* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788184989489
  • Edition : 1
  • Publishing Year : JANUARY 2016
  • Weight : 260.00 gms
  • Pages : 176
  • Language : MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
AFTER A BATTLE OF 1962 MASVI MADE A LOADER FOR ARMY TO LOAD OR RELOAD THE LUGGAGE . ON THAT DAY SUBBU HUG ME AND CRIED .IT WAS A TEARS OF HAPPINESS. I ASKED HIM TO WHAT HAPPENED .HE SAID.” I SAW MANY SOLDIERS DIED IN BATTLE JUST BECAUSE LACK OF MATERIAL AND FOOD. NOW IT WILL NEVER HAPPEN AGAIN.’’
१९६२च्या युद्धानंतर मॅस्वीने सेनादलांसाठी सामानसामुग्री उतरवण्या-चढवण्यासाठी मुद्दाम लोडर बनवला त्याप्रसंगी तेव्हा सुब्बुने मला मिठी मारली व रडू लागला. ते आनंदाश्रू होते. मी त्याला इतके काय झाले म्हणून विचारल्यावर तो म्हणाला ‘बॉर्डरवर सामान नाही, दारूगोळा नाही; रसद नाही म्हणून मृत्युमुखी पडलेले अनेक शहीद जवान पाहिलेत. आता तसे होणार नाही.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #MASVIKANHERE #MASVIKANHERE #मॅस्वीकान्हेरे #BIOGRAPHY #MARATHI #ANANDKANHERE "
Customer Reviews
  • Rating StarSAHITYA SUCHI, APRIL 2016

    एका कल्पक उद्योजकाच्या जिद्दी वाटचालीची कहाणी… ‘मॅस्वी आणि कंपनी प्रा. लि.’ या १९४३ साली स्थापन झालेल्या कंपनीचे मालक शारंगधर पुरुषोत्तम कान्हेरे यांचे हे छोटेखानी चरित्र.हे चरित्र आनंद कान्हेरे या त्यांच्या मुलानेच लिहिलं आहे. उत्तम आर्थिक परिस्थित असल्याने शारंगधर कान्हेरे यांनी त्या काळात परदेशात, मँचेस्टरला इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये बी.एस्सी. टेक केलं आणि त्यानंतर बर्मिंगहॅम इथल्या ऑटोमॅटिक इलेक्ट्रिक कंपनीत रिसर्च आणि डेव्हलपमेंट विभागात नोकरी केली. या काळात युरोपातही दुसऱ्या महायुद्धाचे वारे वाहत होते. कंपनीतलं उत्कृष्ट काम करून कान्हेरे राष्ट्रभक्ती आणि घरातील जबाबदारीची जाण ठेवत भारतात परतले आणि व्यवसाय सुरू केला. या व्यवसायाची सुरुवात पाच जणांनी केली आणि त्यांच्याच नावाच्या आद्याक्षरांनी मॅस्वी हे नाव दिले. सुरुवातीच्या काळात मॅस्वीने मुख्यत्वे पंपसेट, मोठ्या इलेक्ट्रिकल मोटारी व स्वीचगिअरची विक्री केली. हा व्यवसाय मुख्यत्वे एजन्सीजच होता. त्याची वाढ होत असली तरी कान्हेरेंच्या शिक्षणाचा, अनुभवाचा कस लावणारा नव्हता. त्यामुळे कान्हेरेंनी ‘भारत मॅन्युफॅक्चरिंग’ नावाने स्वतंत्र व्यवसायही सुरू केला. या उद्योगाने सुरुवातीला शेगड्या, इस्त्री अशा विद्युत्चलित गोष्टी बनवायला सुरुवात केली. आईसफ्रूट बनवणे, प्लेटिंग