* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: KRANTISURYA
  • Availability : Available
  • ISBN : 9788184980837
  • Edition : 8
  • Publishing Year : MAY 1984
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 168
  • Language : MARATHI
  • Category : BIOGRAPHY
  • Available in Combos :VISHWAS PATIL COMBO SET - 11 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
DURING THE YEAR 1942 NANA PATIL WHO HAD ESTABLISHED QUASI GOVERNMENT IN SATARA, WAS THE BIGGEST HEADACHE FOR THE BRITISH GOVERNMENT. NANASAHEB PATIL HAD MANY QUALITIES. HE WAS A GREAT ORATOR, A VISIONARY SOCIAL WORKER, THE CAPTAIN OF THE FORWARD THINKERS, THE WARRIOR OF THE UNITED MAHARASHTRA MOVEMENT, A PIONEER OF MARXISM IN MAHARASHTRA. HE HAD A GREAT PERSONALITY. HE WAS TOTALLY SHAPED FROM THIS SOIL. HIS COMPETENCY WAS UNIQUE. SINCE CHILDHOOD, NANASAHEB WAS VERY NAUGHTY. ONCE WHEN HE WAS LOST IN A FAIR HE TOLD THE POLICEMAN THAT HIS GRANNY WAS LOST, AND WHEN FINALLY THEY WERE REUNITED HE SCOLDED HER FOR GETTING LOST IN THE FAIR. HE HAD THE GUTS TO MAKE THE PEOPLE THINK, HE QUESTIONED THEM THAT "WAS THE GOD OWNED BY "THEM`?` HE JOINED THE SATYASHODHAK MOVEMENT AND STROVE HARD FOR THE SOCIAL WELFARE. LATER ON, HE STRUGGLED FOR THE FREEDOM MOVEMENT. AFTER MARRIAGE, HE TAUGHT HIS WIFE TO READ AND WRITE. HIS CONTRIBUTION TOWARDS THE FREEDOM STRUGGLE WAS SO GREAT THAT PEOPLE ALWAYS HELPED HIM TO STAY AWAY FROM THE CLUTCHES OF THE BRITISH GOVERNMENT. THE SATARA MOVEMENT DURING THOSE DAYS CONSISTED OF MANY UNDERGROUND GROUPS; A FEW TO NAME WERE THE KISAN VEER AT SATARA, VASANT DADA AT PADMALE, BABURAO CHARANKAR AND GANPATRAO PATIL AT BILASHI, BARDE GURUJI AT VATEGAON, ETC. BUT THE QUASI-GOVERNMENT AT KUNDAL WAS THE MOST STRONG OF THEM ALL. KUNDAL WAS THE CAPITAL OF THE QUASI-GOVERNMENT THEN. AT THE SAME TIME, TODAY NOT ONLY NANASAHEB BUT HIS WORK ALSO HAS BEEN FORGOTTEN BY WE INDIANS. HE SACRIFICED HIMSELF FOR OUR FREEDOM AND WE HAVE TOTALLY NEGLECTED HIM. AFTER FREEDOM, NANASAHEB TURNED TOWARDS MARXISM BUT THAT IS NOT A REASON TO FORGET HIS SACRIFICE. LET US REMEMBER THE GREAT DEEDS BY HIM.
१९४२ च्या धगधगत्या कालखंडात साताऱ्याच्या उदारात "सरकार" (पत्रकार) निर्माता ब्रिटीश प्रतिवणा-या क्रांतिसिंह नाना पाटलांची ही समरगाथा.क्रांतिसिंह – एक फर्डा वक्ता, द्रष्टा समाजसेवक, डाव्यांचावादी सेनानी, संयुक्त महाराष्ट्राचा सूत्रधार, महाराष्ट्राचा माचार्स. त्यांचे लोभस, रंगड व्यक्तित्व, मातीतून आकारले नेतृत्व, मुलंखागळे कर्तृत्व लक्ष्यवे शोधी, कादंबरी विश्वास पाटील यांच्या लेखणीतून साकारलेली ‘क्रांतिसूर’.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#28TH NOV #SAMBHAJI(1.SAHAKAR MAHARSHI SHANKARRAO MOHITE PATIL PURSKAR 2005 2.KAVI MADHAV PURSKAR 2006 3.AKSHARGANDH PURSKAR 2006 ) #NOT GONE WITH THE WIND #BANDA RUPAYA #KRANTISURYA #NAGKESHAR #संभाजी(१.सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील २.कवी माधव पुरस्कार २००६ ३.अक्षरगंध पुरस्कार २००६) #नॉट गॉन विथ द विंड #बंदा रुपया #क्रांतिसूर्य #नागकेशर
Customer Reviews
  • Rating Starसांजवार्ता, ११-०३-२०१०

