* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: CUTTING FREE
  • Availability : Available
  • Translators : SUPRIYA VAKIL
  • ISBN : 9788184980677
  • Edition : 2
  • Publishing Year : SEPTEMBER 2009
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 267
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Print Books:
BEGINNING WITH A PRIVILEGED CHILDHOOD IN AN ELITE FAMILY OF PRE-PARTITION INDIA, TO A TROUBLED YOUTH IN PAKISTAN, THIS IS THE INSPIRING STORY OF SALMA AHMED--A WOMAN WHO SURMOUNTED FORMIDABLE ODDS TO ACHIEVE EXTRAORDINARY SUCCESS IN BUSINESS AND POLITICS. IN THIS STRIKINGLY HONEST AND CANDID ACCOUNT, SALMA TALKS OF HER THREE MARRIAGES - TO A NAVAL OFFICER, A SCION OF A LEADING FEUDAL FAMILY, AND A CRICKETING STAR; HER CONFLICTS AS A MOTHER AS SHE MAKES THE AGONISING DECISION TO GIVE UP TWO OF HER SIX CHILDREN, AND HER EFFORTS TO BUILD A CAREER AS A BUSINESS ENTREPRENEUR AND POLITICAL FIGURE IN AN EMERGING PAKISTAN. AS SHE RECOUNTS THE EVENTS OF A LIFE FILLED WITH DRAMATIC HIGHS AND EQUALLY PAINFUL LOWS, SHE DOES NOT SPARE HERSELF ANY MORE THAN SHE DOES OTHER PLAYERS IN HER STORY. THIS IS A BOOK THAT UNABASHEDLY REVEALS MANY OF THE HIDDEN TABOOS OF CONTEMPORARY PAKISTANI SOCIETY, BRINGING INTO QUESTION CUSTOMS THAT ARE AN INTEGRAL, IF UNPLEASANT, PART OF SUBCONTINENTAL CULTURE. SALMA AHMED`S GRIPPING NARRATION OF HER POLITICAL CAREER IS FAST-PACED AND OFTEN AMUSING. THE BOOK RELATES EVENTS OF THE 1985 ASSEMBLY WHICH NO OTHER AUTHOR HAS YET COMMENTED ON. HER INTERACTION WITH THE LATE PRESIDENT ZIAUL-HAQ AND PRIME MINISTER MOHAMMAD KHAN JUNEJO, MQM LEADER ALTAF HUSSAIN, THE CHARISMATIC PIR SAHIB PAGARO, AND SEVERAL OTHERS, GAVE HER A UNIQUE OPPORTUNITY TO WITNESS FIRST-HAND THE INTRIGUE, POWER PLAYS AND UNFOLDING DRAMA OF PAKISTANI POLITICS. HER FREQUENT VISITS TO INDIA BROUGHT HER INTO CONTACT WITH INDIRA GANDHI, HER SON RAJIV, AND MANY OTHER LEADING FIGURES OF THE SUB-CONTINENT. THIS IS THE ABSORBING TALE OF A WOMAN WHO WAS A PAMPERED CHILD, AN UNHAPPY WIFE, A REPENTANT MOTHER--BUT ONE WHO EMERGED TRIUMPHANT AS A WOMAN OF SUBSTANCE, IN BUSINESS AND POLITICS.
ही एक अतिशय श्रीमंत, उच्चभ्रू कुटुंबात जन्मलेल्या पाकिस्तानी स्त्रीची विलक्षण कहाणी आहे. आयुष्यानं निरनिराळ्या टप्प्यांवर घेतलेली अनपेक्षित वळणं झेलताना लेखिका सलमा अहमद यांनी त्यांच्या बिझनेस, राजकीय कारकीर्द व कौटुंबिक जीवन यांबद्दल, यशापयश, भावनिक आंदोलनं यांबद्दल अतिशय प्रामाणिक व मनमोकळं कथन केलं आहे. सलमा अहमद यांच्या जीवनातले अतिशय उत्तुंग नाट्यमय क्षण वाचकाला रोमांचित करतात तर त्यांच्या जीवनातल्या अनेक काळ्याकुट्ट क्षणी त्यांनी दाखवलेलं विलक्षण धैर्य, चिकाटी आणि आत्मविश्वास स्तिमित करतो. सलमा अहमद यांच्या व्यक्तिगत आयुष्याबरोबरच या कथनातून उपखंडातील संस्कृती, तत्कालिन पाकिस्तानी समाज, सरंजामी जीवन आदींचेही विविधांगी पदर वाचकासमोर उलगडतात. बिझनेस व राजकारण या दोन्ही क्षेत्रांत ‘वूमन ऑफ सबस्टन्स’ ठरलेल्या सलमा अहमद यांचं हे विलक्षण अनुभवकथन वाचकाला एका निराळ्या विश्वाची व स्त्रीशक्तीच्या अफाट सामथ्र्याची ओळख करून देते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #CUTTINGFREE #CUTTINGFREE #कटिंगफ्री #BIOGRAPHY #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #SUPRIYAVAKIL #सुप्रियावकील #SALMAAHMED "
Customer Reviews
  • Rating StarShrikant Adhav

    CUTTING FREE by Salma Ahmed सलमा अहमद यांनी स्वानुभवावर लिहिलेले ‘कटिंग फ्री’ हे विलक्षण पुस्तक आहे. याचा अनुवाद सुप्रिया वकील यांनी केला आहे. ही एक अतिशय श्रीमंत, उच्चभ्रू कुटुंबात जन्मलेल्या पाकिस्तानी स्त्रीची विलक्षण कहाणी आहे. सलमा अहमद यांचाजन्म १० सप्टेंबर रोजी शुक्रवाी ४.३० वाजता ग्रँडचेस्टर मेडोज, केंब्रिज येथील ग्रँडचेस्टर हॉस्पिटलमध्ये झाला. तिचं नाव ठेवलं इंदिरा सलमा हुसेन. तिचे पिता अख्तर हुसेन यांनी तिच्या आईला इंग्रजी शिकायला केंब्रिजला नेलं होतं. तिथं ते कॉर्पस ख्रिस्तीमध्ये अभ्यासक्रम पूर्ण करीत होते. त्याच दरम्यान तिचा जन्म झाला. तिची आई शाकिरा बेगम. तिचं बाळंतपण अवघड गेलं. ती बुटकी, लहानखुऱ्या चणीची होती. इंदिरा सलमा हुसैन तिचं पहिलंच अपत्य होतं. त्या फाळणीपूर्व काळात इंग्लंडमध्ये जन्म होणे ही फार विशेष गोष्ट मानली जात असे. तिच्या आई-वडिलांनी तिला जहाजातून भारतात आणलं. परतीच्या प्रवासात तिची आई विचार करीत होती की, तिच्या नावातील ‘इंदिरा’चं घरातल्यांना काय स्पष्टीकरण द्यायचं त्यासाठी ती टोपण नाव शोधत होती.