* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: KINARE MANACHE
  • Availability : Available
  • ISBN : 9788171619382
  • Edition : 4
  • Publishing Year : AUGUST 1999
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 184
  • Language : MARATHI
  • Category : POEMS
  • Available in Combos :SHANTA SHELKE COMBO SET - 21 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
SHANTABAI IS JOTTING DOWN HER THOUGHTS IN A VERY RHYTHMIC STYLE AND EXPRESSING HERSELF STANZAS AFTER STANZAS SINCE LAST 50 YEARS. SHE HAS NOT STUCK TO THE FORM OF POETRY ONLY BUT HAS TRIED HER HANDS SUCCESSFULLY ON OTHER FORMS OF LITERATURE; YET POETRY IS THE AREA WHICH IS LIKE HER BREATH, HER HEART BEATS MORE RHYTHMICALLY HERE. THIS COLLECTION OF HER POETRY IS COMPILED OF HER MOST EXCLUSIVE POEMS. IT WAS VERY DIFFICULT TO MAKE A SELECTION FROM ALL HER POETRIES, EACH BEAUTIFUL AND PERFECT IN ITS OWN WAY. THE FAMOUS POETESS DR. PRABHA GANORKAR HAS CRITICALLY VIEWED HER POEMS AND TAKEN A REVIEW OF PROGRESS ON THE PATH OF POETRY. DR. GANORKAR HAS VERY ELABORATELY STUDIED AND METICULOUSLY DIAGNOSED THE POETRY, ITS MEANING, ITS MANIFESTATION, ITS PLUS POINTS, ITS MINUS POINTS, AND ITS POSITION IN COMPARISON WITH ITS CONTEMPORARY POEMS. THIS WILL HELP THE READERS IN UNDERSTANDING THE POEM IN A BETTER WAY AND IT WILL ALSO HELP THE SCHOLARS WHO ARE STUDYING THE LITERATURE IN DETAILS.
बाईंच्या दीर्घकालीन काव्य प्रवासाचा चिकित्सकपणे आणि सहृदयतेने घेतलेला वेध गेल्या अर्धशतकापासून शांताबाई काव्य लेखन करीत आहेत.इतर अनेक साहित्यप्रकार त्यांनी आतापर्यंत हाताळले असले तरी आत्मनिष्ठ कविता हीच त्यांची सर्वात आवडती निर्मिती राहिली आहे.`किनारे मनाचे` हा शांता बाईंच्या दीर्घकालीन काव्याप्रवासाचा चीकीत्सतपणे आणि सहृदयेने वेध घेणारा त्यांच्या निवडक कवितांचा संग्रह आहे.सुप्रसिद्धी कवयित्री आणि नामवंत समीक्षिका डॉ.प्रभा गणोरकर यांनी शांत बाईंच्या कवितेचा विकासक्रम इथे मार्मिकपणे उलगडून दाखविला आहे.तिचा आशय,अविष्कार,भाषेचे पोत,तिच्या मर्यादा आणि तिची शक्ती,त्याबरोबर समकालीन कवितेच्या संदर्भात तिचे असलेले नेमके स्थान या सर्व गोष्टींचा अत्यंत अभ्यासपूर्ण,मुलभूत आणि स्वतंत्र विचार डॉ.गणोरकर यांनी आपल्या विस्तृत प्रास्ताविकात केलेला आढळेल.एका जेष्ठ कवयित्रींचा या निवडक कविता आणि तिच्या सर्व काव्यलेखनाच्या हि सर्वांगीण समीक्षा काव्यासारीकांना आणि विशेषतः साहित्याच्या अभ्यासकांना उतबोधक वाटेल.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#आंधळी#कॅथरिन ओवेन्स पिअर#कादंबरी# शान्ता ज.