* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: V. S. KHANDEKARANCHI KAVITA
  • Availability : Available
  • ISBN : 9788171618507
  • Edition : 2
  • Publishing Year : JANUARY 1999
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 224
  • Language : MARATHI
  • Category : POEMS
  • Available in Combos :V.S KHANDEKAR COMBO SET-119 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
V.S.KHANDEKAR IS KNOWN FOR HIS PROSE WRITING , BUT HE WROTE SOME BEAUTIFUL POEMS TOO. THESE POEMS ARE COLLECTED & EDITED BY AVINASH AAWALGAOKAR. THIS COLLECTION INTRODUCES KHANDEKAR AS A POET. HIS UNIQUE WRITING STYLE, COMMAND ON WORDS & UNDERSTANDING OF LIFE MAKES HIS POEM EXTRA-ORDINARY. THESE POEMS MESMERIZES READERS.
समकालीन वास्तवाचा जीवनमूल्यांच्या अनुषंगाने अन्वयार्थ लावून, ललित साहित्याची निर्मिती करणाया मोजक्या लेखकांमध्ये आपणांस वि. स. खांडेकरांचा समावेश करावा लागतो. किंबहुना त्यांच्या या वैशिष्ट्यांमुळेच मराठी साहित्यातील त्यांचे स्थान अढळ आहे. वि. स. खांडेकरांनी कथात्मक वाङ्मयनिर्मितीबरोबरच अगदी प्रारंभापासून काव्यलेखनही केले आहे. १९१९ ते ७५ या प्रदीर्घ काळात ते अव्याहतपणे कविता लिहीत होते. त्यांच्या काही कविता आणि चित्रपटासाठी त्यांनी लिहिलेली गाणी त्या त्या काळात गाजलीही होती; परंतु त्यांच्या कवितांचा संग्रह मात्र त्यांच्या हयातीत प्रसिद्ध होऊ शकला नाही. तो योग डॉ. अविनाश आवलगावकर यांच्यामुळे येत आहे, ही अत्यंत आनंदाची बाब आहे. डॉ. आवलगावकर हे मध्ययुगीन साहित्याचे – विशेषत: महानुभाव साहित्याचे साक्षेपी संशोधक आहेत; परंतु त्यांनी स्वत:ला बंदिस्त करून घेतले नाही. ते आधुनिक साहित्याचेही अभ्यासक आहेत. स्वत: निर्मितिशील कलावंत आहेत आणि त्यामुळेच त्यांना वि.स. खांडेकरांच्या कवितेविषयी ओढ वाटली असणार, हे उघड आहे. यातूनच त्यांनी अतिशय परिश्रमाने आणि संशोधकवृत्तीने खांडेकरांच्या कविता संपादित केल्या आहेत. त्यास विस्तृत विवेचक प्रस्तावनाही जोडली आहे. खांडेकरांच्या अभ्यासकांनाच नव्हे, तर १९२० नंतरच्या मराठी साहित्याचा अभ्यास करणायांना हा ग्रंथ फार फार उपयोगी ठरणार आहे. –नागनाथ कोत्तापल्ले
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
# 11TH JANUARY #YAYATI #AMRUTVEL #RIKAMA DEVHARA #SONERI SWAPNA- BHANGALELI #SUKHACHA SHODH #NAVI STRI #PAHILE PREM #JALALELA MOHAR #PANDHARE DHAG #ULKA #KRAUNCHVADH #HIRVA CHAPHA #DON MANE #DON DHRUV #ASHRU #SARTYA SARI #ABOLI #SWAPNA ANI SATYA #PHULE AANI KATE #JEEVANKALA #PAKALYA #USHAAP #SAMADHIVARLI PHULE #VIKASAN #PRITICHA SHODH #DAVABINDU #CHANDERI SWAPNE #STREE AANI PURUSH #VIDYUT PRAKASH #PHULE ANI DAGAD #SURYAKAMLE #SURYAKAMLE #DHAGAADACHE CHANDANE #DHAGAADACHE CHANDANE #PAHILI LAT #HASTACHA PAUS #SANJVAT #AAJCHI SWAPNE #PRASAD #CHANDRAKOR #KALACHI SWAPNE #ASHRU ANI HASYA #GHARTYABAHER #KAVI #MURALI #BUDDHACHI GOSHTA #BHAUBIJ #SURYASTA #ASTHI #GHARATE #MADHYARATRA #YADNYAKUNDA #SONERI SAVLYA #VECHALELI PHULE #KALIKA #MRUGAJALATIL KALYA #KSHITIJSPARSH #SUVARNAKAN #VANDEVATA #DHUKE #KALPALATA #MANDAKINI #AJUN YETO VAS FULANA #TISARA PRAHAR #VASANTIKA #RANPHULE #AVINASH #HIRWAL #MANJIRYA #SANJSAVLYA #MUKHAVATE #VAYULAHARI #MANZADHAR #CHANDANYAT #SAYANKAL #ZIMZIM #PAHILE PAN #ADNYATACHYA MAHADWARAT #VANHI TO CHETVAVA #GOKARNICHI PHULE #DUSARE PROMETHEUS : MAHATMA GANDHI #RANG ANI GANDH #RESHA ANI RANG #VAMAN MALHAAR JOSHI : VYAKTI ANI VICHAR #GOPAL GANESH AGARKAR : VYAKTI ANI VICHAR #KESHAVSUT : KAVYA ANI KALA #RAM GANESH GADAKARI : VYAKTI ANI VANGAMAY #PRADNYA ANI PRATIBHA #SAHITYA PRATIBHA : SAMARTHYA ANI MARYADA #GADHAVACHI GEETA ANI GAJRACHI PUNGI #SASHACHE SINHAVALOKAN #PAHILI PAVALA #EKA PANACHI KAHANI #RUTU NYAHALANARE PAN #SANGEET RANKACHE RAJYA # V. S. KHANDEKARANCHI KAVITA #TEEN SAMELANE #SAHA BHASHANE #ABHISHEK #SWAPNASRUSHTI #TE DIVAS TEE MANASE #SAMAJSHILPI #JEEVANSHILPI #SAHITYA SHILPI # AASTIK #SUSHILECHA DEV #RAGINI #MUKYA KALYA #INDRADHANUSHYA #ANTARICHA DIVA #NAVE KIRAN #AGNINRUTYA #KAVYAJYOTI #TARAKA #RANGDEVTA #ययाति # (ज्ञानपीठ पुरस्कार १९७६) #अमृतवेल #रिकामा देव्हारा #सोनेरी स्वप्नं-भंगलेली #सुखाचा शोध #नवी स्त्री #पहिले प्रेम #जळलेला मोहर #पांढरे ढग #उल्का #क्रौंचवध #हिरवा चाफा#वि.स.खांडेकरांची कविता
Customer Reviews
  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    वि. स. खांडेकरांच्या निवडक कविता… कै. वि. स. खांडेकर हे कवी म्हणून फारसे वाचकांच्या परिचयाचे नाहीत. त्यांना आपण कादंबरीकार, कथाकार म्हणूनच ओळखतो. पण त्यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून डॉ. अविनाश आवलगांवकर यांनी ते एक द्रष्टे कवी म्हणून वाचकांसमोर णले आहे. त्यांचे ‘वि. स. खांडेकरांची कविता’ हे पुस्तक नुकतेच प्रसिध्द झाले आहे. कै. खांडेकरांच्या समर्थ लेखणीने वाड्.मयाच्या सर्व क्षेत्रात स्वतंत्र असे स्थान निर्माण झाले नसले तरी त्यांच्या अनेक कविता सातत्याने नियतकालिकांमधून ‘कुमार’ या टोपण नावाने प्रकाशित होत होत्या. त्यामुळे कदाचित कवी म्हणून त्यांची प्रतिमा वाचकांसमोर आली नसावी. पण त्यांचा पिंड कवीचा होता हे या पुस्तकावरुन वाचकांच्या ध्यानी येईल. एका पानाची कहाणी या त्यांच्या आत्मचरित्रात त्यांनी हे स्वत:च मान्य केले आहे. कवितेविषयी प्रेम वाढत गेले आणि कविता हे आत्मविष्काराचे प्रभावी माध्यम आहे याची जाण त्यांना आली. तेव्हापासून त्यांनी वेगवेगळया प्रकारच्या कविता केल्या. ‘दुर्दिन दारुण दूर दुरावून दिन मणि दैवाने दिधला’ अशा अजोड काव्यपंक्ती ते लिहू शकले (पान ७१) ही कविता १९२२ मधली आहे. सहज साध्य, सोपी सरळ भाषा त्यांनाही आवडत होती. म्हणूनच ते म्हणतात ‘आकाशातील चंद्र धराया! प्रयत्न केले कितिक वाया ।। जन्म भूमिला मिठी मारुनी । काय साधिले जगती कोणी ।। किंवा ‘मला कपडे नको दागिने नको काही नको ।। एक बाळ हवा, देवा माझे औक्ष घे, पण माझ्या बाळाला ते भरभरुन दे ।।’ ही साधी सरळ काव्यरचना हृदय हेलवणारी, काळजाला हात घालणारी रचना ते सहजतेने करतात. त्यांच्या कवितेत आंतरिक शक्ती आहे. त्याच प्रेरणेने समाजाचे परिवर्तन करण्याचा प्रयत्न करतात, रुढ, पारंपारिक कल्पना सोडून प्रतिभाशक्तीचा अविष्कार झाला तरच ती कविता सरस्वतीला प्रिय होते. अशी या कवीच्या मनाची धारणा आहे. त्यांच्या कवितेत विरहाचे दु:ख जागोजागी जाणवते. तरुण-तरुणीचे प्रेम दिसत नाही, पण ममतेचे कोंदण मात्र दिसते. निसर्गाचे साक्षांत चैतन्यमयी रुप ते साकार करतात. उत्तुंग प्रतिभा भव्य-दिव्य शब्द हे खांडेकरांचे स्वप्न होते. ते साकारित असताना, प्रेमाचे अस्तित्व शरीराच्या पलीकडे आहे याचे भान ते सोडीत नाहीत, काळया रात्रीतून उज्ज्वल उषेचा जन्म होतो. सावळया आकाशातून पडणाऱ्या सरीने पृथ्वी फुलून येते. सावळा कृष्णच राधेलाप्रिय असतो. ज्याच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते म्हणून परीसच सोन्यापेक्षा महत्वाचा! प्रेम गुणी. या कवितेत (पान १३९). जन म्हणती मजला वेडे, वेड कशाचे कारण नकळे । खडे सोडून उधळीत असतो सगळ्यावरती सदाफुले ।। वि. स. खांडेकरांची कवी म्हणून प्रतिमा वाचकांसमोर निर्माण झाली नाही आणि त्याची कारणे शोधताना डॉ. आवलेगांवकर म्हणतात, कवितेचा आशय अभिव्यक्तीच्या आधारे युगामाणशी समान धर्माने सांगू शकली नाही म्हणा किंवा वाचक पुरेशी दाद देऊ शकले नाहीत. नेमके कारण काय असावे? याबाबतीत ते देखील संभ्रमातच आहेत. तरीदेखील कधी कधी वाचकांचा पूर्वग्रह दूषितपणा तर पुढे आला नसावा का? एरवाद्या जेष्ठ-श्रेष्ठ कवितेत काव्य शोधण्याचा निरर्थक प्रयत्न केला जातो. पण एखाद्या कवीची हृदयस्पर्शी कविता असूनही काळाच्या मागे पडते. नेमके कारण सांगता येत नाही, पण वि. स. खांडेकरांची कविता कशी होती याचे उत्तर ते स्वत:च देतात, त्यामुळे ते खरे वाटते. समकालिन वास्तवाचा जीवमूल्याच्या अनुषंगाने अन्वयार्थ लावून ललित साहित्याची निर्मिती वि. स. खांडेकरांनी केली हे नाकारता येणे शक्य नाही. डॉ. अविनाश आवलगावकर यांना वि. स. खांडेकरांची कविता भावली. म्हणूनच अतिशय संशोधक वृत्तीने त्यांनी हा कवितासंग्रह प्रसिद्ध केला आहे. डॉ. नागनाथ कोत्तोपल्ले यांच्या आग्रहाने हा कवितासंग्रह सुनील मेहता यांनी प्रसिद्ध केला. रवींद्र व्होरा यांचे मुखपृष्ठ अत्यंत वेधक आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KHULBHAR DUDHACHI KAHANI
KHULBHAR DUDHACHI KAHANI by SUNANDA AMRAPURKAR Rating Star
श्रीपाद ब्रह्मे

