* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: V. S. KHANDEKARANCHI KAVITA
  • Availability : Available
  • ISBN : 9788171618507
  • Edition : 2
  • Publishing Year : JANUARY 1999
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 224
  • Language : MARATHI
  • Category : POEMS
  • Available in Combos :V.S KHANDEKAR COMBO SET-119 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
V.S.KHANDEKAR IS KNOWN FOR HIS PROSE WRITING , BUT HE WROTE SOME BEAUTIFUL POEMS TOO. THESE POEMS ARE COLLECTED & EDITED BY AVINASH AAWALGAOKAR. THIS COLLECTION INTRODUCES KHANDEKAR AS A POET. HIS UNIQUE WRITING STYLE, COMMAND ON WORDS & UNDERSTANDING OF LIFE MAKES HIS POEM EXTRA-ORDINARY. THESE POEMS MESMERIZES READERS.
समकालीन वास्तवाचा जीवनमूल्यांच्या अनुषंगाने अन्वयार्थ लावून, ललित साहित्याची निर्मिती करणाया मोजक्या लेखकांमध्ये आपणांस वि. स. खांडेकरांचा समावेश करावा लागतो. किंबहुना त्यांच्या या वैशिष्ट्यांमुळेच मराठी साहित्यातील त्यांचे स्थान अढळ आहे. वि. स. खांडेकरांनी कथात्मक वाङ्मयनिर्मितीबरोबरच अगदी प्रारंभापासून काव्यलेखनही केले आहे. १९१९ ते ७५ या प्रदीर्घ काळात ते अव्याहतपणे कविता लिहीत होते. त्यांच्या काही कविता आणि चित्रपटासाठी त्यांनी लिहिलेली गाणी त्या त्या काळात गाजलीही होती; परंतु त्यांच्या कवितांचा संग्रह मात्र त्यांच्या हयातीत प्रसिद्ध होऊ शकला नाही. तो योग डॉ. अविनाश आवलगावकर यांच्यामुळे येत आहे, ही अत्यंत आनंदाची बाब आहे. डॉ. आवलगावकर हे मध्ययुगीन साहित्याचे – विशेषत: महानुभाव साहित्याचे साक्षेपी संशोधक आहेत; परंतु त्यांनी स्वत:ला बंदिस्त करून घेतले नाही. ते आधुनिक साहित्याचेही अभ्यासक आहेत. स्वत: निर्मितिशील कलावंत आहेत आणि त्यामुळेच त्यांना वि.स. खांडेकरांच्या कवितेविषयी ओढ वाटली असणार, हे उघड आहे. यातूनच त्यांनी अतिशय परिश्रमाने आणि संशोधकवृत्तीने खांडेकरांच्या कविता संपादित केल्या आहेत. त्यास विस्तृत विवेचक प्रस्तावनाही जोडली आहे. खांडेकरांच्या अभ्यासकांनाच नव्हे, तर १९२० नंतरच्या मराठी साहित्याचा अभ्यास करणायांना हा ग्रंथ फार फार उपयोगी ठरणार आहे. –नागनाथ कोत्तापल्ले
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
# 11TH JANUARY #YAYATI #AMRUTVEL #RIKAMA DEVHARA #SONERI SWAPNA- BHANGALELI #SUKHACHA SHODH #NAVI STRI #PAHILE PREM #JALALELA MOHAR #PANDHARE DHAG #ULKA #KRAUNCHVADH #HIRVA CHAPHA #DON MANE #DON DHRUV #ASHRU #SARTYA SARI #ABOLI #SWAPNA ANI SATYA #PHULE AANI KATE #JEEVANKALA #PAKALYA #USHAAP #SAMADHIVARLI PHULE #VIKASAN #PRITICHA SHODH #DAVABINDU #CHANDERI SWAPNE #STREE AANI PURUSH #VIDYUT PRAKASH #PHULE ANI DAGAD #SURYAKAMLE #SURYAKAMLE #DHAGAADACHE CHANDANE #DHAGAADACHE CHANDANE #PAHILI LAT #HASTACHA PAUS #SANJVAT #AAJCHI SWAPNE #PRASAD #CHANDRAKOR #KALACHI SWAPNE #ASHRU ANI HASYA #GHARTYABAHER #KAVI #MURALI #BUDDHACHI GOSHTA #BHAUBIJ #SURYASTA #ASTHI #GHARATE #MADHYARATRA #YADNYAKUNDA #SONERI SAVLYA #VECHALELI PHULE #KALIKA #MRUGAJALATIL KALYA #KSHITIJSPARSH #SUVARNAKAN #VANDEVATA #DHUKE #KALPALATA #MANDAKINI #AJUN YETO VAS FULANA #TISARA PRAHAR #VASANTIKA #RANPHULE #AVINASH #HIRWAL #MANJIRYA #SANJSAVLYA #MUKHAVATE #VAYULAHARI #MANZADHAR #CHANDANYAT #SAYANKAL #ZIMZIM #PAHILE PAN #ADNYATACHYA MAHADWARAT #VANHI TO CHETVAVA #GOKARNICHI PHULE #DUSARE PROMETHEUS : MAHATMA GANDHI #RANG ANI GANDH #RESHA ANI RANG #VAMAN MALHAAR JOSHI : VYAKTI ANI VICHAR #GOPAL GANESH AGARKAR : VYAKTI ANI VICHAR #KESHAVSUT : KAVYA ANI KALA #RAM GANESH GADAKARI : VYAKTI ANI VANGAMAY #PRADNYA ANI PRATIBHA #SAHITYA PRATIBHA : SAMARTHYA ANI MARYADA #GADHAVACHI GEETA ANI GAJRACHI PUNGI #SASHACHE SINHAVALOKAN #PAHILI PAVALA #EKA PANACHI KAHANI #RUTU NYAHALANARE PAN #SANGEET RANKACHE RAJYA # V. S. KHANDEKARANCHI KAVITA #TEEN SAMELANE #SAHA BHASHANE #ABHISHEK #SWAPNASRUSHTI #TE DIVAS TEE MANASE #SAMAJSHILPI #JEEVANSHILPI #SAHITYA SHILPI # AASTIK #SUSHILECHA DEV #RAGINI #MUKYA KALYA #INDRADHANUSHYA #ANTARICHA DIVA #NAVE KIRAN #AGNINRUTYA #KAVYAJYOTI #TARAKA #RANGDEVTA #ययाति # (ज्ञानपीठ पुरस्कार १९७६) #अमृतवेल #रिकामा देव्हारा #सोनेरी स्वप्नं-भंगलेली #सुखाचा शोध #नवी स्त्री #पहिले प्रेम #जळलेला मोहर #पांढरे ढग #उल्का #क्रौंचवध #हिरवा चाफा#वि.स.खांडेकरांची कविता
Customer Reviews
  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    वि. स. खांडेकरांच्या निवडक कविता… कै. वि. स. खांडेकर हे कवी म्हणून फारसे वाचकांच्या परिचयाचे नाहीत. त्यांना आपण कादंबरीकार, कथाकार म्हणूनच ओळखतो. पण त्यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून डॉ. अविनाश आवलगांवकर यांनी ते एक द्रष्टे कवी म्हणून वाचकांसमोर णले आहे. त्यांचे ‘वि. स. खांडेकरांची कविता’ हे पुस्तक नुकतेच प्रसिध्द झाले आहे. कै. खांडेकरांच्या समर्थ लेखणीने वाड्.मयाच्या सर्व क्षेत्रात स्वतंत्र असे स्थान निर्माण झाले नसले तरी त्यांच्या अनेक कविता सातत्याने नियतकालिकांमधून ‘कुमार’ या टोपण नावाने प्रकाशित होत होत्या. त्यामुळे कदाचित कवी म्हणून त्यांची प्रतिमा वाचकांसमोर आली नसावी. पण त्यांचा पिंड कवीचा होता हे या पुस्तकावरुन वाचकांच्या ध्यानी येईल. एका पानाची कहाणी या त्यांच्या आत्मचरित्रात त्यांनी हे स्वत:च मान्य केले आहे. कवितेविषयी प्रेम वाढत गेले आणि कविता हे आत्मविष्काराचे प्रभावी माध्यम आहे याची जाण त्यांना