* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: INFIDEL MY LIFE
  • Availability : Available
  • Translators : NEELA CHANDORKAR
  • ISBN : 9788184982510
  • Edition : 1
  • Publishing Year : JUNE 2011
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 470
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY
  • Available in Combos :NEELA CHANDORKAR COMBO SET - 11 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
THE ASTONISHING AND BESTSELLING LIFE STORY OF THE RENOWNED CAMPAIGNER FOR RELIGIOUS TOLERANCE AND WOMEN`S RIGHTS, AYAAN HIRSI ALI.
आयान हिरसी अली– एक झुंझार वृत्तीची इस्लामधर्मीय स्त्री... आईवडिलांकडून झुंजार वृत्तीचं बाळकडू मिळालेली आयान वडिलांच्या पसंतीच्या तरूणाशी लग्न करायला नकार देते. तिच्या अनुपस्थितीत झालेल्या निकाहला ती जिवाच्या आकांतानं विरोध करते तो हॉलंडमधील निर्वासितांच्या छावणीत. मुस्लिमांच्या धर्मपंचायतीसमोर ती धीटपणे सांगते, ‘‘मला हा निकाह मंजूर नाही. कारण माझे मन तो मान्य करत नाही.’’ या तिच्या निर्भीड जबाबाला धर्ममार्तंड थोर मनानं स्वीकारतात आणि तिला या बेडीतून मुक्तता मिळते... हॉलंडमध्ये राज्यशास्त्र विषयातील पदव्युत्तर शिक्षणानंतर तेथील नागरिकत्व... आयानचा निवडणुकीच्या रिंगणातून प्रवेश. तिच्या दुर्दैवानं तिच्या राजकीय अस्तित्वालाच धोका निर्माण होतो आणि नागरिकत्वही रद्द होण्याची भीती समोर ठाकते... त्यातून सहीसलामत सुटका झाल्यानंतर आता आयाननं अमेरिकेत राहाण्याचा निर्णय घेतला आहे... परंपरावादी इस्लामनं स्त्रीच्या तनमनावर आणि स्वातंत्र्यावर ज्या बेड्या ठोकल्या आहेत त्या तोडण्यासाठी प्राणपणानं लढणाऱ्या आधुनिक लढवय्या स्त्रीची कहाणी म्हणजेच इन्फीडेल. तिनं अशा धर्माचा त्याग केला जो तिच्या समाजातील पन्नास टक्के लोकांना कुठलंही स्वातंत्र्य देऊ इच्छित नाही... त्या झुंजार स्त्रीला जाणून घेण्यासाठी प्रत्येक स्त्रीनं हे पुस्तक वाचायलाच हवं...

No Records Found
No Records Found
Keywords
Customer Reviews
  • Rating StarSwati Joshi

