* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789386745873
  • Edition : 1
  • Publishing Year : AUGUST 2017
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 112
  • Language : MARATHI
  • Category : POEMS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
READING YOJANA’S POETRY ONE CAN FATHOM THE DEPTH OF HER WRITING WHICH HAS DEEP ROOTS IN HER STRONG BELIEF IN WOMEN LIBERATION WHICH SHE HAS BREATHED AS AN INDIVIDUAL AND AS A WRITER. AN INDIVIDUAL’S JOURNEY TOWARDS FREEDOM AND LIBERATION BREAKING CHAINS OF MORES AND VALUES IMBIBED ON MINDS OF MASSES CANNOT CORRESPOND WITH THE CHANGE THAT OCCURS AT SNAIL’S PACE IN A SOCIETY. THE RESULT IS OBVIOUS CONFLICT AND TUG-OF-WAR BETWEEN THE ENLIGHTENED AND EMPOWERED INDIVIDUAL AND THE SOCIETY THAT PREFERS STAGNANCY. THE REVERBERATIONS AND CONNOTATIONS OF THIS SKIRMISH REFLECT IN SENSITIVE MIND AND IF THE EXPRESSION IS IN FORM OF POETRY, IT IS OBVIOUS THAT ONE FINDS THESE REFLECTIONS ALL OVER IN WRITING, WHICH IS THE CASE WITH YOJANA’S POETRY. WHEN ONE LOCKS HORNS WITH THE SYSTEM WHICH IS SOCIALLY ACCEPTED HIERARCHAL STRUCTURAL OPPRESSION, IT IS PREDICTABLE THAT AN INDIVIDUAL WILL BE ISOLATED AND DEJECTED. BUT A STRONG MIND IS NOT EXASPERATED AND FACES THE STORM BRAVELY. ONE CAN SENSE THIS IN YOJANA’S POEMS. AND PROBABLY THIS IS WHY NOTWITHSTANDING WITH GLOOMY TONE IN THE BEGINNING, HER POETRY ASCENDS TOWARDS BRIGHTNESS. IT IS APPARENT THAT ROMANTICISM PEEPS INTO HER WORDS BUT THEN, THIS ROMANTICISM DOES NOT DWELLS IN DREAMS LEADING TO ILLUSION OF BLISS, BUT IS PIERCING AND FIERY INDICATION OF A REVOLT. HOWEVER, THIS POETRY DOES NOT TAKE FORM OF PROPAGANDA OF WOMEN LIBERATION, AND STICKS TO ITS CONTEMPORARY INDIVIDUALISTIC FORM.
योजनाची कविता स्त्रीमुक्तीचं बाळकडू कोळून प्यायलेल्या समर्थ स्त्रीची कविता आहे. अर्थात व्यक्ती जितक्या वेगाने बदलू शकते तितक्या वेगाने समाज बदलू शकत नसल्याने समर्थ व्यक्तीचं व्यवस्थेबरोबरचं घर्षण / संघर्ष सुरूच राहतात. संवेदनशील मनात त्याचे पडसाद उमटत राहतात आणि ते संवेदनशील मन जर कवितेमध्ये अभिव्यक्त होणारे असेल तर त्या पडसादांची प्रतिबिंबं कवितेमध्ये उमटत रहातात. अर्थात, व्यक्ती आणि व्यवस्था ह्या संघर्षात व्यक्तीवर हतबल व्हायचे प्रसंग येणे हे अटळच असतं. पण समर्थ मन त्यामुळे हताश होत नाही. तर त्याला निधडेपणाने सामोरं जातं. याची प्रचीती योजनाच्या कवितेत पदोपदी येते. या कवितांमधला रोमँटिसिझम एरवीसारखा सुखासीनतेची आस दर्शवणारा तरल आणि स्वप्निल नाही तर बंडखोरीचे सूचन करणारा तल्लख आणि तिखट आहे. बंडखोरीची ही कविता स्त्रीमुक्तीचा झेंडा खांद्यावर घेऊन कंठाळी सूर लावून प्रचारकी होत नाही, तर ती काळाला अनुसरून व्यक्तिवादीच राहते; स्वत:विषयी बोलण्याच्या निमित्ताने जीवनाविषयी खोलात जाऊन बोलते.
