* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THOUGHT LEADERS
  • Availability : Available
  • Translators : SUPRIYA VAKIL, VILAS WADKAR
  • ISBN : 9788177664300
  • Edition : 6
  • Publishing Year : NOVEMBER 2003
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 418
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
WHAT IS THERE IN THIS BOOK `THOUGHT LEADERS?` IT EXPRESSES TREMENDOUS NECESSITY OF BRINGING NEW IDEAS INTO REAL LIFE, ACCEPTING CHALLENGES, BECOMING FREE AND AUTONOMOUS, AND INCREASING THE STANDARD OF LIVING. THIS BOOK PRESENTS THE GRAPH OF 22 OF INDIA`S VISIONARIES WHO WERE VERY SUCCESSFUL MANAGERS TOO. ALL THESE PEOPLE ARE FROM DIFFERENT BUSINESSES, THEY ALL HAVE DIFFERENT BACKGROUNDS. THIS BOOK TRIES TO FIND THE ANSWER FOR THE QUESTION HOW THEY GOT TO THE TOPMOST POSITIONS? THIS BOOK IS THE COLLECTION OF THE FUNDAMENTALS OF THE EXCEPTIONAL BUSINESSMEN. THIS IS BASICALLY BASED ON THE INTERVIEWS WITH THESE PEOPLE. THESE INTERVIEWS HAVE REVEALED THESE PEOPLE AS SUCCESSFUL MANAGER, LEADERS AND HUMAN BEINGS TOO. THEY ALSO REVEAL THE UPS AND DOWNS IN THEIR LIVES, THE TURNING POINTS OF THEIR CAREERS, THE MOMENTS OF THEIR INSPIRATIONS AND THEN THEIR JOURNEY TOWARDS A THOUGHTFUL LEADERSHIP AND SUCCESS. THESE THOUGHT LEADERS WILL SURELY IMPRESS YOU, IGNITE YOU AND INSPIRE YOU TO ACHIEVE YOUR GOAL WHILE WALKING TOWARDS IT, CROSSING THE HURDLES, MEETING ALL THE EXPECTATIONS ON THE WAY, AND SINCERELY REACHING THE MINUTEST OF OUR FEELINGS, RELIGIOUSLY. THIS BOOK INCLUDES THE INTERVIEWS WITH THE FOLLOWING HIGHLY INTELLIGENT PEOPLE: ANU AAGA, DHANANJAY BAKHALE, PRAMOD CHOUDHARY, RAJABHAU CHITALE, HUMAYUN DHANRAJGIR, BHANWARLAL JAIN, DEEPAK KANEGAONKAR, BHAUSAHEB KELKAR, RAVI KHANNA, VARGIS KURIYAN, RAGHUNATH MASHELKAR, KIRAN MUJUMDAR, NARAYAN MURTI, DEEPAK PAREKH, PRATAP PAWAR, PRAKASH RATNAPARAKHI, RONY SCREWWALA, SARTAJ SINGH, ASHOK SUTA, VIKRAM TANNON, SUDHIR TILLU, MANOJ TIRODKAR.
