* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788184989489
  • Edition : 1
  • Publishing Year : JANUARY 2016
  • Weight : 260.00 gms
  • Pages : 176
  • Language : MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
AFTER A BATTLE OF 1962 MASVI MADE A LOADER FOR ARMY TO LOAD OR RELOAD THE LUGGAGE . ON THAT DAY SUBBU HUG ME AND CRIED .IT WAS A TEARS OF HAPPINESS. I ASKED HIM TO WHAT HAPPENED .HE SAID.” I SAW MANY SOLDIERS DIED IN BATTLE JUST BECAUSE LACK OF MATERIAL AND FOOD. NOW IT WILL NEVER HAPPEN AGAIN.’’
१९६२च्या युद्धानंतर मॅस्वीने सेनादलांसाठी सामानसामुग्री उतरवण्या-चढवण्यासाठी मुद्दाम लोडर बनवला त्याप्रसंगी तेव्हा सुब्बुने मला मिठी मारली व रडू लागला. ते आनंदाश्रू होते. मी त्याला इतके काय झाले म्हणून विचारल्यावर तो म्हणाला ‘बॉर्डरवर सामान नाही, दारूगोळा नाही; रसद नाही म्हणून मृत्युमुखी पडलेले अनेक शहीद जवान पाहिलेत. आता तसे होणार नाही.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #MASVIKANHERE #MASVIKANHERE #मॅस्वीकान्हेरे #BIOGRAPHY #MARATHI #ANANDKANHERE "
Customer Reviews
  • Rating StarSAHITYA SUCHI, APRIL 2016

    एका कल्पक उद्योजकाच्या जिद्दी वाटचालीची कहाणी… ‘मॅस्वी आणि कंपनी प्रा. लि.’ या १९४३ साली स्थापन झालेल्या कंपनीचे मालक शारंगधर पुरुषोत्तम कान्हेरे यांचे हे छोटेखानी चरित्र.हे चरित्र आनंद कान्हेरे या त्यांच्या मुलानेच लिहिलं आहे. उत्तम आर्थिक परिस्थित असल्याने शारंगधर कान्हेरे यांनी त्या काळात परदेशात, मँचेस्टरला इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये बी.एस्सी. टेक केलं आणि त्यानंतर बर्मिंगहॅम इथल्या ऑटोमॅटिक इलेक्ट्रिक कंपनीत रिसर्च आणि डेव्हलपमेंट विभागात नोकरी केली. या काळात युरोपातही दुसऱ्या महायुद्धाचे वारे वाहत होते. कंपनीतलं उत्कृष्ट काम करून कान्हेरे राष्ट्रभक्ती आणि घरातील जबाबदारीची जाण ठेवत भारतात परतले आणि व्यवसाय सुरू केला. या व्यवसायाची सुरुवात पाच जणांनी केली आणि त्यांच्याच नावाच्या आद्याक्षरांनी मॅस्वी हे नाव दिले. सुरुवातीच्या काळात मॅस्वीने मुख्यत्वे पंपसेट, मोठ्या इलेक्ट्रिकल मोटारी व स्वीचगिअरची विक्री केली. हा व्यवसाय मुख्यत्वे एजन्सीजच होता. त्याची वाढ होत असली तरी कान्हेरेंच्या शिक्षणाचा, अनुभवाचा कस लावणारा नव्हता. त्यामुळे कान्हेरेंनी ‘भारत मॅन्युफॅक्चरिंग’ नावाने स्वतंत्र व्यवसायही सुरू केला. या उद्योगाने सुरुवातीला शेगड्या, इस्त्री अशा विद्युत्चलित गोष्टी बनवायला सुरुवात केली. आईसफ्रूट बनवणे, प्लेटिंग करणे अशी कामे सुरू केली. मात्र दोन्ही कामांचा ताण आल्याने त्यांनी ‘भारत इलेक्ट्रिकल’ची जबाबदारी दुसरीकडे सोपवली. पुढे मॅस्वीचा विस्तार करत त्यांनी त्याची शाखा कोल्हापूरलाही सुरू केली. कंपनीकडे पुढे एअर इंडियाने काही वस्तू बनवण्यासाठी विचारणा केली आणि १९५३ मध्ये मॅस्वीत वस्तुंचीही निर्मिती सुरू झाली. सुरुवातीला सामान ठेवण्यासाठी रॅक्स आणि लोखंडी स्कॅफोल्डिंग बनवले आणि पुढे विमानाच्या दाराशी जाईल अशी शिडी बनवण्यात येऊ लागली. असंख्य कसोट्यांना पार करत ही शिडी एअर इंडियाला योग्य वाटली आणि हीच या कंपनीसाठी यशाची शिडी ठरली. पुस्तकाचे चरित्र