* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: PANI KUTHAVAR AALA GA BAI...
  • Availability : Notify Me
     
  • ISBN : 9788171618189
  • Edition : 2
  • Publishing Year : NOVEMBER 1998
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 56
  • Language : MARATHI
  • Category : POEMS
  • Available in Combos :DAYA PAWAR COMBO SET - 6 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS IS A SECOND COLLECTION OF POEMS AFTER DAYA PAWAR`S KONDWADA. HIS AUTOBIOGRAPHY ` BALAUTAM` CONTRIBUTED VALUABLE TO MARATHI LITERATURE AND AT THE INTERNATIONAL LEVEL. HE ALSO REACHED HIS COSMIC `BALAUTAM`. IN SPITE OF THIS. DAYA PAWAR’S ORIGINAL ORIGIN REMAINS AS A GENUINE CONTEMPORARY POET. HE WROTE HIS OWN POEM IN KONDWADA. THERE IS A SIMPLE, EASY TO- USE AND NON -ACCELERATED MOVE TO REBEL AGAINST REBELLION. THIS DISCOVERY HAS BEEN SHOWN IN MORE COMPLEXITY AND OVERALL IN WHERE DID WATER COMES FROM? DAYA PAWAR SENSITIVITY IS ANOTHER IMPORTANT ASPECT IN THIS COLLECTION. THE HARD WORK OF THE YOUNGEST, THE OPPRESS WOMEN, THE MISERY OF THE DALIT WOMEN`S PAIN HAS PERSISTENTLY KEPT ON MANY PLATFORMS. FROM THE TOP OF THE COLLECTION ` WHERE DID WATER COMES FROM? IT IS UNDERSTOOD THAT IN THE LIFE OF DALIT WOMEN- IN HER Q- LEVEL, MERCY PAWAR EXPERIENCE A WHOLE SYSTEM.
दया पवार यांच्या ‘कोंडवाडा’ नंतरचा हा दुसरा कवितासंग्रह. त्यांच्या ‘बलुतं’ या आत्मकथनानं मराठी साहित्याला मोलाचं योगदान दिलं आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील त्यांचा लौकिक ‘बलुतं’मुळंच पोहोचला. असं असलं तरी दया पवारांचा मूळ िंपड हा अखेरपर्यंत अस्सल समकालीन कवीचाच राहिला. ‘कोंडवाडा’मधून त्यांनी स्वत:ची अशी वेगळी कविता नोंदवली. विद्रोहाच्या तप्त आवाजाच्या कोलाहलातही स्पष्टपणे ऐवूÂ येणारी साधी, संयत आणि न एकारलेली. ‘पाणी कुठंवर आलं गं बाई...’ मध्ये हा शोध अधिक प्रगल्भतेनं आणि समग्रपणे व्यक्त झाला आहे. दया पवारांच्या संवेदनशीलतेला या संग्रहात आणखी एक महत्त्वाचं परिमाण लाभलं आहे. सर्वांत पायतळी असलेल्या कष्टकरी, दलित स्त्रीच्या अपार दु:खाचं. लोकगीताच्या देशीय रूपबंधातून दलित स्त्रीच्या वेदनेचा करुण स्वर दया पवारांनी अनेक व्यासपीठांवरून सातत्यानं जागता ठेवला. ‘पाणी कुठंवर आलं गं बाई...’ या संग्रहाच्या शीर्षओळीपासूनच हे जाणवतं की, दलित स्त्रीच्या जगण्यात – तिच्या आQस्तत्वात, दया पवार सबंध व्यवस्थेचं प्रतिरूप अनुभवतात. भारताच्या सांस्कृतिक बेटांमधली दरी नाहीशी व्हावी यासाठी ‘माझी कविता बळी पडली तरी चालेल,’ असे दया पवारांनी कोंडवड्याच्या प्रस्तावनेत लिहिले आहे... ‘धारदार सुळ्यांच्या दरवाजाला हत्ती जसे चिपा होतात, तसं आपण हसत मरावं...’ त्यांच्या या भूमिकेचा पुनरुच्चार ‘पाणी कुठंवर आलं गं बाई...’मधूनही शेवटपर्यंत जाणवतो. कवी दया पवारांचे ‘समकालीनत्व’ अधोरेखित करणारा हा संग्रह मराठीच्या मध्यवर्ती प्रवाहात अनेक अर्थांनी महत्त्वाचा ठरावा. प्रा. प्रज्ञा लोखंड
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #KONDVADA #PANIKUTHVARALAGBAI
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAKAL 12-12-1999

