* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: INFERNO
  • Availability : Available
  • Translators : ASHOK PADHYE
  • ISBN : 9789386175205
  • Edition : 1
  • Publishing Year : SEPTEMBER 2016
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 616
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
IN THE HEART OF ITALY, HARVARD PROFESSOR OF SYMBOLOGY ROBERT LANGDON IS DRAWN INTO A HARROWING WORLD CENTERED ON ONE OF HISTORY’S MOST ENDURING AND MYSTERIOUS LITERARY MASTERPIECES . . . DANTE’S INFERNO. AGAINST THIS BACKDROP, LANGDON BATTLES A CHILLING ADVERSARY AND GRAPPLES WITH AN INGENIOUS RIDDLE THAT PULLS HIM INTO A LANDSCAPE OF CLASSIC ART, SECRET PASSAGEWAYS, AND FUTURISTIC SCIENCE. DRAWING FROM DANTE’S DARK EPIC POEM, LANGDON RACES TO FIND ANSWERS AND DECIDE WHOM TO TRUST . . . BEFORE THE WORLD IS IRREVOCABLY ALTERED.
‘शोधा म्हणजे तुम्हाला ते सापडेल’ हे शब्द चिन्हशास्त्रज्ञ रॉबर्ट लँग्डन याच्या डोक्यात घोळत असताना तो रुग्णालयात जागा झाला. आपण कुठे आहोत, येथे कसे आलोत, हे त्याला आठवेना. जी एक गूढ वस्तू त्याच्याजवळ होती, त्याबद्दलही त्याला सांगता येईना. त्याला ठार मारण्याची धमकी मिळाल्याने सिएना ब्रुक्स या तरुण डॉक्टरणीसोबत त्याने पलायन केले. मग इटलीच्या फ्लॉरेन्स शहरात त्याचा पाठलाग सुरू झाला. प्राचीन व ऐतिहासिक वास्तूंच्या खाचाखोचा माहीत असल्यामुळे आपला पाठलाग करणाNयांना तो गुंगारा देऊ शकत होता. डान्टेचे महाकाव्य ‘इन्फर्नो’मधील काही काव्यपंक्तींच्या साहाय्याने तो रहस्याचा मागोवा घेत चालला होता. ते रहस्य प्राचीन शिल्पे, चित्रे, इत्यादींमध्ये सांकेतिक स्वरूपात लपलेले होते. ते उलगडले तर जगाला एका भयानक संकटातून वाचवता येणार होते... युरोपातील पाश्र्वभूमीवर लिहिलेली डॅन ब्राउनची रहस्यमय व थरारक कादंबरी! चोवीस तासात घडणाNया या घटना वाचताना वाचकाला अक्षरश: भोवळ येऊ लागते; ही कादंबरी पहिल्या पानापासून ते शेवटच्या पानापर्यंत वाचकाला खिळवून ठेवते!

No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #INFERNO #INFERNO #इन्फर्नो #FICTION #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #ASHOKPADHYE #अशोकपाध्ये #DANBROWN #डॅनब्राउन "
Customer Reviews
  • Rating StarRevan Lonkar

