* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
SHE WAS A VERY BEAUTIFUL LADY, BUT WAS BORN TO A POOR SCHOOL MASTER. HE WAS A VERY HANDSOME DOCTOR, FROM A VERY RICH AND NOBLE FAMILY. HE MARRIED HER AGAINST EVERYONE`S WISH. BUT WITHIN A FEW MONTHS AFTER MARRIAGE SHE GOT WHITE SPOTS ON HER BODY, LEUKODERMA. EVERYONE GOT SCARED OF HER UGLINESS AND THEY THREW HER OUT OF THE HOUSE, THEY SENT HER BACK TO HER PARENT`S HOUSE, AS IF SHE WAS A PIECE OF GARBAGE. SHE BUILT UP HER OWN UNIVERSE, BUT HE WAS CURSING HIMSELF. WHAT IF HE HAD SUFFERED WITH THE SAME DISEASE? WOULD SHE HAVE DISCARDED HIM LIKE A PIECE OF GARBAGE? WHAT CAN BE THE END OF SUCH STORIES? SUDHA MURTHY HAS GIVEN AN INSIGHT TO A SIMPLE WOMAN FROM A TRADITIONAL FAMILY. THE WOMAN IS SHATTERED WITH THE DISEASE BUT YET SHE COMES OUT OF IT. SHE SHAPES HER LIFE WELL. THE NOVEL HAS FOUND SOME DEPTH BECAUSE OF THE AUTHOR`S MATURED THOUGHTS AND HER ATTEMPTS TO CORRELATE WITH THE MODERN LIFE. THIS NOVEL HAS BEEN TRANSLATED IN MANY OF THE INDIAN LANGUAGES. WE ARE SURE THAT THIS MARATHI TRANSLATION WILL BE ABLE TO TOUCH THE HEARTS AND MAKE THEM THINK OVER.
ती अनुपम लावण्यवती,गरीब शाळामास्तरांची मुलगी. तो एक देखणा डॉक्टर – घरंदाज,लक्ष्मीपुत्र. सर्वांच्या मर्जीविरुद्ध त्यानं तिच्याशी लग्न केलं. परंतु दुर्दैवानं काही महिन्यांतच तिच्या अंगावर कोडाचा पांढरा डाग उमटला आणि साया घरादारानं त्या अभद्राला घाबरून, किळसून तिला माहेरी हाकलून लावलं — कचराकुंडीत घाण फेकावी, तसं !.... .... पुढे तिनंही आपलं स्वतंत्र अवकाश उभारलं. मात्र काही काळानं तो आतल्या आत तडफडू लागला – ‘तिच्याऐवजी आपल्याला कोड फुटलं असतं, तर तिनं आपल्याला असंच टाकून दिलं असतं का?....’ काय असते या वास्तवातली तडफड?... काय असू शकतो अशा गोष्टींचा शेवट?.... कन्नड साहित्यातील श्रेष्ठ लेखिका सुधा मूर्ती यांनी या कादंबरीत पारंपरिक वातावरणातून आलेल्या व आयुष्य उद्ध्वस्त करणाया संकटांनी घेरलेल्या तरुणीला वास्तवाचं यथोचित भान देऊन, स्वत:च्या आयुष्याला समर्थपणे आकार देण्याइतकं सक्षम केलं आहे. लेखिकेचे प्रगल्भ विचार व आधुनिक जीवनाशी समन्वय साधणारी दृष्टी,यामुळे या कादंबरीला गहनता प्राप्त झाली आहे. अनेक भारतीय भाषांत अनुवादित झालेल्या या कादंबरीचा हा उत्कृष्ट मराठी अनुवाद वाचकांना चटका लावेल व विचारास प्रवृत्त करेल.

