* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: INFIDEL MY LIFE
  • Availability : Available
  • Translators : NEELA CHANDORKAR
  • ISBN : 9788184982510
  • Edition : 1
  • Publishing Year : JUNE 2011
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 470
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY
  • Available in Combos :NEELA CHANDORKAR COMBO SET - 11 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
THE ASTONISHING AND BESTSELLING LIFE STORY OF THE RENOWNED CAMPAIGNER FOR RELIGIOUS TOLERANCE AND WOMEN`S RIGHTS, AYAAN HIRSI ALI.
आयान हिरसी अली– एक झुंझार वृत्तीची इस्लामधर्मीय स्त्री... आईवडिलांकडून झुंजार वृत्तीचं बाळकडू मिळालेली आयान वडिलांच्या पसंतीच्या तरूणाशी लग्न करायला नकार देते. तिच्या अनुपस्थितीत झालेल्या निकाहला ती जिवाच्या आकांतानं विरोध करते तो हॉलंडमधील निर्वासितांच्या छावणीत. मुस्लिमांच्या धर्मपंचायतीसमोर ती धीटपणे सांगते, ‘‘मला हा निकाह मंजूर नाही. कारण माझे मन तो मान्य करत नाही.’’ या तिच्या निर्भीड जबाबाला धर्ममार्तंड थोर मनानं स्वीकारतात आणि तिला या बेडीतून मुक्तता मिळते... हॉलंडमध्ये राज्यशास्त्र विषयातील पदव्युत्तर शिक्षणानंतर तेथील नागरिकत्व... आयानचा निवडणुकीच्या रिंगणातून प्रवेश. तिच्या दुर्दैवानं तिच्या राजकीय अस्तित्वालाच धोका निर्माण होतो आणि नागरिकत्वही रद्द होण्याची भीती समोर ठाकते... त्यातून सहीसलामत सुटका झाल्यानंतर आता आयाननं अमेरिकेत राहाण्याचा निर्णय घेतला आहे... परंपरावादी इस्लामनं स्त्रीच्या तनमनावर आणि स्वातंत्र्यावर ज्या बेड्या ठोकल्या आहेत त्या तोडण्यासाठी प्राणपणानं लढणाऱ्या आधुनिक लढवय्या स्त्रीची कहाणी म्हणजेच इन्फीडेल. तिनं अशा धर्माचा त्याग केला जो तिच्या समाजातील पन्नास टक्के लोकांना कुठलंही स्वातंत्र्य देऊ इच्छित नाही... त्या झुंजार स्त्रीला जाणून घेण्यासाठी प्रत्येक स्त्रीनं हे पुस्तक वाचायलाच हवं...

No Records Found
No Records Found
Keywords
Customer Reviews
  • Rating StarSwati Joshi

