHAG -1 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव_वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more