No Records Found
No Records Found
Keywords
#SUDHA MURTY #N.R.NARAYANA MURTY #LEENA SOHONI #UMA KULKARNI #WISE & OTHERWISE #GOSHTI MANSANCHYA #PUNYABHUMI BHARAT #THAILIBHAR GOSHTI #SUKESHINI AANI ITAR KATHA #BAKULA #AYUSHYACHE DHADE GIRAVTANA #AAJICHYA POTADITALYA GOSHTI #MAHASHWETA #DOLLAR BAHU #SAMANYATALE ASAMANYA #PARIGH #PITRURHUN #ASTITVA #HARAVALELYA MANDIRACHE RAHASYA #TEEN HAJAR TAKE #SARPACHA SOOD #GARUDJANMACHI KATHA #TRISHANKU #A BETTER INDIA A BETTER WORLD #NARAYAN MURTY : MULYA JAPNARA EK ADWITIYA AAYUSHYA #सुधा मूर्ती #एन.आर.नारायण मूर्ती #लीना सोहोनी #उमा कुलकर्णी #वाइज अँड अदरवाइज #गोष्टी माणसांच्या #पुण्यभूमी भारत #थैलीभर गोष्टी #सुकेशिनी #बकुळा #आयुष्याचे धडे गिरवताना #आजीच्या पोतडीतल्या गोष्टी #महाश्वेता #डॉलर बहू सामान्यांतले असामान्य #परीघ पितृऋण #अस्तित्व #हरवलेल्या मंदिराचे रहस्य #तीन हजार टाके #सर्पाचा सूड #गरुडजन्माची कथा #त्रिशंकू #अ बेटर इंडिया अ बेटर वर्ल्ड : नारायण मूर्ती #नारायण मूर्ती : मूल्यं जपणारं एक अद्वितीय आयुष्य
Customer Reviews
  • Rating StarPrajakta Wagh

    महाश्वेता कादंबरी आजच वाचून पूर्ण झाली. कादंबरीचे reviews या ग्रुपवर वाचलेले होते, त्यामुळे त्याचवेळी ठरवलं होतं ही कादंबरी वाचायची. सुधा मूर्ती लिखित ही कादंबरी खूप आवडली, अणि मनाला पण भावली. लेखिकेने कथेच खूप छान सादरीकरण केलेले आहे अणि लिखाणच कौशलय पण खूप छान आहे. मला वाचताना कुठेच कंटाळा नाही आला. प्रत्येक वेळी उत्कंठा होती की पुढे काय असेल. ही कादंबरी वाचून सुधा मूर्ती यांच्या अजून कादंबरी व कथा वाचायला नक्की आवडतील. ...Read more

  • Rating StarPawan Chandak

    खूप दिवसापासून बहुप्रतिक्षित अशी अनेक मित्रांकडून ऐकलेली पण आजवर न वाचलेली अशी सुधा मूर्ती लिखित व उमा कुलकर्णी अनुवादित अप्रतिम कादंबरी `महाश्वेता` एका बैठकीतच वाचून झाली. ही कादंबरी वाचल्यावर एक पुरुष म्हणून मला वारंवार काही प्रश्न पडले, मला वाते ती प्रतिक्रिया या लिहीत आहे. तुमच्या दृष्टीने सौंदर्य म्हणजे काय ? संपूर्ण कादंबरी याच प्रश्नावर आणि त्याच्या उत्तरावर केंद्रित आहे असे मला वाटते आणि मला त्यातील आवडलेले काही संदर्भ येथे देत आहे सृष्टीच सौंदर्याचा गुरु, माता ! किती प्रकारची फुलं निसर्गात फुलत असतात ! मानवाच्या कल्पनेतही येणार नाहीत इतक्या विविध रंगांची उधळण असते. किती विविध, मनाला खेचून घेणारे आकार ! निळ्या आकाशात पांढर्‍या शुभ्र ढगांची मनमोहक नृत्य! पावसाळ्यात