नुकतंच असंच वेगानं वाचून संपवलेलं दुसरं पुस्तक म्हणजे सुनंदा अमरापूरकर यांचं ‘खुलभर दुधाची कहाणी’. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या त्या पत्नी. अर्थात ही काही त्यांची एकमेव ओळख नव्हे. एक चांगल्या अभिनेत्री, उत्तम अनुवादक म्हणूनही त्या ्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘खुलभर दुधाची कहाणी’ या आत्मचरित्रवजा लेखनातून त्यांच्या जगण्याचा व्यापक पट अतिशय प्रांजळपणे उलगडला आहे. मला हे पुस्तक विशेष भावण्याचं कारण म्हणजे त्यात आलेलं नगरचं वर्णन. मी स्वत: नगरला फार प्रदीर्घ काळ राहिलो नसलो, तरी ते शेवटी माझ्या जिल्ह्याचं गाव. आणि वयाच्या १३ ते २२ अशा महत्त्वाच्या कुमार व तरुण वयातला माझा तिथला रहिवास असल्यानं नगरच्या आठवणी विसरणं शक्य नाही. सुनंदाताई माझ्या आईच्या वयाच्या. त्यामुळं त्यांच्या लहानपणच्या आठवणी जवळपास माझ्या जन्माच्या २०-२५ वर्षं आधीच्या. असं असलं तरी मी त्या वर्णनाशी, त्या काळातल्या नगरशीही रिलेट होऊ शकलो, याचं कारण मुळात गेल्या शतकात बदलांचा वेग अतिशय संथ होता. नगरसारख्या निम्नशहरी भागात तर तो आणखी संथ होता. त्यामुळं एकूण समाजजीवनात १९६० ते १९९० या तीस वर्षांत तपशिलातले फरक सोडले, तर फार मोठा बदल झाला नव्हता. सुनंदाताई माहेरच्या करमरकर. त्यांचं आजोळ‌ सातारा असलं, तरी त्या जन्मापासून नगरमध्येच लहानाच्या मोठ्या झालेल्या. अगदी पक्क्या ‘नगरी’ म्हणाव्यात अशा. ( आजही त्या स्वत:ला अभिमानानं ‘नगरकर’च म्हणवून घेतात.) सुनंदाताईंचे वडील त्या दहा वर्षांच्या असतानाच गेले. त्यांना मामांचा आधार होता, पण आईनंच लहानाचं मोठं केलं. तेव्हाचं त्यांचं निम्न मध्यमवर्गीय जगणं, नगरमधले वाडे, तिथलं समाजजीवन, तिथल्या शाळा, शिक्षक, नगरमधील दुकानं, दवाखाने, तिथल्या गल्ल्या, बाजार हे सगळं सगळं सुनंदाताई अतिशय तपशीलवार उभं करतात. नगरसारख्या मध्यम शहरात वाढलेल्या महाराष्ट्रातील कुठल्याही शहरातील त्या काळातील व्यक्तीला अतिशय सहज रिलेट होईल, असं त्यांचं हे जगणं होतं. त्यात सुनंदाताईंचं लेखन अतिशय सहज, सोपं आणि प्रांजळ असल्यामुळं ते आपल्याला अगदी भिडतं. एका प्रख्यात अभिनेत्याची पत्नी असल्यानं त्यांचं जीवन इतर सर्वसामान्य स्त्रियांपेक्षा वेगळं झालं असेल, अशी आपली अपेक्षा असते. सुनंदाताईंच्या लेखनातून या ‘वेगळ्या जीवना’ची काही तरी झलक मिळेल, अशीही आपली एक भूमिका तयार झालेली असते. सदाशिव अमरापूरकरांसारख्या मनस्वी अभिनेत्याशी लग्न झाल्यानंतर सुनंदाताईंचं जगणं बदललंही; मात्र ते वेगळ्या पद्धतीनं. सदाशिव अमरापूरकर ऊर्फ नगरकरांचा लाडका बंडू त्यांना नगरमध्ये शाळेपासून कसा भेटला, नंतर कॉलेजमध्ये दोघांनी एकाच ग्रुपमधील नाटकं कशी सादर केली, त्यात अगदी नकळतपणे त्यांचं प्रेम कसं जमलं आणि नंतर नगर सोडून त्या पतीच्या कारकिर्दीसाठी मुंबईत कशा आल्या हा सर्व नाट्यमय प्रवास सुनंदाताई अतिशय तन्मयतेनं मांडतात. अमरापूरकर मंडळींच्या घराविषयीचे तपशील त्यात येतात. अमरापूरकरांचे वडील दत्तोपंत हे