* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: KINARE MANACHE
  • Availability : Available
  • ISBN : 9788171619382
  • Edition : 3
  • Publishing Year : AUGUST 1999
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 184
  • Language : MARATHI
  • Category : POEMS
  • Available in Combos :SHANTA SHELKE COMBO SET - 21 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
SHANTABAI IS JOTTING DOWN HER THOUGHTS IN A VERY RHYTHMIC STYLE AND EXPRESSING HERSELF STANZAS AFTER STANZAS SINCE LAST 50 YEARS. SHE HAS NOT STUCK TO THE FORM OF POETRY ONLY BUT HAS TRIED HER HANDS SUCCESSFULLY ON OTHER FORMS OF LITERATURE; YET POETRY IS THE AREA WHICH IS LIKE HER BREATH, HER HEART BEATS MORE RHYTHMICALLY HERE. THIS COLLECTION OF HER POETRY IS COMPILED OF HER MOST EXCLUSIVE POEMS. IT WAS VERY DIFFICULT TO MAKE A SELECTION FROM ALL HER POETRIES, EACH BEAUTIFUL AND PERFECT IN ITS OWN WAY. THE FAMOUS POETESS DR. PRABHA GANORKAR HAS CRITICALLY VIEWED HER POEMS AND TAKEN A REVIEW OF PROGRESS ON THE PATH OF POETRY. DR. GANORKAR HAS VERY ELABORATELY STUDIED AND METICULOUSLY DIAGNOSED THE POETRY, ITS MEANING, ITS MANIFESTATION, ITS PLUS POINTS, ITS MINUS POINTS, AND ITS POSITION IN COMPARISON WITH ITS CONTEMPORARY POEMS. THIS WILL HELP THE READERS IN UNDERSTANDING THE POEM IN A BETTER WAY AND IT WILL ALSO HELP THE SCHOLARS WHO ARE STUDYING THE LITERATURE IN DETAILS.
बाईंच्या दीर्घकालीन काव्य प्रवासाचा चिकित्सकपणे आणि सहृदयतेने घेतलेला वेध गेल्या अर्धशतकापासून शांताबाई काव्य लेखन करीत आहेत.इतर अनेक साहित्यप्रकार त्यांनी आतापर्यंत हाताळले असले तरी आत्मनिष्ठ कविता हीच त्यांची सर्वात आवडती निर्मिती राहिली आहे.`किनारे मनाचे` हा शांता बाईंच्या दीर्घकालीन काव्याप्रवासाचा चीकीत्सतपणे आणि सहृदयेने वेध घेणारा त्यांच्या निवडक कवितांचा संग्रह आहे.सुप्रसिद्धी कवयित्री आणि नामवंत समीक्षिका डॉ.प्रभा गणोरकर यांनी शांत बाईंच्या कवितेचा विकासक्रम इथे मार्मिकपणे उलगडून दाखविला आहे.तिचा आशय,अविष्कार,भाषेचे पोत,तिच्या मर्यादा आणि तिची शक्ती,त्याबरोबर समकालीन कवितेच्या संदर्भात तिचे असलेले नेमके स्थान या सर्व गोष्टींचा अत्यंत अभ्यासपूर्ण,मुलभूत आणि स्वतंत्र विचार डॉ.गणोरकर यांनी आपल्या विस्तृत प्रास्ताविकात केलेला आढळेल.एका जेष्ठ कवयित्रींचा या निवडक कविता आणि तिच्या सर्व काव्यलेखनाच्या हि सर्वांगीण समीक्षा काव्यासारीकांना आणि विशेषतः साहित्याच्या अभ्यासकांना उतबोधक वाटेल.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#आंधळी#कॅथरिन ओवेन्स पिअर#कादंबरी# शान्ता ज.शेळके#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%#THE HELENKELLERSTORY #CATHERINEOWENSPEARE #SHANTAJ.SHELKE #ANDHALI #ANDHALYACHE DOL #ANOLAKH #ANUBANDH #CHAUGHIJANI #GAVATI SAMUDRA #GONDAN #KAVITA SMARANATALYA #KINARE MANACHE #LEKHAK ANI LEKHANE #MEGHDUT #NIMITTA NIMITTANE #PAVSAAADHICHAPAUS #PURVASANDHYA #RANGRESHA #RESHIMREGHA #SANGAVESEVATALEMHANUN #SANSMARNE #SUVARNAMUDRA #VARSHA