    📚 घरातील करोनाच्या शिरकावामुळे सगळीच उलथापालथ झाली.आधीच मेडिकल क्षेत्राशी निगडित असल्याने कामाचा ताण होताच. नियमित वाचन होत नव्हते,सतत खंड पडत होता.सर्व शांत झाल्यावर २/३ वेळा पुस्तक हातात धरले तरीपण वाचनात मन लागत नव्हते. काहीतरी रोमांचकारी कंवा रहस्य कथा वाचण्याचे ठरवून डॅनभाऊ😊 ब्राउन यांची " इन्फर्नो " ही कादंबरी हातात घेतली. नेहमीप्रमाणे रॉबर्टदादा🕵️ एका एका चिन्हांचा भेद करून रहस्य उलगडत होते. अचानक कादंबरी अशा एका वळणावर आली की त्यावेळी करोनाने डोक्यात परत थैमान घातले. प्रश्न हा नव्हता की करोना हा मानव निर्मित आहे ? की नैसर्गिक ? प्रश्न हा होता आपण मनुष्य त्याला किती कारणीभूत आहोत ? इन्फर्नो मध्ये वर्णन केल्याप्रमाणे खरंच आपण मनुष्य गरजेपोटी म्हणा किंवा हव्यासापोटी या नैसर्गिक साधन संपत्तीचा नक्कीच विनाश करतो आहे.या सर्वांची फळे आपल्या भविष्यातील पिढ्यांना नक्कीच भोगावी लागणार हे निश्चित..तरी वर्तमानातील आपले वर्तन तसेच आहे. इन्फर्नो मधील अनुवंश शास्त्रज्ञ झोब्रिस्ट हा सुध्दा अशाच एका जागतिक समस्येविषयी जागृत होता.त्याचे भविष्यातील परिणाम व यांचा धोका लक्षात घेऊन जागतिक आरोग्य क्षेत्रातील संस्थानशी झालेली त्याची बोलणी व त्याने सुचवलेला एक पर्याय अर्थातच अमान्य झाला. या समस्येवर त्याने स्वतः केलेली अतिरेकी कारवाई , परिणामा अगोदर त्याने केलेली आत्महत्या, या सर्वांत जागतिक आरोग्य अधिकारी व रॉबर्टदादा😊 यांनी केलेली धावाधाव या सर्व गोष्टी आपल्याला खिळवून ठेवतात.सुरुवातीला थोडे सावकाश असणारे पुस्तक नंतर एकदम गती घेते. खरंतर पुस्तक संपताना डॅन ब्राउन यांनी भविष्यात आपल्या पुढे येणाऱ्या एका समस्येविषयी मोठे प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे. या प्रश्नचिन्हाचा मर्मभेद नक्कीच या आपल्या पिढीला करावाच लागेल .. हे निश्चित 📚 ...Read more

  • Rating StarSanjay Dhote

    युराेपमध्ये इ.स. १३४६ ते १३५३ मध्ये प्लेगची माेठी साथ आली हाेती.त्या वेळी प्लेगला काळा मृत्यू - Black Death म्हटल्या जात हाेते. तेव्हा युराेपातील १/३ ( साडेसात काेटीच्या वर) लाेकसंख्या नष्ट झाली हाेती. पण तरीही अनेक इतिहासकारांनी युराेपातील प्लेगच्ा साथीमुळे या काळात माेठ्या प्रमाणात लाेकसंख्या कमी झाल्यामुळे साथीच्या आधीच्या कित्येक समस्यांचे कसे निवारण झाले हे दाखवून दिले हाेते . अचानक आलेली प्लेगची साथ जरी भीषण असली , तरी त्यामुळे माेठ्या प्रमाणात मानवजातीच्या लाेकसंख्येत घट झाली. त्यामुळे विपुलता वाढली, सर्व प्रकारच्या संधी उपलब्ध हाेत गेल्या. म्हणून युराेपात नंतर जे " कलेचे सुवर्णयुग " अर्थात पुनरुज्जीवन काळ अवतरला त्यासाठी मानवजातीची घट आणि विपुलता हे घटक सहाय्यभूत ठरले, असे बरेच इतिहासकार मानतात. लाेकसंख्येच्या विस्फाेटाच्या याच विषयाला धरून एक " इन्फर्नाे " नावाची कादंबरी आहे . ती डँन ब्राऊन यांनी लिहिलेली आहे. मराठीमध्ये याचा अनुवाद अशाेक पाध्ये यांनी केला आहे. प्रसिद्ध इटालियन कवी डान्टे अलिएघिरी यांच्या " द डिव्हाइन काँमेडी " या महाकाव्याचा या पुस्तकात याेग्य रितीने वापर करून विषय फुलवला आहे. या महाकाव्याच्या इन्फर्नाे या भागात डान्टेने " नरकाचं वर्णन " केलेलं आहे. इन्फर्नाे - नरक , जहन्नुम ! ...Read more