    आयान हिरसी अली या मुस्लिम मुलीचे हे मनोगत. सोमालियात परंपरावादी मुस्लीम कुटुंबात जन्मलेली ही मुलगी. अफ्रिकन देशांमधल्या अंतर्गत यादवीमुळे अनेक देश फिरावे लागलेली. अघोरी FGM सारख्या अन्यायी प्रथेला सामोरे जावे लागलेली. धर्माच्या असाधारण पगड्यमुळे सच्ची मुसलमान होण्यासाठी आधी दिवसातून पाच वेळा नमाज न् नकाब आपणहून अंगीकारून धर्मावर विलक्षण प्रेम करणारी. पण हळूहळू स्त्रियांवरचा जुलूम, त्यांना सतत दिली जाणारी दुय्यम आणि अपमानास्पद वागणूक, फक्त त्यांच्यावर लादल्या जाणाऱ्या जाचक अटी आणि अपमानास्पद नियम, अन्याय, आणि दुसरीकडे त्याच धर्मातल्या पुरूषांची बेजबाबदार आणि अहंकारी वृत्ती, त्यांना अनेक पत्नी करायची मुभा असल्याने स्त्रिया आणि मुलांचे होणारे हाल, पुरुषांच्या मनमानी बेबंद आणि दुटप्पी वागणुकीला मिळणारे धर्माचे अधिष्ठान यांमुळे आलेल्या विविध अनुभवांमुळे ती चिंतन करू लागली. आधी तर ती आपलंच काही चुकलं असेल असं वाटून अधिकाधिक कट्टर धार्मिक होण्याचा प्रयत्न करत गेली. पण तिला हळूहळू विषमता आणि अन्याय अधिकाधिक बोचत राहिला. सुरूवातीला तिने मतं मांडायचा प्रयत्न केला, मग विरोध करू लागली न् मग मात्र हळूहळू चक्क बंड करून ऊठली. जीवावर उदार होऊन ती धर्माची शिकवण आणि धर्ममार्तंडांचं प्रत्यक्षातलं वागणं त्यातल्या विसंगतीवर बोट ठेवू लागली. जगातल्या बहुतांश दहशतवादी कारवायांमधला मुस्लीम सहभाग पाहून ती व्यथित झाली. बहुतांश मुस्लिमबहुल देश हे गुन्हेगारीत फसलेले आणि अंतर्गत यादवीने गांजलेले आहेत हे बहुमोल निरीक्षण ती नोंदवते. कायमच राजकीय अस्थैर्य असल्याने हे देश प्रगती करू शकत नाहीत याबद्दल ती खंतावते. विचारस्वातंत्र्य नाकारणारा, सतत कुणावर तरी दोषारोप करत द्वेष शिकवणारा, हत्येला प्रोत्साहन देणारा, अनेक विवाह व जास्त मुले यांमुळे दारिद्र्य, बेरोजगारी व गुन्हेगारी यांच्या दलदलीत फसणारा धर्म अखेर तिने चक्क झुगारून दिला. (तिचे हे धर्मविरोधी बंड सहन न झाल्याने साहजिकच तिला मारण्याचा फतवा निघाला. तिने युरोपियन देशात आश्रय घेतला. पण दुर्दैवाने अखेर तिची हत्या झाली.) या पुस्तकात तिचे बारीक निरीक्षण आणि त्यावर आधारित सखोल चिंतन आहे. यातली अनेक वाक्ये आणि तिचे चिंतन आपल्यालाही विचार करायला लावतात. तिच्या देशात आधी नकाब आणि हिजाब आजिबात सक्तीचे नव्हते. मुली आणि स्त्रिया मोकळेपणाने हिंडायच्या. पण मूलतत्त्ववादी पगडा वाढू लागल्यावर मात्र ही सक्ती अमलात आली. त्याबद्दल तिच्या एका भावाने प्रामाणिकपणे आपले विचार मांडताना सांगितलं की, "स्त्रीची मान हा काही फार लक्ष वेधून घेणारा अवयव आहे असं मला पूर्वी कधीच वाटलं नव्हतं. मी लहानपणापासून माझी आई, काकू, आत्या, बहिणी यांना मोकळ्या डोक्याने वावरताना पहात आलो. पण कॉलेजमधे गेल्यावर मात्र कट्टरतावादाने आपले पाय रोवायला सुरूवात केली आणि काही वर्षातच हिजाब सक्तीचा झाला. आता मोकळ्या केसांची किंवा ऊघड्या मानेची एकही मुलगी अथवा स्त्री दिसणे मुश्कील. पण त्याचा परिणाम असा झाला की चुकून एखादीची चुकार बट भुरभुरु लागली की माझे हृदयाचे ठोके वाढायला लागले आणि चुकून वाऱ्याने कुणाचा हिजाब सरकून जराशी मान जरी दिसली तरी माझा श्वास अनियमित होऊ लागला. आता मला नकळत चाळाच लागला अशी मान पहायचा. मी अगदी निरखून निरखून पाहू लागलो. प्रत्यक्षात मात्र अशी मान दिसली की ती स्त्री कितीही वयाची असो. तिच्यावर रागावून वसकन् ओरडायची संधी मात्र मी सोडत नाही. मी असा ओरडलो की वाईट न वाटता उलट मला माझ्याच अपराधाचं परिमार्जन झाल्यासारखं वाटतं. " अशा रितीने या कडक नियमांचा होणारा ऊलटाच परिणाम, वागण्यातली विसंगती, स्त्री-पुरुषांच्या मधल्या सहजीवनात नैसर्गिक प्रेमाचा अभाव, त्यामुळे पुरूषांच्याही मानसिकतेत वाढत जाणारी अस्वस्थता आणि या सर्वांचा एकूणच समाजावर पडणारा वाईट प्रभाव याचं फार सुंदर चित्रण या पुस्तकात आहे. या झुंजार स्त्रीचा लढा आणि धर्माच्या बाबतीतले तपशीलवार चिंतन जाणून घेण्यासाठी प्रत्येकाने वाचायलाच हवे असे पुस्तक. *स्वाती प्रताप जोशी* ...Read more

  • Rating StarKalpana Mahadik

    पुस्तक अतिशय सुंदर आहे. नक्की. वाचा.

  • Rating StarShrinivas Ranjanikar

    एका कर्मठ आणि सनातनी देशातील संघर्ष करणाऱ्या स्त्री ची कथा,नक्की वाचा सकारात्मक आत्मकथा...

