* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: DNYANSURYACHI SAWALI
  • Availability : Available
  • ISBN : 9788184985238
  • Edition : 2
  • Publishing Year : JANUARY 2014
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 320
  • Language : MARATHI
  • Category : BIOGRAPHY
  • Available in Combos :MANJUSHREE GOKHALE COMBO SET -10 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
DNYANSURYACHEE SAWALI IS A NOVEL BASED ON THE LIFE OF SOPANDEO, A THIRTEENTH CENTURY SAINT AND THE YOUNGER BROTHER OF SAINT DNYANESHWAR. SOPANDEO LIVED UNDER THE SHADOW OF THE ELDER BROTHER. LIKE HIS SIBLINGS – NIVRUTTINATH, DNYANESHWAR AND MUKTABAI -- SOPANDEO ALSO SUFFERED IN THE CHILDHOOD. HE WAS STUDIOUS BY NATURE AND THE CONVERSATION BETWEEN NIVRUTTINATH (THE ELDEST BROTHER WAS THE SPIRITUAL GURU OF BOTH DNYANESHWAR AND SOPANDEO) LED TO HIS WRITING THE SOPANDEVI WHICH IS THE TRANSLATION OF THE BHAGWAD GEETA . SOPANDWO’S WORK DIFFERS FROM THE DNYANESHWARI WHICH IS ALSO THE RENDERING OF THE BHAGWAD GEETA INTO MARATHI IN THAT IT IN A DIFFERENT FORM OF MARATHI. LIKE DNYANESHWAR, FEELING THAT HIS AIM OF LIFE HAS BEEN REALIZED, SOPANDEO ALSO UNDERTOOK SANJEEVAN SAMADHI (ENDING ONE’S LIFE VOLUNTARILY) AT A VERY YOUNG AGE. THE FLASHBACK STYLE OF NARRATION WHICH BEGINS WITH THE SANJEEVAN SAMADHI OF DNYANESHWAR AND ENDS WITH THAT OF SOPANDEO TRACING IN BETWEEN THE LIFE OF THE YOUNG SAINT AND HOW HE ATTAINED THE SAINTHOOD IS EFFECTIVE.
...नामदेव पुढे झाले. त्यांनी सोपानाच्या पायांवर लोळण घेतली. सोपानानं डोळे उघडले. वाकून त्यानं नामदेवांना उठवलं. दुसऱ्या क्षणाला नामदेवांनी सोपानाला घट्ट मिठी मारली. इतकी घट्ट, की जणू ती कुणी सोडवणं शक्य नव्हतं. जणू ते सोपानाला जाऊच देणार नव्हते. एका मिठीला इतके अर्थ असू शकतात? काय नव्हतं त्या मिठीत? सोपानाला अडवण्याची जिद्द, तो समाधी घेणार म्हणून होणा-या वियोगाचं दु:ख, आपण त्याला थांबवू शकत नाही म्हणून वाटणारी असाहाय्यता, त्याच्या वियोगाची वेदना, एवढ्या लहान वयातली त्याची स्थितप्रज्ञता बघून वाटणारं कौतुक, त्याचा निरागस चेहरा बघून पोटातून तुटून येणारी माया, त्याच्या अलौकिक बुद्धिसामथ्र्याला केलेलं वंदन, या पुण्यात्म्याचा सहवास आपल्याला लाभला म्हणून वाटलेली धन्यता, आपल्यापेक्षा वयानं कितीतरी लहान असलेल्या या पोराला समाधी घेताना बघण्याचं करंटेपण आणि या सर्वांवर कळस, म्हणजे मनात अतिपूज्य भावना असल्यामुळे ज्ञानोबा माउलीला आपण अशी घट्ट मिठी मारू शकलो नाही, म्हणून आता त्या ज्ञानसूर्याचीच सावली असलेल्या सोपानाला आपण घट्ट मिठी मारतो आहोत, याची सार्थकता. एका मिठीमध्ये एवढ्या भावभावना सामावलेल्या असतात, हे नामदेवांनाही उमजलं नसेल; पण नामदेवांनी सोपानाला कडकडून मारलेली मिठी भिजलेल्या डोळ्यांनी बघणा-या जनाबार्इंना मात्र हे सगळे सगळे अर्थ समजले....