सर्वत्र हिरव्या विविध रंगाची छटा ! त्यात सुंदर पशू-पक्षी-फुलपाखरे, कीटक, सगळेच माणसांच्या दृष्टीने कल्पनातीत आहे मानव स्वतःला सौंदर्याचा उपासक मानून नटतो, पण मानवी सौंदर्य तारुण्य काळाशी सीमित आहे. भर तारुण्यात सौंदर्याच्या मस्तीत वावरणारे आणि तारुण्य सरलं की पडलेले दात, पांढरे केस, सुरकुतलेली कातडी, ओसरलेला बांधा यामुळे सौंदर्यविहिन होऊन जातात. माणसांचं सौंदर्य त्याच्या रूपापेक्षा गुणांवर अवलंबून असतं. कुठे आणि कसे जन्मयचं, हे कुठे आपल्या हातात आहे ? तसेच गोरा रंग आणि रूप हे आपल्या हातात नाही. मग शुद्ध निष्कल्मश मन आपल्याकडे असले पाहिजे. कथेतील नायिका अनुपमा - एक सर्वसामान्य कुटुंबातील गरीब शाळा मास्तरांची विद्याविभूषित व नाटक अभियानात तज्ञ. तर या कथेतील डॉक्टर आनंद सौदर्योपासक, घरंदाज कुटुंबातील असा हा लक्ष्मीपुत्र. एका नाटकात अनुपमा व आनंदाची भेट होते तिच्या सौंदर्यावर भाळून आनंद अनुपमा कडे लग्नाची मागणी घालतो. पुढे त्या दोघांचे लग्न थाटात उरकून तिला घरी आणून काही दिवसांनी उच्च शिक्षणासाठी आनंद अनुपमेला सासूबाई राधक्का कडे सोपवून लंडनला रवाना होतो. राधक्का म्हणजे जुन्या विचारांच्या घरंदाज, कर्मकांडात रमणारी स्त्री. दुर्देवाने काही महिन्यातच अनुपमा च्या अंगावर पांढरे डाग उमटू लागतात. आजवर अनुपमाची तिचे `सौंदर्य` हाच गुण मांडल्या गेलेल्या त्या घरात अंगावरील कोड यामुळे तिची ओळखच मिटवून टाकली जाते. तिला आलेल्या पांढ-या डागाला घाबरून कीळसून तिच्या सासरच्या लोकांनी तिला घराबाहेर हाकलून अर्थात बहिष्कृत करून टाकतात. पुढे ती माहेरी आल्यावर देखील तिची अशाच प्रकारे कुचंबणा होत राहते, घरी येणाऱ्या प्रत्येक दुःख, चढ उत्तरास, अडचणींसाठी तिलाच जबाबदार धरले जाते. पुढे तिची अशी अवस्था होते की समाजात पावलोपावली केवळ त्या पांढऱ्या डागामुळे होणाऱ्या अपमान, कुचुंबना यामुळे तिला जगावे की मरावे असा विचार येतो. पण ती जगण्यास प्राधान्य देते आणि अर्थपूर्ण व स्वावलंबी जगण्यासाठी मुंबईत येते. ती स्वतःच्या मेहनतीवर आणि कौशल्यावर, ज्ञानावर आपले स्वतंत्र अवकाश उभारते. स्वतःच्या शिक्षणाचा आधार घेऊन ती आयुष्यात पुन्हा उभी राहते तसेच स्वतःच्या पायावर व समर्थपणे स्वतःची मित्र-मैत्रिणींचे विश्व निर्माण करते. या संपूर्ण परिस्थितीमध्ये केवळ तिच्या अंगावर पांढरे डाग आहे म्हणून तिच्या सासू, सासरच्यांनी तिला घराबाहेर काढले नाही तितका तिला दोष दिला. इतकेच नाही तर तिचा नवरा आनंद देखील तिला स्वीकारत नाही, तिने लंडनला त्याला पाठवलेल्या पत्राचे उत्तर न देता केवळ त्या