* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: PANI KUTHAVAR AALA GA BAI...
  • Availability : Available
  • ISBN : 9788171618189
  • Edition : 2
  • Publishing Year : NOVEMBER 1998
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 56
  • Language : MARATHI
  • Category : POEMS
  • Available in Combos :DAYA PAWAR COMBO SET - 6 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS IS A SECOND COLLECTION OF POEMS AFTER DAYA PAWAR`S KONDWADA. HIS AUTOBIOGRAPHY ` BALAUTAM` CONTRIBUTED VALUABLE TO MARATHI LITERATURE AND AT THE INTERNATIONAL LEVEL. HE ALSO REACHED HIS COSMIC `BALAUTAM`. IN SPITE OF THIS. DAYA PAWAR’S ORIGINAL ORIGIN REMAINS AS A GENUINE CONTEMPORARY POET. HE WROTE HIS OWN POEM IN KONDWADA. THERE IS A SIMPLE, EASY TO- USE AND NON -ACCELERATED MOVE TO REBEL AGAINST REBELLION. THIS DISCOVERY HAS BEEN SHOWN IN MORE COMPLEXITY AND OVERALL IN WHERE DID WATER COMES FROM? DAYA PAWAR SENSITIVITY IS ANOTHER IMPORTANT ASPECT IN THIS COLLECTION. THE HARD WORK OF THE YOUNGEST, THE OPPRESS WOMEN, THE MISERY OF THE DALIT WOMEN`S PAIN HAS PERSISTENTLY KEPT ON MANY PLATFORMS. FROM THE TOP OF THE COLLECTION ` WHERE DID WATER COMES FROM? IT IS UNDERSTOOD THAT IN THE LIFE OF DALIT WOMEN- IN HER Q- LEVEL, MERCY PAWAR EXPERIENCE A WHOLE SYSTEM.
दया पवार यांच्या ‘कोंडवाडा’ नंतरचा हा दुसरा कवितासंग्रह. त्यांच्या ‘बलुतं’ या आत्मकथनानं मराठी साहित्याला मोलाचं योगदान दिलं आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील त्यांचा लौकिक ‘बलुतं’मुळंच पोहोचला. असं असलं तरी दया पवारांचा मूळ िंपड हा अखेरपर्यंत अस्सल समकालीन कवीचाच राहिला. ‘कोंडवाडा’मधून त्यांनी स्वत:ची अशी वेगळी कविता नोंदवली. विद्रोहाच्या तप्त आवाजाच्या कोलाहलातही स्पष्टपणे ऐवूÂ येणारी साधी, संयत आणि न एकारलेली. ‘पाणी कुठंवर आलं गं बाई...’ मध्ये हा शोध अधिक प्रगल्भतेनं आणि समग्रपणे व्यक्त झाला आहे. दया पवारांच्या संवेदनशीलतेला या संग्रहात आणखी एक महत्त्वाचं परिमाण लाभलं आहे. सर्वांत पायतळी असलेल्या कष्टकरी, दलित स्त्रीच्या अपार दु:खाचं. लोकगीताच्या देशीय रूपबंधातून दलित स्त्रीच्या वेदनेचा करुण स्वर दया पवारांनी अनेक व्यासपीठांवरून सातत्यानं जागता ठेवला. ‘पाणी कुठंवर आलं गं बाई...’ या संग्रहाच्या शीर्षओळीपासूनच हे जाणवतं की, दलित स्त्रीच्या जगण्यात – तिच्या आQस्तत्वात, दया पवार सबंध व्यवस्थेचं प्रतिरूप अनुभवतात. भारताच्या सांस्कृतिक बेटांमधली दरी नाहीशी व्हावी यासाठी ‘माझी कविता बळी पडली तरी चालेल,’ असे दया पवारांनी कोंडवड्याच्या प्रस्तावनेत लिहिले आहे... ‘धारदार सुळ्यांच्या दरवाजाला हत्ती जसे चिपा होतात, तसं आपण हसत मरावं...’ त्यांच्या या भूमिकेचा पुनरुच्चार ‘पाणी कुठंवर आलं गं बाई...’मधूनही शेवटपर्यंत जाणवतो. कवी दया पवारांचे ‘समकालीनत्व’ अधोरेखित करणारा हा संग्रह मराठीच्या मध्यवर्ती प्रवाहात अनेक अर्थांनी महत्त्वाचा ठरावा. प्रा. प्रज्ञा लोखंड
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #KONDVADA #PANIKUTHVARALAGBAI