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
तेजस यादव

वाचला तो कर्ण ! आवडला तो कर्ण ! भावला तो कर्ण ...! दोन वर्षापुर्वी मृत्युंजय कादंबरी वाचून झालती . त्या कादंबरीने कित्येक जणांच आयुष्य कायापालट केल , हे मराठी साहित्य विश्व जाणून आहे . आता नुकतीच राधेय वाचून पुर्ण झाली . लेखक रणजित देसाई सुरवातीच ्हणतात .... " राधेय हे कर्णचरित्र नव्हे . प्रत्येकाच्या मनात दडलेला कर्ण असतो . माझ्या मनातल्या कर्णाची ही कहाणी . भावकहाणी . याची सत्यता शोधायची झाली , तर त्यासाठी महाभारताची पाने चाळण्याचे काहीच प्रयोजन नाही , कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत , तर त्यात हा कर्ण दिसेल ." मला कादंबरीत एक विशेष गोष्ट आवडली , ती म्हणजे कर्ण कुठेच वरचढ , रंगवून दाखवला नाही. त्याचे गुण दाखवले तसे त्याचे दोष ही दाखवले . नदीच्या प्रवाहावर वाहत जाणार त्याचं आयुष्य , त्याच दातृत्व , त्याच मित्रप्रेम , त्याचा मनाचा गाभारा , त्याचा आयुष्यी आलेली अहवेला वाचकांसं खुप काही शिकवून जाते . देसाईंची लेखणी इतकी प्रभावशाली आहे की ते कुरुक्षेत्राची युध्दभुमीही जिवंत झालेला भास होतो . मी जेवढा कर्ण वाचला तो मला सर्व आठवला ! मग तो ` शिवाजी सावंतांचा ` असो अथवा नटसम्राट मधील ` वि.वा.शिरवाडकर ( कुसुमाग्रजांचा ) . कादंबरी वाचून झाल्यावर कुसुमाग्रजांची ती ओळ आठवली कृष्ण - " अरे वेड्या तुझ्यासारखे कर्मयात्री ह्या धरेवरच्या माणसांचे दिपस्तंभ.! तुमचे जीवन हे केवळ जळण्यासाठी , ह्या प्रकाशात आम्हाला आमच्या वाटा सापडतात . खुप सुंदर वाचनीय , आणि भरभरुन शिकवनारी कादंबरी .... ...Read more

MAHASAMRAT ZANZAVAT
MAHASAMRAT ZANZAVAT by VISHWAS PATIL Rating Star
Abhiram Bhadkamkar

महा-सम्राट "इतिहास वाचून माणूस बेभान होतो, भानावर येतोच असं नाही" हे (बहुधा) वि ग कानेटकर यांचे विधान मला कायमच महत्वाचे वाटते। प्रकाशनास काही महिने लोटले असले तरी निवांत ऐसपैस वेळ काढून वाचायची म्हणून बाजूला ठेवलेली ज्येष्ठ कादंबरीकार विश्वा पाटील ह्यांची महासम्राट ही कादंबरी हातात घेतली आणि तिने झपाटून गेलो। ही कादंबरी बेभानही करते आणि एक भानही देते हे तिचे वैशिष्ट्य आहे. विश्वासरावांची शैली आणि त्यांची शब्दसंपत्ती ह्यावर नवे काय बोलणार? पण ही कादंबरी उभ्या देशाचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातील घटनांचे केवळ चमकदार कथन यापुरती मर्यादित न राहता तत्कालीन सामाजिक व राजकीय परिसराचे भान देणारी ठरते। तेव्हाचा काळ बारीकसारीक तपशिलांसह उभा करते. ती छत्रपतींच्या तेजस्वी कर्तृत्वाला मुजरा तर करतेच पण त्यासोबत त्यांच्या जन्मापूर्वीची राजकीय परिस्थिती, त्यातून आईसाहेबांच्या मनात उगवलेल्या हिंदवी स्वराज्याच्या अत्यंत अवघड, जवळजवळ अशक्यप्राय स्वप्नाच्या पाठलागाची वेगवान घडामोड चितारते. मुघलांचे डावपेच, खेळया नेस्तनाबूत करण्यामागची `अत्यंत योजनाबद्ध आखणी` मांडत जाते। ही कादंबरी माझे त्याकाळाबद्दलचे आकलन वाढवते. मऱ्हाटी मुलाखातला तत्कालीन निसर्ग यात येतो, तत्कालीन नातेसंबंध, समाजधारणा आणि परचक्राच्या दडपणाखालची उलघाल यातून त्या काळाचा पट मांडला जातो आणि इथेच कादंबरी केवळ एका युगपुरुषांचे चरित्रकथन न रहाता एका शतकाचा लेखाजोखा होऊन जाते। वेगळेपण आहे ते हेच की ही कहाणी महाराक्षसी लाटांविरुद्ध पोहून जात महासागरालाच बांधून घालणाऱ्या चिवट आशावादाची आणि या स्वप्नाला प्रत्यक्षात उतरवणाऱ्या बुद्धीचातुर्याची होत जाते। म्हणूनच ती एकाच वेळी बेभानही करते आणि भानही देते। कादंबरी संपते एक स्वल्पविराम देत... आता पुढचे भाग... त्याची अधीरता आणि उत्सुकता... डोळे दिपून जावेत अशा थोर व्यक्तिमत्वाचे चित्रण हे शिवधनुष्य होते, जे लिलया पेलले आहे... यात रेखाटलेली चित्रे अप्रतिम आहेत... घराघरात भक्तिभावाने ठेवावा आणि `अभ्यासावा` असा हा `झंझावात` आहे... ...Read more