क्षुल्लक पांढऱ्या डागामुळे तिला स्वीकारत नाही. या परिस्थितीमध्ये असेच एकदा काही काळानंतर आनंद आतल्याआत तडफडू लागतो की "तिच्या ऐवजी जर आपल्याला कोड फुटलं असतं, तर तिने देखील आपल्याला असं टाकून दिलं असतं का ? काय असते या वास्तवातील तडफड ? काय असू शकते अशा गोष्टींचा शेवट ? या कादंबरीत मला आवडलेले पात्र म्हणजे डॉ वसंत. डॉ वसंत तिच्या कोडा सकट तिला स्वीकारायला तयार असूनही नवरा, प्रेम संसार निरर्थक वाटुन आधुनिक सुसंस्कृत, तडफदार नायीका साकारण्यात ती यशस्वी होते. या पुस्तकात कर्नाटक संगीत, यक्षगान, संस्कृत साहित्यातील विविध संदर्भ यामुळे या कादंबरीची कलात्मक मूल्य वाढले आहे असे मला वाटते. आनंदला होणारी वास्तवातील तडफड,अनुपमानी स्वतःच्या मेहनतीवर उभारलेले स्वतंत्र आकाश ही सर्व परिस्थिती सुधा मूर्तींनी आपल्या लिखाणातून अप्रतिम मांडली आहे. या कादंबरीत पारंपारिक वातावरणातून आलेल्या व आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या संकटांनी घेरलेल्या तरुणीला वास्तवाचे यथोचित भान देऊन, स्वतःच्या आयुष्याला समर्थपणे आकार देण्याइतकं सक्षम केले आहे. या लिखाणातून लेखिकेचे प्रगल्भ विचार व आधुनिक जीवनाशी समन्वय साधणारी दृष्टी यामुळे या कादंबरीला घनता प्राप्त झाले आहे. मी काही सांगण्यापेक्षा मला वाटते आपल्या सर्वांनाच आत्मचिंतन करायला लावणारी अशी ही महाश्वेता कादंबरी एकदा वाचावी ...Read more

  • Rating Starविनोद गजानन कारवे

    `महाश्वेता` कादंबरीची नायिका अनुपमा सुंदर आहे, अभिजात अभिनयकला तिच्यात आहे, संस्कृत तज्ञ आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असली तरी संस्कारांनी श्रीमंत आहे. पण दुर्दैवाने लग्नानंतर तिच्या शरीरावर कोड फुटते आणि सासरी व माहेरी, आजारामुळे तिची पुरती ओळख मिटवन टाकली जाते. ही मिटवून टाकलेली ओळख अनुपमा ज्या ताकदीने आयुष्याचा स्वीकार करत पुन्हा मिळवत जाते, त्याची ध्येर्यकथा म्हणजे `महाश्वेता` ही सुधा मूर्ती यांची कादंबरी होय. कादंबरीची सुरुवात आनंद आणि अनुपमा यांच्या विवाहाने होते. अनुपमा अत्यंत सुंदर, पण एका शाळा मास्तरची मुलगी आणि आनंद अत्यंत हुशार, गर्भश्रीमंत डॉक्टर. विषम आर्थिक परिस्थितींमुळे दोघांचं लग्न होणे कठीण; पण सर्वांचा विरोध असूनही त्यांचं लग्न होतं. तीन महिन्यांनंतर पुढील शिक्षणासाठी आनंद इंग्लंडला रवाना होतो. तो गेल्यावर सर्वस्वी एकट्या अनुपमाला ऐश्वर्याचा गर्व असलेली सासू व नणंद यांच्याकडून मिळणारी वागणूक अपमानाची असते. त्यातच पायावर निखारा पडल्याचे निमित्त होते आणि अनुपमाच्या पायावर