    दलित स्त्रीच्या वेदनेचा करुण स्वर... आपल्या काव्यलेखनाच्या प्रेरणास्थानांविषयीची व प्रचलित काव्यविचार व परंपरेने चालत आलेली मराठी कविता यांच्यापेक्षा आपल्या कवितेच्या वेगळेपणाविषयीची जाणीव बहुसंख्य दलित कवींनी आपल्या कवितेतून प्रकट केली आहे. दया पवा हे या कवींमध्ये महत्त्वाचे नाव आहे. कोंडवाडा नंतरच्या त्यांच्या कविता पाणी कुठंवर आलं गं बाई ’ या संग्रहात चित्रित करण्यात आल्या आहेत. हा संग्रह त्यांच्या द्वितीय स्मृतिदिनाला प्रकाशित करण्यात आला. पवारांच्या कवितेचे वेगळेपण ‘कोंडवाडा’ मध्येच प्रकट झाले होते. दलित कवितेच्या महालात त्यांची साधी, संयत ठाम उभी होती. पवारांनी भोगलेले बरेवाईट सर्व अनुभव मनात साठवलेले आणि नंतर संयमशील वृत्तीने त्या अनुभवांचे प्रकटीकरण केलेले दिसते. त्यामुळे त्यांच्या कवितेत विद्रोह असला तरी आक्रस्ताळेपणा नाही. ती चिंतनशील कविता आहे. आपल्या उरातल्या जखमा हळुवारपणे,सौम्यपणे ती उघड्या करून दाखवते. आर्त स्वरात व्यथा गुंफून आवेगाने कड्यावरून कोसळणारी अशी ही कविता आहे. वाट्याला आलेला अनुभव कोणत्याही प्रकारचा साजशृंगार न करता ते मांडतात. ज्वालाग्राही अनुभव मनात खदखदत ठेवून ते सौम्यपणे त्याचा आविष्कार करतात. त्यामुळे येथे दलित वेदना आक्रस्ताळ्या भाषणबाजीत न सापडता चिंतनशील काव्यरूप घेतात. दया पवारांच्या कवितेचे हे विशेष ‘कोंडवाडा’तच दिसले होते. मग ‘पाणी कुठवर आलं गं बाई’ या नव्या संग्रहाचा विशेष कोणता? सामूहिक दु:खाचा शोध ते येथे अधिक प्रगल्भतेने घेतात आणि अधिक समग्रपणे व्यक्त करतात. वैयक्तिक अनुभवांतून सामूहिक आविष्कार हे या कवितेचे स्वरूप आहे. कवीचे अनुभव व कविता यांच्यामध्ये त्याचे व्यक्तिमत्त्व उभे असते. अनुभवाचा अर्थ शोधणे व त्या अथानुरूप मूळ अनुभवाचा आकार व घाट साधणे, ही प्रक्रिया ते व्यक्तिमत्त्व करीत असते. येथे दलित स्त्रीच्या वेदनेचा करुण स्वर दया पवार यांच्या संवेदनशीलतेला नवे परिमाण मिळवून देतो. स्त्रीचे दु:ख व्यक्त करण्यासाठी त्यांना लोकगीतांचा देशीय रूपबंध सहज हाती लागतो. ‘कोंबडा’, ‘बाजार’, ‘लोणी’, ‘आडाचं पाणी’, ‘चिलमाचं गाव’, ‘पाणी कुठवर आलं गं बाई’, ‘धरण’ या त्यांच्या कवितांना लोकगीतांच्या अर्थाला सादृश्य असा अर्थ व घाट लाभतो. ‘पाणी कुठवर आलं गं बाई’ आणि ‘बाई मी धरण बांधीते, माझं मरण कांडीते’ या विद्रोहाच्या अंगार फुलवणाऱ्या कविता नर्मदा आंदोलनाच्या प्रेरणास्थानी राहिल्या आहेत. दया पवारांनी कवितेला लढ्याचे साधन मानले आहे. त्यामुळे या कविता एखाद्या आंदोलनाच्या प्रेरणास्थानी राहणे म्हणजे त्यांनी प्रेयस प्राप्त करण्यासारखेच आहे. नारायण सुर्वे यांनी मराठी कवितेला सामाजिक संदर्भाची अपरिहार्यता प्रदान करणारी कविता दिली. तोच प्रकार पवारांच्या कवितेबाबत झाला आहे. सामाजिक संदर्भात बोलत असूनही ही कविता प्रचारकी थाटाची होत नाही, तर दलित जिण्याचा आलेख काढते. ती लढ्याचे साधन बनल्याने निराश होत नाही. जीवनातील एवढे भोग भोगूनही ती उदास बनत नाही. भविष्यकाळाची उत्तेजक स्वप्ने तिच्याजवळ आहेत. वेदनांच्या चित्रणाने भरलेली असूनही ती प्रचंड आशावादी आहे. दया पवार यांचा विकास व जागृती यांच्याशी त्यांची कविता समांतरपणे वाटचाल करीत राहिली, म्हणूनच प्रत्यक्ष जीवनानुभवाशी थेट नाते सांगणारी ठरली आहे. एका संयमित मनाने जीवनाच्या वेदनांचा समर्थपणे घेतलेला हा शोध आहे. संघर्षापेक्षा समर्पणशीलतेकडे झुकणारी ही कविता झपाटून टाकत नाही, पण समंजस मनाने घेतलेला मागोवा वाचकाला, श्रोत्याला अस्वस्थ करीत राहतो. -संतोष शेणई ...Read more

  • Rating StarNEWS PAPAR REVIEW

    लोकगीताच्या रूपबंधातून कष्टकरी स्त्रीच्या वेदनेचा करूण स्वर आळवणाऱ्या दया पवार यांच्या रचना बलुतंकार दया पवार यांच्या ‘बाई मी धरण, धरण बांधते’ आणि ‘पाणी कुठवर आलं ग बाई’ या कविता अत्यंत गाजल्या. दलित स्त्रीच्या जगण्यातले जीवघेणे दु:ख त्यांच्या या कवतांद्वारे वाचकांच्या हृदयाला चटका देऊन गेले. ‘कोंडवाडा’नंतरच्या त्यांच्या कवितांचा वारसा त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कन्या. प्रा. प्रज्ञा लोखंडे यांनी सिद्ध केला आहे आणि मेहता पब्लिशिंग हाऊसने तो ‘पाणी कुठवर आलं