* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: LEADING LADIES
  • Availability : Available
  • Translators : SUMITA BORSE
  • ISBN : 9788184985382
  • Edition : 2
  • Publishing Year : FEBRUARY 2014
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 276
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
LEADING LADIES IS AN INSPIRATIONAL BOOK THAT FOLLOWS THE JOURNEYS OF SOME OF INDIA’S MOST-ADMIRED WOMEN ACHIEVERS WHO HAVE MADE A DIFFERENCE TO SOCIETY WITH THEIR STELLAR WORK AND OTHER PURSUITS THAT TOUCH OUR LIVES, IN MORE WAYS THAN ONE. THIS VOLUME BRINGS ALIVE THEIR UNIQUE STORIES WITH PERSONAL ANECDOTES THAT WILL SERVE AS A BEACON FOR MANY OF US. WHILE A LOT HAS BEEN WRITTEN ABOUT HOW THESE WOMEN HAVE ACHIEVED SUCCESS, THE BOOK AIMS TO HIGHLIGHT THE GUIDING PRINCIPLES OF THEIR LIVES, THE PERSONAL AND PROFESSIONAL BELIEFS THAT DRIVE THEM, THE LIFE AND MANAGEMENT PRACTICES THAT HAVE ALWAYS STOOD THEM IN GOOD STEAD, AND THE NONNEGOTIAB1ES THAT HAVE GUIDED THEM ON THEIR PATH TO SUCCESS. WHAT MAKES THE WOMAN PROFESSIONAL/ ENTREPRENEUR/ACHIEVER/LEADER TICK? WHAT IS IT THAT DRIVES THEM? WHAT ARE THE RULES BY WHICH THEY PLAY THE GAME? IS THERE A LEVEL PLAYING FIELD FOR WOMEN? DO WOMEN NEED A LEVEL PLAYING FIELD? IS THERE SOMETHING MALES CAN LEARN FROM THEIR FEMALE COLLEAGUES? ARE WOMEN LEADERS ALSO FROM VENUS ALONG WITH THE REST OF THEIR CLAN OR DO THEY BELONG TO MARS TOO? THESE INFLUENCERS ARE WELL-EQUIPPED TO PROVIDE THE RIGHT INSIGHTS. THE AUTHOR BORROWS FROM HER JOURNALISTIC EXPERIENCE TO ELICIT A FRESH VIEW FROM SOME OF INDIA`S BRIGHTEST MINDS; TRENDSETTERS WHO HAVE NOT JUST CARVED A NAME FOR THEMSELVES IN THEIR CHOSEN PATH, BUT HAVE BECOME THE TORCH BEARERS FOR COUNTLESS OTHERS IN URBAN AND RURAL INDIA WHO WANT TO FOLLOW THEIR DREAMS, REACH THEIR GOALS, AND GIVE BACK TO SOCIETY. THE LIST OF WOMEN INCLUDED ARE AMRITA PATEL, ANU AGA, KALPANA MORPARIA, KIRAN MAZUMDAR-SHAW, LILA POONAWALLA, MALLIKA SARABHAI, MALLIKA SRINIVASAN, MEHER PUDUMJEE, NAINA LAL KIDWAI, PRIYA PAUL, PT USHA, SHAHEEN MISTRI, SHIKHA SHARMA, SHUBHA MUDGAL, VINITA BALI
आता ती केवळ... राबणारी बिनचेह-याची बाई राहिलेली नाहीतर ती स्वत:चे हक्क असलेली स्वतंत्र नागरिक आहे. केवळ घरकाम, मोलमजुरीच नव्हेतर उद्योगसमूहाची अध्यक्षा... बँकेची व्यवस्थापिका... प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्ती... ते उत्कृष्ट कलाकार अशा विविध कार्यक्षेत्रांत तिने आपल्या कर्तृत्वाचा ‘कॅन्व्हॉस’ चितारला आहे. अनु आगा... लीला पूनावाला... मेहेर पद्मजी... किरण मुझुमदार-शॉ... यांच्यासारख्या प्रथितयश उद्योजिका! शुभा मुद्गल, मल्लिका साराभाई यांच्यासारख्या कलाकार! शिखा शर्मा... नैना गिडवाई... प्रिया पॉल... यांच्यासारख्या यशस्वीता आणि सुवर्णकन्या पीटी उषा... यांच्या यशोगाथांचा हा आलेख!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLIN EMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #BIOGRAPHY #सुधा मेनन #SUDHA MENON #SUMITA BORSE #आघाडीचे महिला नेतृत्व #LEADING LADIES #AAGHADICHE MAHILA NETRUTVA