  • Rating StarYogesh Khurd

    Dan brown लिखित ‘इन्फर्नो‘ वाचून पूर्ण केली. सध्या चालू असलेल्या कोरोणा परिस्थितीशी साधर्म्य दाखवणारी परिस्थिती (विषाणू संक्रमण) आणि ती परिस्थिती उद्भवू नये यासाठी कथेचा नायक रॉबर्ट लॅंग्डन याचे प्रयत्न याभोवती या कादंबरीचे कथासूत्र फिरते. Dan brow यांच्या रॉबर्ट लॅंग्डन सीरिजमध्ये असणाऱ्या अन्य पुस्तके (दा विंची कोड, द लॉस्ट सिम्बॉल, अंजेल अँड डेमन्स) प्रमाणेच चिन्हं आणि कोड्यांची उकल या विषयावरील एक उत्कंठावर्धक कादंबरी. ...Read more

  • Rating StarNeelima Kapse

    छान,उत्कंठावर्धक प्लाँट .As always of Dan Brown. His Angels and Demons i like as Best of all his novels.......

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MI GALIB BOLTOY
MI GALIB BOLTOY by SHABBIR ROMANI Rating Star
लोकमत २५.९.२०२३

शब्बीर रोमानी हे व्यवसायाने वकील. मातृभाषा अर्थात उर्दू आणि शिक्षण मराठी माध्यमातून झालेले. २०१८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या उर्दू पुस्तकाला, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालच्या साहित्य अकादमी केंद्राचे पुरस्कार लाभले आहेत. आता मिर्झागालिबवरचे नवे पुस्तक, `मी गालिब बोलतोय...!` लक्ष वेधून घेत आहे. गालिबच्या एका शेरची पहिली ओळ घेऊन सांगायचे झाल्यास, जिक्र गालिबचा आणि खूबसूरत बयान लेखकाचे असे या पुरस्काराबद्दल म्हणता येईल. मिर्जा असदुल्ला खां,`गालिब` या श्रेष्ठ शायरची शायरी, त्याचे पत्रलेखन, चरित्र यावर आजवर शेकडो पुस्तक प्रसिद्ध आहेत. लेखकाने प्रस्तावनेत नमूद केल्यानुसार गालिबवर अनेक लेखकांनी लिहिले आहे. मराठी, हिंदी-उर्दू लेखकांची ते तपशील पाहून आचंबा वाटतो. शिवाय शब्बीर रोमानी यांनी इथे आपल्या लेखनाचे प्रयोजन सांगताना म्हटले आहे, कि गालिबबद्दल अनेक उलट-सुलट प्रकारच्या कहाण्या, विनोद, (कसलेही शेर गालिबच्या नावाने सांगत राहणे) प्रचलित आहेत; त्यामुळे गालिबची कथा, त्याच्या पत्रांमधल्या मनोरंजक गप्पा-गोष्टी आणि त्याच्याशी निगडित आठवणी हे सगळं साध्या सोप्या भाषेत लिहिण्याचा प्रयत्न म्हणजे हे पुस्तक. सर्वसामान्य माणसाच्या जगण्यातल्या सर्व भावछटा गालिबच्या काव्यातून दिसत असतात. पुस्तक वाचताना गालिबची प्रकृती, त्याची विनोद बुद्धी, संवेदनशील वृत्ती हे आपल्याला जाणवत राहते, आणि