करणे अशी कामे सुरू केली. मात्र दोन्ही कामांचा ताण आल्याने त्यांनी ‘भारत इलेक्ट्रिकल’ची जबाबदारी दुसरीकडे सोपवली. पुढे मॅस्वीचा विस्तार करत त्यांनी त्याची शाखा कोल्हापूरलाही सुरू केली. कंपनीकडे पुढे एअर इंडियाने काही वस्तू बनवण्यासाठी विचारणा केली आणि १९५३ मध्ये मॅस्वीत वस्तुंचीही निर्मिती सुरू झाली. सुरुवातीला सामान ठेवण्यासाठी रॅक्स आणि लोखंडी स्कॅफोल्डिंग बनवले आणि पुढे विमानाच्या दाराशी जाईल अशी शिडी बनवण्यात येऊ लागली. असंख्य कसोट्यांना पार करत ही शिडी एअर इंडियाला योग्य वाटली आणि हीच या कंपनीसाठी यशाची शिडी ठरली. पुस्तकाचे चरित्र लेखकही अभियंते असल्याने या शिडीचे तांत्रिक बारकावेही तयांनी कुशलतेने लिहिले आहेत. मॅस्वी उद्योगाने यानंतर पुण्यात स्वतंत्र कारखाना उभा केला. या कारखान्यात केवळ विमानांसाठी शिड्याच नव्हे तर अनेक उत्पादने घेतली जाऊ लागली. जुन्या उत्पादनातही त्यांनी कल्पक सुधारणा केल्या. लेखकांनी हा भाग तांत्रिक तपशील अन् आकृत्या देत अतिशय स्पष्ट लिहिला आहे. पुढे एअर इंडियासाठी टायर ट्रान्सपोर्ट डॉली, पॅरॅफिन एअरक्लिनिंग इक्विपमेंट बॅगेज ट्रॉली अशी अनेक उत्पादनं बनवली आणि विमानतळावर लागणाऱ्या वस्तुंचे कान्हेरे प्रमुख उत्पादक बनले, एवढेच नव्हे तर देशात आयात होणाऱ्या या वस्तूंचे उत्पादन भारतातच झाल्याने देशाचे लक्षावधी डॉलरचे परकीय चलन वाचवले. एअर इंडियाच्या ‘इंजिन इन्स्ट्रॉलेशन अ‍ॅन्ड रिमूव्हल स्टॅन्ड’ या उत्पादनासाठी कान्हेरेंना १९७३ साली राष्ट्रपती पदकही मिळाले. पुढे १९७१ नंतरच्या आर्थिक मंदीच्या काळात मात्र मॅस्वीला अनेक संकटांना सामोरे जावे लागले. अगदी दिवाळखोरीलाही सामोरे जावे लागले. या सगळ्या काळात वृद्धत्वाकडे झुकलेल्या कान्हेरेंनी अतिशय ठामपणे निश्चयाने आपला लढा सुरू ठेवला आणि देणेकऱ्यांचे पैसे देण्यात यशही मिळवलं. मॅस्वीची ही वाटचाल लेखकाने अतिशय बारकाईने लिहिली आहे. विशेषत: त्यातला तांत्रिक भाग सखोलतेनं लिहिला आहे. अतिशय सुसंस्कृत प्रयोगशील माणसानं कष्टानं उभा केलेला हा उद्योग यशाची उंचीही गाठतो आणि अपयशाने पूर्णत: खचतो. त्यामुळे ही कहाणी वाचकाला अंतर्मुख करते, अनुभवाचे धडेही देते. लेखकाने आपल्या पित्याचे कष्ट, त्यांची जिद्द, त्यांची प्रयोगशील वृत्ती अन् हुशारी अत्यंत जवळून अनुभवली असल्याने आशयाची अस्सलता लेखनात उतरली आहेच. व्यवसायाबद्दल, वडिलांबद्दल तटस्थतेने लिहिण्याचा प्रयत्न केला असला, तरी आपल्या माणसांविषयी आस्था, आदर अन् त्यांच्या यशापशातलं गुंतणंही पुस्तकात वाचायला मिळतं. एकूणच एका कर्तबगार, संवेदनशील वत्सल माणसानं आपला व्यवसाय, कुटुंबाचा मांडलेला हा लेखाजोखा वाचकांनाही आपलंसं करून घेतो. व्यवसायाचं चरित्र लिहित असताना उत्पादनातल्या तांत्रिक गोष्टी अन् त्यामागचे विचार, अनुभव, उत्पादन अधिकाधिक उत्कृष्ट. बनवण्यासाठी घेतलेला ध्यास परिपूर्णतेनं आला आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RAZOR SHARP