लेखकही अभियंते असल्याने या शिडीचे तांत्रिक बारकावेही तयांनी कुशलतेने लिहिले आहेत. मॅस्वी उद्योगाने यानंतर पुण्यात स्वतंत्र कारखाना उभा केला. या कारखान्यात केवळ विमानांसाठी शिड्याच नव्हे तर अनेक उत्पादने घेतली जाऊ लागली. जुन्या उत्पादनातही त्यांनी कल्पक सुधारणा केल्या. लेखकांनी हा भाग तांत्रिक तपशील अन् आकृत्या देत अतिशय स्पष्ट लिहिला आहे. पुढे एअर इंडियासाठी टायर ट्रान्सपोर्ट डॉली, पॅरॅफिन एअरक्लिनिंग इक्विपमेंट बॅगेज ट्रॉली अशी अनेक उत्पादनं बनवली आणि विमानतळावर लागणाऱ्या वस्तुंचे कान्हेरे प्रमुख उत्पादक बनले, एवढेच नव्हे तर देशात आयात होणाऱ्या या वस्तूंचे उत्पादन भारतातच झाल्याने देशाचे लक्षावधी डॉलरचे परकीय चलन वाचवले. एअर इंडियाच्या ‘इंजिन इन्स्ट्रॉलेशन अ‍ॅन्ड रिमूव्हल स्टॅन्ड’ या उत्पादनासाठी कान्हेरेंना १९७३ साली राष्ट्रपती पदकही मिळाले. पुढे १९७१ नंतरच्या आर्थिक मंदीच्या काळात मात्र मॅस्वीला अनेक संकटांना सामोरे जावे लागले. अगदी दिवाळखोरीलाही सामोरे जावे लागले. या सगळ्या काळात वृद्धत्वाकडे झुकलेल्या कान्हेरेंनी अतिशय ठामपणे निश्चयाने आपला लढा सुरू ठेवला आणि देणेकऱ्यांचे पैसे देण्यात यशही मिळवलं. मॅस्वीची ही वाटचाल लेखकाने अतिशय बारकाईने लिहिली आहे. विशेषत: त्यातला तांत्रिक भाग सखोलतेनं लिहिला आहे. अतिशय सुसंस्कृत प्रयोगशील माणसानं कष्टानं उभा केलेला हा उद्योग यशाची उंचीही गाठतो आणि अपयशाने पूर्णत: खचतो. त्यामुळे ही कहाणी वाचकाला अंतर्मुख करते, अनुभवाचे धडेही देते. लेखकाने आपल्या पित्याचे कष्ट, त्यांची जिद्द, त्यांची प्रयोगशील वृत्ती अन् हुशारी अत्यंत जवळून अनुभवली असल्याने आशयाची अस्सलता लेखनात उतरली आहेच. व्यवसायाबद्दल, वडिलांबद्दल तटस्थतेने लिहिण्याचा प्रयत्न केला असला, तरी आपल्या माणसांविषयी आस्था, आदर अन् त्यांच्या यशापशातलं गुंतणंही पुस्तकात वाचायला मिळतं. एकूणच एका कर्तबगार, संवेदनशील वत्सल माणसानं आपला व्यवसाय, कुटुंबाचा मांडलेला हा लेखाजोखा वाचकांनाही आपलंसं करून घेतो. व्यवसायाचं चरित्र लिहित असताना उत्पादनातल्या तांत्रिक गोष्टी अन् त्यामागचे विचार, अनुभव, उत्पादन अधिकाधिक उत्कृष्ट. बनवण्यासाठी घेतलेला ध्यास परिपूर्णतेनं आला आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
डॉ. जयंत वडतकर.अमरावती

मेळघाटचा एन्सायक्लोपिडीया असलेले निवृत्त वनाधिकारी श्री. रविंद्र वानखडे यांच्या अनुभवांवर आधारित कुलामामाच्या देशात हे पुस्तक वाचले तेव्हापासून या पुस्तकाचे लेखक श्री. जी. बी. देशमुख यांना भेटण्याची इच्छा होती. इच्छाशक्ती असली की योग जुळून येतो असं महणतात. रविंद्र वानखडे सरांच्या माध्यमातूनच तो योग जुळून आला. माझ्या एक पुस्तकाचे प्रकाशन बाबत वानखडे सरांशी चर्चा करीत असताना त्यांनी लेखकाचा संदर्भ दिला व जी.