ग बाई’ या शीर्षकाने प्रकाशित केला आहे. अडतीस कवितांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर, येशू खिस्त, भगवान बुद्ध, पंढरीचा राया यांना उद्देशून केलेल्या कविता आहेत. ‘माय मराठी’, ‘गुणगान’ करणारी एक रचना आहे. दलित स्त्रीच्या भाव-भावनांचा विविध पातळ्यांवरचा आविष्कार करणाऱ्या काही कविता आहेत, भारताच्या सद्य:स्थितीतल्या विषमतेच्या चटक्यांचीही जीवघेणी वेदना बहुतेक कवितांमधून या ना त्या स्वरूपात प्रकट होत राहते. कलंक कायमच आपण या देशात, या समाजात नेमके कुठे आहोत याबद्दलचा संभ्रम सतत त्यांना सतावत राहतो. ‘मी तळ्यात की मळ्यात’ असा प्रश्न पडतो. अहंकाराचा बुडबुडा फुटला तरी माथ्यावरचा कलंक अजून पुसला गेलेला नाही, अद्वैताचा नाडा हाती लागत नाही, खाली पाय ठेवावा, तर निसरड्या शेवाळावरच तो पडतो. (किती पायऱ्या उतराव्या), या तुमच्या दुनियेत, तुमच्या संस्कृतीत आपल्या पायाखाली सतत रक्ताचे सडेच पसरलेले दिसतात. तुमच्या पोशाखी संस्कृतीत आपले नाकडेपणच उठून दिसते. तुमचा मुखवटा घालून जगणे अशक्य होते. आपण सतत वधस्तंभाकडेच चाललोय, अशी पदोपदी जाणीव होते. (वधस्तंभ), अशी आपली घुसमट ते व्यक्त करतात. अमेरिकेतही भारताची आठवण अमेरिकेच्या दौऱ्यातील प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्या काही कविता या संग्रहात आहेत. मारूतीसारखे सातासमुद्रापलीकडे उड्डाण करून गेल्यावर कोकणच्या राजा झिम्मा खेळतो - हेच गाणे ओठावर येते. तेथील पितळी कुंडीतले कॅक्टस बघून तुळशीवृंदावन आठवते, नाइट क्लबमधील स्ट्रिपटीझ बघताना रासलीला आठवते. निग्रो वस्तीचे हार्लेम बघताना गोलपाठीचे स्मरण होते. त्या कोणा अक्करमाशाच्या आईच्या गाईसारख्या डोळ्यात आपलीच आई दिसते. अशी सारखी त्यांना भारताची सतत आठवण होत राहते. आर यू इंडियन ? न्यूयॉर्कमधला स्वातंत्रता देवीचा पुतळा प्रथम हसताना दिसतो, नंतर त्यावर आपलेच थेंब थेंब रक्त सांडताना दिसते. पंचतारांकित हॉटेलात पाणी मागितल्यावर मद्याची सुरई घेतलेली काळी राणी ‘आर यू इंडियन’ असा प्रश्न विचारते, तेव्हा त्या प्रश्नाने जिव्हारी बाण लागल्यासारखी जखम होते. भारतात पाणी मागितल्यावर जात आठवते; येथे स्वतंत्रता देवीच्या देशातही तेच भागधेय वाट्याला येते. कुठेही गेले तरी जात वा देश विचारला जातोच (स्वतंत्रदेवतेचा पुतळा) हा जय कुणाचा ? पराभव कुणाचा ? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी खेडी सोडा-शहरात चला असा संदेश दिला. शहरात धर्मांधता-कर्मकांड-भेदभाव यांनी अपमानित व्हावे लागणार नाही, असा युक्तिवाद त्यांनी केला होता. परंतु आता या शहरातूनही चौकाचाकात धर्मांधता उफाळून आलेली दिसते, याबद्दलची खंत प्रकट केली आहे. (बाबा, कालपरवाची गोष्ट), बाबांच्या नावाचा ध्यास घेऊन इतकी वर्षे बरबाद केली म्हणून तुम्ही हसत तर नाही ना ? असा सवाल करून मराठवाडा विद्यापीठाला त्यांचे नाव दिले गेले, तेव्हा ही काही एका दिवसाची कमाई नव्हे, पुन्हा पुन्हा खांडववन पेटून हरळीच्या मुळीसारखे तक्षक तरले म्हणून आजचा दिवस उगवला असे कवी म्हणतो. बाबा, तुमच्या नावाचा विटाळ आज संताच्या भूमीत धुतला गेला हा जय कुणाचा - पराभव कुणाचा दिव्याने दिवा पेटत गेला मनामनात दडलेला काळोख मिटला (बाबा) येशू खिस्त आणि भगवान बुद्ध येशू खिस्ताचा जन्म गोठ्यात झाला. गावकुसाबाहेर झाला. मानवमुक्तीसाठी तो एकाकी लढला. सत्तेचे जुलमी तख्त त्याने उलथवले, क्रूसावर रक्त सांडूनही सर्वांवर दयेची पाखर घातली. गाईच्यासारख्या त्याच्या डोळ्यातून करुणेचा पान्हा उमळून आला. ‘येशू तू आमच्यासाठी हंबरलास’ अशी आपली भावना ते प्रकट करतात. भगवान बुद्ध अजंठ्याच्या लेण्यातील आडव्या फत्तराप्रमाणे चिरनिद्रा न घेता विकलांग आम्रपालीच्या जखमा धूत होता आणि हाताने तिला विझवणारा घालत आहोत; म्हणून