अश्वमेध ग्रंथालय आयोजित `अक्षरगौरव पुरस्कार` २०१४ . * महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था पुरस्कार २०१६- किरण संजीवनी पुष्पलता रानडे परितोषिक.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #MANJUSHRIGOKHALE #TUKYACHIAVALI #JOHARMYBAAPJOHAR #OMKARACHIREKHJANA #DNYANSURYACHISAVALI
Customer Reviews
  • Rating StarManda Kulkarni

    हे पुस्तक वाचताना मुक्ताई आणि तीन भावंडाचे जे हाल झाले त्या बद्यल लेखिकेन(मंजुश्री गोखले)लिहताना जे शब्दप्रयोग केले आहेत,त्यामुळे नजरे समोर त्यांच सगळ जीवन ऊभ रहात . आईवडीलानी देहत्याग केल्या नंतर सुद्धा कर्मठ लोकांनी त्याना किती त्रास दिा ते वाचताना मला तर खरोखर गहिवरुनच येत होत.मन ऊद्वीग्न झाल वाचुन.एवढा त्रास सहन करुन सुद्धा किती शांततेन,सयंमान हे चार भावंड राहीले. पुस्तक पुर्ण झाल तरी डोक्यातुन जात नाही,वाचनिय पुस्तक. ...Read more

  • Rating StarLOKPRABHA 02-11-2018

    मंजुश्री गोखलेलिखित ‘ज्ञानसूर्याची सावली’ ही कादंबरी निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपानदेव आणि मुक्ताबाई या मराठी माणसाच्या काळजाचा विषय असलेल्या चार भावंडापैकी सोपानदेवांचं चरित्र रेखाटते. वडील विठ्ठलपंतांचा संन्यास, गुरूच्या आज्ञेने परत गृहस्थाश्रम स्वकारणं, मग समाजाने केलेल्या हेटाळणीमुळे पत्नी रुक्मिणीसह केलेला देहत्याग या सगळ्यातून ‘संन्याशाची पोरं’ म्हणून हिणवली गेलेली ही चार मुलं... प्रत्येकाचं व्यक्तिमत्त्व वेगळं तरीही एकमेकांमध्ये विरघळलेलं आणि त्यांच्यातही ज्ञानेश्वर म्हणजे साक्षात ज्ञानसूर्य. त्यामुळेच स्वत:चं व्यक्तिमत्व असूनही इतर भावंडं या ज्ञानसूर्याची सावली ठरली. त्यातल्या एका सावलीचं म्हणजेच सोपानदेवांचं चरित्र या कादंबरीत आहे. या चारही भावंडांचं जगणं आणि ज्ञानदेवांच्या समाधीनंतर सोपानदेवांनी घेतलेली समाधी इथवरचा प्रवास कादंबरीत वाचायला मिळतो. या अलौकिक भावंडांचा लेखिकेच्या कल्पनेतून झालेला जीवनप्रवास वाचनीय आहे. ...Read more

  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    निवृत्तीनाथांच्या कृपेने गुरूप्रसाद लाभला. ज्ञानेश्वरांच्या छायेत आत्मविकास साधला आणि मुक्ताईच्या सहवासात जिवंतपणीच मुक्तिस्वातंत्र्य अनुभवले असे संतश्रेष्ठ सोपानदेव! त्यांची जीवनगाथा वेगळी काय असणार? चारही भावंडे म्हणजे ‘परब्रह्मीचे ठसे.’ द्वैत राखन अद्वैत साधणारी ही अवतारी मंडळी भागवत धर्मातील कुलदैवते ठरावीत इतकी महान अशा या संतसज्जनांवर लिहिताना चौघांना एकमेकांपासून वेगळे काढता येतच नाहीत, परंतु हा दैवी चमत्कार मंजुश्री गोखले यांनी करून दाखवला आहे. या प्रेरणापूर्तीचे नाव आहे ज्ञानसूर्याची सावली! एक तर संतचरित्रे म्हणजे न संपणारे संशोधन सुमारे सातशे वर्षांपूर्वीचा इतिहास उपलब्ध असला तरी तो श्रीमंत राजामहाराजांचा. साधुसंत निरहंकारी. ते स्वत:बद्दल सांगायला संकोच करतात. संतशिरोमणी नामदेवांनी या भावंडांची चरित्रे लिहिली नसती तर केवढा मोठा काळ अज्ञात राहिला असता. त्याचा धांडोळा घेत मंजुश्रीतार्इंनी याआधी ‘तुकयाची आवली’, ‘जोहार मायबाप’ (चोखामेळा), ‘ओकाराची रेख जना’ (जनाबाई) या जीवनगाथा लिहिल्या आणि