बी. ना भेटून घ्या असे सांगितले. भेट घडून आली. अगदी सहज, घरगुती भेट झाली, गप्पा रंगल्या. यावेळी जी. बी. देशमुख यांनी त्यांचे पहिले पुस्तक महारुद्र मला भेट दिले. आमच्या चर्चेतून आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉल मथला मराठमोळा झंझावात महारुद्र, हे या पुस्तकाचे शीर्षक वाचून पुस्तकाचा विषय थोडक्यात समजला. लेखकाचे वडील भीमराव देशमुख यांनी फुटबॉलपटू म्हणून गाजविलेल्या कारकीदींचा आढावा या पुस्तकात होता. एका मुलाने आपल्या वडिलांवर लिहिलेले पुस्तक कसे असेल? असा प्रश्न अन पुस्तक, दोन्ही घेऊन घरी आलो. भेट मिळालेले पुस्तक वेळ मिळाला तसे एका बैठकीत वाचून काढले. आता गल्ली गल्लीत जसं क्रिकेट खेळल्या व बघितले जाते तसं स्वातंत्र्य पुर्व काळात वऱ्हाडात फुटबॉल खेळला जात असे. गावागावांत टीम असायच्या, सामने अर्थात स्पर्धा भरवल्या जात असत. स्वातंत्र्यपूर्व काळात अशाच रुपयांमधून चमकत, वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील एका खेळाडूने थेट मुंबईतील फुटबॉल क्लब व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मुसंडी मारत आपल्या खेळाचा व व्यक्तीमत्त्वाचा ठसा उमटविला होता. तो काळ होता १९३० ते १९५० चा. त्या वल्लीचे नाव होतं भिमराव देशमुख. जी. बी. देशमुख यांनी त्यांच्या वडिलांवर लिहिलेले महारुद्र पुस्तक काही फक्त भिमराव देशमुख यांची जीवन चरित्र नाही. स्वातंत्र्य मिळण्याच्या साधारण वीस वर्षा पुर्वी ३० ते ५० च्या दशकात आपल्या देशातील खेळाची स्थिती कशी होती. विशेषतः वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील स्थिती कशी होती. कुठले खेळ खेळले जात असत. स्पर्धा कशा भरवल्या जात असत. शाळा आणि शिक्षण कसं होतं. आर्थिक स्थिती कशी होती. अमरावती जिल्ह्यातील कोणत्या गावात फुटबॉलच्या नावाजलेल्या टीम होत्या. अमरावती कशी होती याची माहिती सुद्धा या पुस्तकातून वाचायला मिळते. पुस्तकाच्या पहिल्याच प्रकरणात भीमराव यांचे व्यक्तिमत्व कसं होतं हे सांगण्यासाठी लेखकाने बाबा म्हणून जरी त्यांची ओळख करून दिली असली तरी पुढील सर्व प्रकरणातून त्यांनी भीमराव अशा एकेरी उल्लेखातून हे व्यक्तिमत्व साकारले आहे. वऱ्हाडातल्या आपल्या सवयीनुसार प्रसिद्धी पासून दूर राहिलेल्या एका नामवंत फुटबॉलपटूची कारकीर्द व फुटबॉल पश्चात कौटुंबिक कारकीर्द तटस्तपणे मांडण्यात लेखक यशस्वी झाले आहेत हे आधीच सांगून टाकतो. अमरावती जिल्ह्यातील खारतळेगाव येथील फुटबॉलच्या टीम मध्ये भीमराव देशमुख यांची कारकीर्द सुरु झाली. ती १९३० सालापासून त्यावेळी ते जेमतेम विशीत होते. प्रथम शालेय स्पर्धापासून पुढे क्लब स्पर्धा पासून भीमरावने आपल्या खेळाचा ठसा उमटविला हळूहळू ख्याती विदर्भांत पोहोचली, भीमराव यांचा खेळ बघण्यासाठी लोक खास वेळ काढून येऊ लागेल, १९३८-३९ मध्ये विदर्भात झालेल्या काही स्पर्धात मुबंईच्या काही टीम सहभागी झाल्या होत्या, त्यामुळे नावाजलेल्या ब्रिटीश खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळाली. मुंबईच्या इंग्रजांच्या टीमला वऱ्हाडातील भीमराव यांच्या टीमने हरविले. वायएमसिए, मुंबईच्या अलेक्झांडर नावाच्या कप्तानाने भीमरावच्या खेळाने प्रभावित होऊन खारतळेगावच्या चार खेळाडूंना मुंबईच्या टीम कडून खेळण्याचे निमंत्रण दिले. १९४० ला भीमराव सह चार खेळाडू मुंबईत पोहोचले. अलेक्झांडरने त्यांना सराव शिबिरीत घातले. पुढील वर्षात भीमराव वायएमसिए टीम कडून खेळण्यासाठी करारबद्ध झाले. जशा आयपीएल मध्ये आज वेगवेगळ्या टीम खेळतात तसे त्यावेळी मुंबईत फुटबॉलचे क्लब होते. पुढील १० वर्षे अनेक टीम कडून खेळत अनेक स्पर्धा गाजविल्या. भीमराव यांचेवर तेव्हाच्या इंग्रजी वृत्तपत्रांतून रकाने छापले जाऊ लागले. मुंबईतील आपल्या १२ वर्षाच्या कार्यकाळात क्लब स्पर्धामधून