* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE HUNGRY TIDE
  • Availability : Available
  • Translators : SUNIL KARMARKAR
  • ISBN : 9789357200783
  • Edition : 1
  • Publishing Year : AUGUST 2023
  • Weight : 350.00 gms
  • Pages : 404
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE HUNGRY TIDE IS A RICH, EXOTIC SAGA SET IN CALCUTTA AND IN THE VAST ARCHIPELAGO OF ISLANDS IN THE BAY OF BENGAL. AN INDIAN MYTH SAYS THAT WHEN THE RIVER GANGES FIRST DESCENDED FROM THE HEAVENS, THE FORCE OF THE CASCADE WAS SO GREAT THAT THE EARTH WOULD HAVE BEEN DESTROYED IF IT HAD NOT BEEN FOR THE GOD SHIVA, WHO TAMED THE TORRENT BY CATCHING IT IN HIS DREADLOCKS. IT IS ONLY WHEN THE GANGES APPROACHES THE BAY OF BENGAL THAT IT FREES ITSELF AND SEPARATES INTO THOUSANDS OF WANDERING STRANDS. THE RESULT IS THE SUNDARBANS, AN IMMENSE STRETCH OF MANGROVE FOREST, A HALF-DROWNED LAND WHERE THE WATERS OF THE HIMALAYAS MERGE WITH THE INCOMING TIDES OF THE SEA. IT IS THIS VAST ARCHIPELAGO OF ISLANDS THAT PROVIDES THE SETTING FOR AMITAV GHOSH’S NEW NOVEL. IN THE SUNDARBANS THE TIDES REACH MORE THAN 100 MILES INLAND AND EVERY DAY THOUSANDS OF HECTARES OF FOREST DISAPPEAR ONLY TO RE-EMERGE HOURS LATER. DENSE AS THE MANGROVE FORESTS ARE, FROM A HUMAN POINT OF VIEW IT IS ONLY A LITTLE LESS BARREN THAN A DESERT. THERE IS A TERRIBLE, VENGEFUL BEAUTY HERE, A PLACE TEEMING WITH CROCODILES, SNAKES, SHARKS AND MAN-EATING TIGERS. THIS IS THE ONLY PLACE ON EARTH WHERE MAN IS MORE OFTEN PREY THAN PREDATOR. AND IT IS INTO THIS TERRAIN THAT AN ECCENTRIC, WEALTHY SCOTSMAN NAMED DANIEL HAMILTON TRIED TO CREATE A UTOPIAN SOCIETY, OF ALL RACES AND RELIGIONS AND CONQUER THE MIGHT OF THE SUNDARBANS. IN JANUARY 2001, A SMALL SHIP ARRIVES TO CONDUCT AN ECOLOGICAL SURVEY OF THIS VAST BUT LITTLE-KNOWN ENVIRONMENT AND THE SCIENTISTS ON BOARD BEGIN TO TRACE THE JOURNEYS OF THE DESCENDANTS OF THIS SOCIETY.
हंग्री टाइड ही कलकत्ता आणि बंगालच्या उपसागरातील बेटांच्या विशाल द्वीपसमूहातील एक समृद्ध गाथा आहे. बेटांचा हा विशाल द्वीपसमूहच अमिताव घोष यांच्या नवीन कादंबरीची मांडणी करतो. सुंदरबनमध्ये समुद्राच्या भरती १०० मैलांपेक्षा जास्त अंतरापर्यंत पोहोचतात आणि दररोज हजारो हेक्टर जंगल नाहीसे होते आणि काही तासांनंतर पुन्हा उगवते. याच पार्श्वभूमीवर दुर्मीळ डॉल्फिनच्या शोधात आलेली पियाली, तिला डॉल्फिन शोधण्यात सहाय्यक ठरणारा फोकीर, कनाई या प्रमुख पात्रांभोवती फिरणारी ही कादंबरी घडते.खारफुटीच्या जंगलातली समृद्ध जलसंपदा, वाघोबाच्या भीतीनं आदिवासी जीवनात उदयाला आलेल्या लोककथा आणि जंगल भयाचं आव्हान पेलतही निसर्गावर मनमुराद प्रेम करणाऱ्या माणसांची ही गोष्ट आहे. जी सुंदरबनच्या जंगलातून अनहद प्रवास घडवते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक #मेहतापब्लिशिंगहाऊस #कादंबरी #अनुवाद #क्लासिक #आध्यात्मिक #धार्मिक #दहंग्रीटाइड #अमितावघोष #सुंदरबन #खारफुटीजंगल #MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS #MEHTAPUBLISHINGHOUSE #THEHUNGRYTIDE #AMITAVGHOSH #SUNDARBAN #MANGROVEFOREST #ENVIRONMENT #FICTION #MARATHITRANSLATION #SUNILKARMARKAR