अफाट लोकप्रिय झाल्या आहेत. विविध विषयांवरील त्यांच्या सुमारे पंचवीस पुस्तकांनी त्या वाचकप्रिय झाल्या असून अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. डॉ. अशोक कामत हे संतसाहित्याचे जिव्हाळ्याचे अभ्यासक. त्यांच्या प्रस्तावनेत ‘ज्ञानसूर्याची सावली’चे महत्त्व विशद करताना म्हटले आहे की, तेराव्या शतकातील केवळ तीन दशकांचा दस्तऐवज अस्सल आहे का? हा प्रश्न संशोधकांना कायम अस्वस्थ करतो. लोकाश्रयावर जागृत राहिलेली संतांची समाधिस्थाने जिवंत असली तरी सारे काही श्रद्धेच्या बळावरच कल्पनेला राबवून लेखन करावे लागते. ते मंजुश्रीतार्इंनी पुरेसे समाधानकारक केले आहे. सूर्य दाखवता येतो, पण किरणांचे काय? कवडसे तेजस्वी असतात. सूर्यापासून ते वेगळे नसतात हेच दाखवून सोपानदेव वेगळेपण अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे. निरनिराळ्या प्रसंगी झालेल्या चर्चेत सोपानदेवांनी आपली प्रज्ञा आणि प्रतिभा यांची वेळोवेळी जी चमक देदीप्यपूर्ण दाखवली आहे ती मुळातूनच वाचण्यासारखी आहे. यातील दशक्रिया विधीची सूक्ष्म पण महत्त्वाची माहिती आणि संजीवन-समाधीचे रहस्य लेखिकेने यथार्थपणे चित्तारले आहे. हटयोगातील गूढरम्य भाषा अधिक सोपी करण्याचा प्रयत्न केला तरी काही सांकेतिक शब्द तेच ठेवल्याने वाचकांस पुरेपूर अर्थबोध होऊ शकतो. अभ्यासकातील मतभेदांचा आदर करून जसे आहे तसे सत्य शोधण्याचा हा लेखनप्रवास आनंदाच्या इच्छित स्थळी वाचकांस घेऊन जातो आणि आत्मिक समाधान देतो. सोपानदेवांच्या समाधीचा प्रसंग आणि सासवडचा परिसर नामदेवांच्या अभंगांचा आधार घेऊनही लेखिकेची स्वतंत्र कल्पनाशक्ती सहज नजरेत भरते. ‘प्रभात’च्या कृष्णधवल चित्रपटमालिकेत सहज सामावले जाईल असे हे संपूर्ण कथानक प्रत्येक भाविक आणि रसिकाने वाचायलाच हवे. फाल्गुन ग्राफिक्सचे मुखपृष्ठ अप्रतिम आहे. -राम कर्णिक ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MI GALIB BOLTOY
MI GALIB BOLTOY by SHABBIR ROMANI Rating Star
लोकमत २५.९.२०२३

शब्बीर रोमानी हे व्यवसायाने वकील. मातृभाषा अर्थात उर्दू आणि शिक्षण मराठी माध्यमातून झालेले. २०१८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या उर्दू पुस्तकाला, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालच्या साहित्य अकादमी केंद्राचे पुरस्कार लाभले आहेत. आता मिर्झागालिबवरचे नवे पुस्तक, `मी गालिब बोलतोय...!` लक्ष वेधून घेत आहे. गालिबच्या एका शेरची पहिली ओळ घेऊन सांगायचे झाल्यास, जिक्र गालिबचा आणि खूबसूरत बयान लेखकाचे असे या पुरस्काराबद्दल म्हणता येईल. मिर्जा असदुल्ला खां,`गालिब` या श्रेष्ठ शायरची शायरी, त्याचे पत्रलेखन, चरित्र यावर आजवर शेकडो पुस्तक प्रसिद्ध आहेत. लेखकाने प्रस्तावनेत नमूद केल्यानुसार गालिबवर अनेक लेखकांनी लिहिले आहे. मराठी, हिंदी-उर्दू लेखकांची ते तपशील पाहून आचंबा वाटतो. शिवाय शब्बीर रोमानी यांनी इथे आपल्या लेखनाचे प्रयोजन सांगताना म्हटले आहे, कि गालिबबद्दल अनेक उलट-सुलट प्रकारच्या कहाण्या, विनोद, (कसलेही शेर गालिबच्या नावाने सांगत राहणे) प्रचलित आहेत; त्यामुळे गालिबची कथा, त्याच्या पत्रांमधल्या मनोरंजक गप्पा-गोष्टी आणि त्याच्याशी निगडित आठवणी हे