* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: CARRY ON MR. BOWDITCH
  • Availability : Available
  • Translators : VIJAY TENDULKAR
  • ISBN : 9789353172664
  • Edition : 1
  • Publishing Year : DECEMBER 2019
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 132
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
  • Sub Category : HISTORICAL, MODERN & CONTEMPORARY FICTION
  • Available in Combos :AMERICAN CLASSICS COMBO SET-17 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
READERS TODAY ARE STILL FASCINATED BY “NAT,? AN EIGHTEENTH-CENTURY NAUTICAL WONDER AND MATHEMATICAL WIZARD. NATHANIEL BOWDITCH GREW UP IN A SAILOR?S WORLD—SALEM IN THE EARLY DAYS, WHEN TALL-MASTED SHIPS FROM FOREIGN PORTS CROWDED THE WHARVES. BUT NAT DIDN?T PROMISE TO HAVE THE MAKINGS OF A SAILOR; HE WAS TOO PHYSICALLY SMALL. NAT MAY HAVE BEEN SLIGHT OF BUILD, BUT NO ONE GUESSED THAT HE HAD THE PERSISTENCE AND DETERMINATION TO MASTER SEA NAVIGATION IN THE DAYS WHEN MEN SAILED ONLY BY “LOG, LEAD, AND LOOKOUT.? NAT?S LONG HOURS OF STUDY AND OBSERVATION, COLLECTED IN HIS FAMOUS WORK, THE AMERICAN PRACTICAL NAVIGATOR (ALSO KNOWN AS THE “SAILORS? BIBLE?), STUNNED THE SAILING COMMUNITY AND MADE HIM A NEW ENGLAND HERO.
नॅट अर्थात बो-डिचची ही जीवनकहाणी. लहानपणापासूनच गणित विषयाच्या आवडीमुळे त्याच्यात हार्वर्ड विद्यापीठात शिकून पदवी मिळवण्याची इच्छा रूजलेली. पण घरच्या परिस्थितीमुळे त्याला शाळा सोडावी लागते. जहाजावर हिशेबनीस म्हणून काम करताना सागरी प्रवासाच्या अनुभवविश्वाशी नॅटची ओळख होते. या प्रवासात त्यानं मिळवलेलं ज्ञान आणि त्याची अपार इच्छाशक्ती त्याला त्याच्या इच्छित साध्यापर्यंत पोहोचवते. नौकानयन शास्त्रात नॅटनं केलेल्या विलक्षण कामाचा हा एक अर्थी साहित्यिक दस्ताऐवजच होय.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#CARRY ON,MR.BOWDITCH #JEAN LEE LATHAM #VIJAY TENDULKAR #MARATHI TRANSLATION #AMERICAN CLASSICS #आगे बढो #जीन ली लेथम #विजय तेंडुलकर #मराठी अनुवाद #अमेरिकन क्लासिक्स #शेन #मराठी पुस्तके
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKMAT 29-12-2019

    हताश न होणारा मुलगा... ‘आगे बढो’ हे तिसरे पुस्तकही असेच रंजक आहे. झीन ली लेथम यांनी ते लिहिले आहे. गणितात प्रावीण्य मिळवायचे व हार्वर्डची पदवी मिळवायचे व हार्वर्डची पदवी मिळवायचे असे ध्येय लहान असतानाच ठरवलेल्या एका मुलाला काही कारणांनी एका जहाजावर ाधा हिशेबतपासणीस म्हणून काम करावे लागते. जहाजावरच्या या प्रवासाला तो त्याच्याकडे असलेल्या अल्पज्ञानाच्या जोरावर खलाशांना अनेक गोष्टी शिकवतो व स्वत:ही शिकतो. अनुभवाच्या जोरावर ज्ञानाचे भांडार वाढवत जातो. अखेर नौकानयनशास्त्रात इतका प्रवीण होतो, की त्यात तो आपल्या अनुभवी ज्ञानाने नवी भर टाकतो. त्याला मान्यता मिळते व हार्वर्डची पदवी अगदी चालत त्याच्याकडे येते. स्वप्नपूर्तीचा हा आनंद प्रेरणादायी असाच आहे. तेंडुलकरांच्या ऐन उमेदीतील हे अनुवाद आहे, मात्र कुठेही त्यात करून टाकू असे म्हणत उरकले असल्याचे जाणवत नाही. मेहतांनी पुस्तके जुनी असूनही दिमाखात काढली आहेत. मूळ अमेरिकन लेखक व तेंडुलकार यांचा छायाचित्रांसहित परिचय वाचकांची उत्सुकता शमवतो. मूळ लेखक जुन्या पिढीतील आहेत. त्यांच्या लेखनावर जुन्या अमेरिकेची छाप आहे. ती अनुवादातही डोकावते, मात्र रसभंग करत नाही तर रस निर्माण करते. अनुवाद वाचणे आवडणारा एक स्वतंत्र असा वाचकवर्ग आहे मराठीत. त्यांच्यासाठी ही एक भेटच आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more