Customer Reviews
  • Rating Starजयश्री सोनवणे

    बंगालमधील सुंदरबनच्या पार्श्वभूमीवर ही कादंबरी जन्म घेते कादंबरीत मुख्य पात्रेत अशी चार-पाचच आहेत. कनाई -हा मूळ कलकत्त्याचा पण आता दिलीत राहून तेथे येणाऱ्या परदेशी भाषिकांना दुभाषा पुरवणे हा त्याचा धंदा आहे. पेशाने तो भाषांतरकार आहे. स्वतःच्या धंद्ामध्ये खूपच व्यस्त असणारा हा ४२ वर्षाचा तरुण त्याची मावशी नीलिमा हिच्या निर्वाणीच्या आग्रहावरून तिला भेटायला वेळात वेळ काढून लुसीबारीला आलेला आहे. पिया- ही मुळची बंगाली. पण आई-वडील सिएटलला स्थायिक झाल्यामुळे आता अमेरिकन आहे. ती सुंदरबन मधील डॉल्फिनचा अभ्यास करायला इकडे आलेली आहे आणि येताना रेल्वेमध्ये तिची कनाईशी ओळख झालेली आहे. निर्मल नीलिमा- निर्मल नीलिमा हे जोडपे या प्रदेशात राहणाऱ्या गरिबीने ग्रासलेल्या बहुसंख्य लोकांसाठी त्यांच्या उत्कर्षासाठी आपले आयुष्य खर्च करायचे हा आदर्श ठेवून १९७० पासून इथे स्थायिक झालेले आहे लुसीबारी येथे त्यांची बडाबन नावाची संस्था आहे दिली माने येथे दवाखाना काढलेला आहे. मोयना- ही लुसी बारीची स्थानिक तरुणी नीलिमाच्या दवाखान्यात नर्स चं काम शिकत आहे. त्याशिवाय अजूनही बरीच कामं ती करत असावी असे दिसते. कारण कनाई साठी जेवण बनवून आणायचं काम निलिमाने तिला सांगितलं आहे. फोकीर- फोकीर हा मोयनाचा नवरा आहे आणि तिथला मासेमारी करणारा कोळी आहे. खाडीच्या प्रदेशात राहत असल्याने मासेमारी व खेकडे हे मुख्य उपजीवीकेचे साधन आहे आणि ते पकडण्यात तो पटाईत आहे. तसेच त्याला इथल्या खाड्चीयां कण न कण माहिती आहे. होरेन - होरेन हा पण एक निष्णात आणि अनुभवी कोळी आहे आणि फोकीरला तो स्वतःच्या मुलासारखा मानतो. सर डॅनियल हॅमिल्टन नावाचा एक स्कॉटिश माणूस ब्रिटिश सरकारकडून १९०३ झाली ही बेटं असलेली दहा एकर जमीन विकत घेतो आणि तिथे मनुष्यवस्ती वसवण्याचा चंग बांधतो. अनेकांना ही जमीन त्याने फुकट दिली आणि १९२० सालापासून ज्यांच्याकडे मालमत्ता, जमीन काहीच नाही अशा अत्यंत गरीब लोकांना या जमिनीच्या मालकीच्या आशेने इथे येऊन वसाहत करण्यास आवाहन केले.१९७१ साली झालेल्या बांगला युद्धामध्ये आणि १९४७ साली झालेल्या फाळणीमध्ये असंख्य निर्वासितांचे लोंढेच्या लोंढे या बेटांवर आले तेव्हा इथे फक्त वाघ, मगरी, चित्ते, नाग, आणि शार्क मासे यांचे साम्राज्य होते. असंख्य लोक त्यांच्या भक्ष्यस्थानी पडले. जे राहिले जगले ते सतत असुरक्षिततेची मूक भावना घेऊन जगत राहिले. इथे वय वर्ष ३० च्या पुढे जगलेले तरुण खूपच कमी दिसतात. इतकंच नव्हे तर इथल्या स्त्रियांचे नेहमीचे पोशाख सुद्धा विधवेचे वस्त्र धारण करणारे असतात अशी इथली परिस्थिती अत्यंत दारुण आहे. खरंतर या कादंबरीला नायक किंवा खलनायक नाहीच आहे. जर कोणी नायक किंवा खलनायक असेल तर तो निसर्ग आहे, ती भरती-ओहोटी आहे. इथले वाघ, मगरी, साप हे सर्व खलनायक आहेत. इथले वादळी वारे, पाण्याचे सतत बदलते प्रवाह आहेत जे इथल्या मनुष्य जीवनाला कधी होत्याचे नव्हते करून टाकतील हे