* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: INFIDEL MY LIFE
  • Availability : Available
  • Translators : NEELA CHANDORKAR
  • ISBN : 9788184982510
  • Edition : 1
  • Publishing Year : JUNE 2011
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 470
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY
  • Available in Combos :NEELA CHANDORKAR COMBO SET - 11 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
THE ASTONISHING AND BESTSELLING LIFE STORY OF THE RENOWNED CAMPAIGNER FOR RELIGIOUS TOLERANCE AND WOMEN`S RIGHTS, AYAAN HIRSI ALI.
आयान हिरसी अली– एक झुंझार वृत्तीची इस्लामधर्मीय स्त्री... आईवडिलांकडून झुंजार वृत्तीचं बाळकडू मिळालेली आयान वडिलांच्या पसंतीच्या तरूणाशी लग्न करायला नकार देते. तिच्या अनुपस्थितीत झालेल्या निकाहला ती जिवाच्या आकांतानं विरोध करते तो हॉलंडमधील निर्वासितांच्या छावणीत. मुस्लिमांच्या धर्मपंचायतीसमोर ती धीटपणे सांगते, ‘‘मला हा निकाह मंजूर नाही. कारण माझे मन तो मान्य करत नाही.’’ या तिच्या निर्भीड जबाबाला धर्ममार्तंड थोर मनानं स्वीकारतात आणि तिला या बेडीतून मुक्तता मिळते... हॉलंडमध्ये राज्यशास्त्र विषयातील पदव्युत्तर शिक्षणानंतर तेथील नागरिकत्व... आयानचा निवडणुकीच्या रिंगणातून प्रवेश. तिच्या दुर्दैवानं तिच्या राजकीय अस्तित्वालाच धोका निर्माण होतो आणि नागरिकत्वही रद्द होण्याची भीती समोर ठाकते... त्यातून सहीसलामत सुटका झाल्यानंतर आता आयाननं अमेरिकेत राहाण्याचा निर्णय घेतला आहे... परंपरावादी इस्लामनं स्त्रीच्या तनमनावर आणि स्वातंत्र्यावर ज्या बेड्या ठोकल्या आहेत त्या तोडण्यासाठी प्राणपणानं लढणाऱ्या आधुनिक लढवय्या स्त्रीची कहाणी म्हणजेच इन्फीडेल. तिनं अशा धर्माचा त्याग केला जो तिच्या समाजातील पन्नास टक्के लोकांना कुठलंही स्वातंत्र्य देऊ इच्छित नाही... त्या झुंजार स्त्रीला जाणून घेण्यासाठी प्रत्येक स्त्रीनं हे पुस्तक वाचायलाच हवं...

No Records Found
No Records Found
Keywords
Customer Reviews
  • Rating StarSwati Joshi

