* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: SWAPNAKADUN SATTYAKADE
  • Availability : Available
  • ISBN : 9788177663907
  • Edition : 11
  • Publishing Year : MARCH 2003
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 72
  • Language : MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE PRESENT BOOK `A TALE OF KALPANA CHAWLA` HAS BEEN PRINTED 10 EDITIONS SO FAR WHICH SHOWS THE POPULARITY OF THE BOOK AS WELL AS OF THE WRITER. BRINGING OUR DREAM INTO REALITY IS NOT AT ALL THAT EASY. IF REQUIRES A LOT OF PERSEVERANCE COURAGE AND MOST OF ALL INCESSANT ATTEMPT FOR THE INTRICATE. HERE IS A YOUNG LADY OF WHOM NOT ONLY KARNAL IN PANJAB (INDIA) BUT ALSO THE WHOLE WORLD SHOULD BE PROUD OF. SHE IS NO OTHER THAN KALPANA CHAWLA! (KC AS SHE WAS POPULAR IN HER GROUP.) KALPANA IS THE FIRST INDIAN LADY ASTRONAUT TO BE INCLUDED IN THE NASA`S COLUMBIA EXPEDITION. THIS EVENT WAS FANTASTIC AS SHE WAS BORN IN A TRADITIONAL INDIAN FAMILY. HOWEVER, WITH ALL ODDS, SHE COMPLETED HER ENGINEERING WITH AERONAUTICS AS HER SPECIAL SUBJECT. LANDING IN USA FOR FURTHER EDUCATION WAS HER NEXT ACHIEVEMENT. THERE WAS NO OTHER MODEL BEFORE HER BUT SHE HERSELF BECAME A MODEL FOR THE GENERATIONS TO COME! SHE HAD INDIRA GANDHI`S DESIRE TO WIN, JRD TATA`S TENACITY AND KIRAN BEDIE`S SENSE OF DUTY! SHE HAS SET UP AN EXEMPLARY LIFE. STILL REMEMBER THAT ONE HAS TO CARRY ONE`S OWN CROSS! AS SHE DID. SHE CREATED A NEW IDEAL BEFORE THOSE WHO `SEE` DREAMS AND TRY TO BRING THEM IN REALITY. IN HER LAST MESSAGE TO HER PROFESSOR DR. V. S. MALHOTRA SHE HAS RIGHTLY SAID, ``THERE DOES EXIST A WAY TO GO FROM A DREAM TO REALITY. THE ONLY THING THAT IS REQUIRED IS TO HAVE THE INSIGHT AND COURAGE IN YOU.`` SHE HAD ALL THAT! BORN IN KARNAL ON 1ST JULY 1961 SHE PASSED AWAY FROM THIS WORLD ON 1ST FEBRUARY 2003. IN A VERY SHORT SPAN OF 42 YEARS SHE ACHIEVED NAME AND FAME, WHICH IS INDESCRIBABLE. IN THE LAST EXPEDITION SHE FLASHED LIKE A METEOR AND SPREAD THE RAYS OF HOPE AMONGST MANY. THE BOOK SCREWS YOU FROM THE FIRST PAGE TO THE LAST. SUCH IS THE LANGUAGE! THE DETAILS OF HER LIFE ARE QUITE VIVIDLY PENNED. ANY ONE AND EVERYONE SHOULD READ THIS BOOK.