त्यांनी ४०० सामने खेळले, तब्बल २५० गोल मारलेत. भीमराव वेगवेगळ्या स्पर्धामधून खेळत मैदान गाजवत होते. त्यातूनच १९४८ च्या ऑलम्पिक स्पर्धेच्या टीम मध्ये निवड झाली मात्र एका सराव सामन्यात पाय फॅक्चर झाल्याने देशाकडून खेळण्याची संधी हुकली. पुढील वर्षात भीमराव हे भारतीय टीम सोबत मलेशिया, कंबोडिया, इंडोनेशिया, म्यानमार, फिलिपिन्स, हाँगकाँग, थायलंड अशा देशात खेळले, या दौऱ्यातील २० पैकी १९ सामने जिंकले. भीमराव आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू झाले होते. इतके खेळून भीमराव यांचेकडे आर्थिक नियोजन नसल्याने परिस्थिती जेमतेमच होती. अशातच १९५१ साली त्यांनी निवृत्ती घेतली. अमरावती मध्ये परत आल्यावर त्यांनी आपला संसार थाटला, आर्थिक पाठबळ नसल्याने फुटकळ व्यवसाय केले. मात्र मी कधीकाळी आंतरराष्ट्रीय खेळाडू होते याचा कधी उल्लेख सुद्धा केला नाही, प्रसिद्धी पासून ते कायमच दूर राहिले. या काळात भीमराव यांच्या पत्नी अंजीरा यांनी जबाबदारीनं संसार सांभाळला. मुलांना मोठे केले. भीमराव शेवटपर्यंत मेहनत करीत राहिले. समाजात चांगले स्थान निर्माण केले. मात्र ते इतके मोठे फुटबॉलपटू होते ते अमरावतीकरांना काही माहिती झाले नाही. भीमराव यांच्या निधनानंतर या आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूचे कार्य पुढील पिढीला माहित व्हावे या उद्देशाने जी. बी. देशमुख यांनी या पुस्तकातून आपल्या तीर्थरुपांचे भावचित्र अगदी सोप्या सरळ भाषेत शब्दबद्ध करून महारुद्र च्या रूपाने वाचकांसमोर ठेवले. या लिखाणासाठी त्यांनी मुंबईत जाऊन त्या काळातील टाईम्स वृत्तपत्रांतील भीमराव यांचा उल्लेख असलेली कात्रणे मिळविली, त्यांच्या समवेत खेळलेल्या खेळाडूंना व पत्रकारांना भेटले, अमरावती मधील त्यांच्या समवयस्क परिचितांकडून त्यांची माहिती गोळा केली. त्यासाठी त्यांनी अथक अशी मेहनत घेतली. व २००५ साली हे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकाच्या पुढील आवृत्ती मेहता प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केल्याने ते पुस्तक महाराष्ट्रभर पोहोचले. या निमित्त्याने भीमराव यांचे कार्य, त्यांचा फुटबॉल खेळातील झंझावात मराठी माणसाला माहिती झाला. अमरावतीकर या नात्याने मला तर आपल्या मातीतील माणूस त्या काळात आंतरराष्ट्रीय पातळीवर झेंडा गाडून आल्याचा अभिमान वाटला. अशा अनेक अर्थाने महारुद्र महत्वाचे आहे. ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
सलिल तांबे

ज्यांना गोष्टींची आवड आहे अशा मुलांसाठी ही मेजवानी आहेच, पण आपल्या पाल्यांमध्ये संवेदनशीलता आणि निसर्गाप्रती आदर जोपासण्यासाठी मोठ्यांनीही हे पुस्तक वाचायला हवे. प्रदूषणाविरुद्ध लहान हातांनी दिलेला लढा असो किंवा निसर्गाचा खरा आनंद पिशवीत भरून आणण्यापक्षा मनात कसा साठवावा, हे सांगणारा दृष्टिकोन असो; हे पुस्तक प्रत्येक वाचकाला समृद्ध करते. पुस्तकातील प्रत्येक कथा संपताना आपल्याला जगण्याकडे बघण्याची एक नवी दृष्टी देऊन जाते. यातलं काही गूढ, काही थरार आणि खूप सारे हळवे प्रसंग अनुभवण्यासाठी तुम्हाला हे पुस्तक स्वतः वाचायलाच हवं. म्हणूनच, आपल्या संग्रही असावा असा हा `हाटूमुटूचा चंद्र` तुम्ही एकदा नक्की अनुभवा! चला तर मग, आपणही शोधूया आपला स्वतःचा ‘हाटूमुटूचा चंद्र’! ...Read more