Customer Reviews
  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    आघाडीचे महिला नेतृत्व भारतातील प्रेरणादायी महिला... आज प्रत्येक स्तरावर महिला आघाडीचे नेतृत्व करत आहेत. राजकारण, समाजकारण, शिक्षण, सेवाक्षेत्रे सर्वच क्षेत्रात महिलांनी आपली योग्यता किंबहुना श्रेष्ठता सिद्ध केली आहे. त्यांच्या आयुष्यातील शाश्वत बाब ्हणजे परिवर्तन होय. मुलगी म्हणून नको असलेल्या घरात मोठी होते. नवऱ्याच्या घरी जाणे व तेथील परिस्थितीशी जुळवून घेणे. संपूर्णत: अनोळखी व्यक्तीसोबत नवे आयुष्य सुरू करणे, या सर्व अवस्थामधून जाताना नातेसंबंध जोपासणे, त्याचे संवर्धन करणे ही अवघड जबाबदारी ती सहज पार पाडते. या पुस्तकाच्या मूळ लेखिका सुधा मेनन आहेत आणि मराठी अनुवाद सुमिता बोरसे यांनी केला आहे. भारतातील कर्तृत्ववान महिलांच्या जीवनालेख, त्यांची प्रेरणा, त्यांचे योगदान या पुस्तकामध्ये मांडले आहे. सहकार क्षेत्रात ग्रामीण महिलासाठी काम करणाऱ्या अम्रिता पटेल मानवाधिकार क्षेत्रात काम करणाऱ्या अनु भागा, व्यवस्थापन क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या कल्पना मोरपारिया, सुवर्णकन्या पी.टी. उषा या आणि इतर पंधरा कर्तृत्ववान महिलांचे कार्य या पुस्तकातून मांडले आहे. महिलांसाठी महत्त्वाचे म्हणजे आयुष्य प्रामाणिकपणे, प्रेमाने, सन्मानाने आणि निष्ठेने जगणे होय. समाजातील सर्वच घटकांनी हे पुस्तक वाचून त्यातून योग्य ते बोध घेण्याची गरज आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

राधेय.... लेखक रणजित देसाई... मित्र कसा असावा...कर्णासारखा दातृत्व कसं असावं...कर्णासारखं असा हा कर्ण... त्याला अंगराज म्हणावं, दान देणारा दाता म्हणावं, राधेय म्हणावं कि कौतेय... काहीही म्हणा पण कर्णासारखा दाता कर्णानंतर कधी झाला नाही आणि कधी होणरही नाही... रणजित देसाई लिखीत कर्णचरीत्र राधेय आज हातावेगळं झालं ते अश्रुभरल्या नयनांनी...ज्याचा अंत करायला स्वतः देवाधिदेव कृष्णाला अर्जुनाचं सारथ्य करावं लागलं यातच अंगराज कर्णांचं विरत्व अधोरेखीत होत आहे. जन्मापासुन ज्याला केवळ सुतपुत्र म्हणुन वागणुक मिळाली असा तो कर्ण स्वतःच्या बळावर इतका महान लढवय्या बनला. पुस्तकाच्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की राधेय मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो, कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत, तर त्यात हा कर्ण दिसेल. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून एक अनोखी ऊंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. राधेय या कादंबरीत रणजित देसाईंच्या शब्दांनी कर्णाची अनेक रुपे अनुभवता आली. त्यामध्ये राधाई आणि वृषाली सोबतचा कर्ण, दुर्यौधनासोबतचा कर्ण, कृष्णासोबतचा कर्ण, रणांगणावरचा कर्ण आणि नदीकाठी पाठमोरा ऊभा राहत दान करत असलेला कर्ण अशा अनेक रुपांनी प्रत्येकवेळी वेगळा भासला. वृषसेन आणि चक्रधराच्या मृत्युने हळवा झालेला कर्णही वाचकाच्या डोळ्यातही पाणी आणवतो... समोर मृत्यु दिसत असताना सुध्दा केवळ दिलेल्या वचनामुळे हातातील धनुष्याचा त्याग करुन शस्त्रहिन हेणारा कर्ण रणजित देसाईंच्या शब्दांमुळे आजन्म लक्षात राहील. कर्णासारखं होणं कुणालाही कदापि शक्य नाही पण त्यातला एखादा जरी चांगला गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने नक्कीच केला पाहीजे... प्रत्येकाच्या संग्रही असावं आणि एकदा तरी वाचावं असं पुस्तक रणजित देसाई लिखीत...राधेय... © विश्वजित शिंत्रे. ...Read more