तिच्यापुढे कुणी आदर्श नव्हता. इंदिरेची इर्षा, जे. आर्. डीं.ची जिद्द, किरण बेदीचा कर्मवाद एकएक प्रकाशकण वेचून तिनेच त्याचा धु्रवतारा बनवला. आणि त्याकडे पाहत ती पावले टाकत राहिली. एक नवी वाट निर्माण केली, मागच्यांसाठी आदर्श ठेवला. उल्केप्रमाणे ती क्षणार्धात अंतर्धान पावली... राख शरीराची होते. विचारांची, आदर्शांची राख करणारा अग्नि अजून जन्मला नाही. तिने असंख्यांच्या मनात प्रकाशाचे कण पेरले. ते रुजतील, फुलतील आणि त्या तारकापुंजातून तिचेच तेज फाकेल. तिने प्रत्यक्षात आणलेला संदेश अमर आहे. स्वप्नाकडून सत्याकडे जाणारी वाट खरोखरच अस्तित्वात आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #BIOGRAPHY #SWAPNAKADUNSATYAKADE #MADHURISHANBHAG #स्वप्नाकडून सत्याकडे (कल्पना चावलाची कहाणी) #
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKMAT 06-07-2003

    कल्पना चावलाच्या जिद्दीची कहाणी... पहिली भारतीय अंतराळवीर स्त्री म्हणून कल्पना चावला हिचा सर्वच भारतीयांना अतिशय अभिमान वाटतो. १ फेब्रुवारी २००३ रोजी कोलंबिया यान पृथ्वीकडे येत असताना अपघात झाला आणि कल्पनासह सर्व अंतराळयात्री ठार झाले. जमिनीपासून सुारे साठ किलोमीटर उंचीवर असताना ही दुर्घटना घडली. त्याची प्रत्येक भारतीयाला हळहळ वाटली. चावला हिच्या व्यक्तिमत्त्वाने भारावून जाऊन लेखिका माधुरी शानभाग यांनी तिची जीवनकहाणी ‘स्वप्नातून सत्याकडे’ या छोटखानी पुस्तकात शब्दबद्ध केली. अगदी अल्प कालावधीत त्यांनी इंटरनेट वृत्तपत्रे, साप्ताहिकांतून आलेले तपशील यांच्या आधारे ६० पानांचे हे पुस्तक ‘कर्नाल ते केप कॅनव्हेरोल’, ‘निळ्या नभाच्या पलीकडे’ आणि ‘त्यानंतर...’ अशा तीन प्रकरणात विभागले आहे. “स्वप्नाकडून सत्याकडे जाणारा मार्ग अस्तित्वात आहे. फक्त तो शोधायची दृष्टी आणि धैर्य, तुमच्या अंगी असायला हवे,” असे २५ जानेवारी २००३ रोजी कोलंबिया अवकाशयानातून पाठविलेल्या संदेशात कल्पनाने म्हटले होते; आणि “अवकाशात प्रचंड वेगाने त्या पोकळीत फिरण्यामधली रोमांचकता मला पुन:पुन्हा अनुभवाविशी वाटते. मृत्यू सतत आपल्या आसपास घोटाळत असतो; पण तो सर्वत्र आहे आणि धोका पत्करणे, हा आमच्या कामाचा एक भाग आहे. कोणत्याही आनंदाची किंमत कशा ना कोणत्या रूपात द्यावीच लागते,” असे एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत तिने म्हटले होते. तिच्या अंगी असलेली धीरोदत्त वृत्ती यातून दिसून येते; पण तिच्या मृत्यूबद्दल हळहळही वाटतेच. कर्नाल येथे पंजाबी कटुंबात जन्मलेल्या कल्पनाला बालपणपासूनच विज्ञानाची आवड होती. टागोर बालनिकेतन शाळेत हुशार विद्यार्थिनीमध्ये तिची गणना होत असे. तिचा मोठा भाऊ कर्नालच्या फ्लइंग क्लबमध्ये जात असे, त्यामुळे कल्पनालाही आपण वैमानिक व्हावे, असे वाटे. त्यानुसार पंजाब अभियांत्रिकी