सगळं साध्या सोप्या भाषेत लिहिण्याचा प्रयत्न म्हणजे हे पुस्तक. सर्वसामान्य माणसाच्या जगण्यातल्या सर्व भावछटा गालिबच्या काव्यातून दिसत असतात. पुस्तक वाचताना गालिबची प्रकृती, त्याची विनोद बुद्धी, संवेदनशील वृत्ती हे आपल्याला जाणवत राहते, आणि लेखकाची तळमळसुद्धा. या पुस्तकाचे वैशिष्टय म्हणजे, मोठी प्रकरण टाळून किस्से सांगावेत अशी रचना. शिवाय लेखकाची साधी-सरळ भाषा, यामुळे शायरीची आणि गालिबबद्दलची सर्वसाधारण माहिती आणि कुतुहूल असणाऱ्या वाचकांना हे पुस्तक रंजक वाटेल. सहसा गालिबचे गाजलेले शेर, किस्से हे आपल्या वाचनात असतात. या पुस्तकात गालिबचे अनेक दुर्मिळ शेर, शिवाय फारसी रचनाही या पुस्तकात समाविष्ट असल्याने त्याला एक संदर्भ ग्रंथाचेही स्वरूप आलेले आहे. गालिबला आंबे फार आवडायचे, `मिर्झा गालिब` या गाजलेल्या चित्रपटातला तो प्रसंग आजही लक्षात आहे. आंबे खाताना एक मित्र गालिबला तुच्छतेने म्हणतो, `आम तो गधेभी नही खाते!` त्यावर गालिबने त्वरित उत्तर देतो. `सिर्फ गधेही नाही खाते!` शब्बीर रोमानी यांनी हा प्रसंग व विनोद म्हणून सांगितला नाही, तर त्याचे तपशिलाने वर्णन तर केलेच शिवाय आंब्यावरची गालिबची मोठी गजल त्यांनी दिलेली असल्याने त्या किश्श्याला एक गांभीर्य आलेले आहे. असाच एक किस्सा, ते कलकत्त्याला असताना साध्या चिकणी-सुपारीवर गालिबला कुणी छेडले होते, यावर तुमची शायरी होऊन जाऊ द्या! असे आवाहन केले. या सुपारीच्या दिसण्या-असण्यावरच्या अफलातून शायरीची भली मोठी झलकच गालिबने पेश केली! गालिबच्या एक महत्वाचा शेर आहे. जिक्र ऊस परी-वंश का और फार बयां अपना बन गया रिकीब आखिर, था जो राजदां अपना त्या परिच्या सौंदर्याचे वर्णन आणि तेही माझ्या भाषेतून, माझ्याकडून ऐकले आणि माझा जवळचा असा मित्र आता या प्रेमाच्या नात्यात माझा प्रतिस्पर्धी झाला (आता तो तिच्यावर प्रेम करायला लागला) कलकत्त्याला गालिब दीडेएक वर्ष राहिला होता. तिथल्या धनिकांनी मुशायरे, मुजरे आयोजित केलेले असायचे, गालिबचा तिथे सन्मानही व्हायचा. गालिबने या बद्दल फार जिव्हाळ्याने लिहिले आहे. या मुशायऱ्यामध्ये गालिबचे फारसीचे काव्यवाचन ऐकून फारसी भाषेचे तज्ञ त्याच्यावर नाराज झाल्याची आठवण आहे! गालिबच्या तोंडून फारसीचे कौतुक ऐकून लोकांनी आक्षेप घेतला! गालिब हा आपल्या दुःख, विवंचनेवर हसणारा अद्भुत असा कलावंत होता. हा शेर वाचल्यावर आपल्याला मुन्शी प्रेमचंद यांच्या `पूस कि रात` मधला हलकू आठवतो! मिर्झा गालिबच्या कुतुहूल असणाऱ्या वाचकांना हा संग्रह आवडण्यासारखाच आहे. लेखनातल्या भाषिक काही त्रुटी वगळल्यास, गालिबचे किस्से, त्याची शायरी हे सगळे रोचक आहे. ...Read more

MRUTYUNJAYEE
MRUTYUNJAYEE by RATNAKAR MATKARI Rating Star
पुस्तकप्रेमी