नगरमधलं मोठं प्रस्थ. श्रीमंत घराणं. मोठा वाडा, नोकरचाकर वगैरे. त्या तुलनेत सुनंदाताईंची माहेरची परिस्थिती जेमतेम म्हणावी अशी. अशा परिस्थितीत हे लग्न झालं आणि त्या अमरापूरकरांची सून झाल्या, इथपर्यंत पुस्तकाचा निम्मा प्रवास (मध्यंतरच) होतो. पुढल्या दोनशे पानांत आपल्याला खऱ्या अर्थानं सदाशिव अमरापूरकर हे काय व्यक्तिमत्त्व होतं, हे उलगडत जातं. अमरापूरकरांनी शेवटपर्यंत त्यांची मध्यमवर्गीय राहणी व मध्यमवर्गीय मूल्यं सोडली नाहीत. ‘अर्धसत्य’सारख्या सिनेमामुळं एका रात्रीतून ते भारतभरात प्रसिद्ध झाले. या एका ओळखीमुळं अमरापूरकरांचं जीवन पूर्ण बदलून गेलं. तोपर्यंत असलेली आर्थिक ओढगस्तीही संपली. हिंदी चित्रपटसृष्टीत अगदी स्वप्नवत अशा रीतीनं ते मोठे स्टार झाले. एकापाठोपाठ एक खलनायकी भूमिका त्यांच्याकडं येऊ लागल्या. पैसा येऊ लागला. अशा परिस्थितीत एक मध्यमवर्गीय कुटुंब या सगळ्या धबधब्याला कसं तोंड देतं आणि आपली मूल्यं कायम जपत राहतं, हे सुनंदाताईंनी फार हृद्यपणे लिहिलं आहे. सुनंदाताईंनी अनेक वर्षं एलआयसीत नोकरी केली. पतीचं अस्थिर क्षेत्र असल्यानं त्यांनी सुरुवातीला नोकरी केलीच; पण नवरा हिंदी चित्रपटसृष्टीत सुपरस्टार व्हिलन झाल्यावरही त्यांनी ही नोकरी सोडली नाही. त्यांच्या तिन्ही मुलींवर त्यांनी उत्तम संस्कार केले. एका सिनेमाच्या प्रीमियरनंतर हे सगळे कुटुंबीय कसे घरी जाऊन पिठलं-भाकरीचं जेवण तयार करून जेवले हे त्यांनी एका प्रसंगात अतिशय खेळकरपणे सांगितलं आहे. अमरापूरकरांचं नाटकवेड, भौतिक सुखांविषयीची काहीशी विरक्त वृत्ती, त्यांचा मित्रांचा गोतावळा, अनेक माणसांचा घरात राबता असा एकूण ‘देशस्थी’ कारभार यावर सुनंदाताई कधी गमतीत, तर कधी काहीसं वैतागून टिप्पणी करतात. अर्थात त्यांचं सदाशिव अमरापूरकरांवर अतिशय प्रेम होतं आणि त्यांनी हे शेवटपर्यंत उत्तम निभावलं. अशा आत्मचरित्रांत अनेकदा ‘आहे मनोहर तरी... गमते उदास’ असा सूर लागण्याचा धोका असतो. सुनंदाताईंच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे, एखादा अपवाद वगळता, त्यांच्या या संपूर्ण पुस्तकात असा रडवा सूर कधीही लागलेला नाही. आपल्याला जे काही मिळालं, ते आपणच निवडलं आहे आणि त्यामुळं त्याविषयी तक्रार करण्याचा आपल्याला काही अधिकार नाही, अशी एक भूमिका त्यांनी घेतलेली दिसते. त्यांच्या या पुस्तकातून विसाव्या शतकातील मध्यमवर्गीय ब्राह्मण घरातील एका तरुणीच्या आशा-आकांक्षांचा, आयुष्यानं दिलेल्या आश्चर्याच्या धक्क्यांचा आणि त्याला सामोरं जाण्यातील धीट दिलदारपणाचा लोभस प्रवास दिसतो. आपली मध्यमवर्गीय मूल्यं जपत, प्रामाणिकपणे व उमेदीनं आयुष्य जगणाऱ्या अनेक महिलांना या पुस्तकात आपल्या जगण्याचं प्रतिबिंब सापडेल. तेच या ‘खुलभर दुधाच्या कहाणी’चं यश आहे. ...Read more

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
प्रभाकर गावंडे, अमरावती

मी विकत घेऊन वाचले आहे हे पुस्तकं, चांगले आहे, नवीन माहिती वाचायला मिळाली.