कवी आपला आदरभाव व्यक्त करतो. पंढरीच्या रायावर मात्र तो धारेवर धरणाऱ्या सवालांची एकापुढे एक सरबत्ती करतो. पंढरीच्या राया चोखा का बाहेरी ? तूच खरा डोंगा दाविली पायरी तुझे भक्तगण देवळाच्या दारी निर्मिली रे भिंत कर कढेवरी का रे घबरशी, लपशी गाभारी ? आणि नंतर कवी त्याच्या दांभिकपणावरच सरळ हल्ला चढवतो. उन्हापावसात कण्हते पायरी छत्र चामरात तू आत भरजरी चांदीचे डोळे तुझे गाले गारगोटी (पायरी) माझा कोंबडा कुणी मारला बाई (कोंबडा) घुसळ घुसळीने बाई - अजून लोणी का ग न्हाई, (लोणी), मांडव रचता रचता उभी हयात ग गेली (मांडव), आडाचं पाणी बाई खोलवर, हाताचा आले फोड (आडाच पाणी), केलं रक्ताचं शिपान येल मांडवाला गेली, गोऱ्या गोऱ्या दंडावर बाई चोळी मी गोंदली, (चोळी), सोन्याची बाई सुरी तिला चांदीची ग धार, कोन दळती दळती जात्यात, बाई मी चिधीत ग सांधीत, जात्यावरचा वरचा दिसता हात कोन हसती हासती बाई सुपात (चिलमाचं गाव), या लोकगीतांच्या लयीतल्या गीतांच्या बाज स्त्री जीवनातल्या सुखदु:खांना समर्थपणे कवटाळतो. ‘‘बाई मी धरण, धरण बांधीते, माझं मरण, मरण कांडीते’’ आणि ‘‘पाणी कुठवर आलं ग बाई’’ या दोन गीतांनी तर अनेकांना भुरळ घातली आहे. तुझे पांग कसे फेडू ? ‘माय मराठी’ या कवितेतूनही दया पवार आपली अंतरीची वेदना प्रकट करतात. धर्ममार्तंडाची कोट रचल्याने पोथी-पुराणात मराठी भेटली नाही, पण जात्यावरच्या ओव्यांत मराठी भेटली, धुळपाटीवर शब्द गिरवता आले, मूक नायकाच्या हाती लेखणी आल्यावर आता दु:खाची गाणी वेशीवर टांगण्याचे बळ लाभले. आता मात्र ‘माय मराठी गे तुझे पांग कसे फेडू’ असे गदगदून आले आहे. दया पवार यांच्या अल्पाक्षरी कवितेतील स्त्री मनाचे भावदर्शन आणि एक दलित म्हणून भोगाव्या लागलेल्या दु:खाचे निवेदन संवेदनाक्षम मनावर नक्कीच आघात करील. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

BHARTIYA GANIKA
BHARTIYA GANIKA by DR.S.R. DESHPANDE Rating Star
डॉ. शुचिता नांदापूरकर-फडके

मंडळी, कालच्या ऱ्हासचक्रानंतर मी विचार करत होते की आज काय? पुस्तकं तर काही वाचून ठेवली होती (म्हणजे वाचली आणि ठेवून दिली बाजूला... अक्षरशः). आत्ताची समोर आहेत ती. कदाचित त्यातलं एखादं उद्या घेईन. मध्ये अचानक या पुस्तकाची जाहिरात वाचली, अगदी गेल्या ठवड्यातली गोष्ट. उत्सुकता चाळवली. समूहात काहीतरी आगळं वेगळं पुस्तक घ्यावं हा विचार सतत मनात असतोच. तसं पुस्तक घरी येताच (जय amazon) चाळायला म्हणून बसले, आणि काय सांगू, हातात मार्कर कधी आलं, मी खुणा कधी केल्या, पुस्तक कधी संपलं... कळलंच नाही. एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगते... प्रेयर पुस्तकाला तुम्ही जो भरघोस प्रतिसाद दिलात, अनेकांनी ते विकत घेण्याचा विचार केला तेव्हाच सांगायचं होतं, पण राहिलं. ओळख करून दिलेलं पुस्तक पूर्णपणे वाचनीय असतं असं नाही. त्याचा बरचसं भाग बोजड असतो. पण ते नाही का, डेटिंगच्या काळात मुलगा मुलगी स्वतःमधलं केवळ उत्तम ते दाखवतात, तसं मला प्रेयर बद्दल वाटलं. आय मीन प्रेयर पुस्तकाबद्दल वाटलं आणि गणिका या पुस्तकाबद्दल मला नेमकं तेच वाटत आहे. ========== ‘भारतीय कामशिल्प’ या पुस्तकाचं लेखन करत असताना प्राचीन भारताच्या समाजजीवनाची माहिती देणारे अनेक संदर्भग्रंथ वाचण्यात येऊन लेखकांची उत्सुकता चाळवली गेली आणि जेव्हा या विषयावर मराठीत एकही परिपूर्ण संदर्भग्रंथ नाही हे लक्षात आलं, तेव्हा त्यांनी स्वतःच या पुस्तकाचं लेखन मनावर घेतलं. केवळ सनसनाटी विषय सवंगपणे हाताळला आहे असं कुठेही वाटत नाही. अतिशय अभ्यासपूर्वक लेखन आहे. सोबत जोडलेली संदर्भग्रंथांची यादी (एकूण संख्या ६४) पुरेशी आहे. गणिका आणि उर्वरित श्रेणी या शरीरविक्रय करतात, हा वैश्विक व्यवसाय आहे. कैक काळापासून या व्यवसायाला मान्यता मिळाली आहे आणि