इंदिरा सलमा हुसैनचे वडील देशभक्त होते, पण सनातनी मुस्लिम कुटुंबात हे नाव रुचलं नसतं. तिच्या मम्मीला एक नाव सुचलं, इंदु बाला. पण तेही नाव चांगलं नसल्यामुळे तिच्या वडिलांनी तिचं टोपणनाव इनी ठेवलं. तिचे वडील तेव्हा सहारनपूमध्ये ‘डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट’ होते. भारतीय मुलकी सेवेतील आयसीएस सदस्य. तिची मम्मी मोराबादच्या सरंजामशाही घराण्यातली होती. उत्तर प्रदेशातील मानकुला हे त्यांचं वडिलोपार्जित खेडं होतं. तिच्या वडिलोपार्जित घराला ‘डेरा’ म्हटलं जात असे. तिच्या घराण्याच्या पठाणी पार्श्वभूमीमुळं बहुधा हे नाव पडलं असावं. वयाच्या सहाव्या वर्षीच भारताच्या फाळणीनंतर सलमा हुसैनला आपल्या कुटुंबियांबरोबर पाकिस्तानमध्ये जावं लागलं. त्यानंतरची तिची विलक्षण जडणघडण या पुस्तकात मांडण्यात आली आहे. आयुष्यानं निरनिराळ्या टप्प्यांवर घेतलेली अनपेक्षित वळणं झेलताना लेखिका सलमा अहमद यांच्या जीवनातले बिझनेस, राजकीय कारकीर्द आणि कौटुंबिक जीवन, अतिशय उत्तुंग, नाट्यमय क्षण रोमांचित करतात तर काळयाकुट्ट क्षणी त्यांनी दाखविलेलं धैर्य, चिकाटी आणि आत्मविश्वास स्तिमित करतो. सलमा अहमद यांच्या व्यक्तिगत आयुष्याबरोबरच तत्कालीन पाकिस्तानी समाज, सरंजामी जीवन वाचकांसमोर उलगडले जाते. सलमा अहमद यांचे बालपण राजकारण व्यक्ती आणि मुत्सद्दी मंडळींच्यात गेले आहे. वडील राजदूत असल्यामुळे लहानपणापासून राजकीय घटनांमधील अन्वयार्थ त्यांना चांगल्या पद्धतीने समजत होता. तो त्यांनी राजकीय पक्षांशी संलग्न होताना अधिक परिपक्व केला. उद्योग, व्यवसाय आणि राजकारण यात यशस्वी होत असताना याचा उपयोग झाला. इंदिरा गांधी, तसेच राजीव गांधी यांच्याशी त्यांनी घेतलेल्या भेटी तसेच पुस्तकात असलेली त्यांची छायाचित्रे, वाचकांशी होत असलेला संवाद अधिकच मनोहारी करतात. खरेतर सलमा अहमद यांनी १९७० मध्ये सामाजिक कार्याला सुरुवात केली. त्यापूर्वी १९६७ मध्ये स्वतःची पहिली इंडस्ट्री त्यांनी स्थापन केली. जहाज मोडणीच्या कामात त्यांनी मिळवलेलं यश हे त्यांच्या कारकीर्दीतील सर्वोच्च यश होतं. कारण अशा प्रकारचे काम करणाऱ्या त्या जगातील पहिल्या महिला होत्या. त्यांनी पाकिस्तान ‘असोसिएशन ऑफ विमेन’ची स्थापना केली. पाकिस्तान स्वतंत्र झाल्यापासून गेल्या ५० वर्षांमधील सर्वांत यशस्वी उद्योजिका म्हणून त्यांना प्रियदर्शनी पुरस्कार देण्यात आला. कालांतराने त्यांनी राजकारण प्रवेश केला. १९७७ मध्ये ऑल पाकिस्तान मुस्लिम लीग या पक्षात त्या सामील झाल्या. त्यांचा हा प्रवास नाट्यमय आणि वाचकांना रोमांचित करणारा आहे. बिझनेस आणि राजकार या दोन्ही क्षेत्रात वूमन ऑफ सबस्टन्स ठरलेल्या सलमा अहमद याचं हे विलक्षण अनुभव कथन स्त्रीशक्तीच्या अफाट सामर्थ्याची ओळख करून देणारे आहे.सलमा अहमदनी हे आत्मवृत्त तिच्या मुलीच्या वियोगामुळे लिहिलं आहे. १९९९ साली ब्रेनट्यूमरनी तिची मुलगी नेहमी म्हणायची, ‘ममी, तू तुझ्याबद्दल लिहिलं नाहीस, तर मी लिहिन’ मुलीच्या स्मृतिप्रित्यर्थ आपल्या स्त्रीमनातील गुंत्याचा मानसिक निचरा म्हणून लिहिलेलं आत्मवृत्त म्हणजे ‘कटिंग फ्री’. बीनाच्या स्मृतीस वाहिलेलं हे आत्मकथन प्रसिद्ध आंग्ल कवी लॉर्ड बायनरच्या जगप्रसिद्ध कवितेचा निर्देश करून सुरू होतं. ``She walks in beauty like the night.`` स्त्रीवर्गाने आणि भारतातील सर्वांनीच वाचावं असं हे पुस्तक असून ते मराठीत आणलं गेल्यामुळे सर्वांची सोय झाली आहे. ते जरूर वाचायला हवं. ...Read more

  • Rating StarPRABHAT 3-1-2010

    सलमा अहमद यांनी स्वानुभवावर लिहिलेले ‘कटिंग फ्री’ हे विलक्षण पुस्तक आहे. याचा अनुवाद सुप्रिया वकील यांनी केला आहे. ही एक अतिशय श्रीमंत, उच्चभ्रू कुटुंबात जन्मलेल्या पाकिस्तानी स्त्रीची विलक्षण कहाणी आहे. आयुष्यानं निरनिराळ्या टप्प्यांवर घेतलेली अनपे्षित वळणं झेलताना लेखिका सलमा अहमद यांच्या जीवनातले बिझनेस, राजकीय कारकीर्द आणि कौटुंबिक जीवन, अतिशय उत्तुंग, नाट्यमय क्षण रोमांचित करतात तर काळयाकुट्ट क्षणी त्यांनी दाखविलेलं धैर्य, चिकाटी आणि आत्मविश्वास स्तिमित करतो. सलमा अहमद यांच्या व्यक्तिगत आयुष्याबरोबरच तत्कालीन पाकिस्तानी समाज, सरंजामी जीवन वाचकांसमोर उलगडले जाते. सलमा अहमद यांचे बालपण राजकारणी व्यक्ती आणि मुत्सद्दी मंडळींच्यात गेले आहे. वडील राजदूत असल्यामुळे लहानपणापासून राजकीय घटनांमधील अन्वयार्थ त्यांना चांगल्या पद्धतीने समजत होता तो त्यांनी राजकीय पक्षांशी संलग्न होताना अधिक परिपक्व केला. उद्योग, व्यवसाय आणि राजकारण यात यशस्वी होत असताना याचा