थॉट लीडर्स` या पुस्तकात आहे तरी काय? ``नव्या कल्पना प्रत्यक्षात आणणं आणि आव्हान स्विकारणं, स्वतंत्र होण्याची अथवा स्वायत्ततेची गरज आणि जीवनाचा दर्जा सुधारणं, या गोष्टींची अत्यंतिक निकड ... या पुस्तकात भारतातील २२ दृष्ट्या व्यवस्थापकांच्या कार्याचा आलेख आहे. या व्यक्ती निरनिराळ्या व्यवसायातील आहेत, यांची पार्श्वभूमीही भिन्न-भिन्न आहे. या भारतीय व्यक्तींना असं खास स्थान कशामुळे मिळालं त्यावर दृष्टीक्षेप टाकण्याचा प्रयत्न या पुस्तकात करण्यात आला आहे. या पुस्तकात व्यवस्थापक व नेते यांच्या जीवनातील महत्वपूर्ण वळणं, त्यांना प्रेरक ठरणारे घटना-प्रसंग यांचं चित्रण आहे... या सगळ्यातून सुरु झालेला हा वैचारिक नेतृत्वांचा प्रवास आणि त्यांची यशोगाथा यावर या पुस्तकात प्रकाश टाकण्यात आला आहे. आपल्या जाणीवेच्या सूक्ष्म, सखोल थरांपर्यंत पोचून, समृद्ध आणि दैदिप्यमान कामगिरी घडविण्यासाठी सहाय्यभूत ठरणा-या घटकांविषयी `थॉट लीडर्स` आपल्याला मोलाचे मार्गदर्शन करते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #BIOGRAPHY #THOUGHT LEADERS #SHRINIV PANDIT #SUPRIYA VAKIL #थॉट लीडर्स #VILAS WADKAR
Customer Reviews
  • Rating Starसौ. शकुंतला जोशी, पुणे

    मी आपले नुकतेच `थॉट लीडर्स` हे पुस्तक वाचले. श्रीनिवास पंडित व आपले पुस्तक खूपच छान आहे. उत्तम रेखाटलेली व्यक्तिचित्रे वाचायला मिळाली. मार्गदर्शक व उपयुक्त अशा विविध गुणवैशिष्ट्यांमुळे आपले थॉट लीडर्स खूपच छान आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठही आकर्षक आहे.

  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 01-08-2004

    विचार समृद्ध थॉट लीडर्स… नव्या कल्पना प्रत्यक्षात आणणं आणि आव्हानं स्वीकारणं, स्वतंत्र होण्याची किंवा स्वायत्ततेची गरज आणि जीवनाचा दर्जा सुधारणं अशा गोष्टींची निकड आजच्या आधुनिक युगात भासते आहे. अशी निकड असणारे स्वत:चा मार्ग शोधतातच; पण त्यांना एखाद पाऊलवाट जरी मिळाली, तरी त्यावरून चालण्याचे समाधान त्यांना लाभू शकते. अशा प्रयत्नशीलांसाठी ‘थॉट लीडर्स’ हे श्रीनिवास पंडित यांचे पुस्तक सुप्रिया वकील आणि विलास वाडकर यांनी अनुवादित केले आहे. यात भारतातील एकूण बावीसजणांची व्यक्तिचित्रणे वा कार्याचा आलेख आला आहे. अन् जागा, धनंजय बखले, प्रमोद चौधरी, राजाभाऊ चितळे, हुमायून धनराजगीर, भ्ंवरलाल जैन, दीपक कानेगावकर, भाऊसाहेब केळकर, रवी खन्ना, वर्गीस कुरीयन, रघुनाथ माशेलकर, किरण मुजुमदार, नारायण मूर्ती, दीपक पारेख, प्रताप पवार, प्रकाश रत्नपारखी, रॉनी स्क्रूवाला, सरताजसिंग, अशेक सुना, विक्रम टन्नन, सुधीर टिल्लू आणि मनोज