त्याची आवश्यकता वाटली आहे. प्राचीन काळात भारतीय गणिका यांना एक संस्कृती आणि दर्जा होता. नीतीनियम होते, ते पाळावे लागत होते. पुस्तकाची प्रकरणं – प्रास्ताविक, विदेशी गणिका, भारतीय साहित्यातील गणिका, गणिकेची प्रशिक्षण व वर्णन, गानिकांची वेशभूषा, सौंदर्यप्रसाधने, विट, गणिकामाता, प्रियकराचा राग-रंग, कथांविषयी थोडेसे आणि कथा (या शेवटच्या प्रकरणात एकूण १३ कथा आहेत – अगदी सुरस आणि चमत्कारिक वाटाव्यात अशा, त्यांचा परिचय मी देणार....... नाही.) प्रास्ताविक – (नऊ पानांचं प्रकरण) कुटुंब किंवा विवाहसंस्था कधी आकाराला आले हे नक्की सांगता येत नसलं तरी स्त्री-पुरुष शरीरसंबंध हे आदिम असून ते पशु – पक्ष्यांप्रमाणेच जनन हेतुस्तव नैसर्गिक होते आणि राहतील. फलन हे स्त्रीदेहामध्ये होतं या जाणीवेतून तिला आदरस्थान प्राप्त झालं. सर्जनाची गूढ शक्ती धारण करणारी ती आदिमाया/माता/ अद्याशक्ती होय. जवळपास प्रत्येक धर्मात प्रजा, पशु आणि धान्य समृद्धीसाठी सुफलता विधी आहेत. भारतीय हिंदू धर्म शास्त्रीय ग्रंथांतून स्त्री पवित्र्याच्या कथा वाचायला मिळतात. पतीला परमेश्वर मानलं जाई. त्याही काळात गणिका हा व्यवसाय होता आणि त्याकडे सहिष्णू वृत्तीने पाहिलं जाई.राजे महाराजे त्यांचे पोशिंदे असतं. शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रिया तिरस्काराला पात्र असत, पण गणिका नाही. त्यांना नगर भूषण, नगर अलंकार, नाग्त रत्न मानलं जाई. प्रसंगी, राजे त्यांचा सल्ला घेत. त्या बहुश्रुत असतं चौसष्ट कलांत पारंगत असतं. संभाषणचतुर, हुशार, समंजस, उदार, योग्य आदर राखणाऱ्या, विनयशील आणि अनुपम सौंदर्यवती असत. एखाद्या गणिकेमुळे त्या राज्याची कीर्ती वाढत असे. धार्मिक समारंभ, सामाजिक कार्यक्रम (विविध झुंजी, शर्यती), करमणुकीचे कार्यक्रम (जलक्रीडा, वनविहार), रंगमंचावर अभिनय, अशा नानाविध ठिकाणी त्यांची ठळक उपस्थिती असे. रथारूढ अथवा सिंहासनाधिष्ठ राजाला वारा घालणे, चवरी ढाळणे, छत्र धरणे अशी कामं त्या करत. त्यांच्याशी संबंध ठेवणं समाजमान्य होतं. प्रतिष्ठितांचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन व्यापक, अगत्यशील आणि स्नेहिल होता. मात्र, त्यांना कडक आणि कठोर नियम पालन करावे लागे.विजयनगर साम्राज्याच्या अस्तानंतर ते पेशवाई संपेपर्यंतच्या काळात, मोगल राजवट येऊन गेली, ब्रिटीश वसवतवादाचा प्रसार सुरू झाला, समाज व्यवस्था बदलली, गणिका संस्कृतीला ओहोटी लागली. ब्रिटीशांचा अंमल सुरू झाल्यावर गणिका संस्था नष्ट होऊन वेश्या व्यवसाय वाढीला लागला. यामागे औद्योगिक क्रांती हे एक कारण आहे. वेश्यागमन निंद्य कृत्य मानलं जाऊ लागलं. तरुण अधिकाधिक सुशिक्षित होऊ लागला तसा शरीरसंबंधांपायी स्वास्थ्य गमवावं लागलं तर काय, हा विचार थोडाफार मूळ धरू लागला. आणि या शौकाची आसक्ती कमी झाली. चरितार्थाकरता पैसे मिळवण्यासाठी वेश्याव्यवसाय हादेखील विश्वसनीय आर्थिक व्यवसाय मानण्यात यावा असा निकाल १९११मध्ये युरोपियन न्यायालयाने दिला. विदेशी गणिका – (२७) बहुतेक सर्व प्राचीन संस्कृतीत गणिकांचे पुरावे मिळतात. इजिप्त, बबिलोन, सिरीया, फिनिशिया, ही काही उदाहरणं. ग्रीस, इटली, भारत इथे त्यांना विशिष्ट दर्जा प्राप्त झाला. त्यांचेही प्रकार होते, सामान्य वेश्या अलेत्रय्डी, आणि सर्वोच्च म्हणजे हेटीअरा (या शब्दाचा अर्थ सोबती). काही हेटीअरा वादविवादपटू होत्या. क्लेप्सीड्रा हिच्या वक्तशीरपणामुळे तिला ते नाव मिळालं होतं त्याचा अर्थ जलघटिकापात्र असा होतो. थीओफ्रत्स याने इ.