* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
NOONI IS A CITY GIRL WHO IS VERY SURPRISED AT THE UNEXPECTED PACE OF LIFE IN HER GRANDPARENT’S VILLAGE IN THE STATE OF KARNATAKA. NOT BEING FAZED WITH THE TURN OF EVENTS, SHE ENGAGES HERSELF IN MANY OF THE ODD JOBS THAT ARE AVAILABLE IN THE VILLAGE. SHE RESORTS TO DOING WORK LIKE PAPAD MAKING, ORGANISING ENJOYABLE PICNICS, LEARNING TO RIDE A CYCLE AND A LONG LIST OF ACTIVITIES WITH HER NEW FOUND FRIENDS.JOIN THE VERY CURIOUS CHARACTER OF NOONI AS SHE UNFOLDS THE MYSTERY BEHIND THE STEPWELL. HER INCESSANT URGE TO ABSTRACTING INFORMATION IS WHAT LEADS HER ON THIS ADVENTURE.
भारताच्या लाडक्या कथाकार सुधा मूर्ती यांच्या लेखणीतून साकार झालेली एक नवी साहस कथा. शहरात वाढलेली मुलगी अनुष्का सुट्टीत आपल्या आजी-आजोबांच्या गावी येते. खेड्यातलं संथ जीवन बघून तिला आश्चर्याचा धक्का बसतो; पण ती लगेचच तिथे रुळते. तिथल्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये ती सहभागी होऊ लागते. पापड बनवणं, सहलीला जाणं, सायकल चालवायला शिकणं आणि नव्या मित्र-मंडळींबरोबर झालेली दोस्ती या सगळ्यात तिचे दिवस भराभर जाऊ लागतात... आणि एक दिवस गावाजवळच्या रानात आपल्या मित्र-मंडळींबरोबर सहलीला गेलेली असताना अनुष्काला एका जुन्या, पायऱ्या असलेल्या विहिरीचा शोध लागतो. या विहिरीबद्दल तिनं नुकतीच आजीकडून एकदंत कथा ऐकलेली असते. निर्भय अनुष्का सोबत एका नव्या साहसासाठी तयार व्हा! सुधा मूर्ती यांच्या लेखणीतून उतरलेल्या या पुस्तकाची गोडी अवीट आहे. ते एकदा हातात आल्यावर खाली ठेवावंसं वाटणारच नाही!

No Records Found
No Records Found
Keywords
#SUDHA MURTY #N.R.NARAYANA MURTY #LEENA SOHONI #UMA KULKARNI #WISE & OTHERWISE #GOSHTI MANSANCHYA #PUNYABHUMI BHARAT #THAILIBHAR GOSHTI #SUKESHINI AANI ITAR KATHA #BAKULA #AYUSHYACHE DHADE GIRAVTANA #AAJICHYA POTADITALYA GOSHTI #MAHASHWETA #DOLLAR BAHU #SAMANYATALE ASAMANYA #PARIGH #PITRURHUN #ASTITVA #HARAVALELYA MANDIRACHE RAHASYA #TEEN HAJAR TAKE #SARPACHA SOOD #GARUDJANMACHI KATHA #TRISHANKU #A BETTER INDIA A BETTER WORLD #NARAYAN MURTY : MULYA JAPNARA EK ADWITIYA AAYUSHYA #सुधा मूर्ती #एन.आर.नारायण मूर्ती #लीना सोहोनी #उमा कुलकर्णी #वाइज अँड अदरवाइज #गोष्टी माणसांच्या #पुण्यभूमी भारत #थैलीभर गोष्टी #सुकेशिनी #बकुळा #आयुष्याचे धडे गिरवताना #आजीच्या पोतडीतल्या गोष्टी #महाश्वेता #डॉलर बहू सामान्यांतले असामान्य #परीघ पितृऋण #अस्तित्व #हरवलेल्या मंदिराचे रहस्य #तीन हजार टाके #सर्पाचा सूड #गरुडजन्माची कथा #त्रिशंकू #अ बेटर इंडिया अ बेटर वर्ल्ड : नारायण मूर्ती #नारायण मूर्ती : मूल्यं जपणारं एक अद्वितीय आयुष्य
Customer Reviews
  • Rating StarPawan Chandak

