* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: MEGHDOOT
  • Availability : Available
  • Translators : SHANTA J SHELAKE
  • ISBN : 9788177661392
  • Edition : 10
  • Publishing Year : FEBRUARY 1994
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 136
  • Language : Translated From SANSKRIT to MARATHI
  • Category : POEMS
  • Available in Combos :SHANTA SHELKE COMBO SET - 21 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE ORIGINAL `MEGHDOOT` IS AN EPIC BY THE FAMOUS SANSKRIT POET, `MAHAKAVI KALIDAS`. THE FIGURE OF SPEECH MAINTAINED THROUGHOUT THE EPIC IS `MANDAKRANTA`. EVERY LINE OF THE EPIC IS MEANINGFUL, REVEALING THE MEANING OF NATURE AND MIND, EXPLAINING THE BEAUTY OF NATURE AND MIND.ACTUALLY, EACH AND EVERY PART OF THE EPIC IS STRONG AND BEAUTIFUL ITSELF, BUT THE STRONGEST IS THE WAY HE HAS DESCRIBED THE HERO`S ANGUISH ON SEPARATION FROM HIS WIFE WHO IS ALSO HIS LOVER. BEFORE SHANTABAI SHELKE TOOK THE DIFFICULT TASK OF TRANSLATING THIS EPIC MANY HAD ATTEMPTED TO DO SO. HER STYLE IS SIMPLE, NOWHERE COMPLEX, HER STANZAS HAVE A RHYTHM AND A PARTICULAR FIGURE OF SPEECH IS MAINTAINED THROUGHOUT. WHILE DOING SO, SHE TAKES IMMENSE CARE TO KEEP THE ORIGINAL FORM AS IT IS. HER TRANSLATION IS SO PERFECT THAT AT TIMES WE FORGET THAT WE ARE READING THE MARATHI VERSION OF THE EPIC AND NOT THE ORIGINAL SANSKRIT ONE. THOSE TENDER AND SENSITIVE MINDS WHO ARE FANS OF THE EPIC `MEGHDOOT` WILL SURELY WELCOME THIS TRANSLATION AND THOSE WHO COULD NOT GO THROUGH IT FOR SOME REASON OR OTHER WILL ALSO LOVE THIS NEW `MEGHDOOT`.
आशयाला धक्का न लावता केलेली प्रतिकृती. महाकवि श्रीकालिदास याचे "मेघदूत" ही संस्कृत साहित्यातली एक स्वभावरमणीय अलौकिक कलाकृती आहे. "मन्दाक्रान्ता" सारखे रसोचित वृत्त, प्रत्ययकारी निसर्गवर्णने, वेधक स्थलचित्रणे, विरहाच्या पाश्र्वभूमीवर व्यक्त झालेला उत्कट प्रणयभाव आणि हे सारे समर्थपणे शब्दांकित करणारी कालिदासाची सुश्लिष्ट शैली यांमुळे "मेघदूता"ला अम्लान टवटवीत लावण्य लाभले आहे. मराठीत "मेघदूता"चे अनेक अनुवाद झाले आहेत. आता प्रसिद्ध कवयित्री शान्ता ज. शेळके या आपला अनुवाद रसिकांना सादर करीत आहेत. साधी सरळ निवेदनपद्धती, छंदोबद्ध प्रवाही रचना, मूळ काव्याच्या रसवत्तेला बाध न आणता किंवा आशयाला ढका न लावता केलेली त्याची प्रतिकृती हे शान्ताबाईच्या अनुवादाचे लक्षणीय विशेष आहेत. "मेघदूता"च्या रसलुब्ध प्रेमिकांना तर हा अनुवाद आवडेलच, पण स्वतंत्रपणे वाचणारांनाही तो आस्वाद्य वाटेल.