लेखकाची तळमळसुद्धा. या पुस्तकाचे वैशिष्टय म्हणजे, मोठी प्रकरण टाळून किस्से सांगावेत अशी रचना. शिवाय लेखकाची साधी-सरळ भाषा, यामुळे शायरीची आणि गालिबबद्दलची सर्वसाधारण माहिती आणि कुतुहूल असणाऱ्या वाचकांना हे पुस्तक रंजक वाटेल. सहसा गालिबचे गाजलेले शेर, किस्से हे आपल्या वाचनात असतात. या पुस्तकात गालिबचे अनेक दुर्मिळ शेर, शिवाय फारसी रचनाही या पुस्तकात समाविष्ट असल्याने त्याला एक संदर्भ ग्रंथाचेही स्वरूप आलेले आहे. गालिबला आंबे फार आवडायचे, `मिर्झा गालिब` या गाजलेल्या चित्रपटातला तो प्रसंग आजही लक्षात आहे. आंबे खाताना एक मित्र गालिबला तुच्छतेने म्हणतो, `आम तो गधेभी नही खाते!` त्यावर गालिबने त्वरित उत्तर देतो. `सिर्फ गधेही नाही खाते!` शब्बीर रोमानी यांनी हा प्रसंग व विनोद म्हणून सांगितला नाही, तर त्याचे तपशिलाने वर्णन तर केलेच शिवाय आंब्यावरची गालिबची मोठी गजल त्यांनी दिलेली असल्याने त्या किश्श्याला एक गांभीर्य आलेले आहे. असाच एक किस्सा, ते कलकत्त्याला असताना साध्या चिकणी-सुपारीवर गालिबला कुणी छेडले होते, यावर तुमची शायरी होऊन जाऊ द्या! असे आवाहन केले. या सुपारीच्या दिसण्या-असण्यावरच्या अफलातून शायरीची भली मोठी झलकच गालिबने पेश केली! गालिबच्या एक महत्वाचा शेर आहे. जिक्र ऊस परी-वंश का और फार बयां अपना बन गया रिकीब आखिर, था जो राजदां अपना त्या परिच्या सौंदर्याचे वर्णन आणि तेही माझ्या भाषेतून, माझ्याकडून ऐकले आणि माझा जवळचा असा मित्र आता या प्रेमाच्या नात्यात माझा प्रतिस्पर्धी झाला (आता तो तिच्यावर प्रेम करायला लागला) कलकत्त्याला गालिब दीडेएक वर्ष राहिला होता. तिथल्या धनिकांनी मुशायरे, मुजरे आयोजित केलेले असायचे, गालिबचा तिथे सन्मानही व्हायचा. गालिबने या बद्दल फार जिव्हाळ्याने लिहिले आहे. या मुशायऱ्यामध्ये गालिबचे फारसीचे काव्यवाचन ऐकून फारसी भाषेचे तज्ञ त्याच्यावर नाराज झाल्याची आठवण आहे! गालिबच्या तोंडून फारसीचे कौतुक ऐकून लोकांनी आक्षेप घेतला! गालिब हा आपल्या दुःख, विवंचनेवर हसणारा अद्भुत असा कलावंत होता. हा शेर वाचल्यावर आपल्याला मुन्शी प्रेमचंद यांच्या `पूस कि रात` मधला हलकू आठवतो! मिर्झा गालिबच्या कुतुहूल असणाऱ्या वाचकांना हा संग्रह आवडण्यासारखाच आहे. लेखनातल्या भाषिक काही त्रुटी वगळल्यास, गालिबचे किस्से, त्याची शायरी हे सगळे रोचक आहे. ...Read more