१.रानकवी लक्ष्मण दुधाळ काव्य पुरस्कार , महाराष्ट्र साहित्य परिषद , मंगळवेढा शाखा २०१७ २.लक्षणीय पद्य साहित्यकृती पुरस्कार , आपटे वाचनमंदिर इचलकरंजी २०१७ ३.अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद , बडोदा , सर्वोत्कृष्ट काव्यसंग्रह २०१७ ४. सुखदा नागेश स्मृती पुरस्कार , साहित्यप्रेमी भगिनी मंडळ,पुणे २०१७ ५.विशाखा काव्य पुरस्कार २०१८

No Records Found
No Records Found
Keywords
#MARI MARI JAY SARIR #YOJANA YADAV #मरी मरी जाय सरी #योजना यादव
Customer Reviews
  • Rating StarManoj V

    Hello! Although we do not know each other, thought of writing to you after reading your book of poems that I discovered while browsing Amazon. Enjoyed reading it a lots. Some of the poems reminded me of the poetry of Elizabeth Bishop. I could also dicern a subtle positive influence of Arundhati Roy in your writing, which is a great thing. My best wishes to you and your poems. Thank you!- Manoj ...Read more

  • Rating StarPramod Munghate

    योजना यादवची कविता... □ #मरीमरीजायसरीर “फुटपाथवर निजलेला बेवडा प्रार्थनेला शरण जात नाही करुणा भाकत नाही कुठल्या प्रेषिताची रहदारीला मोजत नाही मोकाट जनावरांनाही नाही आत्मभानाची सरहद ओलांडून कुठे पोहचतो कळत नाही” ‘आत्मभानची सरहद’ या कवयित्री योजना यादवच्या कवितेतील वरच्या ओळी आहेत. मी २००९ मध्ये फेसबुक साइन इन केलं, तेंव्हा अगदी सुरवातीला मित्रयादीत असलेली योजना यादव. त्यातही कविता करणारी, कविता वॉलवर शेअर करणारी, मिडियात संपादक काम करणारी म्हणून अधिक लक्षात राहिलेली. त्यानिमित्ताने बराच संवाद झालेला. तीनचार वर्षांपूर्वी तिचा नवीन आलेला ‘मरी मरी जाय सरीर’ हा कवितासंग्रह घ्यायला म्हणून पुण्यातील मेहताच्या आउटलेटला गेलो असताना भेटही झालेली. ‘मरी मरी जाय सरीर’ अधूनमधून कविता चाळत होतो. पण परवा एका लेखाच्या निमिताने तो हातात घेतला आणि समग्रच वाचून काढला. फार कमी कविता संग्रह असतात जे एका बैठकीत वाचून संपवायला भाग पाडतात. आणि संग्रहातील सगळ्या कविता मिळून एक महावाक्य सिद्ध व्हावे, असा संग्रह तर दुर्मिळच असतो. संपूर्ण संग्रहातील कवितांचा एकात्म अनुभव वाचकाला येणे या अर्थाने मी महावाक्य असे म्हणतो. ‘मरी मरी जाय सरीर’ या शीर्षकाचा प्रत्यय या संग्रहातील प्रत्येक कविता वेगवेगळ्या संदर्भात देते. कितीतरी पातळ्यांवर कवयित्रीला हे शरीर टाकून द्यायचे आहे. या देहत्यागाला अनेक परिमाणे आहेत. स्त्रीवाद, अध्यात्म, परात्मता आणि आत्मभानाची सरहद्द ओलांडण्याची असोशी या परस्पर विरोधी वाटणाऱ्या जाणिवा एकमेकात बेमालूम मिसळल्या आहेत. आणि त्यात कोणतीही विसंगती नसल्याचा कवयित्रीचा अनुभव प्रत्येक कवितेतून सारख्याच ताकदीने व्यक्त होतो. ‘आत्मभानाची सरहद’ याच शीर्षकाची ही कविता जणू या संग्रहाची शीर्षकविता आहे असे मला वाटते. आत्मभानाची सरहद, पुढची पायरी आहे. त्या आधी शरीर हाच मोठा अडसर आहे. देह