सांगता येत नाही. फाळणी नंतर आणि युद्धानंतर देशोधडीला लागलेले असंख्य लोक इथे आले. ते अत्यंत गरीब होते. इथल्या भरती ओहोटी, लहरी निसर्ग, हिंस्र प्राणी यांच्याशी आपल्या अस्तित्वासाठी ते लढू लागले. त्यांना जात, धर्म, कूळ, वंश यांच्याशी काही देणंघेणं नव्हतं. कारण त्यांच्या अस्तित्वाची लढाईच एवढी बिकट होती की या कशाचं भान असण्याची परिस्थितीच नव्हती. आणि या सर्व लोकांना घुसखोर ठरवून सरकारी अधिकाऱ्यांकडून त्यांना कायम त्रास दिला जात होता. तुरुंगात डांबलं जायचं आणि गोळीबारात मारलं जायचं. निर्मला मात्र क्रांतीसाठीही परिस्थिती अगदी योग्य वाटायची. आपण जेव्हाही कादंबरी वाचायला घेतो तेव्हा ती आपल्या मनाची इतकी पकड घेते की शेवटपर्यंत आपण ती सोडू शकत नाही. संपूर्ण कथानक बाळबोधपणे काळानुसार एका सरळ रेषेत न जाता नदीसारखं वळण घेत, कधी भूतकाळाच्या खाच खळग्यात अडकत, साचत पुढे जाते. मध्येच ते खूप प्रवाही होते, मध्येच संथ होते आणि मध्ये मध्ये निसरड्या शेवाळ्याप्रमाणे फसवं होत जातं. श्री अमिताभ घोष यांचे मूळ इंग्रजी पुस्तक मराठीतून वाचताना हे लक्षात येतं की अनुवादकार श्री. सुनील करमरकर यांची मराठी भाषेवरची पकड ही तितकीच पक्की आहे जितकी त्यांची इंग्रजी भाषेवर पक्की पकड आहे. कादंबरी इंग्रजीत वाचून त्याचा रसास्वाद घेणे ही सहज साध्य गोष्ट आहे. पण त्यातील तरलता आणि जीवनानुभवाला यत्किंचितही धक्का न लावता त्याचा मराठीत अनुवाद करणं हे खूप आव्हानात्मक आहे आणि हे आव्हान सुनील करमरकर यांनी यशस्वीपणे पेललेले आहे. मुळात इंग्रजी भाषेचा बाज, त्याची वाक्यरचना मराठी भाषेपेक्षा खूपच वेगळी असते. पण ही कादंबरी मराठीतून वाचताना कुठेही असं जाणवत नाही की हा अनुवाद आहे म्हणून. ही कादंबरी मुळात मराठीतच लिहिली गेली असावी असं वाटावं इतकी ती अस्सल उतरली आहे. माणसाच्या नात्यातील भावनांचा कल्लोळ आणि दुसरीकडे निसर्गाच्या लहरी स्वभावाचा कल्लोळ याचे चित्र रेखाटताना केलेली शब्दांची गुंफण खूपच विस्मित करणारी आहे. कादंबरी वाचताना ती माणसे, कांदळवनाचे जाळे, पाण्याचा आणि जंगलाचा गूढपणा, दरारा बसवणारं वादळ या गोष्टी जशाच्या तशा आपल्यासमोर उभ्या राहतात. श्री. सुनील करमरकर यांच्या भाषा कौशल्याचा हा परिणाम आहे. आजच्या काळात जिथे एका मराठी वाक्यात दोन इंग्रजी शब्द नसतील तर आपल्याला कमी लेखले जाईल ही भावना घेऊन भाषेचा वापर करणाऱ्या, न्यूनगंडात गेलेल्या मराठी माणसासाठी ही कादंबरी म्हणजे मराठी अस्खलीतपणाचे उदाहरण आहे. कुठेही अर्थाला, आशयाला, प्रासंगिक वर्णनाला बाधा न आणता मराठी भाषेचे वैभव श्री. सुनील करमरकर आपल्या लिखाणातून, अनुवादातून उलगडत जातात. त्यांनी हे सर्व लिखाण करताना घेतलेले कष्ट नक्कीच जाणवतात. श्री सुनील करमरकर यांचे हे पहिले अनुवादित पुस्तक आहे यावर विश्वास बसणार नाही इतके हे पुस्तक उत्तम झाले आहे. ...Read more

  • Rating Starपुरुदत्त रत्नाकर

