* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788184989489
  • Edition : 1
  • Publishing Year : JANUARY 2016
  • Weight : 260.00 gms
  • Pages : 176
  • Language : MARATHI
  • Category : BIOGRAPHY
  • Discount : WORLD BOOK DAY OFFER 23 APRIL(Login to get best discount offers.)
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
AFTER A BATTLE OF 1962 MASVI MADE A LOADER FOR ARMY TO LOAD OR RELOAD THE LUGGAGE . ON THAT DAY SUBBU HUG ME AND CRIED .IT WAS A TEARS OF HAPPINESS. I ASKED HIM TO WHAT HAPPENED .HE SAID.” I SAW MANY SOLDIERS DIED IN BATTLE JUST BECAUSE LACK OF MATERIAL AND FOOD. NOW IT WILL NEVER HAPPEN AGAIN.’’
१९६२च्या युद्धानंतर मॅस्वीने सेनादलांसाठी सामानसामुग्री उतरवण्या-चढवण्यासाठी मुद्दाम लोडर बनवला त्याप्रसंगी तेव्हा सुब्बुने मला मिठी मारली व रडू लागला. ते आनंदाश्रू होते. मी त्याला इतके काय झाले म्हणून विचारल्यावर तो म्हणाला ‘बॉर्डरवर सामान नाही, दारूगोळा नाही; रसद नाही म्हणून मृत्युमुखी पडलेले अनेक शहीद जवान पाहिलेत. आता तसे होणार नाही.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #MASVIKANHERE #MASVIKANHERE #मॅस्वीकान्हेरे #BIOGRAPHY #MARATHI #ANANDKANHERE "
Customer Reviews
  • Rating StarSAHITYA SUCHI, APRIL 2016