    `हरवलेल्या मंदिराचे रहस्य` वाचकांच्या नजरेतून उलगडणारी कादंबरी सुधा मूर्ती लिखित व लीना सोहोनी अनुवादित रहस्यमय पण तितकीच मनाला भावणारी, अत्यंत सोप्या शब्दात मांडलेली इतकेच नाही तर लहान मुलांना जरी वाचून दाखवली तर एका बैठकीत समजणारी अशी अप्रतिम कदंबरी आज एका बैठकीत वाचून झाली. ही कादंबरी वाचतांना माझे लहान होऊन लहानपणी च्या दिवसांत जाऊन सुधा आज्जी मला ही गोष्ट सांगत आहे आणि मी देखील आज वयाच्या चाळिसाव्या वर्षी तितक्याच आवडीने ऐकतोय असं वाटत होतं. एका आटपाट नगरात सोमनायक नावाचा दानशूर राजा एका शिल्पकाराच्या मदतीने पायऱ्यांची विहीर, सात शिवमंदिर, शिल्प, खांब असे सुंदर मंदिर व अमृतमय पाण्याचा झरा असलेली विहीर तयार करतो. व स्वतः पाहरेकरी ठेऊन ती विहीर प्रदूषित होण्यापासून रक्षण करतो. पण तो तीर्थयात्रेला गेल्यावर त्याचा पुत्र हा नियम मोडून मित्रांसोबत जलविहार करून लावलेले सर्व नियम मोडून हे पाणी प्रदूषित करतो ज्यामुळे प्रजेला दूषित पाण्यामुळे आजार व पुढे परक्रीय आक्रमण आदींमुळे हे विहिर पूर्ण बुजवण्यात येते. ही झाली सोमहळी गावविषयी दंतकथा. तर मित्रानो अनुष्का तिच्या आजोळी सुटयात जाते तिथे तिची मैत्री अमित, मेधा, आनंद आणि महादेव यांच्याशी होते. आणि ते गावातील ग्रामीण जीवन, पर्यटन, शेती, गावातील नदी, टेकडी, बगीचा, जंगल, गाय गोठा, वन्यजीव, पक्षी आदी निसर्गमय वातावरणात रमतात. या सर्व गावातील जीवनाचा आनंद घेत असताना एकदा त्यांची आज्जी आजोबा वर लिहिलेली हरवलेल्या मंदिर व विहीर ची गोष्ट त्यांना सांगते. एकदा वळवाचा पावसानंतर नदी काठचे सौंदर्य पाहण्यासाठी अनुष्का आणि तिचे 4 मित्र भटकंती साठी निघतात तेंव्हा अनुष्का चा पाय चिखलात खोलवर रुतल्यावर त्यांना रहस्यमय खड्डा आहे की विहीर आहे की गुफा याचा शोध लागतो. पुढे पडणारे प्रश्न आज्जी आजोबांना ही गोष्ट सांगायची का की आपण एकट्याने खोद काम करायचे ? गावातील लोकांना कळल्यावर ते काय म्हणतील की मदत करतील ? पुरातत्व विभागाची यावर काय भूमिका राहील ? शासकीय वेळकाढू वृत्तीमुळे खोदकाम होईल का ? त्या खड्यात खरच आज्जीने सांगितल्या दंत कथे नुसार नक्कीच विहीर , सात शिवमंदिर, पाण्याचा अमृतमय झरा असेल का ? तर वाचक मित्रांनो एकदा नक्कीच वाचून पहा आणि आपल्या मुलांना देखील वाचून दाखवा त्यांना देखील आवडेल डॉ पवन चांडक एक वाचक ...Read more

  • Rating StarPankaj Datare

    *📖हरवलेल्या मंदिराचे रहस्य*📖 ही कादंबरी म्हणजे अनुष्का या बारा वर्षांच्या मुलीची साहसकथा आहे. शहरात वाढलेली अनुष्का सुट्टीत आपल्या आजी-आजोबांच्या गावी जाते. गावातील जीवन शहरापेक्षा वेगळे असल्याचे तिच्या लक्षात येते. पण तिला ते हळूहळू आवडू लागते तिथल्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये ती सहभागी होऊ लागते. पापड बनवणं, वरदा नदीच्या काठी सहलीला जाणं, सायकल चालवणे, नवे मित्र-मैत्रिणी या सर्वात तिची सुट्टी छान चाललेली असते. यात आणखी एक गंमत म्हणजे आजीकडून गोष्टी ऐकणे. अशीच आजीने तिला गावातील एका जुन्या पायऱ्या असलेल्या विहिरीची गोष्ट सांगितलेली असते. एक दिवस ती गावाजवळच्या रानात आपल्या मित्रमंडळींबरोबर सहलीला गेलेली असताना तिला त्याच जुन्या, पायऱ्या असलेल्या विहिरीचा शोध लागतो. पुढे या विहिरीत काय काय सापडते, हे जाणून घेण्यासाठी ही साहसकथा वाचायलाच हवी. गावातील जीवन, तिथले लोक यांची ओळख होत होत पुढे एका गुपिताच्या शोधापर्यंतचा अनुष्काचा प्रवास कसा होत जातो, हे वाचणे हा नक्कीच एक आनंददायी अनुभव आहे. पुस्तकात निरनिराळ्या प्रसंगांसाठी चित्रांचाही समावेश करण्यात आला आहे. एका गुपिताच्या शोधाची ही कहाणी सांगताना मूर्ती यांनी ग्रामीण जीवनातील साधेपणाचे, निसर्गाशी येणाऱ्या सहवासाचे तसेच तिथल्या सकारात्मक परंपरांचेही वर्णन अतिशय प्रांजळपणे केले आहे. त्यामुळे लहानांबरोबरच मोठय़ांनीही वाचावी अशी ही साहसकथा आहे. ...Read more