RAZOR SHARP by ASHWIN SANGHI Rating Star
सुनील माने, पुणे

लेखक अश्विन सांघी “द रोझाबल लाइन” या पहिल्याच कादंबरीने खूप लोकप्रिय झाला. प्राचीन भारतीय दंतकथा/ऐतिहासिक संदर्भ घेऊन त्याच्याभोवती आजच्या काळात रहस्यपूर्ण कथा लिहिणारा अश्विन. Chanakya’s Chant, The Krishna Key, The Sialkot Saga, Keepers of the Kalacakra, The Vault of Vishnu, The Magicians of Mazda अशा एकापेक्षा एक सुंदर रहस्य कादंबर्या “भारत सिरीज़” नावाने खूप प्रसिद्ध झाल्या. या सर्व कादंबऱ्या मी इंग्लिश मधेच वाचल्या. यांचा मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाउस यांच्याकडे उपलब्ध आहे. अश्विन सांघीने या भारत सिरीज शिवाय एक नवीन थ्रिल्लर सिरीज (कुत्ता कदम) सुरू केली आहे. त्यांतील पहिली कादंबरी Razor Sharp. एक सिरियल किलर मुंबईत एकानंतर एक खून पाडतोय. पोलिस चक्रावले आहेत. 1. रविवार दि २ फेब्रुवारी , गोरेगाव पश्चिममधे रवि मेहराचा खून होतो. त्याची बायको खुशी कॅाल सेंटरचा जॅाब करून रात्री ११.३० ला परत येते. खूप वेळा बेल वाजवून दार न उघडल्यामुळे ती उघडून आत येते तर रवि रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेला असतो. त्याचे हात पाठीमागे नायलॅान दोरीने बांधलेले असतात. त्याच्या छातीत सुरा खुपसलेला असतो. त्याच्या तोंडात काहीतरी खाद्य पदार्थ असतो. 2. सोमवार दि १० फेब्रुवारी , लोअर परळमधे सुचंद्रा अग्रवालचा खून. तिची कामवाली आल्यावर दार न उघडल्यामुळे सोसायटीवाले दार तोडतात. आत सुचंद्राचा खून झालेला. हात नायलॅान दोरीने मागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात काहीतरी खाद्यपदार्थ. पोलिस चक्रावलेले. मग पोलिसखाते जागे होते. त्यांचा नावाजलेला अधिकारी जो सस्पेंड झालेला आहे, त्या प्रकाश कदम, DCP याला बोलावले जाते. राज्याचे गृहमंत्री ओंकार लोखंडे, त्यांचा माणूस कमिशनर चव्हाण आणि उपगृहमंत्री जयंत गायकवाड व त्यांचा माणूस SCP राणे, मुंबईचा डॅान भाऊ पाटील जो लोखंडेचाच माणूस असतो, हे सर्व या केसच्या मागावर लागतात. कदम हा राणेंच्या ओळखीचा खास ऑफिसर असतो म्हणून त्यालाही इन्व्हेस्टीगेशनला बोलावले जाते. 