Customer Reviews
  • Rating StarDAINIK KESARI 26-12-1999

    शांता शेळके यांच्या निवडक कवितांच्या संकलनाच्या प्रस्तावनेमध्ये प्रभा गणोरकर यांनी शांतबार्इंच्या कवितेचे मर्म अतिशय हृद्यपणे उलगडले आहे. शांता शेळके हे नाव त्यांच्या मधुर गीतांच्या, चित्रपटगीते, द्वंद्वगीते, भावगीते, कोळीगीते, भूपाळी आरती अशा विविध द्यरचनांच्या गेय आविष्कारातून महाराष्ट्रातील रसिक मनांच्या मनावर गेली कित्येक वर्षे अधिराज्य करत आहे. शांताबार्इंचे अन्य साहित्यिक आकृतीबंधही मराठी साहित्य रसिकांच्या मनात संस्मरणीय आहेतच; परंतु मनुष्याच्या आणि समाजाच्या मनोरचनेत वाचन संस्कृतीपेक्षा श्रवण संस्कृती अधिक रुळली असल्याने शांताबार्इंचे कवयित्री रूप काहीसे मागे पडल्यासारखे होते. वास्तविक गेली सत्तावन्न-अठ्ठावन्न वर्षे शांताबाई काव्य लेखन करत आहेत. १९६० पासून आजतागायत सातत्याने कविता लिहिताना त्यांनी कवितेची अनेक रूपे पाहिली. कवितेच्या नव्या-जुन्या वाटा आणि वळणे यांचा संस्कार आणि कवितेसंबंधी जागृत आत्मभान शांताबार्इंना आहे. कवींच्या तसेच वाचकांच्याही पिढ्या शांताबार्इंच्या लेखणीशी परिचित आहेत. इतक्या दीर्घकालीन पल्ल्यात भिन्न अभिरुचीच्या वाचकांना आनंद देण्याची तकद त्यांच्या कवितेत आहे. शांताबार्इंच्या कवितेचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या कवितेने जरी वेगवेगळी वळणे घेतली असली तरी ती भरकटत गेलेली नाहीत. स्वत:च्या जाणिवा आणि त्यांची अभिव्यक्ती यांच्याशी ती प्रामाणिक राहिली. उलट त्यांची कविता अधिक प्रगल्भ होत गेली. ‘वर्षा’ आणि ‘रुपवी’मधले त्यांच्या कवितेचे आत्मलक्षी रूप, निसर्ग प्रेम, यांची एकेरी अनुभूती आणि व्यक्तिगत रूप कमी-कमी होत जाऊन अनोळखी, जन्मजान्हवी आणि पूर्वसंस्था या संग्रहात शांताबार्इंची कविता चिंतनशील, व्यापक विचारांची होत गेलेली आहे. आयुष्याच्या वळणावरती आठवणी एकेक तेवत ठेवून उरात आपण विझून गेलो कैक (गोदण) किंवा अवघे नकार मनी दाटतात हाता धरले हात सुटतात पाहताना कधी मागे परतून पुसटही तेथे उरते ना खूण (गोंदण) असे अशा-निराशेचे आत्मलक्षी खेळ रंगविणारी त्यांची शब्दकळा अज्ञात विश्वाचा शोध घेऊ लागते. ऐल अंधुक उजेड, पैल काळोखाचा डोह त्यात तिरीप एखादी, तिचा पडतसे मोह दाट काळोखाच्या पोटी मंद चमकती लाटा काही अज्ञात भोवरे काही असंभाव्य वाटा (जन्मजान्हवी) शांताबार्इंना जनमजात प्रतिभेचे आणि तिच्या आविष्काराचे शब्दभाग्य लाभले आहे. शब्दांसवे मी जन्मले, शब्दांतून मी वाढले हे शाप, हे वरदान, हा दैवाने दिलेला वारसा, मी जाणते इतुकेचे की यांच्याविना कंगाल मी भाषण हे यांच्यावरी मी लाविते मजला कसा, शब्दांमध्ये जगणे मला शब्दांमध्ये मरणे पुन्हा. शांताबार्इंच्या मनाचे किनारे असंख्य कविता संग्रहातून वाचकांना भेटलेले आहेत. त्यांचा पहिला संग्रह ‘वर्षा’ १९४७ मध्ये निघाला. नंतरच्या काळात रुपसी, गोंदण, अनोळखी, जन्मजान्हवी, पूर्वसंध्या आणि इश्यर्थ अश एकूण सात कवितासंग्रहात त्यांची कविता अधिकृत झाली आहे. त्यांच्या कवितेची वैशिष्ट्ये शब्दांचा आणि मनाचा प्रक्षोभ व्यक्त करणाऱ्या निवडक १३६ कवितांचा हा कवितासंग्रह मेहता प्रकाशनाने अतिशय सुबक आवृत्तीमध्ये प्रसिद्ध केला आहे. -मल्हार कृष्ण गोखले ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book