पू. ३७२ – २८७ या काळात ‘ऑन मरेज’ हा ग्रंथ लिहिला, याचा सविस्तर अभ्यास करून लिओंटीयम या हेटीअराने त्यावर प्रगल्भ टीका लिहिली. रोमन समाजात कोर्टीझन अस्तित्वात होत्या. पॉम्पेई इथे व्हिकोली बाल्कोन पन्सिली नावाच्या इमारतीत शेकडो रमणी वास करत. या संदर्भातली रतिक्रिडेची मूळ चित्रं पॉम्पेईन wall paintings म्हणून प्रसिद्ध असून ती इटलीच्या वस्तुसंग्रहालयात सुरक्षित आहेत. रोमन साम्राज्यात हेटीअरा ऐवजी कोर्टीझन शब्द रूढ झाला. युरोपात पंधरा-अठरा शतकांत कोर्टीझन आणि कलावंतीण यांना समाजात विशिष्ट स्थान आणि आदर मिळत होता. फ्रान्समध्ये सतराव्या शतकात रमणींची सत्कारगृहं (सलो) प्रसिद्ध होती. जपानमध्ये गै (कलात्मक क्षमता) आणि शा (व्यक्ती) यावरून गैशा ही संज्ञा रूढ झाली. त्यांच्यात अलंकारिक सुरावट, सौजन्य, निष्कपट, सुसंस्कृतपण असे. बाराव्या शतकापासून कार्यरत असलेली ही प्रथा इडो काळात (इ.स.१६००-१८६८) अधिक वाढीला लागली. ओकिया ही त्यांची निवासस्थानं होत. विसाव्या शतकात त्यांचं वर्चस्व राजकीय क्षेत्रात वाढीला लागलं. १९२०-३० मध्ये त्यांची संख्या साधारण ८० हजार होती, ती १९७०-८० दम्यान १७ हजार इतकीच उरली आहे. चीनमध्ये पूर्वी पीकिंग (बीजिंग) इथे सिंगसॉंग हाउस हा भाग राखीव होता. शांघाय इथे अत्यंत विलासी वारांगना गृहं आहेत. सिंगापूरमध्येगिटार गर्ल्स (पीपाचाई) या नावाने त्या ओळखल्या जातात. पाकिस्तानात त्या तवायफ, कान्जारी आणि गश्ती नावाने ओळखल्या जातात. आज मात्र सर्वत्र आमुलाग्र बदल झाला आहे. भारतीय साहित्यातील गणिका – (३२) संस्कृत, प्राकृत, पाळी भाषांत, हिंदू, बौद्ध, जैन वान्ग्मयात, त्यांचा उल्लेख आढळतो. त्या वैदिक काळात भारतात होत्या हे काही ऋचांवरून समजतं. (ऋचा १.१६७.४ – अनेक पुरुषांशी सांग करणारी ती साधारणी). पंचचुडा अप्सरेपासून त्यांची उत्पत्ती झाली असं मानतात. महाभारत काळात त्यांना प्रतिष्ठा प्राप्त झाली. (राज, नागरी, गुप्त, देव आणि ब्रह्म असे पाच प्रकार होते). रामायणात फार स्थान नव्हतं. अमरकोश, महाभाष्य, वार्त्तिके, दशरूपक, कौटिलीय अर्थशास्त्र जातक कथा, पंचतंत्र, वेताळकथा, शुकबहात्तरी, गाथासप्तशती, अशा विविध ग्रंथांत त्यांचा उल्लेख आहे. कामसूत्र या ग्रंथात वात्सायनाने ‘वैशिक’ या प्रकरणात त्यांची माहिती दिली आहे. कथासरीत्सागर, राजतरंगिणी, शृंगारतिलक, सरस्वतीकंठभरणा, कलाविलास, मेघदूत, मृच्छकटिक, रत्नावली, नागानंदा, अशा नाटकांतून त्यांचा उल्लेख येतो. भारतात इ.पू. पहिल्या सहस्रकात ती प्रथा अस्तित्वात येऊन ब्रिटीशांच्या आगमनानंतर एकोणिसाव्या शतकात लोप पावली असावी असं समजलं जातं. गणिकेची प्रशिक्षण व वर्णन – (१६) गणिकेला बालपण जवळपास नव्हतच. वयाच्या सहा-सात वर्षापासून तिला घडवायला सुरुवात होत असे. त्यांच्या प्रशिक्षणात आचार, विचार, शिष्टाचार, विविध कला, खेळ, भाषा, वर्तन, सौंदर्यवर्धन, गायन, वादन, नृत्य, अलंकरण, शरीर सौष्ठव, बुद्धिवर्धन अशा प्रत्येक अंगाचा व्यापक विचार होता. काही हस्तकला शिकाव्या लागत. पाककला, सुगंधी द्रव्य निर्मिती, कामशास्त्र, प्रणायाराधन, हिकाव्म लागे. स्वसंरक्षण शिकावं लागे. गणिकांची वेशभूषा, सौंदर्यप्रसाधने – (५) आधीच्या प्रशिक्षणात हाही एक महत्त्वाचा भाग होता. विट – (७) हा शब्द मी पहिल्यांदाच ऐकला. त्याचा इथे दिलेला अर्थ – शृंगाररस नायकानुचराप्रमाणे संपत्तीचा भोग न घेणारा किंवा जो आपल्या पैशाचा वापर कधी करत नाही, असं नाटकातलं लबाड, धूर्त पात्र. गणिका संस्थेत त्याच्या जोडीने वयस्य, अनुचर, धूर्त आणि डिंडिक ही पुरुष पात्र वावरतात. प्रतिवेशिनी ही गणिकेची शेजारीण. ती विश्वासातली. ती गणिकेसाठी विट आणि प्रियकर यांच्याशी संवाद साधते. गणिकामाता – (७) हे पात्र फार महत्त्वाच. तिला संरक्षित स्त्री, कुट्टनी किंवा कुट्टीनी म्हटलं जाई. तिचं काम शिस्त राखणे, थोडक्यात रेक्टर. कामकुजानांना आळा घालणं, गणिकांना खऱ्या प्रेमापासून वंचित ठेवणं. कामुकांचं मानसशास्त्र तिला मुखोद्गत. पुरुषांच्या गुणदोषाच्या’ आधारे अचूक आडाखे बांधत ती गणिकेला सल्ला देता. तिचा दबदबा असतो. ते