* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: MEGHDOOT
  • Availability : Available
  • Translators : SHANTA J SHELAKE
  • ISBN : 9788177661392
  • Edition : 10
  • Publishing Year : FEBRUARY 1994
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 136
  • Language : Translated From SANSKRIT to MARATHI
  • Category : POEMS
  • Available in Combos :SHANTA SHELKE COMBO SET - 21 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE ORIGINAL `MEGHDOOT` IS AN EPIC BY THE FAMOUS SANSKRIT POET, `MAHAKAVI KALIDAS`. THE FIGURE OF SPEECH MAINTAINED THROUGHOUT THE EPIC IS `MANDAKRANTA`. EVERY LINE OF THE EPIC IS MEANINGFUL, REVEALING THE MEANING OF NATURE AND MIND, EXPLAINING THE BEAUTY OF NATURE AND MIND.ACTUALLY, EACH AND EVERY PART OF THE EPIC IS STRONG AND BEAUTIFUL ITSELF, BUT THE STRONGEST IS THE WAY HE HAS DESCRIBED THE HERO`S ANGUISH ON SEPARATION FROM HIS WIFE WHO IS ALSO HIS LOVER. BEFORE SHANTABAI SHELKE TOOK THE DIFFICULT TASK OF TRANSLATING THIS EPIC MANY HAD ATTEMPTED TO DO SO. HER STYLE IS SIMPLE, NOWHERE COMPLEX, HER STANZAS HAVE A RHYTHM AND A PARTICULAR FIGURE OF SPEECH IS MAINTAINED THROUGHOUT. WHILE DOING SO, SHE TAKES IMMENSE CARE TO KEEP THE ORIGINAL FORM AS IT IS. HER TRANSLATION IS SO PERFECT THAT AT TIMES WE FORGET THAT WE ARE READING THE MARATHI VERSION OF THE EPIC AND NOT THE ORIGINAL SANSKRIT ONE. THOSE TENDER AND SENSITIVE MINDS WHO ARE FANS OF THE EPIC `MEGHDOOT` WILL SURELY WELCOME THIS TRANSLATION AND THOSE WHO COULD NOT GO THROUGH IT FOR SOME REASON OR OTHER WILL ALSO LOVE THIS NEW `MEGHDOOT`.
आशयाला धक्का न लावता केलेली प्रतिकृती. महाकवि श्रीकालिदास याचे "मेघदूत" ही संस्कृत साहित्यातली एक स्वभावरमणीय अलौकिक कलाकृती आहे. "मन्दाक्रान्ता" सारखे रसोचित वृत्त, प्रत्ययकारी निसर्गवर्णने, वेधक स्थलचित्रणे, विरहाच्या पाश्र्वभूमीवर व्यक्त झालेला उत्कट प्रणयभाव आणि हे सारे समर्थपणे शब्दांकित करणारी कालिदासाची सुश्लिष्ट शैली यांमुळे "मेघदूता"ला अम्लान टवटवीत लावण्य लाभले आहे. मराठीत "मेघदूता"चे अनेक अनुवाद झाले आहेत. आता प्रसिद्ध कवयित्री शान्ता ज. शेळके या आपला अनुवाद रसिकांना सादर करीत आहेत. साधी सरळ निवेदनपद्धती, छंदोबद्ध प्रवाही रचना, मूळ काव्याच्या रसवत्तेला बाध न आणता किंवा आशयाला ढका न लावता केलेली त्याची प्रतिकृती हे शान्ताबाईच्या अनुवादाचे लक्षणीय विशेष आहेत. "मेघदूता"च्या रसलुब्ध प्रेमिकांना तर हा अनुवाद आवडेलच, पण स्वतंत्रपणे वाचणारांनाही तो आस्वाद्य वाटेल.

