* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: INFIDEL MY LIFE
  • Availability : Available
  • Translators : NEELA CHANDORKAR
  • ISBN : 9788184982510
  • Edition : 1
  • Publishing Year : JUNE 2011
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 470
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY
  • Available in Combos :NEELA CHANDORKAR COMBO SET - 11 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
THE ASTONISHING AND BESTSELLING LIFE STORY OF THE RENOWNED CAMPAIGNER FOR RELIGIOUS TOLERANCE AND WOMEN`S RIGHTS, AYAAN HIRSI ALI.
आयान हिरसी अली– एक झुंझार वृत्तीची इस्लामधर्मीय स्त्री... आईवडिलांकडून झुंजार वृत्तीचं बाळकडू मिळालेली आयान वडिलांच्या पसंतीच्या तरूणाशी लग्न करायला नकार देते. तिच्या अनुपस्थितीत झालेल्या निकाहला ती जिवाच्या आकांतानं विरोध करते तो हॉलंडमधील निर्वासितांच्या छावणीत. मुस्लिमांच्या धर्मपंचायतीसमोर ती धीटपणे सांगते, ‘‘मला हा निकाह मंजूर नाही. कारण माझे मन तो मान्य करत नाही.’’ या तिच्या निर्भीड जबाबाला धर्ममार्तंड थोर मनानं स्वीकारतात आणि तिला या बेडीतून मुक्तता मिळते... हॉलंडमध्ये राज्यशास्त्र विषयातील पदव्युत्तर शिक्षणानंतर तेथील नागरिकत्व... आयानचा निवडणुकीच्या रिंगणातून प्रवेश. तिच्या दुर्दैवानं तिच्या राजकीय अस्तित्वालाच धोका निर्माण होतो आणि नागरिकत्वही रद्द होण्याची भीती समोर ठाकते... त्यातून सहीसलामत सुटका झाल्यानंतर आता आयाननं अमेरिकेत राहाण्याचा निर्णय घेतला आहे... परंपरावादी इस्लामनं स्त्रीच्या तनमनावर आणि स्वातंत्र्यावर ज्या बेड्या ठोकल्या आहेत त्या तोडण्यासाठी प्राणपणानं लढणाऱ्या आधुनिक लढवय्या स्त्रीची कहाणी म्हणजेच इन्फीडेल. तिनं अशा धर्माचा त्याग केला जो तिच्या समाजातील पन्नास टक्के लोकांना कुठलंही स्वातंत्र्य देऊ इच्छित नाही... त्या झुंजार स्त्रीला जाणून घेण्यासाठी प्रत्येक स्त्रीनं हे पुस्तक वाचायलाच हवं...

No Records Found
No Records Found
Keywords
Customer Reviews
  • Rating StarSwati Joshi

