* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: TUKAYACHI AAWALI
  • Availability : Available
  • ISBN : 9788177668933
  • Edition : 5
  • Publishing Year : NOVEMBER 2007
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 204
  • Language : MARATHI
  • Category : BIOGRAPHY
  • Available in Combos :MANJUSHRI GOKHALE COMBO SET -14 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
TUKARAM IS ONE OF THE GREATEST SAINTS OF MAHARASHTRA, WHO CONTINUOUSLY SANG PRAISES OF THE LORD THROUGH HIS DEVOTIONAL COMPOSITIONS. THE PERSONAL LIFE OF THE POET SEER WAS SAD. ECONOMIC HARDSHIP PLAGUED HIM FROM THE CHILDHOOD AND HE NEVER ENJOYED MARITAL BLISS FROM HIS FIRST WIFE. AVALI WAS HIS SECOND WIFE WHO FED UP WITH TUKARAM’S TOTAL INDIFFERENCE ABOUT HIS MUNDANE DUTIES AS THE HEAD OF THE FAMILY ALWAYS NAGGED HIM. SHE DISLIKED AND HATED FROM THE BOTTOM OF HER HEART LORD VITTHAL, ONE OF THE GODS FROM THE HINDU PANTHEON TUKARAM WAS FOND OF. IN MARATHI LITERATURE, PLAYS AND FILMS, AVALI HAS BEEN PORTRAYED AS BEING SOMEONE WHO DID NOT ALLOW TUKARAM TO LIVE IN PEACE. ONE WOULD FEEL THAT SHE IS TO TUKARAM WHAT XANTIPPE WAS TO SOCRATES. TUKYACHEE AVALI PRESENTS AVALI AS A LOVING WIFE WHO IS AWARE HOW WELL RESPECTED HER HUSBAND IS IN THE SOCIETY. SHE ALWAYS STANDS BY HIM IN HIS DIFFICULT TIMES. BUT IT THE CARING MOTHER IN HER WHO CANNOT PUT UP WITH THE SUFFERING THE FAMILY HAS TO GO THROUGH DUE TO HER HUSBAND. THE DISPLAY OF CONFLICT BETWEEN THE ROLES OF THE WIFE AND THE MOTHER MAKES INTERESTING READING. INCIDENTALY, AVALI OUTLIVED TUKARAM. MANJUSHRI GOKHALE IS A COLLEGE TEACHER. SHE HAS TACKLED VARIOUS FORMS SUCH AS NOVEL, SHORT STORY, POETRY AND HAS WRITTEN THE SCRIPT AND DIALOGUES FOR A FILM.
आवलीला त्या घटनेचा पुरता अर्थ कळला. ती विलक्षण चरकली. बुवांच्या टाळचिपळ्या बुवांशिवाय? आवलीनं टाहो फोडला. धनी ऽ ऽ ऽ! धनी ऽऽऽऽ! आणि ती बुवांच्या बैठकीवर कोसळली. बुवा ज्यांना आपले श्वास आणि उच्छ्वास म्हणत होते, त्याच टाळचिपळ्या आज बुवांपासून वेगळ्या, अनाथ होऊन बुवांच्या बैठकीवर पडल्या होत्या. करपलेल्या काळजानं आणि चरकलेल्या मनानं त्या टाळचिपळ्या उराशी धरून आवली आकांत करत होती. तिचा आकांत सगळ्या गावकऱ्यांचं काळीज चिरत गेला. विठ्ठलाच्या मूर्तीचा थरकाप उडवत गेला. त्याच्या पायाखालची वीट थरारली. इंद्रायणी क्षणभर वाहायचं विसरली. विठ्ठल मंदिराच्या कळसाला छेदत आवलीचा टाहो आकाश फाडत गेला. नंतर कितीतरी वेळ त्याचे पडसाद आकाशातून येत राहिले. वाळवंटात कोसळत राहिले. विठ्ठलाच्या मंदिराच्या गाभाऱ्यावर आदळत राहिले.
* तूका म्हणे साहित्य पुरस्कार २००८, बुलडाणा * भारताच्या राष्ट्रपती महामहिन्न श्रीमती प्रतिभाताई पाटील वाचनवेध पुरस्कार २००८, अमरावती * बुलडाणा साहित्य संघाचा `ताराबाई शिंदे उत्कृष्ट साहित्य पुरस्कार`
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #MANJUSHRIGOKHALE #TUKYACHIAVALI #JOHARMYBAAPJOHAR #OMKARACHIREKHJANA #DNYANSURYACHISAVALI
Customer Reviews
  • Rating StarMadhuri Kajave