No Records Found
No Records Found
Keywords
#MEGHDOOT #KALIDAS #SHANTASHELKE #TRANSLATIONINMARATHI
Customer Reviews
  • Rating StarMamatta Mungilwar

    ::मेघदूत:: * * आषाढास्य प्रथम दिवसे ** आषाढास्य प्रथम दिवसे,अशी सुरुवातच महाकवी कालिदास लिखित "मेघदूत " ह्या काव्याची. भारतीय मनाला नेहमीच भुरळ घालणार काव्य. महाकवी कालिदास यांचे मेघदूत हेसंस्कृत साहित्यातील एक अलौकिक कलाकृती आहे. मंदाक्रांता सारखे वृत्त , वेधक स्थळचित्र आणि पार्श्वभूमीवर व्यक्त झालेल्या उत्कट प्रणय भाव आणि हे सारे समर्थपणे शब्दांकित करणारे कालिदासाची शैली ....... प्रसिद्ध कवयित्री शांता शेळके यांनी आपल्या सिद्धहस्त लेखणीने ,,सरळ निवेदन पद्धतीने , मूळ काव्याचा रस व आशय वाचका पर्यंत पोहचवला आहे. || कुबेर सेवक यक्ष एक कुणी सेवे माझी आपल्या चुकला प्रिया वियोगे अधिकच दुस:ह वर्षाचा त्या शाप मिळाला जनक सुतेच्या स्नाना योगे पावन झाले जिथे जलाशय घनच्छाय त्या रामगिरीवर विविध आश्रमी घेई आश्रय|| एका यक्षाला त्याच्या कर्तव्यचुकीमुळे यक्षराज कुबेर ,एक वर्षाची हदपारीचा शाप ( शिक्षा )देतो. ते पण अलका नगरी पासून लांब अशा रामगिरी पर्वतावर राहण्याची. विरहात तळमळणारा हा यक्ष आकाशातल्या मेघाला पाहतो आणि दूत बनवून आपल्या पत्नीला निरोप पाठवतो. रामगिरी पासून ते अलकानगरी पर्यंत जाताना लागणारे, अवंती देश, विदिशा नगरी, ब्रह्मवर्त, कुरुक्षेत्र, गंगोत्री, दिमधवल पर्वत, त्यातील लागणारी नगरे आणि निसर्ग ह्याचे वर्णन तो मेघाला विस्तृत पणे सांगतो. ही झाली मेघदूतातली काव्यकल्पना. कालिदासाच्या प्रतिभा संपन्नतेला प्रणाम🙏 आणि शांता बाईच्या अनुवादाला सुद्धा प्रणाम. "पादा कुलाक" वृतांत अतिशय प्रवाहिपणे आपल्या डोळ्यासमोर चित्र कृती उभी राहते. Mamata`s विचार:: ढगातून निरोप देण्यावरून----- आज कालची पिढी म्हणे, आपले पर्सनल msg , डेटा, cloud मध्ये save करतात. हे पण प्रतिभावंत कालिदासाच्या प्रतिभेचं सत्य रूप का?? असंख्य प्रश्न?? ©️®️....... ममता मुनगीलवार ...Read more

  • Rating StarANK - FEB 2000

    महाकवी कालिदासाच्या सदाबहार मेघदूताचा रम्यमनोहर अनुवाद महाकवी कालिदास याच्या मेघदूत या खंडकाव्याला भारतीय साहित्यात एक विशेष स्थान आहे. आपल्या प्रियेपासून वर्षभरासाठी दूर जावे लागलेला कुबेर सेवक यक्ष तिला मेघदूतामार्फत संदेश पाठवत आहे अशी रोमँटिक कलपना या काव्याच्या केंद्रस्थानी आहे. रामगिरीच्या आश्रमातून आषाढाच्या पहिल्या दिवशी गिरिशिखरावर दिसलेला मेघाला तो आवाहन करतो, आणि आपल्या प्रियेला निरोप देण्यासाठी गळ घालतो. प्रियेकडे कोणत्या मार्गाने जावे, जाताना वाटेत काय काय दृष्टीस पडेल याचेही वर्णन करतो आणि कैलास पर्वताजवळच्या अलकापुरीत पोचल्यावर प्रियेला आपली खूण पटवून काय संदेश द्यावा याचेही विवरण करतो. मंदाक्रांता वृत्तातील १२० चतुष्पदींचे हे छोटेखानी काव्य प्रत्ययकारी निसर्गवर्णने, वेधक स्थलचित्रणे आणि विरहार्त प्रणयभावना