    आयान हिरसी अली या मुस्लिम मुलीचे हे मनोगत. सोमालियात परंपरावादी मुस्लीम कुटुंबात जन्मलेली ही मुलगी. अफ्रिकन देशांमधल्या अंतर्गत यादवीमुळे अनेक देश फिरावे लागलेली. अघोरी FGM सारख्या अन्यायी प्रथेला सामोरे जावे लागलेली. धर्माच्या असाधारण पगड्यमुळे सच्ची मुसलमान होण्यासाठी आधी दिवसातून पाच वेळा नमाज न् नकाब आपणहून अंगीकारून धर्मावर विलक्षण प्रेम करणारी. पण हळूहळू स्त्रियांवरचा जुलूम, त्यांना सतत दिली जाणारी दुय्यम आणि अपमानास्पद वागणूक, फक्त त्यांच्यावर लादल्या जाणाऱ्या जाचक अटी आणि अपमानास्पद नियम, अन्याय, आणि दुसरीकडे त्याच धर्मातल्या पुरूषांची बेजबाबदार आणि अहंकारी वृत्ती, त्यांना अनेक पत्नी करायची मुभा असल्याने स्त्रिया आणि मुलांचे होणारे हाल, पुरुषांच्या मनमानी बेबंद आणि दुटप्पी वागणुकीला मिळणारे धर्माचे अधिष्ठान यांमुळे आलेल्या विविध अनुभवांमुळे ती चिंतन करू लागली. आधी तर ती आपलंच काही चुकलं असेल असं वाटून अधिकाधिक कट्टर धार्मिक होण्याचा प्रयत्न करत गेली. पण तिला हळूहळू विषमता आणि अन्याय अधिकाधिक बोचत राहिला. सुरूवातीला तिने मतं मांडायचा प्रयत्न केला, मग विरोध करू लागली न् मग मात्र हळूहळू चक्क बंड करून ऊठली. जीवावर उदार होऊन ती धर्माची शिकवण आणि धर्ममार्तंडांचं प्रत्यक्षातलं वागणं त्यातल्या विसंगतीवर बोट ठेवू लागली. जगातल्या बहुतांश दहशतवादी कारवायांमधला मुस्लीम सहभाग पाहून ती व्यथित झाली. बहुतांश मुस्लिमबहुल देश हे गुन्हेगारीत फसलेले आणि अंतर्गत यादवीने गांजलेले आहेत हे बहुमोल निरीक्षण ती नोंदवते. कायमच राजकीय अस्थैर्य असल्याने हे देश प्रगती करू शकत नाहीत याबद्दल ती खंतावते. विचारस्वातंत्र्य नाकारणारा, सतत कुणावर तरी दोषारोप करत द्वेष शिकवणारा, हत्येला प्रोत्साहन देणारा, अनेक विवाह व जास्त मुले यांमुळे दारिद्र्य, बेरोजगारी व गुन्हेगारी यांच्या दलदलीत फसणारा धर्म अखेर तिने चक्क झुगारून दिला. (तिचे हे धर्मविरोधी बंड सहन न झाल्याने साहजिकच तिला मारण्याचा फतवा निघाला. तिने युरोपियन देशात आश्रय घेतला. पण दुर्दैवाने अखेर तिची हत्या झाली.) या पुस्तकात तिचे बारीक निरीक्षण आणि त्यावर आधारित सखोल चिंतन आहे. यातली अनेक वाक्ये आणि तिचे चिंतन आपल्यालाही विचार करायला लावतात. तिच्या देशात आधी नकाब आणि हिजाब आजिबात सक्तीचे नव्हते. मुली आणि स्त्रिया मोकळेपणाने हिंडायच्या. पण मूलतत्त्ववादी पगडा वाढू लागल्यावर मात्र ही सक्ती अमलात आली. त्याबद्दल तिच्या एका भावाने प्रामाणिकपणे आपले विचार मांडताना सांगितलं की, "स्त्रीची मान हा काही फार लक्ष वेधून घेणारा अवयव आहे असं मला पूर्वी कधीच वाटलं नव्हतं. मी लहानपणापासून माझी आई, काकू, आत्या, बहिणी यांना मोकळ्या डोक्याने वावरताना पहात आलो. पण कॉलेजमधे गेल्यावर मात्र कट्टरतावादाने आपले पाय रोवायला सुरूवात केली आणि काही वर्षातच हिजाब सक्तीचा झाला. आता मोकळ्या केसांची किंवा ऊघड्या मानेची एकही मुलगी अथवा स्त्री दिसणे मुश्कील. पण त्याचा परिणाम असा झाला की चुकून एखादीची चुकार बट भुरभुरु लागली की माझे हृदयाचे ठोके वाढायला लागले आणि चुकून वाऱ्याने कुणाचा हिजाब सरकून जराशी मान जरी दिसली तरी माझा श्वास अनियमित होऊ लागला. आता मला नकळत चाळाच लागला अशी मान पहायचा. मी अगदी निरखून निरखून पाहू लागलो. प्रत्यक्षात मात्र अशी मान दिसली की ती स्त्री कितीही वयाची असो. तिच्यावर रागावून वसकन् ओरडायची संधी मात्र मी सोडत नाही. मी असा ओरडलो की वाईट न वाटता उलट मला माझ्याच अपराधाचं परिमार्जन झाल्यासारखं वाटतं. " अशा रितीने या कडक नियमांचा होणारा ऊलटाच परिणाम, वागण्यातली विसंगती, स्त्री-पुरुषांच्या मधल्या सहजीवनात नैसर्गिक प्रेमाचा अभाव, त्यामुळे पुरूषांच्याही मानसिकतेत वाढत जाणारी अस्वस्थता आणि या सर्वांचा एकूणच समाजावर पडणारा वाईट प्रभाव याचं फार सुंदर चित्रण या पुस्तकात आहे. या झुंजार स्त्रीचा लढा आणि धर्माच्या बाबतीतले तपशीलवार चिंतन जाणून घेण्यासाठी प्रत्येकाने वाचायलाच हवे असे पुस्तक. *स्वाती प्रताप जोशी* ...Read more

  • Rating StarKalpana Mahadik

    पुस्तक अतिशय सुंदर आहे. नक्की. वाचा.

  • Rating StarShrinivas Ranjanikar

    एका कर्मठ आणि सनातनी देशातील संघर्ष करणाऱ्या स्त्री ची कथा,नक्की वाचा सकारात्मक आत्मकथा...