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAKAL 12-12-1999

    दलित स्त्रीच्या वेदनेचा करुण स्वर... आपल्या काव्यलेखनाच्या प्रेरणास्थानांविषयीची व प्रचलित काव्यविचार व परंपरेने चालत आलेली मराठी कविता यांच्यापेक्षा आपल्या कवितेच्या वेगळेपणाविषयीची जाणीव बहुसंख्य दलित कवींनी आपल्या कवितेतून प्रकट केली आहे. दया पवा हे या कवींमध्ये महत्त्वाचे नाव आहे. कोंडवाडा नंतरच्या त्यांच्या कविता पाणी कुठंवर आलं गं बाई ’ या संग्रहात चित्रित करण्यात आल्या आहेत. हा संग्रह त्यांच्या द्वितीय स्मृतिदिनाला प्रकाशित करण्यात आला. पवारांच्या कवितेचे वेगळेपण ‘कोंडवाडा’ मध्येच प्रकट झाले होते. दलित कवितेच्या महालात त्यांची साधी, संयत ठाम उभी होती. पवारांनी भोगलेले बरेवाईट सर्व अनुभव मनात साठवलेले आणि नंतर संयमशील वृत्तीने त्या अनुभवांचे प्रकटीकरण केलेले दिसते. त्यामुळे त्यांच्या कवितेत विद्रोह असला तरी आक्रस्ताळेपणा नाही. ती चिंतनशील कविता आहे. आपल्या उरातल्या जखमा हळुवारपणे,सौम्यपणे ती उघड्या करून दाखवते. आर्त स्वरात व्यथा गुंफून आवेगाने कड्यावरून कोसळणारी अशी ही कविता आहे. वाट्याला आलेला अनुभव कोणत्याही प्रकारचा साजशृंगार न करता ते मांडतात. ज्वालाग्राही अनुभव मनात खदखदत ठेवून ते सौम्यपणे त्याचा आविष्कार करतात. त्यामुळे येथे दलित वेदना आक्रस्ताळ्या भाषणबाजीत न सापडता चिंतनशील काव्यरूप घेतात. दया पवारांच्या कवितेचे हे विशेष ‘कोंडवाडा’तच दिसले होते. मग ‘पाणी कुठवर आलं गं बाई’ या नव्या संग्रहाचा विशेष कोणता? सामूहिक दु:खाचा शोध ते येथे अधिक प्रगल्भतेने घेतात आणि अधिक समग्रपणे व्यक्त करतात. वैयक्तिक अनुभवांतून सामूहिक आविष्कार हे या कवितेचे स्वरूप आहे. कवीचे अनुभव व कविता यांच्यामध्ये त्याचे व्यक्तिमत्त्व उभे असते. अनुभवाचा अर्थ शोधणे व त्या अथानुरूप मूळ अनुभवाचा आकार व घाट साधणे, ही प्रक्रिया ते व्यक्तिमत्त्व करीत असते. येथे दलित स्त्रीच्या वेदनेचा करुण स्वर दया पवार यांच्या संवेदनशीलतेला नवे परिमाण मिळवून देतो. स्त्रीचे दु:ख व्यक्त करण्यासाठी त्यांना लोकगीतांचा देशीय रूपबंध सहज हाती लागतो. ‘कोंबडा’, ‘बाजार’, ‘लोणी’, ‘आडाचं पाणी’, ‘चिलमाचं गाव’, ‘पाणी कुठवर आलं गं बाई’, ‘धरण’ या त्यांच्या कवितांना लोकगीतांच्या अर्थाला सादृश्य असा अर्थ व घाट लाभतो. ‘पाणी कुठवर आलं गं बाई’ आणि ‘बाई मी धरण बांधीते, माझं मरण कांडीते’ या विद्रोहाच्या अंगार फुलवणाऱ्या कविता नर्मदा आंदोलनाच्या प्रेरणास्थानी राहिल्या आहेत. दया पवारांनी कवितेला लढ्याचे साधन मानले आहे. त्यामुळे या कविता एखाद्या आंदोलनाच्या प्रेरणास्थानी राहणे म्हणजे त्यांनी प्रेयस प्राप्त करण्यासारखेच आहे. नारायण सुर्वे यांनी मराठी कवितेला सामाजिक संदर्भाची अपरिहार्यता प्रदान करणारी कविता दिली. तोच प्रकार पवारांच्या कवितेबाबत झाला आहे. सामाजिक संदर्भात बोलत असूनही ही कविता प्रचारकी थाटाची होत नाही, तर दलित जिण्याचा आलेख काढते. ती लढ्याचे साधन बनल्याने निराश होत नाही. जीवनातील एवढे भोग भोगूनही ती उदास बनत नाही. भविष्यकाळाची उत्तेजक स्वप्ने तिच्याजवळ आहेत. वेदनांच्या चित्रणाने भरलेली असूनही ती प्रचंड आशावादी आहे. दया पवार यांचा विकास व जागृती यांच्याशी त्यांची कविता समांतरपणे वाटचाल करीत राहिली, म्हणूनच प्रत्यक्ष जीवनानुभवाशी थेट नाते सांगणारी ठरली आहे. एका संयमित मनाने जीवनाच्या वेदनांचा समर्थपणे घेतलेला हा शोध आहे. संघर्षापेक्षा समर्पणशीलतेकडे झुकणारी ही कविता झपाटून टाकत नाही, पण समंजस मनाने घेतलेला मागोवा वाचकाला, श्रोत्याला अस्वस्थ करीत राहतो. -संतोष शेणई ...Read more