उपयोग झाला. इंदिरा गांधी, तसेच राजीव गांधी यांच्याशी त्यांनी घेतलेल्या भेटी तसेच पुस्तकात असलेली त्यांची छायाचित्रे, वाचकांशी होत असलेला संवाद अधिकच मनोहारी करतात. खरेतर सलमा अहमद यांनी १९७० मध्ये सामाजिक कार्याला सुरुवात केली. त्यापूर्वी १९६७ मध्ये स्वतःची पहिली इंडस्ट्री त्यांनी स्थापन केली. जहाज मोडणीच्या कामात त्यांनी मिळवलेलं यश हे त्यांच्या कारकीर्दीतील सर्वोच्च यश होतं. कारण अशा प्रकारचे काम करणाऱ्या त्या जगातील पहिल्या महिला होत्या. त्यांनी पाकिस्तान ‘असोसिएशन ऑफ विमेन’ची स्थापना केली. पाकिस्तान स्वतंत्र झाल्यापासून गेल्या ५० वर्षांमधील सर्वांत यशस्वी उद्योजिका म्हणून त्यांना प्रियदर्शनी पुरस्कार देण्यात आला. कालांतराने त्यांनी राजकारण प्रवेश केला. १९७७ मध्ये ‘ऑल पाकिस्तान मुस्लिम लीग’ या पक्षात त्या सामील झाल्या. त्यांचा हा प्रवास नाट्यमय आणि वाचकांना रोमांचित करणारा आहे. बिझनेस आणि राजकार या दोन्ही क्षेत्रात वूमन ऑफ सबस्टन्स ठरलेल्या सलमा अहमद याचं हे विलक्षण अनुभव कथन स्त्रीशक्तीच्या अफाट सामर्थ्याची ओळख करून देते. ...Read more

  • Rating StarDAINIK GAONKARI 6-6-2010

    एका उच्चभ्रू पाकिस्तानी महिलेचं विलक्षण अनुभवकथन हे सलमा अहमद लिखित ‘कटिंग फ्री’ या आत्मवृत्ताचं मुखपृष्ठवर्णित उपशीर्षकच त्यातील सारं थोडक्यात सांगून जातं. खरं तर मूळ इंग्रजी आत्मकथेला असं उपशीर्षक नसल्यामुळे ‘कटिंग फ्री’ त्या शीर्षकाचाच विचार वाचका्या मनात प्रथम सुरू होतो. ‘मुक्तता, पण कशापासून?’ असा प्रश्न निर्माण होतो. अर्थात त्याचं साधंसं उत्तर म्हणजे : पुरुषाच्या गुलामगिरीपासून; परंतु पुस्तक वाचत असताना मात्र पुरुषप्रधान संस्कृतीची पार्श्वभूमी घडणाऱ्या घटनांना अजूनही जळजळीत स्त्रीवादी दृष्टिकोन लिखाणात फार जाणवत नाही. एकूणच हे पुस्तक स्त्रीवादी आणि त्यातून येणाऱ्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक प्रश्नांची चर्चा व्हावी, या हेतूने लिहिलेले नसून, मराठी अनुवादाच्या उपशीर्षकास जणू अनुरूप ठरावे म्हणून एका उच्चभ्रू पाकिस्तानी महिलेचं फक्त विलक्षण अनुभवकथन, हेच स्वरूप धारण करून समोर येतं. स्त्रीच्या दु:खाची ज्वलंत कहाणी मांडण्यापेक्षा आपल्या अनुभवाचा वाटा लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणारी एक स्त्री म्हणून सलमा अहमदचं हे आत्मवृत्त जास्त पसंतीस उतरते, असं म्हणणं जास्त योग्य ठरेल. एका अर्थाने ही आत्मकथा त्याआधी प्रसिद्ध झालेल्या तशाच प्रकारच्या दोन आत्मवृत्ताच्या धर्तीचीच वाटते. तेहमीमा दुराणी यांचे ‘माय फ्यूडल लॉर्ड’ आणि असरा नोमानी यांचे ‘स्टॅडिंग अलोन इन मक्का’ ही ती दोन आत्मवृत्ते होत. त्या दोन्ही पाकिस्तानी महिलांनी इस्लामी समाजव्यवस्थेत पुरुषप्रधान संस्कृतीत होणारी मुस्लीम स्त्रियांची गळचेपी मानहानी प्रभावीपणे मांडली होती. सलमा अहमदही तेच कथन पुढे चालवीत असल्या तरी स्त्रीचे एक आगळेवेगळे आणि प्रभावी रूप ही आत्मकथा समोर मांडते. फाळणीपूर्व भारतातील पतियाळामध्ये बालपण गेलेल्या एका श्रीमंत मुस्लीम कुटुंबातील स्त्रीचे तरुणपणी पाकिस्तानमध्ये झालेले हाल आणि त्यानंतर त्यातून बाहेर पडून, राखेतून पुनर्जन्म झालेल्या फिनिक्स पक्षाप्रमाणे, तिने व्यावसायिक जगतात, कमावलेले नाव आणि पाकिस्तानी राजकारणात मिळविलेले स्थान हे सारे स्तिमित करणारेच ठरते. स्त्रीच्या व्यक्तिगत जीवनातील दु:खाबरोबरच तिच्या सामाजिक जीवनपर्वातील अनुभव त्यातील तपशीलासह तितक्याच तन्मयतेने आणि तरीही त्यापासून स्वत:ला दूर ठेवून कथन करीत असताना सर्व सत्य जगासमोर मांडण्यात हे आत्मवृत्त यशस्वी झालं आहे, असे म्हणता येईल. एका स्त्रीची आत्मकथा असूनही जे स्त्रीरूप आपल्यासमोर येते ते मात्र पारंपारिक वाटत नाही. ही स्त्री श्रीमंत, उच्चभ्रू कुटुंबातील असून केंब्रिजला शिकलेली, जगभर फिरलेली, आर्थिक, सामाजिकदृष्ट्या उच्चभ्रू वर्गात मोडणारी आहे. तरीही तीन विवाह संबंधातून जाताना ती प्रवाह पतित भासते. आपल्या चुकांमधून ती फारसे शिकत नाही, असे वाटते. उच्च राहणीमानाचा, पैशाचा, समृद्धीचा मोह तिला सोडता येत नाही आणि सर्वांत न रूचणारी बाब म्हणजे तिचं आपल्या मुलांकडे झालेलं दुर्लक्ष. सहा मुलांची ही आई आपल्या पहिल्या दोन मुलांचा त्याग करते, हे पटत नाही. स्वत:च्या सुखासाठी ती हे करते, हे समजू शकते. पण वाचकांच्या स्त्रीत्वाच्या कल्पनेला धक्का देऊन जाते. त्यामुळेच या आत्मकथेतील स्त्री ही मर्यादाच्या पलीकडे जाऊन जीवन आपल्या पद्धतीनेच जगणारी आहे. स्त्रीचे असेही रूप असते, तेही तितकेच खरे असते, प्रामाणिक असते, हा विचार त्या आत्मकथेतून पुढे येतो. आणि त्यामुळे लेखिका स्वत:च्या दु:खात बुडून न जाता धैर्याने त्यास सामोरी जाते. वडिलांच्या राजकीय पार्श्वभूमीचा