No Records Found
No Records Found
Keywords
#MEGHDOOT #KALIDAS #SHANTASHELKE #TRANSLATIONINMARATHI
Customer Reviews
  • Rating StarMamatta Mungilwar

    ::मेघदूत:: * * आषाढास्य प्रथम दिवसे ** आषाढास्य प्रथम दिवसे,अशी सुरुवातच महाकवी कालिदास लिखित "मेघदूत " ह्या काव्याची. भारतीय मनाला नेहमीच भुरळ घालणार काव्य. महाकवी कालिदास यांचे मेघदूत हेसंस्कृत साहित्यातील एक अलौकिक कलाकृती आहे. मंदाक्रांता सारखे वृत्त , वेधक स्थळचित्र आणि पार्श्वभूमीवर व्यक्त झालेल्या उत्कट प्रणय भाव आणि हे सारे समर्थपणे शब्दांकित करणारे कालिदासाची शैली ....... प्रसिद्ध कवयित्री शांता शेळके यांनी आपल्या सिद्धहस्त लेखणीने ,,सरळ निवेदन पद्धतीने , मूळ काव्याचा रस व आशय वाचका पर्यंत पोहचवला आहे. || कुबेर सेवक यक्ष एक कुणी सेवे माझी आपल्या चुकला प्रिया वियोगे अधिकच दुस:ह वर्षाचा त्या शाप मिळाला जनक सुतेच्या स्नाना योगे पावन झाले जिथे जलाशय घनच्छाय त्या रामगिरीवर विविध आश्रमी घेई आश्रय|| एका यक्षाला त्याच्या कर्तव्यचुकीमुळे यक्षराज कुबेर ,एक वर्षाची हदपारीचा शाप ( शिक्षा )देतो. ते पण अलका नगरी पासून लांब अशा रामगिरी पर्वतावर राहण्याची. विरहात तळमळणारा हा यक्ष आकाशातल्या मेघाला पाहतो आणि दूत बनवून आपल्या पत्नीला निरोप पाठवतो. रामगिरी पासून ते अलकानगरी पर्यंत जाताना लागणारे, अवंती देश, विदिशा नगरी, ब्रह्मवर्त, कुरुक्षेत्र, गंगोत्री, दिमधवल पर्वत, त्यातील लागणारी नगरे आणि निसर्ग ह्याचे वर्णन तो मेघाला विस्तृत पणे सांगतो. ही झाली मेघदूतातली काव्यकल्पना. कालिदासाच्या प्रतिभा संपन्नतेला प्रणाम🙏 आणि शांता बाईच्या अनुवादाला सुद्धा प्रणाम. "पादा कुलाक" वृतांत अतिशय प्रवाहिपणे आपल्या डोळ्यासमोर चित्र कृती उभी राहते. Mamata`s विचार:: ढगातून निरोप देण्यावरून----- आज कालची पिढी म्हणे, आपले पर्सनल msg , डेटा, cloud मध्ये save करतात. हे पण प्रतिभावंत कालिदासाच्या प्रतिभेचं सत्य रूप का?? असंख्य प्रश्न?? ©️®️....... ममता मुनगीलवार ...Read more

  • Rating StarANK - FEB 2000

    महाकवी कालिदासाच्या सदाबहार मेघदूताचा रम्यमनोहर अनुवाद महाकवी कालिदास याच्या मेघदूत या खंडकाव्याला भारतीय साहित्यात एक विशेष स्थान आहे. आपल्या प्रियेपासून वर्षभरासाठी दूर जावे लागलेला कुबेर सेवक यक्ष तिला मेघदूतामार्फत संदेश पाठवत आहे अशी रोमँटिक कलपना या काव्याच्या केंद्रस्थानी आहे. रामगिरीच्या आश्रमातून आषाढाच्या पहिल्या दिवशी गिरिशिखरावर दिसलेला मेघाला तो आवाहन करतो, आणि आपल्या प्रियेला निरोप देण्यासाठी गळ घालतो. प्रियेकडे कोणत्या मार्गाने जावे, जाताना वाटेत काय काय दृष्टीस पडेल याचेही वर्णन करतो आणि कैलास पर्वताजवळच्या अलकापुरीत पोचल्यावर प्रियेला आपली खूण पटवून काय संदेश द्यावा याचेही विवरण करतो. मंदाक्रांता वृत्तातील १२० चतुष्पदींचे हे छोटेखानी काव्य प्रत्ययकारी निसर्गवर्णने, वेधक स्थलचित्रणे आणि विरहार्त प्रणयभावना यांचा त्रिवेणी संगम साधते. आतील स्थलचित्रणांची वास्तवता आजही रसिकांना मुग्ध करते. विमानातून मेघदूताच्या मार्गाने प्रवास केला तर कालिदासाने केलेल्या स्थलवर्णनांची अचूकता लक्षात येते. मेघदूताचे मराठीत भाषांतर, अनुवाद करणे हे आपल्या काव्यप्रतिभेला आव्हान आहे असे प्रत्येक संस्कृतच्या जाणकार कवीला वाटले. त्यामुळे मराठीत मेघदूताचे वीसबावीस अनुवाद उपलब्ध आहेत. कविवर्य कुसुमाग्रज, वसंत बापट, माधव जूलियन, बा. भ. बोरकर यांच्यासारख्या ज्येष्ठ कवींनीही मेघदूतला मराठी रूप दिले आहे. सी. डी. देशमुख, ‘सुश्लोक’ श्रीखंडे प्रभृती संस्कृत पंडितांनीही ‘मेघदूत’च्या निमित्तने आपल्या काव्यरचनेचा कस अजमावून पाहिला आहे. इ. स. १९९४ मध्ये शांता शेळके यांनी एके दिवशी सहजपणे मेघदूतातील काही आवडत्या श्लोकांचे मराठीकरण सुरू केले आणि संपूर्ण मेघदूताचा अनुवाद केल्यावरच त्या थांबल्या. झपाटल्यासारखे त्यांना जणू झाले होते. कॉलेजमध्ये अभ्यासलेल्या मेघदूतातील अनेक श्लोक मनात घोळवत राहण्याचा त्यांचा छंद. त्याची परिणती अशी अनुवादात सत्तरीच्या घरात आल्यावर झाली. शांताबाई प्रारंभीच्या निवेदनात म्हणतात, ‘‘मराठीतील अनेक कवींना, लेखकांना असा अनुवाद करून बघावा असे वाटले. हे सारे वाचन मी एका अनावर ओढीने, प्रेमाने करीत राहिले. त्यामुळे माझी मेघदूताची जाण कितपत सूक्ष्म वा प्रगल्भ झाली ते मला सांगता येणार नाही, पण मेघदूताचे आकर्षण अधिकाधिक वाढत गेले हे मात्र खरे... अशाच एका भारलेल्या मनाच्या अवस्थेत अगदी सहज, निर्हेतुक वृत्तीने मेघदूतातील काही आवडत्या श्लोकांचा मी अनुवाद केला... अनुवाद करून बघणे हा मूळ कलाकृत्तीचा अधिक उत्कटपणे रसास्वाद घेण्याचा एक सुंदर मार्ग आहे... माझा अनुवाद सरळ, साधा, पादाकुलकासारखा प्रवाही छंदात केलेला आहे. तो करताना मुळातील आशयाला, रसवत्तेला हानी पोचू नये याची मी शक्य तेवढी काळजी घेतली आहे. मुख्य म्हणजे माझ्या पदरचे त्यात काहीही, कुठेही घालण्याचे धाष्टर्य मी केले नाही.’’ शांताबार्इंच्या मेघदूताला आपला अंतरिक्षातून काढतानाही फारसे अवघड गेलेले नाही. जेट विमान देखील ढगांच्या गर्दीतून मार्ग काढताना कधी कधी वादळी हेलकावे घेते. तेव्हा कवितेच्या चरणांनीही थोडेफार गचके वाचकांना बसले तर त्यात काही विशेष मानण्याचे कारण नाही. आषाढाच्या पहिल्या दिवशी बघ तो शिखरी मेघ वांकला टक्कर देण्या तर भिंतीवर क्रीडातुर गज जणू ठाकला ! ।।२।। (आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाश्लिष्टानुं वप्रक्रीडा परिणतगज प्रेक्षणीयं ददर्श) जन्मलास तू, घना, जाणतो, प्रथित पुष्करावर्तक वंशी इंद्राचा तू प्रधान सेवक, रूप हवे ते धारण करिशी म्हणून याचना तुझीच करतो वियुक्त जन मी प्रियेपासुनी क्षुद्रांच्या उपकारापेक्षा विफलही बरवी सुजन विनवणी ।।६।। जिवा तापल्या तूच निवविसी म्हणुनि याचितो मेघा तुजला धनपतिशापे विरहतापल्या निरोप माझा पोचव सखिला यक्षांची प्रिय अलकानगरी तिथेच आहे तुजला जाणे शिवमस्तकिंच्या चंद्रकलेचे जिथे पुâलतसे नित्य चांदणे ।।७।। अनिर्वेध तू जाता ऐसा, घना, पाहशील अपुली वहिनी एकएक दिन मोजुनियां ती काळ कंठिता असेल शिणली ललनाहृदये विगलित होती फुलांपरी ती कोमल जात्या आशा तंतू चिवट परंतु वियोगकाली सावरितो त्या ।।९।। असा हा यक्ष मेघदूताला आपल्या ‘भाभीच्या’ भेटीला निरोप देऊन पाठवत आहे; त्यामुळे वाचकांनाही त्याच्या विषयी आत्मीयता वाटणे स्वाभाविक ठरेल. अधूनमधून मूळ संस्कृत शब्द कमी जास्त फरकाने तसेच येतात. भ्रमरपंक्तिसम कटाक्ष तिरपे टाकतील तुजवरी कामिनी (नामोक्ष्यन्ते त्वयि मधुकरश्रेणिदीर्घान्कटाक्षान), मेघचन्द्रस्वर गंभीर गर्जित (मामन्द्राणां गर्जितानाम्) वामअंक मुकलासे जो आता माझ्या नखक्षतांना (वामाश्चाया: कररूहपदैमुच्यमानो मदियै मुक्ताजालं) अंगराग मिसळले जयातुन जलकेलीस्तव येता युवती अशा संस्कृत - मराठी मिश्रित ओळी या अनुवादात भरपूर दिसतात. स्वरामध्ये स्वर मिसळुन जाया सज्ज सदाही असती किन्नर रात्र घालवी तिथे, प्रियाही असेल शिणली तव लखलखुनी, सूय उगवता पुन्हा पहाटे प्रवास आपुला सुरू करी तू... गारांचा वर्षाव करूनिया दाणादाण करी तू त्यांची भलते साहस करू बघते जे, गत त्यांची तर हीच व्हायची ! ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more