* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: DNYANSURYACHI SAWALI
  • Availability : Available
  • ISBN : 9788184985238
  • Edition : 2
  • Publishing Year : JANUARY 2014
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 320
  • Language : MARATHI
  • Category : BIOGRAPHY
  • Available in Combos :MANJUSHRI GOKHALE COMBO SET -14 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
DNYANSURYACHEE SAWALI IS A NOVEL BASED ON THE LIFE OF SOPANDEO, A THIRTEENTH CENTURY SAINT AND THE YOUNGER BROTHER OF SAINT DNYANESHWAR. SOPANDEO LIVED UNDER THE SHADOW OF THE ELDER BROTHER. LIKE HIS SIBLINGS – NIVRUTTINATH, DNYANESHWAR AND MUKTABAI -- SOPANDEO ALSO SUFFERED IN THE CHILDHOOD. HE WAS STUDIOUS BY NATURE AND THE CONVERSATION BETWEEN NIVRUTTINATH (THE ELDEST BROTHER WAS THE SPIRITUAL GURU OF BOTH DNYANESHWAR AND SOPANDEO) LED TO HIS WRITING THE SOPANDEVI WHICH IS THE TRANSLATION OF THE BHAGWAD GEETA . SOPANDWO’S WORK DIFFERS FROM THE DNYANESHWARI WHICH IS ALSO THE RENDERING OF THE BHAGWAD GEETA INTO MARATHI IN THAT IT IN A DIFFERENT FORM OF MARATHI. LIKE DNYANESHWAR, FEELING THAT HIS AIM OF LIFE HAS BEEN REALIZED, SOPANDEO ALSO UNDERTOOK SANJEEVAN SAMADHI (ENDING ONE’S LIFE VOLUNTARILY) AT A VERY YOUNG AGE. THE FLASHBACK STYLE OF NARRATION WHICH BEGINS WITH THE SANJEEVAN SAMADHI OF DNYANESHWAR AND ENDS WITH THAT OF SOPANDEO TRACING IN BETWEEN THE LIFE OF THE YOUNG SAINT AND HOW HE ATTAINED THE SAINTHOOD IS EFFECTIVE.
...नामदेव पुढे झाले. त्यांनी सोपानाच्या पायांवर लोळण घेतली. सोपानानं डोळे उघडले. वाकून त्यानं नामदेवांना उठवलं. दुसऱ्या क्षणाला नामदेवांनी सोपानाला घट्ट मिठी मारली. इतकी घट्ट, की जणू ती कुणी सोडवणं शक्य नव्हतं. जणू ते सोपानाला जाऊच देणार नव्हते. एका मिठीला इतके अर्थ असू शकतात? काय नव्हतं त्या मिठीत? सोपानाला अडवण्याची जिद्द, तो समाधी घेणार म्हणून होणा-या वियोगाचं दु:ख, आपण त्याला थांबवू शकत नाही म्हणून वाटणारी असाहाय्यता, त्याच्या वियोगाची वेदना, एवढ्या लहान वयातली त्याची स्थितप्रज्ञता बघून वाटणारं कौतुक, त्याचा निरागस चेहरा बघून पोटातून तुटून येणारी माया, त्याच्या अलौकिक बुद्धिसामथ्र्याला केलेलं वंदन, या पुण्यात्म्याचा सहवास आपल्याला लाभला म्हणून वाटलेली धन्यता, आपल्यापेक्षा वयानं कितीतरी लहान असलेल्या या पोराला समाधी घेताना बघण्याचं करंटेपण आणि या सर्वांवर कळस, म्हणजे मनात अतिपूज्य भावना असल्यामुळे ज्ञानोबा माउलीला आपण अशी घट्ट मिठी मारू शकलो नाही, म्हणून आता त्या ज्ञानसूर्याचीच सावली असलेल्या सोपानाला आपण घट्ट मिठी मारतो आहोत, याची सार्थकता. एका मिठीमध्ये एवढ्या भावभावना सामावलेल्या असतात, हे नामदेवांनाही उमजलं नसेल; पण नामदेवांनी सोपानाला कडकडून मारलेली मिठी भिजलेल्या डोळ्यांनी बघणा-या जनाबार्इंना मात्र हे सगळे सगळे अर्थ समजले....