MRUTYUNJAYEE
MRUTYUNJAYEE by RATNAKAR MATKARI Rating Star
पुस्तकप्रेमी

मीना कश्यप शाह *मृत्युंजयी* भयकथा हा रत्नाकर मतकरींच्या लेखनाचा हातखंडा. मी दहावीच्या सुट्टीत असताना भयकथा वाचायला सुरुवात केली आणि त्यांनी मला पुरात झपाटून टाकलं होतं. ही पुस्तकं असायचीही सुटसुटीत जाडीची. त्यामुळे जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी पुस्तक लगणाऱ्या मला सगळीकडे ती घेऊन जात येत असत. क्लास मध्ये लवकर पोहोचले - वाच पुस्तक, बससाठी उभी आहे, वाच पुस्तक; झोप येत नाही, वाच (हे बहुदा चक्राकार रित्या सुरु राहायचं, झोप नाही म्हणून वाचायचं आणि वाचत असायचे म्हणून झोप नाही... त्या वयात असं सगळं चालायचं - लहानपण देगा देवा...) मृत्युंजयी सुरु केली तेव्हा आधीच खेकडा, रंगांधळा वाचून झालं होतं. अजूनही एक संपवलं होतं, पण नाव नाही आठवत (बहुतेक कबंध). त्या पार्श्वभूमीवर मृत्युंजयी फार आवडलं नाही, आणि खरं तर त्यामुळे रत्नाकर मतकरींच्या भयकथा वाचणं थांबलं. अलीकडेच हे इ-बुक मिळालं किंडल वर, पुन्हा वाचलं - आतासुद्धा शेवटच्या परिच्छेदात काय वळण मिळतं त्याची उत्सुकता होती, पण एकूणच माझा patience खूपच कमी झालाय त्यामुळे skip reading, quick reading करत पुस्तक पटकन वाचून संपलं. मृत्यू, अखेर, शेवट ही भावना प्रत्येकासाठी भीतीदायकच. त्या भीतीवर बेतलेल्या कथा ह्या संग्रहात आहेत. अतिमानवीय, फँटसी, भुताटकी अशा धक्कातंत्राचा उपयोग अनेक लेखक करतात. पण मतकरीचं वैशिष्ठय असं, की ते जळमटं सारखी कथा लिहून जातात. मृत्युंजयी मधील कथांमध्ये मृत्यूची अनेक रूपं दिसतात, कथा जिवंत माणसांच्या - पण मृत्यूची चाहूल, त्याची भीती, कधी त्याचं हवेहवेपण, कधी त्याच्याकडे आपणहून जाणे, अशा अनेक रंगढंगांनी मतकरी गूढता कायम ठेवतात. ह्या पुस्तकातील, मृत्यू अवतीभवती असलेल्या प्रत्येक कथेत, आपणा सर्वांना नक्कीच सुप्त आकर्षण वाटत असलेल्या अनेक गूढ गोष्टी येतातच... मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी करण्याची अतिमानवीय साधना... स्त्री-पुरुषातील शारीरिक आणि मानसिक ओढ... पूर्वी केलेल्या चुका आणि त्याबद्दलचा सल... जुलमाचा प्रतिशोध... अतिमानवीय शक्तींनी झपाटणे... भूतबाधा, भूतांशी गाठभेट... मृत्यूच्या अनेकविध तऱ्हा... मानसिक संतुलन ढळणे... आणि तत्सम. ह्या कथाप्रकारात महत्वाचं असतं, ते शेवटच्या काही वाक्यांमधे कथेला दिलेलं वळण आणि त्यामुळे वाचकाला बसलेला धक्का. रत्नाकर मतकरींच्या गूढकथा म्हणूनच खूप प्रभावी ठरतात. आता मात्र हे धक्का तंत्र बऱ्याच जागी पाहायला मिळतं - OTT वरच्या अनेक चित्रपट किंवा नाट्यमालांमधे हे तंत्र कथाकार वापरतात, आणि लोकांना हे पहायला खरंच खूप आवडतं, म्हणूनच त्या प्रसिद्ध होतात. अलीकडचं उदाहरण "वाळवी" चित्रपट! मृत्युंजयी मधे देखील काही कथा असा आनंद देऊन जातात. पण असं आहे ना "अति सर्वत्र वर्जयेत" - त्यामुळे बऱ्याच कथांच्या शेवटचा अंदाज लागतो आणि त्यांचा प्रभाव कमी होतो. सुरुवातीला जी गूढकथांची पुस्तकं मी वाचली, तेव्हा हे धक्कातंत्र मला नवीन होतं, त्यामुळे त्यात हा अंदाज लागत नव्हता. कदाचित मृत्युंजयी तेव्हा वाचलं आणि आताही वाचलं ते ह्या तंत्राचा अति वापर झाल्यावर वाचलं गेलं म्हणून असेल, पण कमी प्रभावी वाटलं हे खरं. अर्थात प्रत्येक गोष्टीत (सध्या इतर कथांमधे फारसे न सापडणारे) एक समान सूत्र आहे - ते म्हणजे, *वाईटाचं कधीच भलं होत नाही*. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, कधीही उचलून वाचायला सुरुवात करून काही मिनिटात एक गोष्ट संपते. सध्याच्या व्यग्र काळात हे पुस्तक पुन्हा वाचायला सोपे गेले, नक्कीच. आणि मी पुन्हा एकदा ह्या कथाप्रकाराकडे आकर्षितही झाले आहे... पुन्हा सगळी गूढकथांची पुस्तकं वाचायला हवीत. ...Read more