    आयान हिरसी अली या मुस्लिम मुलीचे हे मनोगत. सोमालियात परंपरावादी मुस्लीम कुटुंबात जन्मलेली ही मुलगी. अफ्रिकन देशांमधल्या अंतर्गत यादवीमुळे अनेक देश फिरावे लागलेली. अघोरी FGM सारख्या अन्यायी प्रथेला सामोरे जावे लागलेली. धर्माच्या असाधारण पगड्यमुळे सच्ची मुसलमान होण्यासाठी आधी दिवसातून पाच वेळा नमाज न् नकाब आपणहून अंगीकारून धर्मावर विलक्षण प्रेम करणारी. पण हळूहळू स्त्रियांवरचा जुलूम, त्यांना सतत दिली जाणारी दुय्यम आणि अपमानास्पद वागणूक, फक्त त्यांच्यावर लादल्या जाणाऱ्या जाचक अटी आणि अपमानास्पद नियम, अन्याय, आणि दुसरीकडे त्याच धर्मातल्या पुरूषांची बेजबाबदार आणि अहंकारी वृत्ती, त्यांना अनेक पत्नी करायची मुभा असल्याने स्त्रिया आणि मुलांचे होणारे हाल, पुरुषांच्या मनमानी बेबंद आणि दुटप्पी वागणुकीला मिळणारे धर्माचे अधिष्ठान यांमुळे आलेल्या विविध अनुभवांमुळे ती चिंतन करू लागली. आधी तर ती आपलंच काही चुकलं असेल असं वाटून अधिकाधिक कट्टर धार्मिक होण्याचा प्रयत्न करत गेली. पण तिला हळूहळू विषमता आणि अन्याय अधिकाधिक बोचत राहिला. सुरूवातीला तिने मतं मांडायचा प्रयत्न केला, मग विरोध करू लागली न् मग मात्र हळूहळू चक्क बंड करून ऊठली. जीवावर उदार होऊन ती धर्माची शिकवण आणि धर्ममार्तंडांचं प्रत्यक्षातलं वागणं त्यातल्या विसंगतीवर बोट ठेवू लागली. जगातल्या बहुतांश दहशतवादी कारवायांमधला मुस्लीम सहभाग पाहून ती व्यथित झाली. बहुतांश मुस्लिमबहुल देश हे गुन्हेगारीत फसलेले आणि अंतर्गत यादवीने गांजलेले आहेत हे बहुमोल निरीक्षण ती नोंदवते. कायमच राजकीय अस्थैर्य असल्याने हे देश प्रगती करू शकत नाहीत याबद्दल ती खंतावते. विचारस्वातंत्र्य नाकारणारा, सतत कुणावर तरी दोषारोप करत द्वेष शिकवणारा, हत्येला प्रोत्साहन देणारा, अनेक विवाह व जास्त मुले यांमुळे दारिद्र्य, बेरोजगारी व गुन्हेगारी यांच्या दलदलीत फसणारा धर्म अखेर तिने चक्क झुगारून दिला. (तिचे हे धर्मविरोधी बंड सहन न झाल्याने साहजिकच तिला मारण्याचा फतवा निघाला. तिने युरोपियन देशात आश्रय घेतला. पण दुर्दैवाने अखेर तिची हत्या झाली.) या पुस्तकात तिचे बारीक निरीक्षण आणि त्यावर आधारित सखोल चिंतन आहे. यातली अनेक वाक्ये आणि तिचे चिंतन आपल्यालाही विचार करायला लावतात. तिच्या देशात आधी नकाब आणि हिजाब आजिबात सक्तीचे नव्हते. मुली आणि स्त्रिया मोकळेपणाने हिंडायच्या. पण मूलतत्त्ववादी पगडा वाढू लागल्यावर मात्र ही सक्ती अमलात आली. त्याबद्दल तिच्या एका भावाने प्रामाणिकपणे आपले विचार मांडताना सांगितलं की, "स्त्रीची मान हा काही फार लक्ष वेधून घेणारा अवयव आहे असं मला पूर्वी कधीच वाटलं नव्हतं. मी लहानपणापासून माझी आई, काकू, आत्या, बहिणी यांना मोकळ्या डोक्याने वावरताना पहात आलो. पण कॉलेजमधे गेल्यावर मात्र कट्टरतावादाने आपले पाय रोवायला सुरूवात केली आणि काही वर्षातच हिजाब सक्तीचा झाला. आता मोकळ्या केसांची किंवा ऊघड्या मानेची एकही मुलगी अथवा स्त्री दिसणे मुश्कील. पण त्याचा परिणाम असा झाला की चुकून एखादीची चुकार बट भुरभुरु लागली की माझे हृदयाचे ठोके वाढायला लागले आणि चुकून वाऱ्याने कुणाचा हिजाब सरकून जराशी मान जरी दिसली तरी माझा श्वास अनियमित होऊ लागला. आता मला नकळत चाळाच लागला अशी मान पहायचा. मी अगदी निरखून निरखून पाहू लागलो. प्रत्यक्षात मात्र अशी मान दिसली की ती स्त्री कितीही वयाची असो. तिच्यावर रागावून वसकन् ओरडायची संधी मात्र मी सोडत नाही. मी असा ओरडलो की वाईट न वाटता उलट मला माझ्याच अपराधाचं परिमार्जन झाल्यासारखं वाटतं. " अशा रितीने या कडक नियमांचा होणारा ऊलटाच परिणाम, वागण्यातली विसंगती, स्त्री-पुरुषांच्या मधल्या सहजीवनात नैसर्गिक प्रेमाचा अभाव, त्यामुळे पुरूषांच्याही मानसिकतेत वाढत जाणारी अस्वस्थता आणि या सर्वांचा एकूणच समाजावर पडणारा वाईट प्रभाव याचं फार सुंदर चित्रण या पुस्तकात आहे. या झुंजार स्त्रीचा लढा आणि धर्माच्या बाबतीतले तपशीलवार चिंतन जाणून घेण्यासाठी प्रत्येकाने वाचायलाच हवे असे पुस्तक. *स्वाती प्रताप जोशी* ...Read more