    पुस्तक: द हंग्री टाईड मराठी अनुवाद: सुनील करमरकर प्रकाशक: मेहता पब्लिशिंग हाऊस प्रथमावृत्ती: ऑगस्ट २०२३ मूळ कादंबरी: (इंग्लिश) the hungry tide, अमिताभ (Amitav) घोष हा अनुवाद आहे असं केवळ आधी माहिती होतं म्हणून त्याच्या खुणा सापडल्या. अन्यथा हीमूळ मराठी कादंबरी आहे असे समजून वाचता आली असती इतका हा अनुवाद सरल, ओघवता. अस्सल झाला आहे. यात हल्ली दुर्मिळ होत चाललेले अनेक मराठी शब्द सहजपणे वापरले आहेत. कुठेही मुद्दाम, प्रयत्नपूर्वक लालित्य आणले आहे असे वाटत नाही. परभाषेतून मातृभाषेत अनुवाद करणे हे मातृभाषेतून परभाषेत अनुवाद करण्यापेक्षा किचकट आणि वेळखाऊ असते. कादंबरी मुळातच मोठी असते. गोष्ट, कथा यापेक्षा बरीच मोठी. त्यातही तुलनेने अधिकच मोठ्या असलेल्या या कादंबरीचा अनुवाद करणं आणि तो निर्दोष करणं याला प्रचंड चिकाटी, जिद्द, संयम आणि आवड असावी लागते. त्यासाठी साजेसा असा स्वभाव अनुवादक श्री. सुनील करमरकर यांना लाभला आहे हे नक्की. ज्ञानपीठ, साहित्य अकॅडमी विजेत्या लेखकाच्या या कादंबरीचा त्यांनी यशस्वीपणे, तोडीस तोड अनुवाद केला आहे. सुनीलजी लीना सोहोनी यांच्या अनुवादतंत्र कार्यशाळेचा या यशामध्ये वाटा असल्याचे कृतज्ञतापूर्वक सांगतात. कादंबरी काल्पनिक आहे. ती सुंदरबन या अस्तीत्वात असलेल्या प्रदेशाभोवती घडते. लेखक बंगाली आहे त्यामुळे बंगाली पार्श्वभूमी असणं लिखाणाच्या गुणवत्तेला पूरक आहे. नद्या, बेटं, खाडी.. अहाहा... या सगळ्यांपासून शेकडो मैल दूर राहणार्‍या माझासारख्याला तर याचं फारच आकर्षण वाटतं. पण कोकणवार्‍या आणि अशा पुस्तकातून तिथे जगणं म्हणजे येर्‍या-गबाळ्याचं काम नाही हे समजतं. तिथल्या जीवनाचं सुरेख वर्णन लेखकाने केलं आहे. तसं पाहायला गेलं तर या,जवळपास ४०० पानी भरगच्च कादंबरीमध्ये ७-८ च मुख्य पात्र आहेत. पण कथानक तीन वेगवेगळ्या ठिकाणी आणि दोन वेगवेगळ्या काळांमध्ये घडत, उलगडत जाते. पाठोपाठची प्रकरणे आळीपाळीने या भिन्न ठिकाणी आणि भिन्न काळात फिरत राहतात. त्यामुळे १००-१२५ पानांनंतर माझ्यासारख्या वाचकाचा पात्रांमध्ये थोडा गोंधळ उडतो आणि संदर्भासाठी आधीचे परत वाचले की कादंबरीची लांबी आणखी वाढते. अमिताभ घोष यांचं निरीक्षण अफलातून आहे. एखाद्या ठिकाणाचं त्यांनी केलेलं वर्णन हे शब्दचित्र या स्तरावरचं असतं. मी असं वर्णन कधी करू शकेन, असा विचार केला तर एकाच शक्यता दिसते... छायाचित्रं किंवा चित्र समोर ठेवून त्याचं वर्णन करायला घेतलं तरच. पण तरीही एवढं आखीव येणार नाही आणि अशी किती चित्रं समोर ठेवणार?! व्यक्तिचं वर्णनही जणू व्यक्तिरेखेसारखं आणि प्रसंगही अगदी जीवंत! `चंद्रप्रकाशाने दिवसा दिसणार्‍या दृश्याची जणू चंदेरी काळी प्रतिमा बनवली होती.` अशी वाक्य त्या दोन्ही प्रतिमा वाचकाच्या मनात लख्ख उभ्या करतात. कुटुंबीय व्यक्तीबद्दल आणि परक्या व्यक्तीच्या सान्निध्यात मानवी मनात नैसर्गिकरित्या उमटणारे तरंग, भावना; संकटात असतांनाचं क्षणिक नैसर्गिक प्रेम; आयुष्यभरात आपल्याच जोडीदाराबद्दल निर्माण झालेला तिटकारा, टोकाची मतं; एकच माणूस बायकोला कसा दुष्ट, निरुपयोगी वाटतो पण तोच परक्या स्त्रीशी कसा आब राखून वागतो, जीवाची बाजी लावून निरपेक्षपणे तिचं रक्षण करतो; हे सगळं अतिशय विचित्र पण शक्य वास्तव यात आलं आहे. कादंबरीतल्या प्रत्येकच पात्राचे स्वतःच्या जोडीदाराशी जमत नाही पण परक्या व्यक्तींना, समाजाला मात्र ते जवळ करतात, जवळचे वाटतात. लिखाण खूपच अभ्यासपूर्ण, संशोधित आहे. ते प्रस्तावनेतही सांगितलं आहे. डॉल्फिनवर शोधकार्य करण्यासारख्या किचकट आणि जोखमीच्या कामात या कादंबरीची एक नायिका पिया स्वतःला कसं