3. मंगळवार दि १८ फेब्रुवारी , ठाणे येथे मंगला शहाचा खून. तिच्या शेजारणीमुळे हे कळते. मंगलाचे हात नायलॅान दोरीने पाठीमागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात खाद्यपदार्थ. पोलिस अधिकारी शिंदे कदमबरोबर येतात. मंगलाच्या चेहऱ्याजवळ कदमला पेस्टिसाईडचा वास येतो. चेहरा निळसर झालेला. खून झाल्यावर बॅाडीला हलवलेले दिसते. तो ऑफिसमध्ये जुन्या खूनांचे फोटो तपासतो. त्यांचीही बॅाडी खून केल्यावर हलवलेली दिसते. चेहऱ्यावर निळसर झाक दिसते. तिन्ही खून “फिनेक” ब्रॅंडच्या चाकूने केलेले असतात. हे समान धागे कदम त्याची मुलगी केतुल बरोबर चर्चा करतो. केतुलची आई काही वर्षांपूर्वी कदमला सोडून गेलेली असते. ती भाऊ पाटीलची सावत्र बहीण असते. पण सध्या ती कुठे आहे व काय करते हे माहित नसते. केतुल कोर्टात काम करत असते तसेच ती “शक्ती” या NGO मधेही काम करते. शक्ती हे सोनापूरमधुन सुटका केलेल्या वेश्यांचे पुनर्वसन करत असते. निर्मल नावाचा तिचा मित्र एथिकल हॅकर असतो. तिच्यावर प्रेम करत असतो. कदमला हार्ट अटॅक येऊन गेलेला व स्टेंट बसवलेला असतो. Depression मुळे त्याची सायकॅालॅाजिस्टकडे ट्रिटमेंट चालू असते. कदमला या तिन्ही केसमधे आणखी एक धागा सापडतो. हे खून आठ दिवसांच्या अंतरावर झालेले असतात. म्हणजे पुढचा खून बुधवारी होणार असल्याचे तो राणे व शिंदेला सांगतो. 4. बुधवार दि २६ फेब्रुवारी, कांदिवली पश्चिम, लक्ष्मी बुधीराजाचा खून. तोच पॅटर्न. 5. गुरुवार दि ५ मार्च, खार पश्चिम, गुरुराज अदवानीचा खून सेम पॅटर्न. गुरूराज हा युट्युबवरचा प्रसिद्ध सिंगर असतो. 6. शुक्रवार दि १३ मार्च, ताडदेव, दिव्या शुक्रपाणीवर खूनी हल्ला होतो. पण ती जबर जखमी होते. ती फिटनेस ट्रेनर असल्यामुळे खुन्याबरोबर झटापट करते. पण चाकू पोटात घुसल्यामुळे ती जबर जखमी होते. हात बांधलेले असतानाही ती फोनवर “सिरी” ला तिच्या भावाला, ध्रुवला फोन लावायला सांगते. फोन लागतो व ती “हेल्प हेल्प” एव्हढेच बोलून बेशुद्ध होते. म्हणून खुनी पळून जातो. ध्रुव तिथे पोहोचून तिला हॅास्पिटलमधे ॲडमिट करतो. पोलिसांना तिथे खुन्याची बॅग सापडते. त्यांत नायलॅानची दोरी, बेगॅान स्प्रे व राजमाच्या बिया सापडतात. तिसऱ्या खुनाआधी पोलिस संशयित म्हणून राजू दाभाडेला अटक करतात. पण चौथ्या खूनाच्या वेळेस तो कस्टडीतच असतो. मग खूनी कोण? 7. शनिवार दि २१ मार्च, बान्द्रा पश्चिम, शनिया डिसौजाचा खून होतो. सेम मोडस ऑपरेंडी . 