    एका कल्पक उद्योजकाच्या जिद्दी वाटचालीची कहाणी… ‘मॅस्वी आणि कंपनी प्रा. लि.’ या १९४३ साली स्थापन झालेल्या कंपनीचे मालक शारंगधर पुरुषोत्तम कान्हेरे यांचे हे छोटेखानी चरित्र.हे चरित्र आनंद कान्हेरे या त्यांच्या मुलानेच लिहिलं आहे. उत्तम आर्थिक परिस्थित असल्याने शारंगधर कान्हेरे यांनी त्या काळात परदेशात, मँचेस्टरला इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये बी.एस्सी. टेक केलं आणि त्यानंतर बर्मिंगहॅम इथल्या ऑटोमॅटिक इलेक्ट्रिक कंपनीत रिसर्च आणि डेव्हलपमेंट विभागात नोकरी केली. या काळात युरोपातही दुसऱ्या महायुद्धाचे वारे वाहत होते. कंपनीतलं उत्कृष्ट काम करून कान्हेरे राष्ट्रभक्ती आणि घरातील जबाबदारीची जाण ठेवत भारतात परतले आणि व्यवसाय सुरू केला. या व्यवसायाची सुरुवात पाच जणांनी केली आणि त्यांच्याच नावाच्या आद्याक्षरांनी मॅस्वी हे नाव दिले. सुरुवातीच्या काळात मॅस्वीने मुख्यत्वे पंपसेट, मोठ्या इलेक्ट्रिकल मोटारी व स्वीचगिअरची विक्री केली. हा व्यवसाय मुख्यत्वे एजन्सीजच होता. त्याची वाढ होत असली तरी कान्हेरेंच्या शिक्षणाचा, अनुभवाचा कस लावणारा नव्हता. त्यामुळे कान्हेरेंनी ‘भारत मॅन्युफॅक्चरिंग’ नावाने स्वतंत्र व्यवसायही सुरू केला. या उद्योगाने सुरुवातीला शेगड्या, इस्त्री अशा विद्युत्चलित गोष्टी बनवायला सुरुवात केली. आईसफ्रूट बनवणे, प्लेटिंग करणे अशी कामे सुरू केली. मात्र दोन्ही कामांचा ताण आल्याने त्यांनी ‘भारत इलेक्ट्रिकल’ची जबाबदारी दुसरीकडे सोपवली. पुढे मॅस्वीचा विस्तार करत त्यांनी त्याची शाखा कोल्हापूरलाही सुरू केली. कंपनीकडे पुढे एअर इंडियाने काही वस्तू बनवण्यासाठी विचारणा केली आणि १९५३ मध्ये मॅस्वीत वस्तुंचीही निर्मिती सुरू झाली. सुरुवातीला सामान ठेवण्यासाठी रॅक्स आणि लोखंडी स्कॅफोल्डिंग बनवले आणि पुढे विमानाच्या दाराशी जाईल अशी शिडी बनवण्यात येऊ लागली. असंख्य कसोट्यांना पार करत ही शिडी एअर इंडियाला योग्य वाटली आणि हीच या कंपनीसाठी यशाची शिडी ठरली. पुस्तकाचे चरित्र लेखकही अभियंते असल्याने या शिडीचे तांत्रिक बारकावेही तयांनी कुशलतेने लिहिले आहेत. मॅस्वी उद्योगाने यानंतर पुण्यात स्वतंत्र कारखाना उभा केला. या कारखान्यात केवळ विमानांसाठी शिड्याच नव्हे तर अनेक उत्पादने घेतली जाऊ लागली. जुन्या उत्पादनातही त्यांनी कल्पक सुधारणा केल्या. लेखकांनी हा भाग तांत्रिक तपशील अन् आकृत्या देत अतिशय स्पष्ट लिहिला आहे. पुढे एअर इंडियासाठी टायर ट्रान्सपोर्ट डॉली, पॅरॅफिन एअरक्लिनिंग इक्विपमेंट बॅगेज ट्रॉली अशी अनेक उत्पादनं बनवली आणि विमानतळावर लागणाऱ्या वस्तुंचे कान्हेरे प्रमुख उत्पादक बनले, एवढेच नव्हे तर देशात आयात होणाऱ्या या वस्तूंचे उत्पादन भारतातच झाल्याने देशाचे लक्षावधी डॉलरचे परकीय चलन वाचवले. एअर इंडियाच्या ‘इंजिन इन्स्ट्रॉलेशन अ‍ॅन्ड रिमूव्हल स्टॅन्ड’ या उत्पादनासाठी कान्हेरेंना १९७३ साली राष्ट्रपती पदकही मिळाले. पुढे १९७१ नंतरच्या आर्थिक मंदीच्या काळात मात्र मॅस्वीला अनेक संकटांना सामोरे जावे लागले. अगदी दिवाळखोरीलाही सामोरे जावे लागले. या सगळ्या काळात वृद्धत्वाकडे झुकलेल्या कान्हेरेंनी अतिशय ठामपणे निश्चयाने आपला लढा सुरू ठेवला आणि देणेकऱ्यांचे पैसे देण्यात यशही मिळवलं. मॅस्वीची ही वाटचाल लेखकाने अतिशय बारकाईने लिहिली आहे. विशेषत: त्यातला तांत्रिक भाग सखोलतेनं लिहिला आहे. अतिशय सुसंस्कृत प्रयोगशील माणसानं कष्टानं उभा केलेला हा उद्योग यशाची उंचीही गाठतो आणि अपयशाने पूर्णत: खचतो. त्यामुळे ही कहाणी वाचकाला अंतर्मुख करते, अनुभवाचे धडेही देते. लेखकाने आपल्या पित्याचे कष्ट, त्यांची जिद्द, त्यांची प्रयोगशील वृत्ती अन् हुशारी अत्यंत जवळून अनुभवली असल्याने आशयाची अस्सलता लेखनात उतरली आहेच. व्यवसायाबद्दल, वडिलांबद्दल तटस्थतेने लिहिण्याचा प्रयत्न केला असला, तरी आपल्या माणसांविषयी आस्था, आदर अन् त्यांच्या यशापशातलं गुंतणंही पुस्तकात वाचायला मिळतं. एकूणच एका कर्तबगार, संवेदनशील वत्सल माणसानं आपला व्यवसाय, कुटुंबाचा मांडलेला हा लेखाजोखा वाचकांनाही आपलंसं करून घेतो. व्यवसायाचं चरित्र लिहित असताना उत्पादनातल्या तांत्रिक गोष्टी अन् त्यामागचे विचार, अनुभव, उत्पादन अधिकाधिक उत्कृष्ट. बनवण्यासाठी घेतलेला ध्यास परिपूर्णतेनं आला आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