    वारकरी संप्रदायाचा `कळस` म्हणजे तुकाराम महाराज तर सर्व परिचित आहेतच. पण त्यांची पत्नी `आवली` हिचा परिचय आपल्यासमोर येतो तो काहीशा नकारात्मक स्वरूपातच! साक्रेटीसची बायको झांटिपी आणि तुकारामाची बायको आवली यांची तुलना करण्याचा मोहही बऱ्याच लोकांन झाल्याचं आठवतंय. कजाग, तोंडाळ ,भांडखोर अशी काहीशी आक्रमक प्रतिमा अवलीच्या वाट्याला आलीय. मंजूताईनी तिची ही उपेक्षा जाणून घेतली आणि तिला त्यात न्याय देण्याचा प्रयत्न आपल्या ` आवली` या चरित्रात्मक कादंबरीतून केला आहे. कर्तबगार पुरुषाच्या पाठीशी एक स्त्री उभी असते, असं कौतुकानं म्हटलं जातं. संतपदाला जाण्याचं जे अफाट कर्तुत्व तुकाराम महाराजांनी केलं, त्या पाठीमागे आवलीचे संसार सावरणारे हात होते. तिची उपासमार होती. तिचे कष्ट होते. तुकाराम महाराजांच्या मऊ मेणाहुनी स्वभावा विरोधात ती कर्तव्यकठोर होती पण ही कठोरता निश्चीतच समर्थनीय आहे हे मंजूताईनी दाखवून दिलंय. मंजुताई, तुम्हाला पुढील लिखाणासाठी खूप शुभेच्छा! अतिशय वाचनीय आणि बांधून ठेवणारं पुस्तक आहे. ही कादंबरी एका कवियत्रीनं लिहिलींय हे मात्र क्षणोक्षणी जाणवतं हे या पुस्तकाचं वैशिष्ट्य! आपला ग्रूप हा पुस्तकप्रेमींचा आहे. लेखकाशिवाय आणि कवींशिवाय नवीन पुस्तके लिहिली जाणार नाहीत. जुन्या आणि प्रस्थापित लेखक,कवींचं आपल्याला कौतुक आहेच पण त्याचबरोबर आपण नव्या लोकांना प्रोत्साहन दिलं पाहिजे असं मला वाटतं. जशी वाचक चळवळ आहे, वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी आपण प्रयत्न करतो तशीच लेखनसंस्कृती जोपासण्याचे प्रयत्नही व्हायलाच हवेत. आपल्यातल्या नवनिर्माणाचा अंकुर आपणच सांभाळला, मोठा केला पाहिजे. मंजुताईंचं हे पुस्तक सर्वांनीच वाचायला हवं, असा माझा आग्रह आहे. ...Read more

  • Rating StarRahul Lale

    तुक्याची आवली... मंजुश्री गोखले यांचं फार अप्रतिम पुस्तक... त्यावरून सुचलेलं... राहुल आवली गाती सारे देवा, तुक्याचे तुझ्या गोड अभंग आवलीच्या भाबड्या जीवाला मिळेना त्याचा संग भक्ती तुक्याची अपरंपार , शब्दातनही वाहे अमृत अश्राप आवलीला मात्र घरादाराची लागे खंत चूल पेटेल का हो कधी वाचून नुसती गीता एकल्या आवलीला पोराबाळांची सदा चिंता विठूनामात रमला रंगला आवलीचा धनी संसारगाडा ओढताना डोळ्यात येई तिच्या पाणी कटीवर हात विठूचे, पर्वा त्याला साऱ्या जगाची चंद्रभागेतून वाचले अभंग, भिजली आवलीची ओझी तुक्या विठूचा भक्त, त्याची एक आवली जिथे जातो तिथे, , तीच त्याची सावली राहुल लाळे ०२-०२-२०२१ ...Read more

  • Rating StarVinod Dhapale

    खूप सुंदर कादंबरी आहे. आवली माई विषयी असलेलं मत परिवर्तित होत अन् आपुलकी निर्माण होते. कादंबरीचा शेवट मनाला चटका लावून जातो..नक्की वाचा....

  • Rating Starप्रा. डॉ. कमला हार्डीकर

    आवली आणि तुकाराम यांच्या संसारातला विठ्ठल हा जणू खलनायक आहे. कादंबरीत एकूण वीस प्रकरणं आहेत. प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी विठ्ठलाचं स्वगत म्हणजे त्या प्रकरणाचा कळस आहे. आवली-तुकारामाचं लग्न ठरल्यानंतर सर्वांत आनंद या विठ्ठलाला होतो कारण तुकारामच्या संतदाची इमारत नेटकेपणानं, मजबुतीनं आवलीच्या आधारावरच उभी राहणार होती. आवलीचा मृत्यू इतका वेगळ्या प्रकारे दर्शवला आहे, की या आवलीला न्याय मिळाला असं वाटतं. नशिबासारखा खरखरीत असलेला हात तुकारामाच्या हाती देऊन ही तुकयाची आवली मृत्यूला सामोरी जाते. संत तुकाराम हे देणे ईश्वराचे. केवळ आवलीमुळेच तुम्हाला, मला, आपण सर्वांना मिळालं. आई आणि पत्नी म्हणून आवलीनं आपलं कर्तव्य चोखपणे पार पाडलंच पण केवळ तिच्यामुळेच तुकोबाराय भक्तीमार्गात तल्लीन होऊ शकले. कादंबरीची भाषा, सर्व प्रसंगांची भावस्पर्शी मांडणी यामुळे एक वेगळ्याच उंचीवर ही कादंबरी वाचकाला नेते. एका ऐतिहासिक पण दुर्लक्षित स्त्रीच्या कल्पकतेने रेखाटलेल्या चरित्ररूपी कादंबरीला तेवढेच यथार्थ, समर्पक आणि विलक्षण बोलकं मुखपृष्ठ मिळणं हा ही एक शिरपेचच होय. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more