तिरोडकर या नामावलीकडे बघूनच त्यांची व्यक्तित्वे काही अशी स्मरू लागतात. मिठाई उत्पादनापासून ते माहिती तंत्रज्ञान, डेअरी, जैव रसायनं, सॉफ्टजेल्स, औषधे उत्पादने, प्रतिमानिर्मिती, इंजिनिअरिंग, विज्ञान अशा क्षेत्रांतली ही सारी मंडळी आहेत. केवळ महाराष्ट्रापुरत्या यांच्या सीमा नसून ही मंडळी इतरही ठिकाणची आहे. पस्तीस वर्षांपासून ते ७९ वर्षांपर्यंतच्या वयोगटातील हे उद्योजक आदर्शत्वाचा नमुना म्हणता येतील. विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या मतांची नोंद घेऊन या ‘लीडर्स’ची निवड केल्याचे दिसते. कार्यक्षेत्रातली अत्त्युत्तम कामगिरी. भविष्यकाळात उज्ज्वल प्रगतीची आशा, इतरांसाठी स्फूर्ती व चैतन्यदायी आणि सर्जनशीलता हे निकष यासाठी लावले गेलेले दिसतात. एकंदर दोन भागांपैकी पहिल्यात त्यांची जडणघडण, त्यांच्यावरचा अनुभवी सल्लागारांचा प्रभाव, आपल्याला कलाटणी देणारी महत्त्वाची वळणं आहेत. त्यांचे वैशिष्ट स्वभावविशेष, त्यांची विचारप्रक्रिया, त्यांची कौशल्ये-कार्यक्षमता आणि आगळेपण सिद्ध करणारे घटक या साऱ्यांचे वर्णन आहे. ‘‘ग्राहकाची स्वादिष्ट पदार्थांची भूक आम्हाला प्रेरणा देते.’’ -राजाभाऊ चितळे. ‘‘उपयोगात आणता येण्याजोगं संरक्षित ज्ञानच फक्त, संपत्तीनिर्मिती करू शकते.’’ -रघुनाथ माशेलकर ‘‘ग्राहकाला चोवीस तासांच्या आत प्रतिसाद देणं हे धार्मिक कायं आहे.’’ -अन् आगा. या तिघांची ही वाक्य त्यांच्या जीवनाचे सार दर्शवितात. अशी वाक्य प्रत्येकाच्या चित्रणात लिहिलेली दिसतात. जणू प्रत्येकाच्या यशाचा तोच मूलमंत्र आहे. दुसऱ्या भागात या यशस्वी उद्योजकांच्या जडणघडणीत आढळणाऱ्या समान घटकांचं तुलनात्मक विवेचन केलेलं दिसतं. यांच्यातले समान स्वभावविशेष आणि सोर्स कोड रेखाटले आहेत. त्यांच्या कार्यक्षेत्रातली त्यांची व्यक्तिमत्त्वे-प्रतिमा यांचाही विचार यात एकत्रितपणे केला आहे. शेवटी असलेल्या परिशिष्टात त्रोटक महितीचा तक्ता दिलेला आहे. यशस्वी नेते उद्योजकांच्या मुलाखतीवर आधारलेल्या या लेखनातून त्यांच्या अंतरंगाचं दर्शन घडतं. जवळपास तीन वर्षे चाललेला एक प्रयत्न या पुस्तकाद्वारे शब्दबद्ध झालेला दिसतो. मात्र अनुवादात वापरलेली भाषा त्यामानाने ग्रांथिक अधिक वाटते. आजच्या पिढीला इंग्रजीचा सराव असल्याने तेच शब्द वापरले असते तरी फारसे बिघडले नसते. काही वेळा वाक्यरचना, शब्दप्रयोग हे मराठीनुसार न करता इंग्रजीच्या धर्तीवर रचलेले वाटतात. आपण जे होऊ शकतो असं आपल्याला वाटतं असतं, तसं होण्यासाठी आपल्याला कुणीतरी स्फूर्तिदायी व्यक्ती असणं ही आपली मुख्य गरज असते. असं राल्फ वाल्डी इमर्सन म्हणतो. म्हणूनच जाणिवेच्या सूक्ष्म सखोल थरापर्यंत पोचून, समृद्ध आणि देदीप्यमान कामगिरी घडवण्यासाठी साहाय्यभूत ठरणाऱ्या घटकांविषयी सहाय्यभूत ठरणाऱ्या घटकांविषयी ‘थॉट लीडर्स’ आपल्याला मोलाचे मार्गदर्शन करते. -राधिका कुंटे ...Read more

