* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: MADHUMEHA : EK AAVHAN
  • Availability : Available
  • ISBN : 9788177664102
  • Edition : 7
  • Publishing Year : JUNE 2003
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 176
  • Language : MARATHI
  • Category : HEALTHCARE & PSYCHOLOGY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
MODERN LIFE HAS BESTOWED MANY BENEFITS UPON US, BUT IT HAS CURSED US IN MANY WAYS. DIABETES IS ONE SUCH CURSE. IT IS VERY ESSENTIAL TO CONTROL DIABETES, NOT ONLY PERSONALLY BUT SOCIALLY AS WELL. THE PERCENTAGE OF DIABETES IS INCREASING DAY BY DAY, GLOBALLY. THIS BOOK IS ESPECIALLY WRITTEN TO GIVE US DETAILED INFORMATION ABOUT THIS DISEASE. IT STARTS WITH THE INTRODUCTION OF DIABETES AS WELL AS THE FACTORS RESPONSIBLE FOR IT AND ITS SYMPTOMS. TILL DATE, THERE IS NO PERFECT CURE FOR DIABETES. DIABETES CAN BE CONTROLLED PERFECT AND PROPER DIET, TIMELY MEDICINES AND REGULAR EXERCISE HELP TO KEEP A CONTROL OVER DIABETES. THERE ARE A FEW REMEDIAL SUGGESTIONS TO KEEP THE DISEASE FROM GETTING WORST THOUGH. THIS BOOK TELLS US IN DETAIL THE WORST ADVERSE EFFECTS DUE TO DIABETES. THE APPENDIX GUIDES US TO CONTROL THIS DISEASE. BOTH DR. ARUNA JAIN AND DR. ASHOK BIRBAL JAIN ARE THE DIRECTORS OF THE DIABETES, HEART DISEASE AND ASTHMA CURE CENTER, AT WARDHA.
आधुनिक युगातील जीवनशैलीमुळे माणसासमोर जी आव्हाने उभी राहिली आहेत त्यामध्ये मधुमेहाचे आव्हान गंभीर आहे; एवढेच नव्हे तर जगात मधुमेहाचे प्रमाण वाढत आहे. ‘मधुमेह : एक आव्हान’ यामध्ये मधुमेहाचा परिचय करून देत असता या आजाराला जबाबदार घातघटक आणि आजाराची लक्षणे याचे विवेचन केले आहे. मधुमेहावर अद्याप परिणामकारक उपाय सापडला नसल्याने त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य आहार, औषधोपचार आणि व्यायाम यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या पुस्तकात त्याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. आजार उग्र न होण्यासाठी प्रतिबंधक उपाय सुचवले आहेत, त्याचबरोबर मधुमेहाचे दुष्परिणाम यावर विवरण आहे. यातील परिशिष्टे आजार नियंत्रण प्रभावीपणे कसे करायचे याकरता उपयुक्त आहेत. डॉ. अरुणा जैन आणि डॉ. अशोक बिरबल-जैन हे वर्धा येथील मधुमेह, हृदयरोग व अस्थमा निवारण केंद्र यांचे संचालक आहेत.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
# मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLIN EMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% # सुधापाटील #SUDH PATIL #HEALTHCARE & PSYCHOLOGY #बालपरिचर्या #BALPARICHARYA #ASHOK BIRBAL JAIN #ARUNA ASHOK JAIN #अशोकबिरबलजैन #अरुणाअशोकजैन #मधुमेह : एक आव्हान #MADHUMEHA : EK AAVHAN #
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAMANA 03-08-2003

    आधुनिक काळात मधुमेह या आजाराचे प्रमाण खूप वाढते आहे. एकदा हा आजार झाला की तो घेऊनच माणसाला आयुष्य काढावे लागते. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य आहार, औषधोपचार आणि व्यायाम यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. डॉ. अरुणा जैन आणि डॉ. अशोक बिरबल जैन या वर्ध्ाच्या. मधुमेह, हृदयरोग व अस्थमा निवारण केंद्राच्या संचालकांनी मधुमेहाविषयी सविस्तर माहिती देणारे मधुमेह- एक आव्हान हे पुस्तक लिहिले आहे. आजार उग्र न होण्यासाठी प्रतिबंधक उपाय, मधुमेहाचे दुष्परिणाम याबद्दल महत्त्वपूर्ण माहिती या पुस्तकात आहे. ...Read more