महाविद्यालयात तिने मिळविलेला प्रवेश, त्यानंतर उच्च शिक्षणासाठी तिने टेक्सास विद्यापीठात मिळवलेला प्रवेश... जीन पियरे या फ्रेंच तरुणाकडून अमेरिकेत तिने विमान चालवण्याचे प्रशिक्षण घेतले. १९८४ मध्ये त्याच्याशीच लग्न केले. १९८८ मध्ये डॉक्टरेट पूर्ण करून ‘नासा’मध्ये संशोधन विभागात तिला नोकरी मिळाली, येथपर्यंतचा प्रवास पहिल्या प्रकरणात आला आहे. त्यानंतर नासातील प्रशिक्षण, पहिली कोलंबिया मोहीम यांची तांत्रिक माहिती वगैरे सर्व तपशील दुसऱ्या प्रकरणात येतात. हे सर्व तपशील लेखिकेने संकलित करून नेटकेपणाने मांडले आहेत. त्यातून कल्पनाची बुद्धीची झोप, जिद्द, चिकाटी यांचे दर्शन घडते. पुढील भागात १६ जानेवारी २००३ला कोलंबिया अवकाशात झेपावले; पण त्याआधी तिला करावी लागलेली तयारी, या मोहिमेत नेमून दिलेले, सुरळीतपणे तिने पार पाडलेले प्रयोग या सर्वांची माहिती दिली आहे. आणि शेवटी ती दुर्घटना. पहिल्या भारतीय अवकाशयात्रीला आपण मुकलो. भारतालाच नव्हे, तर साऱ्या जगाला तिचा अभिमान वाटावा आणि येणाऱ्या पुढच्या पिढ्यांनाही. विज्ञाननिष्ठ पिढीची विज्ञाननिष्ठ पिढींच्या निर्मितीसाठी ती सतत स्फूर्ती देत राहील. असा आशावादहही व्यक्त केला आहे. तिसऱ्या प्रकरणात कल्पनाचा मृत्यू ही क्षणिक लाट न ठरता स्त्रियांना आणि पुरुषांनाही डोळसपणे आजूबाजूला पाहायला लावावे. कल्पनाचे आयुष्य, तिची धडपड, चिकाटी नव्या पिढीपर्यंत पोहोचायला हवी. समाजाला विज्ञानभिमुख करण्यासाठी कल्पना चावला ही प्रवृत्ती लोकांसमोर विशेषत: नव्या पिढीसमोर सतत राहायला हवी, हेच तिच उचित स्मारक ठरेल, असा आशावाद लेखिकेने व्यक्त केला आहे. प्रत्येक घर या पुस्तकाचे स्वागत व्हायला हवे. अत्यंत आटोपशीर असे चरित्र लिहून लेखिकेने चरित्रांच्या पुस्तकात भर घातली आहे. -डॉ. मंदा खांडगे ...Read more

  • Rating StarMAHARASHTRA SAHITYA PATRIKA JAN - FEB 2006

    धगधगते अग्निकुंड ... अंगावर शहारे आणणारी कल्पना चावलाची उत्कंठावर्धक कहाणी. २१व्या शतकाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या तरुणाईला प्रेरणादायी ठरेल असे माधुरी शानभाग यांचे हे पुस्तक. आपल्या अंतरातला स्फुलिंग पेटता ठेवून त्यावर जगणाऱ्या राखेला प्रयत्नवादच्या आणि बुद्धिवादाच्या फुंकरीने उडवून लावणाऱ्या कल्पनाच्या व्यथांची ही कथा! कुणाचाही आदर्श समोर नसताना, किरण बेदीचा दुर्दम्य आशावाद, इंदिरेची झळाळणारी जिद्द, जे. डी. ची ईर्षा यांचा एकेक प्रकाश कण वेचून कल्पना त्याचा धु्रवतारा बनवते. स्वप्नाकडून सत्याकडे कल्पनाने जी खडतर वाटचाल केली त्याचे उत्कंठावर्धक चित्रण लेखिकेने केले आहे. तिच्या वृत्तीचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवावा, असे हजारो पालक आपल्या पाल्यांला यापुढे सांगतील. येणाऱ्या पिढ्यांपुढे एक आदर्श ‘रोल मॉडेल’ म्हणून स्वत:ला सिद्ध करणाऱ्या कल्पनाचे हे धगधगते अग्निकुंड! तिच्यापासून स्फूर्ती घेऊन विज्ञाननिष्ठ पिढी निर्माण होईल, असा विश्वास वाटतो. कल्पनाच्या व्यक्तिमत्त्वाचा पाया जरी भारतात घातला गेला तरी तिचे कर्तृत्व फुलले ते अमेरिकेत. कल्पनासारखे भारतीय जेव्हा परदेशी जाऊन उज्ज्वल यश मिळवितात, तेव्हा आपण ते भारतीय असल्याचा अभिमान व्यक्त करतो. कल्पनाने जो विज्ञानवाद जोपासला, प्रयत्नवाद आणि परिश्रमाची वाट धरली ती प्रसिद्धी व पैसा देणारी नव्हती. तेव्हा कल्पनाचा मृत्यू ही क्षणिक लाट न ठरता स्त्री-पुरुषांनी डोळसपणे आजूबाजूला पाहावे. गल्लीबोळात नवी देवळे उभी राहण्यापेक्षा अभ्यासमंडळे आणि प्रयोगशाळा उभ्या राहाव्यात. १९४७च्या भारत-पाक आणि नंतर फाळणीपासून ते २००३ माधुरी शानभाग यांनी कर्नल ते केपकॅनव्होराल या भागात कल्पनाच्या जन्मापासून ते नासाच्या कॅलिफोर्नियातील अमेन्स रीसर्च सेंटरमध्ये संशोधक म्हणून काम करताना कल्पनाने घेतलेल्या गरुडभरारीचे त्रोटक पण अचूक चित्रण केले आहे. ‘वैâसी’ या नावाने अमेरिकेत ओळखली जाणारी, निळ्या नभाच्या पलीकडे झेपावणारी ‘आय अ‍ॅम कल्पना चावला फ्रॉम कर्नाल इंडिया’ म्हणत भारताविषयी सार्थ अभिमान बाळगणारी आणि १९९७ या दिवशी ‘कोलंबिया’मधून अवकाशात झेप घेणारी ‘पहिली भारतीय अंतराळ स्त्री’ म्हणून लेखिकेने कल्पनाची करून दिलेली ओळख उल्लेखनीय आहे. ‘कोलंबिया’चे अवकाशात उड्डाण जितके महत्त्वाचे त्यापेक्षा अंतराळ यात्रीचे प्रशिक्षण अधिक महत्त्वाचे आणि धोकादायक असते. त्यांचे उतरणे, अंतराळ यात्रीचे प्रशिक्षण, कोलंबियाचा ताशी २८,००० कि.मी. असलेला वेग, खास पोशाख, उड्डाणाच्या वेळीचा प्रचंड वेग आणि शरीरावर चार गुरुत्वाकर्षणाएवढा असलेला दाब हे सारेच लेखिकेने तरलपणे उभे केले आहे. पुढे यानाची गती २८,००० कि.मी. इतकी झाल्यावर यान आडवे होऊन अवकाशात पृथ्वीभोवती फिरायला सुरुवात होते. पृथ्वीभावेती घिरट्या घालून १६ दिवसांनी ते परतणार होते, परंतु जडत्वाच्या गुणधर्मामुळे फिरणारे यान त्याच गतीने फिरत राहते. लेखिकेचे समाजभान येथे प्रकट झाले असून त्यांनी केलेली सुरक्षा निरीक्षणे हे त्यांचे द्योतक आहे. अंतराळातील वर्णने रोमहर्षक केली असून अविस्मरणीय बनली आहेत. त्यामुळे ही वर्णने वाचकाच्या आंतरमनाचा ठाव घेणारी बनतात. उड्डाणाची वेळ अमेरिकेत पहाटेची होती. भारतात त्यावेळी रात्र होती. पहिल्या झटक्याला प्रचंड वेगामुळे माणसाच्या रक्तप्रवाहावर परिणाम होतो. त्या वेगाशी जुळवून घेताना रक्तदाबात अनियमित चढउतार होतात त्यासाठी जमिनीवर अशा वेगाचा सराव करावा लागतो. अंतराळवीर जेव्हा जमिनीवर असतात तेव्हा शरीरातील पाणी गुरुत्वाकर्षणामुळे पायाच्या दिशेने वाहते. अवकाशात आल्याबरोबर गुरुत्वाकर्षण नाहीसे होते. त्यामुळे पाणी सर्व शरीरावर साठून सर्वांगावर, विशेषत: चेहऱ्यावर सूज येते. १९ नोव्हेंबर १९९७ ते ५ डिसेंबर १९९७ असे १६ दिवस कल्पना ‘कोलंबिया’ यानात अंतराळात होती. त्या काळात त्यांनी पृथ्वीभोवती २५२ फेऱ्या मारल्या. ३७६ तास ३४ मिनिटे ती अवकाशात राहिली. सुमारे १ कोटी कि. मी. अंतर त्यांनी काटले. पृथ्वीपासून १५० कि. मी. उंचीवर होते. १६ जानेवारी २००३ साली ‘ए.