व आर्थिक सुबत्तेचा योग्य तो उपयोग करीत ती ‘शिप-ब्रेकिंग’ या नव्या व्यवसायात धडाडीने उतरते व यशस्वी होते. जहाज मोडणीच्या व्यवसायातील पहिली यशस्वी महिला ठरण्याचा मानही मिळविला. अत्यंत लाडावलेली उच्चभ्रू कुटुंबातील मुलगी, तीन विवाहबंधनातून यातनांचे चटके सोसलेली पत्नी आणि एक पश्चात्तापदग्ध आई अशी व्यक्तिगत जीवनातील तीन रूपे बाजूस सारून सलमा अहमद यांनी सामाजिक व पुढे राजकीय जीवनात प्रवेश केला. १९८५ सालच्या पाकिस्तानी राष्ट्रीय असेंब्लीच्या सभासद झाल्या. त्यावेळच्या पंतप्रधान मोहम्मदखान जुनेजो यांच्याबरोबर काम करताना आलेल्या अनुभवातून त्यांनी पाकिस्तानच्या राजकीय जीवनातील आंतरिक घडामोडीवर प्रकाश टाकला आहे. प्रेसिडेंट झिया-उल-हक यांच्याबद्दलचे अनुभवही त्यांनी पुस्तकात मांडले आहेत. वैयक्तिक व सामाजिक जीवनातील अनुभव सांगताना त्या कोठेही डगमगलेल्या वाटत नाहीत. भावनेला लगाम घालून सत्य कथनाचा प्रामाणिक वसा घेऊन लिहिलेले हे आत्मवृत्त त्यामुळेच वाचायला हवे. आत्मवृत्ताचा मूळ हेतू अनुभव कथनातील सत्यता हा असल्याने लिखाणतील परिणामकारकता थोडीशी कमी होऊन ते एकसुरी, माहितीपटासारखे काहीवेळा वाटते. लेखिका व्यक्तिगत जीवनातील चुकाही स्पष्टपणे स्वीकारताना दिसते. त्यामुळे एकूणच ती कोणतीही आग्रही भूमिका घेताना दिसत नाही. स्त्रीवादी दृष्टिकोनाचा आग्रह नाही. स्त्रीवर होणाऱ्या अन्यायाबद्दल चीड, संताप नाही, सामाजिक-राजकीय जीवनात होत असलेल्या ऱ्हासाबद्दल हळहळ वा तिरस्कार व्यक्त करणे नाही, यामुळे सत्य फक्त ‘कथन’ केले जाते. त्यामुळे निवेदनात कोरडेपणा, निरसता आल्यासारखी जाणवते. ही भावना मराठी अनुवादात प्रकर्षाने येत असावी. मूळ इंग्रजी पुस्तक वाचताना कदाचित भाषेच्या अभिव्यक्तीतील भिन्नतेमुळे तसे जाणवत नसेलही. अर्थात अनुवाद करण्याचे काम खूप कठीण असते. सुप्रिया वकिलांनी त्यांचे काम उत्तम प्रकारे पार पाडले आहे. यात शंकाच नाही. आजकाल मराठी अनुवाद करताना इंग्रजी शीर्षक तसेच ठेवण्याची ‘प्रथा’ रूढ झाली आहे. ते जरूर ठेवावे, पण काही वेळा त्याबरोबरच मराठी शीर्षकही दिल्यास अनुवादाची आकर्षकता वाटू शकेल, असे म्हणावेसे वाटते. ‘कटिंग फ्री’ हे पुस्तक वाचायला हवं, कारण भारत आणि पाकिस्तान या दोन राष्ट्रातील ताणतणावाबद्दल ते अप्रत्यक्षरित्या भाष्य करते आणि दोन्ही देशातील लोकांना तितक्याच अप्रत्यक्षपणे पण निसंदिग्धपणे माणुसकीचा संदेश देऊन जाते. भारतात जन्मलेल्या सलमा अहमदचं भारतप्रेम या आत्मकथेत पानापानावर व्यक्त झालेलं दिसून येतं. पाकिस्तानी व इस्लामधर्मी असूनही भारताबद्दलची मानसिक गुंतवणूक जन्मापासून, त्यांनी बाळगलेली आहे. सलमाचं नाव ठेवलं होतं ‘इंदिरा सलमा’ परंतु ते स्वीकारलं जावं म्हणून सलमा झाली ‘इनी’, आयुष्यभरासाठी. तिच्या बहिणीचं नावही मीनल. अशी ही भारतवंशीय लेखिका अनेकदा भारतात येऊन गेली. तिचा राजकारणात प्रवेश झाल्यानंतर इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्याशी परिचय झाला. परराष्ट्रखात्यातील कार्यकर्ते रोमेश भंडारी यांच्याशी सलमा अहमदचे जवळचे संबंध होते. पाकिस्तानातील सर्वांत यशस्वी महिला उद्योजक म्हणून त्यांना प्रियदर्शनी पारितोषिकानेही सन्मानित करण्यात आले होते. त्यांचे हे भारतप्रेम आपली अपुरी आत्मकथा संपवतानासुद्धा दिसून येते. त्यांचे अखेरचे वाक्य आहे, ‘मी अंतिम विश्रांतीसाठी ठिकाण निवडून ठेवले आहे.. दिल्लीत, दर्गाह हजरत निजामुद्दीन औलिया दर्ग्याच्या परिसरात भारत-पाकिस्तान मैत्रीचा हा मानवी हात आपण सर्वांनी धरला पाहीजे, हे अनुभवातून सांगणारं आत्मनिवेदन ‘कटिंग फ्री’ला भारतीयांच्याही जवळ जाण्यास त्यामुळेच प्रवृत्त करतं. अशा या लक्षवेधी, आगळ्या आत्मकथेला भावनेचा ओलावा त्यामागील प्रेरणेमुळे मिळाला आहे. सलमा अहमदनी हे आत्मवृत्त तिच्या मुलीच्या वियोगामुळे लिहिलं आहे. १९९९ साली ब्रेनट्यूमरनी तिची मुलगी नेहमी म्हणायची, ‘ममी, तू तुझ्याबद्दल लिहिलं नाहीस, तर मी लिहिन’ मुलीच्या स्मृतिप्रित्यर्थ आपल्या स्त्रीमनातील गुंत्याचा मानसिक निचरा म्हणून लिहिलेलं आत्मवृत्त म्हणजे ‘कटिंग फ्री’. बीनाच्या स्मृतीस वाहिलेलं हे आत्मकथन प्रसिद्ध आंग्ल कवी लॉर्ड बायनरच्या जगप्रसिद्ध कवितेचा निर्देश करून सुरू होतं. ``She walks in beauty like the night.`` स्त्रीवर्गाने आणि भारतातील सर्वांनीच वाचावं असं हे पुस्तक असून ते मराठीत आणलं गेल्यामुळे सर्वांची सोय झाली आहे. ते जरूर वाचायला हवं. ...Read more

  • Rating StarDAINIK MATRUBHUMI 3-1-2010