आली. तेव्हापासून त्यांनी वेगवेगळया प्रकारच्या कविता केल्या. ‘दुर्दिन दारुण दूर दुरावून दिन मणि दैवाने दिधला’ अशा अजोड काव्यपंक्ती ते लिहू शकले (पान ७१) ही कविता १९२२ मधली आहे. सहज साध्य, सोपी सरळ भाषा त्यांनाही आवडत होती. म्हणूनच ते म्हणतात ‘आकाशातील चंद्र धराया! प्रयत्न केले कितिक वाया ।। जन्म भूमिला मिठी मारुनी । काय साधिले जगती कोणी ।। किंवा ‘मला कपडे नको दागिने नको काही नको ।। एक बाळ हवा, देवा माझे औक्ष घे, पण माझ्या बाळाला ते भरभरुन दे ।।’ ही साधी सरळ काव्यरचना हृदय हेलवणारी, काळजाला हात घालणारी रचना ते सहजतेने करतात. त्यांच्या कवितेत आंतरिक शक्ती आहे. त्याच प्रेरणेने समाजाचे परिवर्तन करण्याचा प्रयत्न करतात, रुढ, पारंपारिक कल्पना सोडून प्रतिभाशक्तीचा अविष्कार झाला तरच ती कविता सरस्वतीला प्रिय होते. अशी या कवीच्या मनाची धारणा आहे. त्यांच्या कवितेत विरहाचे दु:ख जागोजागी जाणवते. तरुण-तरुणीचे प्रेम दिसत नाही, पण ममतेचे कोंदण मात्र दिसते. निसर्गाचे साक्षांत चैतन्यमयी रुप ते साकार करतात. उत्तुंग प्रतिभा भव्य-दिव्य शब्द हे खांडेकरांचे स्वप्न होते. ते साकारित असताना, प्रेमाचे अस्तित्व शरीराच्या पलीकडे आहे याचे भान ते सोडीत नाहीत, काळया रात्रीतून उज्ज्वल उषेचा जन्म होतो. सावळया आकाशातून पडणाऱ्या सरीने पृथ्वी फुलून येते. सावळा कृष्णच राधेलाप्रिय असतो. ज्याच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते म्हणून परीसच सोन्यापेक्षा महत्वाचा! प्रेम गुणी. या कवितेत (पान १३९). जन म्हणती मजला वेडे, वेड कशाचे कारण नकळे । खडे सोडून उधळीत असतो सगळ्यावरती सदाफुले ।। वि. स. खांडेकरांची कवी म्हणून प्रतिमा वाचकांसमोर निर्माण झाली नाही आणि त्याची कारणे शोधताना डॉ. आवलेगांवकर म्हणतात, कवितेचा आशय अभिव्यक्तीच्या आधारे युगामाणशी समान धर्माने सांगू शकली नाही म्हणा किंवा वाचक पुरेशी दाद देऊ शकले नाहीत. नेमके कारण काय असावे? याबाबतीत ते देखील संभ्रमातच आहेत. तरीदेखील कधी कधी वाचकांचा पूर्वग्रह दूषितपणा तर पुढे आला नसावा का? एरवाद्या जेष्ठ-श्रेष्ठ कवितेत काव्य शोधण्याचा निरर्थक प्रयत्न केला जातो. पण एखाद्या कवीची हृदयस्पर्शी कविता असूनही काळाच्या मागे पडते. नेमके कारण सांगता येत नाही, पण वि. स. खांडेकरांची कविता कशी होती याचे उत्तर ते स्वत:च देतात, त्यामुळे ते खरे वाटते. समकालिन वास्तवाचा जीवमूल्याच्या अनुषंगाने अन्वयार्थ लावून ललित साहित्याची निर्मिती वि. स. खांडेकरांनी केली हे नाकारता येणे शक्य नाही. डॉ. अविनाश आवलगावकर यांना वि. स. खांडेकरांची कविता भावली. म्हणूनच अतिशय संशोधक वृत्तीने त्यांनी हा कवितासंग्रह प्रसिद्ध केला आहे. डॉ. नागनाथ कोत्तोपल्ले यांच्या आग्रहाने हा कवितासंग्रह सुनील मेहता यांनी प्रसिद्ध केला. रवींद्र व्होरा यांचे मुखपृष्ठ अत्यंत वेधक आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more