  • Rating StarKalpana Mahadik

    पुस्तक अतिशय सुंदर आहे. नक्की. वाचा.

  • Rating StarShrinivas Ranjanikar

    एका कर्मठ आणि सनातनी देशातील संघर्ष करणाऱ्या स्त्री ची कथा,नक्की वाचा सकारात्मक आत्मकथा...

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
डॉ. जयंत वडतकर.अमरावती

मेळघाटचा एन्सायक्लोपिडीया असलेले निवृत्त वनाधिकारी श्री. रविंद्र वानखडे यांच्या अनुभवांवर आधारित कुलामामाच्या देशात हे पुस्तक वाचले तेव्हापासून या पुस्तकाचे लेखक श्री. जी. बी. देशमुख यांना भेटण्याची इच्छा होती. इच्छाशक्ती असली की योग जुळून येतो असं महणतात. रविंद्र वानखडे सरांच्या माध्यमातूनच तो योग जुळून आला. माझ्या एक पुस्तकाचे प्रकाशन बाबत वानखडे सरांशी चर्चा करीत असताना त्यांनी लेखकाचा संदर्भ दिला व जी.बी. ना भेटून घ्या असे सांगितले. भेट घडून आली. अगदी सहज, घरगुती भेट झाली, गप्पा रंगल्या. यावेळी जी. बी. देशमुख यांनी त्यांचे पहिले पुस्तक महारुद्र मला भेट दिले. आमच्या चर्चेतून आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉल मथला मराठमोळा झंझावात महारुद्र, हे या पुस्तकाचे शीर्षक वाचून पुस्तकाचा विषय थोडक्यात समजला. लेखकाचे वडील भीमराव देशमुख यांनी फुटबॉलपटू म्हणून गाजविलेल्या कारकीदींचा आढावा या पुस्तकात होता. एका मुलाने आपल्या वडिलांवर लिहिलेले पुस्तक कसे असेल? असा प्रश्न अन पुस्तक, दोन्ही घेऊन घरी आलो. भेट मिळालेले पुस्तक वेळ मिळाला तसे एका बैठकीत वाचून काढले. आता गल्ली गल्लीत जसं क्रिकेट खेळल्या व बघितले जाते तसं स्वातंत्र्य पुर्व काळात वऱ्हाडात फुटबॉल खेळला जात असे. गावागावांत टीम असायच्या, सामने अर्थात स्पर्धा भरवल्या जात असत. स्वातंत्र्यपूर्व काळात अशाच रुपयांमधून चमकत, वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील एका खेळाडूने थेट मुंबईतील फुटबॉल क्लब व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मुसंडी मारत आपल्या खेळाचा व व्यक्तीमत्त्वाचा ठसा उमटविला होता. तो काळ होता १९३० ते १९५० चा. त्या वल्लीचे नाव होतं भिमराव देशमुख. जी. बी. देशमुख यांनी त्यांच्या वडिलांवर लिहिलेले महारुद्र पुस्तक काही फक्त भिमराव देशमुख यांची जीवन चरित्र नाही. स्वातंत्र्य मिळण्याच्या साधारण वीस वर्षा पुर्वी ३० ते ५० च्या दशकात आपल्या देशातील खेळाची स्थिती कशी होती. विशेषतः वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील स्थिती कशी होती. कुठले खेळ खेळले जात असत. स्पर्धा कशा भरवल्या जात असत. शाळा आणि शिक्षण कसं होतं. आर्थिक स्थिती कशी होती. अमरावती जिल्ह्यातील कोणत्या गावात