    सलमा अहमद यांनी स्वानुभवावर लिहिलेले ‘कटिंग फ्री’ हे विलक्षण पुस्तक आहे. याचा अनुवाद सुप्रिया वकील यांनी केला आहे. ही एक अतिशय श्रीमंत, उच्चभ्रू कुटुंबात जन्मलेल्या पाकिस्तानी स्त्रीची विलक्षण कहाणी आहे. आयुष्यानं निरनिराळ्या टप्प्यांवर घेतलेली अनपे्षित वळणं झेलताना लेखिका सलमा अहमद यांच्या जीवनातले बिझनेस, राजकीय कारकीर्द आणि कौटुंबिक जीवन, अतिशय उत्तुंग, नाट्यमय क्षण रोमांचित करतात तर काळयाकुट्ट क्षणी त्यांनी दाखविलेलं धैर्य, चिकाटी आणि आत्मविश्वास स्तिमित करतो. सलमा अहमद यांच्या व्यक्तिगत आयुष्याबरोबरच तत्कालीन पाकिस्तानी समाज, सरंजामी जीवन वाचकांसमोर उलगडले जाते. सलमा अहमद यांचे बालपण राजकारणी व्यक्ती आणि मुत्सद्दी मंडळींच्यात गेले आहे. वडील राजदूत असल्यामुळे लहानपणापासून राजकीय घटनांमधील अन्वयार्थ त्यांना चांगल्या पद्धतीने समजत होता तो त्यांनी राजकीय पक्षांशी संलग्न होताना अधिक परिपक्व केला. उद्योग, व्यवसाय आणि राजकारण यात यशस्वी होत असताना याचा उपयोग झाला. इंदिरा गांधी, तसेच राजीव गांधी यांच्याशी त्यांनी घेतलेल्या भेटी तसेच पुस्तकात असलेली त्यांची छायाचित्रे, वाचकांशी होत असलेला संवाद अधिकच मनोहारी करतात. खरेतर सलमा अहमद यांनी १९७० मध्ये सामाजिक कार्याला सुरुवात केली. त्यापूर्वी १९६७ मध्ये स्वतःची पहिली इंडस्ट्री त्यांनी स्थापन केली. जहाज मोडणीच्या कामात त्यांनी मिळवलेलं यश हे त्यांच्या कारकीर्दीतील सर्वोच्च यश होतं. कारण अशा प्रकारचे काम करणाऱ्या त्या जगातील पहिल्या महिला होत्या. त्यांनी पाकिस्तान ‘असोसिएशन ऑफ विमेन’ची स्थापना केली. पाकिस्तान स्वतंत्र झाल्यापासून गेल्या ५० वर्षांमधील सर्वांत यशस्वी उद्योजिका म्हणून त्यांना प्रियदर्शनी पुरस्कार देण्यात आला. कालांतराने त्यांनी राजकारण प्रवेश केला. १९७७ मध्ये ‘ऑल पाकिस्तान मुस्लिम लीग’ या पक्षात त्या सामील झाल्या. त्यांचा हा प्रवास नाट्यमय आणि वाचकांना रोमांचित करणारा आहे. बिझनेस आणि राजकार या दोन्ही क्षेत्रात वूमन ऑफ सबस्टन्स ठरलेल्या सलमा अहमद याचं हे विलक्षण अनुभव कथन स्त्रीशक्तीच्या अफाट सामर्थ्याची ओळख करून देते. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

BHARTIYA GANIKA
BHARTIYA GANIKA by DR.S.R. DESHPANDE Rating Star
डॉ. शुचिता नांदापूरकर-फडके

मंडळी, कालच्या ऱ्हासचक्रानंतर मी विचार करत होते की आज काय? पुस्तकं तर काही वाचून ठेवली होती (म्हणजे वाचली आणि ठेवून दिली बाजूला... अक्षरशः). आत्ताची समोर आहेत ती. कदाचित त्यातलं एखादं उद्या घेईन. मध्ये अचानक या पुस्तकाची जाहिरात वाचली, अगदी गेल्या ठवड्यातली गोष्ट. उत्सुकता चाळवली. समूहात काहीतरी आगळं वेगळं पुस्तक घ्यावं हा विचार सतत मनात असतोच. तसं पुस्तक घरी येताच (जय amazon) चाळायला म्हणून बसले, आणि काय सांगू, हातात मार्कर कधी आलं, मी खुणा कधी केल्या, पुस्तक कधी संपलं... कळलंच नाही. एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगते... प्रेयर पुस्तकाला तुम्ही जो भरघोस प्रतिसाद दिलात, अनेकांनी ते विकत घेण्याचा विचार केला तेव्हाच सांगायचं होतं, पण राहिलं. ओळख करून दिलेलं पुस्तक पूर्णपणे वाचनीय असतं असं नाही. त्याचा बरचसं भाग बोजड असतो. पण ते नाही का, डेटिंगच्या काळात मुलगा मुलगी स्वतःमधलं केवळ उत्तम ते दाखवतात, तसं मला प्रेयर बद्दल वाटलं. आय मीन प्रेयर पुस्तकाबद्दल वाटलं आणि गणिका या पुस्तकाबद्दल मला नेमकं तेच वाटत आहे. ========== ‘भारतीय कामशिल्प’ या पुस्तकाचं लेखन करत असताना प्राचीन भारताच्या समाजजीवनाची माहिती देणारे अनेक संदर्भग्रंथ वाचण्यात येऊन लेखकांची उत्सुकता चाळवली गेली आणि जेव्हा या विषयावर मराठीत एकही परिपूर्ण संदर्भग्रंथ नाही हे लक्षात आलं, तेव्हा त्यांनी स्वतःच या पुस्तकाचं लेखन मनावर घेतलं. केवळ सनसनाटी विषय सवंगपणे हाताळला आहे असं कुठेही वाटत नाही. अतिशय अभ्यासपूर्वक लेखन आहे. सोबत जोडलेली संदर्भग्रंथांची यादी (एकूण संख्या ६४) पुरेशी आहे. गणिका आणि उर्वरित श्रेणी या शरीरविक्रय करतात, हा वैश्विक व्यवसाय आहे. कैक काळापासून या व्यवसायाला मान्यता मिळाली आहे आणि त्याची आवश्यकता वाटली आहे. प्राचीन काळात भारतीय गणिका यांना एक संस्कृती आणि दर्जा होता. नीतीनियम होते, ते पाळावे लागत होते. पुस्तकाची प्रकरणं – प्रास्ताविक, विदेशी गणिका, भारतीय साहित्यातील गणिका, गणिकेची प्रशिक्षण व वर्णन, गानिकांची वेशभूषा, सौंदर्यप्रसाधने, विट, गणिकामाता, प्रियकराचा राग-रंग, कथांविषयी थोडेसे आणि कथा (या शेवटच्या प्रकरणात एकूण १३ कथा आहेत – अगदी सुरस आणि चमत्कारिक वाटाव्यात अशा, त्यांचा परिचय मी देणार....... नाही.) प्रास्ताविक – (नऊ पानांचं प्रकरण) कुटुंब किंवा विवाहसंस्था कधी आकाराला आले हे नक्की सांगता येत नसलं तरी स्त्री-पुरुष शरीरसंबंध हे आदिम असून ते पशु – पक्ष्यांप्रमाणेच जनन हेतुस्तव नैसर्गिक होते आणि राहतील. फलन हे स्त्रीदेहामध्ये होतं या जाणीवेतून तिला आदरस्थान प्राप्त झालं. सर्जनाची गूढ शक्ती धारण करणारी ती आदिमाया/माता/ अद्याशक्ती होय. जवळपास प्रत्येक धर्मात प्रजा, पशु आणि धान्य समृद्धीसाठी सुफलता विधी आहेत. भारतीय हिंदू धर्म शास्त्रीय ग्रंथांतून स्त्री पवित्र्याच्या कथा वाचायला मिळतात. पतीला परमेश्वर मानलं जाई. त्याही काळात गणिका हा व्यवसाय होता आणि त्याकडे सहिष्णू वृत्तीने पाहिलं जाई.