  • Rating StarCHATURA MASIK - FEB 2006

    Winners not do different things they do things differently असं म्हणतात. आज आपण जे पुस्तक पाहणार आहोत ते जरा वेगळं आहे. अतिशय माहितीपूर्ण पण रंजक. आपल्याला सगळ्यांना स्फूर्ती देईल असं. अतिशय माहितीपूर्ण श्रीनिवास पंडित यांनी लिहिलेलं सुप्रिया वकील आणिविलास वाडेकर यांनी अनुवाद केलेलं ‘थॉट लीडर्स’ अर्थात वैचारिक नेतृत्व, अथक परिश्रम आणि बुद्धिमत्ता यांचा कस लावून गगनाला गवसणी घातलेल्या विविध क्षेत्रांतल्या २२ जणांच्या कर्तृत्वाचा हा वेध. असं म्हणतात की गरज ही शोधांची जननी असते. या मंडळींना गरज कशाची होती? तर त्यांच्यामधल्या सुप्त गुणांना वाव देण्याची, नव्या कल्पना प्रत्यक्षात आणण्याची आणि मग सुरुवात झाली ती या वैचारिक नेतृत्वाला. या २२ द्रष्ट्या व्यवस्थापकांच्या खरोखर देदिप्यमान कार्याचा हा आलेख आहे. या सर्वांची पार्श्वभूमी भिन्न आहे. व्यवसाय वेगळे वेगळे आहेत. विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. समान धागा आहे तो म्हणजे धडपड. त्यांच्या वैयक्तिक नेतृत्वाचा प्रवास. या पुस्तकात २० पुरुष आणि २ स्त्रिया अशा २२ नेतृत्वांचा विचार केला आहे. त्यांची जडणघडण, त्यांच्यावर असणारा इतरांचा प्रभाव, कलाटणी देणारी वळणं, त्यांचे स्वभावविशेष, विचार, कौशल्य, कार्यक्षमता या सगळ्यांचं वर्णन पुस्तकात आहे. यात सात नवउद्योजक आहेत. सहा नवउद्योजक व्यवस्थापक आहेत. तीन नवव्यवस्थापक उद्योजक आहेत. तीन नवउद्योजक कुटुंब आहेत. तीन अपवादात्मक व्यावस्थापक आहेत. नारायण मूर्ती, प्रताप पवार, वर्गीस कुरियन, अनू आगा, रघुनाथ माशेलकर, किरण मुजुमदार, रॉनी स्क्रूवाला ही त्यातील काही नावे. पुण्यातील थरमॅक्स या ऊर्जा आणि पर्याव्रण क्षेत्रातल्या अतिशय यशस्वी उद्योगसमूहाच्या अनू आगा म्हणतात की, ग्राहकाला चोवीस तासाच्या आत प्रतिसाद देणं हे धार्मिक कार्य आहे. त्यांचे वडील उद्योजक होते ते संस्कार, पतीनं दिलेलं सहकार्य व्यक्ती म्हणून विकसित होण्याची आणि व्यावसायिक सहचारिणी बनण्याची क्षमता ओळखून त्यांच्या पतीनं केलेली जडणघडण या गोष्टींनी त्यांच्या आयुष्यावर ठळक प्रभाव पाडला. वैयक्तिक आयुष्यात पराकोटीची दु:ख सोसून त्यांनी बदलांना समर्थपणे तोंड दिलं. मनुष्यबळ विकास विभागात आज थरमॅक्सचं वेगळं स्थान आहे. नोवर्तिस इंडिया लि. मुख्य वैद्यकीय अधिकारी धनंजय बखले यांची कारकीर्द ही अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. इतरांनी न चोखळलेल्या वाटा तुडविल्या जाव्यात यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. भारतीय औषध उत्पादन क्षेत्रात नव्या पर्वाचा आरंभ त्यांनी केला आहे. दर्जेदार मिठाई, दूध आणि खाण्याचे पदार्थ म्हणजे चितळे बंधू मिठाईवाले हे समीकरणच आहे. चितळे उद्योगसमूहाची उलाढाल कोट्यवधी रुपयांची आहे. राजाभाऊ चितळे यांनी नोकरी करणं हा विचारच कधी केला नाही. राजस्थानी आणि पंजाबी मिठाई व्यावसायिकांमध्ये घट्ट पाय रोवून स्वत:ला सिद्ध करणारे राजाभाऊ चितळे म्हणतात की, तंत्रज्ञाना आणि बाजारपेठ या आम्हाला समस्या नाहीत. वृद्धीचा वेग व्यवस्थापनाचा अभाव या चिंता आहेत. जागरुकतेनं कृती घडवायला हवी. थांबला तो संपला. धवलक्रांतीचे जनक डॉ. वर्गीस कुरियन यांनी आणंद पॅटर्न सुरू केला. संघटनकौशल्य, कणखर वृत्ती, व्यूहरचना यांनी हा पॅटर्न यशस्वी केला. सी.एस.आय.आर. या विज्ञानसंस्थेचे प्रमुख संचालक उत्तम पॉलिमर शास्त्रज्ञ व्यवस्थापक डॉ. रघुनाथ माशेलकर यांचा कर्तृत्व आलेख अक्षरश: थक्क करणारी आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वत:ला सिद्ध केलेलं हे नेतृत्व. इन्फोसिसचे संस्थापक अध्यक्ष नारायण मूर्ती हे एक विलक्षण व्यक्तिमत्व. त्यांचं तत्वज्ञान म्हणजे कबूल करताना थोडं कमी कबूल करणं आणि देताना थोडं जास्त देणं. विशिष्ट व्यूहरचना, टीमवर्क, पुन:पुन्हा येणारे ग्राहक, कदर, कायद्याचं पालन या काही महत्त्वाच्या गोष्टी नारायण मूर्ती मानतात. इन्फोसिसचे संस्थापक अध्यक्ष नारायण मूर्ती हे एक विलक्षण व्यक्तिमत्व. त्यांचं तत्वज्ञान म्हणजे कबूल करताना थोडं कमी कबूल करणं आणि देताना थोडं जास्त देणं. विशिष्ट व्यूहरचना, टीमवर्क, पुन:पुन्हा येणारे ग्राहक, कदर, कायद्याचं पालन या काही महत्त्वाच्या गोष्टी नारायण मूर्ती मानतात. अवघ्या वीस वर्षांपूर्वी सुरू झालेल्या ‘ग्लोबल एंटरप्राइजेस’चे संस्थापक मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज तिरोडकर (वय ४०) वल्र्ड यंग बिझिनेस अचिव्हर हे बक्षीस मिळवलेले. संपत्ती निर्मिती वृद्धीचं अर्थकारण, लोकव्यवस्थापन आणि अथक शिकत राहणं हे त्यांच्या यशाचं गमक आहे. यापैकी बहुतेकांनी वयाची पन्नाशी ओलांडली असली तरी ते जणू चाळिशीचेच आहेत. कुटुंबव्यवस्थेचा भक्कम पाया, त्यांचे कवच, ऊब याच्या खुणा या नेत्यावर आहेत. बहुतेक सर्वांनी आपल्या अभ्यासक्षेत्राशी संबंधित व्यवसाय निवडला आहे. बहुतेक या सगळ्यांच्या आयुष्यात अशी घटना प्रसंग प्रेरणा झाली आहे. सर्वांमध्ये चिकाटी, एकाग्रता, ऊर्जा, सतत ज्ञानग्रहण, मूल्य, धोका पत्करण्याची तयारी हे गुण सर्वांमध्ये समान