अश्वमेध ग्रंथालय आयोजित `अक्षरगौरव पुरस्कार` २०१४ . * महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था पुरस्कार २०१६- किरण संजीवनी पुष्पलता रानडे परितोषिक.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #MANJUSHRIGOKHALE #TUKYACHIAVALI #JOHARMYBAAPJOHAR #OMKARACHIREKHJANA #DNYANSURYACHISAVALI
Customer Reviews
  • Rating StarManda Kulkarni

    हे पुस्तक वाचताना मुक्ताई आणि तीन भावंडाचे जे हाल झाले त्या बद्यल लेखिकेन(मंजुश्री गोखले)लिहताना जे शब्दप्रयोग केले आहेत,त्यामुळे नजरे समोर त्यांच सगळ जीवन ऊभ रहात . आईवडीलानी देहत्याग केल्या नंतर सुद्धा कर्मठ लोकांनी त्याना किती त्रास दिा ते वाचताना मला तर खरोखर गहिवरुनच येत होत.मन ऊद्वीग्न झाल वाचुन.एवढा त्रास सहन करुन सुद्धा किती शांततेन,सयंमान हे चार भावंड राहीले. पुस्तक पुर्ण झाल तरी डोक्यातुन जात नाही,वाचनिय पुस्तक. ...Read more

  • Rating StarLOKPRABHA 02-11-2018

    मंजुश्री गोखलेलिखित ‘ज्ञानसूर्याची सावली’ ही कादंबरी निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपानदेव आणि मुक्ताबाई या मराठी माणसाच्या काळजाचा विषय असलेल्या चार भावंडापैकी सोपानदेवांचं चरित्र रेखाटते. वडील विठ्ठलपंतांचा संन्यास, गुरूच्या आज्ञेने परत गृहस्थाश्रम स्वकारणं, मग समाजाने केलेल्या हेटाळणीमुळे पत्नी रुक्मिणीसह केलेला देहत्याग या सगळ्यातून ‘संन्याशाची पोरं’ म्हणून हिणवली गेलेली ही चार मुलं... प्रत्येकाचं व्यक्तिमत्त्व वेगळं तरीही एकमेकांमध्ये विरघळलेलं आणि त्यांच्यातही ज्ञानेश्वर म्हणजे साक्षात ज्ञानसूर्य. त्यामुळेच स्वत:चं व्यक्तिमत्व असूनही इतर भावंडं या ज्ञानसूर्याची सावली ठरली. त्यातल्या एका सावलीचं म्हणजेच सोपानदेवांचं चरित्र या कादंबरीत आहे. या चारही भावंडांचं जगणं आणि ज्ञानदेवांच्या समाधीनंतर सोपानदेवांनी घेतलेली समाधी इथवरचा प्रवास कादंबरीत वाचायला मिळतो. या अलौकिक भावंडांचा लेखिकेच्या कल्पनेतून झालेला जीवनप्रवास वाचनीय आहे. ...Read more

  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    निवृत्तीनाथांच्या कृपेने गुरूप्रसाद लाभला. ज्ञानेश्वरांच्या छायेत आत्मविकास साधला आणि मुक्ताईच्या सहवासात जिवंतपणीच मुक्तिस्वातंत्र्य अनुभवले असे संतश्रेष्ठ सोपानदेव! त्यांची जीवनगाथा वेगळी काय असणार? चारही भावंडे म्हणजे ‘परब्रह्मीचे ठसे.’ द्वैत राखन अद्वैत साधणारी ही अवतारी मंडळी भागवत धर्मातील कुलदैवते ठरावीत इतकी महान अशा या संतसज्जनांवर लिहिताना चौघांना एकमेकांपासून वेगळे काढता येतच नाहीत, परंतु हा दैवी चमत्कार मंजुश्री गोखले यांनी करून दाखवला आहे. या प्रेरणापूर्तीचे नाव आहे ज्ञानसूर्याची सावली! एक तर संतचरित्रे म्हणजे न संपणारे संशोधन सुमारे सातशे वर्षांपूर्वीचा इतिहास उपलब्ध असला तरी तो श्रीमंत राजामहाराजांचा. साधुसंत निरहंकारी. ते स्वत:बद्दल सांगायला संकोच करतात. संतशिरोमणी नामदेवांनी या भावंडांची चरित्रे लिहिली नसती तर केवढा मोठा काळ अज्ञात राहिला असता. त्याचा धांडोळा घेत मंजुश्रीतार्इंनी याआधी ‘तुकयाची आवली’, ‘जोहार मायबाप’ (चोखामेळा), ‘ओकाराची रेख जना’ (जनाबाई) या जीवनगाथा लिहिल्या आणि अफाट लोकप्रिय झाल्या आहेत. विविध विषयांवरील त्यांच्या सुमारे पंचवीस पुस्तकांनी त्या वाचकप्रिय झाल्या असून अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. डॉ. अशोक कामत हे संतसाहित्याचे जिव्हाळ्याचे अभ्यासक. त्यांच्या प्रस्तावनेत ‘ज्ञानसूर्याची सावली’चे महत्त्व विशद करताना म्हटले आहे की, तेराव्या शतकातील केवळ तीन दशकांचा दस्तऐवज अस्सल आहे का? हा प्रश्न संशोधकांना कायम अस्वस्थ करतो. लोकाश्रयावर जागृत राहिलेली संतांची समाधिस्थाने जिवंत असली तरी सारे काही श्रद्धेच्या बळावरच कल्पनेला राबवून लेखन करावे लागते. ते मंजुश्रीतार्इंनी पुरेसे समाधानकारक केले आहे. सूर्य दाखवता येतो, पण किरणांचे काय? कवडसे तेजस्वी असतात. सूर्यापासून ते वेगळे नसतात हेच दाखवून सोपानदेव वेगळेपण अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे. निरनिराळ्या प्रसंगी झालेल्या चर्चेत सोपानदेवांनी आपली प्रज्ञा आणि प्रतिभा यांची वेळोवेळी जी चमक देदीप्यपूर्ण दाखवली आहे ती मुळातूनच वाचण्यासारखी आहे. यातील दशक्रिया विधीची सूक्ष्म पण महत्त्वाची माहिती आणि संजीवन-समाधीचे रहस्य लेखिकेने यथार्थपणे चित्तारले आहे. हटयोगातील गूढरम्य भाषा अधिक सोपी करण्याचा प्रयत्न केला तरी काही सांकेतिक शब्द तेच ठेवल्याने वाचकांस पुरेपूर अर्थबोध होऊ शकतो. अभ्यासकातील मतभेदांचा आदर करून जसे आहे तसे सत्य शोधण्याचा हा लेखनप्रवास आनंदाच्या इच्छित स्थळी वाचकांस घेऊन जातो आणि आत्मिक समाधान देतो. सोपानदेवांच्या समाधीचा प्रसंग आणि सासवडचा परिसर नामदेवांच्या अभंगांचा आधार घेऊनही लेखिकेची स्वतंत्र कल्पनाशक्ती सहज नजरेत भरते. ‘प्रभात’च्या कृष्णधवल चित्रपटमालिकेत सहज सामावले जाईल असे हे संपूर्ण कथानक प्रत्येक भाविक आणि रसिकाने वाचायलाच हवे. फाल्गुन ग्राफिक्सचे मुखपृष्ठ अप्रतिम आहे. -राम कर्णिक ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more