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

वा. पां. जाधव अमरावती

`अमरावतीचे छप्पन स्वभाव एक मनोरंजक काव्यसंग्रह` `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे अमरावतीचे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री जी. बी. देशमुख यांचे अमरावती नगरीचा सहज स्वभाव व ह्या नगरीच्या वेगळ्या ओळखीवर आधारित मनोरंजक पुस्तक वाचले. वाचून भरपूर मनोरंजन झाले. खर काय लिहावे या लेखकाबद्दल, मन गोंधळले. ऐतिहासिक असो, प्रवास वर्णन असो, व्यक्ती विशेष असो, अनुभवात्मक घटना घडामोडी असो कशावरही सहज लिखाण करणारा हा लेखक आहे. आता तर त्यांनी लेखनाला विनोद प्रचुर फोडणी देऊन `अमरावतीचे छप्पन स्वभाव` या काव्यसंग्रहातून अमरावतीकरांना मनोरंजनाची मेजवानीच दिली आहे. प्रत्येक शहराची व त्या शहरातील वैशिष्ट्यांची एक वेगळीच ओळख असते. दिवस जातात, काळ लोटतो, पिढ्या बदलतात मात्र जुन्या स्मृतीची चिन्हे नवीन येणाऱ्या पिढीच्या मनात गुढ निर्माण करत कायम हाक देत राहतात. अमरावतीही त्याला अपवाद नाही. बापट चौकात चौक नाही, त्या जागेवर चौरस्ता नसून टी-पॉइंट आहे, खापर्डे बगीचा म्हणून आजही ओळख आहे मात्र तेथे बगिचा नाही किंवा प्रसिद्ध गांधी चौकात गांधीचा पुतळा अथवा स्मृतीदर्शक चिन्ह अथवा उल्लेख नाही मात्र गांधी चौक अशीच ओळख जनमानसात आहे. अशा एक ना अनेक विसंगत नाम दर्शक ओळख असलेली उदाहरणे त्यात सप्रमाण आहेत. पण खरी गंमत म्हणजे कधी काळी घडलेला इतिहास त्यामध्ये दडलेला आहे हे निश्चित. या सोबतच अमरावतीकरांच्या स्वभावातला स्थायी मजेदारपणाच्या एक एका हटके गुण वैशिष्ट्याच्या गमती लेखकाने हुबेहूब अधोरेखित केलेल्या आहेत. आणि त्यावरुन तत्सम रचनांचा उहापोह लेखकाने पुस्तकात केला असावा. विदेशात स्थाईक झालेल्या मूळ अमरावतीकरांना लेखकाने लिहिलेल्या गमती मनोरंजनात्मक वाटाव्या एवढी किमया जी.बी. च्या सहज लेखनाने दाखवली आहे. अमरावतीचे अग्रगण्य वृत्तपत्र दै. हिंदुस्थान मध्ये लेखकाने सतत ६ महीणे लिहीलेल्या काव्य सदरात अमरावतीच्या जनमानसाच्या हृदयाच्या ठाव घेणाऱ्या काव्य रचनांचा आठवणींनी महापूर ओसंडून गेला होता. विशेष म्हणजे ह्यात कुठेही अनावश्यक अभिनीवेष नव्हता. उलट गमतीत केलेले आत्मपरिक्षण मात्र काही प्रमाणात होते. वयस्क अमरावतीकर रसिकांना या रचना ताज्या करून त्यांच्या तारुण्यात घेऊन गेल्या हेच खरे. जी बी देशमुख या लेखकास मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रियां वरून दिसून येते. . सदर पुस्तकातील काव्यमय रचना वाचतांना अमरावतीच्या माणसाच्या वऱ्हाडभोळ्या स्वभावाची प्रचीती येते आणि वेगळाच आनंद देऊन जाते. निखळ मनोरंजन करत गुदगुल्या करणारा असा हा काव्यसंग्रह आहे. अमरावती शहराची ऐतिहासिक वैशिष्टे काव्यरूपात वाचण्याचा आनंद अमरावतीकरांना ते जिथं असतील त्या गावात, परगावात, परदेशात पुस्तक मागवून घेता येईल. ...Read more

ज्योती चेडे, मुंबई.

अमरावतीच्या वैशिष्ट्यांवर आधारीत खुमासदार छप्पन्न कवितांच्या संग्रहातील प्रत्येक कविता वाचत असताना अमरावतीच्या वातावरणाची धुंदी आपसुकच मनावर चढु लागली. सगळ्याच कविता सुंदर आहेत. एकेक कविता अमरावतीचे अप्रतिम वर्णन करते. प्रत्येक कवितेचा शेवट कुठेतरी गंभीर विचार करायला भाग पाडतो आणि मन गलबलून जाते. सगळ्याच कविता सुंदर आहेत पण माझ्या मनाला भावलेल्या व भिडलेल्या कविता आहेत `अमरावतीतल्या गमती`, `अमरावतीचे शिक्षण`, `अमरावतीचे हजरजबाबी`, `अमरावतीचे वेडे`, `अमरावतीच्या काकू` व बाकी सगळ्या. `अमरावतीचे वेडे` या कवितेत उल्लेखीत शेवटचा अश्रुंचा एक थेंब जरुर राखला जाईल. तसेच `अमरावतीच्या काकूं` ची उर्जा उरात भरून उरेल. जीवन देणाऱ्या विहीरीने कोणाचेही जीवन घेऊ नये, अशी सद्भावना मनात जागेल. अमरावतीकर जगात कुठेही असो त्यांच्या मनात एका कोपऱ्यात राजकमल चौक असतोच हे सत्य मनावर कोरले जाईल. प्रत्येक अमरावतीकराने ह्या कविता जगाव्यात. त्यासाठी हे पुस्तक संग्रही ठेवावे आणि परगावी राहणाऱ्या आपल्या अमरावतीकर आप्तेष्टांना भेटी दाखल द्याव्या. ...Read more