* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: V. S. KHANDEKARANCHI KAVITA
  • Availability : Available
  • ISBN : 9788171618507
  • Edition : 2
  • Publishing Year : JANUARY 1999
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 224
  • Language : MARATHI
  • Category : POEMS
  • Available in Combos :V.S KHANDEKAR COMBO SET-119 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
V.S.KHANDEKAR IS KNOWN FOR HIS PROSE WRITING , BUT HE WROTE SOME BEAUTIFUL POEMS TOO. THESE POEMS ARE COLLECTED & EDITED BY AVINASH AAWALGAOKAR. THIS COLLECTION INTRODUCES KHANDEKAR AS A POET. HIS UNIQUE WRITING STYLE, COMMAND ON WORDS & UNDERSTANDING OF LIFE MAKES HIS POEM EXTRA-ORDINARY. THESE POEMS MESMERIZES READERS.
समकालीन वास्तवाचा जीवनमूल्यांच्या अनुषंगाने अन्वयार्थ लावून, ललित साहित्याची निर्मिती करणाया मोजक्या लेखकांमध्ये आपणांस वि. स. खांडेकरांचा समावेश करावा लागतो. किंबहुना त्यांच्या या वैशिष्ट्यांमुळेच मराठी साहित्यातील त्यांचे स्थान अढळ आहे. वि. स. खांडेकरांनी कथात्मक वाङ्मयनिर्मितीबरोबरच अगदी प्रारंभापासून काव्यलेखनही केले आहे. १९१९ ते ७५ या प्रदीर्घ काळात ते अव्याहतपणे कविता लिहीत होते. त्यांच्या काही कविता आणि चित्रपटासाठी त्यांनी लिहिलेली गाणी त्या त्या काळात गाजलीही होती; परंतु त्यांच्या कवितांचा संग्रह मात्र त्यांच्या हयातीत प्रसिद्ध होऊ शकला नाही. तो योग डॉ. अविनाश आवलगावकर यांच्यामुळे येत आहे, ही अत्यंत आनंदाची बाब आहे. डॉ. आवलगावकर हे मध्ययुगीन साहित्याचे – विशेषत: महानुभाव साहित्याचे साक्षेपी संशोधक आहेत; परंतु त्यांनी स्वत:ला बंदिस्त करून घेतले नाही. ते आधुनिक साहित्याचेही अभ्यासक आहेत. स्वत: निर्मितिशील कलावंत आहेत आणि त्यामुळेच त्यांना वि.स. खांडेकरांच्या कवितेविषयी ओढ वाटली असणार, हे उघड आहे. यातूनच त्यांनी अतिशय परिश्रमाने आणि संशोधकवृत्तीने खांडेकरांच्या कविता संपादित केल्या आहेत. त्यास विस्तृत विवेचक प्रस्तावनाही जोडली आहे. खांडेकरांच्या अभ्यासकांनाच नव्हे, तर १९२० नंतरच्या मराठी साहित्याचा अभ्यास करणायांना हा ग्रंथ फार फार उपयोगी ठरणार आहे. –नागनाथ कोत्तापल्ले
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
# 11TH JANUARY #YAYATI #AMRUTVEL #RIKAMA DEVHARA #SONERI SWAPNA- BHANGALELI #SUKHACHA SHODH #NAVI STRI #PAHILE PREM #JALALELA MOHAR #PANDHARE DHAG #ULKA #KRAUNCHVADH #HIRVA CHAPHA #DON MANE #DON DHRUV #ASHRU #SARTYA SARI #ABOLI #SWAPNA ANI SATYA #PHULE AANI KATE #JEEVANKALA #PAKALYA #USHAAP #SAMADHIVARLI PHULE #VIKASAN #PRITICHA SHODH #DAVABINDU #CHANDERI SWAPNE #STREE AANI PURUSH #VIDYUT PRAKASH #PHULE ANI DAGAD #SURYAKAMLE #SURYAKAMLE #DHAGAADACHE CHANDANE #DHAGAADACHE CHANDANE #PAHILI LAT #HASTACHA