  • Rating StarTrupti Kulkarni

    पुस्तक वाचण्याची आवड असलेला माणुस कोणतंही पुस्तक वाचतो मग ते बालवाङ्‌मय का असेना. उलट त्यामुळं प्रसंगी लहान-मोठं होण्यातली मजाही तो अनुभवू शकतो. मला अशीच मजा अनुभवायला मिळाली ती सुधा मूर्तींच्या "हरवलेल्या मंदिराचे रहस्य" या अनुवादीत पुस्तकामुळं. मेहा पब्लिशिंगचं हे पुस्तक येत्या उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांनी आर्वजून वाचावं असं आहे. यातल्या अनुष्काच्या करामती वाचताना आपण आपल्या लहानपणी वाचलेल्या "चिंगी" ची आठवण होते. क्वचित प्रसंगी ही आधुनिक चिंगीच आहे की काय असंही वाटून जातं. त्यामुळं आपल्या मनात बालपण जपून असलेल्या प्रत्येकानं हे पुस्तक वाचायला हरकत नाही. किंबहुना ज्यांच्या लहानपणीच्या सुट्टया आजोळी गेल्या आहेत त्यांना तर ते बालपणीचे दिवस नक्की आठवतील. याशिवायही या पुस्तकात अजुन खुप गमती जमती आहेत, काही उल्लेखनीय गोष्टीही आहेत. पुस्तकाची उल्लेखनीय बाब म्हणजे त्याची प्रस्तावना. फारच सुंदर आणि योग्य शब्दांत त्यांनी लिहली आहे. शिवाय हे पुस्तक सुधा मूर्तींनी त्यांच्या नातीला म्हणजेच अनुष्काला अर्पण केलं आहे. तर अशा या धाडसी अनुष्काच्या करामती सांगणाऱ्या एकुण तेरा कथा आहेत. या कथाप्रकांरांच वैशिष्ट्य म्हणजे त्या म्हणल्या तर प्रत्येक स्वतंत्र कथा आहेत आणि म्हणलं तर ती एक छोट्यांची छोटीशी कादंबरिकाही आहे. बंगळूर सारख्या शहरात सीबीएसर्इ बोर्डाच्या शाळेत शिकणारी अनुष्का सुट्टी निमित्त "सोमनहळ्ळी" सारख्या लहानशा खेड्यात आपल्या आजीआजोबांकडे रहायला येते. तीचे आर्इवडील कामानिमित्त परगावीच राहतात. आणि मग अनुष्काच्या आयुष्यात ज्या ज्या धमाल गोष्टी घडतात त्या वाचताना आपण रंगुन जातो. तिला निर्सगाची अद्‌भुत रहस्यं, चमत्कार पहायला आणि अनुभवायला मिळतात. अशीच एकदा आजी आजोबांकडुन ऐकलेल्या कथति गोष्टीच्या रहस्यानं अनुष्का भारावलेली असते आणि तिच्याही नकळत त्या रहस्यमय गोष्टीचा ती एक मोठा भाग होते. म्हणजे नक्की काय घडतं? ते जाणण्यासाठी हे पुस्तक वाचायला हवं. आता ही कथा वाचताना मला जाणवलेली आणखी एक गोष्ट म्हणजे एखाद्या गावाच्या किंवा शहराच्या बाबतीतही काही लोककथा असतात. ज्याला कोणी सांगोवांगीच्या गोष्टी म्हणतो तर कोणी कपोलकल्पित कथा म्हणतं. तशीच त्या गावच्या हजारो वर्षांपुर्वीच्या सोमनायक नावाच्या सद्‌शील राजाची कथा सगळ्यांना ऐकीव माहित असते. पण तीच कथा सांगण्याची आजीची पद्धत निराळी, आजोबांची निराळी, शिवाय गावातले इतर गावकरीही ती निराळ्या पद्धतीनं सांगत असतात. इथं कानगोष्टीच्या खेळाची आठवण आल्यावाचुन रहात नाही. आणि शेवटी घडतंही तसंच अगदी कानगोष्टी सारखं. मुळ कथा काही वेगळीच असते. पण एक मात्र आहे ती सत्यकथा असते. आणि त्या गोष्टीची सत्यता पडताळण्यासाठी, रहस्यांचा शोध लावण्यासाठी सगळे गावकरी एकत्र येऊन जे सहकार्य करतात ते तर वाखाणण्याजोगं आहे. या सगळ्या धमालीत अजुनही काही गोष्टी आवर्जून जाणवतात. ते म्हणजे आजीआजोबा आणि नातवंड यांच्यातलं नातं, दोन पिढ्यातलं अंतर, शहरी आणि ग्रामिण जीवनातला फरक. शिक्षण पद्धतीतला फरक. मुलांच्या नैसर्गिक क्षमतांचा वापर कसा होऊ शकतो याची जाणीव. अशा अनेक लपलेल्या वाटा सापडतात. खरंतर हे पुस्तक केवळ मुद्रित माध्यमापुरतंच मर्यादित न राहता याचं दृकश्राव्य माध्यमात माध्यमांतर झालं तर अधिक चांगल्या प्रकारे त्याचा आस्वाद घेता येर्इल आणि ते अधिकाधिक परिणामकारक ठरेल. तृप्ती कुलकर्णी ...Read more