आणि त्यातही स्त्रीदेह अध्यात्ममार्गातील धोंड वगैरे अशा पारंपरिक अर्थाने या कवितेतील शरीराचा विचार नाही. एक ‘स्त्री’ म्हणून, एक ‘माणू’स म्हणून सर्व सामाजिक, सांस्कृतिक व्यवस्थांच्या चौकटींचा त्याग करायचा असेल तर हाडामांसाच्या शरीरापलीकडे जाण्याची अगतिकता या कवितेच्या प्रत्येक शब्दाशब्दातून पराकोटीच्या आवेगाने व्यक्त होते. ‘जोहार’ या पहिल्याच कवितेत ती म्हणते, “पृथ्वीच्या या अंडाकृती कवचात आपण दोघेच आहोत असं समज अजून परंपरा उत्क्रांती अशा शब्दांची झाली नाही ओळख नैतिकतेच्या पाशाने शरीरं वेढलं नाही तू पुरुष, मी स्त्री अशी लेबलं नाहीत केवळ स्पर्शाचं भान आहे आपल्यात त्यासाठीच शरीराच्या मशाली पेटल्यात आत्मभानाचा विलोप आणि त्याचवेळी स्पर्शाचे भान, अशी अस्तित्वाची जाणीव म्हणजे आत्मभानाची सरहद ओलांडण्याचा प्रयत्न आहे. देहाचा किंवा आत्मभानाचा विलोप ही रूढ अध्यात्माच्या मोक्ष-मुक्तीच्या कल्पनेच्या विरुद्ध टोकाला जाणारी जाणीव आहे. मोक्ष-मुक्ती ही शरीरनिरपेक्ष अवस्था असते. पण इथे शरीराचे सर्व भोग, वासना-विकार आणि कामभावनेचे सर्व विभ्रम अस्तित्वात आहेतच. पण शारीरभोगाच्या टोकावरील आत्मभानाचे विलोपन अपेक्षित आहे. किंवा या संग्रहातील ‘अचानक’ ही तिसरीच कविता पहा: “अचानक माझ्याच हातून पाझरते तुझ्या स्पर्शाची ऊब घट्ट आलिंगनात मावळत्या सूर्याची आठवण शरीरभर तेजाळत राहते तुझ्या पायांवर तोल सांभाळते सारी सृष्टी ओठांवरून सरकू लागतात ढग घट्ट घट्ट होत जातं आलिंगन वारा शरमून, संकोचून संथ वाहू पाहतो तुझ्यातून माझ्यात अशी उतरते लहर मर्यादा घोंगाळू लागल्या पायात की शब्दांना हाकलून लावतो आपण अचानक अचानक विसरून जातो माणूस असण्यातला भ्रम” किंवा ‘शरीर’ या कवितेच्या शेवटी ती लिहिते “विलगल्यावर तुझं तुला सलत राहतं माझं मला शरीर” ही सल आहे ती शरीरनिरपेक्ष नाही. “विलगल्यावर तुझं तुला सलत राहतं माझं मला शरीर” या ओळीतून विलग झाल्यावरचे दु:ख व्यक्त केले आहे. शरीरांच्या उत्कट मिलनातून अलौकिक मुक्तीचा ध्यास आहे. पण अडसर आहे तो आत्मभानाचा. हे आत्मभान जड शरीराचेच एक परिमाण आहे. या अर्थाने ती म्हणतेय, ‘मरी मरी जाय सरीर’. देहाच्या लौकिक अस्तित्वाचे सगळे बंध वितळून गेल्यावर मुक्तीचा जो अनुभव असतो, तो पारंपरिक अध्यात्माच्या परिभाषेतील ‘मोक्षा’चा नसतो. तो अधिकाधिक इंद्रियसंवेद्य भोगाच्या अत्युच्च टोकावरचा असतो. असे सरहद्दीवरचे क्षण शारीरिक मिलनात कवयित्रीच्या शब्दात “स’मिती’वर” येताना अनुभवता येतात, पण ते आपले नसतात, आपल्या हातातून सुटून जातात, ही तगमग आहे. पण हेच अनुभव कवयित्रीला जणू सत्याचा साक्षात्कार वाटतात. (उदा. ‘पळभर’ या कवितेत “छोटी मोठी बतावणी/ चिरडून जाईल/ इतकी घट्ट/ मिठी मारली/ आपण एकमेकांना/ओठातून ओठात उतरल्या /सत्याचे/ झालो धनी /पळभर का होईना” ) ही जाणीव या संग्रहातील अनेक कवितातून वेगवेगळ्या रूपाने व्यक्त झाली आहे. ‘सिल्विया’ ही या संग्रहातील एक आवडलेली कविता. सिल्विया प्लाथ ही मरणोत्तर पुलित्झर पुरस्काराने सन्मानित अमेरिकन