राजे महाराजे त्यांचे पोशिंदे असतं. शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रिया तिरस्काराला पात्र असत, पण गणिका नाही. त्यांना नगर भूषण, नगर अलंकार, नाग्त रत्न मानलं जाई. प्रसंगी, राजे त्यांचा सल्ला घेत. त्या बहुश्रुत असतं चौसष्ट कलांत पारंगत असतं. संभाषणचतुर, हुशार, समंजस, उदार, योग्य आदर राखणाऱ्या, विनयशील आणि अनुपम सौंदर्यवती असत. एखाद्या गणिकेमुळे त्या राज्याची कीर्ती वाढत असे. धार्मिक समारंभ, सामाजिक कार्यक्रम (विविध झुंजी, शर्यती), करमणुकीचे कार्यक्रम (जलक्रीडा, वनविहार), रंगमंचावर अभिनय, अशा नानाविध ठिकाणी त्यांची ठळक उपस्थिती असे. रथारूढ अथवा सिंहासनाधिष्ठ राजाला वारा घालणे, चवरी ढाळणे, छत्र धरणे अशी कामं त्या करत. त्यांच्याशी संबंध ठेवणं समाजमान्य होतं. प्रतिष्ठितांचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन व्यापक, अगत्यशील आणि स्नेहिल होता. मात्र, त्यांना कडक आणि कठोर नियम पालन करावे लागे.विजयनगर साम्राज्याच्या अस्तानंतर ते पेशवाई संपेपर्यंतच्या काळात, मोगल राजवट येऊन गेली, ब्रिटीश वसवतवादाचा प्रसार सुरू झाला, समाज व्यवस्था बदलली, गणिका संस्कृतीला ओहोटी लागली. ब्रिटीशांचा अंमल सुरू झाल्यावर गणिका संस्था नष्ट होऊन वेश्या व्यवसाय वाढीला लागला. यामागे औद्योगिक क्रांती हे एक कारण आहे. वेश्यागमन निंद्य कृत्य मानलं जाऊ लागलं. तरुण अधिकाधिक सुशिक्षित होऊ लागला तसा शरीरसंबंधांपायी स्वास्थ्य गमवावं लागलं तर काय, हा विचार थोडाफार मूळ धरू लागला. आणि या शौकाची आसक्ती कमी झाली. चरितार्थाकरता पैसे मिळवण्यासाठी वेश्याव्यवसाय हादेखील विश्वसनीय आर्थिक व्यवसाय मानण्यात यावा असा निकाल १९११मध्ये युरोपियन न्यायालयाने दिला. विदेशी गणिका – (२७) बहुतेक सर्व प्राचीन संस्कृतीत गणिकांचे पुरावे मिळतात. इजिप्त, बबिलोन, सिरीया, फिनिशिया, ही काही उदाहरणं. ग्रीस, इटली, भारत इथे त्यांना विशिष्ट दर्जा प्राप्त झाला. त्यांचेही प्रकार होते, सामान्य वेश्या अलेत्रय्डी, आणि सर्वोच्च म्हणजे हेटीअरा (या शब्दाचा अर्थ सोबती). काही हेटीअरा वादविवादपटू होत्या. क्लेप्सीड्रा हिच्या वक्तशीरपणामुळे तिला ते नाव मिळालं होतं त्याचा अर्थ जलघटिकापात्र असा होतो. थीओफ्रत्स याने इ.पू. ३७२ – २८७ या काळात ‘ऑन मरेज’ हा ग्रंथ लिहिला, याचा सविस्तर अभ्यास करून लिओंटीयम या हेटीअराने त्यावर प्रगल्भ टीका लिहिली. रोमन समाजात कोर्टीझन अस्तित्वात होत्या. पॉम्पेई इथे व्हिकोली बाल्कोन पन्सिली नावाच्या इमारतीत शेकडो रमणी वास करत. या संदर्भातली रतिक्रिडेची मूळ चित्रं पॉम्पेईन wall paintings म्हणून प्रसिद्ध असून ती इटलीच्या वस्तुसंग्रहालयात सुरक्षित आहेत. रोमन साम्राज्यात हेटीअरा ऐवजी कोर्टीझन शब्द रूढ झाला. युरोपात पंधरा-अठरा शतकांत कोर्टीझन आणि कलावंतीण यांना समाजात विशिष्ट स्थान आणि आदर मिळत होता. फ्रान्समध्ये सतराव्या शतकात रमणींची सत्कारगृहं (सलो) प्रसिद्ध होती. जपानमध्ये गै (कलात्मक क्षमता) आणि शा (व्यक्ती) यावरून गैशा ही संज्ञा रूढ झाली. त्यांच्यात अलंकारिक सुरावट, सौजन्य, निष्कपट, सुसंस्कृतपण असे. बाराव्या शतकापासून कार्यरत असलेली ही प्रथा इडो काळात (इ.स.१६००-१८६८) अधिक वाढीला लागली. ओकिया ही त्यांची निवासस्थानं होत. विसाव्या शतकात त्यांचं वर्चस्व राजकीय क्षेत्रात वाढीला लागलं. १९२०-३० मध्ये त्यांची संख्या साधारण ८० हजार होती, ती १९७०-८० दम्यान १७ हजार इतकीच उरली आहे. चीनमध्ये पूर्वी पीकिंग (बीजिंग) इथे सिंगसॉंग हाउस हा भाग राखीव होता. शांघाय इथे अत्यंत विलासी वारांगना गृहं आहेत. सिंगापूरमध्येगिटार गर्ल्स (पीपाचाई) या नावाने त्या ओळखल्या जातात. पाकिस्तानात त्या तवायफ, कान्जारी आणि गश्ती नावाने ओळखल्या जातात. आज मात्र सर्वत्र आमुलाग्र बदल झाला आहे. भारतीय साहित्यातील गणिका – (३२) संस्कृत, प्राकृत, पाळी भाषांत, हिंदू, बौद्ध, जैन वान्ग्मयात, त्यांचा उल्लेख आढळतो. त्या वैदिक काळात भारतात होत्या हे काही ऋचांवरून समजतं. (ऋचा १.१६७.४ – अनेक पुरुषांशी सांग करणारी ती साधारणी). पंचचुडा अप्सरेपासून त्यांची उत्पत्ती झाली असं मानतात. महाभारत काळात त्यांना प्रतिष्ठा प्राप्त झाली. (राज, नागरी, गुप्त, देव आणि ब्रह्म असे पाच प्रकार होते). रामायणात फार स्थान नव्हतं. अमरकोश, महाभाष्य, वार्त्तिके, दशरूपक, कौटिलीय अर्थशास्त्र जातक कथा, पंचतंत्र, वेताळकथा, शुकबहात्तरी, गाथासप्तशती, अशा विविध ग्रंथांत त्यांचा उल्लेख आहे. कामसूत्र या ग्रंथात वात्सायनाने ‘वैशिक’ या प्रकरणात त्यांची माहिती दिली आहे. कथासरीत्सागर, राजतरंगिणी, शृंगारतिलक, सरस्वतीकंठभरणा, कलाविलास, मेघदूत, मृच्छकटिक, रत्नावली, नागानंदा, अशा नाटकांतून त्यांचा उल्लेख येतो. भारतात इ.