नसती तर गणिका ही संस्था कधीच नामशेष झाली असती. कारण स्त्रिया या स्त्रिया असल्याने स्त्रीसुलभ भावनेनुसार गणिकागिरीत न रमता त्या केव्हाच संसाराला लागल्या असत्या. प्रियकराचा राग-रंग – (९) रग हे बारा छटांमधली काम आसक्ती असं म्हणता येईल. पुरुषाची मनोवृत्ती, प्रवृत्ती, स्वभाव, गुणविशेष आणि खास करून राग-लोभ जाणून घेत गणिकेला त्याच्याशी वर्तन करावे लागते. कथांविषयी थोडेसे आणि कथा (४८) – ‘शृंगारमंजरीकथा’ हा राजा भोज रचित संस्कृत ग्रंथ असून त्यात स्त्री-पुरुष मनोवृत्ती दर्शन घडवणाऱ्या तेरा कथा आहेत. त्यापैकी काही जीर्ण, काही अपूर्ण आहेत. पैकी एक कथा वाचून दाखवते. संदर्भग्रंथ (४) सोबत फोटो दिले आहेत त्या पानांचे. या पुस्तकात आढळलेले सुंदर शब्द – गरती, लीलासहचारी, पृथुल (अर्थ कळला नाही अजून), रूपाजीवा, सूरसुंदरी परिचय फार लांबला. या विषयावरच्या इतक्या अभ्यासानंतर एखादा पेपर सहज देता येईल. परत अभिमानाने म्हणता येईल, ‘मा, मै फर्स्ट क्लास फर्स्ट आया!’ मनापासून धन्यवाद. माझी परिचय पाळी नसती तर मी हे पुस्तक वाचलंच नसतं. मजा आली मला वाचताना. तशी तुम्हालाही आली असेल अशी खात्री आहे. थांबते. ...Read more

RESHIMREGHA
RESHIMREGHA by SHANTA J SHELAKE Rating Star
मीना कश्यप शाह

शांता शेळके या कवयित्री म्हणून आपल्या सर्वांच्या माहितीच्या आहेतच. गीतकार म्हणूनही त्यांचे मोठे नाव झाले. रेशीमरेघा हे त्यांनी रचलेल्या गीतांचे पुस्तक. मुख्यतः त्यांनी चित्रपट आणि नाटक यासाठी गीते लिहिली आहेत. प्रस्तावनेत शांताबाई म्हणतात, गीते लििणे त्यांना अतिशय आकर्षक वाटत गेले आणि म्हणून केवळ चित्रपट आणि नाटकांसाठीच नाही, तर स्वानंदासाठीही, त्या गीतं लिहित राहिल्या. चालीवर गीते लिहिणे त्यांना आव्हानात्मक वाटायचे, बंधनकारक नाही. पुढे बंगाली, गुजराती अशा काही गीतांच्या चाली आवडल्या, तर त्या, त्या चालींवरही छंद म्हणून गीते लिहू लागल्या. त्यांच्या गीतांमध्ये लावण्या, गवळणी, नृत्यगीते आणि युगुलगीते (त्यांनी द्वंद्वगीते हा शब्द वापरला आहे, जो मला आवडत नाही) जास्त आहेत. ह्या पुस्तकात त्यांचे संकलन आढळून येतं. पुस्तकातील काही गीतांपेक्षा मला त्यांची प्रस्तावनाच जास्त आवडली. आपल्या गीतांबद्दल त्यांनी हळुवार होत लिहिलं आहे. प्रत्येक गाणं ध्वनिमुद्रीत होतानाचे क्षण त्यांना आठवतात. आणि ही गीतं प्रसिद्ध होण्यासाठी संगीतकार, गायक यांचा हातभार नक्कीच आहे याची त्या आठवण काढतात. गीतांचा अर्थ रसिकांपर्यंत पूर्णपणे पोहोचवण्यासाठी गायक-गायिकांचा खूपच मोठा वाटा आहे, त्यांच्याबद्दल त्या अपार कृतज्ञता व्यक्त करतात. हे पुस्तक त्यांनी लावणेसम्राज्ञी यमुनाबाईंना अर्पित केलेले आहे. त्यान्नी लिहिलेल्या "रेशमाच्या रेघांनी" या सर्वात जास्त प्रसिद्ध पावलेल्या लावणीच्या नावावर ह्या पुस्तकाचे नाव आधारित आहे. अनेक प्रसिद्ध गाणी या गीत संग्रहात आढळतात. रेशमाच्या रेघांनी, काय बाई सांगू, मनाच्या धुंदीत लहरीत, हे श्यामसुंदर, राजसा, शालू हिरवा पाच नि मरवा, चाल तुरू तुरू, मनाच्या धुंदीत लहरीत येना आणि अशी अनेक. शांताबाईंचं काव्य सामर्थ्य ह्या लावण्या/गीतांमध्ये देखील दिसून येतं... कळ्या आजच्या, शिळ्या उद्याला, ओठांशी न्याल का, आल्यावर जवळ मला घ्याल का.... अशी अनेक उदाहरणं! पुस्तकातील बहुतेक गाणी ही लावण्यांच्या स्वरूपातली आहेत. त्यामुळे त्याच त्याच भावना सारख्या सारख्या आढळून येतात. बोलावणे किंवा नको जाऊ म्हणणे, भेटी (गिफ्ट्स) घेणे, वाट पाहणे, विरह, सौंदर्याचे वर्णन, शृंगाराचे वर्णन, म्हणजे तुम्हाला काय मिळू शकेल याची कल्पना गीतातून देणे (उदा. कंबरपट्टा रेखून दावी, देहाचा आकार!!) अशा प्रकारचे विषय पुन्हा पुन्हा येत राहतात, पण (शांताबाई बीइंग शांताबाई) कुठेच तोचतोचपणा कंटाळवाणा होत नाही (वाचकाने जरा रोमँटिकपणा दाखवून वाचली ही गीतं तर फारच बहार!) शांताबाई नथ फारच आवडते असं दिसतं... नथ सर्जाची नाकी घालता हसेल डावा गाल किंवा सलगी करते नथ ओठांशी, तो तुमचा अधिकार अशा प्रकारे ती खुलून देखील दिसते ह्या गीतांमधे!! अनेकविध लावण्या आहेत ह्या पुस्तकात. पाडव्याची, रंगपंचमीची, श्रावणाची, अशा विविध दिवसांच्या लावण्या तर हिरव्या रंगाची लावणी देखील आहे. पाडव्याची लावणी म्हणजे पाडव्याला शालू मागते आहे, कारण ती रात्री एकांतात उभारणार आहे. 