    क्रांतिवीर नाना पाटील यांच्या जीवनावर विश्वास पाटील यांनी लिहिलेल्या चरित्रात्मक कादंबरीच्या सुधारित आवृत्तीत इतिहासाच्या तेजस्वी घटनांचे दर्शन घडवून दिले आहे.

  • Rating Starसमाचार मैफिल, २८-०२-२०१०

    क्रांतिवीर नाना पाटील यांच्या जीवनावर विश्वास पाटील यांनी लिहिलेली ही कादंबरी उत्वंâठावर्धक तर झाली आहेच; परंतु नाना पाटलांच्या धाडसाचे आणि देशप्रेमाचे जाज्वल्य दर्शन देणारी ही ठरली आहे. विश्वास पाटील यांनी क्रांतिसिंह नाना पाटलांच्या बरोबर काम केलेलया स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलाखती तसेच त्या वेळचे अनुभव ऐकून कादंबरी लिहिल्यामुळे केवळ कल्पनेचा पाया कादंबरीत नसून वास्तवाचे भानही या लेखनास प्राप्त झाले आहे. ...Read more

  • Rating Starदैनिक देशदूत, ११ एप्रिल २०१०

    क्रांतिवीर नाना पाटील यांच्या जीवनावर विश्वास पाटील यांनी लिहिलेल्या चरित्रात्मक कादंबरीच्या सुधारित आवृत्तीच्या वाचकांना पुन्हा एकदा इतिहासाच्या तेजस्वी घटनांचे दर्शन घडवून दिले आहे. तुरुंग आणि स्वातंत्र्याची चळवळ या दोन वाटांनी निघालेल्या नाना पाटलंच्या केवळ आगमनाने चैतन्य उभे राहत असे. त्यांच्या जीवनातील अनेक धाडसी प्रसंग या चरित्रात्मक कादंबरीत येतात. नाना पाटलांच्या धाडसाचे आणि देशप्रेमाचे जाज्वल्य दर्शन देणारी ही ठरली आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK GAOKARI 27-06-2010

    क्रांतिसूर्य नाना पाटील हे अतिशय मोठे व्यक्तिमत्त्व होते. एक फर्डा वक्ता, द्रष्टा समाजसेवक, डाव्या चळवळींचा सेनानी, संयुक्त महाराष्ट्राचा माळकरी मार्क्सवादी अशा अनेक अंगांनी महाराष्ट्र नानांना ओळखतो. त्यांचे रांगडे व्यक्तिमत्त्व याला मराठी मातीचा अस्ल गंध होता. त्यांचे नेतृत्व आकार घेण्याकामी त्यांचे कर्तृत्व होते. त्याच कर्तृत्वाचा आढावा ख्यातनाम कादंबरीकार विश्वास पाटील यांनी क्रांतिसूर्य या कादंबरीतून घेतला आहे. पाटील यांचा विशिष्ट वाचकवर्ग आहे. त्यांना पाटील यांची शैली ज्ञात आहे; पण या चरित्राच्या निमित्ताने पाटील यांच्या लेखनाचा नवा परिचय वाचकाला होतो. नाना पाटील यांच्या गगनगामी व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास ज्यांना करावयाचा आहे त्यांच्यासाठी हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचे ठरेल. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more