झोकून देऊ शकते हे वर्णन छान आलं आहे. अमिताभ घोष हे स्वतः लेखकप्रवृत्तिचे आहेत आणि त्यांची पत्नी देबोरा अमेरिकन आहे. त्यामुळे निर्मल आणि इंग्लंडमध्ये वाढलेली नायिका पिया ही पात्रं या दोघांवरच बेतलेली असावीत असा विचार मनाला शिवून गेला. पण असा काही निष्कर्श काढणं फारच धाडसाचं होतं. कारण घोष यांनी ही एकच कादंबरी लिहिलेली नाही किंवा ही त्यांची पहिलीच कादंबरीही नाही. शिवाय `चाकोरीबद्ध आयुष्याची सर्वात मोठी शोकांतिका म्हणजे त्यातला फोलपणा कळतो तेव्हा फार उशीर झालेला असतो.` हे निर्मलच्या तोंडचं वाक्य लेखकाला नक्कीच लागू होत नाही. मी कादंबरी वाचून झाल्यावर प्रस्तावना वाचली आणि कदाचित घोष यांनी ऋणनिर्देश केलेल्या आंनेकांमधल्या दोघांवर ही पात्र बेतलेली असू शकतात असे वाटले. पण हे सगळे जर-तर आहे. कादंबरी ज्या प्रकारे वास्तव ठिकाणं आणि लोककथा यांच्याशी काल्पनिक पात्रांचा मेळ घालते त्यामुळे असे संबंध जोडावे वाटले असावे. यातली सगळीच स्त्री पात्रं ध्येयवादी आणि चिकाटीची घेतली आहेत ते वर्णन वास्तविक वाटते. त्यामानाने पुरुष पात्रं थोडी भरकटलेली आहेत. तेही वास्तवाला सोडून वाटत नाही. नायिका पियाच्या होडीचा गळ एकदाचा मातीत रुतला की वाचकाचा जीवही भांड्यात पडतो. कथानायक कनाईच्या कथानकात काही खास घडण्याची वाट बघता बघता वाचकाला भरतीच्या प्रदेशातल्या दमट हवामानात बसल्या बसल्या फुटावा तसा घाम फुटतो. कथेत खूप काही घडतं. तरीही सुरूवातीला नदी किंवा समुद्र शांत असतांना त्या परिस्थितीचा, तिथल्या जीवनाचा वेग असतो त्या वेगाने, गतीने कथानक संथपणे सरकते आणि वादळाच्या परमोच्च बिन्दुकडे जातांना घटनाक्रमाचा वेगही वाढतो. एखाद्या चित्रपटसारखंच हे वाटतं. काही ठिकाणी न पटणारा मजकूर आहे. सुंदरबनातल्या एका जागेला स्थानिक रहिवासी `हॅमिल्टनबाद` नाव ठेवततात. हे शक्य वाटत नाही कारण जिथे मुघल आक्रमक घुसून त्यांनी ते ठिकाण `बाद` केले तिथे प्रमुख आक्रमकाच्या नावापुढे `बाद` लावून त्या जागेचे मुघलीकरण केले जायचे. स्थानिक लोकांच्या इच्छेने नाही. आणि या कथेतली ठिकाणं मुघल अमलाखाली नव्हती. म्हणून हे पटत नाही. या कथेतल्या एका पौराणिक मान्यतेच्या गोष्टीत राक्षस हा साधारण हिंदू नावाचा स्थानिक आणि देवी मुस्लिम नावाची परकीय आहे. ती देवीही ओढूनताणून कुठूनतरी अरबस्तानातून आणवली आहे. हे मला पटले नाही. पण माहितीच्या आंतरजालात चौकशी केली असता, म्हणजे गूगल सर्च केला असता, ही लोकमान्यता घोष यांनी कल्पिलेली नसून बंगभूमीत मान्यताप्राप्त आहे असे कळले. पण या देवतेचे नाव हिंदू जनता वेगळ्या प्रकारे घेते, ती दुर्गाच आहे, हा उल्लेख घोष यांनी केलेला नाही. इंटरनेटवरचे अगदी नगण्य इतके संदर्भ सोडता बाकीचे, ती देवता मुस्लिम असल्याचे, संदर्भ हे `द हंग्री टाईड` २००४ साली प्रकाशित झाल्यानंतरचे आहेत, हे विशेष. `वन` ला हिंदीत `बन` म्हणतात. त्या बनचं बंगालीत `बोन` होऊ शकतं आणि `देवी` चा अपभ्रंश होऊन देबी आणि त्यापासून बिबी होऊन वनदेवता म्हणजेच `बोनबीबी` होऊ शकते अशीही कल्पना करता येईल. शेवटी `बीबी` असल्याने ती मुस्लिम देवता आहे ह्यापेक्षा मला ते जास्त पटतं. कथानायिका पिया युरोपात वाढलेली हिंदू आहे. तिला तिचा नावाडी सोबती मुस्लिम आहे असं वाटत असतं. पण त्याचं लग्न