  • Rating StarMAHARASHTRA TIMES 05-02-2017

    लहान मुलांचे जग हे एक निराळेच विश्व असते. लेखिका सुधा मूर्ती यांनी हे विश्व संवेदनशील नजरेने अनुभवले आहे. अनुष्का ही शहरात राहणारी मुलगी. सुटीसाठी ती आजी-आजोबांकडे गावाला जाते आणि तिथल्या जगात रमते. अनेक नव्या गोष्टी शिकते. पापड बनवणे, सहलीला जाणे, सयकल चालवायला शिकणे याबरोबरच तिला नवी मित्रमंडळीही मिळतात. एक दिवस ती गावाजवळच्या रानात आपल्या मित्रमंडळींबरोबर सहलीला जाते. तेव्हा तिला पायऱ्या असलेल्या एका जुन्या विहिरीचा शोध लागतो. या विहिरीची दंतकथा तिने आपल्या आजीकडून ऐकलेली असते. अनुष्काची शाळेची सुटी संपते आणि ती शहरात परत जाते. तिथपर्यंत हा कथाभाग आहे. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MANSA ASHI ANI TASHIHI
MANSA ASHI ANI TASHIHI by RAVINDRA BHAGAVATE Rating Star
ठाणे वार्ता ८ डिसंबर २०२३

कथा लेखक रवींद्र भगवते हे पटकथा, संवाद लेखक,नाटककार, अनुवादक, कवी आणि निवेदक आहेत. त्यांनी महाराष्ट्र टाईम्स, साप्ताहिक लोकप्रभा, शब्द रुची, माहेर, रणांगण, गप्पागोष्टी यांमधून कथालेखन केले आहे. काही कथासंग्रह आपल्याला झपाटून टाकतात. त्यातीलच एक म्हणज भगवते यांचा हा कथासंग्रह ! `माणसं अशी आणि तशीही` हा कथासंग्रह हातात घेतला की, अधाशासारखा वाचून झाल्यानंतरच आपल्या मनाला तृप्ती मिळते. नंतर कित्येक दिवस त्यातील पात्रांच्या नशेची झिंग काही उतरत नाही. एक एक कथा वाचत पुढे गेलो की मनात अनेक अस्वस्थ भावनांचे थैमान सुरू होते. खर तर चांगल्या लेखनाचे हेच लक्षण असते की, श्री, ते वाचकांच्या बधीर संवेदना जाग्या करते. तरल मनाचे संवेदनशील कथाकार रवींद्र भगवते यांच्याकडून कोणत्या पात्राला कसा न्याय द्यायचा हे शिकायला मिळते. त्यांनी उभ्या केलेल्या व्यक्तिरेखा आपल्या आजू‌बाजूला फिरत असतात. रोजच्या आयुष्यात भेटतात. `माणसं अशी आणि तशीही` हा कथासंग्रह हाती घेतल्यानंतर त्याचे मुखपृष्ठच आपले लक्ष वेधून घेते. निळाशार अथांग असा समुद्र, त्यामध्ये संथ वाहणारी नाव, स्त्री आणि पुरुषाचे एकमेकांकडे पाहणारे रेखाटलेले चेहरे आणि त्यांच्या डोळ्यांत दिसणारे एकमेकांचे प्रतिबिंब, (जणू काही स्त्री आणि पुरुष हे एकमेकांशिवाय अपूर्णच) `माणसं अशी आणि तशीही` या कथासंग्रहाबद्दल सरदार जाधव यांनी रेखाटलेले हे मुखपृष्ठ खूप काही सांगून जाते. एकेक कथेचा परामर्ष घेत केलेली अतिशय समृद्ध अशी प्रस्तावना ज्येष्ठ, श्रेष्ठ कथा लेखक चांगदेव काळे यांनी लिहिली आहे. या कथा सुंदर का आहेत याविषयी काळे यांनी दिलेली कारणमीमांसा नक्कीच वाचनीय आहे. या संग्रहात एकूण सोळा कथांचा समावेश केला आहे. त्यातील पंधरा कथा लघुकथा या प्रकारात मोडतात तर `अमृता` ही कथा दीर्घ कथा या प्रकारात येते. `अमृता` या कथेत, निशिकांतची आई-बहिण या अमृताला समजून घेऊ शकत नव्हत्या. तेव्हा सहजपणे समाजातील लोकांची गतिमंद माणसाकडे पाहण्याची दृष्टी एका वाक्यातच विशद केली आहे.