यांचा त्रिवेणी संगम साधते. आतील स्थलचित्रणांची वास्तवता आजही रसिकांना मुग्ध करते. विमानातून मेघदूताच्या मार्गाने प्रवास केला तर कालिदासाने केलेल्या स्थलवर्णनांची अचूकता लक्षात येते. मेघदूताचे मराठीत भाषांतर, अनुवाद करणे हे आपल्या काव्यप्रतिभेला आव्हान आहे असे प्रत्येक संस्कृतच्या जाणकार कवीला वाटले. त्यामुळे मराठीत मेघदूताचे वीसबावीस अनुवाद उपलब्ध आहेत. कविवर्य कुसुमाग्रज, वसंत बापट, माधव जूलियन, बा. भ. बोरकर यांच्यासारख्या ज्येष्ठ कवींनीही मेघदूतला मराठी रूप दिले आहे. सी. डी. देशमुख, ‘सुश्लोक’ श्रीखंडे प्रभृती संस्कृत पंडितांनीही ‘मेघदूत’च्या निमित्तने आपल्या काव्यरचनेचा कस अजमावून पाहिला आहे. इ. स. १९९४ मध्ये शांता शेळके यांनी एके दिवशी सहजपणे मेघदूतातील काही आवडत्या श्लोकांचे मराठीकरण सुरू केले आणि संपूर्ण मेघदूताचा अनुवाद केल्यावरच त्या थांबल्या. झपाटल्यासारखे त्यांना जणू झाले होते. कॉलेजमध्ये अभ्यासलेल्या मेघदूतातील अनेक श्लोक मनात घोळवत राहण्याचा त्यांचा छंद. त्याची परिणती अशी अनुवादात सत्तरीच्या घरात आल्यावर झाली. शांताबाई प्रारंभीच्या निवेदनात म्हणतात, ‘‘मराठीतील अनेक कवींना, लेखकांना असा अनुवाद करून बघावा असे वाटले. हे सारे वाचन मी एका अनावर ओढीने, प्रेमाने करीत राहिले. त्यामुळे माझी मेघदूताची जाण कितपत सूक्ष्म वा प्रगल्भ झाली ते मला सांगता येणार नाही, पण मेघदूताचे आकर्षण अधिकाधिक वाढत गेले हे मात्र खरे... अशाच एका भारलेल्या मनाच्या अवस्थेत अगदी सहज, निर्हेतुक वृत्तीने मेघदूतातील काही आवडत्या श्लोकांचा मी अनुवाद केला... अनुवाद करून बघणे हा मूळ कलाकृत्तीचा अधिक उत्कटपणे रसास्वाद घेण्याचा एक सुंदर मार्ग आहे... माझा अनुवाद सरळ, साधा, पादाकुलकासारखा प्रवाही छंदात केलेला आहे. तो करताना मुळातील आशयाला, रसवत्तेला हानी पोचू नये याची मी शक्य तेवढी काळजी घेतली आहे. मुख्य म्हणजे माझ्या पदरचे त्यात काहीही, कुठेही घालण्याचे धाष्टर्य मी केले नाही.’’ शांताबार्इंच्या मेघदूताला आपला अंतरिक्षातून काढतानाही फारसे अवघड गेलेले नाही. जेट विमान देखील ढगांच्या गर्दीतून मार्ग काढताना कधी कधी वादळी हेलकावे घेते. तेव्हा कवितेच्या चरणांनीही थोडेफार गचके वाचकांना बसले तर त्यात काही विशेष मानण्याचे कारण नाही. आषाढाच्या पहिल्या दिवशी बघ तो शिखरी मेघ वांकला टक्कर देण्या तर भिंतीवर क्रीडातुर गज जणू ठाकला ! ।।२।। (आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाश्लिष्टानुं वप्रक्रीडा परिणतगज प्रेक्षणीयं ददर्श) जन्मलास तू, घना, जाणतो, प्रथित पुष्करावर्तक वंशी इंद्राचा तू प्रधान सेवक, रूप हवे ते धारण करिशी म्हणून याचना तुझीच करतो वियुक्त जन मी प्रियेपासुनी क्षुद्रांच्या उपकारापेक्षा विफलही बरवी सुजन विनवणी ।।६।। जिवा तापल्या तूच निवविसी म्हणुनि याचितो मेघा तुजला धनपतिशापे विरहतापल्या निरोप माझा पोचव सखिला यक्षांची प्रिय अलकानगरी तिथेच आहे तुजला जाणे शिवमस्तकिंच्या चंद्रकलेचे जिथे पुâलतसे नित्य चांदणे ।।