ऊ.ए.१०७’ या कोलंबियाच्या दुसऱ्या फेरीसाठी तिची निवड होते. तेव्हा परत प्रशिक्षणासाठी नासाच्या वेगवेगळ्या विभागात काम करावे लागते. त्यामुळे पुढे ढकललेली भारत भेट रद्द होते. कल्पनाला अवकाशात जाण्यासाठी कोणकोणत्या दिव्यांतून जावे लागले याचे तपशीलवार वर्णन लेखिकेने केले आहे. तिला अभिनिवेश किंवा आत्मप्रौढी बिलकुल नव्हती. समोरच्या तरुणींना तिने, ‘आपल्या स्वप्नाचा पाठपुरावा करा, त्यांना कधीही विसरू नका.’ एक दिवस ते सत्यात उतरते. असा संदेश तिने दिला. तिचा हा उपदेश नसून अनुभवाचे बोल वाटावेत असा प्रामाणिकपणा त्यात होता. दुसऱ्या उड्डाणाच्या वेळी या फेरीची ती कमांडर होती. प्रमुख आणि फ्लाईट इंजिनिअरच्या खुर्चीत बसलेली होती. यानात पाण्याने अंघोळ करता येत नाही. कारण पाण्याचा फवारा पडत नाही आणि तांब्या उलटा केला तर पाणीही पडत नाही. ओल्या सुगंधी टॉवेलने अंग पुसणे हीच अंघोळ सर्वांत कठीण काम म्हणजे मलमूत्र विसर्जन. ती एक कसरतच असते. कारण गुरुत्वाकर्षण नसल्याने काहीही खाली पडत नाही. द्रव पदार्थ स्ट्रॉने ओढून प्यावे लागतात. नियोजित वेळेआधी ६१ मिनिटे कल्पनाने कोलंबियाचा ताशी २८,००० कि.मी. असलेला वेग कमी केला. परतीच्या प्रवासाला सुरुवात झाल्याचा संदेश पृथ्वीवरील नासाच्या नियंत्रण कक्षाला पोचला गती कमी करताना त्याची दिशा बदलून पृथ्वीपासूनची उंची कमी करण्यात आली. तेव्हा साधारण ऑस्ट्रेलियावर कुठेतरी ‘कोलंबिया’ने वातावरण प्रवेश केला. नियोजन वेळेआधी फक्त १६ मिनिटे कोलंबियाचा आणि कक्षाचा संपर्क तुटला. तेव्हा कोलंबिया जमिनीपासून सुमारे ६० कि.मी. अंतरावर होते. लुझियानातील लोकांना स्फोट झाल्याचा मोठा आवाज ऐकू आला आणि श्वास रोखून नियंत्रण कक्षात बसलेल्या नासाच्या वरिष्ठ तंत्रज्ञानां ‘कोलंबिया’ जळून नष्ट झाल्याची बातमी जाहीर करावी लागली. कल्पना जीवनाला पारखी झाली. भारतभेटीचे स्वप्न स्वप्नच राहिले. ‘मरावे परी किर्ती रूपी उरावे’ कल्पनाच्या मृत्यूने हे शब्द खरे करून दाखविले. भव्य यश मिळवून ती परत आली असती तर...! कल्पना चावलाचे आयुष्य, तिची धडपड, चिकाटी व तिचा प्रयत्नवाद लेखिकेने उत्कटपणे मांडला आहे. समाजाला विज्ञानभिमुख करण्यासाठी कल्पना चावला ही प्रवृत्ती नव्यापिढी समोर ठेवण्याचा लेखिकेचा प्रयत्न स्तुत्य वाटतो. -प्रा. डॉ. शिवाजीराव पाटील ...Read more

  • Rating StarDAINIK LOKSATTA 06-04-2003