पू. पहिल्या सहस्रकात ती प्रथा अस्तित्वात येऊन ब्रिटीशांच्या आगमनानंतर एकोणिसाव्या शतकात लोप पावली असावी असं समजलं जातं. गणिकेची प्रशिक्षण व वर्णन – (१६) गणिकेला बालपण जवळपास नव्हतच. वयाच्या सहा-सात वर्षापासून तिला घडवायला सुरुवात होत असे. त्यांच्या प्रशिक्षणात आचार, विचार, शिष्टाचार, विविध कला, खेळ, भाषा, वर्तन, सौंदर्यवर्धन, गायन, वादन, नृत्य, अलंकरण, शरीर सौष्ठव, बुद्धिवर्धन अशा प्रत्येक अंगाचा व्यापक विचार होता. काही हस्तकला शिकाव्या लागत. पाककला, सुगंधी द्रव्य निर्मिती, कामशास्त्र, प्रणायाराधन, हिकाव्म लागे. स्वसंरक्षण शिकावं लागे. गणिकांची वेशभूषा, सौंदर्यप्रसाधने – (५) आधीच्या प्रशिक्षणात हाही एक महत्त्वाचा भाग होता. विट – (७) हा शब्द मी पहिल्यांदाच ऐकला. त्याचा इथे दिलेला अर्थ – शृंगाररस नायकानुचराप्रमाणे संपत्तीचा भोग न घेणारा किंवा जो आपल्या पैशाचा वापर कधी करत नाही, असं नाटकातलं लबाड, धूर्त पात्र. गणिका संस्थेत त्याच्या जोडीने वयस्य, अनुचर, धूर्त आणि डिंडिक ही पुरुष पात्र वावरतात. प्रतिवेशिनी ही गणिकेची शेजारीण. ती विश्वासातली. ती गणिकेसाठी विट आणि प्रियकर यांच्याशी संवाद साधते. गणिकामाता – (७) हे पात्र फार महत्त्वाच. तिला संरक्षित स्त्री, कुट्टनी किंवा कुट्टीनी म्हटलं जाई. तिचं काम शिस्त राखणे, थोडक्यात रेक्टर. कामकुजानांना आळा घालणं, गणिकांना खऱ्या प्रेमापासून वंचित ठेवणं. कामुकांचं मानसशास्त्र तिला मुखोद्गत. पुरुषांच्या गुणदोषाच्या’ आधारे अचूक आडाखे बांधत ती गणिकेला सल्ला देता. तिचा दबदबा असतो. ते नसती तर गणिका ही संस्था कधीच नामशेष झाली असती. कारण स्त्रिया या स्त्रिया असल्याने स्त्रीसुलभ भावनेनुसार गणिकागिरीत न रमता त्या केव्हाच संसाराला लागल्या असत्या. प्रियकराचा राग-रंग – (९) रग हे बारा छटांमधली काम आसक्ती असं म्हणता येईल. पुरुषाची मनोवृत्ती, प्रवृत्ती, स्वभाव, गुणविशेष आणि खास करून राग-लोभ जाणून घेत गणिकेला त्याच्याशी वर्तन करावे लागते. कथांविषयी थोडेसे आणि कथा (४८) – ‘शृंगारमंजरीकथा’ हा राजा भोज रचित संस्कृत ग्रंथ असून त्यात स्त्री-पुरुष मनोवृत्ती दर्शन घडवणाऱ्या तेरा कथा आहेत. त्यापैकी काही जीर्ण, काही अपूर्ण आहेत. पैकी एक कथा वाचून दाखवते. संदर्भग्रंथ (४) सोबत फोटो दिले आहेत त्या पानांचे. या पुस्तकात आढळलेले सुंदर शब्द – गरती, लीलासहचारी, पृथुल (अर्थ कळला नाही अजून), रूपाजीवा, सूरसुंदरी परिचय फार लांबला. या विषयावरच्या इतक्या अभ्यासानंतर एखादा पेपर सहज देता येईल. परत अभिमानाने म्हणता येईल, ‘मा, मै फर्स्ट क्लास फर्स्ट आया!’ मनापासून धन्यवाद. माझी परिचय पाळी नसती तर मी हे पुस्तक वाचलंच नसतं. मजा आली मला वाचताना. तशी तुम्हालाही आली असेल अशी खात्री आहे. थांबते. ...Read more

RESHIMREGHA
RESHIMREGHA by SHANTA J SHELAKE Rating Star
मीना कश्यप शाह

शांता शेळके या कवयित्री म्हणून आपल्या सर्वांच्या माहितीच्या आहेतच. गीतकार म्हणूनही त्यांचे मोठे नाव झाले. रेशीमरेघा हे त्यांनी रचलेल्या गीतांचे पुस्तक. मुख्यतः त्यांनी चित्रपट आणि नाटक यासाठी गीते लिहिली आहेत. प्रस्तावनेत शांताबाई म्हणतात, गीते लििणे त्यांना अतिशय आकर्षक वाटत गेले आणि म्हणून केवळ चित्रपट आणि नाटकांसाठीच नाही, तर स्वानंदासाठीही, त्या गीतं लिहित राहिल्या. चालीवर गीते लिहिणे त्यांना आव्हानात्मक वाटायचे, बंधनकारक नाही. पुढे बंगाली, गुजराती अशा काही गीतांच्या चाली आवडल्या, तर त्या, त्या चालींवरही छंद म्हणून गीते लिहू लागल्या. त्यांच्या गीतांमध्ये लावण्या, गवळणी, नृत्यगीते आणि युगुलगीते (त्यांनी द्वंद्वगीते हा शब्द वापरला आहे, जो मला आवडत नाही) जास्त आहेत. ह्या पुस्तकात त्यांचे संकलन आढळून येतं. पुस्तकातील काही गीतांपेक्षा मला त्यांची प्रस्तावनाच जास्त आवडली. आपल्या गीतांबद्दल त्यांनी हळुवार होत लिहिलं आहे. प्रत्येक गाणं ध्वनिमुद्रीत होतानाचे क्षण त्यांना आठवतात. आणि ही गीतं प्रसिद्ध होण्यासाठी संगीतकार, गायक यांचा हातभार नक्कीच आहे याची त्या आठवण काढतात. गीतांचा अर्थ रसिकांपर्यंत पूर्णपणे पोहोचवण्यासाठी गायक-गायिकांचा खूपच मोठा वाटा आहे, त्यांच्याबद्दल त्या अपार कृतज्ञता व्यक्त करतात. हे पुस्तक त्यांनी लावणेसम्राज्ञी यमुनाबाईंना अर्पित केलेले आहे. त्यान्नी लिहिलेल्या "रेशमाच्या रेघांनी" या सर्वात जास्त प्रसिद्ध पावलेल्या लावणीच्या नावावर ह्या