आहेत. अशी ही वैचारिक नेतृत्व. यांना या पुस्तकात स्थान मिळालं कारण कामगिरीचा चढता आलेख, अत्युत्तम कामगिरी, प्रगती साधण्याची गुणवत्ता, नवीन उपक्रम घडविण्याची क्षमता सकारात्मक मनोवृत्ती, क्षमता हे पुस्तक सर्वांनी जरूर वाचावं. या नेत्यांमधल्या चैतन्याचा स्पर्श त्यांच्या सहवासात आपण नसलो तरी होतो. आपल्यामधूनही अशी अनेक वैचारिक नेतृत्व जन्मतील जी स्वत:बरोबर इतरांचा विकास घडवतील. इतिहास घडवतील. एक सुंदर वाक्य आठवतंय. If vision is one year cultivate flowers. But if vision is eternally cultivate people. ...Read more

  • Rating StarMUMBAI MAHANAGAR 10-04-2004

    नेतृत्त्वाची यशोगाथा... उद्योग हा उद्योगसारखा करावा, त्यात कोणतही इतर तत्त्वज्ञान आणू नये, असं एका प्रसिद्ध उद्योगपतीने म्हटलंय. पण उद्योगाचं असं वेगळं एक तत्त्वज्ञान असतंच, तेच तत्त्वज्ञान मांडणारं हे पुस्तक थॉट लीडर्स. एकूण बावीस उद्योजक व्यवस्थपकांच्या वाढीचा, वृत्तीचा, वैचारिकतेचा या तपशील यात आहे. प्रस्तावनेतच या पुस्तकाने लेखक श्रीनिवास पंडित म्हणतात, ‘विलक्षण यशप्राप्तीसाठी कारणीभूत ठरलेल्या या व्यक्तींच्या स्वभाव, वृत्ती, त्यांची कार्यक्षमता या सर्व गोष्टींची मी नोंद केली आहे. या गोष्टी अनुसरायला अगदी साध्या, पचायला आणि अवलंबायला अतिशय सोप्या आहेत.’ कोणताही आविर्भाव न आणता सांगितलेल्या आणि लिहिलेल्या या गोष्टी आणि ती माणसं आपलीशी आणि आपल्यासाठीच वाटतात. एका अर्थाने हे पुस्तक म्हणजे उद्योजकाच्या प्रगतीचा आलेख आहे. तर दुसऱ्या आजूने व्यवस्थापनाची भगवद्गीताच आहे. बावीसपैकी दोन स्त्रियांच्या कार्यकर्तृत्वाचा समावेश या पुस्तकात आहे. त्यांच्यापैकी अनू आगा म्हणतात, ‘संस्था चालवण्यासाठी सर्वात लायक असणाऱ्या व्यक्ती म्हणजे व्यावसायिक व्यक्ती. अशाच व्यक्ती संस्था चालवतात. संस्थेचं यश गृहीत धरून चालत नाहीत. ‘पुण्याच्या ‘थरमॅक्स’ या उद्योग समूहाच्या त्या अध्यक्षा आहेत. पतीच्या निधनानंतर त्यांनी उद्यागाची धुरा यशस्वीपणे सांभाळली. करिअरच्या सुरुवातीलाच ‘टॅन्झॅक्शनल अ‍ॅनॅलिसिस’चा केलेला अभ्यास त्यांना पूरक ठरला, कारण त्यात त्या शिकल्या होत्या की, तुम्हाला तुमचे हक्क आहेत. स्वत:च्या कृत्यांना तुमचे तुम्हीच जबाबदार असता, आणि तुम्ही इतरांच्या कृत्यांची जबाबदारी आपल्या शिरावर घेऊ शकत नाही. नोवार्तीस इंडिया लिमिटेडचे वैद्याकीय अधिकारी असलेले धनंजय बखले यांनी तरूण वयातच केलेली प्रगती अचंबित करणारी आहे. ते म्हणतात. ‘बहुविध क्षेत्रातल्या शिस्तबद्ध कार्यपद्धतीसोबत उच्च दर्जाची कार्यक्षमता अंगी असावी लागते. आपल्याकडे प्रचंड आध्यात्मिक शहाणपण आहे. खूप ज्ञानसंचय आहे. पण संशोधनाबाबतची सुज्ञता आपल्याकडे नाही. मध्यमवर्गीय सुखासिन वृत्तीमुळे लोक सामानय दर्जाचे बनतात.’ असंही त्यांचं निरीक्षण आहे. सुरुवातीला हाताखालच्या लोकांच्या हाताखाली काम शिकत शिकत ‘प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड’ या ६० करोड वार्षिक उलाढाल असलेल्या कंपनीचे मालक प्रमोद चौधरींनी आधीच ठरवलं होतं की, ३३व्या वर्षापर्यंत आपण स्वत:चा उद्योग सुरू करायला मोकळं असलं पाहिजे. ‘ग्राहकांशी उद्धटपणे वागणं आणि उर्मट बोलणं यासाठी आपण महाराष्ट्रीयन माणसं कुप्रसिद्ध आहोत, ग्राहकांशी नम्रपणानं कसं वागायचं, हे मी गुजराती माणसांकडून शिकलो.’ असं पुण्याचे मिठाईवाले चितळे यांनी कबूल केलंय. आपल्या उद्योगवाढीसाठी लागणारं अद्ययावत तंत्रज्ञान त्यांनी वेगवेगळ्या देशांतून आणलं, आणि पुण्यात बसून आपल्या उत्पादनाला विशेषत: बाकरवडीला जगाच्या बाजारात मानाने बसवलं. जैन समूह कृषी उद्योगाचे भवरलाल जैन, एस.एच. केळकर आणि कंपनीचे भाऊसाहेब केळकर, ‘कंट्रोल ग्रुप’ चे रवी खन्ना ही माणसं म्हणजे कल्पकता, परिश्रम, धाडस आणि दक्षता यांची चालती-बोलती उदाहरणं आहेत. ‘माझा आशावाद कधीही न थकणारा आहे, तो खचवता येणं कठीण आहे,’ असा दुर्दम्य विश्वास असलेले दीपक कानेगावकर. खरं तर या उद्योजकाला संगीत आणि सुगंधाचं वेड. रसायन उद्योगात पाय घट्ट रोवल्यानंतर, आता आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्याची वेळ आली आहे, असं वाटल्यानंतर त्यांनी जगाला एक अनमोल भेट दिली, ती म्हणजे लता मंगेशकर यांचया नावाचा बॅन्ड असलेला ‘लता’ नावाचा सुगंध. १९७०च्या दशकातल्या ‘दुधाचा महापूर’ या जगातल्या सर्वांत मोठ्या डेअरी विकास कार्यक्रमाने भारतात धवलक्रांती घडवली. या धवलक्रांतीचे शिल्पकार वर्गीय कुरीयन. ते म्हणतात, ‘बारीकसारीक वाटणाऱ्या गोष्टींकडे डोळसपणे पाहण्याची वृत्ती, अशा बारीकसारीक गोष्टींतूनच मोठे प्रयत्न घडत असतात तपशिलांचे बारकावे अतिशय महत्त्वाचे असतात.’ आज व्यवस्थापनाच्या क्षेत्रात मानाचं स्थान असलेलं नाव म्हणजे रघुनाथ माशेलकर. त्यांनी सहाव्या वर्षीच वडील गेल्यावर अधनमधनं दुकानांतून नोकऱ्या केल्या. त्याची आई ही त्यांच्यासाठी प्रेरणा होती. ‘द कौन्सिल ऑफ सायंटिफिक अ‍ॅण्ड इंडस्ट्रीयल रिसर्च’ या संस्थेचे ते प्रमुख संचालक आहेत. आपल्या ३६व्या वर्षी पद्मश्री पुरस्कार मिळालेला किरण मुजुमदार, १०० कोटीची उलाढाल असलेला ‘बायकॉन’ या उद्योगसमूहाच्या त्या अध्यक्षा आहेत. त्यांनी व्यवसायाला सुरुवात केली तेव्हा त्यांचं वय २५ होतं. त्या म्हणतात. ‘प्रामाणिकपणा हेच सर्वोत्तम धोरण’ हे वचन मी प्रत्यक्ष व्यवहारात वापरलं. मी माझ्या सहकाऱ्यांना बायकॉनचं स्वप्न आणि माझं व्यक्तिमत्त्व पटवून दिलं.’ १९८१ मध्ये सात जणांनी १०-१० हजार रुपये जमा करून सुरू केलेली ‘इन्फोसिस ही कंपनी. यात सर्वांत पुढे होते नारायण मूर्ती. त्यांची एका गोष्टीवर श्रद्धा आहे. ती म्हणजे शब्द देताना थोडं कमीच कबूल करणं आणि देताना त्याहून जास्त देणं अधिक चांगलं. ते म्हणतात, ‘अधिकाधिक लोकांना संपत्तीनिर्मितीसाठी प्रोत्साहित करणं हा गरिबीवर मात करण्याचा एकमेव उपाय आहे. तुम्ही संधी निर्माण करायला हव्यात. वैध मार्गाने संपत्ती निर्मिती करायला हवी. मध्यमवर्गीय वस्तीत साधेपणानं राहत असलेल्या या माणसाच्या गरजाही साध्याच आहेत. वार्षिक उलाढाल २५०० कोटींची आहे. एच.डी.एफ.सी. चे व्यवस्थापक दीपक पारेख, सकाळ पेपर्स लि. चे प्रताप पवार, इलेक्ट्रॉनिक ग्रूप ऑफ कंपनीजचे प्रकाश रत्नपारखी, युनिलेजरचे रॉनी स्क्रूवाला, एफ.एम.सी.चे सरताज सिंग, माइंडट्री कन्सल्टिंग प्रा. लि. चे अशोक सुता, बॅनर फॉमॉकॅप्स प्रा. लि चे विक्रम रन्नम, हिताची मेटलचे सुधीर टिल्लू, गोबल एन्टरप्राइजेसचे मनोज तिरोडकर या माणसांच्या कथाही नवीन उद्योजकाला प्रेरणादायी ठरतील अशाच आहेत. मराठी माणसाच्या रक्तात व्यावयायिकता नाही असं आपण म्हणतो-ऐकतो. पण या पुस्तकात निवडलेल्या २२ व्यक्तीपैकी महाराष्ट्रातले १६ तर १० व्यावयायिक मराठी आहेत हे विशेष. पुस्तकाच्या पहिल्या भागात उद्योजकांच्या यशोगाथा आणि दुसऱ्या भागात पहिल्या भागाचं सार ही रचना चांगली आहे. ‘समान गुणवैशिष्ट्यं प्रकट होतात’ हा लेख व्यवस्थापनाच्या विद्यार्थ्यांसाठी संदर्भ ठरावा असे आहे. श्रीनिवास पंडित यांनी इंग्रजीत लिहिलेल्या या पुस्तकाचा सुप्रिया वकील, विलास वाडकर यांनी मराठीत सहज अनुवाद केली आहे. हे पुस्तक वाचणारा प्रत्येक प्रत्येकजण त्यांचे आभारच मानील. उद्याग-व्यवसाय या संबंधी मराठी माणसाची असलेली संकुचित वृत्ती खोडून काढण्यासाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल, याज शंकाच नाही. लेखकाने एके ठिकाणी म्हटलंय मला भरपूर पैसा मिळवायचा आहे असं सांगणारा माणूस भेटली, की मला फार आनंद होतो. अशा प्रकारची माणसं भारतात अगदी दुर्मिळ आहेत. पैसा मिळवणं हे आपल्या समाजात अनैतिक असल्यासारखं मानलं जातं. धनवान बनणं म्हणजे काहीतरी पावित्र्य भ्रष्टता आणि गरीब राहणं म्हणजे सद्वर्तन असं आपल्यावर ठसलेलं. एखाद्या माणसानं श्रीमंत व्हायची, पैसे मिळवायची, धनाढ्य बनायची किंवा स्टाईलमध्ये राहण्याची इच्छज्ञ प्रकट केली तर आपल्याला धक्का बसतो.’ ही वृत्ती सोडण्यासाठी तरी हे पुस्तक प्रत्येकाने वाचायला हवं. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more