कवयित्री. गस ओव्हन मध्ये झोकून देऊन जिने स्वतःला संपवले होते. योजना लिहिते: “सिल्विया प्लाथनं आत्महत्या केली नाही फक्त फेकून दिला देह आत्म्याआड येणारा” आत्मभानाच्या विलयाची असोशी असलेल्या कवयित्रीला उत्क्रांतीच्या साच्यातील जगणेही शिक्षा वाटते. लौकिकाकडून जाणारा हा अलौकिकाचा प्रवास आहे. शरीर आहे, आत्मा आहे, आत्मभान आहे पण हे सगळे निरस्त करायचे आहे. जगण्याच्या प्रवासात व्यक्त-अव्यक्त, दृश्य-अदृश्य सांस्कृतिक धारणा आणि मूल्यांचे ओझे आहेत. नितळ आणि निरागस अशा अलौकिकाच्या बिंदूची सम गाठण्याच्या प्रवासात ते धारणा आणि मूल्यांचे ओझे कवयित्रीला जड झाले आहे. जड शरीराचेच जणू अवयव झाले आहेत, म्हणून शरीराकडून गर्भाकडे आणि तिथून पुन्हा एका शून्याकडे जायचे आहे. म्हणूनच ‘कळप’ या कवितेत ती म्हणते, “तुमची सर्टिफाईड दु:खं / सर्टिफाईड आनंद / संवादाचा हव्यास /आहे ज्यांच्या /जगण्याचा आधार / त्यांना तुमचे / कळप लखलाभ / ज्यांना / एकट्याने /भोगता उपभोगता येतं /त्यांना ओढु नका कळपात...” या अर्थाने ही कवयित्री म्हणतेय, ‘मरी मरी जाय सरीर’. ‘कळपाची’ ही संज्ञा अलीकडच्या ग्लोबल काळात अधिक अदृश्य झाली आहे. ती दिसत नसल्याने अधिक आक्रमक आणि हिंसक-शोषक झाली आहे. दृश्य पातळीवर ई-नागरिक हा आत्यंतिक व्यक्तिवादी जगात जगत असतो. पण ते खरे नसते. अदृश्य पातळीवर चोहोबाजूंनी त्याच्यावर असंख्य कॅमेरे रोखलेले असतात. उपग्रहाच्या माध्यमातून शोरूमच्या चार भिंतीच्या ट्रायल रूममध्ये स्त्री एकटी कधीच नसते. अनेक मल्टीन्याशनल ब्रान्डसने तिच्या शरीरावर ताबा मिळवलेला असतो. खासगीकरणाच्या संस्कृतीत स्त्रीचे शरीर बाजाराचा एक ब्रांड असतो. ‘डिझायनर’ या कवितेत योजना लिहिते, “स्पायकरच्या ट्रायल रूममध्ये कपडे उतरवत असताना रोखलेले असतात डिझायनरचे डोळे आपल्यावर पायाच्या घोटापासून कंबरेपर्यंतचा आकार मांड्यांचा घेराव , स्तनांचा विस्तार स्कॅन होत राहतो आरशापल्याड जीन्स चढवतात ते हात आपले नसतात पायही बहुदा आपले नसतात नव्या कपड्यात खुललेला अहं तो ही नसतोच आपला डिझायनर बेमालूम घुसलेला असतो शरीरात दुकानात पाय ठेवल्यापासून.” या अशा कवितांमधून व्यक्त होणारी स्त्रीवादी जाणीव एकरेषीय स्त्री-पुरुष संघर्षातील नाही. ती त्यापलीकडे जाणारी आहे. एरवी मराठीतील स्त्रीवादी जाणिवांच्या आवाजी कवितेत स्त्री-पुरुष संबंधातील काच, वैय्यर्थ आणि शोषणाच्या संदर्भात स्त्रीवादाचे सुलभीकरण असते. या पार्श्वभूमीवर योजना यादवच्या कवितेतील स्त्रीवादी जाणिवा सूक्ष्मरीतीने समजून घ्याव्या लागतात. ‘रेखा’ शीर्षकाची एक छोटीशी पण सुंदर कविता या संग्रहात आहे. “रेखा, तुझ्या असीम सौंदर्यानं आत्महत्या केली होती त्या दिवशी ज्या दिवशी तुला कळलं होतं सौदर्यापेक्षा औदार्यानं पुरुष जिंकता येतात” किंवा ‘समर्पनाची मृत्युघंटा’ कवितेत ती लिहिते, “किती खोदणाराय मी? /खोदता खोदता /सीतेचं एखादं नख /केस/ वा हाडच लागेल हाताला/ त्यात दिसेल/ तिच्यातून माझ्यापर्यंत /पोहोचलेला डीएनए/ वळवळताना/ संकरासाठी आसुसलेल्या/ निरुपद्रवी गांडुळासारखा/ राम शाम मनू सनू/ कुणीही भोगा /त्याला शिकवा एकवचनाची भाषा/ उभा करा आरसा/ अन् दाखवा /समर्पण संपल्यावर /कुरूप होतात बाया” स्त्रीच्या शारीर सौंदर्याचे सत्य हे स्त्रीवादाचे एक परिमाण कसे आहे ते या कविता पुनःपुन्हा अधोरेखित करतात. ‘सौदर्यापेक्षा औदार्यानं पुरुष जिंकता येतात’ किंवा ‘समर्पण संपल्यावर कुरूप होतात बाया’ या ओळींमधून ही कवयित्री स्त्रीवादी जाणीव वेगळ्याच रीतीने व्यक्त करते. स्त्रीपुरुषसंबंधांचा शरीराच्याच संदर्भात पण शरीराच्या पलीकडे जाणारी ही जाणीव आहे. या संदर्भात योजनाच्या कविता मला माया एंजेलो या अमेरिकन कवयित्रीच्या भूमिकेशी नाते सांगणाऱ्या वाटतात. ‘नापीक जमिनीचे संदर्भ’ या कवितेच्या अखेरीस ती लिहिते, “गुंठाभर जमिनीच्या तुकड्यासारखी असते बाई भाबड्या पुरुषासारखी ज्याला उमजत नाही , की, सालोसाल एकच बी पेरलं तर नापीक होते जमीन.” योजना यादवच्या या कविता २०१०च्या दशकातील आहेत. त्यामुळे नव्वदनंतरच्या जागतिकीकरणाला ही कवयित्री कशी सामोरे जाते हा प्रश्न टाळून पुढे जाता येणार नाही. जगाच्या ग्लोबल व्हिलेजमध्ये सांस्कृतिक परंपरांचे अवमूल्यन झाले असे म्हणतानाच स्थानिक परंपरा व धार्मिक संकेत-व्यवस्थांचे पुनरुज्जीवन झाल्याचेही आपण पाहतो. समाजातील धार्मिक-पारंपारिक धारणांचे बाजारीकरण स्वाभाविक होते. ‘बाजार’ हे मूल्य वर्तमान जीवनाला सर्व पातळीवर कसे वेढून राहिले आहे, हा अनुभव मराठीतील नव्वदोत्तर कवितेत मोठ्या प्रमाणावर आलेला आहे. त्रुटीत, विस्कळीत आणि बहुकेंद्री जीवनशैली ही या काळातील नागरी समाजाची जणू अगतिकताच झाली. (खाजगीकरण व उदारीकरणाने बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या माध्यमातून ग्रामीण जीवनही व्यापले गेले.) नव्वदोत्तर कवितेत माणसाच्या व्यक्तित्वाचे असे खंडित व विघटीत रूप हे मध्यवर्ती अनुभवसूत्र असल्याचा परिणाम कवींच्या अभिव्यक्तीवरही दिसतो. पुढे त्यात साचेबद्धपणा आला. अभिव्यक्तीच्या पातळीवर असा प्रभाव योजनाच्या कवितेवर दिसत नाही. प्रा. वसंत पाटणकर यांनी एका लेखात फार छान म्हटले आहे की जागतिकीकरणाला कवीने प्रतिसाद देणे म्हणजे “कॉम्प्युटर, सायबर विश्व, इंटरनेट, इमेल, वेब, सर्किंग किंवा मॉलमधील वस्तू, वातावरण किंवा मॅकडोनल्ड पिझ्झा, बर्गर किंवा `एम` टीव्ही, `व्ही` टीव्ही, ब्रेकिंग न्यूज किंवा टीव्हीवरील शेकडो चॅनल्स आणि त्यांद्वारे प्रसारित होणारे प्रातिभासिक वास्तव इत्यादी गोष्टींविषयी लिहिणे वा यासंबंधीचे शब्द, संज्ञा, प्रतिमा-प्रतीके पेरत कविता लिहिणे नव्हे.” यातून आपली कविता किती समकालीन आहे हे दाखविण्याचा प्रयत्न काही कवी करतात. पण ते खऱ्या अर्थाने जागतिकीकरणाविषयी बोलत नाहीत, असे त्यांना वाटते. योजनाच्या वर उल्लेख केलेल्या ‘डिझायनर’सारख्या कवितेत बाजार संस्कृतीचा अनुभव असा प्रतीकात्मक नाही, तो भावात्मक आहे. उलट जागतिकीकरणाच्या संदर्भातील स्त्रीवादाचे नवे परिमाण ती व्यक्त करते. आपल्या एकूण जगण्याचे वस्तूकरण झाले आहे अशी जाणीव असणे वेगळे