    आयान हिरसी अली या मुस्लिम मुलीचे हे मनोगत. सोमालियात परंपरावादी मुस्लीम कुटुंबात जन्मलेली ही मुलगी. अफ्रिकन देशांमधल्या अंतर्गत यादवीमुळे अनेक देश फिरावे लागलेली. अघोरी FGM सारख्या अन्यायी प्रथेला सामोरे जावे लागलेली. धर्माच्या असाधारण पगड्यमुळे सच्ची मुसलमान होण्यासाठी आधी दिवसातून पाच वेळा नमाज न् नकाब आपणहून अंगीकारून धर्मावर विलक्षण प्रेम करणारी. पण हळूहळू स्त्रियांवरचा जुलूम, त्यांना सतत दिली जाणारी दुय्यम आणि अपमानास्पद वागणूक, फक्त त्यांच्यावर लादल्या जाणाऱ्या जाचक अटी आणि अपमानास्पद नियम, अन्याय, आणि दुसरीकडे त्याच धर्मातल्या पुरूषांची बेजबाबदार आणि अहंकारी वृत्ती, त्यांना अनेक पत्नी करायची मुभा असल्याने स्त्रिया आणि मुलांचे होणारे हाल, पुरुषांच्या मनमानी बेबंद आणि दुटप्पी वागणुकीला मिळणारे धर्माचे अधिष्ठान यांमुळे आलेल्या विविध अनुभवांमुळे ती चिंतन करू लागली. आधी तर ती आपलंच काही चुकलं असेल असं वाटून अधिकाधिक कट्टर धार्मिक होण्याचा प्रयत्न करत गेली. पण तिला हळूहळू विषमता आणि अन्याय अधिकाधिक बोचत राहिला. सुरूवातीला तिने मतं मांडायचा प्रयत्न केला, मग विरोध करू लागली न् मग मात्र हळूहळू चक्क बंड करून ऊठली. जीवावर उदार होऊन ती धर्माची शिकवण आणि धर्ममार्तंडांचं प्रत्यक्षातलं वागणं त्यातल्या विसंगतीवर बोट ठेवू लागली. जगातल्या बहुतांश दहशतवादी कारवायांमधला मुस्लीम सहभाग पाहून ती व्यथित झाली. बहुतांश मुस्लिमबहुल देश हे गुन्हेगारीत फसलेले आणि अंतर्गत यादवीने गांजलेले आहेत हे बहुमोल निरीक्षण ती नोंदवते. कायमच राजकीय अस्थैर्य असल्याने हे देश प्रगती करू शकत नाहीत याबद्दल ती खंतावते. विचारस्वातंत्र्य नाकारणारा, सतत कुणावर तरी दोषारोप करत द्वेष शिकवणारा, हत्येला प्रोत्साहन देणारा, अनेक विवाह व जास्त मुले यांमुळे दारिद्र्य, बेरोजगारी व गुन्हेगारी यांच्या दलदलीत फसणारा धर्म अखेर तिने चक्क झुगारून दिला. (तिचे हे धर्मविरोधी बंड सहन न झाल्याने साहजिकच तिला मारण्याचा फतवा निघाला. तिने युरोपियन देशात आश्रय घेतला. पण दुर्दैवाने अखेर तिची हत्या झाली.) या पुस्तकात तिचे बारीक निरीक्षण आणि त्यावर आधारित सखोल चिंतन आहे. यातली अनेक वाक्ये आणि तिचे चिंतन आपल्यालाही विचार करायला लावतात. तिच्या देशात आधी नकाब आणि हिजाब आजिबात सक्तीचे नव्हते. मुली आणि स्त्रिया मोकळेपणाने हिंडायच्या. पण मूलतत्त्ववादी पगडा वाढू लागल्यावर मात्र ही सक्ती अमलात आली. त्याबद्दल तिच्या एका भावाने प्रामाणिकपणे आपले विचार मांडताना सांगितलं की, "स्त्रीची मान हा काही फार लक्ष वेधून घेणारा अवयव आहे असं मला पूर्वी कधीच वाटलं नव्हतं. मी लहानपणापासून माझी आई, काकू, आत्या, बहिणी यांना मोकळ्या डोक्याने वावरताना पहात आलो. पण कॉलेजमधे गेल्यावर मात्र कट्टरतावादाने आपले पाय रोवायला सुरूवात केली आणि काही वर्षातच हिजाब सक्तीचा झाला. आता मोकळ्या केसांची किंवा ऊघड्या मानेची एकही मुलगी अथवा स्त्री दिसणे मुश्कील. पण त्याचा परिणाम असा झाला की चुकून एखादीची चुकार बट भुरभुरु लागली की माझे हृदयाचे ठोके वाढायला लागले आणि चुकून वाऱ्याने कुणाचा हिजाब सरकून जराशी मान जरी दिसली तरी माझा श्वास अनियमित होऊ लागला. आता मला नकळत चाळाच लागला अशी मान पहायचा. मी अगदी निरखून निरखून पाहू लागलो. प्रत्यक्षात मात्र अशी मान दिसली की ती स्त्री कितीही वयाची असो. तिच्यावर रागावून वसकन् ओरडायची संधी मात्र मी सोडत नाही. मी असा ओरडलो की वाईट न वाटता उलट मला माझ्याच अपराधाचं परिमार्जन झाल्यासारखं वाटतं. " अशा रितीने या कडक नियमांचा होणारा ऊलटाच परिणाम, वागण्यातली विसंगती, स्त्री-पुरुषांच्या मधल्या सहजीवनात नैसर्गिक प्रेमाचा अभाव, त्यामुळे पुरूषांच्याही मानसिकतेत वाढत जाणारी अस्वस्थता आणि या सर्वांचा एकूणच समाजावर पडणारा वाईट प्रभाव याचं फार सुंदर चित्रण या पुस्तकात आहे. या झुंजार स्त्रीचा लढा आणि धर्माच्या बाबतीतले तपशीलवार चिंतन जाणून घेण्यासाठी प्रत्येकाने वाचायलाच हवे असे पुस्तक. *स्वाती प्रताप जोशी* ...Read more

  • Rating StarKalpana Mahadik

    पुस्तक अतिशय सुंदर आहे. नक्की. वाचा.

  • Rating StarShrinivas Ranjanikar

    एका कर्मठ आणि सनातनी देशातील संघर्ष करणाऱ्या स्त्री ची कथा,नक्की वाचा सकारात्मक आत्मकथा...

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more