कसं झालं असेल याची कल्पना करतांना तिच्या डोळ्यासमोर पेटलेला होम येतो. असो. काल्पनिक कथेत एवढं माफ असतं. लेखकाच्या कल्पनेची आणि संशोधनाची झेप बघता हे मुद्दे बाजूला सारता येतील. मी यापूर्वी ऐतिहासिक कादंबर्‍या सोडता अन्य काल्पनिक कादंबर्‍या फार वाचलेल्या नाहीत. सर्वात अलीकडे रणजीत देसाईंची `बारी` आणि वि. स. खांडेकरांची `रिकामा देव्हारा` वाचली आहे. लेखकाच्या स्वयंप्रतिभेतून आलेल्या या कादंबर्‍यांमद्धे अस्तीत्वात असलेली ठिकाणं, काही ऐतिहासिक प्रसंग, प्रसिद्ध व्यक्तिमत्व आली तरी त्याचे संदर्भ तपासून पहावेप असं वाटत नाही. पण भरपूर अभ्यास, संशोधन करून लिहीलेल्या काल्पनिक कथेतल्या अशा बाबींवर शंकाही येतात आणि त्याचे संदर्भ शोधल्यास सापडू शकतात, असे ढोबळमानाने म्हणता येईल. मेहता पब्लिशिंग हाऊस या अतिशय नावाजलेल्या प्रकाशकांनी हा अनुवाद आणला आहे, हे स्तुत्य आहे. पण का कोण जाणे कादंबरीचं आणि मूळ लेखकाचं नाव ठसठशीत, मधोमध आहे आणि अनुवादकाचं नाव मात्र खाली कोपर्‍यात, अगदी छोट्या अक्षरात आणि मुखपृष्ठाच्या रंगसंगतीत विरून जाईल असं आहे. शिवाय मूळ कादंबरीचं मूल्य ३००च्या आत आणि भाषांतरित कादंबरी ४५०. ह्या `व्यस्त`तेला काही कारणं असतीलच, पण ती व्यस्तता कमी करता आली तर बरं. महाराष्ट्रातून जगभर व्यवसाय करणार्‍या प्रकाशकांनी मराठी माणसाचं नाव मोठं करावं ही अपेक्षा अवास्तव नक्कीच नाही. कादंबरीवाचन हे वाचनातून शेवटी काही तथ्य निघतं का, यासाठी नसतंच. ते असतं त्या व्यक्तिरेखांमध्ये, ठिकाणांमध्ये, प्रसंगांमध्ये, प्रसंगांच्या शृंखलेमध्ये बुडून जाण्यासाठी. त्यातून आपली माहिती, अनुभवविश्व, कल्पनाशक्ति, ज्ञान समृद्ध करण्यासाठी. भाषेचा आनंद घेण्यासाठी. या सगळ्या कसोट्यांवर ही कादंबरी सोळा आणे उतरते. निर्मल या पात्राच्या मनःस्थितीतून सांगायचं तर हल्लीच्या माझ्या `चाकोरीबद्ध जीवनाच्या` चाकोरीतून वाचन हा छंद मला दूर नेतो आणि `फोलपणा`पासून वाचवतो. ही कादंबरी सांगते, `जी व्यक्ति ३० वर्षं एकच काम करते ती भिंतीला आलेल्या बुरशीगत होते.` जणू मी वाचतो ती अशा कादंबर्‍यांमधली अक्षरं माझ्या मनावरची बुरशी पुसून त्याची शाई बनवून लिहिलेली असतात असे म्हणायला हरकत नाही. त्यासाठी कादंबर्‍या आणखी वाचायला हव्यात. सुनीलजींचे अनुवाद तर मी वाचणारच आहे पण अमिताभ घोषही आणखी वाचू शकतो. ...Read more

  • Rating StarSatish Kulkarni

    श्री सुनिल करमरकर यांनी केलेला हंग्री टाईड ( मूळ लेखक श्री. अमिताव घोष) या कादंबरीचा अनुवाद नुकताच वाचनात आला. अप्रतिम अनुवाद. असं म्हणतात अत्तराच्या एका कुपीतून दुसऱ्या कुपीत अत्तर घालताना मध्ये वास उडून जातो. पण सुनिल ने केलेला अनुवाद वाचत असताना आण मराठीतील वेगळी कादंबरी वाचतो आहोत असे जाणवत होते. मराठी भाषेचे सौंदर्य जपून ओघवता अनुवाद त्यांनी वाचकांना दिला आहे. असे अनेक अनुवाद करून जागतिक कीर्तीच्या लेखकांचा परिचय सु नीलजी वाचकाना करून देतील असा विश्वास वाटतो. पुढील लिखाणासाठी खूप खूप शुभेच्छा 👍 ...Read more

  • Rating StarPradeep Karmarkar

    अतिशय सुंदर अनुवाद श्री सुनील करमरकर यांनी केला आहे. भाषा सरळ, सुंदर आणी ओघवती आहे. कोठेही ढोबळ भाषांतर केलेले नाही.त्यामुळे कादंबरीचा दर्जा वाढला आहे.