बरेच लोक मतिमंद किंवा गतिमंद माणसांना समजू शकत नाहीत, ते असं त्यांना लांबून न्याहाळत बसतात. `अमृता` ही या कथासंग्रहातील पहिली कथा तर `रावसाहेब` ही शेवटची कथा पण या दोन्ही कथेमध्ये गतिमंद मुलीची एक वेगळीच कर्म कहाणी आहे. `अमृता` या कथेतील प्रभू काका म्हणजेच अमृताचे वडील यांची एक वेगळीच छाप मनावर उमटते. आपली गतिमंद असणारी मुलगी अमृता हिचं आपल्यानंतर कसे होणार याची काळजी त्यांच्या मनात सतत भेडसावत असते. जेव्हा त्यांच्या लक्षात येते की, अमृताला निशिकांत आवडतो, तेव्हा त्यांच्याकडे येणारा विमा एजंट निशिकांत याला दोन करोड रुपये आणि बंगला देण्याचे कबूल करून निशिकांत आणि अमृताचा त्यांनी लावून दिलेला विवाह, निशिकांत, सुनंदा या पात्र पात्रांची चित्रणे, वाचकाला अनुभवाच्या वेगळ्याच पातळीवर नेऊन ठेवतात. मानसिक गरजेइतकीच व्यक्तीची शारीरिक गरज किती महत्त्वाची आहे ते कथा लेखक भगवतेनी अगदी अचूक मांडले आहे. उदा. `कामदेवानं त्याचं अमृताच्या हातातलं बोट काढलं आणि भारल्यासारखा निशिकांत सुनंदाच्या रुमकडे चालू लागला, तो तिच्या शयनमहालात कधी आला, हे त्याचं त्यालाही कळलं नाही." गतिमंद असणाऱ्या अमृताचा मनापासून सांभाळ करणाऱ्या निशिकांतनं शरीराची भूक भागविण्यासाठी सुनंदाशी केलेलं दुसरं लग्न, आणि अमृताला सुनंदा त्रास देतेय म्हणून तिच्याशी अबोला धरलेला निशिकांत... पण कितीही झाले तरी अन्न, वस्त्र, निवाऱ्याइतक्याच शरीराच्या असणा-या गरजा भागवणे हे देखील नितांत गरजेच आहे. म्हणूनच कितीही झाले तरी तो अमृताचे हातातील बोट सोडवून सुनंदाकडेच जातोच. अमृता, निशिकांत आणि सुनंदा या तीन प्रमुख पात्रांभोवती फिरणारी ही कथा वाचकाला खिळवून ठेवते. रावसाहेब ही कथा मात्र टिपिकल मर्डर मिस्टरी असली तरी ज्या ज्या व्यक्तींकडे संशयाची सुई वळते त्या त्या व्यक्तिरेखा उसठशीत झाल्यामुळे वाचकाला विचार करायला निश्चित भाग पाडते. `अमृता` या कथेतील गतिमंद अमृता असू दे, नाही तर `राबसाहेब` या कथेतील गतिमंद संगीता असू दे त्यांचा समजूतदारपणा शहाण्या सुरत्या बाईलाही जमणार नाही. भगवते यांनी साकारलेल्या पात्रांच्या जगण्यात पराकोटीचे वैविध्य आणि विषमता ठासून भरलेली आहे त्यातून ते आपापल्या वाट्याला आलेल्या परिस्थितीशी कशी झुंज देतात किंवा जुळवून घेतात. याचा चलतचित्रपट जणू डोळ्यासमोर उभा राहतो. यातल्या कथा पुन्हा पुन्हा वाचाव्यात इतक्या चांगल्या आहेत. `तिनं सवत आणली` या कथेत, आजोबांनी कमला काकी आणि शंकरकाकांकडे बघून त्यांच्या मनातील शब्दबद्ध केलेला विचार, `मला महाभारताची आठवण झाली. जरासंधाच्या जनानखान्यात कैद केलेल्या सोळा हजार स्त्रीयांशी श्रीकृष्णानं विवाह केला होता. हा शंकर नव्हे... साक्षात कृष्ण आहे.` एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीच्या भावना समजू शकते त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे कमलाकाकी, बाबू गुंडाने आणि त्याच्या सोबतच्या चार पाच व्यक्तींनी सुमनवर केलेला बलात्कार, त्यातून तिला गेलेले दिवस, अशा मुलीशी कोण लग्न करणार करणार म्हणून कमलाकाकीनं घेतलेला निर्णय आणि त्या निर्णयाची फलश्रुती याविषयी मुळातूनच ही कथा वाचायला हवी. एक मात्र खरं की भगवते यांच्या कथेतील पात्रे ही समजूतदारपणे वागतात. `कुलूप` या कथेत उद्वेगामध्ये दीपा पंडित समोर विकी ठाकूरने काढलेले उद्वार, `स्साला.... हा इतिहासच त्रास देतोय मला. इतिहासाचं काय असतं, तो बिघडत असताना आपल्याला जाणवत नाही; पण एखाद्या भुतासारखा तो आपल्या मानगुटीवर बसतो. विकी ठाकूरला दीपाच्या आक्रमक सौंदर्याची जी भुरळ पड़ते तिला दीपा कसं तोंड देते ते लेखकाच्या खास शैलीत वाचण्यासारखं आहे. `इंटरव्ह्यू` या कथेतील गावावरून आलेला विठ्ठल अडचणींचा सामना करत नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. त्यांनी साकारलेल्या पात्रांमध्ये जिद्द आहे, सकारात्मकता आहे. त्यांच्या `लाल टिकली` या कथेतील उर्मिला हिचा नवरा अपघातामध्ये मरण पावतो. तिला समजते त्याच्या सोबत कुणी सिमरन नावाची तरुणीदेखील होती. हे समजल्यावर ऊर्मिला मृत नवऱ्याच्या चारित्र्याचा शोध घेण्यासाठी बाहेर पड़ते तेव्हा तिला काय शोध लागतो ? शोध संपवूनच ती मुंबईला परत जाते. त्यांच्या कथेतील नायिका या जिद्दी आहेत. त्यांच्या मनात आलेल्या गोष्टी तडीस नेऊनच त्या शांत बसतात. त्यांची कथालेखनावर उत्तम पकड आहे. त्यांच्या प्रत्येक कथेतील व्यक्तिरेखा साकार करताना तिचा मनोविश्लेषणात्मक वेध ते इतक्या सूक्ष्मतेने घेतात म्हणूनच या व्यक्तिरेखा आपल्यापुढे जिवंतपणे उभ्या राहतात. त्यांच्या `गॉगल` या कथेतील घरकाम करणाऱ्या संगीतावर रिबानचा गॉगल चोरल्याचा निकिता आरोप करते. एखादा आरोप प्रामाणिक माणसाला कसा अस्वस्थ करतो तो अस्वस्थपणा या कथेत छान टिपला आहे. त्यांच्या कथेतील पात्रांचे परस्परांशी असलेले नातेसंबंध कथाविषयाचे बीज आणि त्याला अनुसरून केलेली कथेची मांडणी यातून लेखकाच्या सहजाविष्काराचं सामर्थ्य लक्षात येतं. प्रवाही भाषाशैली, तिच्यातील संवेदनशीलता आणि खिळवून ठेवणारं कथाबीज यामुळे वाचक या कथांमध्ये गुंतत जातो आणि मानवी स्वभावाचे विविध नमुने पाहून स्तिमितही होतो. लेखक भावविश्वात खोल खोल उतरत जातो आणि त्यातून प्रत्येक कथा तिच्या आंतरिक गाभ्यासह वाचकांच्या मनाला एक वेगळीच अनुभूती देऊन जाते. त्यांच्या `वर्तुळ` या कथेतील अशोक याला प्लॅटफॉर्मवर धावणारी आपली बायको थोडीशी स्थूल वाटते, त्याला ती नकोशीही वाटते. त्याच्या बाजूने जाणारा तरुण-तरुणींचा सुगंधी घोळका पाहून लगेच त्याच्या मनात विचार येतो, अशाच एखाद्या फुलासी आपलं लग्न व्हायला पाहिजे होतं. मग काय सुगंधच सुगंध... आकाशाएवढा त्याच्या मनातलं हे वादळ शमतं का याचं उत्तर ही कथा सकारात्मक पद्धतीने देते. वास्तव जीवनात पाहण्यात येणारे सर्वसामान्यांचं जगणं, त्याची हतबलता, त्यांचं सोसणं, परिस्थितीला शरण जाण्याची वृत्ती, त्यांमधील ताणतणाव यांसारख्या वास्तवातून सापडणारी कथाबीजं लेखकाला जितकी अस्वस्थ करतात, तितकीच त्या कथा वाचणाऱ्यांनाही अस्वस्थ करून जातात. वास्तवातून फुललेल्या या कथेची पातळी वैयक्तिक अनुभवाची न राहता तिला विशाल सामाजिक भावविश्वाचं अधिष्ठान प्राप्त होतं. त्यांच्या अनेक कथामधून काळाची पावले उमटताना दिसतात. त्यांची `अनामिका` ही कथाही मनाला चटका लावून जाते. या कथासंग्रहाची महत्त्वाची वैशिष्ट्ये म्हणजे त्यांच्या कथेतील सर्व पात्रे ही सहज भावनेनं वावरतात. मानवी