PAUS #SANJVAT #AAJCHI SWAPNE #PRASAD #CHANDRAKOR #KALACHI SWAPNE #ASHRU ANI HASYA #GHARTYABAHER #KAVI #MURALI #BUDDHACHI GOSHTA #BHAUBIJ #SURYASTA #ASTHI #GHARATE #MADHYARATRA #YADNYAKUNDA #SONERI SAVLYA #VECHALELI PHULE #KALIKA #MRUGAJALATIL KALYA #KSHITIJSPARSH #SUVARNAKAN #VANDEVATA #DHUKE #KALPALATA #MANDAKINI #AJUN YETO VAS FULANA #TISARA PRAHAR #VASANTIKA #RANPHULE #AVINASH #HIRWAL #MANJIRYA #SANJSAVLYA #MUKHAVATE #VAYULAHARI #MANZADHAR #CHANDANYAT #SAYANKAL #ZIMZIM #PAHILE PAN #ADNYATACHYA MAHADWARAT #VANHI TO CHETVAVA #GOKARNICHI PHULE #DUSARE PROMETHEUS : MAHATMA GANDHI #RANG ANI GANDH #RESHA ANI RANG #VAMAN MALHAAR JOSHI : VYAKTI ANI VICHAR #GOPAL GANESH AGARKAR : VYAKTI ANI VICHAR #KESHAVSUT : KAVYA ANI KALA #RAM GANESH GADAKARI : VYAKTI ANI VANGAMAY #PRADNYA ANI PRATIBHA #SAHITYA PRATIBHA : SAMARTHYA ANI MARYADA #GADHAVACHI GEETA ANI GAJRACHI PUNGI #SASHACHE SINHAVALOKAN #PAHILI PAVALA #EKA PANACHI KAHANI #RUTU NYAHALANARE PAN #SANGEET RANKACHE RAJYA # V. S. KHANDEKARANCHI KAVITA #TEEN SAMELANE #SAHA BHASHANE #ABHISHEK #SWAPNASRUSHTI #TE DIVAS TEE MANASE #SAMAJSHILPI #JEEVANSHILPI #SAHITYA SHILPI # AASTIK #SUSHILECHA DEV #RAGINI #MUKYA KALYA #INDRADHANUSHYA #ANTARICHA DIVA #NAVE KIRAN #AGNINRUTYA #KAVYAJYOTI #TARAKA #RANGDEVTA #ययाति # (ज्ञानपीठ पुरस्कार १९७६) #अमृतवेल #रिकामा देव्हारा #सोनेरी स्वप्नं-भंगलेली #सुखाचा शोध #नवी स्त्री #पहिले प्रेम #जळलेला मोहर #पांढरे ढग #उल्का #क्रौंचवध #हिरवा चाफा#वि.स.खांडेकरांची कविता
Customer Reviews
  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    वि. स. खांडेकरांच्या निवडक कविता… कै. वि. स. खांडेकर हे कवी म्हणून फारसे वाचकांच्या परिचयाचे नाहीत. त्यांना आपण कादंबरीकार, कथाकार म्हणूनच ओळखतो. पण त्यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून डॉ. अविनाश आवलगांवकर यांनी ते एक द्रष्टे कवी म्हणून वाचकांसमोर णले आहे. त्यांचे ‘वि. स. खांडेकरांची कविता’ हे पुस्तक नुकतेच प्रसिध्द झाले आहे. कै. खांडेकरांच्या समर्थ लेखणीने वाड्.मयाच्या सर्व क्षेत्रात स्वतंत्र असे स्थान निर्माण झाले नसले तरी त्यांच्या अनेक कविता सातत्याने नियतकालिकांमधून ‘कुमार’ या टोपण नावाने प्रकाशित होत होत्या. त्यामुळे कदाचित कवी म्हणून त्यांची प्रतिमा वाचकांसमोर आली नसावी. पण त्यांचा पिंड कवीचा होता हे या पुस्तकावरुन वाचकांच्या ध्यानी येईल. एका पानाची कहाणी या त्यांच्या आत्मचरित्रात त्यांनी हे स्वत:च मान्य केले आहे. कवितेविषयी प्रेम वाढत गेले आणि कविता हे आत्मविष्काराचे प्रभावी माध्यम आहे याची जाण त्यांना आली. तेव्हापासून त्यांनी वेगवेगळया प्रकारच्या कविता केल्या. ‘दुर्दिन दारुण दूर दुरावून दिन मणि दैवाने दिधला’ अशा अजोड काव्यपंक्ती ते लिहू शकले (पान ७१) ही कविता १९२२ मधली आहे. सहज साध्य, सोपी सरळ भाषा त्यांनाही आवडत होती. म्हणूनच ते म्हणतात ‘आकाशातील चंद्र धराया! प्रयत्न केले कितिक वाया ।। जन्म भूमिला मिठी मारुनी । काय साधिले जगती कोणी ।। किंवा ‘मला कपडे नको दागिने नको काही नको ।। एक बाळ हवा, देवा माझे औक्ष घे, पण माझ्या बाळाला ते भरभरुन दे ।।’ ही साधी सरळ काव्यरचना हृदय हेलवणारी, काळजाला हात घालणारी रचना ते सहजतेने करतात. त्यांच्या कवितेत आंतरिक शक्ती आहे. त्याच प्रेरणेने समाजाचे परिवर्तन करण्याचा प्रयत्न करतात, रुढ, पारंपारिक कल्पना सोडून प्रतिभाशक्तीचा अविष्कार झाला तरच ती कविता सरस्वतीला प्रिय होते. अशी या कवीच्या मनाची धारणा आहे. त्यांच्या कवितेत विरहाचे दु:ख जागोजागी जाणवते. तरुण-तरुणीचे प्रेम दिसत नाही, पण ममतेचे कोंदण मात्र दिसते. निसर्गाचे साक्षांत चैतन्यमयी रुप ते साकार करतात. उत्तुंग प्रतिभा भव्य-दिव्य शब्द हे खांडेकरांचे स्वप्न होते. ते साकारित असताना, प्रेमाचे अस्तित्व शरीराच्या पलीकडे आहे याचे भान ते सोडीत नाहीत, काळया रात्रीतून उज्ज्वल उषेचा जन्म होतो. सावळया आकाशातून पडणाऱ्या सरीने पृथ्वी फुलून येते. सावळा कृष्णच राधेलाप्रिय असतो. ज्याच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते म्हणून परीसच सोन्यापेक्षा महत्वाचा! प्रेम गुणी. या कवितेत (पान १३९). जन म्हणती मजला वेडे, वेड कशाचे कारण नकळे । खडे सोडून उधळीत असतो सगळ्यावरती सदाफुले ।। वि. स. खांडेकरांची कवी म्हणून प्रतिमा वाचकांसमोर निर्माण झाली नाही आणि त्याची कारणे शोधताना डॉ. आवलेगांवकर म्हणतात, कवितेचा आशय अभिव्यक्तीच्या आधारे युगामाणशी समान धर्माने सांगू शकली नाही म्हणा किंवा वाचक पुरेशी दाद देऊ शकले नाहीत. नेमके कारण काय असावे? याबाबतीत ते देखील संभ्रमातच आहेत. तरीदेखील कधी कधी वाचकांचा पूर्वग्रह दूषितपणा तर पुढे आला नसावा का? एरवाद्या जेष्ठ-श्रेष्ठ कवितेत काव्य शोधण्याचा निरर्थक प्रयत्न केला जातो. पण एखाद्या कवीची हृदयस्पर्शी कविता असूनही काळाच्या मागे पडते. नेमके कारण सांगता येत नाही, पण वि. स. खांडेकरांची कविता कशी होती याचे उत्तर ते स्वत:च देतात, त्यामुळे ते खरे वाटते. समकालिन वास्तवाचा जीवमूल्याच्या अनुषंगाने अन्वयार्थ लावून ललित साहित्याची निर्मिती वि. स. खांडेकरांनी केली हे नाकारता येणे शक्य नाही. डॉ. अविनाश आवलगावकर यांना वि. स. खांडेकरांची कविता भावली. म्हणूनच अतिशय संशोधक वृत्तीने त्यांनी हा कवितासंग्रह प्रसिद्ध केला आहे. डॉ. नागनाथ कोत्तोपल्ले यांच्या आग्रहाने हा कवितासंग्रह सुनील मेहता यांनी प्रसिद्ध केला. रवींद्र व्होरा यांचे मुखपृष्ठ अत्यंत वेधक आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RUCHIRA BHAG -1
RUCHIRA BHAG -1 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव_वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more