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KHULBHAR DUDHACHI KAHANI
KHULBHAR DUDHACHI KAHANI by SUNANDA AMRAPURKAR Rating Star
श्रीपाद ब्रह्मे

नुकतंच असंच वेगानं वाचून संपवलेलं दुसरं पुस्तक म्हणजे सुनंदा अमरापूरकर यांचं ‘खुलभर दुधाची कहाणी’. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या त्या पत्नी. अर्थात ही काही त्यांची एकमेव ओळख नव्हे. एक चांगल्या अभिनेत्री, उत्तम अनुवादक म्हणूनही त्या ्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘खुलभर दुधाची कहाणी’ या आत्मचरित्रवजा लेखनातून त्यांच्या जगण्याचा व्यापक पट अतिशय प्रांजळपणे उलगडला आहे. मला हे पुस्तक विशेष भावण्याचं कारण म्हणजे त्यात आलेलं नगरचं वर्णन. मी स्वत: नगरला फार प्रदीर्घ काळ राहिलो नसलो, तरी ते शेवटी माझ्या जिल्ह्याचं गाव. आणि वयाच्या १३ ते २२ अशा महत्त्वाच्या कुमार व तरुण वयातला माझा तिथला रहिवास असल्यानं नगरच्या आठवणी विसरणं शक्य नाही. सुनंदाताई माझ्या आईच्या वयाच्या. त्यामुळं त्यांच्या लहानपणच्या आठवणी जवळपास माझ्या जन्माच्या २०-२५ वर्षं आधीच्या. असं असलं तरी मी त्या वर्णनाशी, त्या काळातल्या नगरशीही रिलेट होऊ शकलो, याचं कारण मुळात गेल्या शतकात बदलांचा वेग अतिशय संथ होता. नगरसारख्या निम्नशहरी भागात तर तो आणखी संथ होता. त्यामुळं एकूण समाजजीवनात १९६० ते १९९० या तीस वर्षांत तपशिलातले फरक सोडले, तर फार मोठा बदल झाला नव्हता. सुनंदाताई माहेरच्या करमरकर. त्यांचं आजोळ‌ सातारा असलं, तरी त्या जन्मापासून नगरमध्येच लहानाच्या मोठ्या झालेल्या. अगदी पक्क्या ‘नगरी’ म्हणाव्यात अशा. ( आजही त्या स्वत:ला अभिमानानं ‘नगरकर’च म्हणवून घेतात.) सुनंदाताईंचे वडील त्या दहा वर्षांच्या असतानाच गेले. त्यांना मामांचा आधार होता, पण आईनंच लहानाचं मोठं केलं. तेव्हाचं त्यांचं निम्न मध्यमवर्गीय जगणं, नगरमधले वाडे, तिथलं समाजजीवन, तिथल्या शाळा, शिक्षक, नगरमधील दुकानं, दवाखाने, तिथल्या गल्ल्या, बाजार हे सगळं सगळं सुनंदाताई अतिशय तपशीलवार उभं करतात. नगरसारख्या मध्यम शहरात वाढलेल्या महाराष्ट्रातील कुठल्याही शहरातील त्या काळातील व्यक्तीला अतिशय सहज रिलेट होईल, असं त्यांचं हे जगणं होतं. त्यात सुनंदाताईंचं लेखन अतिशय सहज, सोपं आणि प्रांजळ असल्यामुळं ते आपल्याला अगदी भिडतं. एका प्रख्यात अभिनेत्याची पत्नी असल्यानं त्यांचं जीवन इतर सर्वसामान्य स्त्रियांपेक्षा वेगळं झालं असेल, अशी आपली अपेक्षा असते. सुनंदाताईंच्या लेखनातून या ‘वेगळ्या जीवना’ची काही तरी झलक मिळेल, अशीही आपली एक भूमिका तयार झालेली असते. सदाशिव अमरापूरकरांसारख्या मनस्वी अभिनेत्याशी लग्न झाल्यानंतर सुनंदाताईंचं जगणं बदललंही; मात्र ते वेगळ्या पद्धतीनं. सदाशिव अमरापूरकर ऊर्फ नगरकरांचा लाडका बंडू त्यांना नगरमध्ये शाळेपासून कसा भेटला, नंतर कॉलेजमध्ये दोघांनी एकाच ग्रुपमधील नाटकं कशी सादर केली, त्यात अगदी नकळतपणे त्यांचं प्रेम कसं जमलं आणि नंतर नगर सोडून त्या पतीच्या कारकिर्दीसाठी मुंबईत कशा आल्या हा सर्व नाट्यमय प्रवास सुनंदाताई अतिशय