शेळके#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%#THE HELENKELLERSTORY #CATHERINEOWENSPEARE #SHANTAJ.SHELKE #ANDHALI #ANDHALYACHE DOL #ANOLAKH #ANUBANDH #CHAUGHIJANI #GAVATI SAMUDRA #GONDAN #KAVITA SMARANATALYA #KINARE MANACHE #LEKHAK ANI LEKHANE #MEGHDUT #NIMITTA NIMITTANE #PAVSAAADHICHAPAUS #PURVASANDHYA #RANGRESHA #RESHIMREGHA #SANGAVESEVATALEMHANUN #SANSMARNE #SUVARNAMUDRA #VARSHA
Customer Reviews
  • Rating StarDAINIK KESARI 26-12-1999

    शांता शेळके यांच्या निवडक कवितांच्या संकलनाच्या प्रस्तावनेमध्ये प्रभा गणोरकर यांनी शांतबार्इंच्या कवितेचे मर्म अतिशय हृद्यपणे उलगडले आहे. शांता शेळके हे नाव त्यांच्या मधुर गीतांच्या, चित्रपटगीते, द्वंद्वगीते, भावगीते, कोळीगीते, भूपाळी आरती अशा विविध द्यरचनांच्या गेय आविष्कारातून महाराष्ट्रातील रसिक मनांच्या मनावर गेली कित्येक वर्षे अधिराज्य करत आहे. शांताबार्इंचे अन्य साहित्यिक आकृतीबंधही मराठी साहित्य रसिकांच्या मनात संस्मरणीय आहेतच; परंतु मनुष्याच्या आणि समाजाच्या मनोरचनेत वाचन संस्कृतीपेक्षा श्रवण संस्कृती अधिक रुळली असल्याने शांताबार्इंचे कवयित्री रूप काहीसे मागे पडल्यासारखे होते. वास्तविक गेली सत्तावन्न-अठ्ठावन्न वर्षे शांताबाई काव्य लेखन करत आहेत. १९६० पासून आजतागायत सातत्याने कविता लिहिताना त्यांनी कवितेची अनेक रूपे पाहिली. कवितेच्या नव्या-जुन्या वाटा आणि वळणे यांचा संस्कार आणि कवितेसंबंधी जागृत आत्मभान शांताबार्इंना आहे. कवींच्या तसेच वाचकांच्याही पिढ्या शांताबार्इंच्या लेखणीशी परिचित आहेत. इतक्या दीर्घकालीन पल्ल्यात भिन्न अभिरुचीच्या वाचकांना आनंद देण्याची तकद त्यांच्या कवितेत आहे. शांताबार्इंच्या कवितेचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या कवितेने जरी वेगवेगळी वळणे घेतली असली तरी ती भरकटत गेलेली नाहीत. स्वत:च्या जाणिवा आणि त्यांची अभिव्यक्ती यांच्याशी ती प्रामाणिक राहिली. उलट त्यांची कविता अधिक प्रगल्भ होत गेली. ‘वर्षा’ आणि ‘रुपवी’मधले त्यांच्या कवितेचे आत्मलक्षी रूप, निसर्ग प्रेम, यांची एकेरी अनुभूती आणि व्यक्तिगत रूप कमी-कमी होत जाऊन अनोळखी, जन्मजान्हवी आणि पूर्वसंस्था या संग्रहात शांताबार्इंची कविता चिंतनशील, व्यापक विचारांची होत गेलेली आहे. आयुष्याच्या वळणावरती आठवणी एकेक तेवत ठेवून उरात आपण विझून गेलो कैक (गोदण) किंवा अवघे नकार मनी दाटतात हाता धरले हात सुटतात पाहताना कधी मागे परतून पुसटही तेथे उरते ना खूण (गोंदण) असे अशा-निराशेचे आत्मलक्षी खेळ रंगविणारी त्यांची शब्दकळा अज्ञात विश्वाचा शोध घेऊ लागते. ऐल अंधुक उजेड, पैल काळोखाचा डोह त्यात तिरीप एखादी, तिचा पडतसे मोह दाट काळोखाच्या पोटी मंद चमकती लाटा काही अज्ञात भोवरे काही असंभाव्य वाटा (जन्मजान्हवी) शांताबार्इंना