फुटबॉलच्या नावाजलेल्या टीम होत्या. अमरावती कशी होती याची माहिती सुद्धा या पुस्तकातून वाचायला मिळते. पुस्तकाच्या पहिल्याच प्रकरणात भीमराव यांचे व्यक्तिमत्व कसं होतं हे सांगण्यासाठी लेखकाने बाबा म्हणून जरी त्यांची ओळख करून दिली असली तरी पुढील सर्व प्रकरणातून त्यांनी भीमराव अशा एकेरी उल्लेखातून हे व्यक्तिमत्व साकारले आहे. वऱ्हाडातल्या आपल्या सवयीनुसार प्रसिद्धी पासून दूर राहिलेल्या एका नामवंत फुटबॉलपटूची कारकीर्द व फुटबॉल पश्चात कौटुंबिक कारकीर्द तटस्तपणे मांडण्यात लेखक यशस्वी झाले आहेत हे आधीच सांगून टाकतो. अमरावती जिल्ह्यातील खारतळेगाव येथील फुटबॉलच्या टीम मध्ये भीमराव देशमुख यांची कारकीर्द सुरु झाली. ती १९३० सालापासून त्यावेळी ते जेमतेम विशीत होते. प्रथम शालेय स्पर्धापासून पुढे क्लब स्पर्धा पासून भीमरावने आपल्या खेळाचा ठसा उमटविला हळूहळू ख्याती विदर्भांत पोहोचली, भीमराव यांचा खेळ बघण्यासाठी लोक खास वेळ काढून येऊ लागेल, १९३८-३९ मध्ये विदर्भात झालेल्या काही स्पर्धात मुबंईच्या काही टीम सहभागी झाल्या होत्या, त्यामुळे नावाजलेल्या ब्रिटीश खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळाली. मुंबईच्या इंग्रजांच्या टीमला वऱ्हाडातील भीमराव यांच्या टीमने हरविले. वायएमसिए, मुंबईच्या अलेक्झांडर नावाच्या कप्तानाने भीमरावच्या खेळाने प्रभावित होऊन खारतळेगावच्या चार खेळाडूंना मुंबईच्या टीम कडून खेळण्याचे निमंत्रण दिले. १९४० ला भीमराव सह चार खेळाडू मुंबईत पोहोचले. अलेक्झांडरने त्यांना सराव शिबिरीत घातले. पुढील वर्षात भीमराव वायएमसिए टीम कडून खेळण्यासाठी करारबद्ध झाले. जशा आयपीएल मध्ये आज वेगवेगळ्या टीम खेळतात तसे त्यावेळी मुंबईत फुटबॉलचे क्लब होते. पुढील १० वर्षे अनेक टीम कडून खेळत अनेक स्पर्धा गाजविल्या. भीमराव यांचेवर तेव्हाच्या इंग्रजी वृत्तपत्रांतून रकाने छापले जाऊ लागले. मुंबईतील आपल्या १२ वर्षाच्या कार्यकाळात क्लब स्पर्धामधून त्यांनी ४०० सामने खेळले, तब्बल २५० गोल मारलेत. भीमराव वेगवेगळ्या स्पर्धामधून खेळत मैदान गाजवत होते. त्यातूनच १९४८ च्या ऑलम्पिक स्पर्धेच्या टीम मध्ये निवड झाली मात्र एका सराव सामन्यात पाय फॅक्चर झाल्याने देशाकडून खेळण्याची संधी हुकली. पुढील वर्षात भीमराव हे भारतीय टीम सोबत मलेशिया, कंबोडिया, इंडोनेशिया, म्यानमार, फिलिपिन्स, हाँगकाँग, थायलंड अशा देशात खेळले, या दौऱ्यातील २० पैकी १९ सामने जिंकले. भीमराव आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू झाले होते. इतके खेळून भीमराव यांचेकडे आर्थिक नियोजन नसल्याने परिस्थिती जेमतेमच होती. अशातच १९५१ साली त्यांनी निवृत्ती घेतली. अमरावती मध्ये परत आल्यावर त्यांनी आपला संसार थाटला, आर्थिक पाठबळ नसल्याने फुटकळ व्यवसाय केले. मात्र मी कधीकाळी आंतरराष्ट्रीय खेळाडू होते याचा कधी उल्लेख सुद्धा केला नाही, प्रसिद्धी पासून ते कायमच दूर राहिले. या काळात भीमराव यांच्या पत्नी अंजीरा यांनी जबाबदारीनं संसार सांभाळला. मुलांना मोठे केले. भीमराव शेवटपर्यंत मेहनत करीत राहिले. समाजात चांगले स्थान निर्माण केले. मात्र ते इतके मोठे फुटबॉलपटू होते ते अमरावतीकरांना काही माहिती झाले नाही. भीमराव यांच्या निधनानंतर या आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूचे कार्य पुढील पिढीला माहित व्हावे या उद्देशाने जी. बी. देशमुख यांनी या पुस्तकातून आपल्या तीर्थरुपांचे भावचित्र अगदी सोप्या सरळ भाषेत शब्दबद्ध करून महारुद्र च्या रूपाने वाचकांसमोर ठेवले. या लिखाणासाठी त्यांनी मुंबईत जाऊन त्या काळातील टाईम्स वृत्तपत्रांतील भीमराव यांचा उल्लेख असलेली कात्रणे मिळविली, त्यांच्या समवेत खेळलेल्या खेळाडूंना व पत्रकारांना भेटले, अमरावती मधील त्यांच्या समवयस्क परिचितांकडून त्यांची माहिती गोळा केली. त्यासाठी त्यांनी अथक अशी मेहनत घेतली. व २००५ साली हे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकाच्या पुढील आवृत्ती मेहता प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केल्याने ते पुस्तक महाराष्ट्रभर पोहोचले. या निमित्त्याने भीमराव यांचे कार्य, त्यांचा फुटबॉल खेळातील झंझावात मराठी माणसाला माहिती झाला. अमरावतीकर या नात्याने मला तर आपल्या मातीतील माणूस त्या काळात आंतरराष्ट्रीय पातळीवर झेंडा गाडून आल्याचा अभिमान वाटला. अशा अनेक अर्थाने महारुद्र महत्वाचे आहे. ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
सलिल तांबे

ज्यांना गोष्टींची आवड आहे अशा मुलांसाठी ही मेजवानी आहेच, पण आपल्या पाल्यांमध्ये संवेदनशीलता आणि निसर्गाप्रती आदर जोपासण्यासाठी मोठ्यांनीही हे पुस्तक वाचायला हवे. प्रदूषणाविरुद्ध लहान हातांनी दिलेला लढा असो किंवा निसर्गाचा खरा आनंद पिशवीत भरून आणण्यापक्षा मनात कसा साठवावा, हे सांगणारा दृष्टिकोन असो; हे पुस्तक प्रत्येक वाचकाला समृद्ध करते. पुस्तकातील प्रत्येक कथा संपताना आपल्याला जगण्याकडे बघण्याची एक नवी दृष्टी देऊन जाते. यातलं काही गूढ, काही थरार आणि खूप सारे हळवे प्रसंग अनुभवण्यासाठी तुम्हाला हे पुस्तक स्वतः वाचायलाच हवं. म्हणूनच, आपल्या संग्रही असावा असा हा `हाटूमुटूचा चंद्र` तुम्ही एकदा नक्की अनुभवा! चला तर मग, आपणही शोधूया आपला स्वतःचा ‘हाटूमुटूचा चंद्र’! ...Read more