तन्मयतेनं मांडतात. अमरापूरकर मंडळींच्या घराविषयीचे तपशील त्यात येतात. अमरापूरकरांचे वडील दत्तोपंत हे नगरमधलं मोठं प्रस्थ. श्रीमंत घराणं. मोठा वाडा, नोकरचाकर वगैरे. त्या तुलनेत सुनंदाताईंची माहेरची परिस्थिती जेमतेम म्हणावी अशी. अशा परिस्थितीत हे लग्न झालं आणि त्या अमरापूरकरांची सून झाल्या, इथपर्यंत पुस्तकाचा निम्मा प्रवास (मध्यंतरच) होतो. पुढल्या दोनशे पानांत आपल्याला खऱ्या अर्थानं सदाशिव अमरापूरकर हे काय व्यक्तिमत्त्व होतं, हे उलगडत जातं. अमरापूरकरांनी शेवटपर्यंत त्यांची मध्यमवर्गीय राहणी व मध्यमवर्गीय मूल्यं सोडली नाहीत. ‘अर्धसत्य’सारख्या सिनेमामुळं एका रात्रीतून ते भारतभरात प्रसिद्ध झाले. या एका ओळखीमुळं अमरापूरकरांचं जीवन पूर्ण बदलून गेलं. तोपर्यंत असलेली आर्थिक ओढगस्तीही संपली. हिंदी चित्रपटसृष्टीत अगदी स्वप्नवत अशा रीतीनं ते मोठे स्टार झाले. एकापाठोपाठ एक खलनायकी भूमिका त्यांच्याकडं येऊ लागल्या. पैसा येऊ लागला. अशा परिस्थितीत एक मध्यमवर्गीय कुटुंब या सगळ्या धबधब्याला कसं तोंड देतं आणि आपली मूल्यं कायम जपत राहतं, हे सुनंदाताईंनी फार हृद्यपणे लिहिलं आहे. सुनंदाताईंनी अनेक वर्षं एलआयसीत नोकरी केली. पतीचं अस्थिर क्षेत्र असल्यानं त्यांनी सुरुवातीला नोकरी केलीच; पण नवरा हिंदी चित्रपटसृष्टीत सुपरस्टार व्हिलन झाल्यावरही त्यांनी ही नोकरी सोडली नाही. त्यांच्या तिन्ही मुलींवर त्यांनी उत्तम संस्कार केले. एका सिनेमाच्या प्रीमियरनंतर हे सगळे कुटुंबीय कसे घरी जाऊन पिठलं-भाकरीचं जेवण तयार करून जेवले हे त्यांनी एका प्रसंगात अतिशय खेळकरपणे सांगितलं आहे. अमरापूरकरांचं नाटकवेड, भौतिक सुखांविषयीची काहीशी विरक्त वृत्ती, त्यांचा मित्रांचा गोतावळा, अनेक माणसांचा घरात राबता असा एकूण ‘देशस्थी’ कारभार यावर सुनंदाताई कधी गमतीत, तर कधी काहीसं वैतागून टिप्पणी करतात. अर्थात त्यांचं सदाशिव अमरापूरकरांवर अतिशय प्रेम होतं आणि त्यांनी हे शेवटपर्यंत उत्तम निभावलं. अशा आत्मचरित्रांत अनेकदा ‘आहे मनोहर तरी... गमते उदास’ असा सूर लागण्याचा धोका असतो. सुनंदाताईंच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे, एखादा अपवाद वगळता, त्यांच्या या संपूर्ण पुस्तकात असा रडवा सूर कधीही लागलेला नाही. आपल्याला जे काही मिळालं, ते आपणच निवडलं आहे आणि त्यामुळं त्याविषयी तक्रार करण्याचा आपल्याला काही अधिकार नाही, अशी एक भूमिका त्यांनी घेतलेली दिसते. त्यांच्या या पुस्तकातून विसाव्या शतकातील मध्यमवर्गीय ब्राह्मण घरातील एका तरुणीच्या आशा-आकांक्षांचा, आयुष्यानं दिलेल्या आश्चर्याच्या धक्क्यांचा आणि त्याला सामोरं जाण्यातील धीट दिलदारपणाचा लोभस प्रवास दिसतो. आपली मध्यमवर्गीय मूल्यं जपत, प्रामाणिकपणे व उमेदीनं आयुष्य जगणाऱ्या अनेक महिलांना या पुस्तकात आपल्या जगण्याचं प्रतिबिंब सापडेल. तेच या ‘खुलभर दुधाच्या कहाणी’चं यश आहे. ...Read more

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
प्रभाकर गावंडे, अमरावती

मी विकत घेऊन वाचले आहे हे पुस्तकं, चांगले आहे, नवीन माहिती वाचायला मिळाली.