पांढरा डाग उमटतो. तो वाढतच जातो नि कोड फुटल्याचे निदान डॉक्टर करतात. त्यामुळे अनुपमाला सासरी तुच्छ लेखले जाऊ लागते. या सगळ्यात तिला आशा असते पती आनंदकडून; पण तिच्या पत्राला आनंदकडून जराही प्रतिसाद मिळत नाही. अनुपमा माहेरी परतते. तिच्या व्यंगामुळे तिच्या बहिणीचे ठरलेले लग्नही मोडते. त्यामुळे वडिल-बहिणही अंतरतात. सर्वांकडून अपमानित झालेली अनुपमा मुंबईत येते. मैत्रिणीकडे राहून एका कॉलेजात संस्कृत विषयाची प्राध्यापक म्हणून नोकरी करु लागते. हळूहळू अनुपमा स्वतःला सावरून आपलं स्वतंत्र विश्व निर्माण करते आणि इतरांना जगण्याची नवी दिशा देते. पुढे तिला पती आनंद न्यायला येतो, तिची माफी मागतो, तिच्या व्यंगासकट तिला स्वीकारु पाहतो. पण आता कोडाने `महाश्वेता` झालेल्या अनुपमाला ओढ असते ती फक्त तिच्या कलेची, अभिनयाची. घर-संसार यापासून मनाने दूर झालेली अनुपमा आनंदला चांगलंच सुनावते व त्याच्यासोबत जाण्यास नकार देते. `महाश्वेता` कादंबरीचे प्रत्येक पान आपल्याला बांधून ठेवते. भाषा भारदस्त असून अलंकारिक सुवचने, उपमांचा वापर यांमुळे कादंबरी वाचनीय झालेली आहे. या पुस्तकातील अनुपमा व डॉ. सत्यप्रकाश आणि अनुपमा व आनंद यांच्यातील संवाद केवळ अप्रतिम आहेत. - श्री. विनोद गजानन कारवे (टिटवाळा) ...Read more

  • Rating StarPriyanka Shah Sancheti

    एका स्त्रीला लग्नानंतर शारिरीक व्यंग उद्भवल्यास त्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन आणि त्याचे भोगावे लागलेले परिणाम व तिने त्याला कसं तोंड दिले... याचे वर्णन.. अप्रतिम कादंबरी...

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KHULBHAR DUDHACHI KAHANI
KHULBHAR DUDHACHI KAHANI by SUNANDA AMRAPURKAR Rating Star
श्रीपाद ब्रह्मे

नुकतंच असंच वेगानं वाचून संपवलेलं दुसरं पुस्तक म्हणजे सुनंदा अमरापूरकर यांचं ‘खुलभर दुधाची कहाणी’. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या त्या पत्नी. अर्थात ही काही त्यांची एकमेव ओळख नव्हे. एक चांगल्या अभिनेत्री, उत्तम अनुवादक म्हणूनही त्या ्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘खुलभर दुधाची कहाणी’ या आत्मचरित्रवजा लेखनातून त्यांच्या जगण्याचा व्यापक पट अतिशय प्रांजळपणे उलगडला आहे. मला हे पुस्तक विशेष भावण्याचं कारण म्हणजे त्यात आलेलं नगरचं वर्णन. मी स्वत: नगरला फार प्रदीर्घ काळ राहिलो नसलो, तरी ते शेवटी माझ्या जिल्ह्याचं गाव. आणि वयाच्या १३ ते २२ अशा महत्त्वाच्या कुमार व तरुण वयातला माझा तिथला रहिवास असल्यानं नगरच्या आठवणी विसरणं शक्य