जीवनमूल्यांची जिवापाड जपणूक करताना दिसतात. कथा विषय नेहमीचेच असले तरी लेखकाची कथा मांडणीची शैली वेगळी आहे. कसदार लेखन, भाषेचा वेगळेपणा, शब्द चमत्कृतीचा नेमका वापर, आटोपशीर प्रसंग अशा अनेक जमेच्या बाजू `माणसं अशी आणि तशीही या कथासंग्रहात दिसतात. त्यांच्या कथा विचार करायला लावतात, या कथासंग्रहातल्या इतर कथांमध्येही लेखकाने अनेक नाविन्यपूर्ण विषय हाताळलेले आहेत. प्रत्येकाने आवर्जून वाचावा आणि आपल्या संग्रही ठेवावा. असा हा कथासंग्रह, कथाकार रवींद्र भगवते यांनी असेच लिहीत जावे, हीच मनःपूर्वक सदिच्छा. त्यांच्या साहित्य सेवेस सुयश चिंतिते. ...Read more

THE HUNGRY TIDE
THE HUNGRY TIDE by AMITAV GHOSH Rating Star
जयश्री सोनवणे

बंगालमधील सुंदरबनच्या पार्श्वभूमीवर ही कादंबरी जन्म घेते कादंबरीत मुख्य पात्रेत अशी चार-पाचच आहेत. कनाई -हा मूळ कलकत्त्याचा पण आता दिलीत राहून तेथे येणाऱ्या परदेशी भाषिकांना दुभाषा पुरवणे हा त्याचा धंदा आहे. पेशाने तो भाषांतरकार आहे. स्वतःच्या धंद्ामध्ये खूपच व्यस्त असणारा हा ४२ वर्षाचा तरुण त्याची मावशी नीलिमा हिच्या निर्वाणीच्या आग्रहावरून तिला भेटायला वेळात वेळ काढून लुसीबारीला आलेला आहे. पिया- ही मुळची बंगाली. पण आई-वडील सिएटलला स्थायिक झाल्यामुळे आता अमेरिकन आहे. ती सुंदरबन मधील डॉल्फिनचा अभ्यास करायला इकडे आलेली आहे आणि येताना रेल्वेमध्ये तिची कनाईशी ओळख झालेली आहे. निर्मल नीलिमा- निर्मल नीलिमा हे जोडपे या प्रदेशात राहणाऱ्या गरिबीने ग्रासलेल्या बहुसंख्य लोकांसाठी त्यांच्या उत्कर्षासाठी आपले आयुष्य खर्च करायचे हा आदर्श ठेवून १९७० पासून इथे स्थायिक झालेले आहे लुसीबारी येथे त्यांची बडाबन नावाची संस्था आहे दिली माने येथे दवाखाना काढलेला आहे. मोयना- ही लुसी बारीची स्थानिक तरुणी नीलिमाच्या दवाखान्यात नर्स चं काम शिकत आहे. त्याशिवाय अजूनही बरीच कामं ती करत असावी असे दिसते. कारण कनाई साठी जेवण बनवून आणायचं काम निलिमाने तिला सांगितलं आहे. फोकीर- फोकीर हा मोयनाचा नवरा आहे आणि तिथला मासेमारी करणारा कोळी आहे. खाडीच्या प्रदेशात राहत असल्याने मासेमारी व खेकडे हे मुख्य उपजीवीकेचे साधन आहे आणि ते पकडण्यात तो पटाईत आहे. तसेच त्याला इथल्या खाड्चीयां कण न कण माहिती आहे. होरेन - होरेन हा पण एक निष्णात आणि अनुभवी कोळी आहे आणि फोकीरला तो स्वतःच्या मुलासारखा मानतो. सर डॅनियल हॅमिल्टन नावाचा एक स्कॉटिश माणूस ब्रिटिश सरकारकडून १९०३ झाली ही बेटं असलेली दहा एकर जमीन विकत घेतो आणि तिथे मनुष्यवस्ती वसवण्याचा चंग बांधतो. अनेकांना ही जमीन त्याने फुकट दिली आणि १९२० सालापासून ज्यांच्याकडे मालमत्ता, जमीन काहीच नाही अशा अत्यंत गरीब लोकांना या जमिनीच्या मालकीच्या आशेने इथे येऊन वसाहत करण्यास आवाहन केले.