8. शनिवार दि २८ मार्च, चेंबूर, ७१ वर्षांच्या राहुल सिंह नावाच्या सिख व्यक्तिचा खून होतो. तीच पध्दत. यानंतर एक दिवस कदम KBC बघत असताना अमिताभ बच्चन एका सिनेमाचं गाणं लावून त्याचा पिक्चर ओळखायला सांगतात. ते गाणं असते- “सोमवार को हम मिले मंगलवार को नयन बुध को मेरी निंद खुली जुम्मेरात को चैन अरे शुक्र शनी कटे मुश्किलसे आज है इतवार सात दिनों में हो गया जैसे सात जनम का प्यार” आणि कदमच्या डोक्यात एकदम प्रकाश पडतो… अरे, हे सर्व खून असेच रविवार ते शनिवार एक एका वारी घडलेत! पण शनिवारी दोन खून कसे? याच्या मागे काही खगोलशास्त्र किंवा भविष्याचा तर संबंध नाही? कदमला आठवतं की शेजारी राहणारा डॉ. देसाईला पण भविष्य-खगोलशास्त्राची आवड व माहिती आहे. ( डॅाक्टर कडे सापडलेल्या नायलॅानचे रंगीत दोर व फिनेक कंपनीचा चाकू यामुळे एक संशयित म्हणून कदमने त्याला अटक करून पुछताछ केलेली असते) कदम लगेच डॅाक्टरांकडे जातो. त्यांची माफी मागून त्यांना या प्रश्नांत मदत करायला सांगतो. तो या सर्व खुनांचा सिक्वेन्स सांगतो. ते प्रत्येक वारी का घडले? मग शनिवारी दोन का? यापुढे कोणता वार? कुणाचा खून? डॅाक्टर सांगतात की भारतीय भविष्य व खगोल शास्त्रात नवग्रहांना खूप महत्व आहे. रवि, सोम(चंद्र), मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि, राहू आणि केतु. यांचे रंग व धान्य वेगवेगळे असतात. त्या त्या ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी ते वापरले जातात. कदम ही माहिती लिहून घेतो. त्यावरून प्रत्येक खुनात वापरण्यात आलेले फिनेक कंपनीचे चाकू, वेगवेगळ्या रंगांचे नायलॅान दोर व तोंडातील पदार्थ यांचा संबंध जोडून एक तख्ता तयार करतोः- “रवि मेहरा-रविवार-सोनेरी दोर- तोंडात गहू-दिशा पूर्व सुचंद्रा-सोमवार-चंदेरी दोर-तोंडात तांदूळ-दिशा पश्चिम मंगला शाह-मंगळवार-लाल दोर-तोंडात तूर डाळ- दिशा दक्षिण लक्ष्मी बुधीराजा-बुधवार-हिरवा दोर-तोंडात हिरवे मूग-दिशा उत्तर गुरुराज अदवानी-गुरूवार-पिवळा दोर-तोंडात हरबरा डाळ-दिशा उत्तर पूर्व(ईशान्य) दिव्या शुक्रपाणी-शुक्रवार-पांढरा दोर-राजमा-दिशा दक्षिण पूर्व शनिया डिसौजा-शनिवार-काळा दोर-तोंडात काळे तिळ-दिशा उत्तर पश्चिम राहुल सिंग-शनिवार-निळा दोर-तोंडात उडीद दाळ-दिशा दक्षिण पश्चिम” आता उरला एकच ग्रह-केतु. केतुचा वार मंगळवार. ग्रे रंग, चना दाळ, दिशा दक्षिण पश्चिम. “केतु”म्हणजे कदमची मुलगी केतुलचा नंबर लागणार? आज तर मंगळवारच आहे! कदम घाबरून जातो! तो केतुलला फोन करतो पण तो बंद लागतो. ती सध्या कुठे आहे? कोर्टात? कदम आपल्या मुलीला वाचवतो का? खरा खुनी कोण असतो? तो पकडला जातो का? त्याचे यामागचा उद्देश काय असतो? याच्यामध्ये अजून कोण सामिल असतं का? याची उत्तरे मिळण्यासाठी वाचावी लागेल अश्विन सांघी यांची कादंबरी Razor Sharp. ...Read more

BANGARWADI
BANGARWADI by VYANKATESH MADGULKAR Rating Star
Sameer Kazi

सुंदर अशी कादंबरी माणदेशी बनगरवाडी तशी कोरडी रखरखती पण, यातील पात्रात मायेचा करुणेचाओलावा मनात घर करुन जातो