पुस्तकाचे नाव आधारित आहे. अनेक प्रसिद्ध गाणी या गीत संग्रहात आढळतात. रेशमाच्या रेघांनी, काय बाई सांगू, मनाच्या धुंदीत लहरीत, हे श्यामसुंदर, राजसा, शालू हिरवा पाच नि मरवा, चाल तुरू तुरू, मनाच्या धुंदीत लहरीत येना आणि अशी अनेक. शांताबाईंचं काव्य सामर्थ्य ह्या लावण्या/गीतांमध्ये देखील दिसून येतं... कळ्या आजच्या, शिळ्या उद्याला, ओठांशी न्याल का, आल्यावर जवळ मला घ्याल का.... अशी अनेक उदाहरणं! पुस्तकातील बहुतेक गाणी ही लावण्यांच्या स्वरूपातली आहेत. त्यामुळे त्याच त्याच भावना सारख्या सारख्या आढळून येतात. बोलावणे किंवा नको जाऊ म्हणणे, भेटी (गिफ्ट्स) घेणे, वाट पाहणे, विरह, सौंदर्याचे वर्णन, शृंगाराचे वर्णन, म्हणजे तुम्हाला काय मिळू शकेल याची कल्पना गीतातून देणे (उदा. कंबरपट्टा रेखून दावी, देहाचा आकार!!) अशा प्रकारचे विषय पुन्हा पुन्हा येत राहतात, पण (शांताबाई बीइंग शांताबाई) कुठेच तोचतोचपणा कंटाळवाणा होत नाही (वाचकाने जरा रोमँटिकपणा दाखवून वाचली ही गीतं तर फारच बहार!) शांताबाई नथ फारच आवडते असं दिसतं... नथ सर्जाची नाकी घालता हसेल डावा गाल किंवा सलगी करते नथ ओठांशी, तो तुमचा अधिकार अशा प्रकारे ती खुलून देखील दिसते ह्या गीतांमधे!! अनेकविध लावण्या आहेत ह्या पुस्तकात. पाडव्याची, रंगपंचमीची, श्रावणाची, अशा विविध दिवसांच्या लावण्या तर हिरव्या रंगाची लावणी देखील आहे. पाडव्याची लावणी म्हणजे पाडव्याला शालू मागते आहे, कारण ती रात्री एकांतात उभारणार आहे. 🙂 "मी सुंदर आहे तर आता मी काय करू?" अशी तक्रारही दिसून येते. "माझ्या नखऱ्याच्या शंभर तऱ्हा" सांगणारीला स्वतःच्या सौंदर्याची पुरेपूर जाणीव आहे आणि त्यापेक्षाही, फक्त शारीरिक सौंदर्यावर विसंबून न राहता, त्याबरोबर तोरा दाखवत भुरळ पाडणे ह्यात ती माहीर आहे. पण त्याचबरोबर ती धोक्याची सूचना पण देते आहे... घटकाभर संग बसून घालवा वेळ, जमल्यास मनांचा जमून येईल मेळ, नाहीतर यायचा अंगाशी हा खेळ, पाय टाकण्याआधी इथे, विचार पुरता करा, माझ्या नखऱ्याच्या शंभर तऱ्हा!! एका लावणीत एका पुरुषाने फसवलंय अशा स्त्रीचे रूप आहे. जत्रेत एक जण भेटला आणि त्याने आपल्याशी फ्लर्ट केलं, जत्रा उलगडल्यावर दुसऱ्या दिवशी मात्र तो डोळ्याला डोळा भिडवत नाही, तोंड चुकवून पुढे जातो, ह्याची तक्रार ह्या लावणीत येते. किती विविधता! अशा लावणी कलाकाराच्या आयुष्याचं विदारक दृश्य देखील शांताबाईंनी दाखवले आहे. तिथे येणारा आज एक, तर उद्या दुसराही असू शकेल किंवा तिथे असणारी आज एक, तर उद्या दुसरीही असू शकेल. हे सांगून त्या म्हणतात... प्रीतीचे नीतीचे व्यर्थ सांगणे, भुकेल्या देहाचे सारे मागणे, जन्माच्या नात्याचे फुका बहाणे, कुणाला सतत इथे राहणे? इथल्या महाली घडीची वस्ती, सुखाचे हिंदोळे आभाळी चढती, घडीत वरती घडीत खालती ऐन विशीतल्या स्त्रीचं सौंदर्याचं अत्युत्तम वर्णन एका गीतात केलं आहे. अनेक गीतांमध्ये पुरुषांनी स्त्रीच्या देहाचे आणि मनाचे केलेले वर्णन दिसून येते. त्यातही नुसता देहच नाही तर स्त्रीचा तोरा (attitude) देखील पुरुषाला कशी भुरळ पाडतो हे दिसतच. "ही चाल तुरुतुरु" आपल्या सगळ्यांच्या आवडीचे आणि माहितीचे आहे. असंच "मनाच्या धुंदीत लहरीत ये ना" हे देखील. गीतांमध्ये श्रावण, पाऊस, विरह, वाट बघणे हे सर्व हमखास येतं. एक गीत आहे "लहरी सजण कुणी दावा" - मीना खडीकर यांचे संगीत, उषा मंगेशकर यांचा आवाज. हे गीत मला ना वाचायला आवडलं ना ऐकायला आवडलं 🫣 श्रीकृष्ण राधेच्या कथा तर आपण गवळणींमधे अनेक वेळा ऐकल्या आहेत. कृष्णाची धून ऐकल्यानंतर अगदी काहीही न सुचता तशीच्या तशी निघालेली राधा! त्यातही तिच्या शृंगारचं वर्णन येतंच. सजण्याची आवड असलेल्या स्त्रीचे वर्णन अतिशय खुबीने शांताबाईंनी केले आहे. मला स्वतःला नटण्या मुरडण्याची अतिशय हौस असल्यामुळे हे सगळं वर्णन वाचून, "हे पुस्तक आपण आधी का नाही वाचलं" याचं दुःख मात्र झालं. ही उदाहरणं बघा ना... माथ्यावर मोतियाची जाळी, भांगेत मोती सर, चंद्रकोर भाळी, कानात झुमके, केसांमध्ये वेल, नाकात नथ, नथित हिरे, बिल्वदळे, वज्रटिक, `बोलताना पाठीवर जिचे रेशमाचे गोंडे खालीवर होतील अशी` पाच पदरी मोहन माळ!! दंडात वाकी रुताव्या, शिंदेशाही तोडे असावेत आणि पायी सांध्यात सोनसळी, गळ्यात तन्मणी, कमरेला कंबरपट्टा, पायी पैंजण.... "शालू हिरवा, पाच नि मरवा, वेणी तीपेडी घाला" हे गीत तर फारच प्रसिद्ध झाले. शृंगार आणि सौंदर्य यांचे वर्णन या सगळ्या गीतांमध्ये अगदी खुलून आलेलं आहे. आणि प्रेम! त्याविषयी किती लिहावं आणि कशाप्रकारे लिहावं असा मोठाच प्रश्न पडला आहे. तरीही एका स्त्रीच्या मनाने वाचलेल्या ह्या चार ओळी लिहीतेच... काय वाजले प्रिय ते पाऊल, तो तर वारा तिची न चाहूल, भास हो फसवा वरचेवरी, शोधितो राधेला श्रीहरी!! ...Read more