मीना कश्यप शाह *मृत्युंजयी* भयकथा हा रत्नाकर मतकरींच्या लेखनाचा हातखंडा. मी दहावीच्या सुट्टीत असताना भयकथा वाचायला सुरुवात केली आणि त्यांनी मला पुरात झपाटून टाकलं होतं. ही पुस्तकं असायचीही सुटसुटीत जाडीची. त्यामुळे जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी पुस्तक लगणाऱ्या मला सगळीकडे ती घेऊन जात येत असत. क्लास मध्ये लवकर पोहोचले - वाच पुस्तक, बससाठी उभी आहे, वाच पुस्तक; झोप येत नाही, वाच (हे बहुदा चक्राकार रित्या सुरु राहायचं, झोप नाही म्हणून वाचायचं आणि वाचत असायचे म्हणून झोप नाही... त्या वयात असं सगळं चालायचं - लहानपण देगा देवा...) मृत्युंजयी सुरु केली तेव्हा आधीच खेकडा, रंगांधळा वाचून झालं होतं. अजूनही एक संपवलं होतं, पण नाव नाही आठवत (बहुतेक कबंध). त्या पार्श्वभूमीवर मृत्युंजयी फार आवडलं नाही, आणि खरं तर त्यामुळे रत्नाकर मतकरींच्या भयकथा वाचणं थांबलं. अलीकडेच हे इ-बुक मिळालं किंडल वर, पुन्हा वाचलं - आतासुद्धा शेवटच्या परिच्छेदात काय वळण मिळतं त्याची उत्सुकता होती, पण एकूणच माझा patience खूपच कमी झालाय त्यामुळे skip reading, quick reading करत पुस्तक पटकन वाचून संपलं. मृत्यू, अखेर, शेवट ही भावना प्रत्येकासाठी भीतीदायकच. त्या भीतीवर बेतलेल्या कथा ह्या संग्रहात आहेत. अतिमानवीय, फँटसी, भुताटकी अशा धक्कातंत्राचा उपयोग अनेक लेखक करतात. पण मतकरीचं वैशिष्ठय असं, की ते जळमटं सारखी कथा लिहून जातात. मृत्युंजयी मधील कथांमध्ये मृत्यूची अनेक रूपं दिसतात, कथा जिवंत माणसांच्या - पण मृत्यूची चाहूल, त्याची भीती, कधी त्याचं हवेहवेपण, कधी त्याच्याकडे आपणहून जाणे, अशा अनेक रंगढंगांनी मतकरी गूढता कायम ठेवतात. ह्या पुस्तकातील, मृत्यू अवतीभवती असलेल्या प्रत्येक कथेत, आपणा सर्वांना नक्कीच सुप्त आकर्षण वाटत असलेल्या अनेक गूढ गोष्टी येतातच... मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी करण्याची अतिमानवीय साधना... स्त्री-पुरुषातील शारीरिक आणि मानसिक ओढ... पूर्वी केलेल्या चुका आणि त्याबद्दलचा सल... जुलमाचा प्रतिशोध... अतिमानवीय शक्तींनी झपाटणे... भूतबाधा, भूतांशी गाठभेट... मृत्यूच्या अनेकविध तऱ्हा... मानसिक संतुलन ढळणे... आणि तत्सम. ह्या कथाप्रकारात महत्वाचं असतं, ते शेवटच्या काही वाक्यांमधे कथेला दिलेलं वळण आणि त्यामुळे वाचकाला बसलेला धक्का. रत्नाकर मतकरींच्या गूढकथा म्हणूनच खूप प्रभावी ठरतात. आता मात्र हे धक्का तंत्र बऱ्याच जागी पाहायला मिळतं - OTT वरच्या अनेक चित्रपट किंवा नाट्यमालांमधे हे तंत्र कथाकार वापरतात, आणि लोकांना हे पहायला खरंच खूप आवडतं, म्हणूनच त्या प्रसिद्ध होतात. अलीकडचं उदाहरण "वाळवी" चित्रपट! मृत्युंजयी मधे देखील काही कथा असा आनंद देऊन जातात. पण असं आहे ना "अति सर्वत्र वर्जयेत" - त्यामुळे बऱ्याच कथांच्या शेवटचा अंदाज लागतो आणि त्यांचा प्रभाव कमी होतो. सुरुवातीला जी गूढकथांची पुस्तकं मी वाचली, तेव्हा हे धक्कातंत्र मला नवीन होतं, त्यामुळे त्यात हा अंदाज लागत नव्हता. कदाचित मृत्युंजयी तेव्हा वाचलं आणि आताही वाचलं ते ह्या तंत्राचा अति वापर झाल्यावर वाचलं गेलं म्हणून असेल, पण कमी प्रभावी वाटलं हे खरं. अर्थात प्रत्येक गोष्टीत (सध्या इतर कथांमधे फारसे न सापडणारे) एक समान सूत्र आहे - ते म्हणजे, *वाईटाचं कधीच भलं होत नाही*. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, कधीही उचलून वाचायला सुरुवात करून काही मिनिटात एक गोष्ट संपते. सध्याच्या व्यग्र काळात हे पुस्तक पुन्हा वाचायला सोपे गेले, नक्कीच. आणि मी पुन्हा एकदा ह्या कथाप्रकाराकडे आकर्षितही झाले आहे... पुन्हा सगळी गूढकथांची पुस्तकं वाचायला हवीत. ...Read more