BAJIND
BAJIND by PAHILWAN GANESH MANUGADE Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

काही पुस्तकं अशी असतात कि कितीही वेळा वाचली तरीही त्या पुस्तकाचा कंटाळा येत नाही. पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं आणि त्याची पारायणं होतचं राहतात. असचं एक पुस्तक म्हणजे *पै.गणेश मानुगडे* लिखीत *बाजिंद.* *बाजिंद* हे एक असं रसायन आहे जे प्रत्ेकाला अक्षरशः वेड लावतं. साधारण चार पाच वर्षांपुर्वी पहील्यांदा वाचलं होतं, त्यानंतर बर्‍याचवेळा आणि आज पुन्हा एकदा. त्याबद्दलची एक सुंदर आठवण म्हणजे माझ्या बहिणीच्या गरोदरपणाच्या दिवसात ग्रहण लागलं होतं आणि त्या ग्रहणकाळात तिला मी *बाजिंद* वाचुन दाखवलं होतं, असं हे पुस्तक. कुस्ती, प्रेमकथा, हेरगिरी, गुढ रहस्यमय बाजिंदचं जंगल, पशु-पक्षी व हिंस्र जनावरांची भाषा, बहीर्जी नाईक आणि अवघ्या हिंदुस्थानाचे आणि मराठी मनाचे आराध्यदैवत *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज* असा या पुस्तकाचा प्रवास. शेवटाला अंगावर काटा आला कि समजावं आपण या पुस्तकाच्या प्रेमात पडलोय. रायगडच्या डोंगरदरीत वसलेल्या धनगरवाडीचा सखाराम धनगर आणि त्याच्यासोबत मल्हारी, सर्जा आणि नारायण निघालेत छत्रपती शिवरायांना भेटायला. कारण टकमक टोकावरुन ज्या गद्दारांचा कडेलोट व्हायचा ती प्रेतं येऊन पडायची ती थेट धनगरवाडीच्या आसपासच्या जंगलात आणि त्यामुळे आसपासच्या परीसरात जंगली जनावरांचा सुळसुळाट खुप वाढला होता. त्यांची मेजवानी व्हायची पण जर कधी कडेलोट नसायचा तेव्हा ती हिंस्त्र जनावरं आसपासच्या लोकवस्तीत शिरायची. हिच कैफियत मांडायला सखाराम धनगर आणि इतर मंडळी रायगडी निघतात. त्यानंतरचा त्यांचा प्रवास आणि कथा वाचकाला इतकी गुरफटवुन टाकते कि शेवटच्या पानावरची शेवटची ओळ कधी वाचुन संपते, कळतही नाही. त्यांची स्वराज्यहेर खंडोजीची भेट मग सावित्री, वस्तादकाका, वाचतानाही भितीदायक दिसणारं जंगल, कधीही न पाहीलेलं महादेवाचं मंदीर, खंडोजीचा असणारा ट्विस्ट आणि मग बहिर्जी नाईक आणि मग थेट रायगड आणि महाराज, सगळं प्रत्यक्षात आपल्यासमोर घडतयं कि असा भास निर्माण करणारं असं हे पुस्तक. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी कथा, एकदा वाचली कि पुन्हा एकदा वाचण्याचा मोह आवरता येत नाही अशी कथा, ज्यामध्ये असं बरचं काही जे वाचल्याशिवाय कळणार नाही. अजुन एक असं कि सातासमुद्रापार जगातील अव्वल गणली जाणारी इस्त्राईलची गुप्तहेर संघटना मोसाद यांच्या अभ्यासक्रमात बहिर्जी नाईक आणि आपलं हेरखातं शिकवलं जातं अशी अभिमान वाटणारी घटना आपल्या राज्यात घडलीय त्याचीच हि गोष्ट...बाजिंद... ...इकडे खंडोजीने सावित्रीला उचलुन जंगलातुन बरेच बाहेर आणले होते. पुढे डोंगराची कडेतुट होती आणि हजारो हात खोल फेसाळणार्‍या नदीचे विशाल पात्र...खंडोजीने एकदा मागे पाहीले आणि ताडले कि शिर्क्यांची फौज पाठलाग करत आहे...त्याने कशाचाही विचार न करता सावित्रीसह स्वतःला त्या कडेतुट वरुन त्या विशाल नदीच्या पात्रात झोकुन दिले...आणि... त्यासाठी वाचा *पै.गणेश मानुगडे* लिखीत...*बाजिंद..!!!* © विश्वजीत श्रीपती शिंत्रे. मु.पो.इंचनाळ, ता.गडहिंग्लज,जि.कोल्हापुर ०९९२२३१३९१९ ...Read more