नाही. सुनंदाताई माझ्या आईच्या वयाच्या. त्यामुळं त्यांच्या लहानपणच्या आठवणी जवळपास माझ्या जन्माच्या २०-२५ वर्षं आधीच्या. असं असलं तरी मी त्या वर्णनाशी, त्या काळातल्या नगरशीही रिलेट होऊ शकलो, याचं कारण मुळात गेल्या शतकात बदलांचा वेग अतिशय संथ होता. नगरसारख्या निम्नशहरी भागात तर तो आणखी संथ होता. त्यामुळं एकूण समाजजीवनात १९६० ते १९९० या तीस वर्षांत तपशिलातले फरक सोडले, तर फार मोठा बदल झाला नव्हता. सुनंदाताई माहेरच्या करमरकर. त्यांचं आजोळ‌ सातारा असलं, तरी त्या जन्मापासून नगरमध्येच लहानाच्या मोठ्या झालेल्या. अगदी पक्क्या ‘नगरी’ म्हणाव्यात अशा. ( आजही त्या स्वत:ला अभिमानानं ‘नगरकर’च म्हणवून घेतात.) सुनंदाताईंचे वडील त्या दहा वर्षांच्या असतानाच गेले. त्यांना मामांचा आधार होता, पण आईनंच लहानाचं मोठं केलं. तेव्हाचं त्यांचं निम्न मध्यमवर्गीय जगणं, नगरमधले वाडे, तिथलं समाजजीवन, तिथल्या शाळा, शिक्षक, नगरमधील दुकानं, दवाखाने, तिथल्या गल्ल्या, बाजार हे सगळं सगळं सुनंदाताई अतिशय तपशीलवार उभं करतात. नगरसारख्या मध्यम शहरात वाढलेल्या महाराष्ट्रातील कुठल्याही शहरातील त्या काळातील व्यक्तीला अतिशय सहज रिलेट होईल, असं त्यांचं हे जगणं होतं. त्यात सुनंदाताईंचं लेखन अतिशय सहज, सोपं आणि प्रांजळ असल्यामुळं ते आपल्याला अगदी भिडतं. एका प्रख्यात अभिनेत्याची पत्नी असल्यानं त्यांचं जीवन इतर सर्वसामान्य स्त्रियांपेक्षा वेगळं झालं असेल, अशी आपली अपेक्षा असते. सुनंदाताईंच्या लेखनातून या ‘वेगळ्या जीवना’ची काही तरी झलक मिळेल, अशीही आपली एक भूमिका तयार झालेली असते. सदाशिव अमरापूरकरांसारख्या मनस्वी अभिनेत्याशी लग्न झाल्यानंतर सुनंदाताईंचं जगणं बदललंही; मात्र ते वेगळ्या पद्धतीनं. सदाशिव अमरापूरकर ऊर्फ नगरकरांचा लाडका बंडू त्यांना नगरमध्ये शाळेपासून कसा भेटला, नंतर कॉलेजमध्ये दोघांनी एकाच ग्रुपमधील नाटकं कशी सादर केली, त्यात अगदी नकळतपणे त्यांचं प्रेम कसं जमलं आणि नंतर नगर सोडून त्या पतीच्या कारकिर्दीसाठी मुंबईत कशा आल्या हा सर्व नाट्यमय प्रवास सुनंदाताई अतिशय तन्मयतेनं मांडतात. अमरापूरकर मंडळींच्या घराविषयीचे तपशील त्यात येतात. अमरापूरकरांचे वडील दत्तोपंत हे नगरमधलं मोठं प्रस्थ. श्रीमंत घराणं. मोठा वाडा, नोकरचाकर वगैरे. त्या तुलनेत सुनंदाताईंची माहेरची परिस्थिती जेमतेम म्हणावी अशी. अशा परिस्थितीत हे लग्न झालं आणि त्या अमरापूरकरांची सून झाल्या, इथपर्यंत पुस्तकाचा निम्मा प्रवास (मध्यंतरच) होतो. पुढल्या दोनशे पानांत आपल्याला खऱ्या अर्थानं सदाशिव अमरापूरकर हे काय व्यक्तिमत्त्व