७।। अनिर्वेध तू जाता ऐसा, घना, पाहशील अपुली वहिनी एकएक दिन मोजुनियां ती काळ कंठिता असेल शिणली ललनाहृदये विगलित होती फुलांपरी ती कोमल जात्या आशा तंतू चिवट परंतु वियोगकाली सावरितो त्या ।।९।। असा हा यक्ष मेघदूताला आपल्या ‘भाभीच्या’ भेटीला निरोप देऊन पाठवत आहे; त्यामुळे वाचकांनाही त्याच्या विषयी आत्मीयता वाटणे स्वाभाविक ठरेल. अधूनमधून मूळ संस्कृत शब्द कमी जास्त फरकाने तसेच येतात. भ्रमरपंक्तिसम कटाक्ष तिरपे टाकतील तुजवरी कामिनी (नामोक्ष्यन्ते त्वयि मधुकरश्रेणिदीर्घान्कटाक्षान), मेघचन्द्रस्वर गंभीर गर्जित (मामन्द्राणां गर्जितानाम्) वामअंक मुकलासे जो आता माझ्या नखक्षतांना (वामाश्चाया: कररूहपदैमुच्यमानो मदियै मुक्ताजालं) अंगराग मिसळले जयातुन जलकेलीस्तव येता युवती अशा संस्कृत - मराठी मिश्रित ओळी या अनुवादात भरपूर दिसतात. स्वरामध्ये स्वर मिसळुन जाया सज्ज सदाही असती किन्नर रात्र घालवी तिथे, प्रियाही असेल शिणली तव लखलखुनी, सूय उगवता पुन्हा पहाटे प्रवास आपुला सुरू करी तू... गारांचा वर्षाव करूनिया दाणादाण करी तू त्यांची भलते साहस करू बघते जे, गत त्यांची तर हीच व्हायची ! ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RAZOR SHARP
RAZOR SHARP by ASHWIN SANGHI Rating Star
सुनील माने, पुणे

लेखक अश्विन सांघी “द रोझाबल लाइन” या पहिल्याच कादंबरीने खूप लोकप्रिय झाला. प्राचीन भारतीय दंतकथा/ऐतिहासिक संदर्भ घेऊन त्याच्याभोवती आजच्या काळात रहस्यपूर्ण कथा लिहिणारा अश्विन. Chanakya’s Chant, The Krishna Key, The Sialkot Saga, Keepers of the Kalacakra, The Vault of Vishnu, The Magicians of Mazda अशा एकापेक्षा एक सुंदर रहस्य कादंबर्या “भारत सिरीज़” नावाने खूप प्रसिद्ध झाल्या. या सर्व कादंबऱ्या मी इंग्लिश मधेच वाचल्या. यांचा मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाउस यांच्याकडे उपलब्ध आहे. अश्विन सांघीने या भारत सिरीज शिवाय एक नवीन थ्रिल्लर सिरीज (कुत्ता कदम) सुरू केली आहे. त्यांतील पहिली कादंबरी Razor Sharp. एक सिरियल किलर मुंबईत एकानंतर एक खून पाडतोय. पोलिस चक्रावले आहेत. 1. रविवार दि २ फेब्रुवारी , गोरेगाव पश्चिममधे रवि मेहराचा खून होतो. त्याची बायको खुशी कॅाल सेंटरचा जॅाब करून रात्री ११.३० ला परत येते. खूप वेळा बेल वाजवून दार न उघडल्यामुळे ती उघडून आत येते तर रवि रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेला असतो. त्याचे हात पाठीमागे नायलॅान दोरीने बांधलेले असतात. त्याच्या छातीत सुरा खुपसलेला असतो. त्याच्या तोंडात काहीतरी खाद्य पदार्थ असतो. 