आणि त्यातून बाहेर पडण्याची तगमग असणे वेगळे. त्यासाठी एक मूल्यचौकट कवीच्या एकूण व्यक्तित्वातच असावी लागते. ती योजनाच्या कवितेच्या मुळाशी आहे. त्याचाच परिणाम म्हणून वर्तमानाच्या विघटीत-विस्कळीत जीवनशैलीत जगत असताना या कवयित्रीच्या एकूण अभिव्यक्तीत एकात्मता आढळते. नव्वदोत्तर कवितेत हा विशेषही दुर्मिळ आहे. योजनाची कविता समकालीन जगण्यातील असंबद्धता व्यक्त करीत असली तरी ती मूल्यभावाचा एकात्म प्रत्यय देणारी आहे. त्यामुळे जागतिकीकरणाच्या प्रभावात ती कविता संभ्रमित झालेली नाही. ती एकूणच संभ्रमावस्थेकडे गांभीर्याने पाहते. म्हणून डिजिटल युगातील किंवा ई-विश्वातील निव्वळ चमत्कृतीपूर्ण प्रतिमांच्या भाराने वाकलेल्या कवितेपेक्षा योजना यादवची कविता मला अधिक महत्त्वाची वाटते. सभोवतालच्या वास्तवाचे आकलन असणे आणि त्याची स्वतःच्या अस्तित्वजाणीवेला आच असणे, एव्हढाच अनुभव व्यक्त करणाऱ्या कविता पुढे आवर्तात सापडतात. मग त्या कवितांमध्ये काहीच सापडत नाही असा अनुभव आहे. स्वप्न हे योजना यादवच्या अनुभूतीचे एक रूपक आहे. सत्याच्या निकट जाण्यासाठी सभोवतालच्या वास्तवापेक्षा पुष्कळदा स्वप्नांतील फैंटेसी अधिक अर्थपूर्ण ठरते. ‘स्वप्न’ या कवितेत ती लिहिते : “शरीरात रुतून बसलीयत माणसं दाटीवाटीनं नवरा योनीच्या तळघरात पोरगी त्याच्या मांडीवर पोटाच्या मध्यभागापर्यंत उरलेले भाग मिळतील तसे वाटून घेतलेत प्रत्येकानं अन् आई मात्र उभीच आहे शरीरात नखशिखान्त” पितृसत्ताक संस्कृतीच्या संदर्भात कवयित्रीने केलेले हे विधान आहे. “ आई मात्र उभीच आहे शरीरात नखशिखान्त” असा आईविषयक एक बंध अनेक कवितांमध्ये आढळतो. तो मला जागतिकीकरणाचा प्रभाव पचविलेल्या कवितेच्या संदर्भात विशेष वाटतो. ‘स्वप्न स्वप्न स्वप्न’ या आणखी एका कवितेत ती म्हणते, “गर्भाशय समुद्रासारख आहे आतून आणि आई पृथ्वीसारखी मी स्वतः भोवतीच फिरतो तिच्या उदरात पाय रोवून बाप चंद्रासारखा दूर आहे कुठंतरी इतकंच माहित आणि नातीबीती नसतात कुमारीमातेच्या पोराला एक बागुलबुवा असतो समाज नावाचा आई घाबरत नाही त्याला आई घाबरत नाही क्षणभंगुर वावटळीला ........” अनेक कवितातून बापाचा सुद्धा वेगवेगळ्या परिप्रेक्ष्यातून शोध घेताना दिसते. ‘संग कवितेशी’ ही कविता या संदर्भात लक्षात घेण्यासारखी आहे. या कवितेत ती म्हणते, “मुळात मलाच सर करणं जमणार नाही जोखता येणार नाही माझ्या देहापल्याडची तटबंदी यायचं तर पुरुषार्थाची सारी अस्त्रं फेकून एकदा पायतळी या त्याआधी फेका गुर्मीची भाषा भ्रमिष्ट होऊ द्या तुमच्यातल्या आदिपित्याला अन्यथा माझ्या नादीच लागू नका कवितेशी संग करायला जन्म फुंकता यायला हवा” अशा अनेक संदर्भात कवयित्री आपली भूमिका नेमक्या शब्दात मांडते. ‘पुरुषार्थाची सारी अस्त्रं फेकून’ आणि ‘भ्रमिष्ट होऊ द्या तुमच्यातल्या आदिपित्याला’ या ओळीतून ती जसे परंपरागत सांस्कृतिक सत्तेला आव्हान आव्हान देते. ते देताना कवयित्री आपली कविताच पणाला लावते. कवितांविषयक अनेक कविही या संग्रहात आहेत. ‘अभिव्यक्ती’, ‘शब्द’, ‘बयो कविते’ या शीर्षकाच्या कवितांमधून योजना यादवची कवितेची कल्पना स्पष्ट होते. भाषा असते समूहाची म्हणून कविताही असे ती म्हणते. शब्दांची सुई करून शरीरात टोचता येत नाही अशी अगतिकताही ती बोलून दाखवते. “जळजळीत दु:खाचे / थरावर थर साचून / त्यातून तू उगवणार असशील / तर / बयो कविते / माझ्यापासून तू दूरच राहा” असेही सांगते. या कवितेचा एकूण सारांश सांगायचा झाला तर असे म्हणता येईल की, या कवितेला शरीरसापेक्ष पण अलौकिक क्षणाच्या साक्षात्काराच्या अनुभवाची असोशी आहे. त्यासाठी या कवितेला आत्मभान विसरायचे आहे. ही असोशी इतक्या टोकावर जाते की या कवितेला शरीराचाची अडसर वाटावा. आत्मभानाच्या विलयाची तीव्र आस असली तरी या कवितेत मूल्यभानाचा विसर नाही, हे मला महत्वाचे वाटते. (या संदर्भात ही कविता उत्तरआधुनिकवादी की आधुनिकवादी असेही मूल्यमापन करण्याची गरज इथे नाही, असे मला वाटते. कारण त्या मूल्यसंकल्पनाव्युहात ही कविता कुठे बसते हा आणखी वेगळा मुद्दा आहे.) योजनाच्या कवितेतील मूल्यभान संग्रहाच्या अखेरच्या दोन कवितांतून अधोरेखित होते असे मला वाटते. शेवटच्या ‘सरहद्दीवर बुद्ध’ या कवितेत ती म्हणते, “मालकीच्या लोभात भरकटणाऱ्या अस्वस्थ आत्म्यांना म्हणूनच कळत नाहीत त्याच्या मिटलेल्या पापण्यांतले भाव बुद्धवाटेवर चालणारा मात्र शोधत असतो चिरनिद्रेचा इलाज” आणि त्या आधीच्या ‘निरंतर शांतीच्या शोधात’ या कवितेत ती लिहिते, “निसटलंच हातून सारं तर निरंतर शांतीच्या शोधातला बुद्ध तरी जन्मतोच आपल्यात..” □ -प्रमोद मुनघाटे ...Read more

  • Rating StarP.R Ramdasi

    आपल्या "मरी मरी जाय सरीर"काव्यसंग्रहातील कविता ब-याचदा वाचल्या. मी कुणी समीक्षक नाही किंवा काव्यक्षेत्राचा जाणकार नाही. केवळ एक वाचक म्हणून कविता वाचल्यावर मनांत जे आले ते कळवित आहे। बहुतांशी कवितांमधून ( बुद्ध, स्वप्न , दुःखाचं अँडिक्शन इ.) स्त्रमनाची अलवार स्पंदनं आणि पौरुषत्वाची अपार असंवेदनशीलता याचं वर्णन अल्पाक्षरात साधलेलं आहे. बुद्ध वाचताना सजग मनात प्रश्न येतो की बुद्धाच्या अंतःकरणातील करुणा कधीच कां स्त्रीच्या वाट्याला येणार नाही ?  स्त्रीदेहाची आसक्ती अनादीअनंत आणि इतक्या पराकोटीची की त्या देहात माझ्याइतक्याच किंबहुना कांकणभर जास्तच संवेदना आहेत याचं पुरुषांना भान राहू नये ? "त्यानंतर " वाचल्यावर वाटलं की ही  विरहवेदना की प्रेमभंगाची व्यथा ...जी त्याचं नव्हे तर तिचंच प्राक्तन ठरतं ! " संग कवितेशी " ही कविता मला वैयक्तिक पातळीवर आवडली. ज्यामधे एका निर्भिड स्रीनं दिलेलं आव्हान लक्षणीय आहे. देह सर करता येतो पण स्रीमनाची अभेद्य तटबंदी, गुर्मी बाळगून कदापि लांघता येणार नाही. ती ओलांडायची असेल तर आदिपुरुषापासून रुजलेली आणि रुजवली गेलेली,  पुरुषार्थ या नावानं, परजली जाणारी अस्त्रं त्यागावी लागतील. गृहकृत्यदक्ष, आदरातिथ्य असलेल्या गृहिणी स्त्रीची सुप्तभावना excuse me कवितेत, विशेषतः शेवटच्या ओळींमध्ये to the point व्यक्त झाली आहे. वर्षानुवर्षं लादल्या गेलेल्या आणि तेच तिच्या आयुष्याची इतिकर्तव्यता समजल्या गेलेल्या आदरातिथ्याला मे नाँट बी अँव्हेलेबल हेच धाडसी उत्तर असू शकतं. "बीज क्षेत्र न्याय" या एका लेखिकेनं ( मला नांव आठवत नाहीय.) मांडलेल्या तत्वाची आठवण होते.."