    फ्रॉम द पॉइंट ऑफ नो रिटर्न... कल्पना चावला हे नाव स्मरताच प्रत्येक भारतीयाच्या मनात दु:खाची एक तरी लकेर चमकून जाते. यापुढेही जात राहील. या दु:खाला सार्थ कौतुकाभिमानाची झालर आहे. केवळ या जगातच नव्हे, तर संपूर्ण विश्वावर तिने आपल्या नावाची मोहर उमटवली १ फेब्रुवारी २००३ च्या रात्री झालेल्या कोलंबियाच्या अपघातानं सारं विश्चच हळहळलं. पंजाबातल्या एका लहानशा शहरगावात जन्माला आलेल्या या आकाशकन्येची कहाणी माधुरी शानभाग यांनी रोचकपणे मांडली आहे. फाळणीमुळे विस्थापित व्हावं लागलेल्यांमध्ये चावला कुटुंबही होतं. जगण्यासाठी वाटेत तिथे पाय रोवून उभं राहण्याची जिद्द फाळणीतल्या विस्थापितांनी दाखवलीच. त्याच संस्कारावर आपल्या परिश्रमांचा साज चढवून कल्पनानं थेट अंतराळात पाऊल टाकलं. कल्पनाचं बालपण अन्य कोणत्याही भारतीय मुलीपेक्षा वेगळं नव्हतं. तिच्या वेगाच्या वाऱ्याच्या, साहसाच्या वेडाला (भारतीय संस्कृतीत नेहमी होतो तो) विरोध झालाच. एरोस्पेस इंजिनीयरिंगसारखा अभ्यासक्रम, परगावी आणि पुढे परदेशी शिक्षण या सगळ्यांसाठी तिला घरच्यांच्या मिनतवाऱ्या कराव्या लागल्या. रूढ अर्थानं तिचं कुटुंब आधुनिक जीवनशैली अनुसरणारं नव्हतं. ‘भारतीय स्त्री’ या संकल्पनेमध्ये अनुस्यूत असणारे सारे अडथळे तिला पार करावे लागले. मात्र या अडचणींचा कल्पनाने कधी बाऊ केला नाही. उलट भारतीय असल्याचा, एकत्र कुटुंबपद्धतीचा तिला नासाच्या निवडचाचण्यांमध्ये फायदाच झाला. व्यक्तिस्वातंत्र्याचे अतिरिक्त लाड पुरवण्याची मागणी करणाऱ्यांनी हे ध्यानात घ्यायला हवं. त्यामुळेच कदाचित कल्पनाने भारतीय भूमीशी असलेले संबंध शेवटपर्यंत टिकवून ठेवले होते. त्याच्या मनस्पर्शी कहाण्या या पुस्तकात वाचायला मिळतात. दर नव्वद मिनिटांत एक पृथ्वीप्रदक्षिणा (एक दिवस एक रात्र) घालण्याने उद्भवणारा त्रास, अवकाश मोहिमांची पूर्वतयारी, तत्संबंधी तांत्रिक बाबींची सोप्या शब्दांत माहिती लेखिकेने दिली आहे. कल्पनाने अवकाशातून पाहिलेल्या पृथ्वीचे केलेले वर्णन तिच्या वृत्तीतील लालित्याचा, सौंदर्याच्या ओढीचा पुरावाच आहे. रूक्ष संशोधनाच्या मुखवट्याआडचा कल्पनाचा हसरा चेहरा या पुस्तकानं वाचकांसमोर मांडला आहे. डॉ. आनंदीबाई जोशी या परदेशात जाऊन डॉक्टर होणाऱ्या पहिल्या भारतीय महिला, डॉ. कमला सोहोनी या पहिल्या भारतीय महिला संशोधक, कल्पना चावला ही पहिली भारतीय अंतराळवीर... ही मालिका ‘पहिली’ या क्रमांकाच्या पुढे नेणं, हेच कल्पनाचं खरं स्मारक ठरणार आहे, हे लेखिकेचं मत वाचकाला अंतर्मुख करतं. ...Read more

  • Rating StarDAINIK PUDHARI 31-08-2003