2. सोमवार दि १० फेब्रुवारी , लोअर परळमधे सुचंद्रा अग्रवालचा खून. तिची कामवाली आल्यावर दार न उघडल्यामुळे सोसायटीवाले दार तोडतात. आत सुचंद्राचा खून झालेला. हात नायलॅान दोरीने मागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात काहीतरी खाद्यपदार्थ. पोलिस चक्रावलेले. मग पोलिसखाते जागे होते. त्यांचा नावाजलेला अधिकारी जो सस्पेंड झालेला आहे, त्या प्रकाश कदम, DCP याला बोलावले जाते. राज्याचे गृहमंत्री ओंकार लोखंडे, त्यांचा माणूस कमिशनर चव्हाण आणि उपगृहमंत्री जयंत गायकवाड व त्यांचा माणूस SCP राणे, मुंबईचा डॅान भाऊ पाटील जो लोखंडेचाच माणूस असतो, हे सर्व या केसच्या मागावर लागतात. कदम हा राणेंच्या ओळखीचा खास ऑफिसर असतो म्हणून त्यालाही इन्व्हेस्टीगेशनला बोलावले जाते. 3. मंगळवार दि १८ फेब्रुवारी , ठाणे येथे मंगला शहाचा खून. तिच्या शेजारणीमुळे हे कळते. मंगलाचे हात नायलॅान दोरीने पाठीमागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात खाद्यपदार्थ. पोलिस अधिकारी शिंदे कदमबरोबर येतात. मंगलाच्या चेहऱ्याजवळ कदमला पेस्टिसाईडचा वास येतो. चेहरा निळसर झालेला. खून झाल्यावर बॅाडीला हलवलेले दिसते. तो ऑफिसमध्ये जुन्या खूनांचे फोटो तपासतो. त्यांचीही बॅाडी खून केल्यावर हलवलेली दिसते. चेहऱ्यावर निळसर झाक दिसते. तिन्ही खून “फिनेक” ब्रॅंडच्या चाकूने केलेले असतात. हे समान धागे कदम त्याची मुलगी केतुल बरोबर चर्चा करतो. केतुलची आई काही वर्षांपूर्वी कदमला सोडून गेलेली असते. ती भाऊ पाटीलची सावत्र बहीण असते. पण सध्या ती कुठे आहे व काय करते हे माहित नसते. केतुल कोर्टात काम करत असते तसेच ती “शक्ती” या NGO मधेही काम करते. शक्ती हे सोनापूरमधुन सुटका केलेल्या वेश्यांचे पुनर्वसन करत असते. निर्मल नावाचा तिचा मित्र एथिकल हॅकर असतो. तिच्यावर प्रेम करत असतो. कदमला हार्ट अटॅक येऊन गेलेला व स्टेंट बसवलेला असतो. Depression मुळे त्याची सायकॅालॅाजिस्टकडे ट्रिटमेंट चालू असते. कदमला या तिन्ही केसमधे आणखी एक धागा सापडतो. हे खून आठ दिवसांच्या अंतरावर झालेले असतात. म्हणजे पुढचा खून बुधवारी होणार असल्याचे तो राणे व शिंदेला सांगतो. 4. बुधवार दि २६ फेब्रुवारी, कांदिवली पश्चिम, लक्ष्मी बुधीराजाचा खून. तोच पॅटर्न. 5. गुरुवार दि ५ मार्च, खार पश्चिम, गुरुराज अदवानीचा खून सेम पॅटर्न. गुरूराज हा युट्युबवरचा प्रसिद्ध सिंगर असतो. 6. शुक्रवार दि १३ मार्च, ताडदेव, दिव्या शुक्रपाणीवर खूनी हल्ला होतो. पण ती जबर जखमी होते. ती फिटनेस ट्रेनर असल्यामुळे खुन्याबरोबर झटापट करते. पण चाकू पोटात घुसल्यामुळे ती जबर जखमी होते. हात बांधलेले असतानाही ती फोनवर “सिरी” ला तिच्या भावाला, ध्रुवला फोन लावायला सांगते. फोन लागतो व ती “हेल्प हेल्प” एव्हढेच बोलून बेशुद्ध होते. म्हणून खुनी पळून जातो. ध्रुव तिथे पोहोचून तिला हॅास्पिटलमधे ॲडमिट करतो. पोलिसांना तिथे खुन्याची बॅग सापडते. त्यांत नायलॅानची दोरी, बेगॅान स्प्रे व राजमाच्या बिया सापडतात. तिसऱ्या खुनाआधी पोलिस संशयित म्हणून राजू दाभाडेला अटक करतात. पण चौथ्या खूनाच्या वेळेस तो कस्टडीतच असतो. मग खूनी कोण? 7. शनिवार दि २१ मार्च, बान्द्रा पश्चिम, शनिया डिसौजाचा खून होतो. सेम मोडस ऑपरेंडी . 