नापीक जमिनीचे संदर्भ " वाचताना.  आणि "आत्महत्या " वाचताना समस्त स्रीवर्गापुढचा यक्षप्रश्न उमजतो की लाज कोळून प्यावी की शरीरच संपवावं ! कारण डिझायनर तर पावला-पावलावर आहेतच शरीराचे वक्राकार, चढउताराला दर्शनीय बनविण्यासाठी टपलेले ! आणि उमजलेल्या कवितांमधील शेवटची.. "सरहद्दीवर बुद्ध "--- जे आहे ते अपूर्ण आणि जे नाही ते पूर्ण ....हा अट्टाहास मानवी जीवन कलंकित करतो., ओंजळी गळक्या आहेत हे जाणून-उमजूनही, अजाण बनून, ओंजळी भरण्याचा निष्फळ प्रयत्न करुन शेवटी रिकाम्या हातांनी जातो.. काही कविता मला माझ्या सीमित आकलनशक्ती मुळे सखोल कळल्या नाहीत. वरील मजकूर म्हणजे यथाशक्ती रहग्रहण आहे. परीक्षण नव्हे. तो माझा प्रांत नाही आणि हक्क तर नाहीच नाही.  आपल्या पुढच्या काव्यसंग्रहाची प्रतिक्षा राहील हे निश्चित !  वरील मजकुरात काही औधत्य वाटल्यास क्षमस्व. सर्वांगिण शुभेच्छा. ...Read more

  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 04-11-2018

    वास्तवतेचे दर्शन घडविणाऱ्या कविता... योजना यादव यांची कविता स्त्रीमुक्तीचं बाळकडू कोळून प्यायलेल्या समर्थ स्त्रीची कविता आहे. अर्थात व्यक्ती जितक्या वेगाने बदलू शकते, तितक्या वेगाने समाज बदलू शकत नसल्याने समर्थ व्यक्तीचं व्यवस्थेबरोबरचं घर्षण- संघर् सुरूच राहतात. संवेदनशील मनात त्याचे पडसाद उमटत राहतात आणि ते संवेदनशील मन जर कवितेमध्ये अभिव्यक्त होणारे असेल तर त्या पडसादांची प्रतिबिंब कवितेमध्ये उमटत राहतात. अर्थात, व्यक्ती आणि व्यवस्था या संघर्षात व्यक्तीवर हतबल व्हायचे प्रसंग येणे हे अटळच असतं. पण समर्थ मन त्यामुळे हताश होत नाही. तर त्याला निधडेपणाने सामोरं जातं. याची प्रचीती योजनाच्या कवितेत पदोपदी येते. या कवितांमधला रोमँटिसिझम एरवीसारखा सुखासीनतेची आस दर्शवणारा तरल आणि स्वप्निल नाही तर बंडखोरीचे सूचन करणारा तल्लख आणि तिखट आहे. बंडखोरीची ही कविता स्त्रीमुक्तीचा झेंडा खांद्यावर घेऊन कंठाळी सूर लावून प्रचारकी होत नाही, तर ती काळाला अनुसरून व्यक्तिवादीच राहते; स्वत:विषयी बोलण्याच्या निमित्ताने जीवनाविषयी खोलात जाऊन बोलते. या काव्य संग्रहात एकूण ७४ कविता समाविष्ट आहेत. लहानलहान असल्या तरी कविता अर्थपूर्ण व आशयघन आहेत. शब्दांचे जंजाळ किंवा अवडंबर कुठेच नाही जसे पहिलीच कविता ‘जोहार’– ‘केवळ स्पर्शाचं भान आहे आपल्यात त्या साठीच शरीराच्या, मशाली पेटल्यात जगण्याचा अट्टाहास, एवढ्यापुरताच, आणि माझा जोहार, तेवढ्यापुरता.’ ‘गुलाम कवितेत – ‘सरावलो साशंक मनाला, तरच होऊ शकतो बेफिकीर मावळत्या सूर्याच्या साक्षीनं. नात उजळवू शकतो एखादा क्षण.’ अशी ही योजना यादव यांची कविता यथार्थतेचे दर्शन घडविणारी, काळजाला भिडणारी आहे. –डॉ. शैलजा यादवाड ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more