    आकाशाला गवसणी घालण्याची स्वप्ने पाहणारी आणि ती स्वप्ने सत्यात उतरावित म्हणून जिद्दीने प्रयत्नांची पराकाष्ठा करणारी आदर्श भारतीय अवकाशकन्या कल्पना चावलाची ही जीवनकथा प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक भारतीयास अभिमानस्पद वाटावी अशीच आहे. ‘स्वप्नाकडून सत्याकड’ ही कल्पना चावलाची कहाणी माधुरी शानभाग यांनी खूप श्रम घेऊन समर्थपणे लिहिली आहे. कल्पनाला दुर्दम्य जीवनेच्छेचा, चिवट वृत्तीने झुंजत राहायचा वारसा तिच्या आई वडिलांकडून मिळाला होता. तिच्या वडिलांची जिद्द थेट तिच्या रक्तात उतरली होती. कल्पना लहानपणापासूनच हूड होती. बाहेरच्या जगात रमणारी होती. ती हट्टी होती, जिद्दी होती. भातुकलीच्या खेळात रमण्यापेक्षा चेहऱ्यावर वाऱ्याचे सपकारे घेत सायकलवरून रपेट मारण्यात तिला आनंद वाटे. शाळेत ती भरतनाट्यम, कराटेही शिकली. खेळात अनेक बक्षिसे तिने मिळविली होती. शाळेत असताना एकदा तिने एक मोठे पोस्टर बनविले होते. त्यात अवकाश यान, विमान, ग्रह-तारे होते. तिचा भाऊ मला पायलट व्हायचे आहे असे म्हणायचा. अवकाशात उडण्याचे बीज तेथेच कल्पनाच्या डोक्यात पेरले गेले. विरोध होत असतानाही तिने चंदीगडच्या पंजाब इंजिनिअरींग कॉलेजात प्रवेश घेतला. तिने हट्टाने ‘एरॉनॉटिक्स’ विषय घेतला होता. मध्यमवर्गीय शीख कुटुंबात राहणाऱ्या कल्पनाची झेप अवकाशाकडे होती. तिने पंजाब विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला. पुढे ती शिकायला अमेरिकेस गेली. १९८८मध्ये आपली डॉक्टरेट पूर्ण झाल्यानंतर तिने अवकाशात जायच्या प्रयत्नांची आखणी करावयास सुरुवात केली. वयाच्या तिशीनंतर कल्पनाने नासाच्या संशोधन विभागातून अवकाशयात्री विभागात प्रवेश मिळविला. पुढे तिची निवड झाली. तिने त्यासाठी अनेक कसोट्या दिल्या. तिने जिद्दीने प्रशिक्षण घेतले आणि कोलंबिया अवकाशयान उड्डाणासाठी सज्ज झाले. कल्पना चावला पहिली भारतीय अवकाश कन्या ठरली. तिने आपल्या पृथ्वीचे, सूर्यमालेचे निरीक्षण केले. नवीन अनुभव घेतले. १९ नोव्हेंबर १९९७ ते ५ डिसेंबर १९९७ या काळात तिच्या यानाने २५२ पृथ्वी प्रदक्षिणा काढल्या होत्या. तिची मोहीम सफल झाली होती. ती आपल्या जन्मभूमीला कधीच विसरली नव्हती. २००३ साली कोलंबियाच्याच अवकाश यात्रेसाठी तिची फेरनिवड झाली होती. १६ जानेवारी २००३ रोजी तिचे अवकाश यान अवकाशात झेपावले. अवकाश यान परत येताना पृथ्वीच्या वातावरणात घुसल्यानंतर तापमान नियंत्रणाबाहेर गेले. प्रचंड दाब वाढला. कोलंबिया जमिनीपासून केवळ ६० कि.मी. अंतरावर असताना त्याने पेट घेतला. अनेक तर्कविर्तक झाले. हसतमुख कल्पनाची भरारी कायमची विसावली होती. कल्पना चावलाची ही कहानी विद्यार्थ्यांना, स्त्रियांना नक्कीच आदर्श वाटावी अशी आहे. स्वप्नाकडून सत्याकडे जाण्याचा मार्ग खडतर असतो, पण त्यातून यश प्राप्त होते याची साक्ष येथे पटते. अनेक बारकाव्यासह आपल्या समर्थ लेखणीने माधुरी शानभाग यांनी कल्पनाची सत्यकथा सांगितली आहे. अनेक महत्त्वपूर्ण चित्रामुळे पुस्तक समृद्ध झाले आहे. -ज्ञानेश्वर म. कुलकर्णी ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more