🙂 "मी सुंदर आहे तर आता मी काय करू?" अशी तक्रारही दिसून येते. "माझ्या नखऱ्याच्या शंभर तऱ्हा" सांगणारीला स्वतःच्या सौंदर्याची पुरेपूर जाणीव आहे आणि त्यापेक्षाही, फक्त शारीरिक सौंदर्यावर विसंबून न राहता, त्याबरोबर तोरा दाखवत भुरळ पाडणे ह्यात ती माहीर आहे. पण त्याचबरोबर ती धोक्याची सूचना पण देते आहे... घटकाभर संग बसून घालवा वेळ, जमल्यास मनांचा जमून येईल मेळ, नाहीतर यायचा अंगाशी हा खेळ, पाय टाकण्याआधी इथे, विचार पुरता करा, माझ्या नखऱ्याच्या शंभर तऱ्हा!! एका लावणीत एका पुरुषाने फसवलंय अशा स्त्रीचे रूप आहे. जत्रेत एक जण भेटला आणि त्याने आपल्याशी फ्लर्ट केलं, जत्रा उलगडल्यावर दुसऱ्या दिवशी मात्र तो डोळ्याला डोळा भिडवत नाही, तोंड चुकवून पुढे जातो, ह्याची तक्रार ह्या लावणीत येते. किती विविधता! अशा लावणी कलाकाराच्या आयुष्याचं विदारक दृश्य देखील शांताबाईंनी दाखवले आहे. तिथे येणारा आज एक, तर उद्या दुसराही असू शकेल किंवा तिथे असणारी आज एक, तर उद्या दुसरीही असू शकेल. हे सांगून त्या म्हणतात... प्रीतीचे नीतीचे व्यर्थ सांगणे, भुकेल्या देहाचे सारे मागणे, जन्माच्या नात्याचे फुका बहाणे, कुणाला सतत इथे राहणे? इथल्या महाली घडीची वस्ती, सुखाचे हिंदोळे आभाळी चढती, घडीत वरती घडीत खालती ऐन विशीतल्या स्त्रीचं सौंदर्याचं अत्युत्तम वर्णन एका गीतात केलं आहे. अनेक गीतांमध्ये पुरुषांनी स्त्रीच्या देहाचे आणि मनाचे केलेले वर्णन दिसून येते. त्यातही नुसता देहच नाही तर स्त्रीचा तोरा (attitude) देखील पुरुषाला कशी भुरळ पाडतो हे दिसतच. "ही चाल तुरुतुरु" आपल्या सगळ्यांच्या आवडीचे आणि माहितीचे आहे. असंच "मनाच्या धुंदीत लहरीत ये ना" हे देखील. गीतांमध्ये श्रावण, पाऊस, विरह, वाट बघणे हे सर्व हमखास येतं. एक गीत आहे "लहरी सजण कुणी दावा" - मीना खडीकर यांचे संगीत, उषा मंगेशकर यांचा आवाज. हे गीत मला ना वाचायला आवडलं ना ऐकायला आवडलं 🫣 श्रीकृष्ण राधेच्या कथा तर आपण गवळणींमधे अनेक वेळा ऐकल्या आहेत. कृष्णाची धून ऐकल्यानंतर अगदी काहीही न सुचता तशीच्या तशी निघालेली राधा! त्यातही तिच्या शृंगारचं वर्णन येतंच. सजण्याची आवड असलेल्या स्त्रीचे वर्णन अतिशय खुबीने शांताबाईंनी केले आहे. मला स्वतःला नटण्या मुरडण्याची अतिशय हौस असल्यामुळे हे सगळं वर्णन वाचून, "हे पुस्तक आपण आधी का नाही वाचलं" याचं दुःख मात्र झालं. ही उदाहरणं बघा ना... माथ्यावर मोतियाची जाळी, भांगेत मोती सर, चंद्रकोर भाळी, कानात झुमके, केसांमध्ये वेल, नाकात नथ, नथित हिरे, बिल्वदळे, वज्रटिक, `बोलताना पाठीवर जिचे रेशमाचे गोंडे खालीवर होतील अशी` पाच पदरी मोहन माळ!! दंडात वाकी रुताव्या, शिंदेशाही तोडे असावेत आणि पायी सांध्यात सोनसळी, गळ्यात तन्मणी, कमरेला कंबरपट्टा, पायी पैंजण.... "शालू हिरवा, पाच नि मरवा, वेणी तीपेडी घाला" हे गीत तर फारच प्रसिद्ध झाले. शृंगार आणि सौंदर्य यांचे वर्णन या सगळ्या गीतांमध्ये अगदी खुलून आलेलं आहे. आणि प्रेम! त्याविषयी किती लिहावं आणि कशाप्रकारे लिहावं असा मोठाच प्रश्न पडला आहे. तरीही एका स्त्रीच्या मनाने वाचलेल्या ह्या चार ओळी लिहीतेच... काय वाजले प्रिय ते पाऊल, तो तर वारा तिची न चाहूल, भास हो फसवा वरचेवरी, शोधितो राधेला श्रीहरी!! ...Read more