जनमजात प्रतिभेचे आणि तिच्या आविष्काराचे शब्दभाग्य लाभले आहे. शब्दांसवे मी जन्मले, शब्दांतून मी वाढले हे शाप, हे वरदान, हा दैवाने दिलेला वारसा, मी जाणते इतुकेचे की यांच्याविना कंगाल मी भाषण हे यांच्यावरी मी लाविते मजला कसा, शब्दांमध्ये जगणे मला शब्दांमध्ये मरणे पुन्हा. शांताबार्इंच्या मनाचे किनारे असंख्य कविता संग्रहातून वाचकांना भेटलेले आहेत. त्यांचा पहिला संग्रह ‘वर्षा’ १९४७ मध्ये निघाला. नंतरच्या काळात रुपसी, गोंदण, अनोळखी, जन्मजान्हवी, पूर्वसंध्या आणि इश्यर्थ अश एकूण सात कवितासंग्रहात त्यांची कविता अधिकृत झाली आहे. त्यांच्या कवितेची वैशिष्ट्ये शब्दांचा आणि मनाचा प्रक्षोभ व्यक्त करणाऱ्या निवडक १३६ कवितांचा हा कवितासंग्रह मेहता प्रकाशनाने अतिशय सुबक आवृत्तीमध्ये प्रसिद्ध केला आहे. -मल्हार कृष्ण गोखले ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
डॉ. जयंत वडतकर.अमरावती

मेळघाटचा एन्सायक्लोपिडीया असलेले निवृत्त वनाधिकारी श्री. रविंद्र वानखडे यांच्या अनुभवांवर आधारित कुलामामाच्या देशात हे पुस्तक वाचले तेव्हापासून या पुस्तकाचे लेखक श्री. जी. बी. देशमुख यांना भेटण्याची इच्छा होती. इच्छाशक्ती असली की योग जुळून येतो असं महणतात. रविंद्र वानखडे सरांच्या माध्यमातूनच तो योग जुळून आला. माझ्या एक पुस्तकाचे प्रकाशन बाबत वानखडे सरांशी चर्चा करीत असताना त्यांनी लेखकाचा संदर्भ दिला व जी.बी. ना भेटून घ्या असे सांगितले. भेट घडून आली. अगदी सहज, घरगुती भेट झाली, गप्पा रंगल्या. यावेळी जी. बी. देशमुख यांनी त्यांचे पहिले पुस्तक महारुद्र मला भेट दिले. आमच्या चर्चेतून आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉल मथला मराठमोळा झंझावात महारुद्र, हे या पुस्तकाचे शीर्षक वाचून पुस्तकाचा विषय थोडक्यात समजला. लेखकाचे वडील भीमराव देशमुख यांनी फुटबॉलपटू म्हणून गाजविलेल्या कारकीदींचा आढावा या पुस्तकात होता. एका मुलाने आपल्या वडिलांवर लिहिलेले पुस्तक कसे असेल? असा प्रश्न अन पुस्तक, दोन्ही घेऊन घरी आलो. भेट मिळालेले पुस्तक वेळ मिळाला तसे एका बैठकीत वाचून काढले. आता गल्ली गल्लीत जसं क्रिकेट खेळल्या व बघितले जाते तसं स्वातंत्र्य पुर्व काळात वऱ्हाडात फुटबॉल खेळला जात असे. गावागावांत टीम असायच्या, सामने अर्थात स्पर्धा भरवल्या जात असत. स्वातंत्र्यपूर्व काळात अशाच रुपयांमधून चमकत, वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील एका खेळाडूने थेट मुंबईतील फुटबॉल क्लब व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मुसंडी मारत आपल्या खेळाचा व व्यक्तीमत्त्वाचा ठसा उमटविला होता. तो काळ होता १९३० ते १९५० चा. त्या वल्लीचे नाव होतं भिमराव देशमुख. जी. बी. देशमुख यांनी त्यांच्या वडिलांवर लिहिलेले महारुद्र पुस्तक काही फक्त भिमराव देशमुख यांची