होतं, हे उलगडत जातं. अमरापूरकरांनी शेवटपर्यंत त्यांची मध्यमवर्गीय राहणी व मध्यमवर्गीय मूल्यं सोडली नाहीत. ‘अर्धसत्य’सारख्या सिनेमामुळं एका रात्रीतून ते भारतभरात प्रसिद्ध झाले. या एका ओळखीमुळं अमरापूरकरांचं जीवन पूर्ण बदलून गेलं. तोपर्यंत असलेली आर्थिक ओढगस्तीही संपली. हिंदी चित्रपटसृष्टीत अगदी स्वप्नवत अशा रीतीनं ते मोठे स्टार झाले. एकापाठोपाठ एक खलनायकी भूमिका त्यांच्याकडं येऊ लागल्या. पैसा येऊ लागला. अशा परिस्थितीत एक मध्यमवर्गीय कुटुंब या सगळ्या धबधब्याला कसं तोंड देतं आणि आपली मूल्यं कायम जपत राहतं, हे सुनंदाताईंनी फार हृद्यपणे लिहिलं आहे. सुनंदाताईंनी अनेक वर्षं एलआयसीत नोकरी केली. पतीचं अस्थिर क्षेत्र असल्यानं त्यांनी सुरुवातीला नोकरी केलीच; पण नवरा हिंदी चित्रपटसृष्टीत सुपरस्टार व्हिलन झाल्यावरही त्यांनी ही नोकरी सोडली नाही. त्यांच्या तिन्ही मुलींवर त्यांनी उत्तम संस्कार केले. एका सिनेमाच्या प्रीमियरनंतर हे सगळे कुटुंबीय कसे घरी जाऊन पिठलं-भाकरीचं जेवण तयार करून जेवले हे त्यांनी एका प्रसंगात अतिशय खेळकरपणे सांगितलं आहे. अमरापूरकरांचं नाटकवेड, भौतिक सुखांविषयीची काहीशी विरक्त वृत्ती, त्यांचा मित्रांचा गोतावळा, अनेक माणसांचा घरात राबता असा एकूण ‘देशस्थी’ कारभार यावर सुनंदाताई कधी गमतीत, तर कधी काहीसं वैतागून टिप्पणी करतात. अर्थात त्यांचं सदाशिव अमरापूरकरांवर अतिशय प्रेम होतं आणि त्यांनी हे शेवटपर्यंत उत्तम निभावलं. अशा आत्मचरित्रांत अनेकदा ‘आहे मनोहर तरी... गमते उदास’ असा सूर लागण्याचा धोका असतो. सुनंदाताईंच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे, एखादा अपवाद वगळता, त्यांच्या या संपूर्ण पुस्तकात असा रडवा सूर कधीही लागलेला नाही. आपल्याला जे काही मिळालं, ते आपणच निवडलं आहे आणि त्यामुळं त्याविषयी तक्रार करण्याचा आपल्याला काही अधिकार नाही, अशी एक भूमिका त्यांनी घेतलेली दिसते. त्यांच्या या पुस्तकातून विसाव्या शतकातील मध्यमवर्गीय ब्राह्मण घरातील एका तरुणीच्या आशा-आकांक्षांचा, आयुष्यानं दिलेल्या आश्चर्याच्या धक्क्यांचा आणि त्याला सामोरं जाण्यातील धीट दिलदारपणाचा लोभस प्रवास दिसतो. आपली मध्यमवर्गीय मूल्यं जपत, प्रामाणिकपणे व उमेदीनं आयुष्य जगणाऱ्या अनेक महिलांना या पुस्तकात आपल्या जगण्याचं प्रतिबिंब सापडेल. तेच या ‘खुलभर दुधाच्या कहाणी’चं यश आहे. ...Read more

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
प्रभाकर गावंडे, अमरावती

मी विकत घेऊन वाचले आहे हे पुस्तकं, चांगले आहे, नवीन माहिती वाचायला मिळाली.