  • Rating StarJMGIMS, SEPT-2003

    The last 2-3 decades have brought in the great epidemiological transition with a spectacular increase in the incidence and prevalence of the life style diseases including Diabetes Mellitus, hyper­tension and coronary heart disease. It is estimated tht the population of diabetics in India will be approxi­mately 60 million by the year 2025, there by having an enormous impact on morbidity, and mortality and a severe drain on resources of the country. Naturally it needs to be contained and prevented. Non-adherence is the basic problem in many a chronic diseases more so with the Diabetes when therapy is itself loaded with so many restrictions. In fact self management is the key to appropriate management of the disease. This necessitates the patients’ education to ensure that skills are acquired especially when it comes to proper use of drugs. Information, education and communication are the two way exchange between the patient and doctor and provision of a brief, selective, customized and written information about the disease and its man­agement will go a long way in helping the patient as well as community. The present monograph is authored by a practicing pathologist and a physician is significant wherein they have poured in their long experiences of public relations and clinical practice. There are 30 small chapters & 14 appendices. In the preface itself authors take up the myths about Diabe­tes which are almost engraved in the minds of the people, educated and illiterate both and emphasize that through health education it is possible to make whole process of its management patient friendly. The beauty of the monograph is its precise text in the form of Question and Answers comprising maximum and latest, scientific and useful informa­tion in simplest possible syntax in vernacular (Marathi) which is the need of the day. All possible questions asked by the patients or may be in their mind, the authors have tried to answer beginning from the definitions of various terms which other­wise may confuse any body, to the complexities like significance of glycocylated hemoglobin (CH.5), hypoglycemia unawareness (Ch. 10), lipid profile (Ch. ll). Also some of those questions which people hesitate to ask or do not ask have been dealt with like Diabetes and sex, when you observe fast or you are traveling and diabetes in elderly etc. The chapter on pregnancy and diabetes is very appropriate. The five point programme for the management of Diabetes is nicely elaborated and illustrated in various chapters and the appendices. Later part of the monograph covers the optimum daily require­ment of calories, food articles (beside the balanced diet in chapter 7), and useful exercise. In his forewords Justice (Retd.) C. S. Dharmadhikari writes “by reading this book patient may become partly his own doctor helping himself in the management of Diabetes”. He further quotes a letter written by Mahatma Gandhi to Shree Gopal Krishna Gokhale about how to manage diabetes and what precautions need to be taken and puts it as one of the good book for public education. All academic institutions’ ultimate objective is public service hence they must assess the needs and to take appropriate action there after. For management of such diseases like Diabetes public education is very essential particularly when India is labeled as world capital for diabetes. A readable literature provided to the public in their own language is more beneficial rather than one written in scientific jargons. Madhumeha EK Awhan by Dr Aruna Jain and Dr Birbal Jain will definitely serve the purpose. It will also help general practi­tioner in guiding their patients. Dr OP Gupta, Professor, Deptt. of Medicine MGIMS, Sevagram ...Read more

  • Rating StarDAINIK LOKSATTA

    मधुमेहांसाठी माहितीपर पुस्तक... आधुनिक काळातही मधुमेहाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून अद्याप त्याच्यावर ठोस प्रतिबंधात्मक उपचाराचा शोध लागलेला नाही. या विकाराविषयी वर्ध्याच्या मधुमेह, हृदयरोग व अस्थमा निवारण केंद्राचे संचालक डॉ. अरुणा जैन व डॉ. अशोक िरबल जैन यांनी संयुक्तरित्या ‘मधुमेह एक आव्हान’ हे अतिशय माहितीपर पुस्तक लिहिले आहे. मधुमेहाचा परिचय, त्याला कारणीभूत ठरणारे घटक, त्याची लक्षणे, त्यावर नियंत्रणासाठी आवश्यक आहार, औषधोपचार, व्यायाम, त्याचे दुष्परिणाम, विविध वयोगटांतील मधुमेहींसाठी खास काळजी इत्यादींचे सुबोध भाषेतील मार्गदर्शन हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य, केवळ मधुमेहीच नाही तर त्यांचे नातलग आणि सर्वसामान्यांनाही उपयुक्त ठरणारे असे हे पुस्तक आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more