  • Rating StarNEWS PAPAR REVIEW

    लोकगीताच्या रूपबंधातून कष्टकरी स्त्रीच्या वेदनेचा करूण स्वर आळवणाऱ्या दया पवार यांच्या रचना बलुतंकार दया पवार यांच्या ‘बाई मी धरण, धरण बांधते’ आणि ‘पाणी कुठवर आलं ग बाई’ या कविता अत्यंत गाजल्या. दलित स्त्रीच्या जगण्यातले जीवघेणे दु:ख त्यांच्या या कवतांद्वारे वाचकांच्या हृदयाला चटका देऊन गेले. ‘कोंडवाडा’नंतरच्या त्यांच्या कवितांचा वारसा त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कन्या. प्रा. प्रज्ञा लोखंडे यांनी सिद्ध केला आहे आणि मेहता पब्लिशिंग हाऊसने तो ‘पाणी कुठवर आलं ग बाई’ या शीर्षकाने प्रकाशित केला आहे. अडतीस कवितांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर, येशू खिस्त, भगवान बुद्ध, पंढरीचा राया यांना उद्देशून केलेल्या कविता आहेत. ‘माय मराठी’, ‘गुणगान’ करणारी एक रचना आहे. दलित स्त्रीच्या भाव-भावनांचा विविध पातळ्यांवरचा आविष्कार करणाऱ्या काही कविता आहेत, भारताच्या सद्य:स्थितीतल्या विषमतेच्या चटक्यांचीही जीवघेणी वेदना बहुतेक कवितांमधून या ना त्या स्वरूपात प्रकट होत राहते. कलंक कायमच आपण या देशात, या समाजात नेमके कुठे आहोत याबद्दलचा संभ्रम सतत त्यांना सतावत राहतो. ‘मी तळ्यात की मळ्यात’ असा प्रश्न पडतो. अहंकाराचा बुडबुडा फुटला तरी माथ्यावरचा कलंक अजून पुसला गेलेला नाही, अद्वैताचा नाडा हाती लागत नाही, खाली पाय ठेवावा, तर निसरड्या शेवाळावरच तो पडतो. (किती पायऱ्या उतराव्या), या तुमच्या दुनियेत, तुमच्या संस्कृतीत आपल्या पायाखाली सतत रक्ताचे सडेच पसरलेले दिसतात. तुमच्या पोशाखी संस्कृतीत आपले नाकडेपणच उठून दिसते. तुमचा मुखवटा घालून जगणे अशक्य होते. आपण सतत वधस्तंभाकडेच चाललोय, अशी पदोपदी जाणीव होते. (वधस्तंभ), अशी आपली घुसमट ते व्यक्त करतात. अमेरिकेतही भारताची आठवण अमेरिकेच्या दौऱ्यातील प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्या काही कविता या संग्रहात आहेत. मारूतीसारखे सातासमुद्रापलीकडे उड्डाण करून गेल्यावर कोकणच्या राजा झिम्मा खेळतो - हेच गाणे ओठावर येते. तेथील पितळी कुंडीतले कॅक्टस बघून तुळशीवृंदावन आठवते, नाइट क्लबमधील स्ट्रिपटीझ बघताना रासलीला आठवते. निग्रो वस्तीचे हार्लेम बघताना गोलपाठीचे स्मरण होते. त्या कोणा अक्करमाशाच्या आईच्या गाईसारख्या डोळ्यात आपलीच आई दिसते. अशी सारखी त्यांना भारताची सतत आठवण होत राहते. आर यू इंडियन ? न्यूयॉर्कमधला स्वातंत्रता देवीचा पुतळा प्रथम हसताना दिसतो, नंतर त्यावर आपलेच थेंब थेंब रक्त सांडताना दिसते. पंचतारांकित हॉटेलात पाणी मागितल्यावर मद्याची सुरई घेतलेली काळी राणी ‘आर यू इंडियन’ असा प्रश्न विचारते, तेव्हा त्या प्रश्नाने जिव्हारी बाण लागल्यासारखी जखम होते. भारतात पाणी मागितल्यावर जात आठवते; येथे स्वतंत्रता देवीच्या देशातही तेच भागधेय वाट्याला येते. कुठेही गेले तरी जात वा देश विचारला जातोच (स्वतंत्रदेवतेचा पुतळा) हा जय कुणाचा ? पराभव कुणाचा ? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी खेडी सोडा-शहरात चला असा संदेश दिला. शहरात धर्मांधता-कर्मकांड-भेदभाव यांनी अपमानित व्हावे लागणार नाही, असा युक्तिवाद त्यांनी केला होता. परंतु आता या शहरातूनही चौकाचाकात धर्मांधता उफाळून आलेली दिसते, याबद्दलची खंत प्रकट केली आहे. (बाबा, कालपरवाची गोष्ट), बाबांच्या नावाचा ध्यास घेऊन इतकी वर्षे बरबाद केली म्हणून तुम्ही हसत तर नाही ना ? असा सवाल करून मराठवाडा विद्यापीठाला त्यांचे नाव दिले गेले, तेव्हा ही काही एका दिवसाची कमाई नव्हे, पुन्हा पुन्हा खांडववन पेटून हरळीच्या मुळीसारखे तक्षक तरले म्हणून आजचा दिवस उगवला असे कवी म्हणतो. बाबा, तुमच्या नावाचा विटाळ आज संताच्या भूमीत धुतला गेला हा जय कुणाचा - पराभव कुणाचा दिव्याने दिवा पेटत गेला मनामनात दडलेला काळोख मिटला (बाबा) येशू खिस्त आणि भगवान बुद्ध येशू खिस्ताचा जन्म गोठ्यात झाला. गावकुसाबाहेर झाला. मानवमुक्तीसाठी तो एकाकी लढला. सत्तेचे जुलमी तख्त त्याने उलथवले, क्रूसावर रक्त सांडूनही सर्वांवर दयेची पाखर घातली. गाईच्यासारख्या त्याच्या डोळ्यातून करुणेचा पान्हा उमळून आला. ‘येशू तू आमच्यासाठी हंबरलास’ अशी आपली भावना ते प्रकट करतात. भगवान बुद्ध अजंठ्याच्या लेण्यातील आडव्या फत्तराप्रमाणे चिरनिद्रा न घेता विकलांग आम्रपालीच्या जखमा धूत होता आणि हाताने तिला विझवणारा घालत आहोत; म्हणून कवी आपला आदरभाव व्यक्त करतो. पंढरीच्या रायावर मात्र तो धारेवर धरणाऱ्या सवालांची एकापुढे एक सरबत्ती करतो. पंढरीच्या राया चोखा का बाहेरी ? तूच खरा डोंगा दाविली पायरी तुझे भक्तगण देवळाच्या दारी निर्मिली रे भिंत कर कढेवरी का रे घबरशी, लपशी गाभारी ? आणि नंतर कवी त्याच्या दांभिकपणावरच सरळ हल्ला चढवतो. उन्हापावसात कण्हते पायरी छत्र चामरात तू आत भरजरी चांदीचे डोळे तुझे गाले गारगोटी (पायरी) माझा कोंबडा कुणी मारला बाई (कोंबडा) घुसळ घुसळीने बाई - अजून लोणी का ग न्हाई, (लोणी), मांडव रचता रचता उभी हयात ग गेली (मांडव), आडाचं पाणी बाई खोलवर, हाताचा आले फोड (आडाच पाणी), केलं रक्ताचं शिपान येल मांडवाला गेली, गोऱ्या गोऱ्या दंडावर बाई चोळी मी गोंदली, (चोळी), सोन्याची बाई सुरी तिला चांदीची ग धार, कोन दळती दळती जात्यात, बाई मी चिधीत ग सांधीत, जात्यावरचा वरचा दिसता हात कोन हसती हासती बाई सुपात (चिलमाचं गाव), या लोकगीतांच्या लयीतल्या गीतांच्या बाज स्त्री जीवनातल्या सुखदु:खांना समर्थपणे कवटाळतो. ‘‘बाई मी धरण, धरण बांधीते, माझं मरण, मरण कांडीते’’ आणि ‘‘पाणी कुठवर आलं ग बाई’’ या दोन गीतांनी तर अनेकांना भुरळ घातली आहे. तुझे पांग कसे फेडू ? ‘माय मराठी’ या कवितेतूनही दया पवार आपली अंतरीची वेदना प्रकट करतात. धर्ममार्तंडाची कोट रचल्याने पोथी-पुराणात मराठी भेटली नाही, पण जात्यावरच्या ओव्यांत मराठी भेटली, धुळपाटीवर शब्द गिरवता आले, मूक नायकाच्या हाती लेखणी आल्यावर आता दु:खाची गाणी वेशीवर टांगण्याचे बळ लाभले. आता मात्र ‘माय मराठी गे तुझे पांग कसे फेडू’ असे गदगदून आले आहे. दया पवार यांच्या अल्पाक्षरी कवितेतील स्त्री मनाचे भावदर्शन आणि एक दलित म्हणून भोगाव्या लागलेल्या दु:खाचे निवेदन संवेदनाक्षम मनावर नक्कीच आघात करील. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more