STEPHEN ALTER

About Author

Birth Date : 15/09/1956


SHORTLISTED FOR THE DSC SOUTH ASIAN LITERATURE AWARD IN 2017. HE WAS WRITER-IN-RESIDENCE AT MIT FOR TEN YEARS, BEFORE WHICH HE DIRECTED THE WRITING PROGRAMME AT THE AMERICAN UNIVERSITY IN CAIRO. HE IS FOUNDING DIRECTOR OF THE MUSSOORIE MOUNTAIN FESTIVAL.

स्टीफन ऑल्टर यांनी फिक्शन आणि नॉन-फिक्शन मिळून वीस पुस्तकं लिहिली आहेत. त्यांचा जन्म उत्तराखंडमध्ये मसूरी इथे झाला. ते जिथे राहतात आणि काम करतात त्या हिमालयाला केंद्रस्थानी ठेवून त्यांनी बरंचसं लिखाण केलेलं आहे. त्यांना मिळालेल्या मानसन्मानात गुगेनहाईम शिष्यवृत्ती आणि फुलब्राइट पुरस्काराचा समावेश आहे. ‘बिकमिंग अ माउंटन : हिमालयन जर्नीज इन सर्च ऑफ द सेक्रेड अ‍ॅन्ड द सब्लाइम’ या त्यांच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आठवणीसंग्रहाला २०१५ सालचा हिमालय साहित्याचा केकू नवरोजी पुरस्कार मिळाला आहे. ‘इन द जंगल्स ऑफ द नाइट : अ नॉव्हेल अबाउट जिम कॉर्बेट’ या त्यांच्या अगदी अलीकडच्या काल्पनिक साहित्यकृतीला २०१७ साली डीएससी दक्षिण आशियाई साहित्य पुरस्कारासाठी नामांकन मिळालं होतं. एमआयटी इथे ते दहा वर्षं निवासी लेखक म्हणून कार्यरत होते. त्यापूर्वी त्यांनी कैरोच्या अमेरिकन विद्यापीठात लेखनविषयक अभ्यासक्रमाची धुरा सांभाळली. मसूरी माउंटन फेस्टिवलचे ते संस्थापक - संचालक आहेत.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
HIMALAYARANYAK Rating Star
Add To Cart INR 650

Latest Reviews

रुपाली सोनवणे

#रुक #जाना #नही लेखक: Dr. भावेश भाटिया शब्दांकन: Dr: सचिन पाचोरकर अनुवाद: सुप्रिया वकील ​अंथरून पाहून पाय पसरावे... अह्ह.. त्या निर्जीव अंथरुणासाठी आपल्या सजीव पावलांना का त्रास द्यावा? असेच एक जबरदस्त आत्मचरित्र वाचून संपवलं आणि एक ऊर्जा निर्माणकरून गेलं, पुस्तकाचं नाव आहे `रुक जाना नहीँ ​डॉ. भावेश भाटिया यांची ही प्रेरणादायी कहाणी. शाळेत असताना आलेलं अकाली अंधत्व आणि त्यानंतर खडखडीत खडतर जीवनाचा सुरू झालेला प्रवास, पण या प्रवासात खचलेल्या बालमनाला त्यांच्या आईने दिलेलं बळ, प्रेरणा व आत्मसन्मानाची शिकवण आणि स्वाभिमानाचे धडे लेखकास पुरे होते. हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. चांगल्या धडधाकट व्यक्तीवर संकट आल्यावर दूर दूर पळणारे नातलग, मित्र परिवार, जातभाई... दृष्टी गेलेल्या व्यक्तीस कितपत आधार देतील? पण एक ऑपरेटर ते एक उद्योजक, `सनराईज कॅण्डल`चा विस्तार आणि स्वतःबरोबर अनेक दृष्टिहीन व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभं करून रोजगार देणारा हा अवलिया किती अडथळे पार करून आलाय हे जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचायला हवंच. ​कुठलाही वशीला नाही की कोणाची सहानुभूती नाही, स्वबळावर विविध प्रयोग करत उद्योग यशस्वी करणं सोपं नाही. यात ज्या ज्या देवमाणसांनी हातभार लावला त्यांचा पण उल्लेख आहे, पण त्या देवमाणसांनी देखील कधीच उपकारिक भाषा न करता व स्वाभिमान न दुखावता कशी मदत करता येऊ शकते हे त्यांच्या कृतीतून दाखवून दिलंय. लेखक फक्त उद्योग उभारून थांबले नाहीत तर त्यांनी सामाजिक जाणीवेचं भान देखील ठेवलंय. महाबळेश्वरमध्ये सनराईज कॅण्डल नावाने त्यांनी भव्य असा उद्योग परिसर आणि म्युझियम सुरू केलंय, तेथे अनेक दृष्टिहीन व्यक्तींना रोजगार मिळाला आहे त्याचबरोबर सर्वजण स्वाभिमानाने कष्ट करून जगत आहेत. हजारो आयुष्य त्यांनी उजळून टाकली आहेत. दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार सह एकून 46 पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.विशेष म्हणजे सर्व पुरस्कार त्यांच्या योग्यतेनुसार दिले आहेत.. आणी अशा हजारो पुरस्कारांचे ते मानकरी आहेत असंच वाटत..त्यांच्या कामाची दखल रिलायन्स ग्रुप ने देखील घेतली आहे.व त्यांच्या पुस्तकास प्रस्तावना देखील नीता अंबानी यांनी दिली आहे.उद्योग करताना छोट्या छोट्या गोष्टी कसा प्रभाव करतात याच वर्णन देखील त्यांनी लिहिल आहे.. ​या कार्यात महत्त्वाचं योगदान त्यांच्या धर्मपत्नी नीता भाटिया यांनी दिलं आहे. दूरदृष्टी ठेवून आपल्या पतीस प्रोत्साहन देऊन, नवीन कल्पनेसह पाठिंबा देऊन त्यांना हुरूप देण्याचं काम त्यांनी केलंय. नीता भाटिया यांचं कर्तृत्व, त्यांचं पवित्र निस्वार्थी प्रेम या पुस्तकातून वाचताना आंतरिक वेगळी ऊर्जा मिळते. कलियुगातील देवी हा शब्द व मान त्यांना समर्पक वाटतो. पुस्तक सर्व वयोगटातील वाचक वाचू शकतात. मनाने खचलेल्या पण शरीराने धडधाकट असलेल्या प्रत्येक व्यक्तीने वरील पुस्तक नक्की वाचावं आणि आत्मसात करावं. एवढ्या उंचीवर असूनही जमिनीवर पाय असलेल व्यक्तिमत्व आहे. अगदी प्रेमळ पणे वागण बोलण सन्मान देण..ही दैवी देणगी त्यांच्या जवळ आहे. ...Read more