8. शनिवार दि २८ मार्च, चेंबूर, ७१ वर्षांच्या राहुल सिंह नावाच्या सिख व्यक्तिचा खून होतो. तीच पध्दत. यानंतर एक दिवस कदम KBC बघत असताना अमिताभ बच्चन एका सिनेमाचं गाणं लावून त्याचा पिक्चर ओळखायला सांगतात. ते गाणं असते- “सोमवार को हम मिले मंगलवार को नयन बुध को मेरी निंद खुली जुम्मेरात को चैन अरे शुक्र शनी कटे मुश्किलसे आज है इतवार सात दिनों में हो गया जैसे सात जनम का प्यार” आणि कदमच्या डोक्यात एकदम प्रकाश पडतो… अरे, हे सर्व खून असेच रविवार ते शनिवार एक एका वारी घडलेत! पण शनिवारी दोन खून कसे? याच्या मागे काही खगोलशास्त्र किंवा भविष्याचा तर संबंध नाही? कदमला आठवतं की शेजारी राहणारा डॉ. देसाईला पण भविष्य-खगोलशास्त्राची आवड व माहिती आहे. ( डॅाक्टर कडे सापडलेल्या नायलॅानचे रंगीत दोर व फिनेक कंपनीचा चाकू यामुळे एक संशयित म्हणून कदमने त्याला अटक करून पुछताछ केलेली असते) कदम लगेच डॅाक्टरांकडे जातो. त्यांची माफी मागून त्यांना या प्रश्नांत मदत करायला सांगतो. तो या सर्व खुनांचा सिक्वेन्स सांगतो. ते प्रत्येक वारी का घडले? मग शनिवारी दोन का? यापुढे कोणता वार? कुणाचा खून? डॅाक्टर सांगतात की भारतीय भविष्य व खगोल शास्त्रात नवग्रहांना खूप महत्व आहे. रवि, सोम(चंद्र), मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि, राहू आणि केतु. यांचे रंग व धान्य वेगवेगळे असतात. त्या त्या ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी ते वापरले जातात. कदम ही माहिती लिहून घेतो. त्यावरून प्रत्येक खुनात वापरण्यात आलेले फिनेक कंपनीचे चाकू, वेगवेगळ्या रंगांचे नायलॅान दोर व तोंडातील पदार्थ यांचा संबंध जोडून एक तख्ता तयार करतोः- “रवि मेहरा-रविवार-सोनेरी दोर- तोंडात गहू-दिशा पूर्व सुचंद्रा-सोमवार-चंदेरी दोर-तोंडात तांदूळ-दिशा पश्चिम मंगला शाह-मंगळवार-लाल दोर-तोंडात तूर डाळ- दिशा दक्षिण लक्ष्मी बुधीराजा-बुधवार-हिरवा दोर-तोंडात हिरवे मूग-दिशा उत्तर गुरुराज अदवानी-गुरूवार-पिवळा दोर-तोंडात हरबरा डाळ-दिशा उत्तर पूर्व(ईशान्य) दिव्या शुक्रपाणी-शुक्रवार-पांढरा दोर-राजमा-दिशा दक्षिण पूर्व शनिया डिसौजा-शनिवार-काळा दोर-तोंडात काळे तिळ-दिशा उत्तर पश्चिम राहुल सिंग-शनिवार-निळा दोर-तोंडात उडीद दाळ-दिशा दक्षिण पश्चिम” आता उरला एकच ग्रह-केतु. केतुचा वार मंगळवार. ग्रे रंग, चना दाळ, दिशा दक्षिण पश्चिम. “केतु”म्हणजे कदमची मुलगी केतुलचा नंबर लागणार? आज तर मंगळवारच आहे! कदम घाबरून जातो! तो केतुलला फोन करतो पण तो बंद लागतो. ती सध्या कुठे आहे? कोर्टात? कदम आपल्या मुलीला वाचवतो का? खरा खुनी कोण असतो? तो पकडला जातो का? त्याचे यामागचा उद्देश काय असतो? याच्यामध्ये अजून कोण सामिल असतं का? याची उत्तरे मिळण्यासाठी वाचावी लागेल अश्विन सांघी यांची कादंबरी Razor Sharp. ...Read more

BANGARWADI
BANGARWADI by VYANKATESH MADGULKAR Rating Star
Sameer Kazi

सुंदर अशी कादंबरी माणदेशी बनगरवाडी तशी कोरडी रखरखती पण, यातील पात्रात मायेचा करुणेचाओलावा मनात घर करुन जातो