१९७१ साली झालेल्या बांगला युद्धामध्ये आणि १९४७ साली झालेल्या फाळणीमध्ये असंख्य निर्वासितांचे लोंढेच्या लोंढे या बेटांवर आले तेव्हा इथे फक्त वाघ, मगरी, चित्ते, नाग, आणि शार्क मासे यांचे साम्राज्य होते. असंख्य लोक त्यांच्या भक्ष्यस्थानी पडले. जे राहिले जगले ते सतत असुरक्षिततेची मूक भावना घेऊन जगत राहिले. इथे वय वर्ष ३० च्या पुढे जगलेले तरुण खूपच कमी दिसतात. इतकंच नव्हे तर इथल्या स्त्रियांचे नेहमीचे पोशाख सुद्धा विधवेचे वस्त्र धारण करणारे असतात अशी इथली परिस्थिती अत्यंत दारुण आहे. खरंतर या कादंबरीला नायक किंवा खलनायक नाहीच आहे. जर कोणी नायक किंवा खलनायक असेल तर तो निसर्ग आहे, ती भरती-ओहोटी आहे. इथले वाघ, मगरी, साप हे सर्व खलनायक आहेत. इथले वादळी वारे, पाण्याचे सतत बदलते प्रवाह आहेत जे इथल्या मनुष्य जीवनाला कधी होत्याचे नव्हते करून टाकतील हे सांगता येत नाही. फाळणी नंतर आणि युद्धानंतर देशोधडीला लागलेले असंख्य लोक इथे आले. ते अत्यंत गरीब होते. इथल्या भरती ओहोटी, लहरी निसर्ग, हिंस्र प्राणी यांच्याशी आपल्या अस्तित्वासाठी ते लढू लागले. त्यांना जात, धर्म, कूळ, वंश यांच्याशी काही देणंघेणं नव्हतं. कारण त्यांच्या अस्तित्वाची लढाईच एवढी बिकट होती की या कशाचं भान असण्याची परिस्थितीच नव्हती. आणि या सर्व लोकांना घुसखोर ठरवून सरकारी अधिकाऱ्यांकडून त्यांना कायम त्रास दिला जात होता. तुरुंगात डांबलं जायचं आणि गोळीबारात मारलं जायचं. निर्मला मात्र क्रांतीसाठीही परिस्थिती अगदी योग्य वाटायची. आपण जेव्हाही कादंबरी वाचायला घेतो तेव्हा ती आपल्या मनाची इतकी पकड घेते की शेवटपर्यंत आपण ती सोडू शकत नाही. संपूर्ण कथानक बाळबोधपणे काळानुसार एका सरळ रेषेत न जाता नदीसारखं वळण घेत, कधी भूतकाळाच्या खाच खळग्यात अडकत, साचत पुढे जाते. मध्येच ते खूप प्रवाही होते, मध्येच संथ होते आणि मध्ये मध्ये निसरड्या शेवाळ्याप्रमाणे फसवं होत जातं. श्री अमिताभ घोष यांचे मूळ इंग्रजी पुस्तक मराठीतून वाचताना हे लक्षात येतं की अनुवादकार श्री. सुनील करमरकर यांची मराठी भाषेवरची पकड ही तितकीच पक्की आहे जितकी त्यांची इंग्रजी भाषेवर पक्की पकड आहे. कादंबरी इंग्रजीत वाचून त्याचा रसास्वाद घेणे ही सहज साध्य गोष्ट आहे. पण त्यातील तरलता आणि जीवनानुभवाला यत्किंचितही धक्का न लावता त्याचा मराठीत अनुवाद करणं हे खूप आव्हानात्मक आहे आणि हे आव्हान सुनील करमरकर यांनी यशस्वीपणे पेललेले आहे. मुळात इंग्रजी भाषेचा बाज, त्याची वाक्यरचना मराठी भाषेपेक्षा खूपच वेगळी असते. पण ही कादंबरी मराठीतून वाचताना कुठेही असं जाणवत नाही की हा अनुवाद आहे म्हणून. ही कादंबरी मुळात मराठीतच लिहिली गेली असावी असं वाटावं इतकी ती अस्सल उतरली आहे. माणसाच्या नात्यातील भावनांचा कल्लोळ आणि दुसरीकडे निसर्गाच्या लहरी स्वभावाचा कल्लोळ याचे चित्र रेखाटताना केलेली शब्दांची गुंफण खूपच विस्मित करणारी आहे. कादंबरी वाचताना ती माणसे, कांदळवनाचे जाळे, पाण्याचा आणि जंगलाचा गूढपणा, दरारा बसवणारं वादळ या गोष्टी जशाच्या तशा आपल्यासमोर उभ्या राहतात. श्री. सुनील करमरकर यांच्या भाषा कौशल्याचा हा परिणाम आहे. आजच्या काळात जिथे एका मराठी वाक्यात दोन इंग्रजी शब्द नसतील तर आपल्याला कमी लेखले जाईल ही भावना घेऊन भाषेचा वापर करणाऱ्या, न्यूनगंडात गेलेल्या मराठी माणसासाठी ही कादंबरी म्हणजे मराठी अस्खलीतपणाचे उदाहरण आहे. कुठेही अर्थाला, आशयाला, प्रासंगिक वर्णनाला बाधा न आणता मराठी भाषेचे वैभव श्री. सुनील करमरकर आपल्या लिखाणातून, अनुवादातून उलगडत जातात. त्यांनी हे सर्व लिखाण करताना घेतलेले कष्ट नक्कीच जाणवतात. श्री सुनील करमरकर यांचे हे पहिले अनुवादित पुस्तक आहे यावर विश्वास बसणार नाही इतके हे पुस्तक उत्तम झाले आहे. ...Read more