जीवन चरित्र नाही. स्वातंत्र्य मिळण्याच्या साधारण वीस वर्षा पुर्वी ३० ते ५० च्या दशकात आपल्या देशातील खेळाची स्थिती कशी होती. विशेषतः वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील स्थिती कशी होती. कुठले खेळ खेळले जात असत. स्पर्धा कशा भरवल्या जात असत. शाळा आणि शिक्षण कसं होतं. आर्थिक स्थिती कशी होती. अमरावती जिल्ह्यातील कोणत्या गावात फुटबॉलच्या नावाजलेल्या टीम होत्या. अमरावती कशी होती याची माहिती सुद्धा या पुस्तकातून वाचायला मिळते. पुस्तकाच्या पहिल्याच प्रकरणात भीमराव यांचे व्यक्तिमत्व कसं होतं हे सांगण्यासाठी लेखकाने बाबा म्हणून जरी त्यांची ओळख करून दिली असली तरी पुढील सर्व प्रकरणातून त्यांनी भीमराव अशा एकेरी उल्लेखातून हे व्यक्तिमत्व साकारले आहे. वऱ्हाडातल्या आपल्या सवयीनुसार प्रसिद्धी पासून दूर राहिलेल्या एका नामवंत फुटबॉलपटूची कारकीर्द व फुटबॉल पश्चात कौटुंबिक कारकीर्द तटस्तपणे मांडण्यात लेखक यशस्वी झाले आहेत हे आधीच सांगून टाकतो. अमरावती जिल्ह्यातील खारतळेगाव येथील फुटबॉलच्या टीम मध्ये भीमराव देशमुख यांची कारकीर्द सुरु झाली. ती १९३० सालापासून त्यावेळी ते जेमतेम विशीत होते. प्रथम शालेय स्पर्धापासून पुढे क्लब स्पर्धा पासून भीमरावने आपल्या खेळाचा ठसा उमटविला हळूहळू ख्याती विदर्भांत पोहोचली, भीमराव यांचा खेळ बघण्यासाठी लोक खास वेळ काढून येऊ लागेल, १९३८-३९ मध्ये विदर्भात झालेल्या काही स्पर्धात मुबंईच्या काही टीम सहभागी झाल्या होत्या, त्यामुळे नावाजलेल्या ब्रिटीश खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळाली. मुंबईच्या इंग्रजांच्या टीमला वऱ्हाडातील भीमराव यांच्या टीमने हरविले. वायएमसिए, मुंबईच्या अलेक्झांडर नावाच्या कप्तानाने भीमरावच्या खेळाने प्रभावित होऊन खारतळेगावच्या चार खेळाडूंना मुंबईच्या टीम कडून खेळण्याचे निमंत्रण दिले. १९४० ला भीमराव सह चार खेळाडू मुंबईत पोहोचले. अलेक्झांडरने त्यांना सराव शिबिरीत घातले. पुढील वर्षात भीमराव वायएमसिए टीम कडून खेळण्यासाठी करारबद्ध झाले. जशा आयपीएल मध्ये आज वेगवेगळ्या टीम खेळतात तसे त्यावेळी मुंबईत फुटबॉलचे क्लब होते. पुढील १० वर्षे अनेक टीम कडून खेळत अनेक स्पर्धा गाजविल्या. भीमराव यांचेवर तेव्हाच्या इंग्रजी वृत्तपत्रांतून रकाने छापले जाऊ लागले. मुंबईतील आपल्या १२ वर्षाच्या कार्यकाळात क्लब स्पर्धामधून त्यांनी ४०० सामने खेळले, तब्बल २५० गोल मारलेत. भीमराव वेगवेगळ्या स्पर्धामधून खेळत मैदान गाजवत होते. त्यातूनच १९४८ च्या ऑलम्पिक स्पर्धेच्या टीम मध्ये निवड झाली मात्र एका सराव सामन्यात पाय फॅक्चर झाल्याने देशाकडून खेळण्याची संधी हुकली. पुढील वर्षात भीमराव हे भारतीय टीम सोबत मलेशिया, कंबोडिया, इंडोनेशिया, म्यानमार, फिलिपिन्स, हाँगकाँग, थायलंड अशा देशात खेळले, या दौऱ्यातील २० पैकी १९ सामने जिंकले. भीमराव आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू झाले होते. इतके खेळून भीमराव यांचेकडे आर्थिक नियोजन नसल्याने परिस्थिती जेमतेमच होती. अशातच १९५१ साली त्यांनी निवृत्ती घेतली. अमरावती मध्ये परत आल्यावर त्यांनी आपला संसार थाटला, आर्थिक पाठबळ नसल्याने फुटकळ व्यवसाय केले. मात्र मी कधीकाळी आंतरराष्ट्रीय खेळाडू होते याचा कधी उल्लेख सुद्धा केला नाही, प्रसिद्धी पासून ते कायमच दूर राहिले. या काळात भीमराव यांच्या पत्नी अंजीरा यांनी जबाबदारीनं संसार सांभाळला. मुलांना मोठे केले. भीमराव शेवटपर्यंत मेहनत करीत राहिले. समाजात चांगले स्थान निर्माण केले. मात्र ते इतके मोठे फुटबॉलपटू होते ते अमरावतीकरांना काही माहिती झाले नाही. भीमराव यांच्या निधनानंतर या आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूचे कार्य पुढील पिढीला माहित व्हावे या उद्देशाने जी. बी. देशमुख यांनी या पुस्तकातून आपल्या तीर्थरुपांचे भावचित्र अगदी सोप्या सरळ भाषेत शब्दबद्ध करून महारुद्र च्या रूपाने वाचकांसमोर ठेवले. या लिखाणासाठी त्यांनी मुंबईत जाऊन त्या काळातील टाईम्स वृत्तपत्रांतील भीमराव यांचा उल्लेख असलेली कात्रणे मिळविली, त्यांच्या समवेत खेळलेल्या खेळाडूंना व पत्रकारांना भेटले, अमरावती मधील त्यांच्या समवयस्क परिचितांकडून त्यांची माहिती गोळा केली. त्यासाठी त्यांनी अथक अशी मेहनत घेतली. व २००५ साली हे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकाच्या पुढील आवृत्ती मेहता प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केल्याने ते पुस्तक महाराष्ट्रभर पोहोचले. या निमित्त्याने भीमराव यांचे कार्य, त्यांचा फुटबॉल खेळातील झंझावात मराठी माणसाला माहिती झाला. अमरावतीकर या नात्याने मला तर आपल्या मातीतील माणूस त्या काळात आंतरराष्ट्रीय पातळीवर झेंडा गाडून आल्याचा अभिमान वाटला. अशा अनेक अर्थाने महारुद्र महत्वाचे आहे. ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
सलिल तांबे

ज्यांना गोष्टींची आवड आहे अशा मुलांसाठी ही मेजवानी आहेच, पण आपल्या पाल्यांमध्ये संवेदनशीलता आणि निसर्गाप्रती आदर जोपासण्यासाठी मोठ्यांनीही हे पुस्तक वाचायला हवे. प्रदूषणाविरुद्ध लहान हातांनी दिलेला लढा असो किंवा निसर्गाचा खरा आनंद पिशवीत भरून आणण्यापक्षा मनात कसा साठवावा, हे सांगणारा दृष्टिकोन असो; हे पुस्तक प्रत्येक वाचकाला समृद्ध करते. पुस्तकातील प्रत्येक कथा संपताना आपल्याला जगण्याकडे बघण्याची एक नवी दृष्टी देऊन जाते. यातलं काही गूढ, काही थरार आणि खूप सारे हळवे प्रसंग अनुभवण्यासाठी तुम्हाला हे पुस्तक स्वतः वाचायलाच हवं. म्हणूनच, आपल्या संग्रही असावा असा हा `हाटूमुटूचा चंद्र` तुम्ही एकदा नक्की अनुभवा! चला तर मग, आपणही शोधूया आपला स्वतःचा ‘हाटूमुटूचा चंद्र’! ...Read more