वा. पां. जाधव अमरावती

`अमरावतीचे छप्पन स्वभाव एक मनोरंजक काव्यसंग्रह` `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे अमरावतीचे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री जी. बी. देशमुख यांचे अमरावती नगरीचा सहज स्वभाव व ह्या नगरीच्या वेगळ्या ओळखीवर आधारित मनोरंजक पुस्तक वाचले. वाचून भरपूर मनोरंजन झाले. खर काय लिहावे या लेखकाबद्दल, मन गोंधळले. ऐतिहासिक असो, प्रवास वर्णन असो, व्यक्ती विशेष असो, अनुभवात्मक घटना घडामोडी असो कशावरही सहज लिखाण करणारा हा लेखक आहे. आता तर त्यांनी लेखनाला विनोद प्रचुर फोडणी देऊन `अमरावतीचे छप्पन स्वभाव` या काव्यसंग्रहातून अमरावतीकरांना मनोरंजनाची मेजवानीच दिली आहे. प्रत्येक शहराची व त्या शहरातील वैशिष्ट्यांची एक वेगळीच ओळख असते. दिवस जातात, काळ लोटतो, पिढ्या बदलतात मात्र जुन्या स्मृतीची चिन्हे नवीन येणाऱ्या पिढीच्या मनात गुढ निर्माण करत कायम हाक देत राहतात. अमरावतीही त्याला अपवाद नाही. बापट चौकात चौक नाही, त्या जागेवर चौरस्ता नसून टी-पॉइंट आहे, खापर्डे बगीचा म्हणून आजही ओळख आहे मात्र तेथे बगिचा नाही किंवा प्रसिद्ध गांधी चौकात गांधीचा पुतळा अथवा स्मृतीदर्शक चिन्ह अथवा उल्लेख नाही मात्र गांधी चौक अशीच ओळख जनमानसात आहे. अशा एक ना अनेक विसंगत नाम दर्शक ओळख असलेली उदाहरणे त्यात सप्रमाण आहेत. पण खरी गंमत म्हणजे कधी काळी घडलेला इतिहास त्यामध्ये दडलेला आहे हे निश्चित. या सोबतच अमरावतीकरांच्या स्वभावातला स्थायी मजेदारपणाच्या एक एका हटके गुण वैशिष्ट्याच्या गमती लेखकाने हुबेहूब अधोरेखित केलेल्या आहेत. आणि त्यावरुन तत्सम रचनांचा उहापोह लेखकाने पुस्तकात केला असावा. विदेशात स्थाईक झालेल्या मूळ अमरावतीकरांना लेखकाने लिहिलेल्या गमती मनोरंजनात्मक वाटाव्या एवढी किमया जी.बी. च्या सहज लेखनाने दाखवली आहे. अमरावतीचे अग्रगण्य वृत्तपत्र दै. हिंदुस्थान मध्ये लेखकाने सतत ६ महीणे लिहीलेल्या काव्य सदरात अमरावतीच्या जनमानसाच्या हृदयाच्या ठाव घेणाऱ्या काव्य रचनांचा आठवणींनी महापूर ओसंडून गेला होता. विशेष म्हणजे ह्यात कुठेही अनावश्यक अभिनीवेष नव्हता. उलट गमतीत केलेले आत्मपरिक्षण मात्र काही प्रमाणात होते. वयस्क अमरावतीकर रसिकांना या रचना ताज्या करून त्यांच्या तारुण्यात घेऊन गेल्या हेच खरे. जी बी देशमुख या लेखकास मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रियां वरून दिसून येते. . सदर पुस्तकातील काव्यमय रचना वाचतांना अमरावतीच्या माणसाच्या वऱ्हाडभोळ्या स्वभावाची प्रचीती येते आणि वेगळाच आनंद देऊन जाते. निखळ मनोरंजन करत गुदगुल्या करणारा असा हा काव्यसंग्रह आहे. अमरावती शहराची ऐतिहासिक वैशिष्टे काव्यरूपात वाचण्याचा आनंद अमरावतीकरांना ते जिथं असतील त्या गावात, परगावात, परदेशात पुस्तक मागवून घेता येईल. ...Read more

ज्योती चेडे, मुंबई.

अमरावतीच्या वैशिष्ट्यांवर आधारीत खुमासदार छप्पन्न कवितांच्या संग्रहातील प्रत्येक कविता वाचत असताना अमरावतीच्या वातावरणाची धुंदी आपसुकच मनावर चढु लागली. सगळ्याच कविता सुंदर आहेत. एकेक कविता अमरावतीचे अप्रतिम वर्णन करते. प्रत्येक कवितेचा शेवट कुठेतरी गंभीर विचार करायला भाग पाडतो आणि मन गलबलून जाते. सगळ्याच कविता सुंदर आहेत पण माझ्या मनाला भावलेल्या व भिडलेल्या कविता आहेत `अमरावतीतल्या गमती`, `अमरावतीचे शिक्षण`, `अमरावतीचे हजरजबाबी`, `अमरावतीचे वेडे`, `अमरावतीच्या काकू` व बाकी सगळ्या. `अमरावतीचे वेडे` या कवितेत उल्लेखीत शेवटचा अश्रुंचा एक थेंब जरुर राखला जाईल. तसेच `अमरावतीच्या काकूं` ची उर्जा उरात भरून उरेल. जीवन देणाऱ्या विहीरीने कोणाचेही जीवन घेऊ नये, अशी सद्भावना मनात जागेल. अमरावतीकर जगात कुठेही असो त्यांच्या मनात एका कोपऱ्यात राजकमल चौक असतोच हे सत्य मनावर कोरले जाईल. प्रत्येक अमरावतीकराने ह्या कविता जगाव्यात. त्यासाठी हे पुस्तक संग्रही ठेवावे आणि परगावी राहणाऱ्या आपल्या अमरावतीकर आप्तेष्टांना भेटी दाखल द्याव्या. ...Read more